Author Archives: Kokanai Digital
प्रास्तावित नागपूर – गोवा शक्तिपीठ महामार्ग ८०५ किमी लांबीचा असून तो वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशीव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग अशा १२ जिल्ह्यांतून जाणार आहे. या महामार्गाचे संरेखन अंतिम करण्यात आले असून आराखडाही तयार करण्यात आला आहे. हा महामार्ग मार्गी लावण्याच्या दृष्टीने एमएसआरडीसीने भूसंपादन प्रक्रियेस सुरुवात केली होती. मात्र कोल्हापूर, सांगली आणि आसपासच्या भागातील शेतकरी, स्थानिक रहिवासी आणि राजकीय नेते या महामार्गास विरोध करीत आहेत. हा महामार्ग रद्द व्हावा यासाठी आंदोलन सुरू आहे.
या पार्श्वभूमीवर याआधीच एमएसआरडीसीवर भूसंपादन प्रक्रिया स्थगित करण्याची नामुष्की ओढावली आहे. भूसंपादन पूर्णत: बंद असतानाच आता शक्तिपीठ महामार्गास पर्यावरणासंबंधीची परवानगी घेण्यासाठी एमएसआरडीसीकडून केंद्र सरकारकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता. मात्र हा प्रस्ताव आता एमएसआरडीसीने मागे घेतला आहे. एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी या वृत्ताला दुजोरा दिला.
बदलापूर: दोन चिमुकल्यांच्या अत्याचार प्रकरणी संतप्त पालक आणि बदलापूरकरांनी आंदोलकांनी साडेदहाच्या सुमारास बदलापूर रेल्वे स्थानकात ठिय्या मांडला. त्यामुळे मुंबईहून येणारी आणि मुंबईकडे जाणारी अशा दोन्ही रेल्वे सेवेला त्याचा फटका बसला आहे.
मंगळवारी सकाळी साडेसहा वाजल्यापासून बदलापूर पूर्व येथील आदर्श शाळेबाहेर पालक आणि नागरिकांनी आंदोलन सुरू केले होते. हे आंदोलन आक्रमक रूप घेत असतानाच यातील काही आंदोलकांनी आपला मोर्चा बदलापूर रेल्वे स्थानकाकडे वळवला. साडेदहा वाजण्याच्या सुमारास आंदोलकांनी मुंबईकडे जाणारी आणि मुंबईहून येणारी अशी दोन्ही रेल्वे सेवा बंद पाडली. रेल्वे रुळावर आंदोलक बसल्याने एकाच गोंधळ उडाला त्यामुळे लोकल वाहतूक ठप्प झाली. अकरा वाजेपर्यंत पोलीस आणि रेल्वे सुरक्षा बल आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न करत होते. मात्र आंदोलक आरोपीच्या फाशीची मागणी करत घोषणाबाजी करत आहेत.
Konkan Railway Updates: उत्तर व दक्षिण भारतात लोहमार्ग देखभाल दुरुस्तीचे काम करण्यात येणार असून त्याचा pकोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या रेल्वे गाड्यांवरही होणार आहे. काही गाड्या रद्द केल्या आहेत तर काही गाड्या इतर मार्गाने वळवण्यात आल्या आहेत.
गाडी क्रमांक १२४५० चंदीगड मडगाव एक्सप्रेस ७, ९, १४ आणि १६ सप्टेंबर रोजी रद्द करण्यात आली आहे. गाडी क्रमांक १२४४९ मडगाव-चंदीगड एक्सप्रेस १०, ११, १७ व १८ सप्टेंबर रोजी धावणार नाही.
चंदीगड कोचुवेली एक्सप्रेस ६, ११ व १३ सप्टेंबर रोजी आदर्शनगर, दिल्ली कांट, रेवारी, अलवार, मथुरामार्गे वळवण्यात आली आहे. याच मार्गाने कोचुवेली चंदीगड एक्सप्रेस ७, ९ व १४ सप्टेंबर रोजी धावेल. कोचुवेली-अमृतसर आणि अमृतसर-कोचुवेली एक्सप्रेस, एर्नाकुलम-निजामुद्दीन व निजामुद्दीन-एर्नाकुलम या गाड्याही या मार्गावरून धावणार आहेत.
मडगावहून १६ सप्टेंबर रोजी सुटणारी राजधानी एक्सप्रेस (२२४१३) ४ तास ४० मिनिटे उशिराने म्हणजे दुपारी १२.४० वाजता सुटणार आहे. १० सप्टेंबरची एर्नाकुलम निजामुद्दीन एक्सप्रेस उत्तर मध्य रेल्वेच्या विभागात अर्धा तास थांबवली जाणार आहे.
केंद्रीयमंत्री आणि उत्तर मुंबई मतदारसंघाचे खासदार पियुष गोयल यांनी बोरिवलीतून कोकणात जाणारी रेल्वे सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. दोन दिवसांपूर्वी बोरिवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील राणे यांनी ही गाडी दिनांक २४ ऑगस्ट पासून सुरू केली जाणार असल्याचे जाहीर केले आहे . यासाठी कोकण विकास समितीने ईमेलद्वारे पियुष गोयल आणि केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले आहेत.
