नागपूर- मडगाव विशेष गाडीला डिसेंबर ३१ पर्यंत मुदत वाढ

प्रवाशांचा प्रतिसाद लक्षात घेऊन गणेशोत्सवासाठी सोडण्यात आलेल्या नागपूर ते मडगाव दरम्यान धावणाऱ्या Nagpur – Madgaon Jn – Nagpur Special (Bi-Weekly) 01139/01140 या विशेष रेल्वे गाडीला डिसेंबर अखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे ही गाडी आता 31 डिसेंबरपर्यंत धावणार आहे.

 

ह्या गाडीच्या वेळा पत्रकामध्ये आणि स्थानकांमध्ये काहीसे बदलही करण्यात आलेले आहेत. सुधारित वेळापत्रकानुसार ही गाडी नागपूर येथून बुधवारी तसेच शनिवारी दुपारी 3:05 सुटून गुरुवार तसेच रविवारी ती मडगावला दुसऱ्या दिवशी सायंकाळी 5:00 वाजता पोहोचेल.

 

मडगाव ते नागपूर दरम्यान धावताना ही गाडी (01140) गुरुवार तसेच रविवारी मडगाव येथून रात्री 8:00 वाजता सुटून दुसऱ्या दिवशी रात्री 9:30 वाजता ते नागपूरला पोहोचेल.

 

नागपूर ते मडगाव या प्रवासात गाडी वर्धा, पुलगाव, धामणगाव बडनेरा, अकोला मलकापूर, भुसावळ, नाशिक, इगतपुरी, कल्याण, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर, कणकवली, कुडाळ, थीवी तसेच करमाळी या स्थानकांवर थांबणार आहे.

ह्या गाडीला 2 Tier AC – 01,  3 Tier AC – 04,  Sleeper – 11, General – 04, SLR-02 असे एकूण 22 डबे असणार आहेत. 

एक महिन्याच्या कालावधीत या विशेष गाडीच्या दोन्ही बाजूच्या मिळून अठरा फेऱ्या होणार आहेत.

 

ह्या अतिरिक्त फेऱ्यांचे आरक्षण 23/10/2022 पासून रेल्वेच्या तिकीट खिडक्यांवर आणि ऑनलाईन पोर्टलवर चालू होईल.







मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Facebook Comments Box

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व मुंबै जिल्हा बँकेच्या समन्वयातून कोकणचा विकास- मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर

सिंधुदुर्ग: आज महाराष्ट्र भाजपचे आमदार,मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी ओरस येथील सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रधान कार्यालयाला भेट दिली. यावेळी बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी व उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी पुषपगुच्छ त्यांचे  देऊन स्वागत केले. 
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व मुंबै जिल्हा बँकेच्या समन्वयातून कोकणचा विकास,युवकांना रोजगार व पर्यटन या विषयांवर एकत्रित काम करण्याबाबत त्यांनी सकारात्मक चर्चा झाली. यावेळी आमदार, भाजपा सचिव प्रमोद जठार, संचालक बाबा परब आदी उपस्थित होते.
Facebook Comments Box

माथेरान ला भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी एक खुशखबर; बंद पडलेली टॉय ट्रेन उद्यापासून सुरु

रायगड :नेरळ माथेरान ला भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी एक खुशखबर आहे. येथील प्रसिद्ध असलेली टॉय ट्रेन पुन्हा सुरु होणार आहे. उद्या दिनांक २२ ओक्टोम्बर रोजी हि सेवा पुन्हा चालू होणार आहे असे रेल्वे प्रशासनाने जाहीर केले आहे. 
येथे पडणाऱ्या मुसळधार पाऊस आणि त्यामुळे होणारे भुरस्सलन ह्यामुळे ह्या मार्गावरील रेल्वे रुळे खराब झाल्याकारणाने हि सेवा बंद करावी लागली होती. मागील ३ वर्षे हि सेवा बंद होती. आता ह्या रेल्वे मार्गात काही सुधारणा करण्यात आलेल्या आहेत.  
उद्यापासून खालील सेवा चालू होतील 
नेरळ-माथेरान-नेरळ ह्या मार्गावर मिनी ट्रेन 
नेरळ-माथेरान-नेरळ ह्या मार्गावर मिनी ट्रेन स्वरूपात 4 गाड्या चालवनिण्यात येणार आहेत.  त्यापैकी २ नेरळ ते माथेरान  आणि २ माथेरान ते नेरळ अशा चालणार आहेत. ह्या सर्व गाड्या ६ कोच सहित धावणार आहेत. 
माथेरान ते अमन लॉज (शटल सेवा)
ह्या मार्गावर टॉय ट्रेन स्वरूपात ६ फेऱ्या चालविण्यात येणार आहेत. ह्या सर्व गाड्या ६ कोच सहित धावणार आहेत. 
Facebook Comments Box

