Author Archives: Kokanai Digital

कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरण करण्यास कर्नाटक राज्याची संमती

   Follow us on        
बेळगाव: कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरण करण्यास कर्नाटक राज्य सरकारने पूर्ण संमती दर्शविली आहे आणि या संदर्भात पत्रव्यवहार सुरू केला आहे.
बेळगाव येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात मोठ्या आणि मध्यम उद्योग आणि पायाभूत सुविधा विकास मंत्र्यांच्या वतीने उत्तर देताना ऊर्जा मंत्री के.जे. जॉर्ज यांनी हे सांगितले.
“कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेमध्ये यापूर्वीच विलीनीकरण व्हायला हवे होते. तथापि, ऑपरेशनल तोट्यामुळे, या प्रदेशातील रेल्वे स्थानकांवर कोणताही महत्त्वपूर्ण विकास झालेला नाही. कर्नाटकच्या २७० कोटी रुपयांच्या इक्विटी योगदानाच्या समायोजनाबाबत पत्रव्यवहार सुरू आहे. भारतीय रेल्वेमध्ये विलीन झाल्यानंतर, नवीन गाड्या सुरू केल्या जातील आणि विद्यमान रेल्वे स्थानकांमध्ये सुधारणा दिसून येतील,” असे जॉर्ज यांनी गुरुवारी विधानसभेत आमदार किरण कुमार कोडगी आणि व्ही. सुनील कुमार यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी प्रस्तावाला संबोधित करताना सांगितले.
ग्रामीण विकास आणि पंचायत राज मंत्री प्रियांक खरगे यांनी जोडले की, राज्य सरकारने विलीनीकरणाबाबत कोकण रेल्वेला आधीच पत्र लिहिले आहे आणि त्यांच्या उत्तराची वाट पाहत आहे.
एकूण चार राज्याची भागीदारी असलेली कोकण रेल्वेच्या विलीनीकरणाला आतापर्यंत दोन राज्यांनी संमती दर्शवली आहे. अलीकडेच गोवा राज्याने कोकण रेल्वेच्या विलीनीकरणाला आपली संमती दर्शवली  आहे.

Loading

कोकण रेल्वे प्रवासी संघटनेची आज सावंतवाडीत महत्त्वाची बैठक

   Follow us on        

सावंतवाडी: कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडीची आज महत्त्वाची बैठक सावंतवाडीतील श्रीराम वाचन मंदीर, सावंतवाडी येथे सायंकाळी ५:३० वाजता आयोजित करण्यात आली आहे.

या बैठकीत सावंतवाडी रेल्वे स्थानकातील समस्या, अपूर्ण अवस्थेत असलेले सावंतवाडी टर्मिनस, प्रवाश्यांच्या समस्या आदी विषयांवर चर्चा होणार असून या बैठकीत कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या सदस्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कोकण रेल्वे प्रवासी संघटना,सावंतवाडी अध्यक्ष/सचिव यांच्याकडून करण्यात आले आहे.

 

