Author Archives: Kokanai Digital

सावधान! ही चूक करू नका; नाहीतर तुमचा ‘फार्मर आयडी’ ५ वर्षांसाठी ब्लॉक; शासकीय योजना बंद

   Follow us on        

महाराष्ट्र: महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण आणि कठोर निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजनेअंतर्गत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी २६ मार्च २०२६ रोजी घोषणा केली की, गाव नकाशावरील शेत किंवा पाणंद रस्त्यांवर अतिक्रमण करणाऱ्या किंवा रस्त्याचे नुकसान करणाऱ्या शेतकऱ्यांचा आधार लिंक्ड फार्मर आयडी पाच वर्षांसाठी ब्लॉक करण्यात येईल. यामुळे अशा शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या कोणत्याही योजनांचा लाभ मिळणार नाही.

सरकारने स्पष्ट केले आहे की, अतिक्रमण हटवण्यासाठी शेतकऱ्यांना सात दिवसांचा कालावधी देण्यात येईल. शेतकरी स्वेच्छेने जमीन दान करू शकतात, परंतु त्यांना ती जमीन नंतर परत मिळणार नाही. मात्र, नियमांचे पालन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी स्टॅम्प ड्यूटी माफ करण्याची तरतूद करण्यात आली आहे. भूसंपादन न करता स्वेच्छा दानावर भर देण्यात आला असून, नोंदणीकृत दानपत्र किंवा हक्कसोड पत्र आवश्यक ठरणार आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा हा निर्णय ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेतापर्यंत बारमाही, मजबूत आणि यंत्रसामग्रीने तयार केलेले पक्के रस्ते उपलब्ध करून देण्यासाठी घेण्यात आला आहे.

यामुळे शेतमाल वाहतुकीतील अडथळे दूर होऊन कृषी उत्पादन वाढण्यास मदत होईल, असे सरकारचे म्हणणे आहे. ही योजना डिसेंबर २०२५ मध्ये मंत्रिमंडळाने मंजूर केली होती आणि त्यात १०० टक्के यांत्रिकीकरणाला परवानगी देण्यात आली आहे.महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, शेतकऱ्यांच्या हितासाठी रस्त्यांचा विकास आवश्यक आहे आणि अतिक्रमण रोखण्यासाठी हे कठोर पाऊल उचलण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी याबाबत जागरूक राहावे आणि स्थानिक महसूल कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन सरकारने केले आहे. ही बातमी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची असून, ग्रामीण विकासाच्या दृष्टीने एक मोठा पाऊल मानले जात आहे.

 

 

मुंबई–सुरत लोकल ट्रेन लवकरच सुरू होणार

   Follow us on        

मुंबई: मुंबई–सुरत दरम्यान उपनगरी (सबर्बन) रेल्वे सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण हालचाली सुरू झाल्या असून, गुजरात राज्यातील प्रवाशांसाठी ही मोठी दिलासादायक बातमी ठरण्याची शक्यता आहे. पश्चिम रेल्वे (WR) प्रशासन या मार्गावर आधुनिक नमो भारत रॅपिड ट्रान्झिट ट्रेन तसेच सुधारित मेनलाइन इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट (MEMU) गाड्या चालवण्याचा विचार करत आहे.

सध्या विरार ते सुरत दरम्यान MEMU गाड्या धावतात; मात्र या गाड्या सुमारे ३० थांबे घेत असल्याने प्रवासाला ५ तासांहून अधिक वेळ लागतो. तसेच दिवसातून मर्यादित फेऱ्या असल्याने प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर गैरसोय सहन करावी लागते. यामुळे मुंबई–सुरत दरम्यान अधिक वेगवान, आरामदायी आणि वारंवार धावणारी सेवा सुरू करण्याची गरज व्यक्त केली जात होती.

याच पार्श्वभूमीवर नमो भारतसारख्या आधुनिक गाड्यांचा पर्याय समोर आला आहे. या गाड्यांमध्ये एसी आणि नॉन-एसी डबे, शौचालय सुविधा, आरामदायी आसन व्यवस्था आणि जास्त वेग अशा सुविधा उपलब्ध आहेत. सध्याच्या लोकल (EMU) गाड्यांमध्ये शौचालय नसल्यामुळे ३ तासांपेक्षा जास्त प्रवास करणे अवघड होते. त्यामुळे लांब पल्ल्याच्या उपनगरी सेवेसाठी अशा आधुनिक गाड्या अधिक उपयुक्त ठरू शकतात.

