Author Archives: Kokanai Digital

जिल्हापरिषद निवडणूका आणि आंगणेवाडी जत्रेसाठी मुंबई पुण्याहून कोकणात जाण्यासाठी विशेष गाड्यांची मागणी

   Follow us on        

मुंबई | जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका ७ फेब्रुवारी २०२६ रोजी होणार असून, त्यानंतर ९ फेब्रुवारी २०२६ रोजी कोकणातील अतिशय महत्त्वाचा धार्मिक उत्सव आंगणेवाडी जत्रा पार पडणार आहे. यामुळे ६ ते १० फेब्रुवारी २०२६ या कालावधीत मुंबई/पुणे ते कोकण व कोकण ते मुंबई/पुणे मार्गावर प्रवाशांची अभूतपूर्व गर्दी होण्याची दाट शक्यता आहे.

या काळात मतदार, मतदान व शासकीय कर्मचारी, सुरक्षा दल तसेच आंगणेवाडी जत्रेसाठी जाणारे व परतीच्या प्रवासातील लाखो भाविक मोठ्या संख्येने प्रवास करतील. मागील अनुभव लक्षात घेता, कोकण रेल्वे मार्गावरील सध्याच्या नियमित गाड्या ही अतिरिक्त गर्दी हाताळण्यासाठी अपुऱ्या ठरण्याची शक्यता असून, यामुळे प्रचंड गर्दी, प्रतीक्षा यादी (वेटिंग), तसेच प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागू शकतो.

या पार्श्वभूमीवर, ६, ७, ८, ९ आणि १० फेब्रुवारी २०२६ रोजी अतिरिक्त विशेष रेल्वे गाड्या चालवाव्यात, अशी ठाम मागणी कोकण विकास समिती (शहरी व ग्रामीण विभाग) यांच्यावतीने करण्यात आली आहे. या प्रस्तावित विशेष गाड्यांचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे असावे अशी विनंती कोकण विकास समिती तर्फे करण्यात आली आहे.

या विशेष गाड्यांमुळे कोकणकडे जाणाऱ्या व येणाऱ्या विद्यमान सेवांवरील ताण मोठ्या प्रमाणात कमी होईल, निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडण्यास मदत होईल, तसेच आंगणेवाडी जत्रेसाठी येणाऱ्या भाविकांचा प्रवास सुरक्षित व शिस्तबद्ध होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

तातडीने निर्णयाची अपेक्षा

मागणी निश्चित असून नियोजनासाठी वेळ मर्यादित असल्याने, या विशेष गाड्यांना लवकर मंजुरी देऊन तातडीने अधिसूचना जारी करावी, अशी जोरदार विनंती करण्यात आली आहे. वेळेत सकारात्मक निर्णय झाल्यास प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल आणि स्थानिक प्रशासनालाही नियोजनात मदत होईल.

ही मागणी जयवंत शंकर दरेकर व अक्षय मधुकर महापदी (कोकण विकास समिती – शहरी व ग्रामीण विभाग) यांच्या वतीने करण्यात आली आहे.

कोकण रेल्वे मार्गावर आज आणि उद्या धावणार ‘वीकेंड स्पेशल’ एक्सप्रेस

   Follow us on        

रत्नागिरी/सिंधुदुर्ग :आठवड्याच्या शेवटी होणारी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता, रेल्वे प्रशासनाने मडगाव जंक्शन ते लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) दरम्यान विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. ही गाडी दोन्ही दिशांनी प्रत्येकी एक फेरी पूर्ण करेल.

​गाड्यांचे वेळापत्रक खालीलप्रमाणे:

​१. मडगाव – लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष (०१००४):

ही गाडी शनिवारी, ३१ जानेवारी २०२६ रोजी मडगाव जंक्शन येथून दुपारी १६:३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी (रविवारी) पहाटे ०५:५० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.

​२. लोकमान्य टिळक टर्मिनस – मडगाव विशेष (०१००३):

ही गाडी रविवारी, १ फेब्रुवारी २०२६ रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सकाळी ०७:५५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री २२:०० वाजता मडगाव जंक्शन येथे पोहोचेल.

गाडीचे थांबे:

या विशेष ट्रेनच्या प्रवासादरम्यान प्रवाशांच्या सोयीसाठी करमाळी, थिविम, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, विलवडे, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पेण, पनवेल आणि ठाणे या स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत.

​गाडीची रचना (Composition):

​या विशेष ट्रेनला एकूण २० डबे असतील. यामध्ये:

​१८ स्लीपर क्लास डबे.

​०२ एसएलआर (SLR) डबे.

