



Pahalgam Terror Attack: पाकिस्तान ची गोची करण्यासाठी भारताने अजून एक मोठा निर्णय घेतला आहे. भारताने आता पाकिस्तानच्या विमानांसाठी आपली हवाई हद्द Airspace बंद केले आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात यापुर्वी काही मोठे निर्णय घेतले आहेत. त्यानंतर पाकने देखील भारताच्या विरोधात काही निर्णय घेतले. भारतीय विमानांसाठी पाकिस्तानच्या हवाई हद्दीत प्रवेशास मनाई केली. पाकिस्तानने भारतातील विमान वाहतूक क्षेत्राला हानी पोहोचवण्याच्या दृष्टीने भारतीय विमानांसाठी आपले हवाई क्षेत्र बंद केले. त्यानंतर आता भारतानेही पाकिस्तानसाठी आपले हवाई क्षेत्र बंद केलं आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर संभाव्य लष्करी कारवाईच्या पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तानसाठी आपले हवाई क्षेत्र बंद केलं आहे. 30 एप्रिल ते 23 मे पर्यंत हवाई क्षेत्र बंद करण्यात आले आहे. या काळात, पाकिस्तानच्या नोंदणीकृत, चालवल्या जाणाऱ्या किंवा भाडेतत्त्वावर घेतलेल्या विमानांसह पाकिस्तानी लष्करी विमानांना या क्षेत्रात प्रवेश करण्याची परवानगी दिली जाणार नाही. पाकिस्तानचे हवाई क्षेत्र बंद झाल्यानंतर त्यांच्या विमान कंपन्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागेल. पूर्वी पाकिस्तानी विमाने भारतीय हवाई हद्द वापरून चीन, म्यानमार, थायलंड, मलेशिया आणि श्रीलंकेत उड्डाण करत होता, परंतु आता हवाई हद्द बंद झाल्यानंतर, त्यांच्या विमानांना पुन्हा या देशांमध्ये पोहोचण्यासाठी जास्त अंतराचा प्रवास करावा लागेल.
पाकिस्तानी एअरलाइन्स पीआयएने उड्डाणे केली रद्द
भारतीय हवाई क्षेत्र बंद करण्यापूर्वी, पाकिस्तानी माध्यमांनी वृत्त दिले होते की, पाकिस्तानची राष्ट्रीय विमान कंपनी पीआयएने गिलगिट, स्कार्दू आणि पाकव्याप्त काश्मीरला जाणारी उड्डाणे रद्द केली आहेत. उर्दू दैनिक ‘जंग’ ने दिलेल्या वृत्तानुसार, पीआयएने कराची आणि लाहोरहून स्कार्दूला जाणारी प्रत्येकी दोन उड्डाणे रद्द केली आहेत. इस्लामाबादहून स्कार्दू आणि गिलगिटला जाणाऱ्या एकूण सहा विमान उड्डाणेही रद्द करण्यात आली आहेत. पाकिस्तानने आपल्या हवाई क्षेत्राची देखरेखही कडक केली आहे.
एक्सप्रेस ट्रिब्यूननुसार, सुरक्षेच्या कारणास्तव सर्व व्यावसायिक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की, ही सर्व पावले खबरदारीचा उपाय म्हणून आणि प्रादेशिक तणावादरम्यान राष्ट्रीय हवाई सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी उचलण्यात आली आहेत. याशिवाय, पाकिस्तान प्राधिकरणाने सर्व विमानतळांना हाय अलर्टवर ठेवले आहे.
आजचे पंचांग
- तिथि-चतुर्थी – 11:26:47 पर्यंत
- नक्षत्र-मृगशिरा – 14:22:01 पर्यंत
- करण-विष्टि – 11:26:47 पर्यंत, भाव – 22:16:55 पर्यंत
- पक्ष- शुक्ल
- योग-अतिगंड – 08:33:58 पर्यंत, सुकर्मा – 29:38:19 पर्यंत
- वार- गुरूवार
- सूर्योदय- 06:13
- सूर्यास्त- 19:59
- चन्द्र-राशि-मिथुन
- चंद्रोदय- 09:07:59
- चंद्रास्त- 23:07:59
- ऋतु- ग्रीष्म
- महाराष्ट्र दिन
- मराठी राजभाषा दिन
- आंतरराष्ट्रीय कामगार दिन
- 1707 : इंग्लंडचे राज्य आणि स्कॉटलंडचे राज्य विलीन होऊन ग्रेट ब्रिटनचे साम्राज्य निर्माण झाले.
