Author Archives: Kokanai Digital

जमिनीच्या वादात कोयत्याने हल्ला! ओवळीयेतील महिलेचा मृत्यू

   Follow us on        

सावंतवाडी : तालुक्यातील ओवळीये गावातील मधलीवाडी येथे रविवारी सायंकाळी घडलेल्या धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या जमिनीच्या वादातून कोयत्याने करण्यात आलेल्या हल्ल्यात ६५ वर्षीय सरस्वती सावंत यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

या प्रकरणी पोलिसांनी संशयित विजय कृष्णा सावंत (वय ६१) आणि त्यांचा मुलगा रघुनाथ विजय सावंत (वय ३७) या पिता–पुत्रांना तात्काळ ताब्यात घेतले आहे. ही घटना सायंकाळी सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, सरस्वती सावंत या आपल्या मुलगा एकनाथ सावंत याच्यासोबत शेतात कामासाठी गेल्या असताना संशयितांनी तेथे येत जमिनीच्या वादातून वाद घातला. सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची झाली; मात्र काही क्षणांतच हा वाद हिंसक वळणावर गेला. संतापाच्या भरात आरोपींनी कोयत्याने सरस्वती सावंत यांच्या डोक्यावर वार केले. यात त्या गंभीर जखमी होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला.

घटनेनंतर तातडीने त्यांना सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह 

या प्रकरणातील धक्कादायक बाब म्हणजे, मृत महिलेने दोन दिवसांपूर्वीच आपल्या जीवाला धोका असल्याची तक्रार पोलिसांकडे दिली होती. तरीही ही घटना घडल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

त्यांच्या अनपेक्षित जाण्याने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. ही घटना डोळ्यासमोर घडल्याने त्यांचा मुलगा अजूनही या धक्क्यातून सावरला नाही आहे. अंत्यसंस्कारावेळी कुटुंबीयांचा आक्रोश मन हेलावून टाकणारा होता. त्यांच्या पश्चात पती, दोन मुलगे, एक मुलगी, सुना, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे.

दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून हल्ल्यात वापरण्यात आलेला कोयता जप्त केला असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेविरोधात नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्याची जोरदार मागणी केली जात आहे.

Konkan Railway: मुंबई – मडगाव दरम्यान ‘समर स्पेशल’ गाड्यांची घोषणा

   Follow us on        

मुंबई, दि. ३० मार्च २०२६ – उन्हाळी हंगामात प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने मुंबई सीएसएमटी  –मडगाव–मुंबई सीएसएमटी दरम्यान विशेष साप्ताहिक गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

गाडी क्रमांक ०१०१९ मुंबई सीएसएमटी–मडगाव स्पेशल ही गाडी दर रविवारी पहाटे ००:५५ वाजता मुंबई सीएसएमटीहून सुटेल. ही सेवा ०५ एप्रिल २०२६ ते ०७ जून २०२६ या कालावधीत चालणार असून, गाडी त्याच दिवशी दुपारी १५:१५ वाजता मडगाव येथे पोहोचेल.

तसेच, गाडी क्रमांक ०१०२० मडगाव–मुंबई सीएसएमटी स्पेशल ही गाडी दर रविवारी सायंकाळी १६:०० वाजता मडगावहून सुटेल आणि पुढील दिवशी पहाटे ०३:५० वाजता मुंबई सीएसएमटी येथे पोहोचेल. ही सेवा देखील ०५ एप्रिल २०२६ ते ०७ जून २०२६ या कालावधीत चालवण्यात येणार आहे.

या गाडीला दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, अरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवीम आणि करमळी या स्थानकांवर थांबा देण्यात येणार आहे.

या गाडीची एकूण रचना २२ डब्यांची असून त्यात २ एसी (१), ३ एसी (६), स्लीपर (९), जनरल (४) आणि एसएलआर (२) डब्यांचा समावेश आहे.

दरम्यान, गाडी क्रमांक ०१०२० साठी आरक्षण ०१ एप्रिल २०२६ पासून सर्व प्रवासी आरक्षण प्रणाली (PRS), इंटरनेट आणि IRCTC संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे.

पालकांना वाऱ्यावर सोडलं तर पगारातून १५% कापले जाणार! तेलंगणा सरकारचा मोठा निर्णय!

