Author Archives: Kokanai Digital

Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर धावणार डॉ. आंबेडकर नगर – ठोकूर विशेष एक्सप्रेस

   Follow us on        

Konkan Railway: ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या सुट्ट्यांदरम्यान प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन, पश्चिम रेल्वेच्या समन्वयाने डॉ. आंबेडकर नगर (DADN) आणि ठोकूर (TOK) (मंगळूर जवळ) दरम्यान विशेष भाड्यावर विशेष एक्स्प्रेस चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

​कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या या विशेष गाड्यांचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

ट्रेन क्र. ०९३०४: डॉ. आंबेडकर नगर – ठोकूर विशेष

​प्रस्थान: रविवार, २१ आणि २८ डिसेंबर २०२५ रोजी.

​वेळ: डॉ. आंबेडकर नगर येथून संध्याकाळी १६:३० वाजता सुटणार.

​आगमन: ही गाडी तिसऱ्या दिवशी सकाळी ०३:०० वाजता ठोकरू येथे पोहोचेल.

ट्रेन क्र. ०९३०३: ठोकूर – डॉ. आंबेडकर नगर विशेष

​प्रस्थान: मंगळवार, २३ आणि ३० डिसेंबर २०२५ रोजी.

​वेळ: ठोकूर येथून सकाळी ०४:४५ वाजता सुटणार.

​आगमन: ही गाडी दुसऱ्या दिवशी दुपारी १५:३० वाजता डॉ. आंबेडकर नगर येथे पोहोचेल.

​महत्त्वाचे थांबे 

​प्रवाशांच्या सोयीसाठी, ही विशेष एक्स्प्रेस दोन्ही दिशांना खालील प्रमुख स्थानकांवर थांबेल:

​इंदूर जं., देवास, उज्जैन जं., नागदा जं., रतलाम जं., वडोदरा जं., भरूच जं., सुरत, वापी, वसई रोड, भिवंडी रोड, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम, करमळी, मडगाव जं., काणकोण, कारवार, अंकोला, गोकर्ण रोड, कुमठा, मुरुडेश्वर, भटकर, मूकांबिका रोड बायंदूर (हॉल्ट), कुंदापुरा, उडुपी, मुलकी आणि सुरतकल.​

गाडीची रचना (Composition)

​या विशेष गाडीमध्ये प्रवाशांसाठी एकूण २२ एलएचबी (LHB) डबे असणार आहेत,

ज्यामध्ये: ​वातानुकूलित ३ टायर (AC 3 Tier) – १९ डबे, ​वातानुकूलित ३ टायर इकोनॉमी (AC 3 Tier Economy) – ०१ डबा, ​जनरेटर कार (Generator Car) – ०२ डबे

​प्रवाशांनी या विशेष सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

कोकण रेल्वेचा ‘फुकट्या प्रवाशांना’ दणका: एका महिन्यात २.३३ कोटी रुपयांचा विक्रमी दंड वसूल!

   Follow us on        

मुंबई: कोकण रेल्वे मार्गावर तिकीट तपासणी मोहीम (Ticket Checking Drive) मोठ्या प्रमाणात तीव्र करण्यात आली असून, विनातिकीट आणि अनियमित प्रवास करणाऱ्यांवर कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने (KRCL) कडक कारवाईचा बडगा उगारला आहे. नोव्हेंबर २०२५ या एका महिन्यात, या मोहिमेतून २.३३ कोटी रुपये दंड आणि भाड्यापोटी वसूल करण्यात आले आहेत.

मोहिमेतील प्रमुख आकडेवारी (नोव्हेंबर २०२५)

​कोकण रेल्वेने नोव्हेंबर २०२५ मध्ये केलेल्या कारवाईचा तपशील खालीलप्रमाणे आहे:

​विशेष तिकीट तपासणी मोहिमा: १,०७०

​अनधिकृत/अनियमित प्रवासी: ४२,९६५

​वसूल झालेली एकूण रक्कम (भाडे आणि दंड): २.३३ कोटी रुपये

​कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून भाडे आणि दंड अशा स्वरूपात ही रक्कम वसूल करण्यात आली आहे.

