मध्य रेल्वेच्या ६ विशेष गाड्यांच्या फेऱ्यांमध्ये मुदतवाढ!

   Follow us on        

मुंबई: प्रवाशांची वाढती गर्दी आणि प्रवासाची सोय लक्षात घेऊन मध्य रेल्वेने (Central Railway) मोठा निर्णय घेतला आहे. नागपूर-मडगाव, दादर-गोरखपूर आणि दादर-बलिया यांसारख्या महत्त्वाच्या मार्गांवर धावणाऱ्या सहा विशेष गाड्यांच्या कालावधीत मुदतवाढ देण्यात आली आहे. ही मुदतवाढ १ मार्च २०२६ पासून पुढील सूचना मिळेपर्यंत लागू असेल.

​विशेष म्हणजे, या गाड्यांच्या वेळापत्रकात, थांब्यांमध्ये किंवा डब्यांच्या रचनेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

​या गाड्यांच्या फेऱ्यांमध्ये झाली वाढ:

​नागपूर – मडगाव विशेष (०११३९): ही गाडी आता दर बुधवार आणि शनिवारी धावेल.

​मडगाव – नागपूर विशेष (०११४०): ही गाडी आता दर गुरुवार आणि रविवारी धावेल.

​दादर – गोरखपूर विशेष (०१०२७): ही गाडी आठवड्यातून चार दिवस म्हणजे दर मंगळवार, गुरुवार, शनिवार आणि रविवारी धावेल.

​गोरखपूर – दादर विशेष (०१०२८): ही गाडी दर सोमवार, मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी धावेल.

​दादर – बलिया विशेष (०१०२५): ही गाडी दर सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी धावेल.

​बलिया – दादर विशेष (०१०२६): ही गाडी दर बुधवार, शुक्रवार आणि रविवारी धावेल.

​प्रवाशांसाठी सूचना:

​रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, प्रवाशांनी सविस्तर वेळापत्रक आणि थांब्यांच्या माहितीसाठी enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा NTES (National Train Enquiry System) अ‍ॅपचा वापर करावा. या निर्णयामुळे उन्हाळी सुट्ट्या किंवा इतर सणासुदीच्या काळात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Facebook Comments Box

बेळगाव – सावंतवाडी रेल्वेमार्ग: ५६ वर्षांची ‘प्रतीक्षा’ संपेना!

   Follow us on        

सावंतवाडी: बेळगाव ते सावंतवाडी (चंदगड-आंबोली मार्गे) रेल्वे मार्ग हा महत्त्वाचा प्रकल्प गेल्या पाच दशकांहून अधिक काळ प्रलंबितच आहे. बेळगाव (कर्नाटक) आणि सावंतवाडी (सिंधुदुर्ग, महाराष्ट्र) जोडणारा सुमारे ११४.६ किलोमीटर लांबीचा हा मार्ग कोकण रेल्वे आणि दक्षिण पश्चिम रेल्वेची कनेक्टिव्हिटी मजबूत होण्यासाठी महत्वाचा आहे. सध्याच्या लोंडा-मडगाव-परनेम मार्गापेक्षा अंतर सुमारे १६५ किमी कमी करणाऱ्या या प्रकल्पात बेळगाव, कुद्रेमनी, माडवळे, हलकर्णी, नागनवाडी, चंदगड, कानूर, आंबोली आणि सावंतवाडी अशी ९ स्थानके प्रस्तावित आहेत, तर २०१८ बनविण्यात आलेल्या अहवालात या प्रकल्पाचा खर्च १८०५ कोटी रुपये इतकाआहे. हा मार्ग शेती-व्यापार, पर्यटन, भाजीपाला-मासे वाहतूक आणि कोकणातील दरड कोसळण्याच्या वेळी पर्यायी मार्ग म्हणून उपयुक्त ठरणार आहे.