राज ठाकरेंचे शिंदे सरकारला पत्र, म्हणाले “राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा”

मुंबई : ऐन दिवाळीच्या तोंडावर परतीच्या पावसाच्या तडाख्याने महाराष्ट्रातील शेतीचं अपरिमित नुकसान झालं आहे. त्यामुळे राज्य सरकारने युद्धपातळीवर आढावा घेऊन उपाययोजना कराव्यात आणि ‘ओला दुष्काळ’ जाहीर करून माझ्या शेतकरी बांधवांना दिलासा द्यावा. अशा आशयाचे पत्र आज राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले आहे. 
काय लिहिले आहे या पत्रात?
“ऐन दिवाळीच्या तोंडावर परतीच्या पावसाच्या तडाख्याने महाराष्ट्रातील शेतीचं अपरिमित नुकसान झालं आहे. त्यामुळे राज्य सरकारने युद्धपातळीवर आढावा घेऊन उपाययोजना कराव्यात आणि ‘ओला दुष्काळ’ जाहीर करून माझ्या शेतकरी बांधवांना दिलासा द्यावा”, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली आहे.
“या वर्षी मान्सूनचा मुक्काम लांबला आणि त्यात परतीच्या पावसाने तर कहर केला. या परतीच्या पावसाने खरीप पिकांचे अपरिमित नुकसान केलं आहे. एकूणच हवामान पाहता रब्बी हंगामाबाबतीतही शेतकरी बांधव चिंतातुर आहे. ऐन पीक काढणीच्या वेळेस हा पाऊस आल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत पीक वाया गेले आहे. यावर सरकारने नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत, हे चांगलच आहे, पण तेवढं पुरेसं नाही. सध्याची परिस्थिती पाहिली तर लक्षात येईल की शेतकऱ्यांचं राज्यभर झालेलं नुकसान मोठं आहे. त्यामुळे राज्य सरकारने ‘ओला दुष्काळ’ जाहीर करावा”, असे राज ठाकरे यांनी पत्रात लिहिले आहे.
“सरकारने पंचनाप्याचे आदेश दिले आहेत, पण पूर्वानुभवानुसार प्रशासकीय पातळीवर ते पंचनामे नीट होत नाहीत. गरजू शेतकरी नेहमीच उपेक्षित राहतो. त्यामुळे सरकारने हे पंचनामे नीट होतील, हे पहावे आणि परिस्थितीचा युद्धपातळीवर आढावा घेऊन राज्यात ‘ओला दुष्काळ’ जाहीर करावा. तसंच कोरडवाहू आणि बागायती शेतीसाठी शेतकऱ्यांना जी प्रतिहेक्टरी नुकसान भरपाई दिली जाते, ती पुरेशी नाही तिचादेखील पुनर्विचार करावा”, अशी मागणीही त्यांनी या पत्राद्वारे केली आहे.
“दिवाळी हा आनंदाचा सण आहे. खरंतर लॉकडाऊनच्या संकटानंतर शेतकरीही दिवाळी धूमधडाक्यात साजरी करण्याच्या मनस्थितीत असणार, अशा वेळी त्यांना दिलासा देऊन त्यांचीही दिवाळी अतिशय आनंदात साजरी होईल याकडे राज्य सरकारने लक्ष द्यावं”, असेही ते म्हणाले.
Facebook Comments Box

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात मोठी नोकरभरती.

सिंधुदुर्ग: राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी अधिनिस्त वैद्यकीय अधिकारी आणि इतर असे एकूण १५ पदांच्या  ८५ जागा  कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी अर्ज मागवण्यात आलेले आहेत. 
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २७ ओक्टोम्बर २०२२ आहे.  इच्छुक उमेदवारांनी दिनांक १४/१०/२०२२ ते २७/१०/२०२२ या कालावधीत सकाळी १० ते संध्याकाळी ५ ह्या वेळेत ह्या बातमीसोबत जोडलेल्या जाहिरातीतील अर्ज भरून सीआरयु कक्ष(टपाल शाखा) मुख्य प्रशाकीय इमारत, तळमजला, जि. प. सिंधुदुर्ग, सिंधुदुर्गनगरी, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग मध्ये मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. सिंधुदुर्ग यांचे नावे राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM , SINDHUDURG ), व पदाच्या नावाचे स्पष्ट उल्लेख करून सादर करावेत. 
ह्या पदांसाठी पात्रता,अटी,वेतनश्रेणी आणि इतर माहितीसाठी खालील जाहिरात डाउनलोड करावी.
   Click here to download>>>>>>>>>>    जाहिरात आणि अर्ज  






मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.
Facebook Comments Box

काँग्रेस अध्यक्ष पदासाठीच्या निवडणुकीत मल्लिकार्जून खरगे यांचा विजय

काँग्रेस अध्यक्ष निवडणूक :काँग्रेस अध्यक्ष पदासाठीच्या निवडणुकीत मल्लिकार्जून खरगे यांचा अखेर विजय झाला आहे. 17 ऑक्टोबर रोजी झालेल्या अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीत देशभरातील काँग्रेस नेते आणि पदाधिकाऱ्यांनी मतदान केलं.9,385 सदस्यांनी यासाठी मतदान केलं. यापैकी 416 मतं बाद झाली. मल्लिकार्जून खरगे यांना 7897 एवढी मतं मिळाली तर शशी थरूर यांना 1072 मतं मिळाली.