Loading

१४ डिसेंबर पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-चतुर्दशी – 17:00:54 पर्यंत
  • नक्षत्र-रोहिणी – 27:55:16 पर्यंत
  • करण-वणिज – 17:00:54 पर्यंत, विष्टि – 27:44:51 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-सिद्ध – 08:26:00 पर्यंत, साघ्य – 29:06:38 पर्यंत
  • वार- शनिवार
  • सूर्योदय- 07:05
  • सूर्यास्त- 18:01
  • चन्द्र-राशि-वृषभ
  • चंद्रोदय- 16:59:00
  • चंद्रास्त- 30:53:59
  • ऋतु- हेमंत
जागतिक दिवस:
  • राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस.
  • शहीद बुद्धीजीवी दिन – बांग्लादेश
  • राज्य दिन – अमेरिका-अलाबामा
महत्त्वाच्या घटना:
  • १८१९: अलाबामा हे अमेरिकेचे २२ वे राज्य बनले.
  • १८९६: ग्लासगो अंडरग्राऊंड रेल्वे सुरु झाली.
  • १९०३: किटीहॉक, नॉर्थ कॅरोलिना येथे राईट बंधूंनी उड्डाणाचा पहिला प्रयत्‍न केला.
  • १९११: रुआल आमुन्सन यांनी दक्षिण ध्रुवाची मोहीम पूर्ण केली.
  • १९२१: बनारस हिंदू विश्वविद्यालयाने एनी बेसेन्ट यांना ‘डॉक्टर ऑफ़ लेटर्स ची पदवी ने सन्मानित केले.
  • १९२९: ’प्रभात’चा ’गोपालकृष्ण’ हा चित्रपट मुंबईच्या ’मॅजेस्टिक’ चित्रपटगृहात प्रदर्शित झाला.
  • १९३९: फिनलंडवर आक्रमण करण्यासाठी सोव्हिएत युनियन ला लीग ऑफ नेशन्समधून काढून टाकले.
  • १९४१: दुसरे महायुद्ध – जपानने थायलँडबरोबर सहकार्याचा करार केला.
  • १९५०: UNHCR ची स्थापना.
  • १९६१: टांझानियाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.
  • १९६२ : नासाचे मरिनर २ (चित्रीत), जगातले पहिले अवकाशयान झाले जे शुक्र ग्रहाच्या जवळुन यशस्वी रीत्या उडाले.
  • १९८३: हुसैन मोहम्मद इरशाद यांनी स्वतःला बांगलादेश चे राष्ट्रपती घोषित केले.
  • १९९७: ग्रीनहाउस गॅसचे उत्सर्जन कमी करण्यासाठी सर्व देशांची संमती.
  • १९९८: २३ व्या काहिरा अंतरराष्ट्रीय फ़िल्म समारोह तमिळ चित्रपट “टेररिस्ट” साठी सर्वोत्कृष्ट भूमिकेसाठी आयशा धारकर यांना जूरी पुरस्कार ने सन्मानित केल्या गेले
  • २०००: जॉर्ज वॉकर बुश हे अमेरिकेचे ४३ वे राष्ट्राध्यक्षपदी निवडल्या गेले.
  • २००२: पाकिस्तान ने दक्षिण आफ्रिकेला हरवून दृष्टिहीन चा विश्वचषक जिंकला.
  • २००८: अर्जेंटिना आणि भारतामध्ये खेळल्या गेलेल्या हॉकीच्या अंडर-२१ सामन्यात ४-४ ने सामना रद्द झाला होता.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १५०३: नोट्रे डॅम (Nostradamus) – प्रसिद्ध फ्रेंच ज्योतिषी, गणितज्ञ व भविष्यवेत्ता (म्रुत्यू: २ जुलै १५६६)
  • १५४६: टायको ब्राहे – डच खगोलशास्त्रज्ञ, खगोलशास्त्रावर मूलभूत संशोधन केले. (म्रुत्यू: २४ आक्टोबर १६०१)
  • १८६४: उत्तर प्रदेश चे प्रसिद्ध वकील आणि सार्वजनिक कार्यकर्ते जगत नारायण मुल्ला यांचा जन्म.
  • १८९५: जॉर्ज (सहावा) – इंग्लंडचा राजा (मृत्यू: ६ फेब्रुवारी १९५२)
  • १९१०: ला भारतीय कादंबरीकार उपेंद्रनाथ अशक यांचा जन्म.
  • १९१८: योगाचार्य बी. के. एस. अय्यंगार – जागतिक कीर्तीचे थोर तत्त्ववेत्ते जे. कृष्णमूर्ती यांना त्यांनी योगविद्येचे पाठ दिले. ‘Light on Yoga’ हा त्यांचा ग्रंथ जगात ’योगविद्येचे बायबल’ समजला जातो.
  • १९२२: ला प्रसिद्ध भौतिक शास्त्राचे प्रसिद्ध वैज्ञानिक निकोले बासोव यांचा जन्म.
  • १९२४: राज कपूर – अभिनेता, निर्माता व दिग्दर्शक आणि ’द ग्रेटेस्ट शो मॅन’ (मृत्यू: २ जून १९८८)
  • १९३४: श्याम बेनेगल – चित्रपट दिग्दर्शक व पटकथालेखक
  • १९२८: प्रसाद सावकार – गायक व नट
  • १९३६: ला बंगाली आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम करणारे प्रसिद्ध अभिनेता विश्वजीत चटर्जी यांचा जन्म.
  • १९३९: सतीश दुभाषी – चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेते (मृत्यू: १२ सप्टेंबर १९८०)
  • १९४६: संजय गांधी – राजकारणी व इंदिरा गांधी यांचे पुत्र (मृत्यू: २३ जून १९८०)
  • १९५३: विजय अमृतराज – भारतीय लॉनटेनिसपटू
  • १९६२: ला माजी भारतीय क्रिकेटर भरत अरुण यांचा जन्म.
  • १९८४: भारतीय अभिनेते आणि निर्माते राणा दग्गुबटी यांचा जन्म.
  • १९९४: ला भारतीय क्रिकेटर कुलदीप यादव यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १७९९: जॉर्ज वॉशिंग्टन – अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष (जन्म: २२ फेब्रुवारी १७३२)
  • १९४३: कॉर्नफ्लेक्सचे निर्माते जॉन हार्वे केलॉग यांचे निधन. (जन्म: २६ फेब्रुवारी १८५२)
  • १९६६: शंकरदास केसरीलाल ऊर्फ ‘शैलेन्द्र’ – गीतकार (जन्म: ३० ऑगस्ट १९२३)
  • १९७१: ला भारताचे परमवीर चक्र पुरस्काराने सन्मानित झालेले मिलिटरी ऑफिसर निर्मल जीत सिंग शहीद झाले होते.
  • १९७७: गजानन दिगंबर तथा ग. दि. माडगूळकर – गीतकार, कवी, लेखक, पटकथाकार, अभिनेते. गीतरामायणामुळे त्यांना ’महाराष्ट्राचे वाल्मिकी’ म्हणून ओळखले जाते. (जन्म: १ आक्टोबर १९१९)
  • १९७९: भारताचे माजी क्रिकेट खेळाडू निरोडे चौधरी यांचे निधन.
  • २००६: अटलांटिक रिकॉर्ड्सचे सहसंस्थापक अत्लम एर्टेगुन यांचे निधन. (जन्म: ३१ जुलै १९२३)
  • २००५: ला मराठी चित्रपट सृष्टीचे कलाकार सुधीर जोशी यांचे निधन.
  • २०१३: भारतीय चित्रकार सी एन करुणाकरन यांचे निधन.