- 1739 चिमाजी अप्पांनी पोर्तुगीजांच्या ताब्यातील वसईवर हल्ला केला. तीन महिन्यांच्या युद्धानंतर वसई मराठ्यांच्या ताब्यात गेली.
- 1840 : युनायटेड किंगडममध्ये पेनी ब्लॅक, पहिले अधिकृत टपाल तिकीट जारी करण्यात आले.
- 1844 : हाँगकाँग पोलीस दलाची स्थापना जगातील दुसरे आधुनिक पोलीस दल आणि आशियातील पहिले पोलीस दल म्हणून करण्यात आली.
- 1882 : आर्य महिला समाजाचे पं. रमाबाईंच्या पुढाकाराने पुण्यात त्याची स्थापना झाली.
- 1884 : अमेरिकेत कामगारांनी दिवसात 8 तास काम करावे या मागणीची घोषणा.
- 1886 : आंतरराष्ट्रीय कामगार दिन हा कम्युनिस्ट आंतरराष्ट्रीय संघटनेच्या दुसर्या बैठकीत पहिल्यांदा साजरा केला.
- 1890 : जागतिक कामगार दिन हा जगात पहिल्यांदा साजरा केला.
- 1897 : रामकृष्ण मिशन ची सुरूवात स्वामी विवेकानंद यांनी केली.
- 1927 : जागतिक कामगार दिन हा भारतात पहिल्यांदा साजरा केला.
- 1930 : सूर्यमालेतील प्लुटो चे नामकरण करण्यात आले.
- 1940 : युद्धाच्या उद्रेकामुळे ऑलिम्पिक खेळ रद्द करण्यात आले.
- 1960 : मुंबईसह मराठी भाषिक ‘महाराष्ट्र’ राज्य आणि ‘गुजरात’ राज्य या स्वतंत्र राज्यांचा निर्माण झाला.
- 1960 : गुजरात उच्च न्यायालयाची स्थापना झाली.
- 1961 : क्युबाचे पंतप्रधान फिडेल कॅस्ट्रो यांनी क्युबाला समाजवादी देश घोषित केले आणि निवडणुका रद्द केल्या.
- 1962 : महाराष्ट्रातील जिल्हा परिषदांची स्थापना.
- 1978 : जपानचे ‘नामी उमुरा’ हे उत्तर ध्रुवावर पोहोचणारे पहिले मनुष्य आहेत.
- 1983 : ‘अमरावती विद्यापीठाची’ स्थापना.
- 1998 : कोकण रेल्वे प्रकल्प पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी राष्ट्राला समर्पित केला.
- 1999 : नगरपालिकांच्या नगराध्यक्षांची मुदत एक वर्षावरून अडीच वर्षांपर्यंत वाढवण्यासाठी सुधारणा करणारा अध्यादेश जारी झाला.
- 1218 : जर्मनीचा राजा रुडॉल्फ (पहिला) यांचा जन्म. (मृत्यू: 15 जुलै 1291)
- 1913 : ‘बलराज साहनी’ – अभिनेता यांचा जन्म. (मृत्यू: 13 एप्रिल 1973)
- 1915 : डॉ. रामेश्वर शुक्ल उर्फ अंचल – हिन्दी साहित्यिक यांचा जन्म. (मृत्यू: 13 ऑक्टोबर 1995)
- 1919 : ‘मन्ना डे’ – भारतीय भाषेतील प्रतिभासंपन्न पार्श्वगायक यांचा जन्म. (मृत्यू: 24 ऑक्टोबर २०१३)
- 1922 : ‘मधु लिमये’ – स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार आणि समाजवादी नेते यांचा जन्म. (मृत्यू: 8 जानेवारी 1995)
- 1932 : ‘एस. एम. कृष्णा’ – कर्नाटकचे 16 वे मुख्यमंत्री यांचा जन्म.
