Konkan Railway: १०० कोटी उत्त्पन्न मिळवून देण्याची क्षमता असणाऱ्या जिल्ह्याच्या पदरी उपेक्षाच!

   Follow us on        
Kokanai Exclusive: कोकण रेल्वेच्या गेल्या वर्षीच्या म्हणजे २४-२५ उत्पन्नात सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मोठे योगदान राहिले आहे आहे.  सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या स्थानकांपासून मिळणाऱ्या उत्पन्नात वाढ होऊन ते ९८ कोटी ६२ लाख झाले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन स्थानके म्हणजे कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी कोकण रेल्वेला सर्वात जास्त उत्पन्न  मिळवून देणाऱ्या पहिल्या १० स्थानकांमध्ये मोडत आहेत. तर जिल्ह्यातून पूर्ण वर्षात जवळपास ४८ लाख प्रवाशांनी प्रवास केला आहे.  कणकवली आणि कुडाळ स्थानकांच्या उत्पन्नात मोठी वाढ होऊन ते प्रत्येकी ३४ कोटीच्या घरात पोहोचले आहे. ही दोन्ही स्थानके उत्पन्नात संपूर्ण कोकण रेल्वे क्षेत्रात अनुक्रमे पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावर आहेत. सावंतवाडी स्थानकापासून मिळणाऱ्या उत्पन्नात सुद्धा जवळपास ९ ते १० टक्क्याने वाढ होऊन ते १६ कोटीच्या घरात गेले असून संपूर्ण कोकण रेल्वे क्षेत्रात दहाव्या क्रमांकावर आहे. वैभववाडी (७ कोटी) सिंधदुर्ग (५.६० कोटी)  ही स्थानके सुद्धा रेल्वे ला चांगले उत्त्पन्न मिळवून देत आहेत.
असे असताना रेल्वे प्रशासनाकडून या जिल्ह्याच्या पदरी उपेक्षाच पडत असल्याचे दिसत आहे. कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या एकूण १५ गाडयांना या जिल्ह्यात एकही स्थानकावर थांबा नाही आहे. खर ते महाराष्ट्र सरकारने या जिल्ह्याला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित केले असताना या जिल्ह्यातून जाणाऱ्या प्रत्येक गाडीला जिल्हातील स्थानकांवर आलटून पालटून थांबे देणे गरजेचे होते. मात्र प्रवाशी संघटनांनी वारंवार मागणी करून सुद्धा रेल्वे प्रशासन हे थांबे देत नाही आहे.
सावंतवाडी स्थानकापासून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या वाढीस वाव 
सावंतवाडी पंचक्रोशीमध्ये येणारे तालुके आणि गावे पाहता या स्थानकाचा विकास करून इथे महत्वाच्या गाडयांना थांबे दिले जावेत, उदघाटन झालेल्या टर्मिनस चे काम पूर्ण करण्यात यावे यासाठी कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडी ने विविध माध्यमातून आंदोलन छेडले आहे. टर्मिनस चे काम पूर्ण झाल्यानंतर आणि अधिक गाडयांना थांबे दिल्यावर या स्थानकावरून रेल्वे ला मिळणाऱ्या उत्पन्नात दुपटीने वाढ होण्याचा विश्वास संघटनेने व्यक्त केला आहे.
वैभववाडी आणि सिंधुदुर्ग स्थानकापासून मिळणाऱ्या उत्पन्नात चांगली वाढ होत असूनही येथे आरक्षण सुविधा, पादचारी पूल आणि इतर मूलभूत सेवा उपलब्ध करून देण्यास रेल्वे प्रशासन अयशस्वी ठरत आहे. खरे तर वाढती प्रवासी संख्या लक्षात घेऊन येथे या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात थांबा नसणाऱ्या गाड्या
१) १२२०१/०२ – कोचुवेली लोकमान्य टिळक टर्मिनस गरीब रथ एक्सप्रेस
२) १२४३१ /१२४३२ त्रिवंद्रम राजधानी एक्सप्रेस
३) १२२२४/२३ एलटीटी – एर्नाकुलम दुरांतो एक्सप्रेस
४) १२२८३/८४  – हजरत निजामुद्दीन एर्नाकुलम दुरंतो एक्सप्रेस
५) १२४४९/५०  गोवा संपर्क क्रांती एक्सप्रेस
६) १२२१७/१८ – केरळ संपर्क क्रांती एक्सप्रेस
७) १२९७७/७८  – मारुसागर सुपरफास्ट एक्सप्रेस
८) १९५७७/७८ जामनगर तिरुनेलवेली एक्सप्रेस
९) १२४८३/८४ अमृतसर कोचुवेली साप्ताहिक सुपरफास्ट एक्सप्रेस
१०) २२६५९/६० ऋषिकेश कोचुवली सुपरफास्ट एक्सप्रेस
११ २२४७५/७६ कोईमतूर हिसार एसी सुपरफास्ट एक्सप्रेस
१२) २०९२३/२४  गांधीधाम तिरुनवेली हमसफर एक्स्प्रेस
१३) २०९०९/१० कोचुवेली पोरबंदर साप्ताहिक सुपरफास्ट एक्सप्रेस
१४) २२६५३/५४ हजरत निजामुद्दीन – तिरुवनंतपुरम सेंट्रल सुपरफास्ट एक्सप्रेस
१५) २२६५३/५४ हजरत निजामुद्दीन – एर्नाकुलम  सुपरफास्ट एक्सप्रेस
Facebook Comments Box

