कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा निष्फळ, कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडी २६ जानेवारीला रेल रोको आंदोलन करण्यावर ठाम.

   Follow us on        

सावंतवाडी: कोकण रेल्वे मार्गावरील सावंतवाडी स्थानकावर परिपूर्ण रेल्वे टर्मिनस व्हावे, या ठिकाणी नवीन टर्मिनस प्लॅटफॉर्म आणि बिल्डिंग व्हावी, या स्थानकाचा समावेश केंद्राच्या अमृत भारत स्थानक योजनेत करावा तसेच सावंतवाडी स्थानकावरून कोरोना काळात काढून घेण्यात आलेला १२४३१/३२ राजधानी एक्सप्रेस व १२२०१/०२ गरीब रथ एक्स्प्रेस चा थांबा पूर्ववत करावा इत्यादी मागण्यांसाठी येत्या २६ जानेवारीला कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडी ही अराजकीय संघटना रेल रोको आंदोलन करणार आहे. त्याबाबत ची नोटीस संबंधित प्रशासनाला दिलेली होती त्याचाच भाग म्हणून रेल्वे प्रशासनाकडून क्षेत्रीय वाहतूक प्रबंधक श्री शैलेश आंबर्डेकर यांनी आज कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडीच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली आणि रेल रोको करू नये असा आशयाचे पत्र संघटनेला सुपूर्द केले.परंतु कोकण रेल्वेने दिलेल्या पत्रात संघटनेच्या मागण्यांसंदर्भात एकही सकारात्मक बाब नसल्याने संघटनेने आपण आपल्या भूमिकेवर ठाम आहोत अशा आशयाचे पत्र क्षेत्रीय वाहतूक प्रबंधक श्री आंबर्डेकर यांना सुपूर्द केले. तसेच आमच्या मागण्यांसंदर्भात बेलापूर येथे व्यवस्थापकीय संचालक श्री संतोष कुमार झा यांचा अध्यक्षतेखाली २३ जानेवारीच्या अगोदर बैठक आयोजित करावी अशी विनंती संघटनेने केली.

यावेळी संघटनेचे अध्यक्ष ऍड श्री संदीप निंबाळकर, सचिव श्री मिहिर मठकर, सल्लागार श्री सुभाष शिरसाट आदी उपस्थित होते.

Facebook Comments Box

पालकमंत्री पद एवढे महत्वाचे कां?

   Follow us on        

विश्लेषण: महाराष्ट्र राज्यातील पालकमंत्र्यांच्या नावाची नुकतीच घोषणा झाली. यादी निघाल्या नंतर काही मंत्र्यांकडून नाराजीचा सूर निघायला सुरुवात झाला. यावरून महायुतीतील सुद्धा घमासान सुरू झाले. हा वाद एवढा टोकाला गेला की दोन जिल्ह्यातील पालकमंत्री पदाचा निर्णय विद्यमान सरकारला स्थगित करावा लागला. पालकमंत्री पदासाठी एवढी मारामारी कशाला हा प्रश्न साहजिकच पडतो.

महाराष्ट्रातील राजकारणात पालकमंत्री पद अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे कारण या पदाच्या माध्यमातून राज्य सरकार स्थानिक प्रशासनावर थेट नियंत्रण ठेवते. पालकमंत्री हा जिल्ह्याचा मुख्य शासकीय प्रतिनिधी असतो आणि त्याला त्या जिल्ह्याच्या विकासाबाबत जबाबदारी असते.

प्रशासनिक नियंत्रण:
पालकमंत्री जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यकाळासाठी एक प्रमुख प्रशासनिक व्यक्ती म्हणून कार्य करतो.तो जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा अधिकारी,आणि इतर सरकारी विभागांच्या कामकाजावर देखरेख ठेवतो.