या प्रकल्पाचे पहिले सर्वेक्षण १९७० मध्ये झाले होते. २०१८ मध्ये दुसरे सर्वेक्षण आणि फिजिबिलिटी रिपोर्ट तयार होऊन रेल्वे मंत्रालयाकडे सादर झाला, ज्यात सकारात्मक अहवाल होता. मात्र, कोरोना काळात बेळगावचे माजी खासदार सुरेश आंगडी यांच्या निधनानंतर पाठपुरावा कमी पडला आणि प्रकल्प रेंगाळला. फेब्रुवारी २०२६ पर्यंतच्या नवीनतम स्थितीनुसार, हा प्रकल्प अद्याप प्रलंबितच आहे; प्रत्यक्ष बांधकाम, जमीन अधिग्रहण किंवा निधीची मोठी मंजुरी झालेली नाही. रेल्वे मंत्रालयाच्या अधिकृत दस्तऐवजांमध्ये किंवा युनियन बजेट २०२५-२६ मध्ये या प्रकल्पासाठी स्पष्ट तरतूद किंवा प्रगती दाखवली गेली नाही.

बेळगाव जिल्ह्यातील इतर प्रकल्प (जसे बेळगाव-धारवाड) जसे जमीन अधिग्रहण आणि निधीच्या अभावामुळे रखडलेले आहेत, तसाच हाही आहे. जानेवारी २०२५ मध्ये कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांनी बेळगाव-चंदगड-सावंतवाडी रेल्वे संघर्ष समितीला भेटून रेल्वे मंत्र्यांना निधी मिळवण्याचे आश्वासन दिले होते. ऑक्टोबर २०२४ मध्ये केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमण्णा यांच्याशी बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर यांची चर्चा झाली आणि दक्षिण पश्चिम रेल्वेच्या जनरल मॅनेजरला पाठपुरावा करण्याच्या सूचना दिल्या गेल्या. स्थानिक संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश दळवी यांच्यासह खासदार शाहू महाराज आणि इतर नेते सातत्याने प्रयत्न करत आहेत.

तरीही मुख्य अडथळे निधी मंजुरी, दोन्ही राज्यांतील (कर्नाटक-महाराष्ट्र) जमीन अधिग्रहण आणि सातत्यपूर्ण राजकीय पाठपुराव्याचा अभाव यामुळे आहेत. युनियन बजेट किंवा संसदीय सत्रात नवीन चालना मिळेल अशी आशा आहे, पण सध्या तरी हा प्रकल्प “रखडलेला”च आहे. स्थानिक विकास, व्यापार आणि कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीने हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा असून, लवकरात लवकर प्रत्यक्ष काम सुरू व्हावे अशी मागणी जोर धरत आहे.

Facebook Comments Box

बांदा – सावंतवाडी रेल्वे स्टेशन बस सेवेसाठी धरणे आंदोलन

   Follow us on        

सावंतवाडी: बांदा ते सावंतवाडी रेल्वे स्टेशन दरम्यान नियमित एसटी बस फेऱ्या सुरू कराव्यात, या प्रमुख मागणीसाठी आज  शनिवार, २८ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता सावंतवाडी एसटी डेपोसमोर भव्य धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. या आंदोलनाला ‘रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडी’ यांनी आपला जाहीर पाठिंबा दर्शवला असून, प्रशासनावर दबाव निर्माण करण्यासाठी परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने एकवटणार आहेत.

​हे आंदोलन जिल्हा परिषद सदस्य श्री. नितीन सावंत आणि पंचायत समिती सदस्य श्री. सदाशिव राणे यांच्या नेतृत्वाखाली पार पडणार आहे. बांदा, निगुडे, शेर्ले, इन्सुली, कास, वाफोली, डेगवे, विलवडे, निरवडे, रोणापाल, मडुरा, सोनुर्ली, मळगांव आणि वेत्ये या गावांतील सरपंच, माजी सरपंच, ग्रामस्थ, युवक मंडळे, महिला मंडळे, प्रवासी आणि सर्व सामाजिक कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

​बऱ्याच काळापासून बांदा परिसरातील प्रवाशांना रेल्वे स्टेशनवर जाण्यासाठी हक्काची बस सेवा उपलब्ध नसल्याने मोठी गैरसोय होत आहे. प्रवाशांना खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागत असून, यामुळे आर्थिक आणि मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. वारंवार मागणी करूनही एसटी प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने अखेर आंदोलनाचे हत्यार उपसण्यात आले आहे. जोपर्यंत एसटी प्रशासनाकडून ठोस आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत मागे हटणार नाही, असा पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे.

