मळगाव रेल्वे फाटकाचा वाहनधारकांना मनस्ताप;उड्डाणपुलाची मागणी

   Follow us on        

सावंतवाडी: सावंतवाडी रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे फाटकामुळे वाहनधारकांना दररोज मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. सावंतवाडी-शिरोडा हा मार्ग पर्यटन आणि व्यापाराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा राज्यमार्ग आहे. मात्र, या मार्गावर असलेल्या रेल्वे फाटकामुळे प्रवाशांचा मोठा वेळ आणि इंधन वाया जात आहे. रेल्वे प्रशासनाच्या नियमानुसार, गाडी येण्यापूर्वी आणि गेल्यानंतर साधारणपणे १० ते १५ मिनिटे हे फाटक बंद ठेवले जाते. गोव्याला जाणाऱ्या गाड्यांची मोठी वर्दळ असल्याने दिवसातून अनेक वेळा हे फाटक बंद असते, परिणामी फाटकाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात.

​या वाहतूक कोंडीचा सर्वाधिक फटका विद्यार्थी आणि नोकरदार वर्गाला बसत असून वेळेवर कामावर पोहोचणे कठीण झाले आहे. या समस्येवर रेल्वे स्थानकामार्फत एक पर्यायी रस्ता उपलब्ध आहे, परंतु तो रस्ता सुमारे २ किलोमीटरचा वळसा घालून जातो. वाढते इंधन दर आणि अतिरिक्त अंतरामुळे वाहनधारक या वळसा मार्गापेक्षा फाटकावर ताटकळत थांबणे पसंत करतात. येथील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी उड्डाणपूल बांधणे हाच एकमेव ठोस उपाय असल्याची भावना स्थानिकांनी व्यक्त केली आहे. रेल्वे प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन समन्वयाने उड्डाणपुलाचे काम मार्गी लावावे, अशी आग्रही मागणी आता जोर धरू लागली आहे.

Facebook Comments Box
   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search