विकासकामांचे नियोजन व अंमलबजावणी:
जिल्ह्यातील विविध विकासकामे आणि योजनांच्या अंमलबजावणीला चालना देणे आणि त्यावर नियंत्रण ठेवणे. यात ग्रामीण विकास, आरोग्य सेवा, शिक्षण इत्यादी क्षेत्रांचा समावेश होतो.

राजकीय प्रभाव:
स्थानिक राजकारणात मोठा प्रभाव असलेला पालकमंत्री त्या जिल्ह्याच्या राजकीय समीकरणांवर नियंत्रण ठेवतो, त्यामुळे त्याच्या समर्थनाच्या आधारावर शासकीय कामे व इतर निर्णय होतात.

कायदा व सुव्यवस्था:
पालकमंत्री हा जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारीही घेतो. त्याच्या अधीन असलेल्या जिल्ह्यातील भागात शांती आणि सुव्यवस्था राखण्यासाठी त्याला विशेष अधिकार मिळतात.

जिल्ह्याच्या सर्व विकासात्मक आणि प्रशासकीय निर्णयांसाठी महत्त्वपूर्ण भूमिका:

कोणत्याही जिल्ह्यातील सरकारी योजनांचे निर्णय घेण्यास आणि त्या क्षेत्रातील आवश्यक निर्णय घेण्यास पालकमंत्री प्रमुख भूमिका निभावतो.

Facebook Comments Box

रायगड रत्नागिरी लोकसभा क्षेत्रातील रेल्वे समस्या सोडवण्यासाठी मुंबई येथे उच्चस्तरीय बैठक पार

   Follow us on        

मुंबई: रायगड रत्नागिरी लोकसभा क्षेत्रातील रेल्वे समस्या सोडवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यासाठी लोकसभा खासदार सुनील तटकरे अध्यक्षतेखाली सोमवार दि. २० जानेवारी, २०२५ सकाळी १०:३० ते १२:३९ या वेळेत सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली. या बैठकीला आमदार व कॅबिनेट मंत्री आदिती तटकरे व आमदार अनिकेत तटकरे उपस्थित होते. यावेळी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्मवीर मीना, कोकण रेल्वेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा व इतर अधिकारी उपस्थित होते. सदर बैठकीत आपापल्या समस्या मांडण्यासाठी संबंधित ठिकाणच्या प्रवासी संघटना व प्रतिनिधींना बोलावण्यात आले होते. आपना सहकारी बँकेचे संचालक तथा रत्नागिरी जिल्हा नियोजन चे सदस्य श्री. अजयशेठ बिरवटकर यांनी जल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष नितिन सखाराम जाधव व अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीचे सचिव अक्षय मधुकर महापदी यांना निमंत्रित केले होते.

याप्रसंगी कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण, रत्नागिरी दिवा गाडी दादरपर्यंत पूर्ववत करणे, मुंबई चिपळूण नवीन गाडी सुरू करणे, पुणे एर्नाकुलम एक्सप्रेस कल्याणमार्गे वळवणे, जबलपूर कोईंबतूर एक्सप्रेसला कल्याण येथे थांबा देणे, खेड येथे विविध गाड्यांना थांबा देणे, गोव्यातून मुंबईकडे येणाऱ्या गाड्यांमध्ये कोकण रेल्वेने रत्नागिरीच्या उत्तरेकडील स्थानकांना दिलेला अपुरा कोटा वाढवणे किंवा सर्व स्थानकांना समान कोटा देणे आदी महत्त्वाचे विषय मांडण्यात आले.

त्याचबरोबर पेण, नागोठणे, रोहा, माणगाव आणि वीर येथीलही समस्यांवर चर्चा करण्यात आली. रेल्वे अधिकाऱ्यांनी ज्या ज्या गोष्टी शक्य असतील त्या पुढे रेल्वे बोर्ड व मंत्रालयाकडे मांडण्याचे आश्वस्त केले. तसेच खासदार  सुनील तटकरे यांनी रेल्वे मंत्रालयात पाठपुरावा करण्याची ग्वाही दिली.