KRCL चा प्रवाशांना इशारा

​रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांनी योग्य तिकीट किंवा पास सोबत ठेवावा, अन्यथा तिकीट तपासणी दरम्यान कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा स्पष्ट इशारा कोकण रेल्वेने दिला आहे. प्रवाशांनी नियमांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहनही रेल्वे प्रशासनाने केले आहे.

​प्रवाशांना अधिक चांगल्या आणि सुरक्षित सुविधा मिळाव्यात यासाठी कोकण रेल्वेची ही मोहीम यापुढेही सुरू राहणार आहे.

कोकण रेल्वे मार्गावर धावणार वडोदरा – कोट्टायम विशेष एक्सपेस

   Follow us on        

Konkan Railway: ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या काळात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी पश्चिम रेल्वेच्या समन्वयाने विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या गाड्यांचा तपशील खालीलप्रमाणे आहे:

१) गाडी क्र. 09124 / 09123 वडोदरा जं. – कोट्टायम विशेष गाडी (विशेष भाड्यावर):

गाडी क्र. 09124 (वडोदरा जं. – कोट्टायम स्पेशल)

​प्रस्थान: ही गाडी वडोदरा जं. येथून दर शनिवारी सकाळी ०६:०५ वाजता सुटेल.

​आगमन: कोट्टायम येथे दुसऱ्या दिवशी संध्याकाळी १९:५० वाजता पोहोचेल.

​धावण्याच्या तारखा:

​डिसेंबर २०२५: २० आणि २७

​जानेवारी २०२६: ०३ आणि १०

गाडी क्र. 09123 (कोट्टायम – वडोदरा जं. स्पेशल)

​प्रस्थान: ही गाडी कोट्टायम येथून दर रविवारी रात्री २१:०० वाजता सुटेल.

​आगमन: वडोदरा जं. येथे तिसऱ्या दिवशी सकाळी ०६:०० वाजता पोहोचेल.

​धावण्याच्या तारखा:

​डिसेंबर २०२५: २१ आणि २८

​जानेवारी २०२६: ०४ आणि ११

महत्वाचे थांबे (दोन्ही दिशांना):

​सुरत, वापी, वसई रोड, भिवंडी रोड, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी, थिविम, करमळी, मडगाव जं., कारवार, कुमटा, मुरुडेश्वर, भटळ, मूकांबिका रोड बायंदूर (ह), कुंदापुरा, उडुपी, सुरथकल, मंगळूर जं., कासारगोड, कन्नूर, तेलिचेरी, कोझिकोडे, तिरूर, शोरानूर जं., त्रिशूर, आलुवा आणि एरणाकुलम टाऊन स्थानकांवर गाडी थांबेल.

गाडीची रचना (Composition):

​गाडीमध्ये एकूण २१ एलएचबी (LHB) डबे असतील, ज्याचा तपशील खालीलप्रमाणे आहे:

​प्रथम श्रेणी वातानुकूलित (First AC) – ०१ डबा

​द्वितीय श्रेणी वातानुकूलित (2 Tier AC) – ०२ डबे

​तृतीय श्रेणी वातानुकूलित (3 Tier AC) – ०६ डबे

​शयनयान (Sleeper) – ०६ डबे

​सामान्य (General) – ०४ डबे

​एसएलआर/डी (SLR/D) – ०१ डबा

​जनरेटर कार (Generator Car) – ०१ डबा

सावंतवाडी टर्मिनस प्रकरणी कोकण रेल्वे सीएमडींच्या वक्तव्याने नव्याने वाद

   Follow us on        

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकाला ‘टर्मिनस’चा दर्जा देण्याच्या दीर्घकाळ रखडलेल्या प्रकल्पात आता नव्याने वाद निर्माण झाला आहे. कोकण रेल्वे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक (CMD) संतोष कुमार झा यांनी नुकत्याच झालेल्या एका बैठकीत “हे स्थानक टर्मिनस नसून फक्त वे-साईड स्टेशन आहे. ‘टर्मिनस’ हे नाव कसे पडले? याचा पुरावा द्या,” अशी थेट मागणी केल्याची माहिती समोर आली आहे.