- 1943 : ‘सोनल मानसिंह’ – नृत्यांगना यांचा जन्म.
- 1955 : ‘आनंद गोपाल महिंद्रा’ – महिंद्रा समूहाचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष यांचा जन्म.
- 1971 : ‘अजित कुमार’ – भारतीय अभिनेते आणि रेस कार ड्रायव्हर यांचा जन्म.
- 1988 : ‘अनुष्का शर्मा’ – हिंदी चित्रपट अभिनेत्री यांचा जन्म.
- 1945 : ‘जोसेफ गोबेल्स’ – जर्मनीचा चॅन्सेलर नाझी नेता यांचे
- निधन. (जन्म: 29 ऑक्टोबर 1897)
- 1958 : गणेश शिवराम उर्फ नाना जोग – नाटककार यांचे नागपुर येथे निधन.
- 1972 : ‘कमलनयन बजाज’ – उद्योगपती, जमनालाल बजाज यांचे चिरंजीव यांचे निधन. (जन्म: 23 जानेवारी 1915)
- 1993 : ‘ना. ग. गोरे’ – स्वातंत्र्यसैनिक आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील नेते यांचे निधन. (जन्म: 15 जून 1907)
- 2013 : ‘निखील एकनाथ खडसे’ यांचे निधन
सध्याची संरचना | सुधारित संरचना |
२ टियर एसी – ०१ |
२ टियर एसी – ०२
|
३ टियर एसी – ०४ |
३ टियर एसी – ०४
|
स्लीपर – ११ | स्लीपर – ०७ |
जनरल – ०३ | जनरल – ०४ |
पॅन्ट्री कार – ०१ | पॅन्ट्री कार – ०१ |
एसएलआर – ०२ | एसएलआर – ०२ |
एकूण – २२ आयसीएफ कोच |
एकूण – २० एलएचबी कोच
|
आजचे पंचांग
- तिथि-तृतीया – 14:15:06 पर्यंत
- नक्षत्र-रोहिणी – 16:19:11 पर्यंत
- करण-गर – 14:15:06 पर्यंत, वणिज – 24:46:31 पर्यंत
- पक्ष- शुक्ल
- योग-शोभन – 12:01:16 पर्यंत
- वार- बुधवार
- सूर्योदय- 06:13
- सूर्यास्त- 18:58
- चन्द्र-राशि-वृषभ – 27:16:02 पर्यंत
- चंद्रोदय- 08:05:59
- चंद्रास्त- 22:03:59
- ऋतु- ग्रीष्म
- प्रामाणिकपणा दिवस National Honesty Day
- 1492 : स्पेनने ख्रिस्तोफर कोलंबस यांना त्यांच्या शोधाकार्यासाठी नियुक्त केले.
- 1657 : शिवाजी महाराजांनी मुघलांच्या ताब्यात असलेल्या जुन्नर शहरावर हल्ला करून लुटले.
- 1789 : जॉर्ज वॉशिंग्टन अमेरिकेचे पहिले निर्वाचित राष्ट्राध्यक्ष बनले.
- 1905 : अल्बर्ट आइनस्टाईन यांनी झुरिच विद्यापीठात डॉक्टरेट प्रबंध पूर्ण केला.
- 1936 : महात्मा गांधींनी वर्ध्याजवळ सेवाग्राम आश्रम स्थापन केला.
- 1977 : 9 राज्यांमधील विधानसभा विसर्जित करण्यात आली आणि जनसंघ, समाजवादी पक्ष, केंद्रीय काँग्रेस आणि भारतीय लोक दल यांनी जनता पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला.
- 1982 : कलकत्ता येथे बिजन सेतू हत्याकांड घडले.