ही बैठक आयोजित करून सर्वांना आपले म्हणणे मांडण्याची संधी दिल्याबद्दल खासदार श्री. सुनिल तटकरे व बैठकीला आमंत्रित केल्याबद्दल श्री. अजयशेठ बिरवटकर यांचे जल फाऊंडेशन कोकण विभाग रजिस्टर या संस्थेच्या वतीने आभार.

Facebook Comments Box

Mumbai Local Trains : मुंबईला लवकरच 238 एसी लोकल मिळणार

   Follow us on        

Mumbai Local : मुंबईकरांसाठी एक खुशखबर आहे. एसी लोकल खरेदी करण्याचा प्रस्ताव पुन्हा रुळावर आला असल्याची माहिती केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट अंतर्गत मुंबईला तब्बल २३८ नव्या एसी लोकल ट्रेन मिळणार आहेत.शनिवारी अश्विनी वैष्णव यांनी अनेक प्रकल्पांवर भाष्य केले. तेव्हा त्यांनी एसी लोकल खरेदीबाबत माहिती दिली.

मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्टच्या फेज 3 आणि 3 A अंतर्गत, मुंबईत लवकरच २३८ एसी लोकल ट्रेन धावणार आहेत. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या माहितीनुसार, जून २०२३ मध्ये मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (MRVC) एसी लोकल ट्रेनसाठी जागतिक निविदा काढल्या होत्या. खरेदी रखडल्याने हा उपक्रम पुढे ढकलण्यात आला. आता १८ महिन्यांनंतर एसी लोकल खरेदीवर भर देण्यात येत आहे.

एमयूटीपी म्हणजेच मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्टच्या मूळ योजनेनुसार, फेज 3 मध्ये ४७ एसी लोकल गाड्या खरेदी केल्या जाणार आहेत. यासाठी अंदाजे ३,४९१ कोटी रुपये इतका खर्च येऊ शकतो. तर फेज 3 A मध्ये १९१ एसी लोकल गाड्या खरेदी केल्या जाणार आहेत. यासाठी अंदाजे १५,८०२ कोटी रुपये इतका खर्च येऊ शकतो.एसी लोकल खरेदीबाबतच्या निर्णयामुळे मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे. यामुळे प्रवाशांना उन्हाळ्यात एसी लोकलने प्रवास करता येईल. शिवाय याचा परिणाम स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर देखील होऊ शकतो असे म्हटले जात आहे. तरी या २३८ एसी ट्रेन मुंबईत कधी धावणार याकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे.

 

Facebook Comments Box

मोठी बातमी: रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला स्थगिती

   Follow us on        

मुंबई:रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्त केलेल्या आदिती तटकरेंच्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली आहे. फलोत्पादन व रोजगार हमीमंत्री भरत गोगावले यांच्या विरोधानंतर ही स्थगिती देण्यात आली आहे. मंत्रीपदावर वर्णी लागल्यानंतर भरत गोगावले यांनी रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी मोर्चेबांधणी केली होती. जिल्ह्यातील शिवसेना आणि भाजप आमदारांनी रायगडचे पालकमंत्री म्हणून फलोत्पादन व रोजगार हमीमंत्री भरत गोगावले यांची निवड करण्याची मागणी केली होती. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या आदिती तटकरे यांच्याकडे रायगडचे पालकमंत्रीपद आले आहे. रायगड जिल्ह्यात शिवसेनेचे तीन, भाजपचे तीन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा एकच आमदार आहे. तरीही तटकरे यांना पद मिळाले हे विशेष मानले जाते. हा निर्णय मनाला पटण्यासारखा नाही, अशी प्रतिक्रिया गोगावले यांनी व्यक्त केली. त्यांच्या समर्थकांनी महामार्गावरील वाहतूक रोखून या नियुक्तीवर जाहीर नाराजी व्यक्त केली होती. या पाश्र्वभूमीवर ही स्थगिती देण्यात आली असल्याचे समजते.

