Deprecated: Optional parameter $depth declared before required parameter $output is implicitly treated as a required parameter in /home/kokanaii/web/kokanai.in/public_html/wp-content/themes/flatsome/inc/structure/structure-header.php on line 82

Deprecated: Optional parameter $depth declared before required parameter $output is implicitly treated as a required parameter in /home/kokanaii/web/kokanai.in/public_html/wp-content/themes/flatsome/inc/structure/structure-header.php on line 202

Deprecated: Optional parameter $content declared before required parameter $code is implicitly treated as a required parameter in /home/kokanaii/web/kokanai.in/public_html/wp-content/themes/flatsome/inc/shortcodes/accordion.php on line 3

Deprecated: Optional parameter $content declared before required parameter $code is implicitly treated as a required parameter in /home/kokanaii/web/kokanai.in/public_html/wp-content/themes/flatsome/inc/shortcodes/accordion.php on line 18

Deprecated: Optional parameter $content declared before required parameter $tag is implicitly treated as a required parameter in /home/kokanaii/web/kokanai.in/public_html/wp-content/themes/flatsome/inc/shortcodes/tabs.php on line 3

Deprecated: Optional parameter $content declared before required parameter $tag is implicitly treated as a required parameter in /home/kokanaii/web/kokanai.in/public_html/wp-content/themes/flatsome/inc/shortcodes/blog_posts.php on line 3

Deprecated: Optional parameter $content declared before required parameter $code is implicitly treated as a required parameter in /home/kokanaii/web/kokanai.in/public_html/wp-content/themes/flatsome/inc/shortcodes/google_maps.php on line 3

Deprecated: Optional parameter $content declared before required parameter $tag is implicitly treated as a required parameter in /home/kokanaii/web/kokanai.in/public_html/wp-content/themes/flatsome/inc/shortcodes/portfolio.php on line 4
Kokanai Digital, Author at Kokanai - Page 32 of 324

Author Archives: Kokanai Digital

Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर १ मे पासून धावणार ‘विशेष मेमू’; अपुरे डबे व आरंभ स्थानकावरून प्रवासी नाराज

   Follow us on        

चिपळूण:कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने दिवा ते चिपळूण दरम्यान ‘अनारक्षित विशेष मेमू’ ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. ही विशेष सेवा १ मे २०२६ ते ७ जून २०२६ या कालावधीत दर शुक्रवार, शनिवार आणि रविवारी उपलब्ध असणार आहे. सुट्ट्यांच्या काळात होणारी प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून, यामुळे नोकरदार आणि पर्यटकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

​गाडी क्र. ०११५९ (दिवा ते चिपळूण):

दिवा स्थानकावरून ही गाडी रात्री २३:२५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ०६:३० वाजता चिपळूणला पोहोचेल.

​गाडी क्र. ०११६० (चिपळूण ते दिवा):

परतीच्या प्रवासासाठी चिपळूण येथून ही गाडी दुपारी १५:३० वाजता सुटेल आणि त्याच रात्री २३:१० वाजता दिवा स्थानकावर पोहोचेल.

या गाडीचे थांबे: निळजे, तळोजे, कळंबोली, पनवेल, सोमटणे, आपटा, जिते, पेण, कासू, नागोठणे, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सापे वामने, करंजाडी, विन्हेरे, दिवाणखवटी, कळंबणी बुद्रुक, खेड आणि अंजनी

​ही गाडी पूर्णपणे ‘अनारक्षित’ असल्याने प्रवाशांना आगाऊ आरक्षणाची गरज भासणार नाही, ज्यामुळे ऐनवेळी प्रवास करणाऱ्यांना ही सेवा अत्यंत उपयुक्त ठरेल. तरी प्रवाशांनी या विशेष मेमू गाडीच्या वेळापत्रकाची नोंद घेऊन आपल्या प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

कोकण रेल्वे प्रवाशांची नाराजी 

मात्र गाडीच्या डब्यांची संख्या आणि सुरुवातीचे स्थानक यावरून रेल्वे प्रशासनावर सडकून टीका केली जात आहे.