तब्बल 24 वर्षानंतर काँग्रेसला गांधी घराण्याबाहेरील अध्यक्ष मिळाला आहे. यापूर्वी सीताराम  सीताराम केसरी हे गांधी घराण्याव्यतिरिक्तचे अध्यक्ष होते.शशी थरूर यांनी एक ट्विट करत मल्लिकार्जून खरगे यांचं अभिनंदन केलं आहे.

नाव सन
1 पट्टाभी सीतारामय्या 1948-1949
2 पुरुषोत्तम दास टंडन 1950
3 इंदिरा गांधी 1959, 1966-67, 1978-84
4 नीलम संजीव रेड्डी 1960-1963
5 के कामराज 1964-1967
6 एस सिद्धवनल्ली निजलिंगप्पा 1968-1969
7 जगजीवन राम 1970-1971
8 शंकरदयाल शर्मा 1972-1974
9 देवकांत बरुआ 1975-1977
10 पी.व्ही. नरसिंह राव 1992-96
11 सीताराम केसरी 1996-1998
12 सोनिया गांधी 1998-2017 आणि 2019
13 राहुल गांधी 2017-2019

स्वातंत्र्यानंतर आतापर्यंतच्या काँग्रेसच्या अध्यक्षांची यादी

Facebook Comments Box

राणेंविरुद्ध टीका भास्कर जाधवांच्या अंगलट अंगलट, ‘ह्या’ कलमांतर्गत अजामीनपात्र गुन्हा दाखल.

सिंधुदुर्ग :केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी आमदार भास्कर जाधव  यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भास्कर जाधवांवर गुन्हा दाखल व्हावा, अशी तक्रार भाजप कार्यकर्त्यांनी केली होती. कुडाळमधील सभेत राणेंवर अत्यंत खालच्या दर्जाची शिवराळ भाषा वापरल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे.  

गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांच्या विरोधात भाजप कार्यकर्त्यांनी कुडाळ पोलीस स्थानकात तक्रार दाखल केल्यानंतर रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. 153, 505 (1) (क), 500, 504 कलमांतर्गत अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भास्कर जाधव यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे होमग्राउंड समजल्या जाणाऱ्या सिंधुदूर्ग जिल्ह्यात राणेंवर घणाघाती टीका केली.

काय म्हणाले होते भास्कर जाधव? 

नारायण राणे हे देशाचे नेते असल्याचं सांगतात पण गल्लीत त्यांना कुत्रंदेखील विचारत नाही. भास्कर जाधव यांनी मध्यम, लघु, सुक्ष्म खातं म्हणत नारायण राणे, नितेश राणे, निलेश राणे या तिघांवर टीका केली. शिवसेनेने काही केले नाही, असं नारायण राणे म्हणतात. मग तू काय म्हशी भदरात होता? अशा शब्दात जाधव यांनी टीकास्त्र सोडलं. नारायण राणे केंद्रात मंत्री आहेत. मात्र, त्यांच्यामुळे देशात कोकणाची लाज जात असल्याचं सांगितलं. राणेंना तामिळनाडूचा प्रश्न विचारला की, केरळचे उत्तर देतात. कोकणातून देशाला विद्वान, विचारवंत नेते मिळाले. मात्र, राणेंनी देशात कोकणाची लाज काढली असल्याची घणाघाती टीका केली. यावेळी भास्कर जाधव यांनी राणेंची मिमिक्री करत टीकास्त्र सोडलं होते.

 







मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.
Facebook Comments Box

दिवाळीसाठी कोकण रेल्वेमार्गावरील ‘ह्या’ दोन गाड्या अतिरिक्त कोच सहित धावणार.

रत्नागिरी : खास दिवाळीसाठी या आधी काही विशेष गाड्या  कोकण रेल्वेमार्गावर  सोडल्या आहेत. आता प्रवासी संख्या वाढल्याने कोकण रेल्वे मार्गे धावणार्‍या दोन एक्स्प्रेस गाड्यांच्या डब्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे. 