या योजनेअंतर्गत सुरत रेल्वे स्थानकावर उपनगरी गाड्यांसाठी स्वतंत्र प्लॅटफॉर्म उभारण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. सुरत स्टेशनचा सुमारे ₹१,५०० कोटींचा पुनर्विकास प्रकल्प सुरू असून, तो डिसेंबर २०२७ पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. या नव्या स्टेशनला मेट्रो, बुलेट ट्रेन आणि विमानतळाशीही जोडले जाणार आहे, ज्यामुळे एकात्मिक वाहतूक व्यवस्था तयार होईल.

जर मुंबई–सुरत उपनगरी रेल्वे सेवा प्रत्यक्षात आली, तर हजारो रोजंदारी कामगार, व्यावसायिक आणि छोट्या उद्योगांशी संबंधित प्रवाशांना मोठा फायदा होईल. प्रवासाचा वेळ कमी होईल, रेल्वेवरील ताण कमी होईल आणि रस्ते वाहतुकीवरील दबावही घटण्यास मदत होईल.

एकूणच, मुंबई–सुरत दरम्यान उपनगरी रेल्वे सेवा सुरू करण्याचा प्रस्ताव हा भविष्यातील दळणवळणासाठी गेमचेंजर ठरू शकतो. आता या योजनेची अंमलबजावणी किती लवकर होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मनसेचा दुसरा ‘प्रहार’! बंद केलेली गाडी सुरू करण्यासाठी कोकण रेल्वे मुख्यालयावर धडक

   Follow us on        

नवी मुंबई: कोकण रेल्वेच्या प्रवाशांना सातत्याने भेडसावणाऱ्या अडचणींविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज बेलापूर येथील कोकण रेल्वे मुख्यालयावर धडक देत जोरदार निषेध नोंदवला. कोकणातील चाकरमान्यांची जीवनवाहिनी असलेल्या रेल्वे सेवेत होणारी गैरसोय, तसेच ‘दादर–रत्नागिरी पॅसेंजर’सारख्या महत्त्वाच्या गाड्या रद्द करण्याच्या निर्णयामुळे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी आहे. या पार्श्वभूमीवर मनसेच्या शिष्टमंडळाने रेल्वे प्रशासनाला निवेदन सादर करून तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली.

मनसेने स्पष्ट इशारा देताना सांगितले की, प्रवाशांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास आणि रद्द केलेल्या गाड्या त्वरित पूर्ववत न केल्यास पक्ष आपल्या आक्रमक शैलीत आंदोलन उभे करेल.

या वेळी लहू थळे, स्वप्निल पंडित, प्रथमेश म्हात्रे, अक्षय वानखेडे, सविनय म्हात्रे, विलास घोणे, सचिन कदम यांच्यासह बेलापूर विभागातील प्रकाश कोकाटे, प्रशांत कोळी, शशी कोळी, सिद्धेश गायकवाड, ऋषिकेश पवार आणि चंद्रकांत कोळी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

यापूर्वी मनसेच्या शिष्टमंडळाने मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील मध्य रेल्वेच्या मुख्यालयात धडाक देऊन दादर रत्नागिरी गाडी दादर येथून सोडण्याची मागणी केली आणि तसे न केल्यास मनसे स्टाइलने आंदोलन करू अशा इशारा दिला होता.

कोकणवासीयांना न्याय मिळेपर्यंत आणि त्यांच्या प्रवासातील अडचणी दूर होईपर्यंत हा लढा सुरूच राहणार असल्याचे मनसेकडून सांगण्यात आले.

धक्कादायक! वंदे भारत एक्सप्रेसमध्ये जेवणात किडे; कंत्राटदाराला ५० लाखांचा दंड

   Follow us on        

नवी दिल्ली : पटना ते टाटानगर दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस (ट्रेन नंबर २१८९६) मध्ये १५ मार्च २०२६ रोजी जेवणात सर्व्ह केलेल्या अमूल दहीत जिवंत किडे  आढळल्याची तक्रार प्रवाशाने केल्यानंतर भारतीय रेल्वेने कठोर पावले उचलली आहेत.प्रवासी ऋतेश कुमार सिंह यांनी जेवणाच्या वेळी दही उघडल्यावर त्यात किडे फिरत असल्याचे पाहिले. केवळ एका कंटेनरपुरते मर्यादित न राहता अनेक दहीच्या कंटेनर्समध्ये हा दोष आढळला. यासंदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.या घटनेची गांभीर्याने दखल घेत रेल्वे मंत्रालयाने खालील कारवाई केली:

आयआरसीटीसी वर ₹१० लाख दंड

सेवा पुरवठादार कंपनी वर ₹५० लाख दंड

सेवा पुरवठादाराचा करार तत्काळ रद्द

रेल्वेने स्पष्ट केले की, प्रवाशांच्या सुरक्षितता आणि जेवणाच्या गुणवत्तेला प्राधान्य दिले जाते. अशा प्रकारच्या अन्न सुरक्षा उल्लंघनाला शून्य सहनशीलता धोरण असल्याचे रेल्वेने सांगितले.प्रवाशांनी सांगितले की, दही ४ मार्च रोजी तयार झाले होते आणि १५ मार्च रोजी सर्व्ह केले गेले, म्हणजे सुमारे ११ दिवसांचे अंतर होते. स्टाफने सुरुवातीला किड्यांना केशर समजले होते, मात्र नंतर वस्तुस्थिती स्पष्ट झाली.ही घटना वंदे भारत सारख्या प्रीमियम ट्रेनमध्ये घडल्याने प्रवाशांमध्ये मोठी नाराजी व्यक्त होत आहे. अन्न सुरक्षा मानकांचे काटेकोर पालन करण्यासाठी रेल्वेने सर्व संबंधित विभागांना सूचना दिल्या आहेत.

अन्न पॅकेट उघडण्यापूर्वी त्याची तपासणी करावी आणि कोणतीही अनियमितता आढळल्यास तत्काळ ट्रेन स्टाफ किंवा आयआरसीटीसी अॅपद्वारे तक्रार नोंदवावी. असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

 

 

 

दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा सुरू करा; खासदार नारायण राणे यांची रेल्वे मंत्र्यांकडे मागणी

   Follow us on        

दिल्ली: कोकण रेल्वे मार्गावरील अत्यंत महत्त्वाची आणि सर्वसामान्यांची जीवनवाहिनी समजली जाणारी ‘दादर-रत्नागिरी पॅसेंजर’ ट्रेन गेल्या अनेक दिवसांपासून बंद असल्याने कोकणवासीयांचे प्रचंड हाल होत आहेत. या पार्श्वभूमीवर, माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहून ही रेल्वे सेवा तातडीने पूर्ववत करण्याची मागणी केली आहे. या ट्रेनच्या अभावामुळे विशेषतः दैनिक मजूर, छोटे व्यापारी, विद्यार्थी आणि उपचारासाठी मुंबईला जाणाऱ्या रुग्णांना मोठ्या आर्थिक आणि शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे राणे यांनी पत्रात नमूद केले आहे.

खासदार राणे यांनी पत्रात स्पष्ट केले की, रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण आणि निमशहरी भागातील जनतेसाठी ही रेल्वे सर्वात स्वस्त आणि विश्वासार्ह पर्याय होती. मात्र, ही सेवा बंद झाल्यामुळे प्रवाशांना खासगी वाहतुकीचा महागडा पर्याय निवडावा लागत आहे किंवा इतर ओव्हरक्राउडेड गाड्यांतून प्रवास करावा लागत आहे. यामुळे कोकणातील सामाजिक आणि आर्थिक घडी विस्कटत असून, जनभावनेचा विचार करून रेल्वे मंत्रालयाने या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करावा, अशी विनंती त्यांनी केली आहे. कोकणच्या विकासासाठी आणि जनतेला दिलासा देण्यासाठी ही ‘पॅसेंजर’ सेवा लवकरच सुरू होईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.

दादर – रत्नागिरी गाडी बंद करण्यामागे दिलेले रेल्वेचे ‘स्पष्टीकरण’ पूर्णपणे अस्वीकार्य

मुंबई : पुन्हा एकदा मध्य रेल्वे प्रशासनाने ‘स्पष्टीकरण’ देत रत्नागिरी पॅसेंजर गाडीला लोकल विलंबाचे कारण ठरवले आहे. दिवा क्रॉसिंगवर मोठी अडचण निर्माण होत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र हे स्पष्टीकरण पूर्णपणे अस्वीकार्य असल्याचे मत प्रवाशांनी व्यक्त केले आहे.