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

Loading

Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या दोन गाड्यांच्या डब्यांत कपात

   Follow us on        

Konkan Railway Updates:एकीकडे कोकणरेल्वे मार्गावर होणाऱ्या गर्दी कमी करण्यासाठी या मार्गावर चालविण्यात येणाऱ्या गाड्या पूर्ण क्षमतेने चालविण्यासाठी त्यांच्या डब्यांत वाढ करण्यात यावी अशी मागणी होत असताना रेल्वे प्रशासन मात्र गाड्यांचे सध्या असलेले डबे कमी करताना दिसत आहे. कोकण रेल्वे प्रशासनने अलीकडेच प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धपत्रकानुसार कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या दोन गाड्यांच्या डब्यांच्या संरचनेत बदल करून डबे कमी करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. तपशील खालीलप्रमाणे

१) ११०९९ / १११०० लोकमान्य टिळक (टी) – मडगाव जं. – लोकमान्य टिळक (टी) एक्सप्रेस

एलएचबी स्वरूपात चालविण्यात येणाऱ्या या गाडीच्या टू टियर एसी आणि थ्री टियर एसीचा प्रत्येकी  १ डबा कमी  करण्यात आला आहे.

सध्याची संरचना: फर्स्ट एसी – ०१ , २ टियर एसी – ०२, ३ टियर एसी – ०६, स्लीपर – ०८, सामान्य – ०२, पँट्री कार – ०१, एसएलआर – ०१, जनरेटर कार – ०१

सुधारित संरचना: फर्स्ट एसी – ०१ , २ टियर एसी – ०१, ३ टियर एसी – ०५, स्लीपर – ०८, सामान्य – ०२, पँट्री कार – ०१, एसएलआर – ०१, जनरेटर कार – ०१

दिनांक १२ जानेवारी २०२४ पासून हा बदल अमलांत आणला जाणार आहे.

२) २२११३ /२२११४ लोकमान्य टिळक (टी) – कोचुवेली – लोकमान्य टिळक (टी) एक्सप्रेस

एलएचबी स्वरूपात चालविण्यात येणाऱ्या या गाडीच्या टू टियर एसी आणि थ्री टियर एसीचा प्रत्येकी  १ डबा कमी  करण्यात आला आहे.

सध्याची संरचना: २ टियर एसी – ०१, ३ टियर एसी – ०७, स्लीपर – ०९, सामान्य – ०३ ,जनरेटर कार – ०२

सुधारित संरचना: २ टियर एसी – ०१, ३ टियर एसी – ०६, स्लीपर – ०९, सामान्य – ०३ ,जनरेटर कार – ०१ ,एसएलआर – ०१

दिनांक १४ जानेवारी २०२५ पासून हा बदल अमलांत आणला जाणार आहे.

 

 

 

 

 