​”ही प्रवाशांची चेष्टा आहे” – अक्षय महापदी

या निर्णयावर प्रतिक्रिया देताना ‘अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती’चे सचिव अक्षय महापदी यांनी रेल्वे प्रशासनावर तीव्र शब्दांत ताशेरे ओढले आहेत. ते म्हणाले की, “मुंबई-कल्याण मार्गावर १५ डब्यांच्या लोकल्स अपुऱ्या पडत असताना, एवढ्या लांब पल्ल्याच्या मार्गावर ही ८ डब्यांची खेळण्यातली गाडी नक्की कोणासाठी सोडली आहे? ८ डब्यांची मेमू सोडून प्रशासनाने कोकणी प्रवाशांची क्रूर चेष्टा केली आहे.”

​दिवा स्थानकावरून गाडी सोडण्यास विरोध

प्रवाशांनी केवळ डब्यांच्या संख्येवरच नाही, तर गाडी सुटण्याच्या ठिकाणावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मुंबईतील बहुतांश प्रवाशांना दिवा स्थानक सोयीचे नाही, ही बाब वारंवार निदर्शनास आणून देऊनही रेल्वे प्रशासन मुद्दाम दिव्यातून गाड्या सोडून प्रवाशांना डिवचत आहे का, असा संतप्त सवाल महापदी यांनी उपस्थित केला आहे.

सुट्ट्यांच्या काळात कोकणात जाणाऱ्यांची गर्दी प्रचंड असते. अशा वेळी ८ डब्यांची गाडी म्हणजे ‘उंटाच्या तोंडात जिरे’ अशी अवस्था असून, या गाडीला डबे वाढवून मिळावेत आणि ती मुंबईतील मुख्य स्थानकावरून सोडावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.

 

मराठी सक्ती: परिवहन मंत्र्यांच्या निर्णयाला ज्येष्ठ साहित्यिक मधू मंगेश कर्णिक यांचा पाठिंबा

   Follow us on        

मुंबई: महाराष्ट्रातील सर्व परवानाधारक रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी १ मे पासून मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतला आहे. या निर्णयानुसार, ज्या चालकांना मराठी लिहिता, वाचता किंवा बोलता येणार नाही, त्यांचे परवाने रद्द करण्यात येतील, अशी कडक ताकीद देण्यात आली आहे. राज्य परिवहन विभागाच्या ५९ प्रादेशिक कार्यालयांच्या माध्यमातून या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी विशेष मोहीम राबवली जाणार आहे.

​या निर्णयाला ९६ वर्षीय पद्मश्री पुरस्कार विजेते आणि ज्येष्ठ साहित्यिक मधू मंगेश कर्णिक यांनी पत्राद्वारे आपला पूर्ण पाठिंबा दर्शवला आहे. मंत्री प्रताप सरनाईक यांनी ट्विटरवर कर्णिक सरांच्या स्वाक्षरीतील पत्राची प्रत शेअर करत, हा आपल्यासाठी मोठा आशीर्वाद असल्याचे म्हटले आहे. कर्णिक यांनी या वयातही मराठी भाषा आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी घेतलेल्या या भूमिकेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

​स्थानिक भाषेचा आदर राखला जावा आणि प्रवाशांशी संवाद साधताना भाषिक अडथळे येऊ नयेत, हा या निर्णयामागचा मुख्य उद्देश आहे. अनेक मराठी संघटनांनी या पावलाचे स्वागत केले असले, तरी काही अमराठी चालक संघटनांनी याला विरोध करत १ मे पासून संपाचा इशारा दिला आहे. मात्र, “महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल तर स्थानिक भाषेचा सन्मान करावाच लागेल,” अशी ठाम भूमिका सरनाईक यांनी घेतली आहे. महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर घेतलेला हा निर्णय राज्यातील भाषिक अस्मिता अधिक बळकट करणारा ठरेल, अशी चिन्हे दिसत आहेत.

