०८ डिसेंबर पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग 

  • तिथि-सप्तमी – 09:46:31 पर्यंत
  • नक्षत्र-शतभिष – 16:03:47 पर्यंत
  • करण-वणिज – 09:46:31 पर्यंत, विष्टि – 20:58:12 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-वज्र – 27:53:05 पर्यंत
  • वार- रविवार
  • सूर्योदय- 07:02
  • सूर्यास्त- 17;59
  • चन्द्र-राशि-कुंभ
  • चंद्रोदय- 12:37:59
  • चंद्रास्त- 24:40:00
  • ऋतु- हेमंत
जागतिक दिवस:
  • जपानमध्ये हा दिवस बोधी दिवस (Bodhi Day) म्हणून साजरा केला जातो.
महत्त्वाच्या घटना:
  • १७४०: दीड वर्षाच्या लढाईनंतर रेवदंड्याचा किल्ला मराठ्यांनी पोर्तुगीजांकडून जिंकला. मानाजी आंग्रे आणि खंडोजी मानकर यांच्या नेतृत्वाखाली मराठी आरमाराने हा विजय मिळवला.
  • १९२३: अमेरिका आणि जर्मनी मध्ये मित्रासंधी होऊन हस्ताक्षर झाले होते.
  • १९३७: भारतीय पहिली दुमजली बस मुंबईत धावू लागली.
  • १९४१: दुसरे महायुद्ध – जपानी फौजांनी एकाच वेळी मलेशिया, थायलँड, हाँगकाँग, फिलिपाइन्स व डच इस्ट इंडिज वर हल्ला केला. याच्या एकच दिवस आधी जपानने अमेरिकेतील पर्ल हार्बरवर हल्ला चढवला होता.
  • १९५५: युरोप परिषदेने युरोपचा ध्वज अवलंबला.
  • १९५६: ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न येथे ऑलंपिक खेळांचा समारोप झाला.
  • १९६७: आयएनएस कलवारी भारतीय नौदलात समाविष्ट करण्यात आले.
  • १९७१: भारत पाक युद्ध – भारतीय आरमाराने पाकिस्तानातील कराची बंदरावर हल्ला केला.
  • १९७६: अमेरिका ने नेवादा येथे अणुबॉम्ब चाचणी केली होती.
  • १९८०: इंग्रजी संगीतकार जॉन लेलेन यांना त्यांच्या घराबाहेर एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर गोळीबार केला.
  • १९८५: सार्क परिषदेची स्थापना.
  • १९९८: कर्नल ह्यूगो शावेज यांनी व्हेनेझुएला चे राष्ट्रपती म्हणून पदभार सांभाळला.
  • १९९८: ऑलंपिक च्या इतिहासात महिलांचा बर्फावर खेळल्या जाणारा हॉकी खेळाला खेळल्या गेले.
  • १९९८: फिनलँड ने स्वीडन ला ६-० ने बर्फावरील खेळल्या जाणाऱ्या हॉकी मध्ये हरवले होते.
  • २०००: ब्रिटन आणि रशिया या दोन देशांत सुरक्षा करार पार पडला.
  • २००३: जेव्हा राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये निलंबना चा काळ वाढविल्यामुळे झिंबाब्वे ने स्वतःला वेगळे करून घेतले.
  • २००३: वसुंधरा राजे ह्या राजस्थान च्या मुख्यमंत्री बनल्या.
  • २००३: उमा भारती ह्या मध्य प्रदेश च्या मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्या.
  • २००४: पाकिस्तान ने ७०० किलोमीटर दूर मारा करणारी शाहीन-१ नावाच्या क्षेपणास्त्राचे यशस्वी रित्या परीक्षण केले.