मध्य रेल्वेचे ‘स्पष्टीकरण’

दादर – रत्नागिरी गाडी बंद करण्यामागे रेल्वेने आपले स्पष्टीकरण दिले आहे. दादर रत्नागिरी ही गाडी कोरोनानंतर सुरू करताना दादर स्थानकावरून दिवा स्थानकामध्ये शिफ्ट केली गेली होती. याचे मुख्य कारण दिवास्थानकामध्ये क्रॉसिंग करत असताना इतर लोकल ट्रेनला होणारा उशीर हे होते. ही गाडी ज्यावेळेस दिवास्थानकामध्ये क्रॉसिंग करते त्यावेळेस सुमारे सात ते आठ लोकल गाड्यांना थांबावे लागत होते. त्यातून लोकल सेवेवर दुष्परिणाम होत होता, असे रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितले.

मात्र हे स्पष्टीकरण अस्वीकार्य असून उत्तर भारतात जाणार्‍या गाड्यांना प्राधान्य दिल्यानंतर केलेली सारवासारव असल्याचे मत प्रवासी संघटनांनी व्यक्त केले आहे.

कोरोना पूर्व काळात मागील २० वर्षांपासून ही रत्नागिरी पॅसेंजर गाडी नियमित धावत होती. त्या काळात कधीही लोकल सेवेवर एवढा ‘मोठा’ परिणाम झाला नव्हता. आता अचानक काय बदलला? रेल्वे प्रशासनाला रात्रीच्या अंधारात काय ‘नवीन’ समस्या दिसली?

सर्वात मोठा प्रश्न – दिवा स्टेशनचा!

दिवा स्टेशनवरून मुंबईकडे येणाऱ्या गाड्यांसाठी ट्रॅक क्रमांक ५ आणि ६ पूर्णपणे मेल आणि एक्सप्रेस गाड्यांसाठी राखीव आहेत. मग लोकल गाड्यांना या रत्नागिरी पॅसेंजरमुळे कशी अडचण येते? एखादी पॅसेंजर गाडी क्रॉसिंगवर थांबली तरी ती ५-६ ट्रॅकवरच राहते ना? लोकलना तर वेगळ्या ट्रॅकवरून मार्ग मिळतो. मग ही ‘मोठी अडचण’ कुठून निर्माण झाली?

कल्याण स्टेशनची सत्यकथा…

कल्याण स्टेशनवर तर रोज दोन्ही बाजूने (मुंबई-कल्याण आणि कल्याण-पुढे) गाड्या एकाच वेळी मर्ज होतात. तेव्हा लोकल गाड्या खोळंबून बाजूला ठेवल्या जातात. तरीही त्या गाड्या चालू राहतात, वेळेवर सुटतात. प्रवासी तक्रार करतात पण रेल्वे प्रशासनाला ते ‘नॉर्मल’ वाटते. मग दिवा स्टेशनवर एका पॅसेंजर गाडीमुळे एवढा गोंधळ का?

पुन्हा एकदा रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना ‘समजूत’ घालण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र प्रवासी आता म्हणतात – “२० वर्षे चाललेल्या गाडीला अचानक ‘समस्या’ का? ट्रॅक ५-६ मेल-एक्सप्रेससाठी राखीव असताना लोकलना अडथळा कसा? कल्याणात मर्जिंग होऊनही लोकल चालतात, मग दिव्यात काय वेगळे आहे?”

मनसेचा अप्रत्यक्ष पण स्पष्ट संदेश

राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मनसेने रेल्वे प्रशासनाकडे प्रतिनिधी पाठवून तातडीने गाडी पूर्ववत दादरपर्यंत सुरू करण्याची मागणी केली. रेल्वेने लोकल विलंबाचे कारण सांगत गाडी बंद/मर्यादित ठेवण्याचा निर्णय घेतला असला तरी मनसे म्हणते – कोकणवासीयांच्या सोयीसाठी ही गाडी आवश्यक आहे, आणि तिच्या जागी उत्तर भारतात जाणाऱ्या गाड्या प्राधान्य देणे हे मराठी माणसावर अन्याय आहे.

मागील २० वर्षे ही गाडी चालू होती, तेव्हा लोकलना एवढी अडचण नव्हती. आता अचानक “लोकल विलंब” म्हणून तिला लक्ष्य करणे हे रेल्वेचे तर्कशास्त्र मनसेला मान्य नाही. दिवा स्टेशनवर ५-६ ट्रॅक मेल-एक्सप्रेससाठी राखीव असताना लोकलना कशी समस्या येते, हाही प्रश्न मनसेने केला आहे.