<script async src="https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6191739074070790" crossorigin="anonymous"></script> <!-- new display --> <ins class="adsbygoogle" style="display: block;" data-ad-client="ca-pub-6191739074070790" data-ad-slot="8284357421" data-ad-format="auto" data-full-width-responsive="true"></ins> <script> (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({}); </script>पाश्चिम उपनगरीय रेल्वे क्षेत्रातील प्रवाशांसाठी या गाडीने कोकणात जाण्यासाठी एक सोयीचा पर्याय उपलब्ध होणार आहे. मात्र या गाडीचे थांबे निश्चित करताना या क्षेत्रातील सर्व कोकणवासियांचा विचार करणे गरजेचे आहे. 10105/10106 दिवा सावंतवाडी एक्सप्रेसच्या च्या धर्तीवर या गाडीला थांबे मिळाल्यास या गाडीचा मोठा फायदा प्रवाशांना होऊ शकतो. गरज असलेल्या स्थानकांवर नंतर थांबे मिळविण्यास खूप अडचणीचे जाते, त्यामुळे या स्थानकांवर सुरवातीलाच थांबे देण्याचा विचार करावा आशयाचे निवेदन कोकण रेल्वे विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष जयवंत शंकर दरेकर यांनी रेल्वे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना ईमेलद्वारे दिले आहे.
<script async src="https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6191739074070790" crossorigin="anonymous"></script> <ins class="adsbygoogle" style="display: block;" data-ad-format="fluid" data-ad-layout-key="-64+c2-1f-2z+tg" data-ad-client="ca-pub-6191739074070790" data-ad-slot="4639791735"></ins> <script> (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({}); </script>10105/10106 दिवा सावंतवाडी एक्सप्रेसचे थांबे
- दिवा
- कळंबोली
- पनवेल जंक्शन
- आपटा
- जिते
- रोहे
- माणगांव
- गोरेगांव रोड
- वीर
- सापेवामणे
- करंजाड़ी
- विन्हेरे
- खेड़
- चिपळूण
- सावर्डा
- आरवली रोड
- संगमेश्वर रोड
- रत्नागिरी
- निवसर
- आडवली
- वेरावली
- विलवडे
- सौंदल
- राजापुर रोड
- खारेपाटण रोड
- वैभववाडी रोड
- अचिर्णे
- नांदगाव रोड
- कणकवली
- सिंधुदुर्ग
- कुडाळ
- झाराप
- सावंतवाडी रोड
मालवण: मालवण तालुक्यातील सर्जेकोट येथे काल रविवारी मध्यरात्री नौका समुद्रात पलटी होऊन तीन मच्छीमारांचा मृत्यू झाला असल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. तर एक मच्छिमार पोहत किनाऱ्यावर येण्यात यशस्वी ठरल्याने सुदैवाने बचावला आहे. ऐन नारळी पौर्णिमेला झालेल्या या दुर्घटनेमुळे सर्जेकोट व हडी गावासह मच्छिमार बांधवांवर शोककळा पसरली आहे.
मृतांमध्ये पातीचे मालक सर्जेकोट मच्छिमार संस्थेचे व्हाईसचेअरमन गंगाराम उर्फ जीजी जनार्दन आडकर, हडी जठारवाडी येथील लक्ष्मण शिवाजी सुर्वे (65) व प्रसाद भरत सुर्वे (32) यांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत विजय अनंत धुरत (53) रा. मोर्वे देवगड हे पोहत किनार्यावर पोहचल्याने त्यांचा जीव बचावला असून आचरा प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांच्यावर उपचार केले जात आहेत.
दरम्यान, सकाळच्या सुमारास दुर्घटनेतील मच्छिमारांचे व्यांगणी येथे एकाचा तर सापळेबाग किनारी दोघांचे मृतदेह आढळून आले.
Train Derailment: मागच्या काही दिवसांपासून ट्रेनचे अपघात किंवा दुर्घटना थांबण्याचं नाव घेत नाही. पुन्हा एकदा पहाटेच्या सुमारास एक्सप्रेसचे डबे रुळावरुन घसरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ट्रेन रुळ सोडून पुढे गेली. या दुर्घटनेत मोठं नुकसान झालं असून घटनास्थळावरचे फोटो समोर आले आहेत.
19168 वाराणसी अहमदाबाद साबरमती एक्सप्रेस रुळावरुन घसरले. 22 डबे डिरेल झाले आहेत. मागच्या काही दिवसांपासून अशा घटना वाढत आहेत. या दुर्घटनेचं कारण अद्याप समोर आलं नाही
कानपूर भीमसेन सेक्शनदरम्यान ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या दुर्घटनेनंतर हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आला आहेमहत्त्वाची बाब म्हणजे अजून तरी कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आली नाही.या दुर्घटनेत जखमी झालेल्या लोकांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्याचं काम सुरू आहे.
प्रवाशांना सुरक्षित ठिकाणी घेऊन जाण्याचं काम सुरू आहे. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर अधिकारी, पोलीस आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. हा अपघात भयंकर होता. मात्र थोडक्यात जीवितहानी टळली आहे.
इंजिनला बोल्डर आदळल्याने इंजिनच्या कॅटल गार्डचे मोठे नुकसान झाल्याचं लोको पायलनं सांगितलं आहे. त्यामुळे ट्रेन डिरेल झाली असावी असा अंदाज आहे.