गिरीश महाजनांच्या नियुक्तीलाही स्थगिती
गोगावलेंप्रमाणेच शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांना पालकमंत्रीपद मिळालेले नाही. दादा भुसे हे पुन्हा एकदा नाशिकचे पालकमंत्री होण्यासाठी प्रयत्नशील होते, परंतु हे पद जळगाव जिल्ह्यातील मंत्री गिरीश महाजन यांना देण्यात आले होते. या दोन्ही जिल्ह्यांतील महायुतीतील वाद चव्हाट्यावर आल्यानंतर दोन्ही जिल्ह्यांतील पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आली आहे

 

Facebook Comments Box

२० जानेवारी पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-षष्ठी – 10:01:42 पर्यंत
  • नक्षत्र-हस्त – 20:31:00 पर्यंत
  • करण-वणिज – 10:01:42 पर्यंत, विष्टि – 23:21:36 पर्यंत
  • पक्ष- कृष्ण
  • योग-सुकर्मा – 26:51:31 पर्यंत
  • वार- सोमवार
  • सूर्योदय- 07:17
  • सूर्यास्त- 18:23
  • चन्द्र-रशि-कन्या
  • चंद्रोदय- 23:57:59
  • चंद्रास्त- 11:15:00
  • ऋतु- शिशिर