Loading

१३ डिसेंबर पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-त्रयोदशी – 19:42:16 पर्यंत
  • नक्षत्र-भरणी – 07:50:48 पर्यंत, कृत्तिका – 29:48:31 पर्यंत
  • करण-कौलव – 09:05:19 पर्यंत, तैेतिल – 19:42:16 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-शिव – 11:53:37 पर्यंत
  • वार- शुक्रवार
  • सूर्योदय- 07:05
  • सूर्यास्त- 18:01
  • चन्द्र-राशि-मेष – 13:19:53 पर्यंत
  • चंद्रोदय- 16:03:59
  • चंद्रास्त- 29:47:00
  • ऋतु- हेमंत
जागतिक दिवस:
  • माल्टाचा प्रजासत्ताक दिन
  • जागतिक व्हायोलिन दिवस
महत्त्वाच्या घटना:
  • १९३०: ’प्रभात’चा ’उदयकाल’ हा चित्रपट मुंबईच्या ’मॅजेस्टिक’ चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. आधी या चित्रपटाचे नाव ’स्वराज्याचे तोरण’ असे होते. परंतु तो सेन्सॉरमधे अडकल्यामुळे त्यात बरीच काट छाट करावी लागली व त्याचे नावही बदलले.
  • १९३७: ला जपान आणि चीन या दोघांमध्ये झालेल्या युद्धात नरसंहार आणि अत्याचाराचे युग सुरु झाले होते.
  • १९४१: दुसरे महायुद्ध – हंगेरी व रुमानियाने अमेरिकेविरुद्ध युद्ध पुकारले.
  • १९८१: पोलंड मध्ये मार्शल लॉ चा कब्जा.
  • १९८९: जम्मू काश्मीर चे माजी मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या मुलीचे आतंकवाद्यांनी अपहरण करून ५ आतंकवाद्यांना सोडून घेतले होते.
  • १९९१: मधुकर हिरालाल कनिया यांनी भारताचे २३ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
  • १९९६: कोफी अन्नान हे संयुक्त राष्ट्राचे महासचिव बनले होते.
  • २००१: जैश-ए-मोहम्मद व लष्कर-ए-तय्यबा च्या अतिरेक्यांनी संसदभवनावर हल्ला केला.
  • २००१: आजच्या दिवशीच दिल्लीच्या संसद भवनावर अतिरेक्यांचा हल्ला.
  • २००२: ज्येष्ठ चित्रपट निर्माते-दिग्दर्शक यश चोप्रा यांना २००१ चा फाळके पुरस्कार जाहीर.
  • २००३: इराकचे माजी राष्ट्रपती सद्दाम हुसेन यांना त्यांच्या घरून अटक.
  • २००४: अपहरण आणि नरसंहार यांचे ९ आरोप चिली च्या माजी राष्ट्रपती वर लाऊन त्यांना घरामध्ये नजरबंद ठेवल्या गेले.
  • २०१६: सायरस मिस्त्री यांना टी सी एस च्या संचालक मंडळ आणि अध्यक्ष पदावरून काढण्यात आले.
  • २०१६: अँडी मरे आणि अँजेलीक्यू केरबर यांना आयटीएफ (इंटरनॅशनल टेनिस फेडेरेशन) ने २०१६ जागतिक विजेते घोषित केले.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १७८०: योहान वुल्फगँग डोबेरायनर – जर्मन रसायनशास्त्रज्ञ (मृत्यू: २४ मार्च १८४९)
  • १८०४: मेजर थॉमस कॅन्डी – कोशकार व शिक्षणतज्ञ, मराठीत विरामचिन्हे वापरण्यास त्यांनी प्रथम सुरूवात केली, इंडियन पीनल कोडचे त्यांनी मराठीत भाषांतर केले. (मृत्यू: २६ फेब्रुवारी १८७७)
  • १८१६: सीमेन्सचे संस्थापक वर्नेर व्हॅन सीमेन्स यांचा जन्म. (मृत्यू: ६ डिसेंबर १८९२)
  • १८९९: पांडुरंग सातू नाईक – आल्हाददायकता, कल्पकता व वास्तवता ही वैशिष्ट्ये असलेले चित्रपट छायालेखक (cinematographer), ’हंस पिक्चर्स’ चे एक भागीदार. ’छाया’, ’धर्मवीर’, ’प्रेमवीर (१९३७)’, ’ज्वाला (१९३८)’, ’ब्रह्मचारी’, ’ब्रँडीची बाटली (१९३९)’, ’देवता’, ’सुखाचा शोध (१९३९)’, ’लग्न पहावं करुन (१९४०)’, ’अर्धांगी (१९४०)’, ’पहिला पाळणा’, ’भक्त दामाजी (१९४२)’, ’पैसा बोलतो आहे (१९४३)’, ’रामशास्त्री (१९४४)’, ’लाखारानी (१९४५)’, ’चिराग कहाँ रोशनी कहाँ’ इत्यादी अनेक चित्रपटांचे उत्कष्ट छायालेखन त्यांनी केले. (मृत्यू: २१ ऑगस्ट १९७६ – मुंबई)
  • १९०३: प्रसिद्ध कादंबरीकार इलाचंद्र जोशी यांचा जन्म.
  • १९२५: प्रसिद्ध लेखक लक्ष्मी चंद्र जैन यांचा जन्म.
  • १९४०: भारतीय अर्थशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक संजय लोळ यांचा जन्म. (मृत्यू: १८ जुन २००५)
  • १९५४: भारतीय ऑटोलरीगोलॉजिस्ट आणि राजकारणी हर्षवर्धन यांचा जन्म.
  • १९५५: मनोहर पर्रीकर – गोव्याचे मुख्यमंत्री
  • १९६०: प्रसिद्ध दक्षिणात्य चित्रपटांचे अभिनेते व्यंकटेश दग्गुबाती यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १०४८: ला फारसी विद्वान लेखक अलबेरूनी यांचे निधन.
  • १७८४: सॅम्युअल जॉन्सन – ब्रिटिश साहित्यिक, टीकाकार, पत्रकार व विचारवंत (जन्म: १८ सप्टेंबर १७०९)
  • १९२२: आइसलँड देशाचे पहिले पंतप्रधान हेंस हाफस्टाइन यांचे निधन. (जन्म: ४ डिसेंबर १८६१)
  • १९३०: फ्रिट्झ प्रेग्ल – सेंद्रीय पदार्थांच्या पृथ्थक्‍करणासाठी १९२३ मधील रसायनशास्त्राचा नोबेल पुरस्कार मिळवणारे ऑस्ट्रियन शास्त्रज्ञ (जन्म: ३ सप्टेंबर १८६९)
  • १९६१: अ‍ॅना मेरी रॉबर्टसन ऊर्फ ’ग्रँडमा मोझेस’ यांचे वयाच्या १०२ व्या वर्षी निधन. वयाच्या ७७ व्या वर्षी त्यांनी पेंटिंगच्या छंदाची सुरूवात केली आणि त्यात प्रसिद्धी मिळवली. अमेरिकन ग्रामीण जीवनावरील त्यांची पेंटिग्ज आजही प्रसिद्ध आहेत. (जन्म: ? ? १८६०)
  • १९८६: स्मिता पाटील – अभिनेत्री. त्यांचे ’निशांत’, ’मंथन’, ’भूमिका’, ’जैत रे जैत’, ’गमन’, ’चक्र’, ’उंबरठा’ इत्यादी चित्रपट लोकप्रिय झाले. पद्मश्री (१९८५), दोन राष्ट्रीय पुरस्कार व एक फिल्मफेअर अ‍ॅवॉर्ड (जन्म: १७ आक्टोबर १९५५ – पुणे)
  • १९९४: विश्वनाथ अण्णा तथा तात्यासाहेब कोरे – सहकार क्षेत्रातील अग्रणी व्यक्तिमत्व, वारणा परिसराच्या विकासाचे शिल्पकार, वारणा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक, यशवंतराव चव्हाण यांचे निकटचे सहकारी (जन्म: १७ आक्टोबर १९१७ – कोडोवली, पन्हाळा, कोल्हापूर)
  • १९९६: श्रीधर पुरुषोत्तम तथा शिरुभाऊ लिमये – स्वातंत्र्यसैनिक, क्रांतिकारक, कॅपिटॉल बॉम्बस्फोटाचे सूत्रधार, (जन्म: ? ? ????)
  • २००६: अमेरिकन फुटबॉल लीग आणि वर्ल्ड चॅम्पियनशिप टेनिसचे संस्थापक लामर हंट यांचे निधन. (जन्म: २ ऑगस्ट १९३२)