- 1995 : बिल क्लिंटन उत्तर आयर्लंडला भेट देणारे पहिले अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बनले.
- 1996 : थेऊर येथील श्री चिंतामणी मंदिराच्या प्रांगणात श्रीमंत माधवराव पेशव्यांच्या स्मृतिस्थळाचे उद्घाटन करण्यात आले.
- 2009 : ख्रायस्लर कंपनीने दिवाळखोरी घोषित केली.
- 2013 : विलेम-अलेक्झांडर नेदरलँड्सचा राजा बनल्यानंतर त्याची आई राणी बीट्रिक्सने राजीनामा दिला; ती 33 वर्षांपूर्वी सिंहासनावर आरूढ झाली होती.
- 1777 : ‘कार्ल फ्रेड्रिक गाऊस’ – जर्मन गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 23 फेब्रुवारी 1855)
- 1870 : ‘दादासाहेब फाळके’ – भारतीय चित्रपट उद्योगाचे जनक यांचा जन्म. (मृत्यू: 16 फेब्रुवारी 1944)
- 1909 : माणिक बंडोजी इंगळे ऊर्फ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज – यांचा जन्म. (मृत्यू: 11 ऑक्टोबर 1968)
- 1910 : श्रीरंगम श्रीनिवास राव ऊर्फ ‘श्री श्री राव’ – साहित्य अकादमी पुरस्कार विजेते तेलुगू कवी आणि गीतकार यांचा जन्म. (मृत्यू: 15 जून 1983)
- 1921 : ‘रॉजर एल. ईस्टन’ – जीपीएस चे सहसंशोधक यांचा जन्म. (मृत्यू: 8 मे 2014)
- 1926 : ‘श्रीनिवास खळे’ – मराठी संगीतकार यांचा जन्म. (मृत्यू: 2 सप्टेंबर 2011)
- 1987 : ‘रोहित शर्मा’ – भारतीय क्रिकेटपटू यांचा जन्म.
- 1030 : ‘मोहंमद गझनी’ – तुर्कीच्या गझनवी साम्राज्याचा शासक यांचे निधन. (जन्म: 2 ऑक्टोबर 971)
- 1878 : साक्षात्कारी सत्पुरुष व दत्तावतारी स्वामीमहाराज अक्कलकोट यांनी समाधी घेतली.
- 1913 : ‘मोरो केशव दामले’ – व्याकरणकार आणि निबंधकार यांचे निधन. (जन्म: 7 नोव्हेंबर 1868)
- 1945 : ‘अॅडॉल्फ हिटलर’ – जर्मनीचे नाझी हुकूमशहा यांनी आत्महत्या केली. (जन्म: 20 एप्रिल 1889)
- 2001 : ‘श्रीपाद अच्युत दाभोळकर’ – प्रयोग परिवार या संकल्पनेचे प्रवर्तक, गणितज्ञ आणि कृषी शास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म: 21 ऑगस्ट 1924)
- 2003 : ‘वसंत पोतदार’ – मराठी साहित्यिक यांचे निधन. (जन्म: 20 नोव्हेंबर 1939)
- 2014 : ‘खालिद चौधरी’ – भारतीय चित्रकार आणि सेट डिझायनर यांचे निधन. (जन्म: 20 डिसेंबर 1919)
- 2020 : ‘ऋषि कपूर’ – चित्रपट अभिनेता यांचे निधन.
आजचे पंचांग
- तिथि-द्वितीया – 17:34:05 पर्यंत
- नक्षत्र-कृत्तिका – 18:48:09 पर्यंत
- करण-बालव – 07:21:58 पर्यंत, कौलव – 17:34:05 पर्यंत
- पक्ष- शुक्ल
- योग-सौभाग्य – 15:53:16 पर्यंत
- वार- मंगळवार
- सूर्योदय- 06:14
- सूर्यास्त- 18:58
- चन्द्र-राशि-वृषभ
- चंद्रोदय- 07:09:00
- चंद्रास्त- 20:56:00
- ऋतु- ग्रीष्म
- आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस International Dance Day
- जागतिक इच्छा दिन World Wish Day
- जागतिक पुरवठा दिवस National Supply Chain Day
- 1639: मुघल सम्राट शाहजहानने दिल्लीतील लाल किल्ल्याची पायाभरणी केली.