राज्यांतर्गत गाड्या बंद करून मध्य रेल्वेचा राज्याबाहेर जाणार्‍या गाड्यांना नियमित करण्याचा सपाटा

   Follow us on        

मुंबई: मध्य रेल्वेने उत्तर भारतातील विशेष रेल्वे गाड्या नियमित करण्याचा सपाटा लावला असून, याच मालिकेत आता ‘छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते रिवा’ या साप्ताहिक एक्स्प्रेसचा समावेश झाला आहे. रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, गाडी क्रमांक २०१५३/२०१५४ रिवा-सीएसएमटी-रिवा ही गाडी आता नियमित स्वरूपात धावणार आहे. ही गाडी दर गुरुवारी रिवा येथून दुपारी १५:५० वाजता सुटेल, तर दर शुक्रवारी सीएसएमटी येथून दुपारी १३:३० वाजता सुटेल. या निर्णयामुळे उत्तर भारतीयांना दिलासा मिळाला असला तरी, महाराष्ट्रातील प्रवाशांमध्ये मात्र तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

मध्य रेल्वेच्या दुटप्पी धोरणामुळे महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. उपनगरीय लोकल गाड्यांच्या वाहतुकीत अडथळा नको, असे तांत्रिक कारण पुढे करून दादर-रत्नागिरी सारख्या महत्त्वाच्या राज्यातील गाड्या बंद पाडणाऱ्या रेल्वे प्रशासनाने, आता परराज्यात जाणाऱ्या गाड्यांना मात्र मुंबईतील मुख्य टर्मिनसवरून सोडण्याचा सपाटा लावला आहे. यावरून मध्य रेल्वेचा महाराष्ट्रातील प्रवाशांप्रती असलेला दुजाभाव स्पष्टपणे समोर येत आहे.

​काही काळापूर्वी दादर-रत्नागिरी पॅसेंजरसारख्या गाड्या केवळ मुंबई उपनगरीय लोकल गाड्यांना अडथळा हे कारण देऊन बंद करण्यात आल्या. मात्र, दुसरीकडे दादर-गोरखपूर, मुंबई-बेंगळुरू वंदे भारत आणि आता नव्याने नियमित करण्यात आलेली ‘रिवा एक्स्प्रेस’ यांसारख्या लांब पल्ल्याच्या गाड्यांना दादर आणि सीएसएमटीसारख्या गजबजलेल्या स्थानकांवरून हिरवा कंदील दाखवला जात आहे. “राज्यातील प्रवाशांना वाऱ्यावर सोडून परराज्यातील गाड्यांना झुकते माप देणे हे नेमके कोणते रेल्वे प्रशासन?” असा संतप्त सवाल आता प्रवासी संघटना विचारत आहेत.

रेल्वे मंत्र्यांच्या आदेशालाही केराची टोपली?

विशेष म्हणजे, दादर-रत्नागिरी गाडी पुन्हा दादरपर्यंत सुरू करण्याच्या व्यवहार्यतेची (Feasibility) तपासणी करण्याचे आदेश खुद्द केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी दिले होते. परंतु, अनेक दिवस उलटूनही मध्य रेल्वेने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती किंवा निर्णय जाहीर केलेला नाही. रेल्वे मंत्र्यांच्या सूचनेनंतरही टाळाटाळ करणाऱ्या प्रशासनाचा हा ‘मुजोरपणा’ असल्याचे बोलले जात आहे.

​कोकण आणि राज्यातील इतर भागांतील प्रवाशांची मोठी गैरसोय होत असताना, रेल्वेचे अधिकारी मात्र सोयीस्करपणे तांत्रिक अडचणींचे कारण पुढे करत आहेत. एका बाजूला राज्यातील रेल्वेगाड्यांच्या वेळेचा बोजवारा उडाला असताना, दुसऱ्या राज्यांसाठी मुंबईची मुख्य स्थानके रिकामी कशी होतात, असा सवाल उपस्थित करत आता रेल्वे प्रवासी आक्रमक झाले आहेत. या मुजोर प्रशासनाविरोधात आता दादर येथे होणाऱ्या रेल्वे परिषदेत मोठे आंदोलन पुकारण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मळगाव रेल्वे फाटकाचा वाहनधारकांना मनस्ताप;उड्डाणपुलाची मागणी

   Follow us on        

सावंतवाडी: सावंतवाडी रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे फाटकामुळे वाहनधारकांना दररोज मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. सावंतवाडी-शिरोडा हा मार्ग पर्यटन आणि व्यापाराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा राज्यमार्ग आहे. मात्र, या मार्गावर असलेल्या रेल्वे फाटकामुळे प्रवाशांचा मोठा वेळ आणि इंधन वाया जात आहे. रेल्वे प्रशासनाच्या नियमानुसार, गाडी येण्यापूर्वी आणि गेल्यानंतर साधारणपणे १० ते १५ मिनिटे हे फाटक बंद ठेवले जाते. गोव्याला जाणाऱ्या गाड्यांची मोठी वर्दळ असल्याने दिवसातून अनेक वेळा हे फाटक बंद असते, परिणामी फाटकाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात.