  • २००४: रवींद्रनाथ टागोर यांच्या चोरीस गेलेल्या नोबेल पदकाची प्रकृतीची स्वीडन सरकारने भेट दिली.
  • २००४: ख्रिश्चन ज्युनियर या फुटबॉलपटूच्या मृत्यूस कारण ठरलेल्या मोहन बागानचा गोळी सुब्रतो पॉलवर बंदी.
  • २००७: अमेरिकी संघटना NATA ने दक्षिणी अफगानिस्तान च्या मुसाकला जिल्ह्यात असलेल्या तालिबानी आतंकवाद्यांवर हल्ला केला होता.
  • २०१६: इंडोनेशियातील असेह प्रांतात ६.५ रिश्टर चा भूकंप. यात किमान ९७ लोक मृत्युमुखी.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १७२०: बालाजी बाजीराव तथा नानासाहेब पेशवा यांचा जन्म. (मृत्यू: २३ जून १७६१)
  • १७६५: एली व्हिटनी – कापसाच्या जिनिंग मशीनचा संशोधक (मृत्यू: ८ जानेवारी १८२५)
  • १८६१: जनरल मोटर्स आणि शेवरलेट चे संस्थापक विलियम सी. दुरंत यांचा जन्म. (मृत्यू: १८ मार्च १९४७)
  • १८७५: भारताचे स्वातंत्र्य सैनिक तेज बहादुर सप्रू यांचा जन्म.
  • १८७७: नारायण सदाशिव मराठे तथा ’केवलानंद सरस्वती’ – महाराष्ट्रातील धर्मसुधारणावादी श्रेष्ठ संस्कृत पंडित, संस्कृतमीमांसाकोशाचे संपादक (मृत्यू: १ मार्च १९५५)
  • १८९४: पॉपय कार्टून चे निर्माते ई. सी. सेगर यांचा जन्म. (मृत्यू: १३ ऑक्टोबर १९३८)
  • १८९७: पं. बाळकृष्ण शर्मा ऊर्फ ’नवीन’ – हिन्दी कवी. हिन्दीला राष्ट्रभाषा म्हणून मान्यता मिळवण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्‍न केले. (मृत्यू: २९ एप्रिल १९६०)
  • १९००: उदय शंकर – जागतिक कीर्तीचे नर्तक व नृत्यदिग्दर्शक, पद्मविभूषण (१९७१), संगीत नाटक अकादमी पुरस्कार (१९६२) व फेलोशिप विजेते. त्यांनी अल्मोडा येथे ’इंडिया कल्चरल सेंटर’ची स्थापना केली. (मृत्यू: २६ सप्टेंबर १९७७)
  • १९०१: भारताच्या संसद चे सदस्य अमरनाथ विद्यालंकार यांचा जन्म.
  • १९२७: पंजाब चे माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांचा जन्म.
  • १९३५: धर्मेन्द्र – चित्रपट अभिनेता
  • १९४२: भारतीय क्रिकेटपटू हेमंत कानिटकर यांचा जन्म.
  • १९४४: शर्मिला टागोर – चित्रपट अभिनेत्री.
  • १९५१: नोर्थेन अंड शेल चे संस्थापक रिचर्ड डेसमंड यांचा जन्म
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १९४७: भारताचे स्वातंत्र्य सैनिक भाई परमानन्द यांचे निधन.
  • १९७८: गोल्डा मायर – शिक्षिका व इस्त्रायलच्या ४ थ्या पंतप्रधान (जन्म: ३ मे १८९८)
  • २००४: प्रसिद्ध कॅमेरामन सुब्रतो मित्रा यांचे निधन.
  • २०१३: नोबेल पारितोषिके ऑस्ट्रेलियन-इंग्लिश केमिस्ट आणि शैक्षणिक जॉन कॉर्नफॉथ यांचे निधन. (जन्म: ७ सप्टेंबर १९१७)
  • २०१५: जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये विधार्थ्यांचे आवडते आणि प्रसिद्धी असलेले लेखक रमाशंकर यादव यांचे निधन.