   Follow us on        

तेलंगणाच्या विधानसभेने २९ मार्च २०२६ रोजी ‘कर्मचारी जबाबदारी आणि पालक सहाय्य निरीक्षण विधेयक’ मंजूर केले. या विधेयकानुसार, वृद्ध आई-वडिलांची काळजी न घेणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारातून दरमहा १५ टक्के किंवा कमाल १०,००० रुपये वजा करून ते थेट त्यांच्या वृद्ध पालकांच्या बँक खात्यात जमा करण्याची तरतूद करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांनी जानेवारी २०२६ मध्ये प्रस्तावित केलेल्या या कायद्याचा उद्देश वृद्धांकडे होणारी दुर्लक्ष आणि त्यांना सोडून देण्याच्या वाढत्या घटना रोखणे हा आहे. हा कायदा सरकारी, खासगी क्षेत्रातील कर्मचारी तसेच लोकप्रतिनिधींनाही लागू होणार आहे.

२००७ च्या पालक देखभाल कायद्याची ही अंमलबजावणी अधिक कठोर करणारा हा नवा कायदा आहे. मात्र, काही जणांच्या मते १०,००० रुपयांची मर्यादा अपुरी आहे आणि कुटुंबातील खासगी बाबींमध्ये सरकारी हस्तक्षेप वाढेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

 

 

अटल सेतूचा विस्तार अलिबागपर्यंत होणार; मुंबई – अलिबाग अंतर दीड तासांवर येणार

   Follow us on        

​नवी मुंबई: मुंबई आणि नवी मुंबईला जवळ आणणाऱ्या ‘अटल सेतू’चा विस्तार आता थेट अलिबागपर्यंत करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सिडकोने हाती घेतला आहे. या प्रकल्पामुळे सध्या रस्ते मार्गाने मुंबई ते अलिबाग जाण्यासाठी लागणारा ४ ते ५ तासांचा वेळ कमी होऊन अवघ्या दीड तासात हे अंतर पार करता येणार आहे. या कनेक्टिव्हिटीमुळे जेएनपीटी (JNPT) आणि नियोजित नवी मुंबई विमानतळ थेट अलिबागशी जोडले जाणार असून, प्रवाशांना आणि लॉजिस्टिक क्षेत्राला याचा मोठा फायदा होणार आहे.

​सध्या उलवे भागात ७ किमी लांबीचा सहा पदरी (सिक्स लेन) कोस्टल रोड तयार करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. या मार्गाचा पुढील टप्पा द्रोणागिरीमार्गे रेवस-करंजा खाडी पुलाशी जोडण्याचा प्रस्ताव आहे. हा मार्ग पूर्ण झाल्यानंतर एक अखंड कोस्टल कॉरिडॉर तयार होईल, ज्यामुळे नवी मुंबई विमानतळापर्यंत पोहोचण्यासाठी अत्यंत जलद कनेक्टिव्हिटी मिळेल. या प्रकल्पासाठी अंदाजे १६०० कोटी रुपयांचा खर्च प्रस्तावित असून, विस्तारासाठी २५०० ते ४००० कोटी रुपयांपर्यंत खर्च अपेक्षित आहे.

​पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी या प्रकल्पात विशेष काळजी घेण्यात आली आहे. खारफुटीच्या (मॅंग्रोव्हज) जंगलांचे नुकसान टाळण्यासाठी काही भागांत ‘एलिव्हेटेड’ रस्ता उभारण्यात येणार आहे. स्टिल्ट्सवर हा रस्ता बांधल्यामुळे जमिनीवरील पर्यावरणाची हानी टाळता येईल. या मार्गामुळे पाम बीच रोडसह इतर मुख्य रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी होईल आणि अटल सेतूपासून द्रोणागिरीपर्यंतचा प्रवास ‘सिग्नलमुक्त’ झाल्याने प्रवाशांचे २० ते ३० मिनिटे वाचणार आहेत.

​या प्रकल्पामुळे केवळ वेळच वाचणार नाही, तर रेवस-करंजा पुलामुळे कोकण भाग थेट रस्त्याने जोडला जाईल. परिणामी, सध्याच्या फेरीबोटींवरील ताण कमी होईल आणि अलिबागसह संपूर्ण कोकण पट्ट्यातील पर्यटनाला मोठी चालना मिळेल.