Mumbai Goa Highway: खुशखबर! कशेडी घाट बोगदा लवकरच पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी खुला होणार

   Follow us on        
Kashedi Tunnel | मे महिन्याच्या सुट्टीत मुंबई गोवा महामार्गाने कोकणात जाण्याच्या तयारीत असलेल्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील महत्त्वाचा कशेडी घाट बोगदा लवकरच पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी खुला होणार आहे. त्यामुळे चाकरमान्यांचा प्रवास जलद, सुरक्षित आणि अधिक आरामदायक होणार आहे. कशेडीच्या दोन्ही बोगद्यांपैकी पोलादपूर बाजूकडील वीजपुरवठा कार्यान्वित झाला असून, उर्वरित वीजपुरवठा १५ दिवसांत पूर्ववत होणार आहे.
राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अभियंता पंकज गोसावी यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही बोगद्यांतील अंतर्गत गळती दुरुस्त करण्याचे काम सुरू असून १५ मेपूर्वी वाहतुकीसाठी ते पूर्ण क्षमतेने खुले करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. बोगद्याचा वापर सणासुदीच्या काळात प्रवाशांनी अधिक पसंत केल्याने, ही सुविधा वेळेत पूर्ण व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
spacer height=”20px”]
कशेडी घाट बोगदा हा दोन किलोमीटर लांबीचा असून, त्याला जोडणाऱ्या रस्त्यांसह संपूर्ण मार्ग सुमारे नऊ किलोमीटरचा आहे. यामुळे ४० ते ४५ मिनिटांचा वळसा वाचून अवघ्या १० ते १५ मिनिटांत रायगडमधील पोलादपूर ते रत्नागिरीतील खेडमधील कशेडीपर्यंतचा प्रवास शक्य होणार आहे.
बोगद्यात दोन्ही बाजूंनी २०० पथदीपांची उभारणी करण्यात येणार असून, त्यासाठी आवश्यक यंत्रसामग्री उपलब्ध झाली आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी २० दिवसांचा कालावधी अपेक्षित असून, १५ मेपूर्वी सर्व कामे पूर्ण करण्याचा मानस आहे. त्यामुळे सुट्टीच्या कालावधीत कोकणात जाणारा प्रवास अधिक सुकर होणार आहे.
Facebook Comments Box

Pahalgam Terror Attack: भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानच्या विमानांसाठी भारताची हवाई हद्द बंद

   Follow us on        

Pahalgam Terror Attack: पाकिस्तान ची गोची करण्यासाठी भारताने अजून एक मोठा निर्णय घेतला आहे. भारताने आता पाकिस्तानच्या विमानांसाठी आपली हवाई हद्द Airspace बंद केले आहे.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात यापुर्वी काही मोठे निर्णय घेतले आहेत. त्यानंतर पाकने देखील भारताच्या विरोधात काही निर्णय घेतले. भारतीय विमानांसाठी पाकिस्तानच्या हवाई हद्दीत प्रवेशास मनाई केली. पाकिस्तानने भारतातील विमान वाहतूक क्षेत्राला हानी पोहोचवण्याच्या दृष्टीने भारतीय विमानांसाठी आपले हवाई क्षेत्र बंद केले. त्यानंतर आता भारतानेही पाकिस्तानसाठी आपले हवाई क्षेत्र बंद केलं आहे.

पहलगाम हल्ल्यानंतर संभाव्य लष्करी कारवाईच्या पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तानसाठी आपले हवाई क्षेत्र बंद केलं आहे. 30 एप्रिल ते 23 मे पर्यंत हवाई क्षेत्र बंद करण्यात आले आहे. या काळात, पाकिस्तानच्या नोंदणीकृत, चालवल्या जाणाऱ्या किंवा भाडेतत्त्वावर घेतलेल्या विमानांसह पाकिस्तानी लष्करी विमानांना या क्षेत्रात प्रवेश करण्याची परवानगी दिली जाणार नाही. पाकिस्तानचे हवाई क्षेत्र बंद झाल्यानंतर त्यांच्या विमान कंपन्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागेल. पूर्वी पाकिस्तानी विमाने भारतीय हवाई हद्द वापरून चीन, म्यानमार, थायलंड, मलेशिया आणि श्रीलंकेत उड्डाण करत होता, परंतु आता हवाई हद्द बंद झाल्यानंतर, त्यांच्या विमानांना पुन्हा या देशांमध्ये पोहोचण्यासाठी जास्त अंतराचा प्रवास करावा लागेल.