​या वाहतूक कोंडीचा सर्वाधिक फटका विद्यार्थी आणि नोकरदार वर्गाला बसत असून वेळेवर कामावर पोहोचणे कठीण झाले आहे. या समस्येवर रेल्वे स्थानकामार्फत एक पर्यायी रस्ता उपलब्ध आहे, परंतु तो रस्ता सुमारे २ किलोमीटरचा वळसा घालून जातो. वाढते इंधन दर आणि अतिरिक्त अंतरामुळे वाहनधारक या वळसा मार्गापेक्षा फाटकावर ताटकळत थांबणे पसंत करतात. येथील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी उड्डाणपूल बांधणे हाच एकमेव ठोस उपाय असल्याची भावना स्थानिकांनी व्यक्त केली आहे. रेल्वे प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन समन्वयाने उड्डाणपुलाचे काम मार्गी लावावे, अशी आग्रही मागणी आता जोर धरू लागली आहे.

Konkan Railway: कुडाळ स्थानकावर बेकायदा तिकीट विक्री करणाऱ्या दलालाला अटक

   Follow us on        

कुडाळ: कोकण रेल्वेच्या रत्नागिरी आरपीएफ (रेल्वे सुरक्षा दल) पथकाने ‘ऑपरेशन उपलब्ध’ अंतर्गत कुडाळ रेल्वे स्थानकावर धडक कारवाई करत एका तिकीट दलालाला (टाउट) रंगेहात पकडले आहे. या कारवाईत दलालाकडे ३,५८० रुपये किमतीचे एक अवैध ‘तत्काळ’ तिकीट सापडले असून ते जप्त करण्यात आले आहे. हे तिकीट काळ्या बाजारात चढ्या दराने विकण्याच्या उद्देशाने काढण्यात आले होते. अशा अवैध विक्रीमुळे सामान्य प्रवाशांना हक्काची तिकिटे मिळवण्यात अडचणी येत होत्या.

​स्थानकावर नियमित तपासणी सुरू असताना आरपीएफला या व्यक्तीच्या हालचालींवर संशय आला. प्राथमिक चौकशीत तो बेकायदेशीरपणे तिकीट विक्री करत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर आरोपीला पुढील कायदेशीर कारवाईसाठी कणकवली आरपीएफच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्याच्यावर रेल्वे कायदा १९८९ च्या कलम १४३ नुसार गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. या कलमांतर्गत रेल्वे तिकिटांची अनधिकृत खरेदी-विक्री करणे हा गंभीर आणि दंडनीय गुन्हा मानला जातो.

​रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी आणि दलालांचा सुळसुळाट रोखण्यासाठी ‘ऑपरेशन उपलब्ध’ ही विशेष मोहीम हाती घेतली आहे. प्रवाशांना पारदर्शक पद्धतीने आणि योग्य किमतीत तिकिटे मिळावीत, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. कोकण रेल्वे मार्गावर आरपीएफ पूर्णपणे सतर्क असून, प्रवाशांनीही कोणत्याही अनधिकृत व्यक्तीकडून तिकीट खरेदी करू नये आणि काही संशयास्पद आढळल्यास तात्काळ आरपीएफला कळवावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

मुंबई-गोवा महामार्गावर मे महिन्यापासून टोल वसुली सुरू

   Follow us on        

​मुंबई-गोवा महामार्गावरून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओसरगाव येथील टोलनाका पुन्हा सुरू करण्याच्या हालचाली केंद्र सरकारने सुरू केल्या आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) या टोल वसुलीसाठी ऑनलाईन निविदा प्रसिद्ध केल्या असून, २३ एप्रिल ही निविदा भरण्याची शेवटची तारीख आहे. २४ एप्रिल रोजी या निविदा उघडल्या जातील आणि त्यानंतर ठेकेदार निश्चित केला जाईल. सर्व प्रक्रिया सुरळीत पार पडल्यास मे २०२६ पासून प्रत्यक्ष टोल वसुली सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

​जानवली पूल ते पत्रादेवी या ६० किलोमीटर लांबीच्या मार्गासाठी ही टोल वसुली केली जाणार आहे. यामध्ये दुचाकी आणि तीन आसनी वाहनांना सवलत देण्यात आली असून, उर्वरित सर्व वाहनांना टोल भरावा लागणार आहे. या मार्गावरून वार्षिक सुमारे ५७.८८ कोटी रुपयांचा टोल जमा होईल, अशी अपेक्षा प्रशासनाने व्यक्त केली आहे.