- 1930: ब्रिटन आणि ऑस्ट्रेलियामध्ये टेलिफोन सेवा सुरू करण्यात आली.
- 1933: प्रभात कंपनीचा सिंहगड हा चित्रपट प्रदर्शित झाला.
- 1945: दुसरे महायुद्ध इटलीतील जर्मन सैन्याने मित्र राष्ट्रांना बिनशर्त आत्मसमर्पण केले.
- 1986: लॉस एंजेलिस सेंट्रल लायब्ररीला लागलेल्या आगीत सुमारे 400,000 पुस्तके नष्ट झाली.
- 1991: बांगलादेशच्या दक्षिणेकडील चितगाव जिल्ह्यात आलेल्या तीव्र चक्रीवादळामुळे सुमारे 1,38,000 लोकांचा मृत्यू झाला आणि सुमारे एक कोटी लोक बेघर झाले.
- 2010 : शत्रूच्या रडारने न पकडली जाणारी मुंबईतील मांजगाव येथे बांधण्यात आलेली आधुनिक उपकरणे असलेली INS शिवालिक ही युद्धनौका भारताने नौदलात सामील केली.
- 1727 : ‘जीन-जॉर्जेस नोव्हर’ – फ्रेंच नर्तक आणि बॅलेट चे निर्माते यांचा जन्म. (मृत्यू: 19 ऑक्टोबर 1810)
- 1848 : ‘राजा रवि वर्मा’ – चित्रकार यांचा जन्म. (मृत्यू: 2 ऑक्टोबर 1906)
- 1867 : ‘डॉ. शंकर आबाजी भिसे’ – भारतीय शास्त्रज्ञ आणि अग्रगण्य शोधक यांचा जन्म. (मृत्यू: 7 एप्रिल 1935)
- 1891 : ‘भारतीदासन’ – भारतीय कवी आणि कार्यकर्ते यांचा जन्म. (मृत्यू: 21 एप्रिल 1964)
- 1901 : ‘मिचेनोमिया हिरोहितो’ – दुसऱ्या महायुद्धाच्या आधी व नंतरच्या काळातील जपानी सम्राट यांचा जन्म. (मृत्यू: 7 जानेवारी 1989)
- 1936 : ‘झुबिन मेहता’ – भारतीय संगीतकार यांचा जन्म.
- 1966 : ‘फिल टफनेल’ – इंग्लिश फिरकी गोलंदाज यांचा जन्म.
- 1970 : ‘आंद्रे आगासी’ – अमेरिकन लॉन टेनिस खेळाडू यांचा जन्म.
- 1979 : ‘आशिष नेहरा’ – भारतीय क्रिकेट खेळाडू
- 1945 : ‘हेन्रिच हिमलर’ – जर्मन नाझी अधिकारी यांचे निधन. (जन्म: 7 ऑक्टोबर 1900)
- 1960 : ‘पं. बाळकृष्ण शर्मा’ – हिंदी कवी यांचे निधन. (जन्म: 8 डिसेंबर 1897)
- 1980 : ‘श्रीकृष्ण के. क्षीरसागर’ – लेखक, विचारवंत आणि समीक्षक यांचे निधन. (जन्म: 6 नोव्हेंबर 1901)
- 1980 : ‘सर अल्फ्रेड हिचकॉक’ – चित्रपट दिग्दर्शक यांचे निधन. (जन्म: 13 ऑगस्ट 1899)
- 2006 : ‘जे. के. गालब्रेथ’ – कॅनेडियन-अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म: 15 ऑक्टोबर 1908)
- 2020 – ‘इरफान खान’ – भारतीय अभिनेता यांचे निधन.