Railway Updates: गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी ७६ स्थानकांवर उभारले जाणार विशेष ‘पॅसेंजर होल्डिंग एरिया’

   Follow us on        

Railway Updates: भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या वाढत्या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि स्थानकांवरील गर्दी कमी करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण योजना हाती घेतली आहे. रेल्वे मंत्रालयाने देशातील ७६ महत्त्वाच्या स्थानकांवर अद्ययावत सुविधांनी सज्ज असे विशेष ‘पॅसेंजर होल्डिंग एरिया’ (प्रवासी प्रतीक्षा क्षेत्र) उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेची माहिती केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी राज्यसभेत एका लेखी प्रश्नाला उत्तर देताना दिली.

​या नवीन सुविधेमुळे रेल्वे प्लॅटफॉर्मवरील गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे. या होल्डिंग एरियामध्ये प्रवाशांसाठी आसनव्यवस्था, पिण्याचे शुद्ध पाणी (RO), स्वच्छतागृहे, तिकीट खिडक्या, ऑटोमॅटिक तिकीट वेंडिंग मशीन्स (ATVMs) आणि ट्रेनच्या माहितीसाठी इलेक्ट्रॉनिक बोर्ड अशा अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे, नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर अशा प्रकारचा एक ‘मॉडेल होल्डिंग एरिया’ आधीच सुरू करण्यात आला असून, त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत.

​सुरक्षेच्या दृष्टीने या क्षेत्रांमध्ये एआय (AI) आधारित सीसीटीव्ही कॅमेरे, लगेज स्कॅनर, मेटल डिटेक्टर्स आणि अग्निशमन यंत्रणा बसवण्यात येणार आहेत. रेल्वेने लागू केलेल्या नवीन नियमानुसार, ज्यांच्याकडे कन्फर्म तिकीट आहे अशाच प्रवाशांना थेट प्लॅटफॉर्मवर प्रवेश दिला जाईल. तर, ज्या प्रवाशांचे तिकीट वेटिंग लिस्टमध्ये आहे किंवा ज्यांच्याकडे तिकीट नाही, त्यांना त्यांचे स्टेटस कन्फर्म होईपर्यंत या बाहेरील होल्डिंग एरियामध्ये थांबावे लागेल.

​याव्यतिरिक्त, रेल्वेने पायाभूत सुविधांमध्येही बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. स्थानकांवर ६ मीटर आणि १२ मीटर रुंदीचे नवीन ‘फूट-ओव्हर-ब्रिज’ (FOBs) बांधले जातील. प्रशासकीय स्तरावर अधिक कार्यक्षमता आणण्यासाठी ‘स्टेशन डायरेक्टर’ या पदाचे अधिकार वाढवण्यात आले असून, त्यांना तातडीचे निर्णय घेण्यासाठी आर्थिक अधिकारही देण्यात आले आहेत. मोठ्या स्थानकांवर सर्व विभागांमध्ये ताळमेळ राखण्यासाठी ‘वॉर रूम्स’ देखील स्थापन केल्या जाणार आहेत.

धक्कादायक! बदलापूर लोकल ट्रेनवर दगडफेक; एक महिला प्रवासी जखमी

   Follow us on        

मुंबई, २८ मार्च २०२६: मुंबईतील लोकल ट्रेन प्रवास पुन्हा एकदा असुरक्षित ठरला आहे. शुक्रवार, २७ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ७:१४ च्या बदलापूर लोकल ट्रेनवर दादर रेल्वे स्थानकाच्या अगदी आधी मोठा दगड फेकण्यात आला. या घटनेत महिलांच्या डब्यात बसलेल्या एका महिलेला डोळ्याला गंभीर जखम झाली.

ही गाडी दादर स्टेशनजवळ जस्ट थांबत असताना डाव्या बाजूने (लेफ्ट साइड) जोरदार दगड आला आणि थेट महिलांच्या डब्यात घुसला. तो दगड एका महिलेच्या डोळ्याखाली लागला आणि मोठ्या प्रमाणात रक्त वाहू लागले. सहप्रवासी महिलांनी  तिची मदत केली. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाकडे तक्रार केली आहे.