Facebook Comments Box

सिंधुदुर्ग: जिल्हाधिकाऱ्यांकडून २०२६ वर्षातील ३ स्थानिक सुट्ट्या जाहीर

   Follow us on        

सिंधुदुर्ग: जिल्ह्यात सन २०२६ साठी तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी महसूल विभागाच्या नियमांनुसार अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. ही अधिसूचना दिनांक २० फेब्रुवारी २०२६ रोजी काढण्यात आली असून, ती जिल्ह्यातील शासकीय कार्यालये, महसूल विभाग आणि संबंधित यंत्रणांना लागू राहणार आहे.

या अधिसूचनेनुसार, खालीलप्रमाणे स्थानिक सुट्ट्या जाहीर झाल्या आहेत:

१७ ऑगस्ट २०२६ (सोमवार) – नागपंचमी

१८ सप्टेंबर २०२६ (शुक्रवार) – उज्वळी पौर्णिमा (उज्वळी पौर्णिमा / उज्वळी पौर्णिमा पूजन)

६ नोव्हेंबर २०२६ (शुक्रवार) – धनत्रयोदशी (धनत्रयोदशी / धनत्रयोधशी ज्योतिषी)

या सुट्ट्या जिल्ह्यातील महसूल हद्दीतील शासकीय कार्यालयांसाठी लागू असून, स्थानिक परंपरा आणि सणांचा विचार करून जिल्हाधिकाऱ्यांनी ही घोषणा केली आहे. अधिसूचना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर (sindhudurg.nic.in) उपलब्ध आहे.

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी डिजिटल स्वाक्षरी करून ही अधिसूचना प्रसिद्ध केली असून, ती मुख्य सचिव, सामान्य प्रशासन विभाग, मुंबई यांच्यापर्यंत विविध अधिकाऱ्यांना पाठवण्यात आली आहे. स्थानिक नागरिकांनी या सुट्ट्यांचा लाभ घेऊन सण उत्साहाने साजरा करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Facebook Comments Box

Mumbai Local: अतिरिक्‍त महसुलाच्या लोभापायी एसी लोकलच्या खिडक्या जाहिरातींनी झाकल्या; प्रवाशांची मोठी गैरसोय

   Follow us on        

मुंबई: मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या मध्य रेल्वेच्या एसी लोकल (AC EMU) सध्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आणि वादात सापडल्या आहेत. रेल्वेचे उत्पन्न वाढवण्यासाठी एसी लोकलच्या डब्यांच्या बाहेरील भागावर करण्यात आलेल्या जाहिरातींमुळे प्रवाशांच्या त्रासात भर पडली आहे. विशेषतः ‘अरुण आईस्क्रीम’ (Arun Icecreams) च्या जाहिरातीसाठी वापरण्यात आलेल्या जाहिरातींच्या विनाइल रॅपिंगमुळे प्रवाशांना डब्यातून बाहेरचे काहीच दिसत नसल्याच्या तक्रारी सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

​नेमका प्रकार काय?

​प्रसिद्ध पत्रकार आणि रेल्वे प्रवासी राजेंद्र बी. अकलेकर यांनी ट्विटरवर (X) काही फोटो शेअर करत हा गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांच्या दाव्यानुसार, सीएसएमटीहून सुटणाऱ्या रात्री २०:०० वाजताच्या कल्याण एसी लोकलच्या खिडक्यांवर इतक्या जाड थराचे विनाइल रॅपिंग करण्यात आले आहे की, खिडक्या पूर्णपणे अपारदर्शक (Opaque) झाल्या आहेत. यामुळे प्रवाशांना येणारे स्थानक किंवा प्लॅटफॉर्म ओळखणे कठीण होत आहे.