मनसेने सांगितले की, मागणी पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन आणि ट्रेन रोखण्याची कारवाई केली जाईल. हा इशारा रेल्वे आणि केंद्र सरकारला थेट आहे.

संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकासाठी कोच पोजिशन डिजिटल इंडिकेटरची मागणी

   Follow us on        

नवी मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकावर फलाट क्रमांक १ व २ वर कोच पोजिशन डिजिटल इंडिकेटर बसविण्याबाबत कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक (CMD) यांना बेलापूर येथे निवेदन सादर करण्यात आले.

“निसर्गरम्य चिपळूण आणि संगमेश्वर” फेसबुक ग्रुपच्या वतीने हे निवेदन देण्यात आले असून, प्रवाशांच्या वाढत्या गैरसोयीचा मुद्दा यामध्ये मांडण्यात आला आहे. संगमेश्वर रोड हे कोकण रेल्वे मार्गावरील महत्त्वाचे स्थानक असून येथे दररोज मोठ्या प्रमाणात प्रवाशांची वर्दळ असते. मुंबई, गोवा, कर्नाटक तसेच इतर राज्यांकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी हे स्थानक अत्यंत उपयुक्त ठरते.

मात्र, या स्थानकावर कोच पोजिशन दर्शविणारे डिजिटल इंडिकेटर उपलब्ध नसल्यामुळे प्रवाशांना गाडी येण्यापूर्वी आपल्या आरक्षित डब्याचा अचूक अंदाज येत नाही. त्यामुळे गाडी थांबल्यानंतर प्रवाशांची धावपळ होऊन गोंधळाची परिस्थिती निर्माण होते.

विशेषतः जेष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग व्यक्ती तसेच लहान मुलांसह प्रवास करणाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. अनेक वेळा योग्य डब्यापर्यंत वेळेत पोहोचता न आल्याने अपघाताचा धोका देखील निर्माण होत आहे.

इतर अनेक स्थानकांवर ही सुविधा उपलब्ध असून संगमेश्वर रोड स्थानकावरही ती तातडीने सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

प्रवाशांच्या सोयीसाठी व सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाने या मागणीची दखल घेऊन लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा ग्रुपचे प्रमुख संदेश जिमन यांनी व्यक्त केली.

सरकारचा मोठा निर्णय! एलपीजी ते पीएनजी स्विच अनिवार्य

   Follow us on        

नवी दिल्ली: पश्चिम आशियातील युद्धामुळे भारतात गॅस संकट निर्माण झाल्याने केंद्र सरकारने बुधवारी (२६ मार्च) एक महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. ज्या शहरांमध्ये पाईप्ड नॅचरल गॅस (पीएनजी) उपलब्ध आहे, तेथील नागरिकांना एलपीजी (एलपीजी सिलिंडर) कनेक्शन बंद करून पीएनजी कनेक्शन घेणे अनिवार्य करण्यात आले आहे.

केंद्र सरकारने स्पष्ट केले की, पीएनजी उपलब्ध असलेल्या शहरांमधील लोकांनी ताबडतोब एलपीजी कनेक्शन बदलून पीएनजी कनेक्शन घ्यावे. ज्या कुटुंबांकडे पीएनजी सुविधा उपलब्ध असूनही ते अद्याप एलपीजी वापरत आहेत, त्यांच्या एलपीजी कनेक्शनची संख्या कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. पीएनजी उपलब्ध नसलेल्या ठिकाणी मात्र एलपीजी कनेक्शन सुरू राहणार आहे.

सरकारने कनेक्शन बदलण्यासाठी तीन महिन्यांचा वेळ दिला आहे. यामुळे गॅस पुरवठा व्यवस्थापन अधिक सुधारेल आणि इंधन आयात कमी होण्यास मदत होईल, असे सरकारचे म्हणणे आहे.

महाराष्ट्रातही परिणाम:

मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, नागपूर, नाशिक अशा मोठ्या शहरांमध्ये पीएनजी उपलब्ध असल्याने येथील अनेक कुटुंबांना एलपीजी ते पीएनजी स्विच करावे लागणार आहे.

का घेतला हा निर्णय?

पश्चिम आशियातील युद्धामुळे गॅस आणि तेलाची टंचाई निर्माण झाली आहे.

देशभरात अनेक शहरांत आणि ग्रामीण भागात सिलिंडर मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.

पीएनजी हा स्वच्छ, सतत पुरवठा होणारा आणि तुलनेने स्वस्त पर्याय मानला जातो.