​मुंबईत परदेशी महिला पर्यटकाची फसवणूक; ४०० मीटरच्या प्रवासासाठी लुटले १८ हजार रुपये, टॅक्सी चालकाला अटक

   Follow us on        

मुंबई: मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका अमेरिकन महिला पर्यटकाला अवघ्या ४०० मीटर अंतरासाठी १८ हजार रुपये (२०० डॉलर्स) आकारून लुबाडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सहार पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत ५० वर्षीय टॅक्सी चालक देशराज यादव याला अटक केली आहे. पीडित महिलेने सोशल मीडियावर आपली कैफियत मांडल्यानंतर पोलिसांनी या घटनेची स्वतःहून दखल (Suo-motu FIR) घेतली आणि अवघ्या तीन तासांत आरोपीला बेड्या ठोकल्या.

​मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला विमानतळावर उतरल्यानंतर जवळच असलेल्या ‘हिल्टन’ या पंचतारांकित हॉटेलमध्ये जाण्यासाठी टॅक्सीत बसली होती. हॉटेलचे अंतर अवघे ४०० मीटर असतानाही, चालकाने तिला थेट हॉटेलवर न नेता अंधेरी पूर्व परिसरात सुमारे २० मिनिटे फिरवले. तिला एका अनोळखी ठिकाणी नेऊन भीती दाखवण्यात आली आणि त्यानंतर हॉटेलवर सोडण्यासाठी १८ हजार रुपयांची मागणी केली गेली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने टॅक्सी क्रमांक (MH 01 BD 5405) आणि आपला अनुभव सोशल मीडियावर शेअर केला होता. पोलिसांनी या प्रकरणी टॅक्सी जप्त केली असून पुढील तपास सुरू आहे.

Konkan Railway: आंगणेवाडीच्या जत्रेसाठी कोकणात जाणार्‍या भाविकांसाठी खुशखबर! ‘या’ विशेष गाडीला मुदतवाढ

 

   Follow us on        

Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता, रेल्वे प्रशासनाने सुरत-मंगळुरू-सुरत विशेष गाडीला (०९०५७/०९०५८) मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची आणि दक्षिण भारतात जाणाऱ्या प्रवाशांची मोठी सोय होणार आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रति पंढरपूर अशी खास ओळख असलेल्या आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी देवीची जत्रा 9 फेब्रुवारी 2026रोजी होणार आहे या गाडीच्या मुदतवाढी मुळे या जत्रेसाठी कोकणात जाणार्‍या भाविकांची सोय होणार आहे.

गाड्यांचे वेळापत्रक आणि दिवस:

गाडी क्र. ०९०५७ (सुरत ते मंगळुरू): ही गाडी १ ते २५ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत दर बुधवारी आणि रविवारी धावेल.

गाडी क्र. ०९०५८ (मंगळुरू ते सुरत): ही गाडी २ ते २६ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत दर गुरुवारी आणि सोमवारी धावेल.

आरक्षण तपशील:

गाडी क्र. ०९०५७ साठीचे आरक्षण ३१ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ८:०० वाजल्यापासून सुरू होणार आहे.

गाडीचे थांबे:

ही गाडी प्रवासादरम्यान महत्त्वाच्या स्थानकांवर थांबणार आहे, ज्यात प्रामुख्याने यांचा समावेश आहे: उधना, वलसाड, वापी, पालघर, वसई रोड, भिवंडी रोड, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवी, करमळी, मडगाव, कारवार, गोकर्ण रोड, मुरूडेश्वर, उडुपी आणि सुरतकल.

गाडीची रचना (Coaches):

प्रवाशांच्या सोयीसाठी या गाडीत खालीलप्रमाणे डबे असतील:

६ शयनयान (Sleeper)

१० वातानुकूलित तृतीय श्रेणी (3AC)

१ वातानुकूलित द्वितीय श्रेणी (2AC)

२ सामान्य द्वितीय श्रेणी (General)

२ एसएलआर (SLR)

उधना, वलसाड, वापी, पालघर, वसई रोड, भिवंडी रोड, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवी, करमळी, मडगाव, काणकोण, कारवार, अंकोला, गोकर्ण रोड, कुमटा, मुरूडेश्वर, भटकळ, मूकाम्बिका रोड बैन्दूर, कुंदापूर, उडुपी, मुळकी आणि सुरतकल.