मुंबई सेंट्रल रेल्वेचे डिव्हिजनल रेल्वे मॅनेजर (DRM) यांनी घटनेची दखल घेतली आणि रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (RPF) ला तातडीने चौकशीचे निर्देश दिले आहेत. मुंबईतील लोकल ट्रेनवर दगडफेकीच्या घटना गेल्या काही दिवसांत वारंवार घडत आहेत. यापूर्वी वंदे भारत एक्सप्रेससह इतर ट्रेनांवरही अशा घटना घडल्या होत्या. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे प्रशासनाने कडक उपाययोजना करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. अज्ञात दगडफेक करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यात येत आहे.

 

Konkan Railway: रेल्वे रूळ क्रॉसिंग अपघात रोखण्यासाठी आयोजित सेमिनार कोकणरेल्वे मुख्यालयात पार

   Follow us on        

नवी मुंबई: कोकण रेल्वेने सुरक्षिततेबाबत आपली बांधिलकी अधिक मजबूत करत लेव्हल क्रॉसिंग गेट्सवरील (LC Gates) सुरक्षा आणि जनजागृती वाढवण्यासाठी २६ मार्च २०२६ रोजी बेलापूर येथील कॉर्पोरेट कार्यालयात उच्चस्तरीय सेमिनार आयोजित केला. या सेमिनारमध्ये गेटमॅन, सुपरवायझर, स्टेशन मास्टर आणि लोको पायलट अशा विविध कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कोकण रेल्वेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांनी भूषवले, तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही उपस्थिती होती.

या सेमिनारमध्ये लेव्हल क्रॉसिंगवरील उपकरणांचा योग्य वापर, सुरक्षा नियमांचे पालन आणि आपत्कालीन परिस्थितीत कोणती कार्यपद्धती अवलंबावी यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. याशिवाय, रेल्वे रुळांच्या सुरक्षिततेसाठी फ्लॅंजची रुंदी आणि उंची योग्य राखण्यावरही भर देण्यात आला. रस्ते वापरकर्त्यांच्या सुरक्षिततेसाठी गेटजवळ स्पष्ट साइनबोर्ड आणि मार्किंग असणे आवश्यक असल्याचेही अधोरेखित करण्यात आले.

या वेळी गेट परिसरातील रस्त्यांची देखभाल सुधारण्याची गरज व्यक्त करत, टिकाऊ रबर लेव्हल क्रॉसिंग पॅनेल्स बसवण्याचे फायदे सांगण्यात आले. या पॅनेल्समुळे प्रवाशांना अधिक सोयीस्कर प्रवास अनुभव मिळेल आणि देखभालही सुलभ होईल. सेमिनारमध्ये सहभागी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या अनुभवांची देवाणघेवाण करून सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी उपयुक्त उपाय सुचवले.

कराड-चिपळूण राष्ट्रीय महामार्ग ६० दिवस राहणार बंद; प्रवाशांसाठी पर्यायी मार्ग कोणता?

   Follow us on        

कराड: कराड ते चिपळूण दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पाटण येथील धांडे पुलाचे बांधकाम आणि बाजारपेठेतील रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यासाठी हा राष्ट्रीय महामार्ग पुढील दोन महिने म्हणजेच तब्बल ६० दिवस वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांनी यासंदर्भात अधिकृत अधिसूचना जारी केली असून, हा मार्ग २७ मार्च रोजी रात्री १२ वाजल्यापासून ते २७ मे रात्री १२ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, जेणेकरून पावसाळ्यात वाहतुकीचा खोळंबा होणार नाही.

​महामार्ग बंद असल्याने प्रवाशांच्या सोयीसाठी वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. कराड आणि उंब्रजकडून चिपळूणकडे जाणारी सर्व वाहने आता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ मार्गे पाचवड, कोकरूड, मलकापूर आणि संगमेश्वरमार्गे चिपळूणला पोहोचतील. प्रवासाचे नियोजन करताना वाहनधारकांनी या बदलाची नोंद घेऊन सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Railway Updates: रेल्वे रूळांवर होणारे अपघात टाळण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान! फक्त १२ तासांत तयार होणार भुयारीमार्ग

   Follow us on        

नवी दिल्ली: भारतीय रेल्वेने रेल्वे ट्रॅक ओलांडताना होणाऱ्या अपघातांना आळा घालण्यासाठी देशभरात “मिशन मोड”मध्ये अंडरपास (भुयारी मार्ग) बांधण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला आहे. ज्या ठिकाणी रेल्वे रुळाच्या एका बाजूला वस्ती आणि दुसऱ्या बाजूला शेती, शाळा, स्मशानभूमी किंवा इतर आवश्यक ठिकाणे आहेत, अशा ठिकाणी हे अंडरपास उभारले जाणार आहेत. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी अधिकाऱ्यांना अशा ठिकाणी प्राधान्याने काम करण्याचे निर्देश दिले आहेत.