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

Loading

Facebook Comments Box

०७ डिसेंबर पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग 

  • तिथि-षष्ठी – 11:08:13 पर्यंत
  • नक्षत्र-धनिष्ठा – 16:51:11 पर्यंत
  • करण-तैतुल – 11:08:13 पर्यंत, गर – 22:29:51 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-व्याघात – 08:41:48 पर्यंत, हर्शण – 30:25:21 पर्यंत
  • वार- शनिवार
  • सूर्योदय- 07.01
  • सूर्यास्त- 17.59
  • चन्द्र-राशि-कुंभ
  • चंद्रोदय- 11:58:59
  • चंद्रास्त- 23:42:59
  • ऋतु- हेमंत
जागतिक दिवस:
  • International Civil Aviation Day
महत्त्वाच्या घटना:
  • १८२५: बाष्पशक्तीवर चालणारे ’एंटरप्राईज’ नावाचे जहाज कोलकाता बंदरात दाखल झाले. भारतात आलेले अशा प्रकारचे ते पहिले जहाज होते.
  • १८५६: भारतातील पहिला उच्‍चवर्णीय विधवा विवाह कोलकत्त्यात संपन्न झाला.
  • १९१७: पहिले महायुद्ध – अमेरिकेने ऑस्ट्रिया/हंगेरी विरुद्ध युद्ध पुकारले.
  • १९३५: ’प्रभात’चा धर्मात्मा हा अस्पृष्योद्धारावरचा चित्रपटमुंबईतील ’कृष्ण’ सिनेमात प्रदर्शित झाला. हा चित्रपट ’प्रभात’ व बालगंधर्व यांनी ’बालगंधर्व-प्रभात’ या संयुक्त बॅनरखाली बनवला होता.
  • १९४१: द्वितीय विश्वयुद्धाच्या दरम्यान जपान ने अमेरिकेच्या पर्ल हार्बर वर हवाई हमाला केला होता.
  • १९४१: दुसरे महायुद्ध – जपानने पर्ल हार्बरवर तुफानी हल्ला केला.
  • १९४४: निकोलै रेडेस्कु ने रोमानिया मध्ये सरकार स्थापन केले होते.
  • १९४९: भारतीय सशस्त्र सेना ध्वज दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली.
  • १९७२: अमेरिकेने चंद्रावर जाणाऱ्या अपोलो १७ चे आजच्या दिवशीच प्रक्षेपण केले होते.
  • १९७५: इंडोनेशियाने पूर्व तिमोरवर हल्ला केला.
  • १९८८: यासर अराफात यांनी इस्त्राएलच्या अस्तित्त्वास मान्यता दिली.
  • १९९२: दक्षिण आफ्रिकेला पहिल्यांदा एकदिवसीय क्रिकेट सामना खेळल्या गेला.
  • १९९४: कन्‍नड साहित्यिक यू. आर. अनंतमूर्ती यांना ज्ञानपीठ पारितोषिक जाहीर
  • १९९५: फ्रेन्च गयानातील कोऊरू प्रक्षेपण केन्द्रावरुन ’इन्सॅट-२सी’ या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण
  • १९९५: अमेरिकेच्या नासाने गुरु ग्रहावर पाठविलेले गॅलीलियो स्पेस एअर क्राफ्ट गुरु वर पोहचले होते.
  • १९९८: ७२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कवी वसंत बापट यांची निवड
  • २००१: विक्रमसिंघे श्रीलंकाचे नवीन प्रधानमंत्री म्हणून नियुक्त.
  • २००२: तुर्किश अभिनेत्री अजरा अकिन यांना मिस वर्ल्ड चा पुरस्कार.
  • २००३: रमन सिंग हे छत्तीसगड चे मुख्यमंत्री बनले.
  • २००४: हामिद करजई हे अफगाणिस्तान चे राष्ट्रपती पदाची शपथ घेतली.
  • २००८: भारतीय गोल्फ खेळाडू जीव मिल्खा सिंह यांनी जपान दौरा खिताब जिंकला.
  • २०१६: पाकिस्तान इंटरनॅशनल एरलाईन्स चे पीके ६६१ विमान कोसळले. यात ४७ लोकांचा मृत्यू.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १८७९: भारताचे क्रांतिकारक जतीन्द्रनाथ मुखर्जी यांचा जन्म.
  • १८८९: समाजशास्त्राचे विद्वान राधाकमल मुखर्जी यांचा जन्म.
  • १९०२: जनार्दन ग्यानोबा तथा ‘जे. जी.‘ नवले – भारतीय कसोटी क्रिकेट संघाचे पहिले यष्टिरक्षक (मृत्यू: ७ सप्टेंबर १९७९)
  • १९२१: प्रमुख स्वामी महाराज – स्वामीनारायण पंथातील अध्यात्मिक गुरू
  • १९२४: पोतुर्गाल चे मारियो सोरेस यांचा जन्म.
  • १९४०: भारतीय चित्रपट निर्माता कुमार सहानी यांचा जन्म.
  • १९५७: जिऑफ लॉसन – ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १७८२: १८ व्या शतकाचा वीर योद्धा हैदर आली यांचा जन्म.
  • १८९४: सुएझ कालव्याचे सहनिर्माते फर्डीनंट द लेशप्स यांचे निधन. (जन्म: १९ नोव्हेंबर १८०५)
  • १९४१: भास्कर रामचंद्र तथा भा. रा. तांबे – कवी (जन्म: २७ आक्टोबर १८७४)
  • १९४१: सुएझ कालव्याचे सहनिर्माते फर्डीनंट द लेशप्स यांचे निधन. (जन्म: १९ नोव्हेंबर १८०५)
  • १९७६: डॉ. गोवर्धनदास पारिख – विचारवंत आणि शिक्षणतज्ञ (जन्म: ? ? ????)
  • १९८२: बाबूराव विजापुरे – संगीतशिक्षक? (जन्म: १७ जून १९०३)
  • १९९३: इव्होरी कोस्ट आयलंडचे पहिले अध्यक्ष फेलिक्स हॉफॉएट-बोजि यांचे निधन. (जन्म: १८ ऑक्टोबर १९०५)
  • १९९७: ज्योतिर्मठाचे शंकराचार्य स्वामी शांतानंद सरस्वती यांचे अलाहाबाद येथील अलोपी आश्रमात निधन (जन्म: १६ जुलै १९१३ – अच्छाती, बस्ती, उत्तर प्रदेश)
  • २००४: अॅमवे चे सहसंस्थापक जय व्हॅन ऍन्डेल यांचे निधन. (जन्म: ३ जुन १९२४)
  • २००३: ला भारताचे पाचवे राष्ट्रपती फ़ख़रुद्दीन अली अहमद यांच्या पत्नी आणि भारतीय राजनीती मधील प्रसिद्ध बेगम आबिदा अहमद यांचे निधन.
  • २०१३: ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक विनय आपटे यांचे निधन.ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक विनय आपटे यांचे निधन.
  • २०१६: पाकिस्तानी गायक आणि इस्लाम धर्मप्रचारक जुनैद जमशेद यांचे विमान अपघातात निधन.