सावंतवाडी टर्मिनसच्या कामातील विलंब आणि सुविधांबाबत सतत पाठपुरावा करणारे कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे नेते मिहीर मठकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अलीकडेच संतोष कुमार झा यांची भेट घेतली होती. या चर्चेदरम्यान स्थानकाच्या दर्जा, कामातील उशीर आणि पुढील कार्यवाही यावर बोलताना झा यांनी हा प्रश्न उपस्थित केला. यामुळे स्थानकाच्या नावाचा दर्जा, प्रकल्प रेंगाळण्याची कारणे आणि प्रशासकीय दृष्टिकोनावरून नव्याने वाद पेटण्याची शक्यता आहे.

या घडामोडींवर तीव्र नाराजी व्यक्त करत मिहीर मठकर यांनी म्हटले आहे, “वरिष्ठ अधिकारीच अशा प्रकारचे वक्तव्य करत असतील तर सामान्य नागरिकांनी काय अपेक्षा ठेवाव्या? हा प्रकल्प वर्षानुवर्षे रखडला आहे, आणि आता दर्जाच नाकारला जातोय.” तसेच, पुढील काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

पार्श्वभूमी:

कोकण रेल्वे मार्गावरील सावंतवाडी रोड स्थानकाला टर्मिनस म्हणून विकसित करण्याची योजना २०१५ पासून आहे. तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या उपस्थितीत भूमिपूजनही झाले होते. मात्र, भूसंपादन, निधी आणि इतर कारणांमुळे काम रखडले आहे. स्थानिक नागरिक आणि प्रवाशांसाठी अतिरिक्त थांबे, मेंटेनन्स सुविधा आणि इतर सोयी अपेक्षित आहेत. कोकण रेल्वेच्या काही अधिकृत जुन्या घोषणांमध्ये याला ‘टर्मिनस’ म्हणून उल्लेख आहे, पण सध्याच्या विकासात ते मधले स्थानक (मिड-स्टेशन) म्हणूनच विकसित झाल्याचे सांगितले जाते.

हा वाद आता रेल्वे मंत्रालयापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. स्थानिक खासदार-आमदार आणि संघटनांकडून पाठपुरावा वाढवला जाणार असून, लवकरच आंदोलनाची रूपरेषा आखली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

२०२६ साठी २४ दिवसांच्या सार्वजनिक सुट्ट्या जाहीर; ‘या’ तारखेला असणार एक अतिरिक्त सुट्टी

   Follow us on        

मुंबई, दि. ९: महाराष्ट्र शासनाने २०२६ या वर्षासाठी राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांसाठी २४ सार्वजनिक सुट्ट्या जाहीर केल्या असून, भाऊबीज (११ नोव्हेंबर २०२६, बुधवार) यादिवशी अतिरिक्त सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे, सामान्य प्रशासन विभागाने या संदर्भातील अधिसूचना जारी केली आहे.

जाहीर केलेल्या सुट्ट्यांमध्ये प्रमुख सण आणि राष्ट्रीय दिवसांचा समावेश आहे. या सुट्या महाराष्ट्रातील सर्व शासकीय कार्यालये, राज्य शासनाचे उपक्रम, महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायती यांना लागू राहील.

याशिवाय १ एप्रिल २०२६ (बुधवार) हा दिवस केवळ बँकांसाठी वार्षिक लेखापरीक्षणासाठी सुट्टी म्हणून जाहीर करण्यात आला आहे.

 

 

 

शालेय सहलींसाठी फक्त एसटी बस हाच पर्याय; विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी सरकारचे कठोर नियम

   Follow us on        

मुंबई : विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला असून, राज्यातील सर्व शालेय सहलींसाठी फक्त एमएसआरटीसीच्या एसटी (लालपरी) बसचांचा वापर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. यामुळे खासगी आणि शाळेच्या मालकीच्या बसद्वारे सहली आयोजित करण्यावर संपूर्ण बंदी घालण्यात आली आहे.