कोकण रेल्वेमार्गे धावणार्‍या हापा -मडगाव (22908/22907) तसेच पोरबंदर कोचुवेली (20910/20909) या दोन नियमित एक्स्प्रेस गाड्यांना स्लीपर श्रेणीचा प्रत्येकी एक डबा वाढवण्यात आला आहे. यातील हापा-मडगाव गाडीला दि. 19 ऑक्टोबरच्या फेरीपासून तर पोरबंदर – कोचुवेली या गाडीच्या दि. 20 ऑक्टोबर 2022 पासून अतिरिक्त डबा जोडण्यात येणार असल्याची माहिती कोकण रेल्वेकडून देण्यात आली आहे.

 

दसर्‍या दिवाळीपासून कोकण रेल्वे मार्गावर नियमित गाड्यांव्यतिरिक्त फेस्टीवल स्पेशल गाड्यांच्या फेर्‍या जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये नागपूर, सुरत, उधना तसेच मुंबईतून देखील कोकण रेल्वे मार्गावर दिवाळीसाठी रेल्वेच्या अतिरिक्त गाड्या करण्यात आल्या आहे. 







मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

Facebook Comments Box

जवळची भाडे नाकारून रिक्षा-टॅक्सी चालकांची मुजोरी- वाहतूक पोलिसांचा आदेश – पण कायद्यात त्रुटी

Mumbai News :मुंबई वाहतूक पोलीस सहाआयुक्तांनी आज एक कार्यालयीन आदेश जाहीर केला आहे. जे रिक्षा/टॅक्सी चालक जवळची भाडी नाकारत असल्याच्या तक्रारी येत असल्याने त्यावर कारवाईबाबत हा आदेश जाहीर केला आहे. 
तसेच सर्व प्रभारी पोलीस निरीक्षक यांनी आपल्या वाहतूक विभागातील रिक्षा व टॅक्सी चालक यांच्या संघटनांशी संपर्क साधून बैठकीचे आयोजन करावे. तसेच रिक्षा व टॅक्सी चालक यांनी प्रवाशांशी सौजन्याने वागण्याबाबत व भाडे न नाकारण्याबाबत समज देऊन प्रबोधन करण्यात यावे असे ह्या आदेशात म्हंटले आहे.
तसेच अशाप्रकारे भाडे नाकारण्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यास संबधीत रिक्षा व टॅक्सिचालक यांच्यावर तात्काळ मोटार वाहन कायदा कलम १७८(३) अन्वये कारवाई करण्यात यावी असा आदेश पण दिला आहे. 
मोटार वाहन कायदा कलम १७८(३) आणि त्यातील त्रुटी 
आमच्या प्रतिनिधींनी ह्या कायद्यातील कलम १७८(३) चेक केल्यावर त्यातील काही त्रुटी लक्षात आल्या आहे. ह्या कलमाप्रमाणे जर रिक्षाचालक भाडे नाकारत असेल तर त्यावर दंडात्मक कारवाई म्हणून फक्त जास्तीत जास्त ५० रुपये दंड वसूल केला जाऊ शकतो. आणि टॅक्सीचालक भाडे नाकारत असेल तर त्याच्याकडून जास्तीत जास्त  २०० रुपये दंड वसूल केला जाऊ शकतो. हा दंड अशाप्रकारांना आळा घालण्यासाठी खूप कमी आहेत. ह्या कलम मध्ये काही सुधारणा अपेक्षित आहेत. 
Facebook Comments Box

ग्रामपंचायत निवडणुक : दीपक केसरकर यांना धक्का..

सिंधुदुर्ग: जिल्ह्यात एकूण चार  ग्रामपंचायतीचे निकाल आले आहेत. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या मतदारसंघात भाजपने जोर लावल्याचे दिसून आले आहे. दोडामार्ग तालुक्यातील. झरे दोन ग्रामपंचायतच्या सरपंचपदी भाजपा पक्षाच्या श्रुती विठ्ठल देसाई तर पाटये पूर्नवसन येथे भाजपचे प्रविण पांडुरंग गवस सरपंचपदी विजयी झाले आहेत. भाजपने दोन्ही ग्रामपंचायतवर झेंडा फडकवल्यानंतर जल्लोष केला.

 देवगड तालुक्यातील माळेगाव ग्रामपंचायत वर भाजप झेंडा फडकवला आहे. पडवणे ग्रामपंचायत वर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने झेंडा फडकविला आहे.

बाळासाहेबांच्या शिवसेनेला जिल्ह्यात आमदार मंत्री असताना एकही ग्रामपंचायत राखता आलेली नाही.

राज्यातील 18 जिल्ह्यांतील 82 तालुक्यांमधील 1 हजार 166 ग्रामपंचायती आणि थेट सरपंचपदासाठी 74 टक्के मतदान झालं ग्रामपंचायती आणि थेट सरपंचपदासाठीच्या निवडणुकांचा आज निकाल आहे

 







मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.
Facebook Comments Box

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search