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

Loading

Facebook Comments Box

पवनार – पत्रादेवी शक्तीपीठ द्रुतगती महामार्ग पूर्णत्वास नेण्यासाठी हालचाली सुरू

   Follow us on        

Shaktipeeth Expressway Updates:वर्धा जिल्ह्यापासून सांगली जिल्ह्याच्या हद्दीपर्यंतच्या शक्तीपीठ द्रुतगती महामार्ग प्रकल्पाला जनता पूर्ण पाठिंबा देत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधी नंतर घेतलेल्या आपल्या पहिल्या पत्रकार परिषदेत दिली. त्यानुसार या जिल्ह्यांमध्ये भूसंपादन सुरू करून पूर्ण केले जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

हा द्रुतगती मार्ग ज्या 12 जिल्ह्यांतून जातो, त्यापैकी केवळ सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातच विरोध आहे, ज्यांच्या जमिनी संपादित कराव्या लागणार आहेत, त्यांच्याशी चर्चा करून तोडगा काढला जाईल आणि या महामार्गाचे काम लवकरच सुरू केले जाईल असे ते म्हणालेत.

11 जिल्हय़ातून जाणार्‍या सुमारे 802 किलोमीटर लांबीच्या या द्रुतगती महामार्गाला शेतकर्‍यांनी विरोध केला होता. आत्ताच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला त्यामुळे मोठा फटकाही बसला होता. त्यामुळ सावधानता म्हणुन विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर या प्रकल्पाच्या भूसंपादन प्रक्रियेस तात्पुरती स्थगिती देण्यात आली होती. मात्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे भेटले आहे. त्यामुळे हा प्रकल्प पूर्णत्वास नेण्यास हालचाली झाल्या आहेत.

शक्तीपीठ एक्स्प्रेसमध्ये 802 किमी लांबीमध्ये 26 इंटरचेंज असतील.