नव्या नियमांनुसार सहलीसाठी शाळांनी प्रशासनाची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक असून, प्रत्येक १० विद्यार्थ्यांमागे १ शिक्षक असा प्रमाण राखणे बंधनकारक करण्यात आले आहे. मुलींच्या गटांसाठी महिला शिक्षकांची नियुक्ती अनिवार्य असेल. तसेच सहलींचे नियोजन ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक स्थळांना प्राधान्य देऊन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

एमएसआरटीसीकडून दररोज ८०० ते १००० बस २५१ डेपोमधून उपलब्ध करून देण्याची तयारी असून, शालेय सहलींसाठी ५० टक्के भाडे सवलत देण्यात येणार आहे. सरकारच्या मते या नियमांमुळे विद्यार्थ्यांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि नियंत्रित होईल अशी अपेक्षा आहे.

सावंतवाडी टर्मिनससाठीच्या तक्रार मोहिमेला कोकणवासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

   Follow us on        सावंतवाडी टर्मिनस प्रकल्पाला गती देण्यासाठी महाराष्ट्र शासनाचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे ऑनलाईन तक्रार मागणी नोंदवण्याबद्दल आवाहन कोकण रेल्वे प्रवासी संघटनेकडून करण्यात आले आहे.

या मोहिमेला कोकणवासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. कालच्या एका दिवसात टर्मिनस साठीच्या तब्बल 264 तक्रारी दाखल झाल्या असल्याची माहिती संघटनेचे संपर्कप्रमुख तसेच उपाध्यक्ष सागर तळवडेकर यांनी दिली.

सावंतवाडी रेल्वे टर्मिनस व्हावे यासाठी डिजिटल पद्धतीने लढाई करताना सुरवातीला इमेल मोहीम, त्यानंतर तक्रार मोहीम, त्यात महामहीम राष्ट्रपती यांच्याकडे तक्रार, माननीय प्रधानमंत्री यांच्याकडे तक्रार, मुख्यमंत्री श्रीमान देवाभाऊ, रेल्वे मंत्रालय (रेल मदद) आणि कोकण रेल्वे कडे हजारो तक्रारी दाखल केल्या, त्यानंतर असणारे मंत्री महोदयांचे जनता दरबारात देखील तक्रारींचा पाऊस पाडला होता. आणि आज देखील त्याचा प्रत्यय आला.

सोबतच सुरू असलेल्या डिजिटल सह्यांची मोहिमेला कोकणवासीयांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि आता देखील देत आहात याचा अर्थ कोकणवासी आपल्या हक्काच्या लढाईसाठी नक्कीच जागा झालाय. कोकणवासी आपल्या हक्कासाठी डिजिटली साक्षर होतोय यात मी समाधानी आहे. अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

सावंतवाडी टर्मिनसचे काम त्वरित सुरु करण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे मागणी नोंदवावी यात वेबसाईट www.pratapsamaik.com Grievances ( तक्रार) सेक्शन Public Transport ( सार्वजनिक वाहतूक) निवडा Describe your issue मध्ये पेस्ट करावे असे आवाहन करण्यात आले आहे.गेल्या १० वर्षांपासून रखडलेल्या सावंतवाडी टर्मिनसमुळे कोकणी प्रवाशांचे हाल होत आहेत.निधी परत जाणे आणि प्रशासकीय समन्वयाच्या अभावामुळे हा प्रकल्प ठप्प आहे.हा प्रकल्प गतिमान करण्यासाठी व प्रवाशांना सुविधा देण्यासाठी तो तातडीने राज्य शासनाच्या मित्रा ( MlTRA ) संस्थेकडे वर्ग करावा.मागणी नोंदवल्यानंतर येणाऱ्या पोचपावतीला स्क्रीनशॉट संबधित ग्रुपवर अपलोड करा.या संदेशात सांगितल्याप्रमाणे आपण सावंतवाडी टर्मिनसच्या कामाला गती देण्यासाठी आपली मागणी नोंदवू शकता आणि हा संदेश इतर कोकणवासीयांपर्यत पोहोचवावा असे आवाहन कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने केले आहे.