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

Loading

Mumbai Goa Highway: महामार्गाची डेडलाईन पुन्हा घसरली

   Follow us on        

पळस्पे ते इंदापुर डीसेबंर २०२४ अखेरपर्यंत शक्य नाही पुलाचे कामही बंद

रायगड प्रतिनीधी:-गणेश नवगरे: महाराष्ट्र राज्यातिल लोकसभा निडणुकीपुर्वी मुबंई गोवा राष्ट्रिय महामार्गाचे काम डिसेंबरपर्यंत २०२४ पर्यंत पुर्ण हो़ईल व महामार्गाचे काम हे युध्दपातळीवर सुरू असल्याचे आश्वासने कोकणातील सर्व पक्षाच्या नेते मंडळीनीं आपल्या भाषणशैलीतुन जनतेला दिली होती.माञ सध्या सुरू असेले महामार्गाचे काम कासव गतीने सुरू असुन या संदर्भमार्गावरील अनेक पुलांची कामे अध्याप अपुर्णच आहेत या महामार्गवरील कामे पुर्ण होण्यास कमीत कमी तीन ते चार वर्ष लागण्याची शक्यता दिसुन येत आहे.

मुबंई गोवा महामार्गावरील वडखळ पर्यंतचे काम पुर्ण झाले आहे: माञ नागेठणे, कोलाड, पुई,माणगाव येथील प्रमुख पुलांचें काम अर्धवट आहे. पळस्पे ते इंदापुर हा तब्बल ८४ किलोमीटरचा रस्ता सर्वात तापदायक होता.याचे दोन टप्प्यात विभाजन केल्यानतंर पळस्पे ते कासू पर्यंत काम होत आले आहे. माञ त्या नतंर काम पुर्ण ठप्प झाले आहे.

माणगाव बायपासचे काम न केल्याने ठेकेदार ब्लॅकलिस्ट करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या कामादरम्यान १०० वॉर्डन्स लावण्यासदंर्भात राष्ट्रिय महामार्ग प्राधिकरणाने सांगितले आहे.त्याच्या पुढच्या रसत्याचे काम हे एल एन टीकडे असुन बहुतांश काम पुर्ण झाले आहे.

मुबंई गोवा महामार्गाचे काम हे २०१० पासुन संथ गतीने सुरू आहे. ठेकेदारांच्या निष्काळजीमुळे महामार्गाचे काम रखडले आहे. महामार्गाचे काम होण्यासाठी कोकणकरांच्या जनआक्रोष समितीने माणगाव येथेआमरणऊपोषण केले होते याची दख़्खल प्रशासनानी घेतली होती,तसेत माणगाव येथे प्रशासकिय कार्यालयाला पञ देऊन दिंडीही काढण्यात आली होती.विषेश बाब म्हणजे स्वता बांधकाम मंञी रविंद्र चव्हाण यांनी तब्बल ५ वेळा पहाणी दौराही केला होता त्याच बरोबर कोकणकरांना दिलासा देण्यासाठी निवडणुकी पूर्वी स्वता मुख्यमंञी एकनाथ शिंदे यांनीही माणगाव पर्यंत पहाणी केली होती. जनआक्रोष या महामार्गाबाबत सतत पाठपुरावा करत असुन मिळतात फक्त खोट्या डेडलाईन ञस्त कोकणकर पुन्हा आंदोलनाच्या मार्गावर असुन पुढिल नियोजना बाबत सद्या जनआक्रोषची चर्चा सुरू आहे.या बाबत जनआक्रोष कडुन वारंवार सांगण्यात

येत आहे कि रोज आपघात होत आहेत परंतु अपघात ग्रस्तांना शासनाची कुठलिही मदत त्या परीवाराला मिळत नाही. दळवणालाही मोठा फटका बसतआहे. सुरूवातिला मुबंई गोवा महामार्ग हा ‘बिओटी तत्वावर बांधला जाणार होता; माञ प्रधानमंञी नरेद्रं मोदी हे पंतप्रधान झाल्यानतंर या महामार्गासाठी केंद्र सरकारने निधी उपलब्ध करुन दिला आहे परंतु दोन चार ठेकेदारांनी पळ काढल्याने महामार्गाचे काम रखडले आहे. केंद्र व राज्य सरकारच्या मंञ्यानी अनेकदा खंत व्यक्त केली आहे.

इंदापुरपर्यंत महामार्ग मार्च महीण्यापर्यंत पुर्ण होईल यासाठी आमचा प्रयत्न राहील ८४ किलोमिटर मार्गावरील १० किलोमिटरचे काम शिल्लक आहे हे काम प्रगतीपथावर आहे आमटेम,नागोठणे,कोलाड, पुई, आणि पुढे इंदापूर येथिल काही कामच्या टप्प्याचा समावेश आहे. महामार्गासाठी निधीही पुरेसा उपलब्ध आहे.”