​रेल्वे प्रशासनाचे स्पष्टीकरण आणि प्रवाशांचा संताप

​या तक्रारीला उत्तर देताना DRM मुंबई (मध्य रेल्वे) यांनी सांगितले की, “एसी लोकलच्या डब्यांवर खिडक्यांसह विनाइल रॅपिंग करण्याची परवानगी आहे, मात्र आतून ८०% दृश्यमानता (Visibility) राखणे बंधनकारक आहे. जर दृश्यमानतेत काही अडथळा येत असेल, तर त्याची तपासणी करून दुरुस्ती केली जाईल.”

रेल्वे प्रशासनाने दिलेल्या या तांत्रिक स्पष्टीकरणानंतर प्रवाशांमधील संताप कमी होण्याऐवजी अधिकच वाढला आहे. प्रवाशांच्या मते, रात्रीच्या वेळी परिस्थिती अत्यंत बिकट होते; दिवसा तरी प्रकाशाच्या जोरावर थोडीफार दृश्यमानता मिळते, परंतु रात्रीच्या काळोखात डब्यातून बाहेरचे स्थानक किंवा प्लॅटफॉर्म ओळखणे अशक्य होते. रेल्वेने ८० टक्के दृश्यमानतेचा जो दावा केला आहे, तो केवळ कागदावरच असून प्रत्यक्षात प्रवाशांना शून्याच्या बरोबरीने दिसत असल्याची टीका होत आहे. केवळ महसूल मिळवण्याच्या ‘लोभी’ वृत्तीपोटी प्रवाशांच्या सुरक्षिततेशी आणि सोयींशी तडजोड केली जात असल्याचा गंभीर आरोप करत, रेल्वेला प्रवाशांच्या हितापेक्षा जाहिरातींचे उत्पन्नच अधिक महत्त्वाचे वाटते का, असा सवाल संतप्त मुंबईकरांनी उपस्थित केला आहे.

​प्रवाशांची मागणी

​सोशल मीडियावर अनेक प्रवाशांनी “DRM साहेबांनी स्वतःच्या केबिनमधून बाहेर पडून प्रत्यक्ष पाहणी करावी,” अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. जाहिरात लावणाऱ्या कंपन्यांच्या निकृष्ट कामामुळे (Poor Workmanship) सामान्य प्रवाशांना हा त्रास सहन करावा लागत आहे. ही समस्या तात्काळ सोडवून खिडक्यांवरील अडथळे दूर करावेत, अशी मागणी आता जोर धरत आहे.

Facebook Comments Box

प्रवाशांनो इथे लक्ष द्या! दिवा – चिपळूण मेमूची दिनांक ०१ मार्च रोजीची फेरी रद्द | पनवेलहुन कोकणात जाणाऱ्या अजून एका होळी विशेष गाडीची घोषणा

   Follow us on        

दि. २७ फेब्रुवारी २०२६: कोकण रेल्वे प्रशासनाने चिपळूण – दिवा – चिपळूण मार्गावरील मेमू अनारक्षित विशेष गाडी क्रमांक ०११६० / ०११५९ च्या धावण्याच्या प्रारंभ तारखेत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. गाडी क्रमांक ०११६० ही चिपळूण येथून पूर्वी जाहीर केल्याप्रमाणे ०१ मार्च २०२६ पासून धावणार होती; मात्र सुधारित नियोजनानुसार ती आता ०२ मार्च २०२६ ते ०८ मार्च २०२६ या कालावधीत धावेल. त्यानुसार दिवा येथून सुटणारी गाडी क्रमांक ०११५९ च्याही सेवेत तदनुरूप बदल करण्यात आले आहेत. प्रवाशांनी सुधारित तारखांची नोंद घेऊन आपला प्रवास नियोजित करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