 

पाकिस्तानी एअरलाइन्स पीआयएने उड्डाणे केली रद्द 

भारतीय हवाई क्षेत्र बंद करण्यापूर्वी, पाकिस्तानी माध्यमांनी वृत्त दिले होते की, पाकिस्तानची राष्ट्रीय विमान कंपनी पीआयएने गिलगिट, स्कार्दू आणि पाकव्याप्त काश्मीरला जाणारी उड्डाणे रद्द केली आहेत. उर्दू दैनिक ‘जंग’ ने दिलेल्या वृत्तानुसार, पीआयएने कराची आणि लाहोरहून स्कार्दूला जाणारी प्रत्येकी दोन उड्डाणे रद्द केली आहेत. इस्लामाबादहून स्कार्दू आणि गिलगिटला जाणाऱ्या एकूण सहा विमान उड्डाणेही रद्द करण्यात आली आहेत. पाकिस्तानने आपल्या हवाई क्षेत्राची देखरेखही कडक केली आहे.

एक्सप्रेस ट्रिब्यूननुसार, सुरक्षेच्या कारणास्तव सर्व व्यावसायिक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की, ही सर्व पावले खबरदारीचा उपाय म्हणून आणि प्रादेशिक तणावादरम्यान राष्ट्रीय हवाई सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी उचलण्यात आली आहेत. याशिवाय, पाकिस्तान प्राधिकरणाने सर्व विमानतळांना हाय अलर्टवर ठेवले आहे.

Facebook Comments Box

०१ मे पंचांग आणि दिनविशेष


आजचे पंचांग

  • तिथि-चतुर्थी – 11:26:47 पर्यंत
  • नक्षत्र-मृगशिरा – 14:22:01 पर्यंत
  • करण-विष्टि – 11:26:47 पर्यंत, भाव – 22:16:55 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-अतिगंड – 08:33:58 पर्यंत, सुकर्मा – 29:38:19 पर्यंत
  • वार- गुरूवार
  • सूर्योदय- 06:13
  • सूर्यास्त- 19:59
  • चन्द्र-राशि-मिथुन
  • चंद्रोदय- 09:07:59
  • चंद्रास्त- 23:07:59
  • ऋतु- ग्रीष्म

जागतिक दिवस :
  • महाराष्ट्र दिन
  • मराठी राजभाषा दिन
  • आंतरराष्ट्रीय कामगार दिन

महत्त्वाच्या घटना :
  • 1707 : इंग्लंडचे राज्य आणि स्कॉटलंडचे राज्य विलीन होऊन ग्रेट ब्रिटनचे साम्राज्य निर्माण झाले.
  • 1739 चिमाजी अप्पांनी पोर्तुगीजांच्या ताब्यातील वसईवर हल्ला केला. तीन महिन्यांच्या युद्धानंतर वसई मराठ्यांच्या ताब्यात गेली.
  • 1840 : युनायटेड किंगडममध्ये पेनी ब्लॅक, पहिले अधिकृत टपाल तिकीट जारी करण्यात आले.
  • 1844 : हाँगकाँग पोलीस दलाची स्थापना जगातील दुसरे आधुनिक पोलीस दल आणि आशियातील पहिले पोलीस दल म्हणून करण्यात आली.
  • 1882 : आर्य महिला समाजाचे पं. रमाबाईंच्या पुढाकाराने पुण्यात त्याची स्थापना झाली.
  • 1884 : अमेरिकेत कामगारांनी दिवसात 8 तास काम करावे या मागणीची घोषणा.
  • 1886 : आंतरराष्ट्रीय कामगार दिन हा कम्युनिस्ट आंतरराष्ट्रीय संघटनेच्या दुसर्‍या बैठकीत पहिल्यांदा साजरा केला.
  • 1890 : जागतिक कामगार दिन हा जगात पहिल्यांदा साजरा केला.
  • 1897 : रामकृष्ण मिशन ची सुरूवात स्वामी विवेकानंद यांनी केली.
  • 1927 : जागतिक कामगार दिन हा भारतात पहिल्यांदा साजरा केला.
  • 1930 : सूर्यमालेतील प्लुटो चे नामकरण करण्यात आले.
  • 1940 : युद्धाच्या उद्रेकामुळे ऑलिम्पिक खेळ रद्द करण्यात आले.
  • 1960 : मुंबईसह मराठी भाषिक ‘महाराष्ट्र’ राज्य आणि ‘गुजरात’ राज्य या स्वतंत्र राज्यांचा निर्माण झाला.
  • 1960 : गुजरात उच्च न्यायालयाची स्थापना झाली.
  • 1961 : क्युबाचे पंतप्रधान फिडेल कॅस्ट्रो यांनी क्युबाला समाजवादी देश घोषित केले आणि निवडणुका रद्द केल्या.
  • 1962 : महाराष्ट्रातील जिल्हा परिषदांची स्थापना.
  • 1978 : जपानचे ‘नामी उमुरा’ हे उत्तर ध्रुवावर पोहोचणारे पहिले मनुष्य आहेत.
  • 1983 : ‘अमरावती विद्यापीठाची’ स्थापना.
  • 1998 : कोकण रेल्वे प्रकल्प पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी राष्ट्राला समर्पित केला.
  • 1999 : नगरपालिकांच्या नगराध्यक्षांची मुदत एक वर्षावरून अडीच वर्षांपर्यंत वाढवण्यासाठी सुधारणा करणारा अध्यादेश जारी झाला.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 1218 : जर्मनीचा राजा रुडॉल्फ (पहिला) यांचा जन्म. (मृत्यू: 15 जुलै 1291)
  • 1913 : ‘बलराज साहनी’ – अभिनेता यांचा जन्म. (मृत्यू: 13 एप्रिल 1973)
  • 1915 : डॉ. रामेश्वर शुक्ल उर्फ अंचल – हिन्दी साहित्यिक यांचा जन्म. (मृत्यू: 13 ऑक्टोबर 1995)
  • 1919 : ‘मन्ना डे’ – भारतीय भाषेतील प्रतिभासंपन्न पार्श्वगायक यांचा जन्म. (मृत्यू: 24 ऑक्टोबर २०१३)
  • 1922 : ‘मधु लिमये’ – स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार आणि समाजवादी नेते यांचा जन्म. (मृत्यू: 8 जानेवारी 1995)
  • 1932 : ‘एस. एम. कृष्णा’ – कर्नाटकचे 16 वे मुख्यमंत्री यांचा जन्म.
  • 1943 : ‘सोनल मानसिंह’ – नृत्यांगना यांचा जन्म.
  • 1955 : ‘आनंद गोपाल महिंद्रा’ – महिंद्रा समूहाचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष यांचा जन्म.
  • 1971 : ‘अजित कुमार’ – भारतीय अभिनेते आणि रेस कार ड्रायव्हर यांचा जन्म.
  • 1988 : ‘अनुष्का शर्मा’ – हिंदी चित्रपट अभिनेत्री यांचा जन्म.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 1945 : ‘जोसेफ गोबेल्स’ – जर्मनीचा चॅन्सेलर नाझी नेता यांचे
  • निधन. (जन्म: 29 ऑक्टोबर 1897)
  • 1958 : गणेश शिवराम उर्फ नाना जोग – नाटककार यांचे नागपुर येथे निधन.
  • 1972 : ‘कमलनयन बजाज’ – उद्योगपती, जमनालाल बजाज यांचे चिरंजीव यांचे निधन. (जन्म: 23 जानेवारी 1915)
  • 1993 : ‘ना. ग. गोरे’ – स्वातंत्र्यसैनिक आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील नेते यांचे निधन. (जन्म: 15 जून 1907)
  • 2013 : ‘निखील एकनाथ खडसे’ यांचे निधन