नागरिकांना सूचना:

जर तुमच्या भागात पीएनजी सुविधा उपलब्ध असेल तर लवकरात लवकर पीएनजी कनेक्शन घ्या. तीन महिन्यांच्या आत कनेक्शन न बदलल्यास एलपीजी कनेक्शन बंद केले जाऊ शकते.

Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावरील विशेष गाड्यांना उन्हाळी हंगामासाठी मुदतवाढ

   Follow us on        

पनवेल: प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कोकण रेल्वेमार्गावर धावणाऱ्या पश्चिम रेल्वेच्या उन्हाळी विशेष गाड्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

०९०५७ सुरत–मंगळुरू जंक्शन विशेष (बुधवार, रविवार) ही गाडी २ एप्रिल २०२६ ते ३१ मे २०२६ दरम्यान धावणार आहे. तसेच ०९०५८ मंगळुरू जंक्शन–सुरत विशेष (गुरुवार, सोमवार) ही गाडी २ एप्रिल २०२६ ते १ जून २०२६ पर्यंत चालवण्यात येणार आहे.

याशिवाय ०९४२४ अहमदाबाद–मंगळुरू जंक्शन विशेष (शुक्रवार) २७ मार्च २०२६ ते २९ मे २०२६ दरम्यान धावेल, तर ०९४२३ मंगळुरू जंक्शन–अहमदाबाद विशेष (शनिवार) २८ मार्च २०२६ ते ३० मे २०२६ या कालावधीत प्रवाशांच्या सेवेत राहणार आहे.

रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, या गाड्यांच्या थांब्यांमध्ये किंवा डब्यांच्या रचनेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

दरम्यान, ०९०५७ या गाडीचे आरक्षण २७ मार्च २०२६ रोजी सकाळी ८ वाजल्यापासून सुरू झाले आहे, तर ०९४२४ गाडीचे आरक्षण २६ मार्च २०२६ पासून उपलब्ध करण्यात आले आहे. प्रवाशांनी अधिक माहितीसाठी www.enquiry.indianrail.gov.in⁠� या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा RailOne/N TES अ‍ॅपचा वापर करावा, असे आवाहन रेल्वेकडून करण्यात आले आहे.

वैभववाडी – कोल्हापूर नव्या रेल्वे मार्गाचा डीपीआर तयार; १०८ किमीच्या प्रकल्पाला गती मिळणार

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत दिलेल्या लेखी उत्तरातून माहिती समोर.

   Follow us on        

मुंबई, 25 मार्च 2026 : कोल्हापूर (श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस) ते वैभववाडी दरम्यान 108 किमी लांबीच्या नव्या रेल्वे मार्गासाठीचा सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करण्यात आला आहे. या महत्त्वाच्या प्रकल्पामुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत होण्याची अपेक्षा आहे.

डीपीआर तयार झाल्यानंतर आता या प्रकल्पासाठी राज्य सरकार आणि इतर संबंधित भागधारकांशी सल्लामसलत केली जाणार आहे. त्यानंतर नीती आयोग, केंद्रीय अर्थ मंत्रालय आदी संस्थांकडून आवश्यक मंजुरी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. विविध स्तरांवरील मंजुरी आणि मूल्यांकनांवर प्रकल्पाची अंतिम अंमलबजावणी अवलंबून असणार आहे.

सध्या कोल्हापूर स्थानकावरून 30 रेल्वेगाड्या धावतात, ज्यामुळे मुंबई, पुणे, दिल्ली, अहमदाबाद आणि नागपूरसारख्या प्रमुख शहरांशी थेट जोडणी उपलब्ध आहे. वंदे भारत, कोयना, महालक्ष्मी, हरिप्रिया आणि दीक्षाभूमी एक्सप्रेससारख्या महत्त्वाच्या गाड्या कोल्हापूरला सेवा देत आहेत.

दरम्यान, रेल्वे प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी जमीन अधिग्रहण, वनखात्याची मंजुरी, अतिक्रमण हटवणे, भौगोलिक परिस्थिती, कायदा-सुव्यवस्था आणि निधीची उपलब्धता हे महत्त्वाचे घटक ठरतात. तसेच मार्गावरील वाहतूक, कनेक्टिव्हिटी, सामाजिक-आर्थिक गरजा आणि राज्य व केंद्र सरकारांकडून होणारी मागणी यावरही प्रकल्पाच्या मंजुरीचा निर्णय घेतला जातो.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search