  1.  पवनार-येळा
  2.  कळंब-राळेगाव
  3.  यवतमाळ
  4.  माहूरगड-आर्णी
  5.  पुसद
  6.  उमरखेड
  7.  हिंगोली-नांदेड
  8.  औंढा नागनाथ-बसमत
  9.  परभणी
  10.  गंगाखेड
  11.  परळी वैजनाथ
  12.  अंबेजोगाई-घाटनांदूर
  13.  लातूर
  14.  तुळजापूर-धाराशिव
  15.  बार्शी
  16.  सोलापूर
  17.  पंढरपूर-मंगळवेढा
  18.  सांगोला
  19.  सांगली
  20.  नरसोबाची वाडी
  21.  पट्टण कोडोली
  22.  कोल्हापूर बायपास
  23.  पन्हाळा
  24.  आदमपूर
  25.  गारगोटी
  26. बांदा-पत्रादेवी

Loading

Facebook Comments Box

आंबोली-दोडामार्ग पट्ट्यात पट्टेरी वाघांचे अस्तित्व अधोरेखित; आतापर्यंतच्या विक्रमी संख्येची नोंद

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी ते दोडामार्ग या सह्याद्रीच्या पट्ट्यात तब्बल आठ पट्टेरी वाघांची नोंद झाली आहे. त्यात पाच मादी, तर तीन नर वाघांचा समावेश आहे. पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात वाघांची अधिकृतरीत्या वनविभागाच्या दप्तरी नोंद झाली आहे.
वनविभाग, सह्याद्री रिझर्व्ह फॉरेस्ट आणि वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन ट्रस्टच्या माध्यमातून जानेवारी ते मे दरम्यान सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आणि कर्नाटकातील काली व्याघ्र प्रकल्प या दोन्ही ठिकाणी हे सर्वेक्षण करण्यात आले होते. यामध्ये सिंधुदुर्गमध्ये आठ वाघांचे अस्तित्व वेगवेगळ्या कॅमेऱ्यामध्ये दिसून आले. हे वाघ सावंतवाडी तालुक्यातील आंबोली दोडामार्ग पट्ट्यात आढळून आले आहेत.
वनशक्ती संस्थेने मांगेली ते आंबोली हा वाघाचा कॉरिडॉर असून तो भाग संरक्षित करावा, यासाठी उच्च न्यायालयात याचिकेला दाखल केली आहे. दीर्घकाळ यावर सुनावणी सुरु आहे. या भागात पट्टेरी वाघ असल्याचे वन शक्तीने वेळोवेळी उच्च न्यायालयात सांगितले आहे. आता भागात विक्रमी नोंद झाल्याने या झाल्याने या मागणीला बळ मिळाले आहे.

Loading

Facebook Comments Box

‘अटल सेतू’वरील वाहनांच्या संख्येत घट; कारण काय?

मुंबई : विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राज्य सरकारने मुंबईच्या वेशीवरील पाचही पथकर नाक्यांवर हलक्या वाहनांसाठी टोलवसुली बंद केल्याचा निर्णय ताजा असतानाच मोठा गाजावाजा करुन उभारण्यात आलेल्या शिवडी-न्हावाशेवा ‘अटल सेतू’वरील वाहनांची संख्या लक्षणीय प्रमाणात रोडावल्याने टोलमुक्तीचा फटका ‘अटल सेतू’ला बसल्याची चर्चा आता जोर धरु लागली आहे. ॲाक्टोबर महिन्यात अटल सेतूवरुन सात लाख सात हजार १०४ वाहनांनी प्रवास केल्याची नोंद झाली. ही संख्या नोव्हेंबर महिन्यात सहा लाख ६९ हजार ९२ पर्यत खाली घसरली असून पथकर नाक्यांवरील टोलमाफी हे कारण यामागे असू शकते का, यावर आता चर्चा सुरु झाली आहे. विशेष म्हणजे, या काळात अटल सेतूवरुन हलक्या वाहनांची संख्या सर्वाधिक घटली आहे.