​विशेष म्हणजे, यापूर्वी जून २०२३ मध्ये हा टोलनाका सुरू करण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र, टोल विरोधी कृती समिती आणि विविध राजकीय पक्षांनी केलेल्या तीव्र आंदोलनामुळे ही वसुली बंद करावी लागली होती. गेल्या तीन वर्षांपासून या संदर्भात कोणतीही कार्यवाही झाली नव्हती, परंतु आता महामार्गाचे चौपदरीकरण पूर्णत्वाकडे जात असल्याने प्रशासनाने पुन्हा कंबर कसली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा टोलवरून राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत.

दादर-रत्नागिरी गाडी पूर्ववत करण्यासाठी शिवसेनेचा मध्य रेल्वेला १० दिवसांचा ‘अल्टीमेटम’

   Follow us on        

मुंबई:कोविड काळात बंद करण्यात आलेली दादर-रत्नागिरी पॅसेंजर ट्रेन येत्या दहा दिवसांत पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. जर रेल्वे प्रशासनाने यावर तातडीने निर्णय घेतला नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा निर्वाणीचा इशारा शिवसेना नेते आणि खासदार अरविंद सावंत यांनी दिला आहे. मंगळवारी त्यांनी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राजीव श्रीवास्तव यांची भेट घेऊन या संदर्भात सविस्तर चर्चा केली. यावेळी मध्य रेल्वेने कोकणच्या प्रवाशांच्या संयमाचा अंत पाहू नये, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.

​राज्यांतर्गत रेल्वे गाड्यांकडे लक्ष देण्याची मागणी:

या भेटीदरम्यान खासदार सावंत यांनी केवळ कोकणच नव्हे, तर राज्यातील इतरही बंद असलेल्या गाड्यांचा प्रश्न मांडला. त्यांनी सांगितले की, मुंबई-सावंतवाडी ट्रेन आठवड्यातून फक्त एकदाच चालवली जाते, ती दररोज सुरू करणे आवश्यक आहे तसेच, मराठवाड्यातून सुटणारी नांदेड-पुणे गाडी पुण्याऐवजी हडपसरला थांबवली जाते, ज्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होते. ही गाडी हडपसर ऐवजी थेट पुणे स्टेशनपर्यंत सुरू करावी, अशी आग्रही मागणी त्यांनी यावेळी केली.

​रेल्वेच्या ‘मराठीद्वेषा’वर संताप:

खासदार सावंत यांनी रेल्वे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढत ‘मराठीद्वेष’ थांबवण्याचे आवाहन केले. ‘डेक्कन क्वीन’च्या वाढदिवसाच्या वेळी केवळ हिंदी आणि इंग्रजी भाषेचा वापर करणे आणि ‘रेल वन ॲप’मध्ये मराठी भाषेचा समावेश न करणे, याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. याशिवाय रेल्वेच्या जमिनीवरील झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन आणि शिवडीतील एंड-टू-एंड पुलाचे रखडलेले काम या प्रश्नांकडेही त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. या बैठकीला रेल्वेचे अधिकारी आणि भारतीय कामगार सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

वास्को-पटना एक्सप्रेस: कोकणी जनतेला नको असलेली गाडी

   Follow us on        

मळगाव : कोकण रेल्वे मार्गावरून धावणारी वास्को-पटना सुपरफास्ट एक्सप्रेस सध्या कोकणातील स्थानिक प्रवाशांसाठी मोठा मनस्ताप ठरत आहे. ही गाडी दर बुधवारी धावते, परंतु ती गोवा राज्यातील वास्को आणि मडगाव स्थानकावरूनच इतकी तुडुंब भरून येते की, सावंतवाडी रोड स्थानकावर गाडीत पाऊल ठेवणेही अशक्य झाले आहे. रेल्वे प्रशासनाने या गाडीला सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकमेव थांबा दिला असला, तरी त्याचा उपयोग येथील जनतेपेक्षा परप्रांतीयांच्या प्रवासासाठीच अधिक होत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