कर्तव्य पथावर महाराष्ट्राचा डंका! गणेशोत्सवाच्या चित्ररथाला देशात प्रथम क्रमांक

   Follow us on        

नवी दिल्ली: यंदाच्या प्रजासत्ताक दिन संचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथाने बाजी मारली असून, राज्याला राज्यांच्या श्रेणीमध्ये प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे. ‘गणेशोत्सव आणि आत्मनिर्भरता’ या विषयावर आधारित महाराष्ट्राच्या चित्ररथाने उपस्थितांची मने जिंकली. या चित्ररथावर पारंपरिक लेझीम नृत्य सादर करणाऱ्या महिला पथकाने महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडवले. राज्यांच्या या स्पर्धेत जम्मू-काश्मीरने दुसरे, तर केरळने तिसरे स्थान पटकावले आहे.

​लष्करी दलांमध्ये भारतीय नौदलाला सर्वोत्तम संचलन तुकडीचा बहुमान मिळाला आहे. तर निमलष्करी दलांमध्ये दिल्ली पोलीस ही सर्वोत्तम तुकडी ठरली आहे. केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांच्या चित्ररथांमध्ये सांस्कृतिक मंत्रालयाच्या ‘वंदे मातरम’ संकल्पनेवरील चित्ररथाला पहिले पारितोषिक देण्यात आले. या चित्ररथातून वंदे मातरम गीताचा १५० वर्षांचा वारसा आणि बंकिमचंद्र चॅटर्जी यांचे योगदान अतिशय देखण्या पद्धतीने मांडण्यात आले होते.

​लोकपसंती (Popular Choice) श्रेणीमध्ये मात्र निकाल काहीसे वेगळे राहिले. यामध्ये नागरिकांनी आसाम रेजिमेंटला सर्वोत्तम लष्करी तुकडी आणि गुजरातच्या चित्ररथाला राज्यांच्या श्रेणीमध्ये पहिले स्थान दिले आहे. गुजरातच्या चित्ररथाची संकल्पना ‘स्वदेशीचा मंत्र’ यावर आधारित होती. लोकपसंती श्रेणीत उत्तर प्रदेश दुसऱ्या आणि राजस्थान तिसऱ्या क्रमांकावर राहिले. या सर्व विजेत्यांना ३० जानेवारी रोजी एका विशेष सोहळ्यात सन्मानित करण्यात येणार आहे.

मोठी बातमी! उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनामुळे जिल्हापरिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकींच्या वेळापत्रकात बदल

   Follow us on        

मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला असल्यामुळे १२ जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या उर्वरित टप्प्यांमध्ये बदल करण्यात आला असून ५ फेब्रुवारी २०२६ ऐवजी आता ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान; तर मतमोजणी ७ फेब्रुवारी २०२६ ऐवजी ९ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी होईल.

यानुसार संबंधित जिल्हाधिकारी सुधारित #निवडणूक कार्यक्रमाची सूचना ३१ जानेवारी २०२६ रोजी प्रसिद्ध करतील. आता ७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होईल. त्यामुळे जाहीर प्रचाराची समाप्ती ५ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री १० वाजता होईल. संबंधित ठिकाणी ९ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता मतमोजणी सुरु होईल. निकाल जाहीर झाल्यानंतर संबंधित ठिकाणची आचारसंहिता संपुष्टात येईल. निवडून आलेल्या सदस्यांची नावे शासन राजपत्रात ११ फेब्रुवारी २०२६ पर्यंत प्रसिद्ध केली जातील.

मुंबई लोकलच्या मोटर कॅबिनसमोर CCTV कॅमेरे; रेल्वे अपघातांच्या तपासात येणार पारदर्शकता

   Follow us on        

Mumbai: मुंबई उपनगरीय रेल्वेतील अपघातांचे नेमके कारण शोधण्यासाठी आणि तपासात पारदर्शकता आणण्यासाठी मध्य रेल्वेने लोकल गाड्यांच्या मोटर कॅबिनबाहेर हाय-क्वालिटी CCTV कॅमेरे बसवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. रेल्वे माहिती अधिकार कार्यकर्ते समीर झवेरी यांनी माहिती अधिकारांतर्गत (RTI) विचारलेल्या प्रश्नानंतर ही बाब समोर आली आहे.

 

सध्या रेल्वे रुळांवरील अपघात, आत्महत्या किंवा तांत्रिक बिघाड यांसारख्या घटनांच्या तपासासाठी केवळ मोटरमनचे विधान किंवा प्रत्यक्षदर्शींच्या साक्षीवर अवलंबून राहावे लागते, ज्यात अनेकदा विसंगती आढळतात. आता या कॅमेऱ्यांमुळे रेल्वे प्रशासनाकडे ठोस पुरावे उपलब्ध होणार असून, अपघातासाठी मोटरमन जबाबदार आहे की बाह्य घटक, हे स्पष्ट होण्यास मदत होईल. यामुळे मोटरमनवर होणारे खोटे आरोपही थांबतील. मध्य रेल्वेच्या ताफ्यातील १६४ लोकल गाड्यांपैकी १६१ मोटर कॅबिनवर हे कॅमेरे आधीच कार्यान्वित झाले असून, उर्वरित कॅमेरे बसवण्याचे काम वेगाने सुरू आहे. या निर्णयामुळे भविष्यातील रेल्वे अपघात तपास अधिक अचूक आणि पारदर्शक होणार आहे.