महत्त्वाच्या घटना:
  • १७८८: इंग्लडमधून हद्दपार केलेले गुन्हेगार वसाहतीसाठी ऑस्ट्रेलियातील न्यू साऊथ वेल्सच्या किनार्‍यावर उतरले. इथे वसाहत करण्यासाठी तयार झालेल्या गुन्हेगारांची शिक्षा माफ करण्यात आली होती.
  • १८४१: ब्रिटिशांनी हाँगकाँग बेटाचा ताबा घेतला.
  • १९३७: फ्रॅंकलिन डिलानो रूझवेल्ट यांनी अमेरिकेचे ३२ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून अमेरिकेच्या अध्यक्षपदाची शपथ घेतली. यानंतर २० जानेवारीलाच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा शपथविधी करण्याची प्रथा पडली.
  • १९४४: दुसरे महायुद्ध – रॉयल एअर फोर्सने बर्लिनवर २३०० टन बॉम्बवर्षाव केला.
  • १९४८: महात्मा गांधींची हत्या करण्याचा चौथा प्रयत्‍न झाला. याआधी १९३४, १९४४ व १९४४ मध्ये त्यांची हत्या करण्याचे प्रयत्‍न झाले होते.
  • १९५७: आशियातील पहिली अणुभट्टी पंतप्रधान पंडित जवाहरलालनेहरू यांच्या हस्ते देशाला अर्पण करुन अॅटॉमिक एनर्जी एस्टॅब्लिशमेंट (सध्याचे नाव भाभा अणुसंशोधन केंद्र) या संस्थेची स्थापना करण्यात आली.
  • १९६३: चीन व नेपाळ या देशांत सरहद्दविषयक करार झाला.
  • १९६९: क्रॅब नेब्युलात प्रथमत: पल्सार दिसून आला.
  • १९९८: संगीत क्षेत्रातील नोबेल समजला जाणारा ’पोलार संगीत पुरस्कार’ विख्यात सतारवादक पं. रविशंकर यांना जाहीर
  • १९९९: गिरीश कर्नाड यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर
  • २००९: अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा शपथविधी झाला.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १७७५: आंद्रे अ‍ॅम्पिअर – फ्रेन्च भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू: १० जून १८३६)
  • १८६१: मराठीमधील पहिल्या स्त्री कथा-कादंबतीकार, निबंधकार आणि सुधारक काशीबाई गोविंदराव कानिटकर यांचा जन्म.
  • १८७१: सर रतनजी जमसेटजी टाटा – टाटा घराण्यातील उद्योगपती व दानशूर व्यक्ति (मृत्यू: ५ सप्टेंबर १९१८)
  • १८८९: महान देशभक्त आणि तपस्वी मसुरकर महाराज यांचा जन्म.
  • १८९८: कृष्णाजी गणेश फुलंब्रीकर तथा ’मास्टर कृष्णराव’ – प्रतिभावान गायक, अभिनेते व संगीतकार, त्यांच्या गायनात ग्वाल्हेर, आग्रा व जयपूर घराण्यांचा संगम दिसून येई. ’वंदे मातरम’ला त्यांनी दिलेली चाल लोकप्रिय ठरली. (मृत्यू: २० आक्टोबर १९७४)
  • १९३०: चंद्रावर उतरणारे दुसरे अमेरिकन अंतराळवीर बझ आल्ड्रिन यांचा जन्म.
  • १९६०: आपा शेर्पा – १९ वेळा माऊंट एव्हरेस्टवर यशस्वी चढाई करणारे नेपाळी गिर्यारोहक
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १८९१: डेविड कालाकौआ – हवाईचा राजा (जन्म: १६ नोव्हेंबर १८३६)
  • १९३६: जॉर्ज (पाचवा) – इंग्लंडचा राजा (जन्म: ३ जून १८६५)
  • १९५१: अमृतलाल विठ्ठलदास ठक्कर ऊर्फ ’ठक्कर बाप्पा’ – समाजसेवक (जन्म: २९ नोव्हेंबर १८६९)
  • १९८०: कस्तुरभाई लालभाई – दानशूर व राष्ट्रवादी विचारसरणीचे उद्योगपती, पद्मभूषण (१९६९), रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे संचालक (१९३७ – १९४९). अरविंद मिल्स, अशोक मिल्स, अतुल असे अनेक गिरण्या व कारखाने त्यांनी चालू केले. आपल्या गिरण्य़ांत त्यांनी कामगार कल्याणासाठी सहकार संस्था काढल्या. (जन्म: १९ डिसेंबर १८९४)
  • १९८८: खान अब्दुल गफार खान तथा ’सरहद गांधी’ (जन्म: ३ जून १८९०)
  • १९९३: ऑड्रे हेपबर्न – ब्रिटिश अभिनेत्री, संयुक्त राष्ट्रांच्या बालक निधीच्या (UNICEF) सदिच्छा प्रतिनिधी, ’रोमन हॉलिडे’ या चित्रपटातील अभिनयाबद्दल त्यांना ऑस्कर पुरस्कार मिळाला. (जन्म: ४ मे १९२९)
  • २००२: रामेश्वरनाथ काओ – रिसर्च अँड अ‍ॅनॅलेसिस विंग (RAW) या भारतीय गुप्तचर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष. काओ यांना भारतीय गुप्तचर यंत्रणेचे अध्वर्यू मानण्यात येते. (जन्म: १० मे १९१८)

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.
Facebook Comments Box

७६ व्या प्रजासत्ताक दिनी सकाळी ९.१५ वाजता होणार मुख्य शासकीय समारंभ; जिल्हानिहाय ध्वजारोहण करणाऱ्या मंत्र्यांची यादी जाहीर

मुंबई, दि. १९: भारताच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त २६ जानेवारी २०२५ रोजी ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ राज्यभर एकाच वेळी सकाळी ९.१५ वाजता आयोजित करण्यात येणार आहे. या मुख्य शासकीय समारंभात निमंत्रितांना सहभागी होता यावे यासाठी या दिवशी सकाळी ८.३० ते १० या दरम्यान ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय किंवा अर्ध शासकीय समारंभ आयोजित करण्यात येऊ नये, असे राजशिष्टाचार विभागामार्फत कळविण्यात आले आहे.

मुंबई येथील मुख्य शासकीय समारंभात राज्यपाल यांच्या हस्ते व मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत शिवाजी पार्क दादर मुंबई येथे ध्वजारोहण व समारंभपूर्वक संचलन कार्यक्रम होईल. विभागीय आणि जिल्हा स्तरावर पुढे दर्शविल्याप्रमाणे मंत्री अथवा राज्यमंत्री ध्वजारोहण करतील.