होळी २०२६ निमित्त पनवेलहुन कोकणात जाणाऱ्या अजून एका होळी विशेष गाडीची घोषणा

होळी सणाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने Indian Railways प्रशासनामार्फत मडगाव जं.–पनवेल–मडगाव जं. दरम्यान विशेष साप्ताहिक गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

गाडी क्रमांक 01106 / 01105 मडगाव जं. – पनवेल – मडगाव जं. साप्ताहिक विशेष

गाडी क्रमांक 01106 मडगाव जं.–पनवेल विशेष ही गाडी दि. 04 मार्च 2026 (बुधवार) रोजी मडगाव जंक्शन येथून सायं. 16:30 वाजता सुटेल व दुसऱ्या दिवशी पहाटे 04:00 वाजता पनवेल येथे पोहोचेल.

परतीच्या प्रवासासाठी गाडी क्रमांक 01105 पनवेल–मडगाव जं. विशेष ही गाडी दि. 05 मार्च 2026 (गुरुवार) रोजी पनवेल येथून सकाळी 05:45 वाजता सुटेल व त्याच दिवशी सायं. 18:10 वाजता मडगाव जंक्शन येथे पोहोचेल.

थांबे खालीलप्रमाणे असतील :
करमाळी, थिवीम, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, विलवडे, अडावली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा आणि पेन.

रचना (Composition) :
एकूण 20 डबे – 18 स्लीपर कोच व 2 एसएलआर डबे.

गाडी क्रमांक 01106 साठी आरक्षण दि. 28/02/2026 पासून सर्व प्रवासी आरक्षण प्रणाली (PRS), इंटरनेट तसेच IRCTCच्या संकेतस्थळावर उपलब्ध होईल.

अधिक माहितीसाठी व सविस्तर वेळापत्रक पाहण्यासाठी प्रवाशांनी Indian Railwaysच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

होळीच्या सणासाठी कोकण व मुंबईदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या विशेष गाडीचा मोठा दिलासा मिळणार आहे.

Facebook Comments Box

दोडामार्ग आणि सावंतवाडीतील २५ गावांना ‘इको सेन्सिटिव्ह झोन’चा दर्जा; खाणकाम आणि प्रदूषणकारी प्रकल्पांवर बंदी

   Follow us on        

सावंतवाडी: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग आणि सावंतवाडी तालुक्यातील २५ गावांसाठी केंद्र सरकारने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने या गावांना ‘इको सेन्सिटिव्ह झोन’ (ESZ) म्हणून जाहीर करणारी अंतिम अधिसूचना प्रसिद्ध केली असून, यामुळे या भागात प्रस्तावित असलेल्या खाणकामांना आणि पर्यावरणाचे नुकसान करणाऱ्या मोठ्या प्रकल्पांना आता अधिकृतपणे चाप बसणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही प्रक्रिया राबवण्यात आली असून, मंगळवारी केंद्र सरकारने यावर अंतिम शिक्कामोर्तब केले. विशेष म्हणजे, २०१० सालापासून ‘वनशक्ती’ या संस्थेच्या माध्यमातून स्टॅलिन दयानंद यांनी हा न्यायालयीन लढा यशस्वीपणे सुरू ठेवला होता.

या नव्या अधिसूचनेमुळे आता संबंधित गावांमध्ये खाणकाम, ‘लाल श्रेणी’तील प्रदूषणकारी उद्योग आणि वनसंपदेला धोका निर्माण करणाऱ्या प्रकल्पांवर पूर्णपणे बंदी असेल. या निर्णयाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय समिती स्थापन करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी या समितीचे अध्यक्ष असतील, तर उपवनसंरक्षक हे सचिव म्हणून काम पाहतील. ही समिती वर्षभराच्या आत स्थापन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या पर्यावरणपूरक निर्णयामध्ये केसरी, फणसवडे, उडेली, दाभील-नेवली, सरमळे, ओटवणे, घारपी, असनिये, फुकेरी, तांबोळी, कोनशी, भालावल, भेकुर्ली, कुंभवडे, खडपडे, तळकट, झोळंबे, कोलझर, शिरवल, कुंभरल, पणतूर्ली, उगाडे, भिकेकोनाळ, कळणे आणि पडवे माजगाव या २५ गावांचा समावेश आहे.