Konkan Railway: ४७ प्रवाशांचा हरवलेला मुद्देमाल परत, ४२ मुलांची सुटका: RPF ची उल्लेखनीय कामगिरी.

   Follow us on        

Konkan Railway: कोकण रेल्वेवरील प्रवाशांची सुरक्षितता, संरक्षण आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी रेल्वे संरक्षण दल (RPF) सातत्याने सतर्क, कार्यक्षम आणि संवेदनशील भूमिका बजावत आहे. प्रवासी सुरक्षेच्या दृष्टीने राबविण्यात येणाऱ्या विविध विशेष मोहिमा, तत्काळ कारवाई आणि लोकाभिमुख उपक्रमांमुळे RPF ने उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

ऑपरेशन अमानत अंतर्गत RPF ने रेल्वे परिसरात प्रवाशांकडून चुकून राहिलेल्या वस्तू शोधून काढून तब्बल 47 प्रवाशांना ₹27.93 लाख किमतीचे मौल्यवान साहित्य सुरक्षितपणे परत केले. या कार्यामुळे रेल्वे सुरक्षेवरील प्रवाशांचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.

बालसुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत ऑपरेशन नन्हे फरिश्ते अंतर्गत RPF ने 42 अल्पवयीन मुलांची सुटका केली. या मुलांना पुढील काळजी, संरक्षण व पुनर्वसनासाठी चाइल्ड हेल्पलाईनकडे सुपूर्द करण्यात आले असून, संभाव्य शोषणापासून त्यांचे संरक्षण करण्यात आले आहे.

रेल्वे परिसरातील बेकायदेशीर हालचालींवर आळा घालण्यासाठी राबविण्यात आलेल्या ऑपरेशन सतर्क मोहिमेत RPF ने ₹5.31 लाख किमतीच्या 3,146 बेकायदेशीर दारूच्या बाटल्या जप्त केल्या. यासोबतच 38 दारू तस्करांना अटक करून त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात आली, ज्यामुळे रेल्वे परिसरातील अवैध व्यापाराला मोठा आळा बसला आहे.

कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी RPF ने ACP प्रकारातील 142 प्रकरणे उघडकीस आणून, संबंधित गुन्हेगारांवर रेल्वे कायदा कलम 141 अंतर्गत अटक व खटले दाखल केले. तसेच, जीवन रक्षा उपक्रम अंतर्गत RPF कर्मचाऱ्यांनी तीन प्रवाशांचे प्राण वाचवून आपली कर्तव्यनिष्ठा अधोरेखित केली.

प्रवाशांच्या सामान चोरीच्या घटनांवर कठोर कारवाई करत RPF ने नऊ गुन्हेगारांना अटक केली असून, त्यांच्याकडून ₹67.88 लाख किमतीचे चोरीचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. या कारवाईमुळे प्रवाशांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक बळकट झाली आहे.

ही सर्व कामगिरी RPF च्या सतर्कता, समर्पण आणि प्रवासीहितैषी दृष्टिकोनाचे उत्तम उदाहरण आहे. कोकण रेल्वेवर सुरक्षित, संरक्षित आणि प्रवासीस्नेही प्रवास अनुभव देण्यासाठी RPF चे योगदान अत्यंत मोलाचे ठरत आहे.

Konkan Railway: योग नगरी ऋषिकेश आणि एर्नाकुलम दरम्यान धावणार ‘स्पेशल एक्सप्रेस’

   Follow us on        

एर्नाकुलम: उत्तर भारत आणि दक्षिण भारताला जोडणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाने योग नगरी ऋषिकेश – एर्नाकुलम जंक्शन – योग नगरी ऋषिकेश दरम्यान  स्पेशल एक्सप्रेस गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष गाड्यांमुळे उत्तराखंड, दिल्ली, महाराष्ट्र, गोवा आणि केरळ या राज्यांमधील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

​गाड्यांचे वेळापत्रक आणि मार्ग

​१. ट्रेन क्र. ०४३६० (योग नगरी ऋषिकेश ते एर्नाकुलम जंक्शन): ही गाडी शुक्रवारी, ३० जानेवारी २०२६ रोजी सकाळी ०७:०० वाजता योग नगरी ऋषिकेश येथून सुटेल आणि तिसऱ्या दिवशी रात्री २३:३० वाजता एर्नाकुलम जंक्शनला पोहोचेल.