-श्री यशवंत घोटकर-प्रकल्प संचालक,राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरण

Loading

कोकण रेल्वेवर धावणाऱ्या हिवाळी विशेष गाडीसाठी अतिरिक्त थांब्यांची घोषणा

   Follow us on        
Konkan Railway Updates: मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरुन करमळी पर्यंत धावणाऱ्या ०११५१/५२ विशेष गाडीला  वीर, वैभववाडी आणि सावंतवाडी या रेल्वे स्थानकात अतिरिक्त थांबा देण्यात थांबे देण्यात आले आहेत. यासाठी अखंड कोकण रेल्वे प्रवासी संघटनेतर्फे अक्षय महापदी यांनी  इमेलद्वारे निवेदन दिले होते. या निवेदनात महाड, लांजा, राजापूर, वैभववाडी आणि सावंतवाडी तालुक्यांतील स्थानकांत थांबा देण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली होती.
कोकण रेल्वे प्रवासी संघटना, (सावंतवाडी) ने या गाडीला मिळालेल्या अपुऱ्या थांब्यांबाबत ‘एक्स’ माध्यमातून नाराजी व्यक्त केली होती. हिवाळी विशेष गाड्यांना वीर, विलवडे किंवा आडवली, राजापूर आणि सावंतवाडी या स्थानकांवर थांबे देण्यात यावेत अशा विनंतीचे निवेदन या संघटनेतर्फे कोकणरेल्वेच्या बेलापूर कार्यालयाला पाठविण्यात आले होते. याचबरोबर कोकण रेल्वेचे क्षेत्रिय रेल्वे प्रबंधक शैलेश बापट यांच्याशी संपर्क साधून हे थांबे देण्याची विनंती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली होती.
कोकण रेल्वे प्रशासनाने या निवेदनांची दखल घेऊन हे अतिरिक्त थांबे दिल्याबद्दल संघटनांनी आभार व्यक्त केले आहेत.
गाडी क्र. ०११५१ मुंबई सीएसएमटी – करमाळी स्पेशल या गाडीची वीर या स्थानकावर आगमनाची  वेळ 0४.१४,  वैभववाडी  स्थानकावर सकाळी ९.०० तर  सावंतवाडी स्थानकावर १०.३६ अशी असणार आहे.
तर परतीच्या प्रवासात गाडी क्र. ०११५२  करमाळी – मुंबई सीएसएमटी स्पेशल या गाडीची सावंतवाडी या स्थानकावर आगमनाची वेळ १५.४०,  वैभववाडी स्थानकावर सकाळी १७.०८  तर वीर स्थानकावर २३.००   अशी असणार आहे.

Loading

सिंधुदुर्ग: भराडीदेवीने कौल दिला; आंगणेवाडीच्या जत्रेची तारीख ठरली

   Follow us on        

सिंधुदुर्ग:कोकणातील लोकांसाठी महत्त्वाची जत्रा म्हणजे आंगणेवाडीच्या भराडीदेवीची जत्रा (Anganewadi Bharadi Jatra). दरवर्षी देवीला कौल लावून या जत्रेची तारीख ठरवली जाते. त्यामुळे आता यंदाच्या आंगणेवाडीच्या जत्रेची तारीख देखील त्याचप्रमाणे जाहीर झाली आहे. यंदा ही जत्रा 22 फेब्रुवारी 2025 रोजी होणार आहे. कोणत्याही कॅलेंडर किंवा तिथीनुसार ही तारीख ठरत नसून देवीला कौल लावून ही तारीख ठरली जाते. आंगणेवाडी यात्रेच्या तारखेची अनेक जण आतुरतेने वाट पाहत असतात.

आंगणेवाडी जत्रा कोणत्याही तिथीवर अवलंबून नसते. देवीचा कौल घेऊनच यात्रेचा दिवस ठरविण्यात येतो. यावेळी सुमारे दहा लाखांपेक्षा जास्त भाविक यात्रेस उपस्थिती दर्शवतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

Loading

Winter Special Trains: महाराष्ट्रातील स्थानकांवर थांबे देताना रेल्वेचा आखडता हात – अक्षय महापदी

   Follow us on        

Konkan Railway: मध्य रेल्वेतर्फे कोकण रेल्वे मार्गावर सोडण्यात आलेल्या हिवाळी विशेष गाड्यांचे थांबे पाहून महाराष्ट्रात थांबे देताना हात आखडता घेण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. नाताळ आणि नववर्ष गोव्याची मक्तेदारी असली तरीही त्या काळात महाराष्ट्रातही पर्यटकांचे प्रमाण वाढते. तसेच शालेय सुट्ट्यांमुळे स्थानिक नागरिकही आपापल्या मूळ गावी जाण्याच्या प्रयत्नात असतात. तळकोकणात जत्रांचा हंगामही सुरू होत असल्याने चाकरमानी गावी जात असतात. सर्व नियमित गाड्यांचे आरक्षण याआधीच भरल्यामुळे प्रवाशांची मदार विशेष गाड्यांवर होती. परंतु महाराष्ट्रातील बऱ्याच तालुक्यांत थांबे न दिल्यामुळे प्रवाशांचा हिरमोड झाला आहे. याबाबत अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती, महाराष्ट्रचे सचिव अक्षय मधुकर महापदी यांनी समितीतर्फे नाराजी व्यक्त केली असून या गाड्यांना महाड, लांजा, राजापूर, वैभववाडी आणि सावंतवाडी या तालुक्यांतील रेल्वे स्थानकांवर थांबे देण्याची मागणी निवेदना द्वारे मध्य रेल्वे प्रशासनाला केली आहे.

हिवाळी पर्यटन आणि सणांच्या काळात धावणाऱ्या ०११५१/०११५२ मुंबई-करमळी, ०१४६३/०१४६४ लोकमान्य टिळक टर्मिनस-कोचुवेली, आणि ०१४०७/०१४०८ पुणे-करमळी या हिवाळी विशेष गाड्यांना महाड, लांजा, राजापूर आणि वैभववाडी या तालुक्यांत थांबा न दिल्याबद्दल आम्ही खेद व्यक्त करतो. या गाड्या या भागातील प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरू शकतात.