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

 

Facebook Comments Box

Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावरील दोन गाड्यांचा स्लीपर डब्यांत मोठी कपात

   Follow us on        
Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या २ गाड्यांच्या रेकचे रूपांतर आधुनिक दर्जाच्या एलएचबी रेक मध्ये करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. मात्र ही सुधारणा करताना या गाड्यांच्या डब्यांच्या संरचनेत मोठा बदल करण्यात आला असून सामान्य प्रवाशांना सोयीच्या ठरणाऱ्या स्लीपर डब्यांत कपात करण्यात आली आहे. याबाबतचा अधिक तपशील खालीलप्रमाणे
१) २२१४९/२२१५०  पुणे जंक्शन – एर्नाकुलम – द्वि-साप्ताहिक एक्सप्रेस ही गाडी दिनांक ६ जुलै २०२५ पासून  सुधारित एलएचबी कोचसहित धावणार आहे.
२ ) ११०९७/११०९८  पुणे जंक्शन – एर्नाकुलम – पुणे जंक्शन साप्ताहिक एक्सप्रेस ही गाडी दिनांक ५ जुलै २०२५ पासून सुधारित एलएचबी कोचसहित धावणार आहे.
या दोन्ही गाड्यांच्या डब्यांची सध्याची आणि सुधारित संरचना खालीलप्रमाणे असणार आहे.
सध्याची संरचना सुधारित संरचना
२ टियर एसी – ०१
२ टियर एसी – ०२
३ टियर एसी – ०४
३ टियर एसी – ०४
स्लीपर – ११ स्लीपर – ०७
जनरल – ०३ जनरल – ०४
पॅन्ट्री कार – ०१ पॅन्ट्री कार – ०१
एसएलआर – ०२ एसएलआर – ०२
एकूण – २२ आयसीएफ कोच
एकूण – २० एलएचबी कोच
LHB मध्ये अपग्रेड करताना दोन्ही या गाड्यांचे तब्बल ४ स्लीपर डबे कमी करण्यात आले आहेत. एकिकडे कोकण रेल्वे मार्गावर स्लीपर आणि जनरल डब्यांमध्ये मोठी गर्दी होत असताना या गाड्यांचे हे डबे कमी केल्याने प्रवाशांकडून नाराजी व्यक्त होत आहे.
Facebook Comments Box

३० एप्रिल पंचांग आणि दिनविशेष


आजचे पंचांग

  • तिथि-तृतीया – 14:15:06 पर्यंत
  • नक्षत्र-रोहिणी – 16:19:11 पर्यंत
  • करण-गर – 14:15:06 पर्यंत, वणिज – 24:46:31 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-शोभन – 12:01:16 पर्यंत
  • वार- बुधवार
  • सूर्योदय- 06:13
  • सूर्यास्त- 18:58
  • चन्द्र-राशि-वृषभ – 27:16:02 पर्यंत
  • चंद्रोदय- 08:05:59
  • चंद्रास्त- 22:03:59
  • ऋतु- ग्रीष्म