​या गाडीतील प्रवासादरम्यान निर्माण होणारी परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. गाडीमध्ये नेहमीच परप्रांतीयांची प्रचंड गर्दी असते, त्यामुळे रात्रीच्या वेळी प्रवास करणे स्थानिक प्रवाशांसाठी जिकिरीचे झाले आहे. विशेषतः आपल्या कुटुंबाला आणि महिलांना घेऊन या गाडीने प्रवास करणे आता धोकादायक वाटू लागले आहे. सुरक्षित प्रवासाची कोणतीही खात्री रेल्वे प्रशासन देऊ शकत नसल्याने, प्रवाशांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली असून संतापाची लाट उसळली आहे.

​रेल्वेच्या ढिसाळ नियोजनामुळे आरक्षित डब्यांची (Reserved Coaches) अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. या डब्यांमध्ये घुसखोरी करणाऱ्या प्रवाशांमुळे आरक्षित डब्यांचे रूपांतर जनरल डब्यांत झाले आहे. ज्या प्रवाशांनी आधीच आरक्षण केले आहे, त्यांनाही स्वतःच्या जागेवर बसणे कठीण झाले आहे. या गर्दीमुळे सावंतवाडी स्थानकावरून गाडीत चढणे शक्य नसल्याने अनेक प्रवाशांना आपले तिकीट रद्द करावे लागते, परिणामी रेल्वेला दर आठवड्याला हजारो रुपयांचा परतावा द्यावा लागत असून मोठे आर्थिक नुकसान होत आहे.

​सावंतवाडी स्थानकावरील या गाडीचा थांबा केवळ तांत्रिक किंवा नावापुरताच मर्यादित राहिला आहे. या गाडीमुळे कोकणात परप्रांतीयांची संख्या तर वाढत आहेच, पण स्थानिक कोकणी माणसाला मात्र या सेवेचा कोणताही लाभ मिळत नाही. परप्रांतीयांच्या सोयीसाठी रेल्वे स्थानिक प्रवाशांच्या सोयीकडे आणि सुरक्षेकडे दुर्लक्ष करत असल्याची टीका होत आहे. आरक्षित डब्यातही नियमांची पायमल्ली होत असल्याने प्रवाशांकडून रेल्वे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

“ज्या गाड्यांचा फायदा कोकणातील जनतेला नाही, त्या गाड्या आमच्या मार्गावर कशासाठी?” असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे. वास्को-पटना सारख्या गाड्यांमुळे स्थानिक प्रवाशांना कोणताही दिलासा मिळत नसून, त्याऐवजी कोकणच्या हक्काच्या गाड्या सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे.

​पुणे आणि कल्याणसाठी हव्यात स्वतंत्र गाड्या

सध्या कोकणातून पुणे आणि मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांची संख्या प्रचंड आहे. परंतु, रेल्वे प्रशासन या गरजेकडे डोळेझाक करत आहे. वास्को-पटना सारखी गाडी अव्यवस्थितपणे चालवण्यापेक्षा, पुणे-सावंतवाडी आणि कल्याण-सावंतवाडी या मार्गांवर नियमित गाड्या सुरू केल्यास त्याचा थेट फायदा येथील स्थानिक जनतेला आणि चाकरमान्यांना होईल. पुण्याला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची आणि नोकरदारांची संख्या मोठी असतानाही पुरेशी रेल्वे सेवा उपलब्ध नसल्याने खासगी ट्रॅव्हल्सचे दर प्रवाशांचे कंबरडे मोडत आहेत.

शक्तीपीठ महामार्ग रधानगरीमार्गे सिंधुदुर्गात आणा

   Follow us on        

सिंधुदुर्ग: प्रस्तावित ‘शक्तीपीठ महामार्ग’ जर राधानगरीमार्गे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणला नाही, तर या जिल्ह्याला महामार्गाचा ‘बगल’ मिळण्याचा धोका निर्माण झाला आहे. याचा थेट परिणाम जिल्ह्याच्या पर्यटन आणि स्थानिक व्यापारावर होईल, असा इशारा माजी आमदार संदेश पारकर यांनी दिला आहे.