रत्नागिरी ते कणकवली या १११ किलोमीटरच्या भागात कोणत्याही गाडीला एकही थांबा न दिल्यामुळे या गाड्या नक्की कोणासाठी सोडल्या जातात हा प्रश्न उभा राहिला आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस कोचुवेली विशेष गाडी सावंतवाडीच्या पुढे दर १५ ते २० किलोमीटरवर थांबणार आहे. परंतु, महाराष्ट्रात थांबे देण्यास आपले प्रशासन तयार नाही. कोकण रेल्वेत २२% आर्थिक सहभाग उचलून महाराष्ट्राला काहीही मिळाले नाही या आमच्या मतावर या प्रकारांमुळे मोहोर उमटते.

कोकण रेल्वे मार्गावरील वरील सर्व तालुके हे कोकणातील आर्थिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत. सणासुदीचा कालावधी तसेच पर्यटन हंगामामुळे येथे प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. अशा परिस्थितीत या स्थानकांना थांबे न दिल्याने स्थानिक रहिवाशांची अनावश्यक गैरसोय होणार आहे.

वरील गाड्यांना वरील स्थानकांवर थांबा दिल्यास स्थानिक नागरिकांची दळणवळणाची समस्या सुटेल,पर्यटन क्षेत्राला चालना मिळेल व प्रवाशांचा वेळ आणि खर्च वाचेल.

आपण या भागातील प्रवाशांच्या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे आणि वरील गाड्यांना आरक्षण सुरु होण्यापूर्वी महाड तालुक्यातील वीर, लांजा तालुक्यातील विलवडे, राजापूर तालुक्यातील राजापूर रोड आणि वैभववाडी तालुक्यातील वैभववाडी रोड तसेच ०११५१/०११५२ मुंबई-करमळी गाडीला सावंतवाडी रोड स्थानकांवर तातडीने थांबे देण्याची व्यवस्था करावी, अशी आम्ही नम्र विनंती करतो.

आपण लवकरात लवकर याबाबत सकारात्मक निर्णय घ्याल, अशी अपेक्षा आहे असे या निवेदनात त्यांनी म्हटले आहे.