  • ठाणे – उपमुख्यमंत्री एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे,
  • पुणे – उपमुख्यमंत्री अजित आशाताई अनंतराव पवार,
  •  नागपूर – मंत्री सर्वश्री चंद्रशेखर प्रभावती कृष्णराव बावनकुळे,
  • अहिल्यानगर – राधाकृष्ण सिंधुताई एकनाथराव विखे पाटील,
  • वाशिम – हसन सकीना मियालाल मुश्रीफ,
  • सांगली – चंद्रकांत (दादा) सरस्वती बच्चू पाटील,
  • नाशिक- गिरीश गीता दत्तात्रय महाजन,
  • पालघर- गणेश सुभद्रा रामचंद्र नाईक,
  • जळगाव- गुलाबराव रेवाबाई रघुनाथ पाटील,
  • यवतमाळ- संजय प्रमिला दुलीचंद राठोड,
  • मुंबई शहर- मंगलप्रभात प्रेमकवर गुमनमल लोढा,
  • मुंबई उपनगर- ॲड.आशिष मीनल बाबाजी शेलार,
  • रत्नागिरी- उदय स्वरूपा रवींद्र सामंत,
  • धुळे- जयकुमार नयनकुवर जितेंद्रसिंह रावल,
  • जालना- श्रीमती पंकजा प्रज्ञा गोपीनाथ मुंडे,
  • नांदेड- अतुल लीलावती मोरेश्वर सावे,
  • चंद्रपूर- अशोक जनाबाई रामाजी उईके,
  • सातारा- शंभुराज विजया देवी शिवाजीराव देसाई,
  • बीड- दत्तात्रय गिरीजाबाई विठोबा भरणे,
  • रायगड- आदिती वरदा सुनील तटकरे,
  • लातूर- शिवेंद्रसिंह अरुणाराजे अभयसिंहराजे भोसले,
  • नंदुरबार- ॲङ माणिकराव सरस्वती शिवाजी कोकाटे,
  • सोलापूर- जयकुमार कमल भगवानराव गोरे,
  • हिंगोली- नरहरी सावित्रीबाई सिताराम झिरवाळ,
  • भंडारा- संजय सुशीला वामन सावकारे,
  • छत्रपती संभाजीनगर संजय शकुंतला पांडुरंग शिरसाट,
  • धाराशिव- प्रताप इंदिराबाई बाबुराव सरनाईक,
  • बुलढाणा- मकरंद सुमन लक्ष्मणराव जाधव (पाटील),
  • सिंधुदुर्ग- नितेश नीलम नारायण राणे,
  • अकोला- आकाश सुनिता पांडुरंग फुंडकर,
  • गोंदिया- बाबासाहेब शांताबाई मोहनराव पाटील,
  • कोल्हापूर- प्रकाश सुशीला आनंदराव आबिटकर,
  • गडचिरोली- ॲड. आशिष उमादेवी नंदकिशोर जयस्वाल,
  • वर्धा- पंकज कांचन राजेश भोयर,
  • परभणी- श्रीमती मेघना दीपक साकोरे – बोर्डीकर
  • अमरावती- इंद्रनील अनिता मनोहर नाईक.

राष्ट्रध्वजारोहण करणारे मंत्री अथवा राज्यमंत्री काही अपरिहार्य कारणामुळे कार्यक्रम स्थळी उपस्थित राहू न शकल्यास विभागीय मुख्यालयी विभागीय आयुक्तांनी आणि जिल्हा मुख्यालयी जिल्हाधिकारी यांनी तसेच इतर विभागीय व जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी अनुक्रमे संबंधित विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी ध्वजारोहण करतील. संबंधित प्रांत अधिकारी व तहसीलदार हे अनुक्रमे जिल्हा उपविभागीय व तालुका मुख्यालयी ध्वजारोहण समारंभाच्या ठिकाणी शासकीय कार्यक्रमांचे अध्यक्षस्थान स्वीकारतील.