जागतिक दिवस :
  • प्रामाणिकपणा दिवस National Honesty Day
महत्त्वाच्या घटना :
  • 1492 : स्पेनने ख्रिस्तोफर कोलंबस यांना त्यांच्या शोधाकार्यासाठी नियुक्त केले.
  • 1657 : शिवाजी महाराजांनी मुघलांच्या ताब्यात असलेल्या जुन्नर शहरावर हल्ला करून लुटले.
  • 1789 : जॉर्ज वॉशिंग्टन अमेरिकेचे पहिले निर्वाचित राष्ट्राध्यक्ष बनले.
  • 1905 : अल्बर्ट आइनस्टाईन यांनी झुरिच विद्यापीठात डॉक्टरेट प्रबंध पूर्ण केला.
  • 1936 : महात्मा गांधींनी वर्ध्याजवळ सेवाग्राम आश्रम स्थापन केला.
  • 1977 : 9 राज्यांमधील विधानसभा विसर्जित करण्यात आली आणि जनसंघ, समाजवादी पक्ष, केंद्रीय काँग्रेस आणि भारतीय लोक दल यांनी जनता पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला.
  • 1982 : कलकत्ता येथे बिजन सेतू हत्याकांड घडले.
  • 1995 : बिल क्लिंटन उत्तर आयर्लंडला भेट देणारे पहिले अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बनले.
  • 1996 : थेऊर येथील श्री चिंतामणी मंदिराच्या प्रांगणात श्रीमंत माधवराव पेशव्यांच्या स्मृतिस्थळाचे उद्घाटन करण्यात आले.
  • 2009 : ख्रायस्लर कंपनीने दिवाळखोरी घोषित केली.
  • 2013 : विलेम-अलेक्झांडर नेदरलँड्सचा राजा बनल्यानंतर त्याची आई राणी बीट्रिक्सने राजीनामा दिला; ती 33 वर्षांपूर्वी सिंहासनावर आरूढ झाली होती.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 1777 : ‘कार्ल फ्रेड्रिक गाऊस’ – जर्मन गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 23 फेब्रुवारी 1855)
  • 1870 : ‘दादासाहेब फाळके’ – भारतीय चित्रपट उद्योगाचे जनक यांचा जन्म. (मृत्यू: 16 फेब्रुवारी 1944)
  • 1909 : माणिक बंडोजी इंगळे ऊर्फ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज – यांचा जन्म. (मृत्यू: 11 ऑक्टोबर 1968)
  • 1910 : श्रीरंगम श्रीनिवास राव ऊर्फ ‘श्री श्री राव’ – साहित्य अकादमी पुरस्कार विजेते तेलुगू कवी आणि गीतकार यांचा जन्म. (मृत्यू: 15 जून 1983)
  • 1921 : ‘रॉजर एल. ईस्टन’ – जीपीएस चे सहसंशोधक यांचा जन्म. (मृत्यू: 8 मे 2014)
  • 1926 : ‘श्रीनिवास खळे’ – मराठी संगीतकार यांचा जन्म. (मृत्यू: 2 सप्टेंबर 2011)
  • 1987 : ‘रोहित शर्मा’ – भारतीय क्रिकेटपटू यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 1030 : ‘मोहंमद गझनी’ – तुर्कीच्या गझनवी साम्राज्याचा शासक यांचे निधन. (जन्म: 2 ऑक्टोबर 971)
  • 1878 : साक्षात्कारी सत्पुरुष व दत्तावतारी स्वामीमहाराज अक्‍कलकोट यांनी समाधी घेतली.
  • 1913 : ‘मोरो केशव दामले’ – व्याकरणकार आणि निबंधकार यांचे निधन. (जन्म: 7 नोव्हेंबर 1868)
  • 1945 : ‘अ‍ॅडॉल्फ हिटलर’ – जर्मनीचे नाझी हुकूमशहा यांनी आत्महत्या केली. (जन्म: 20 एप्रिल 1889)
  • 2001 : ‘श्रीपाद अच्युत दाभोळकर’ – प्रयोग परिवार या संकल्पनेचे प्रवर्तक, गणितज्ञ आणि कृषी शास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म: 21 ऑगस्ट 1924)
  • 2003 : ‘वसंत पोतदार’ – मराठी साहित्यिक यांचे निधन. (जन्म: 20 नोव्हेंबर 1939)
  • 2014 : ‘खालिद चौधरी’ – भारतीय चित्रकार आणि सेट डिझायनर यांचे निधन. (जन्म: 20 डिसेंबर 1919)
  • 2020 : ‘ऋषि कपूर’ – चित्रपट अभिनेता यांचे निधन.