Facebook Comments Box

Holi Special Trains: कोकण रेल्वे मार्गावर १ मार्च रोजी धावणार सीएसएमटी – सावंतवाडी विशेष एक्सप्रेस

   Follow us on        

मुंबई: होळी आणि आगामी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने मुंबई ते सावंतवाडी दरम्यान विशेष वातानुकूलित (AC) गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. ही गाडी पूर्णतः आरक्षित असून १ मार्च २०२६ रोजी दोन्ही बाजूंनी धावणार आहे.

​गाडीचे वेळापत्रक खालीलप्रमाणे:

​गाडी क्र. ०१०७१ (मुंबई ते सावंतवाडी):

ही गाडी रविवार, १ मार्च २०२६ रोजी मध्यरात्री ००:२० वाजता (म्हणजेच २८ फेब्रुवारीच्या रात्री) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी १२:३० वाजता सावंतवाडीला पोहोचेल.

​गाडी क्र. ०१०७२ (सावंतवाडी ते मुंबई):

परतीच्या प्रवासासाठी ही गाडी रविवार, १ मार्च २०२६ रोजी संध्याकाळी १७:२० वाजता सावंतवाडीहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ३:४५ वाजता मुंबईला पोहोचेल.

​सर्व थांब्यांची यादी (List of Halts):

​या विशेष गाडीला कोकण रेल्वे मार्गावरील महत्त्वाच्या स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे. स्थानकांची संपूर्ण यादी खालीलप्रमाणे आहे:

​१. दादर

२. ठाणे

३. पनवेल

४. पेण

५. रोहा

६. माणगाव

७. वीर

८. खेड

९. चिपळूण

१०. सावर्डा

११. आरवली रोड

१२. संगमेश्वर रोड

१३. रत्नागिरी १४. आडवली

१५. विलवडे

१६. राजापूर रोड

१७. वैभववाडी रोड

१८. नांदगाव रोड

१९. कणकवली

२०. सिंधुदुर्ग

२१. कुडाळ

​महत्त्वाची माहिती:

​डब्यांचे स्वरूप: या गाडीला ‘एसी थ्री टायर इकॉनॉमी’ (AC 3 Tier Economy) डबे जोडण्यात आले आहेत.

​आरक्षण: गाडी क्र. ०१०७१ चे बुकिंग सध्या सुरू झाले आहे. प्रवाशांनी अधिकृत संकेतस्थळ किंवा रेल्वेच्या ॲपवरून आपले आरक्षण निश्चित करावे.

​टीप: अधिकृत माहितीसाठी प्रवाशांनी www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा NTES ॲपचा वापर करावा.

Facebook Comments Box

Konkan Railway Recruitment: कोकण रेल्वेत १९० जागांसाठी भरती जाहीर; अर्ज कसा कराल?

   Follow us on        

नवी मुंबई: कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (KRCL) द्वारे अभियांत्रिकी पदवीधर, डिप्लोमा धारक आणि सामान्य प्रवाहातील पदवीधरांसाठी शिकाऊ उमेदवारी (Apprentice) प्रशिक्षणाची मोठी संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. ‘शिकाऊ उमेदवारी कायदा १९६१/१९७३’ अंतर्गत एकूण १९० जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे.

महत्त्वाचे तपशील:

संस्था: कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (भारत सरकारचा उपक्रम).

एकूण पदे: १९० जागा.

पात्रता: ज्या उमेदवारांनी २०२१, २०२२, २०२३, २०२४ आणि २०२५ या वर्षांत आपली पदवी किंवा डिप्लोमा पूर्ण केला आहे, ते यासाठी पात्र आहेत.

प्रशिक्षण कालावधी: १ वर्ष.

कामाचे ठिकाण: महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक राज्यातील कोकण रेल्वेची विविध स्थानके आणि कार्यक्षेत्रे.