 

Mumbai Goa Highway Accident: महामार्गावरील अपघातप्रकरणी अधिकारी व ठेकेदारांना सहआरोपी करा; जनआक्रोश समितीची मागणी

   Follow us on        माणगाव : मुंबई–गोवा महामार्गावरील माणगाव येथे झालेल्या अलीकडील अपघातानंतर अधिकारी व ठेकेदारांना सहआरोपी करण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी जनआक्रोश समितीने माणगाव पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मा. श्री. निवृत्ती बोऱ्हाडे साहेब यांची भेट घेतली.

समितीने यावेळी गेल्या १७ वर्षांतील अपघातांचे आकडे समोर ठेवत सांगितले की, महामार्गावरील रखडलेल्या कामामुळे आजपर्यंत ४५०० पेक्षा जास्त कोकणकरांचा मृत्यू, तर १० हजारांहून अधिक जखमी झाले आहेत. “अनेक दुर्घटनांमध्ये रस्त्यावरील त्रुटी स्पष्ट असतानाही ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कोणतीही कारवाई झाली नाही; प्रत्येकवेळी चालकांवरच गुन्हे दाखल करण्यात आले,” अशी नाराजी समितीने व्यक्त केली.

अपघातात शिवशाही बस चालकाची चूक असल्याचे प्राथमिक मत स्थानिक प्रत्यक्षदर्शी व पोलिसांनी नोंदवले असले, तरी महामार्गाच्या चौपदरीकरणानंतर अचानक दुपदरी रस्ता होणे, इशारा फलकांचा अभाव, धोकादायक ठिकाणांचा सूचना ही प्रशासकीय व ठेकेदारांची गंभीर चूक असल्याचे समितीने स्पष्ट केले. अशा परिस्थितीत अधिकारी व ठेकेदार यांनाही जबाबदार धरणे आवश्यक असल्याची भूमिका समितीने मांडली.

यावर बोऱ्हाडे साहेबांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून कायदेशीर बाजू तपासण्याचे आश्वासन दिले. तसेच माणगाव परिसरातील धोकादायक ठिकाणांची तातडीने पाहणी करण्याचे आदेश त्यांनी तत्काळ दिले. या पाहणी अहवालाच्या आधारे NHAI व PWD यांसारख्या संबंधित यंत्रणांना निर्देशित करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. यापुढे महामार्गावरील त्रुटींमुळे अपघात झाल्यास अधिकारी व ठेकेदारांवर गुन्हे नोंदवले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या बैठकीस स्थानिक माणगावकर, जनआक्रोश समितीचे सदस्य तसेच माणगावमधील सर्व पक्षीय पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व समाजघटक एकत्र आल्यास महामार्गावरील दुर्लक्षाविरुद्धचा आवाज आणखी बुलंद होईल, असा विश्वास जन आक्रोष समितीने व्यक्त केला.

हिवाळी विशेष गाड्यांना थांबे द्या – रेल्वे प्रवासी सेवा समितीचे निवेदन

   Follow us on    

 

 

► खेड (ता.) कोंकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या हिवाळी विशेष गाड्यांच्या थांब्यांमध्ये महाराष्ट्रातील महत्त्वाचे तालुके पुन्हा एकदा दुर्लक्षित झाल्याचा आरोप करत अखिल कोंकण रेल्वे प्रवासी सेवा समिती, महाराष्ट्र यांनी मध्य रेल्वेला निवेदन दिले आहे. ०११४१/०११४२ मुंबई-करमळी, ०१४५१/०१४५२ लोकमान्य टिळक टर्मिनस-तिरुअनंतपुरम उत्तर तसेच भविष्यात जाहीर होणाऱ्या सर्व हिवाळी विशेष गाड्यांना माणगाव, महाड, खेड, राजापूर, वैभववाडी व सावंतवाडी या तालुक्यातील स्थानकांवर थांबे देण्यात यावेत, अशी मागणी समितीचे सचिव अक्षय महापदी यांनी केली आहे.