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

 

Facebook Comments Box

२९ एप्रिल पंचांग आणि दिनविशेष


आजचे पंचांग

  • तिथि-द्वितीया – 17:34:05 पर्यंत
  • नक्षत्र-कृत्तिका – 18:48:09 पर्यंत
  • करण-बालव – 07:21:58 पर्यंत, कौलव – 17:34:05 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-सौभाग्य – 15:53:16 पर्यंत
  • वार- मंगळवार
  • सूर्योदय- 06:14
  • सूर्यास्त- 18:58
  • चन्द्र-राशि-वृषभ
  • चंद्रोदय- 07:09:00
  • चंद्रास्त- 20:56:00
  • ऋतु- ग्रीष्म

जागतिक दिवस :
  • आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस International Dance Day
  • जागतिक इच्छा दिन World Wish Day
  • जागतिक पुरवठा दिवस National Supply Chain Day
महत्त्वाच्या घटना :
  • 1639: मुघल सम्राट शाहजहानने दिल्लीतील लाल किल्ल्याची पायाभरणी केली.
  • 1930: ब्रिटन आणि ऑस्ट्रेलियामध्ये टेलिफोन सेवा सुरू करण्यात आली.
  • 1933: प्रभात कंपनीचा सिंहगड हा चित्रपट प्रदर्शित झाला.
  • 1945: दुसरे महायुद्ध इटलीतील जर्मन सैन्याने मित्र राष्ट्रांना बिनशर्त आत्मसमर्पण केले.
  • 1986: लॉस एंजेलिस सेंट्रल लायब्ररीला लागलेल्या आगीत सुमारे 400,000 पुस्तके नष्ट झाली.
  • 1991: बांगलादेशच्या दक्षिणेकडील चितगाव जिल्ह्यात आलेल्या तीव्र चक्रीवादळामुळे सुमारे 1,38,000 लोकांचा मृत्यू झाला आणि सुमारे एक कोटी लोक बेघर झाले.
  • 2010 : शत्रूच्या रडारने न पकडली जाणारी मुंबईतील मांजगाव येथे बांधण्यात आलेली आधुनिक उपकरणे असलेली INS शिवालिक ही युद्धनौका भारताने नौदलात सामील केली.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 1727 : ‘जीन-जॉर्जेस नोव्हर’ – फ्रेंच नर्तक आणि बॅलेट चे निर्माते यांचा जन्म. (मृत्यू: 19 ऑक्टोबर 1810)
  • 1848 : ‘राजा रवि वर्मा’ – चित्रकार यांचा जन्म. (मृत्यू: 2 ऑक्टोबर 1906)
  • 1867 : ‘डॉ. शंकर आबाजी भिसे’ – भारतीय शास्त्रज्ञ आणि अग्रगण्य शोधक यांचा जन्म. (मृत्यू: 7 एप्रिल 1935)
  • 1891 : ‘भारतीदासन’ – भारतीय कवी आणि कार्यकर्ते यांचा जन्म. (मृत्यू: 21 एप्रिल 1964)
  • 1901 : ‘मिचेनोमिया हिरोहितो’ – दुसऱ्या महायुद्धाच्या आधी व नंतरच्या काळातील जपानी सम्राट यांचा जन्म. (मृत्यू: 7 जानेवारी 1989)
  • 1936 : ‘झुबिन मेहता’ – भारतीय संगीतकार यांचा जन्म.
  • 1966 : ‘फिल टफनेल’ – इंग्लिश फिरकी गोलंदाज यांचा जन्म.
  • 1970 : ‘आंद्रे आगासी’ – अमेरिकन लॉन टेनिस खेळाडू यांचा जन्म.
  • 1979 : ‘आशिष नेहरा’ – भारतीय क्रिकेट खेळाडू
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 1945 : ‘हेन्रिच हिमलर’ – जर्मन नाझी अधिकारी यांचे निधन. (जन्म: 7 ऑक्टोबर 1900)
  • 1960 : ‘पं. बाळकृष्ण शर्मा’ – हिंदी कवी यांचे निधन. (जन्म: 8 डिसेंबर 1897)
  • 1980 : ‘श्रीकृष्ण के. क्षीरसागर’ – लेखक, विचारवंत आणि समीक्षक यांचे निधन. (जन्म: 6 नोव्हेंबर 1901)
  • 1980 : ‘सर अल्फ्रेड हिचकॉक’ – चित्रपट दिग्दर्शक यांचे निधन. (जन्म: 13 ऑगस्ट 1899)
  • 2006 : ‘जे. के. गालब्रेथ’ – कॅनेडियन-अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म: 15 ऑक्टोबर 1908)
  • 2020 – ‘इरफान खान’ – भारतीय अभिनेता यांचे निधन.


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

 

Facebook Comments Box

Monsoon 2025: मान्सूनची चाहुल! पावसाची वर्दी देणारा ‘नवरंग’ कोकणात दाखल

   Follow us on        

रत्नागिरी: पावसाची वर्दी घेऊन येणारा पक्षी म्हणून ओळख असलेला नवरंग म्हणजेच ‘इंडियन पिट्टा’ कोकणात दाखल झाला आहे (indian pitta migration). पावसाची जशी चाहूल लागते तशी कोकणामध्ये नवरंग पक्षाचं आगमन होत. हा अतिशय दुर्मिळ पक्षी असून वर्षभरातील फक्त चारच महिने आपल्याला पाहायला मिळतो. पावसाला पोषक वातावरण निर्माण झालं की नवरंग पक्षी कोकणात दाखल होतो. हवामान विभागानेदेखील यंदा पाऊस लवकर असल्याची माहिती दिली आहे. त्यातच आता नवरंग पक्षाच्या आगमनाने पावसाच्या आगमनाची चाहूल दिली आहे. नवरंग पक्षी हा शेतकऱ्यांचा मित्र म्हणून संबोधला जातो. पावसाच्या आगमनाची चाहूल लागताच आपल्या विशिष्ट आवाजाने शेतकऱ्यांना हा पक्षी जणू पावसाला लवकर सुरू होणार असल्याची वर्दी0 देतो. नवरंग पक्षाच्या आगमनाने पक्षी प्रेमींही सुखावले असून त्याची छबी टिपण्याचा मोह आवरत नाही.