या अंडरपासची रचना अशी केली जाणार आहे की नागरिकांना सायकल, दुचाकी किंवा अन्य आवश्यक वस्तूंसह सहजपणे मार्ग वापरता येईल. यामुळे लोकांना रेल्वे रुळ ओलांडण्याची गरज कमी होईल आणि अपघातांचे प्रमाण लक्षणीयरीत्या घटण्यास मदत होईल. पुढील ५ ते ६ वर्षांत देशभरातील ही समस्या सोडवण्याचे उद्दिष्ट रेल्वे प्रशासनाने ठेवले आहे.

विशेष म्हणजे, हे अंडरपास अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून केवळ १२ तासांत तयार केले जाणार आहेत. यासाठी आधीच प्री-फॅब्रिकेटेड (पूर्वनिर्मित) संरचना तयार करून त्या ठिकाणी नेल्या जातील. त्यानंतर रेल्वे ट्रॅक काही काळासाठी बंद करून (ब्लॉक घेऊन) ट्रॅक कापून ही संरचना बसवली जाईल आणि अवघ्या १२ तासांत काम पूर्ण केले जाईल. यामुळे प्रवाशांना कमीत कमी अडथळा येईल आणि काम जलदगतीने पूर्ण होईल.

रेल्वेचा ‘महाराष्ट्रद्वेष’! राज्यांतर्गत दोन डझनहून अधिक गाड्या कायमस्वरूपी बंद

   Follow us on        

मुंबई, २७ मार्च २०२६: कोरोनाच्या काळापासून तसेच अलीकडच्या काळात महाराष्ट्रातील अनेक महत्त्वाच्या राज्यांतर्गत प्रवासी रेल्वेगाड्या कायमस्वरूपी बंद करण्यात आल्या आहेत. यामुळे कोकण, मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयाविरोधात प्रवासी संघटना आणि स्थानिक नेते आक्रमक झाले आहेत.

रेल्वे अभ्यासक पियुष यांनी शेअर केलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात २ डझनहून अधिक गाड्या रद्द झाल्या आहेत. यात मुंबई-कोल्हापूर सह्याद्री एक्सप्रेस, कुर्ला एलटीटी-नांदेड एक्सप्रेस (बार्शी मार्गे), मुंबई-विजयापूर एक्सप्रेस, मुंबई-भुसावळ पॅसेंजर, पनवेल-बारामती पॅसेंजर यासारख्या महत्त्वाच्या गाड्यांचा समावेश आहे. याशिवाय दादर-रत्नागिरी, रत्नागिरी-मडगाव पॅसेंजर, एलटीटी-अजनी (नागपूर) एक्सप्रेस, मनमाड-पुणे पॅसेंजर आदी गाड्याही बंद आहेत.

प्रवाशांच्या म्हणण्यानुसार, या गाड्या बंद झाल्यामुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था, शेतीमाल वाहतूक आणि दैनंदिन प्रवास मोठ्या प्रमाणात प्रभावित झाला आहे. कोल्हापूर, सांगली, मिरज, हिंगोली, वाशिम, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसारख्या भागांतून मुंबईसह इतर शहरांशी थेट जोडणी तुटली आहे. यामुळे प्रवाशांना महागड्या वैकल्पिक मार्गांचा अवलंब करावा लागत आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) या मुद्द्यावर रेल्वे प्रशासनाविरोधात आवाज उठवला आहे. प्रवासी संघटनांनी देखील रेल्वे मंत्रालय आणि महाराष्ट्र सरकारकडे या गाड्या तातडीने सुरू करण्याची मागणी केली आहे. २०२५ मध्ये कोल्हापूर येथे सह्याद्री एक्सप्रेसच्या पुनर्स्थापनेची मागणी करत मोर्चे आणि निषेध प्रदर्शन झाले होते, तरीही अनेक गाड्या अद्याप बंदच आहेत.