 

अतिरिक्त थांबा न देण्याचा निर्णय अयोग्य…

समितीने नमूद केले आहे की, ख्रिसमस व नवनव्या वर्षाच्या सुट्ट्यांदरम्यान गेल्यावर्षीप्रमाणे महाराष्ट्रातील पर्यटकांनी मोठी वर्दळ असेल. त्याचबरोबर शालेय सुट्ट्यांमुळे स्थानिक नागरिक मोठ्या प्रमाणात आपल्या गावी जातात. नियमित गाड्यांचे आरक्षण पूर्ण भरलेले असल्याने प्रवाशांची अपेक्षा विशेष गाड्यांवर होती; मात्र महाराष्ट्रातील अनेक तालुक्यांना थांबे न दिल्यामुळे प्रवाशांचा हिरमोड झाल्याचे समितीने सांगितले.

रत्नागिरी ते कणकवली या १११ किलोमीटरच्या पट्ट्यात एकाही विशेष गाडीला थांबा नाही. या गाड्या नेमक्या कोणासाठी सोडल्या जातात? असा प्रश्नही समितीने उपस्थित केला आहे. तिरअनंतपुरम विशेष गाडी सावंतवाडीच्या पुढे १५-२० किमी अंतरावर थांबे घेते, परंतु महाराष्ट्र कोकणातील अतिरिक्त थांबा न देण्याचा निर्णय अयोग्य असल्याचे समितीचे मत आहे.

त्वरित सकारात्मक निर्णयाची अपेक्षा व्यक्त

कोकणातील पर्यटक, व्यापारी, शिक्षण आणि रोजगारासाठी हे तालुके महत्त्वाचे असून विशेष गाड्या थांबा नसल्यामुळे स्थानिकांना मोठी गैरसोय होते. अनेकांनी तिकिटे रद्द केली आहेत. समितीने वैयक्तिक राजकारण सोडून, खेडवाडी रोड आणि सावंतवाडी रोड या स्थानकांवर तातडीने थांबे सुरू करण्याची मागणी केली आहे. प्रवासी सेवा समिती रेल्वे प्रशासनाकडून याबाबत त्वरित सकारात्मक निर्णयाची अपेक्षा व्यक्त केली आहे.

Konkan Railway: डिजिटल तक्रार प्रणालीमुळे हरवलेले ७५ वर्षीय आजोबा कुटुंबीयांकडे सुखरूप परत

   Follow us on    

 

 
५ डिसेंबर, २०२५

दिनांक ४ डिसेंबर रोजी तिरुनेलवेली – जामनगर एक्सप्रेस (गाडी क्रमांक १९५७७) ने प्रवास करणारे ७५ वर्षीय वृद्ध प्रवासी चुकीने चिपळूण येथे उतरल्याने हरवले होते. मात्र त्यांच्या मुलाने ‘रेल मदद’वर तात्काळ तक्रार नोंदवल्यानंतर कोकण रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाने (RPF) जलद आणि समन्वयित शोधमोहीम राबवली.

चिपळूण स्थानकात गस्त घालत असताना RPF पथकाच्या लक्षात एक वृद्ध प्रवासी प्लॅटफॉर्मवर भांबावलेल्या अवस्थेत फिरताना दिसले. पथकाने त्यांच्याशी संवाद साधला असता, ते चुकून गाडीतून उतरल्याचे आणि स्वतःचे गंतव्य नीट सांगू न शकण्याच्या अवस्थेत असल्याचे स्पष्ट झाले.

यानंतर ‘रेल मदद’वरील तक्रारीतील तपशीलांची पडताळणी करून RPF पथकाने त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला व त्या वृद्ध प्रवाशाला सन्मानपूर्वक त्यांच्या परिवाराकडे सुरक्षितपणे सोपवले.

कुटुंबीयांनी RPF चे मनःपूर्वक आभार मानले. या घटनेतून कोकण रेल्वेची डिजिटल तक्रार नोंद, वेगवान प्रतिसाद आणि मैदानातील समन्वयित कार्यप्रणाली वृद्ध व असुरक्षित प्रवाशांच्या सुरक्षेसाठी किती प्रभावी ठरते, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search