राज्यात वरील दिवशी सर्व शासकीय व सार्वजनिक इमारतींवर, किल्ल्यांवर तसेच जिल्ह्यांमध्ये ऐतिहासिक महत्त्वाच्या ठिकाणी राष्ट्रध्वज उभारण्यात यावेत, असेही कळविण्यात आले आहे.

राष्ट्रध्वज लावण्याच्या योग्य पद्धतीबाबत शासन परिपत्रक क्रमांक एफएलजी-१०९१/३०, दिनांक २ मार्च १९९१ तसेच क्रमांक एफएलजी १०९१(२)/३०, दिनांक ५ डिसेंबर १०९१ तसेच क्रमांक एफएलजी १०९८/ ध्वजसंहिता/३०, दिनांक ११ मार्च १०९८ अन्वये दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याची दक्षता घेण्यात यावी. याप्रसंगी सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी उपस्थित रहावे. तसेच उत्सव अथवा औपचारिक प्रसंगी परिधान करावयाचा राष्ट्रीय पोशाख प्रजासत्ताक दिन समारंभप्रसंगी उपस्थित राहणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांनी व व्यक्तींनी परिधान करावा. स्थानिक लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्यसैनिक, शहीद जवानांच्या पत्नींना व आई- वडील यांना समारंभास निमंत्रित करावे. अधिकाधिक नागरिकांना हा सोहळा घरबसल्या पाहता यावा यासाठी वेबसाईटद्वारे थेट प्रक्षेपण करण्याचा प्रयत्न करावा, अशा सूचना या परिपत्रकाद्वारे देण्यात आल्या आहेत.

Facebook Comments Box

धक्कादायक! कोकण रेल्वेतून होत आहे ‘गोवा दारू’ ची तस्करी

   Follow us on        
मडगावः इतर राज्यातील तुलनेत गोवा राज्यात मद्य स्वस्त आहे. त्यामुळे गोव्यातून आजूबाजूच्या राज्यात तस्करी करण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात समोर येतात. मात्र आता तर गोव्यातून मद्याची तस्करी करताना रेल्वेचा वापर करत असल्याची धक्कदायक माहिती समोर आली आहे. गोव्यातून मोठ्या प्रमाणात शेजारील राज्यात मद्याची तस्करी केली जात असतानाच आता गुजरातमध्ये कोकण रेल्वेमार्गे दारू नेली जात असल्याचे उघड झाले आहे. रेल्वे पोलीस दारू पकडतात. मात्र त्याचे प्रमाण नगण्य असते. मद्यमाफिया व पोलीस यंत्रणा यांचे साटेलोटे असल्याने हा धंदा बिनधास्त सुरू आहे.
अन्य राज्याच्या तुलनेत गोव्यात मद्य स्वस्त आहे. गुजरातमध्ये तर दारूबंदी आहे. गोव्यातून दुसऱ्या राज्यात अनेक वर्षांपासून मद्य चोरट्यामार्गे नेले जात आहे. हल्लीच गुजरात राज्यातील अबकारी अधिकारी मडगावात चौकशीसाठी आले होते. सुरत येथे मद्यसाठा पकडला होत. तो मडगावातून नेण्यात आला होता, असे तपासात उघड झाले होते.
पकडण्यात आलेल्या संशयितांनी मडगावातील एका दारू होलसेलवाल्याचे नाव सांगितल्याने पुढील तपासासाठी अधिकारी मडगावात आले होते. नंतर त्यांनी याबाबत फातोर्डा पोलिसांना त्याबाबत कल्पना दिली होती. दरम्यान, मागच्या वर्षी कोकण रेल्वे पोलिसांनी दारूची एकूण ७ प्रकरणे नोंद करून दहाजणांना पकडले होते.
एका पोलिस अधिकाऱ्याने आपले नाव गुपित ठेवण्याच्या अटीवर बोलताना सांगितले, या मद्य तस्करीत बडी धेंडे गुंतलेली असतात. त्यांचे हात वरपर्यंत पोहोचलेले आहेत. त्यामुळे अनेकदा माहिती असूनही कारवाई करता येत नाही.
Facebook Comments Box