रेल्वे प्रशासनाकडून मात्र या गाड्या कमी प्रवासी संख्या, शून्य-आधारित वेळापत्रक आणि गाड्यांच्या उपलब्धतेमुळे बंद ठेवल्याचे सांगण्यात येते. प्रवासी मात्र याला दुजाभाव म्हणत आहेत. काही गाडय़ा बंद करण्यामागे रेल्वे प्रशासनाने दिलेली कारणे पटण्यासारखी नाही आहेत. राज्यांतर्गत गाड्यांपेक्षा रेल्वे उत्तर भारत, गुजरात आणि ईतर राज्यात जाणार्‍या गाड्यांना प्राधान्य दिले जात असल्याचा आरोप देखील केला जात आहे.

प्रवासी संघटनांनी रेल्वे प्रशासनाकडे अनेक महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत. कोरोनाकाळात बंद झालेल्या सर्व राज्यांतर्गत गाड्या तातडीने सुरू करा, कोकण रेल्वे मार्गावरील पॅसेंजर सेवा वाढवा, मराठवाडा-विदर्भातील रेल्वे जोडण्या मजबूत करा आणि नवीन वंदे भारत व एक्सप्रेस गाड्यांची घोषणा करा, अशी प्रमुख मागणी आहे.प्रवाशांच्या म्हणण्यानुसार, रेल्वे मंत्रालय आणि महाराष्ट्र सरकार लवकरात लवकर या मुद्द्यावर निर्णय घेईल, अशी अपेक्षा आहे. अन्यथा आंदोलन तीव्र होण्याची शक्यता आहे.
रत्नागिरी पुढे एकही पॅसेंजर सेवा नाही. 
कोकण रेल्वे मार्गावरील महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण पट्ट्यात चालविण्यात येणार्‍या दिवा सावंतवाडी पॅसेंजरला एक्सप्रेसचा दर्जा दिल्याने तसेच रत्नागिरी – मडगाव पॅसेंजर ५०१०१ / ५०१०२ बंद केल्यामुळे या पट्ट्यात एकही पॅसेंजर गाडी धावत नाही. या कारणाने सामान्य प्रवाशांना महागड्या वैकल्पिक मार्गांचा अवलंब करावा लागत आहे.

 

बंद झालेल्या काही प्रमुख गाड्या :

सह्याद्री एक्सप्रेस ११०२३ / ११०२४ (मुंबई CSMT – कोल्हापूर)

एलटीटी – अजनी (नागपूर) एक्सप्रेस (औरंगाबाद मार्गे) ११२०१ / ११२०२ (लोकमान्य तिलक टर्मिनस – अजनी) – हिंगोली, वाशिमसाठी महत्त्वाची

रत्नागिरी – मडगाव पॅसेंजर ५०१०१ / ५०१०२ (रत्नागिरी – मडगाव)

दादर – रत्नागिरी पॅसेंजर (दिवा-रत्नागिरी मध्ये बदल झाला आहे, मूळ दादर सेवा बंद)

मनमाड – पुणे पॅसेंजर (ट्रेन नंबर: सामान्यतः ५१४१० / ५१४०९ सारखे, बंद)

मुंबई – भुसावळ पॅसेंजर (मुंबई – भुसावळ मार्गातील पॅसेंजर सेवा बंद)

पनवेल – बारामती पॅसेंजर (पनवेल – बारामती मार्ग)

कुर्ला / एलटीटी – नांदेड एक्सप्रेस (बार्शी मार्गे) (संबंधित ट्रेन नंबर: ११०११ / ११०१२ सारखे, बंद)

मुंबई – विजयापूर एक्सप्रेस (संबंधित ट्रेन नंबर: १११३९ / १११४० किंवा समान)

पुणे – भुसावळ एक्सप्रेस (पनवेल मार्गे) (संबंधित एक्सप्रेस सेवा बंद)

कोकण रेल्वे मार्गावर १०१०१ / १०१०२ (रत्नागिरी-मडगाव एक्सप्रेस) देखील दीर्घकाळ बंद किंवा रद्द झाली होती.

अनेक पॅसेंजर गाड्या जसे मुंबई-भुसावळ, पुणे-कर्जत-पनवेल, पुणे-पनवेल इत्यादींचे नंबर ५०००० सीरीजमध्ये असतात, पण त्या बंद आहेत.

 

 

 

 

 

 

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search