रत्नागिरी: पावसाची वर्दी घेऊन येणारा पक्षी म्हणून ओळख असलेला नवरंग म्हणजेच ‘इंडियन पिट्टा’ कोकणात दाखल झाला आहे (indian pitta migration). पावसाची जशी चाहूल लागते तशी कोकणामध्ये नवरंग पक्षाचं आगमन होत. हा अतिशय दुर्मिळ पक्षी असून वर्षभरातील फक्त चारच महिने आपल्याला पाहायला मिळतो. पावसाला पोषक वातावरण निर्माण झालं की नवरंग पक्षी कोकणात दाखल होतो. हवामान विभागानेदेखील यंदा पाऊस लवकर असल्याची माहिती दिली आहे. त्यातच आता नवरंग पक्षाच्या आगमनाने पावसाच्या आगमनाची चाहूल दिली आहे. नवरंग पक्षी हा शेतकऱ्यांचा मित्र म्हणून संबोधला जातो. पावसाच्या आगमनाची चाहूल लागताच आपल्या विशिष्ट आवाजाने शेतकऱ्यांना हा पक्षी जणू पावसाला लवकर सुरू होणार असल्याची वर्दी0 देतो. नवरंग पक्षाच्या आगमनाने पक्षी प्रेमींही सुखावले असून त्याची छबी टिपण्याचा मोह आवरत नाही.
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक ठिकाणी या पक्ष्याची मधुर शीळ कानी पडू लागली आहे (indian pitta migration). पावसाळ्याच्या तोंडावर हा पक्षी स्थानिक स्वरुपाचे स्थलांतर करत असला तरी, कोकणात या पक्ष्याची काही संख्या घरटी देखील बांधते. (indian pitta migration)
भारतीय पिट्टा या नावाने ओळखला जाणारा हा पक्षी भारतात स्थानिक स्वरुपाचे स्थलांतर करतो. ‘पिट्टा’ हा शब्द तेलुगू भाषेतून आला आहे. ज्याचा अर्थ ‘लहान पक्षी’ असा होतो. याला मराठीत स्थानिक भाषेत नवरंग, बहिरा पाखर, बंदी, पाऊसपेव असेही म्हटले जाते. हा पक्षी हिवाळ्यात दक्षिण भारत आणि श्रीलंकेत स्थलांतर करतो, तर पावसाळ्याच्या तोंंडावर अगदी हिमालयाच्या पायथ्यापर्यंत प्रजननाकरिता जातो. एप्रिल महिन्यात श्रीलंका आणि दक्षिण भारतात स्थलांतर केलेले नवरंग पक्षी पश्चिम घाटाच्या धारेला धरुनच उत्तरेकडे सरकू लागतात. सध्या या पक्ष्यांचे आगमन रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात झाले आहे. जिल्ह्यातील पक्षीनिरीक्षक या पक्ष्यांची छायाचित्र टिपत आहेत.
मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात नवरंग पक्षी मुंबई आणि रायगड जिल्ह्यात सरकेल आणि तिथून गुजरातमध्ये जाऊन प्रजनन करेल. पश्चिम घाटामार्गे स्थलांतर करणारे ९० टक्के नवरंग पक्षी हे गुजरात किंवा त्यावरील भागात जाऊन प्रजनन करत असले तरी, काही पक्षी हे कोकणात देखील घरटी बांधतात. लहान आकाराचा हा पक्षी आपल्या रंगासाठी ओळखला जातो. त्याचे पाय लाब आणि मजबूत असतात. चोच जाड असते. हा पक्षी सहसा दाट झाडी असलेल्या जंगलात जमिनीवर खाद्य शोधताना दिसतो. पालापाचोळ्यामधील कीटक शोधताना दिसतो. सकाळी आणि सायंकाळी हा पक्षी आवाज देताना दिसतो. यामधील नर आणि मादी हे एकसारखेच दिसतात.