Loading

१२ डिसेंबर पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-द्वादशी – 22:28:32 पर्यंत
  • नक्षत्र-अश्विनी – 09:53:20 पर्यंत
  • करण-भाव – 11:50:57 पर्यंत, बालव – 22:28:32 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-परिघ – 15:22:39 पर्यंत
  • वार- गुरूवार
  • सूर्योदय- 07:04
  • सूर्यास्त- 18:01
  • चन्द्र-राशि-मेष
  • चंद्रोदय- 15:16:00
  • चंद्रास्त- 28:41:00
  • ऋतु- हेमंत
महत्त्वाच्या घटना:
  • १७८७: ला पेनसिल्वेनिया हे अमेरिकेचे संविधान स्विकार करणारे दुसरे राष्ट्र बनले.
  • १७५५: डच इस्ट इंडिया कंपनीचे निकोबार येथे आगमन
  • १८००: ला वॉशिंग्टन डीसी अमेरिकेची राजधानी बनले.
  • १८८२: आनंदमठ या बंकिमचंद्र यांच्या कादंबरीचे प्रकाशन, याच कादंबरीमध्ये वंदे मातरम् हे गीत आहे.
  • १८८४: ला इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन देशांमध्ये क्रिकेट सामना खेळला गेला जो अधिकृत रित्या पहिला होता.
  • १९०१: जी. मार्कोनी याला प्रथमच बिनतारी संदेशाचे अटलांटिक महासागर पार प्रक्षेपण करण्यात यश मिळाले.
  • १९११: दिल्ली ही भारताची राजधानी करण्यात आली. या आधी कोलकाता ही भारताची राजधानी होती.
  • १९११: ला जॉर्ज पाचवा भारतामध्ये आला होता.
  • १९१७: ला इटली येथील फ्रेंच आल्प्स येथे फ्रान्स च्या सैन्याची रेल्वे रुळावरून रेल्वे घसरून ५४३ लोकांचा मृत्यू.
  • १९२३: ला इटलीच्या गंगा मानल्या जाणाऱ्या नदीवरील बांध फुटल्यामुळे ६०० च्या जवळपास लोक मारल्या गेले होते.
  • १९३६: ला चीन चे नेता च्यांग काई शेक यांनी जपान विरुद्ध युद्धाची घोषणा केली होती.
  • १९५८: ला जिनिया हा देश संयुक्त राष्ट्र संघाचा सदस्य बनला.
  • १९६३: ला केनियाला स्वातंत्र्य मिळाले.
  • १९७१: संस्थानिकांचे तनखे व विशेषाधिकार रद्द करण्यात आले.
  • १९९०: ला टी. एन. शेषन हे भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त बनले.
  • १९९६: ला भारत आणि बांग्लादेश यांच्या मध्ये ३० वर्षापर्यंत गंगेचे पाणी वाटण्याच्या करारा वर सह्या झाल्या होत्या.
  • २००१: पृथ्वी या क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात आली.
  • २००१: आशा भोसले यांना दादासाहेब फाळके पुरस्कार
  • २००१: ला भारताने नेपाळ ला दोन चीता हेलिकॉप्टर आणि काही अवजारे दिली होती.
  • २००८: ला कर्नाटक चे माजी मुख्यमंत्री एम वीरप्पा मोइली यांनी सरकारी कर्मचारी यांच्या सेवा मंडळांमध्ये बदलाव करण्यासाठी शिफारस केली.
  • २०१६: प्रियांका चोप्रा यांना युनिसेफ (UNICEF) सदिच्छा दूत म्हणून नेमण्यात आले.
  • 2021: हरनाज कौर संधूने मिस युनिव्हर्स 2021 जिंकली
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १८८१: वॉर्नर ब्रदर्स चे सहसंस्थापक हॅरी वॉर्नर यांचा जन्म. (मृत्यू: २५ जुलै १९५८)
  • १८७२: डॉ. बाळकृष्ण शिवराम मुंजे – राजकीय नेते, हिन्दू महासभेचे संस्थापक, अध्यक्ष आणि सरचिटणीस, लष्करीकरणाचे प्रवर्तक आणि नाशिक येथील ’भोंसला मिलिटरी स्कूल’चे संस्थापक (मृत्यू: ३ मार्च १९४८)
  • १८९२: गौरीशंकर गोवर्धनराम जोशी तथा ’धूमकेतू’ – गुजराथी कथाकार व कादंबरीकार. त्यांच्या ७ उत्कृष्ट कथांचा संग्रह ’सप्तपर्ण’ या नावाने प्रकाशित झाला आहे. (मृत्यू: ११ मार्च १९६५)
  • १९०५: डॉ. मुल्कराज आनंद – लेखक (मृत्यू: २८ सप्टेंबर २००४)
  • १९०७: खेमचंद प्रकाश – संगीतकार (मृत्यू: १० ऑगस्ट १९५०)
  • १९१५: फ्रँक सिनात्रा – हॉलिवूड मधील अभिनेते व गायक (मृत्यू: १४ मे १९९८)
  • १९१९: ला भारतीय क्रिकेटर भाऊसाहेब निंबाळकर यांचा जन्म.
  • १९२७: इंटेल कॉर्पोरेशनचे सहसंस्थापक रॉबर्ट नोयस यांचा जन्म. (मृत्यू: ३ जून १९९०)
  • १९४०: शरद पवार – केंद्रीय कृषी मंत्री, संरक्षण मंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
  • १९४५: ला संसद आणि लोकसभेचे सदस्य माजीद मेमन यांचा जन्म.
  • १९४९: ला महाराष्ट्राचे लोकनेते गोपीनाथ पांडुरंग मुंडे यांचा जन्म.
  • १९४९: ला तमिळ तसेच हिंदी चित्रपटांचे अभिनेते रजनीकांत यांचा जन्म.
  • १९५०: रजनीकांत – प्रसिद्ध तामिळ अभिनेते
  • १९५२: भारतीय कॅनेडियन व्यापारी आणि राजकारणी हरब धालीवाल यांचा जन्म.
  • १९५४: ला मुंबई येथे २६/११ च्या झालेल्या दहशदवादी हल्यात शहीद झालेले हेमंत करकरे यांचा जन्म.
  • १९७३: ला मराठी चित्रपट सृष्टीचे प्रसिद्ध सुपर स्टार भरत जाधव यांचा जन्म.
  • १९७८: ला मराठी चित्रपट सृष्टीचे कलाकार उमेश कामत यांचा जन्म.
  • १९८१: युवराजसिंग – भारतीय क्रिकेटपटू
  • १९८४: ला मराठी चित्रपट सृष्टीचे कलाकार संतोष जुवेकर यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १९३०: परदेशी मालाविरुद्ध निदर्शने करताना हुतात्मा बाबू गेनू याचा मोटारीखाली चिरडून मृत्यू (जन्म: ? ? १९०८)
  • १९६४: मैथिलिशरण गुप्त – हिन्दी कवी. त्यांचे सुमारे ४० स्वतंत्र ग्रंथ आणि ६ अनुवादित ग्रंथ प्रसिद्ध झाले. त्यांच्या ’भारतभारती’ या काव्यग्रंथामुळे त्यांना राष्ट्रकवी म्हणून मान्यता मिळाली. (जन्म: ३ ऑगस्ट १८८६)
  • १९९१: दत्तात्रय गणेश तथा अप्पासाहेब शेंबेकर – शेतीतज्ञ व बागाईतदार, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघाचे संस्थापक अध्यक्ष (१९६३ – १९६६) (जन्म: ? ? ????)
  • १९९२: पं. महादेवशास्त्री जोशी – साहित्यिक, भारतीय संस्कृतीकोषाचे व्यासंगी संपादक (जन्म: १२ जानेवारी १९०६ – आंबेडे, सातेरी, गोवा)
  • २०००: जयदेवप्पा हलप्पा तथा जे. एच. पटेल – कर्नाटकचे १५ वे मुख्यमंत्री (३१ मे १९९६ – ७ आक्टोबर १९९९) (जन्म: १ आक्टोबर १९३०)
  • २००५: रामानंद सागर – हिन्दी चित्रपट निर्माते (जन्म: २९ डिसेंबर १९१७)
  • २००६: सीगेट टेक्नोलॉजी चे सहसंस्थापक अॅलन शुगर्ट यांचे निधन. (जन्म: २७ सप्टेंबर १९३०)
  • २०१२: पण्डित रवी शंकर – सतार वादक, ’भारतरत्‍न’ (जन्म: ७ एप्रिल १९२०)
  • २०१२: उत्तराखंडचे पहिले मुख्यमंत्री नित्यानंद स्वामी यांचे निधन. (जन्म: २८ डिसेंबर १९२७)
  • २०१५: भारतीय शेतकरी आणि राजकारणी शरद अनंतराव जोशी यांचे निधन. (जन्म: ३ सप्टेंबर १९३५)

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search