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक ठिकाणी या पक्ष्याची मधुर शीळ कानी पडू लागली आहे (indian pitta migration). पावसाळ्याच्या तोंडावर हा पक्षी स्थानिक स्वरुपाचे स्थलांतर करत असला तरी, कोकणात या पक्ष्याची काही संख्या घरटी देखील बांधते. (indian pitta migration)

भारतीय पिट्टा या नावाने ओळखला जाणारा हा पक्षी भारतात स्थानिक स्वरुपाचे स्थलांतर करतो. ‘पिट्टा’ हा शब्द तेलुगू भाषेतून आला आहे. ज्याचा अर्थ ‘लहान पक्षी’ असा होतो. याला मराठीत स्थानिक भाषेत नवरंग, बहिरा पाखर, बंदी, पाऊसपेव असेही म्हटले जाते. हा पक्षी हिवाळ्यात दक्षिण भारत आणि श्रीलंकेत स्थलांतर करतो, तर पावसाळ्याच्या तोंंडावर अगदी हिमालयाच्या पायथ्यापर्यंत प्रजननाकरिता जातो. एप्रिल महिन्यात श्रीलंका आणि दक्षिण भारतात स्थलांतर केलेले नवरंग पक्षी पश्चिम घाटाच्या धारेला धरुनच उत्तरेकडे सरकू लागतात. सध्या या पक्ष्यांचे आगमन रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात झाले आहे. जिल्ह्यातील पक्षीनिरीक्षक या पक्ष्यांची छायाचित्र टिपत आहेत.

मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात नवरंग पक्षी मुंबई आणि रायगड जिल्ह्यात सरकेल आणि तिथून गुजरातमध्ये जाऊन प्रजनन करेल. पश्चिम घाटामार्गे स्थलांतर करणारे ९० टक्के नवरंग पक्षी हे गुजरात किंवा त्यावरील भागात जाऊन प्रजनन करत असले तरी, काही पक्षी हे कोकणात देखील घरटी बांधतात. लहान आकाराचा हा पक्षी आपल्या रंगासाठी ओळखला जातो. त्याचे पाय लाब आणि मजबूत असतात. चोच जाड असते. हा पक्षी सहसा दाट झाडी असलेल्या जंगलात जमिनीवर खाद्य शोधताना दिसतो. पालापाचोळ्यामधील कीटक शोधताना दिसतो. सकाळी आणि सायंकाळी हा पक्षी आवाज देताना दिसतो. यामधील नर आणि मादी हे एकसारखेच दिसतात.

Facebook Comments Box

Mumbai to Konkan RORO Service: अवघ्या ५ तासांत मुंबईतून तळकोकणात! वाहतुकीचा जलद पर्याय लवकरच खुला होणार

   Follow us on        
मुंबई: यावर्षी कोकणात जाण्यासाठी वाहतुकीचा नवीन पर्याय खुला होणार आहे. राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी चाकरमान्यांना  मोठी खुशखबर दिली असून माझगाव ते मालवण जलवाहतुकीने अवघ्या पाच तासांत पोहोचता येणार आहे. येत्या गणेशचतुर्थी पर्यंत ही वाहतूक खुली होणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे
या वॉटर मेट्रोमुळे मुंबई महानगर प्रदेशातील रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवरचा पडणारा मोठा ताण हा विभागला जाणार असून जलवाहतुकीचा मोठा पर्याय आगामी काळात मुंबईकरांना खुला होऊ शकणार आहे, असेही मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी यावेळी स्पष्ट केले.
रेल्वेचे तिकीट जरी मिळाले नाही तरी काळजी करण्याचे कारण नाही. कारण महाराष्ट्र सागरी मंडळाने रो-रो बोट सेवेद्वारे जलवाहतुकीची जलद सेवा चाकरमान्यांसाठी गणेश चतुर्थीला उपलब्ध करून दिली आहे. एनडीटीव्ही मराठीच्या कॉन्क्लेव्हमध्ये बोलताना मंत्री नितेश राणे यांनी ही घोषणा केली. मालवणला जाऊ इच्छिणारे थेट दुचाकी, चारचाकी गाडी घेऊन माझगाव ते मालवण हा जलप्रवास जलद गतीने करता येणे शक्य आहे. याकरता मालवण आणि विजयदुर्ग असे दोन पर्याय देण्यात आले आहेत. ज्यांना मालवणी येथे पोहोचायचे असेल त्यांनी मालवणला, तर ज्यांना विजयदुर्ग येथून कोकणातील आपल्या गावी जायचे असेल त्यांच्याकरता विजयदुर्ग येथे दुसरा पर्याय देण्यात आलेला आहे.
सरकार जलवाहतुकीच्या क्षेत्रात मोठे काम करत असून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या क्षेत्रात आपल्याला अधिकाधिक काम करण्यास सांगितले आहे. मुंबई महानगर प्रदेशातील वॉटर ट्रान्सपोर्टला म्हणजेच जलवाहतुकीला शासकीय पातळीवर गती देण्याचे काम प्रगतिपथावर असून याबाबतचे डीपीआर (प्रकल्प अहवाल) तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. यावर्षी नसला तरी आगामी वर्षात साधारणपणे फेब्रुवारी, मार्चच्या सुमारास कोचीनच्या धर्तीवर मुंबई महानगर प्रदेशातील वॉटर मेट्रोला मान्यता देण्यात येईल.
यंदाच्या गणपती उत्सवात सिंधुदुर्गात जाऊ इच्छिणाऱ्या गणेश भक्तांसाठी माझगाव पासून ते थेट मालवणपर्यंत रो-रो बोट सेवेद्वारे जलवाहतूक सुरू करण्यात येणार आहे.
Facebook Comments Box