​पारकर यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे सरकारकडे मागणी केली आहे की, सध्या आखण्यात येत असलेल्या महामार्गाच्या आराखड्यात सिंधुदुर्ग जिल्ह्याला योग्य स्थान मिळणे अत्यंत आवश्यक आहे. जर हा महामार्ग जिल्ह्याबाहेरून गेला, तर कोकणातील आर्थिक चक्रावर त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतात.

पर्यटनाला मिळणार मोठी चालना

​महामार्ग सिंधुदुर्ग जिल्ह्यातून गेल्यास गोवा-सिंधुदुर्ग पर्यटन साखळी अधिक मजबूत होईल. यामुळे प्रवाशांचा वेळ वाचेल आणि प्रवासाची सोय होईल. राधानगरी मार्गे जोडणी मिळाल्यास खालील पर्यटन स्थळांना मोठा फायदा होऊ शकतो:

​किल्ले: सिंधुदुर्ग किल्ला, विजयदुर्ग आणि रांगणा किल्ला.

​किनारे: तारकर्ली आणि देवबाग.

​थंड हवेची ठिकाणे: आंबोली आणि सावंतवाडी.

धार्मिक स्थळांचा विकास

​केवळ निसर्ग पर्यटनच नाही, तर धार्मिक पर्यटनालाही यामुळे गती मिळेल. कुणकेश्वर, आंगणेवाडी, मांगरूर दत्त मंदिर आणि वालावल लक्ष्मीनारायण मंदिर यांसारख्या प्रसिद्ध धार्मिक स्थळांवर भाविकांची संख्या वाढून स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल, असेही पारकर यांनी नमूद केले.

​जर महामार्गाने सिंधुदुर्गला वळसा घातला, तर जिल्हा विकासाच्या मुख्य प्रवाहापासून दूर राहील अशी भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शासनाने तातडीने आराखड्यात बदल करून राधानगरी मार्गे सिंधुदुर्गचा समावेश करावा, अशी मागणी स्थानिक नागरिक, व्यापारी आणि पर्यटन व्यावसायिकांकडून केली जात आहे.

मल्टीमोडल कॉरिडोर की ‘मल्टीमोडल’ लूट? विरार-अलिबागसाठी भारी टोल

   Follow us on        

मुंबई: महाराष्ट्रातील प्रस्तावित विरार-अलिबाग मल्टीमोडल कॉरिडोरसाठी पूर्ण १२६ किलोमीटर अंतरासाठी ₹७६५ इतका टोल आकारण्याच्या बातम्या माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्या आहेत. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र चर्चा सुरू झाली आहे. इन्फ्रा न्यूज इंडियाने यावर प्रश्न उपस्थित करताना म्हटले आहे की, प्रति किलोमीटर ₹६.०७ इतका टोल दर अत्यंत जास्त आहे. प्रकल्प अद्याप सुरूही झालेला नसताना इतका उच्च दर निश्चित करणे योग्य नाही, असे मत व्यक्त करत MSRDCकडून अधिकृत स्पष्टीकरणाची मागणी करण्यात आली आहे.

१२६ किलोमीटर लांबीचा मल्टीमोडल कॉरिडोर विरार ते अलिबाग दरम्यान थाणे आणि नवी मुंबई मार्गे जोडणारा असेल. यात रस्ता, रेल्वे आणि बससाठी वेगवेगळ्या समर्पित लेन असतील. भूमी संपादन प्रक्रिया सुरू असून, BOT मॉडेलवर टेंडर प्रक्रिया सुरू आहे. प्रकल्प २०३० पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. मात्र, अद्याप बांधकाम सुरू नसताना टोल दर ₹७६५ ते ₹१००० पर्यंत असल्याच्या बातम्यांमुळे लोक संतापले आहेत.

काहींनी दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेचा उल्लेख करत याची तुलना केली आहे.नागरिक आणि सोशल मीडियावर या उच्च टोल दरावर टीका होत आहे. MSRDCने याबाबत लवकरात लवकर अधिकृत माहिती जाहीर करावी, अशी मागणी जोर धरत आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे.

 

 

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search