​२. ट्रेन क्र. ०४३५९ (एर्नाकुलम जंक्शन ते योग नगरी ऋषिकेश): परतीच्या प्रवासात ही गाडी मंगळवारी, ०३ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री २३:०० वाजता एर्नाकुलम येथून सुटेल आणि चौथ्या दिवशी दुपारी १६:१५ वाजता योग नगरी ऋषिकेशला पोहोचेल.

योग नगरी ऋषिकेश आणि एर्नाकुलम जंक्शन दरम्यान धावणारी ही विशेष एक्सप्रेस एकूण ३३ स्थानकांवर थांबणार असून, तिचा मार्ग हरिद्वार, मेरठ सिटी, हजरत निजामुद्दीन, मथुरा, कोटा, नागदा, रतलाम, वडोदरा, सुरत, वसई रोड, पनवेल, रोहा, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, थिविम, मडगाव, कारवार, कुमटा, भटकळ, उडुपी, मंगळूर, कासारगोड, कन्नूर, कोझिकोड, तिरुर, कुट्टिपुरम, शोरानूर, थ्रिसूर आणि अलुआ असा आहे.

​कोचची रचना (Coach Composition) या गाडीत प्रवाशांच्या सोयीसाठी विविध श्रेणींचे एकूण १८ डबे असतील:

​१ डबा: प्रथम श्रेणी सह एसी टू टायर (1st Class Cum AC 2 Tier)

​१ डबा: एसी टू टायर (AC 2 Tier)

​३ डबे: एसी थ्री टायर (AC 3 Tier)

​७ डबे: स्लीपर क्लास (Sleeper Class)

​४ डबे: जनरल सेकंड क्लास (General Second Class)

​२ डबे: लगेज कम ब्रेक व्हॅन

​आरक्षणाबाबत माहिती या विशेष गाड्यांचे आगाऊ आरक्षण (Advance Reservation) २८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ०८:०० वाजेपासून दक्षिण रेल्वेच्या (Southern Railway) केंद्रांवरून आणि आयआरसीटीसीच्या (IRCTC) संकेतस्थळावर सुरू झाले आहे.

​प्रवाशांनी या विशेष सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

सिंधुदुर्ग रेल्वे स्थानकावरील तिकीट आरक्षण खिडकीचे अस्तित्व धोक्यात; रेल्वेकडून एक महिन्याची ‘डेडलाईन’

   Follow us on        

सीबीडी बेलापूर: कोंकण रेल्वे कॉर्पोरेशनच्या मुख्य कार्यालयात २७ जानेवारी रोजी महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघ आणि रेल्वे अधिकारी यांच्यात एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत सिंधुदुर्ग (ओरस) रेल्वे स्थानकावरील आरक्षण प्रणाली (PRS) केंद्राबाबत रेल्वे प्रशासनाने चिंतेची बाब मांडली आहे. प्रवाशांच्या मागणीखातर सुरू करण्यात आलेल्या या आरक्षण खिडकीला सध्या अत्यंत अल्प प्रतिसाद मिळत असून, दिवसाला सरासरी केवळ ७ तिकिटांचे आरक्षण होत आहे. रेल्वेच्या नियमांनुसार, एखादे आरक्षण केंद्र सुरू ठेवण्यासाठी तिथून दिवसाला किमान २५ तिकिटांची विक्री होणे आवश्यक असते.

​प्रवासी महासंघाच्या विनंतीचा मान राखून रेल्वे अधिकाऱ्यांनी हे केंद्र सुरू ठेवण्यासाठी एक महिन्याची मुदतवाढ दिली आहे. जर या काळात प्रतिसादात सुधारणा झाली नाही, तर हे केंद्र कायमचे बंद केले जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघाचे प्रसिद्धी प्रमुख अभिजित धुरत यांनी ओरस, कुडाळ आणि परिसरातील नागरिकांना कळकळीचे आवाहन केले आहे की, त्यांनी मोबाईल ॲपऐवजी प्रत्यक्ष रेल्वे खिडकीवर जाऊन आरक्षण करावे. अपेक्षित २५ किंवा त्याहून अधिक आरक्षणे नोंदवून हे केंद्र वाचवण्यासाठी सहकार्य करावे, अन्यथा हे केंद्र बंद झाल्यास महासंघ जबाबदार राहणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search