२८ एप्रिल पंचांग आणि दिनविशेष


आजचे पंचांग

  • तिथि-प्रथम – 21:13:41 पर्यंत
  • नक्षत्र-भरणी – 21:38:36 पर्यंत
  • करण-किन्स्तुघ्ना – 11:07:55 पर्यंत, भाव – 21:13:41 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-आयुष्मान – 20:01:52 पर्यंत
  • वार- सोमवार
  • सूर्योदय- 06:15
  • सूर्यास्त- 18:58
  • चन्द्र-राशि-मेष – 26:54:34 पर्यंत
  • चंद्रोदय- 06:16:59
  • चंद्रास्त- 19:45:59
  • ऋतु- ग्रीष्म

जागतिक दिन :
  • कामाच्या ठिकाणी सुरक्षितता आणि आरोग्यासाठी जागतिक दिवस World Day For Safety And Health At Work
महत्त्वाच्या घटना :
  • 1916 : होम रुल लीगची स्थापना झाली.
  • 1920: अझरबैजान सोव्हिएत युनियनमध्ये सामील झाला.
  • 1969 : चार्ल्स गॉल यांनी फ्रान्सच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
  • 2001 : डेनिस टिटो हे पैसे देउन अंतराळात प्रवास करणारे पहिला अंतराळ प्रवासी झाले.
  • 2003 : ऍपल कम्प्यूटर इन्क. ने आयट्यून्स स्टोअर प्रकाशित केले.
  • 2007 : 2007 साली श्रीलंकेला हरवून ऑस्ट्रेलिया चौथ्यांदा वर्ल्ड क्रिकेट चॅम्पियन बनला, श्रीलंकेला हरवून ऑस्ट्रेलिया चौथ्यांदा वर्ल्ड क्रिकेट चॅम्पियन बनला.
  • 2008 : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने ‘PSLV-C9’ उपग्रह प्रक्षेपित केला.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 1758 : ‘जेम्स मोन्‍रो’ – अमेरिकेचे 5 वे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू: 4 जुलै 1831)
  • 1854 : ‘वासुकाका जोशी’ – लोकमान्य टिळकांचे निकटचे सहकारी यांचा जन्म. (मृत्यू: 12 जानेवारी 1944)
  • 1908 : ऑस्ट्रियाचे व्यापारी व नाझीविरोधी ऑस्कार शिंडलर यांचा जन्म.
  • 1916 : प्रसिद्ध लक्झरी स्पोर्ट्स कार लॅम्बोर्गिनी चे निर्माते फारूशियो लॅम्बोर्गिनी यांचा इटली येथे जन्म. (मृत्यू: 20 फेब्रुवारी 1993)
  • 1931 : लेखक मधु मंगेश कर्णिक यांचा जन्म.
  • 1937 : इराकी हुकूमशहा आणि इराकचे ५वे अध्यक्ष सद्दाम हुसेन यांचा जन्म. (मृत्यू: 30 डिसेंबर 2006)
  • 1942 : इंग्लिश क्रिकेटर माईक ब्रेअर्ली यांचा जन्म.
  • 1968 : झिम्बाब्वेचे क्रिकेटपटू अँडी फ्लॉवर यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 1740 : थोरले बाजीराव पेशवे ऊर्फ श्रीमंत बाजीराव बल्लाळ बाळाजी भट यांचे नर्मदातीरी रावेरखेडी येथे निधन. (जन्म: 18 ऑगस्ट 1700)
  • 1903 : ‘जोशिया विलार्ड गिब्स’ – भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या विषयांमध्ये आपले महत्वपूर्ण योगदान देणारे अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ यांचे निधन.
  • 1945 : इटलीचे हुकूमशहा बेनिटो मुसोलिनी यांचा गोळ्या घालून मृत्यू. (जन्म: 29 जुलै 1883)
  • 1978 : अफगाणिस्तानचे पहिले अध्यक्ष मोहम्मद दाऊद खान यांचे निधन. (जन्म: 18 जुलै 1909)
  • 1992 : ‘डॉ. विनायक कृष्ण गोकाक’ – ज्ञानपीठ पुरस्कारविजेते कन्नड साहित्यिक आणि शिक्षणतज्ज्ञ यांचे निधन. (जन्म: 9 ऑगस्ट 1909)
  • 1998 : ‘रमाकांत देसाई’ – जलदगती गोलंदाज यांचे निधन. (जन्म: 20 जून 1939)


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

 

Facebook Comments Box

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search