आजचे पंचांग
- तिथि-प्रथम – 21:13:41 पर्यंत
- नक्षत्र-भरणी – 21:38:36 पर्यंत
- करण-किन्स्तुघ्ना – 11:07:55 पर्यंत, भाव – 21:13:41 पर्यंत
- पक्ष- शुक्ल
- योग-आयुष्मान – 20:01:52 पर्यंत
- वार- सोमवार
- सूर्योदय- 06:15
- सूर्यास्त- 18:58
- चन्द्र-राशि-मेष – 26:54:34 पर्यंत
- चंद्रोदय- 06:16:59
- चंद्रास्त- 19:45:59
- ऋतु- ग्रीष्म
- कामाच्या ठिकाणी सुरक्षितता आणि आरोग्यासाठी जागतिक दिवस World Day For Safety And Health At Work
- 1916 : होम रुल लीगची स्थापना झाली.
- 1920: अझरबैजान सोव्हिएत युनियनमध्ये सामील झाला.
- 1969 : चार्ल्स गॉल यांनी फ्रान्सच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
- 2001 : डेनिस टिटो हे पैसे देउन अंतराळात प्रवास करणारे पहिला अंतराळ प्रवासी झाले.
- 2003 : ऍपल कम्प्यूटर इन्क. ने आयट्यून्स स्टोअर प्रकाशित केले.
- 2007 : 2007 साली श्रीलंकेला हरवून ऑस्ट्रेलिया चौथ्यांदा वर्ल्ड क्रिकेट चॅम्पियन बनला, श्रीलंकेला हरवून ऑस्ट्रेलिया चौथ्यांदा वर्ल्ड क्रिकेट चॅम्पियन बनला.
- 2008 : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने ‘PSLV-C9’ उपग्रह प्रक्षेपित केला.
- 1758 : ‘जेम्स मोन्रो’ – अमेरिकेचे 5 वे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू: 4 जुलै 1831)
- 1854 : ‘वासुकाका जोशी’ – लोकमान्य टिळकांचे निकटचे सहकारी यांचा जन्म. (मृत्यू: 12 जानेवारी 1944)
- 1908 : ऑस्ट्रियाचे व्यापारी व नाझीविरोधी ऑस्कार शिंडलर यांचा जन्म.
- 1916 : प्रसिद्ध लक्झरी स्पोर्ट्स कार लॅम्बोर्गिनी चे निर्माते फारूशियो लॅम्बोर्गिनी यांचा इटली येथे जन्म. (मृत्यू: 20 फेब्रुवारी 1993)
- 1931 : लेखक मधु मंगेश कर्णिक यांचा जन्म.
- 1937 : इराकी हुकूमशहा आणि इराकचे ५वे अध्यक्ष सद्दाम हुसेन यांचा जन्म. (मृत्यू: 30 डिसेंबर 2006)
- 1942 : इंग्लिश क्रिकेटर माईक ब्रेअर्ली यांचा जन्म.
- 1968 : झिम्बाब्वेचे क्रिकेटपटू अँडी फ्लॉवर यांचा जन्म.
- 1740 : थोरले बाजीराव पेशवे ऊर्फ श्रीमंत बाजीराव बल्लाळ बाळाजी भट यांचे नर्मदातीरी रावेरखेडी येथे निधन. (जन्म: 18 ऑगस्ट 1700)
- 1903 : ‘जोशिया विलार्ड गिब्स’ – भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या विषयांमध्ये आपले महत्वपूर्ण योगदान देणारे अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ यांचे निधन.
- 1945 : इटलीचे हुकूमशहा बेनिटो मुसोलिनी यांचा गोळ्या घालून मृत्यू. (जन्म: 29 जुलै 1883)
- 1978 : अफगाणिस्तानचे पहिले अध्यक्ष मोहम्मद दाऊद खान यांचे निधन. (जन्म: 18 जुलै 1909)
- 1992 : ‘डॉ. विनायक कृष्ण गोकाक’ – ज्ञानपीठ पुरस्कारविजेते कन्नड साहित्यिक आणि शिक्षणतज्ज्ञ यांचे निधन. (जन्म: 9 ऑगस्ट 1909)
- 1998 : ‘रमाकांत देसाई’ – जलदगती गोलंदाज यांचे निधन. (जन्म: 20 जून 1939)