रेल रोको च्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडी ची पालकमंत्री श्री नितेश राणे आणि आमदार श्रीमती सुलभा गायकवाड यांची भेट

   Follow us on        

सिंधुदुर्ग: २६ जानेवारी २०२५ प्रजासत्ताक दिनी नियोजित सावंतवाडी रेल्वे स्थानकावर रेल रोको आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडी चे मुंबई प्रतिनिधींनी आज सिंधुदुर्गचे नवनियुक्त पालकमंत्री ना. श्री नितेश राणे यांची भेट घेतली. सावंतवाडी टर्मिनस च्या उर्वरित कामासाठी निधीची तरतूद करावी, सावंतवाडीत रेल्वेचे परिपूर्ण टर्मिनस उभारण्यासाठी आपण राज्यशासनामार्फत निधी उपलब्ध करावा, या ठिकाणी कोरोना काळात काढून घेण्यात आलेल्या गाडी क्र. १२४३१/३२ राजधानी एक्सप्रेस आणि १२२०१/०२ गरीब रथ एक्स्प्रेस चा थांबा पूर्ववत करावा. नव्याने १२१३३/३४ मंगलोर सुपरफास्ट एक्स्प्रेस ला सावंतवाडी थांबा मिळावा, आणि कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण करावे या विषयावर पालकमंत्री श्री नितेश राणे यांचे लक्ष वेधण्यात आले. यावर आपण योग्य कार्यवाही करून येत्या काही महिन्यात ही कामे मार्गी लावू असे आश्वासन संघटनेच्या पदाधिकाऱ्याना दिले. यावेळी पालकमंत्री राणे यांचा संघटनेतर्फे शाल आणि भगवी टोपी घालून सत्कार करण्यात आला.

त्यानंतर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कल्याण पूर्व च्या आमदार श्रीमती सुलभा गायकवाड यांची भेट घेऊन त्यांना सावंतवाडी टर्मिनस आणि कोकण रेल्वेचे विलीनीकरण या संदर्भात निवेदन देण्यात आले. आणि सावंतवाडी टर्मिनस का गरजेचे आहे हे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पटवून दिले. त्यावर आमदार श्रीमती गायकवाड मॅडम यांनी या संदर्भात आपण राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र जी फडणवीस यांची भेट घेऊन त्यांचा कानावर हा विषय घालते असे संघटनेला आश्र्वासित केले.

यावेळी संघटनेचे मुंबई अध्यक्ष विनोद नाईक, प्रकाश येडगे, प्रशांत परब आदी संघटनेचे मुंबई विभागाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Facebook Comments Box

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर शिवशाही बसला भीषण आग

   Follow us on        

पुणे : मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर शिवशाही बसला भीषण आग लागली आहे. पुण्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर बसने अचानक पेट घेतल्याने मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर वाहतूक कोंडी झाली. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. ही घटना सकाळी नऊच्या सुमारास घडली आहे. शिवशाही बसमध्ये १२ प्रवासी प्रवास करत होते. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आहे. चालकाने प्रसंगावधान दाखवत सर्व प्रवाशांना खाली उतरवले.सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झालेली नाही. किंवा कोणीही जखमी झालेलं नाही.

या घटनेमुळे काही वेळ मुंबईकडे जाणारी लेन वाहतुकीसाठी ठप्प झाली होती. अग्निशमन दलाने तात्काळ येऊन आग विझवली आहे. मुंबईच्या दिशेने वाहतूक पूर्ववत झाली आहे. पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर वाहनांना आग लागण्याच्या घटना वाढतच आहेत.

Facebook Comments Box

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search