पदनिहाय रिक्त जागांचा तपशील:

अर्ज करण्याची शेवटची तारीख: २१ मार्च २०२६

अर्ज कसा कराल? (How to Apply)

१. अधिकृत वेबसाइटला भेट द्या: सर्वात आधी कोकण रेल्वेच्या https://konkanrailway.com या अधिकृत संकेतस्थळावर जा.

२. भरतीचा विभाग शोधा: होमपेजवर गेल्यावर ‘Quick Links’ हा विभाग शोधा. त्यामध्ये ‘Graduate Apprentice / Technician Apprentice for training in KRCL’ या पर्यायावर क्लिक करा.

३. अधिसूचना वाचा: अर्ज करण्यापूर्वी दिलेली अधिकृत जाहिरात (Notification No: CO/APPR/2026/01) काळजीपूर्वक वाचा, जेणेकरून पात्रता आणि कागदपत्रांची स्पष्टता येईल.

४. नोंदणी आणि अर्ज: दिलेल्या ‘Apply Online’ लिंकवर क्लिक करा.

तुमची वैयक्तिक माहिती, शैक्षणिक पात्रता (Degree/Diploma) आणि इतर तपशील अचूक भरा.

जर तुम्ही अभियांत्रिकीचे विद्यार्थी असाल, तर तुम्हाला NATS (National Apprenticeship Training Scheme) पोर्टलवर नोंदणी केलेली असणे आवश्यक असू शकते.

५. कागदपत्रे अपलोड करा: तुमचे फोटो, स्वाक्षरी आणि आवश्यक शैक्षणिक प्रमाणपत्रे स्कॅन करून अपलोड करा.

६. अर्ज सबमिट करा: सर्व माहिती तपासून झाल्यावर ‘Submit’ बटणावर क्लिक करा आणि अर्जाची एक प्रिंट आऊट भविष्यातील संदर्भासाठी काढून ठेवा.

Facebook Comments Box

कर्जत-पळसदरी घाटात उतारावर मालगाडीचे नियंत्रण सुटले; थोडक्यात अनर्थ टळला! थरारक व्हिडिओ समोर

   Follow us on        

ठाणे: मध्य रेल्वेच्या पळसदरी आणि कर्जत रेल्वे स्थानकांदरम्यान गुरुवारी एक थरारक घटना घडली. उतारावरून धावणाऱ्या एका मालगाडीवरील नियंत्रण सुटल्याने ही गाडी प्रचंड वेगात धावू लागली. सुदैवाने, या वेळी अपघात झाला नाही आणि मोठा अनर्थ टळला आहे. मात्र, या गंभीर प्रकारामुळे रेल्वे प्रशासनात मोठी खळबळ उडाली असून मध्य रेल्वेने तातडीने चौकशीचे आदेश दिले आहेत.

​मिळालेल्या माहितीनुसार, तीन इंजिन असलेली ही मालगाडी मालवाहतूक करत असताना अचानक उतारावर तिचा वेग अनियंत्रित झाला. ही मालगाडी पळसदरी ते कर्जत दरम्यानच्या तीव्र उतारावरून धावत असताना रेल्वे कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आली. घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सतर्क करण्यात आले आणि पुढील धोके टाळण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली. सुदैवाने गाडी रुळावरून घसरली नाही किंवा दुसऱ्या कोणत्याही गाडीला धडकली नाही, ज्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

​प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, या मालगाडीच्या इंजिनमध्ये काही प्रशिक्षणार्थी लोको पायलट्स (Trainee Loco Pilots) कार्यरत होते. गाडी उतारावरून खाली येत असताना वेगावर योग्य नियंत्रण ठेवण्यास ते अपयशी ठरल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी या घटनेची पुष्टी केली असून, तांत्रिक बिघाड होता की मानवी चूक, याचा शोध घेण्यासाठी उच्चस्तरीय चौकशी सुरू केली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

व्हिडिओ येथे पहा 👇

Facebook Comments Box

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search