मुंबई – नवी मुंबई प्रवास अतिवेगवान व्हावा यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) शिवडी – न्हावाशेवा असा २१.८ किमी लांबीचा सागरी सेतू बांधला आहे. लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता तोंडावर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत जानेवारी महिन्यात हा सेतू वाहतूक सेवेत दाखल झाला. मुंबई ते नवी मुंबई हे अंतर जेमतेम १२ ते १५ मिनिटांत कापणे यामुळे शक्य झाले. नवी मुंबईच्या दक्षिणेकडील उलवे, उरण, द्रोणागिरी, जासई, पनवेल, गव्हाण यासारख्या उपनगरांमधील रहिवाशांसाठी मुंबई या सेतूमुळे जवळ आल्याने येथील प्रवासी नागरिकांचा मोठा प्रतिसाद अटल सेतूला मिळेल असे दावेही केले जात होते. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने हा सेतू सुरु करताना एका बाजूस प्रवासासाठी २५० रुपयांचा टोल आकारण्याचा निर्णय जाहीर केला आणि नियमित कामानिमित्त मुंबईत येजा करणाऱ्या प्रवाशांचा भ्रमनिरास झाल्याचे पहायला मिळाले. तशा प्रतिक्रियाही या उपनगरांमध्ये उमटल्या. असे असले तरी पुणे तसेच मुंबई-गोवा महामार्गावरुन मुंबईच्या दिशेने येजा करणाऱ्या प्रवाशांसाठी अटल सेतू सोयीचा ठरल्याचे चित्र आहे. असे असले तरी अजूनही नजिकच्या महिन्यांमध्ये या सेतूवरुन प्रवास करणाऱ्या वाहनांची संख्या दहा लाखांच्या पलिकडे पोहोचलेली नाही. राज्य सरकारने मुंबईच्या वेशीवरील पथकर नाक्यावरील टोल वसुली बंद करण्याचा निर्णय घेताच अटल सेतूवरील प्रवाशी वाहनांची संख्या आणखी कमी झाली असून यामध्ये हलक्या वाहनांची संख्या अधिक असल्याचे पहायला मिळत आहे.

Loading

Facebook Comments Box

०६ डिसेंबर पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग 

  • तिथि-पंचमी – 12:10:00 पर्यंत
  • नक्षत्र-श्रवण – 17:19:02 पर्यंत
  • करण-बालव – 12:10:00 पर्यंत, कौलव – 23:41:35 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-घ्रुव – 10:42:29 पर्यंत
  • वार- शुक्रवार
  • सूर्योदय- 07. 01
  • सूर्यास्त- 17.59
  • चन्द्र-राशि-मकर – 29:07:32 पर्यंत
  • चंद्रोदय- 11:16:59
  • चंद्रास्त- 22:44:00
  • ऋतु- हेमंत
जागतिक दिवस:
  • महापरिनिर्वाण दिन
महत्त्वाच्या घटना:
  • १७६८: एनसायक्लोपीडिया ब्रिटानिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला.
  • १८७७: द वॉशिंग्टन पोस्ट या वृत्तपत्राच्या प्रकाशनास सुरूवात झाली.
  • १८९७: परवाना टॅक्सीकॅब सुरु करणारे लंडन हे जगातील पहिले शहर ठरले.
  • १९१७: फिनलँड (रशियापासुन) स्वतंत्र झाला.
  • १९७१: भारताने बांगलादेशला मान्यता दिल्यामुळे पाकिस्तानने भारताशी राजनैतिक संबंध तोडले.
  • १९७८: स्पेनने सार्वमत चाचणीच्या कौलावरुन नवीन संविधान अंगीकारले.
  • १९८१: डॉ. एस. झेड. कासिम यांच्या नेतृत्त्वाखाली ’पोलर सर्कल’ या जहाजातून भारताची तुकडी आपल्या पहिल्या अंटार्क्टिक मोहिमेवर गोव्यातील मार्मागोवा बंदरातून रवाना झाली. ९ जानेवारी १९८२ रोजी रात्री साडेबारा वाजता अंटार्क्टिकावर पोचली. भारत हा अंटार्क्टिका मोहीम करणारा तेरावा देश बनला.
  • १९९२: अयोध्येत कारसेवकांनी बाबरी मशिद पाडली. त्यामुळे उसळलेल्या दंगलीत सुमारे १,५०० लोक ठार झाले.
  • १९९७: जपान च्या क्योटो मध्ये आंतरराष्ट्रीय हवामान परिषदच्या सम्मेलनाचे उद्घाटन.
  • १९९८: बँकॉक मध्ये १३ वी आशियाई क्रीडा स्पर्धेला सुरुवात.
  • १९९८: ह्यूगो चावेझ यांना व्हेनेझुएला चे राष्ट्रपती म्हणून निवडल्या गेले.
  • १९९९: जर्मनीची लॉनटेनिसपटू स्टेफी ग्राफ हिला ’ऑलिम्पिक ऑर्डर’ या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.
  • २०००: थोर समाजसेवक बाबा आमटे यांना राष्ट्रपती के. आर. नारायणन यांच्या हस्ते केन्द्र सरकारचा ’डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
  • २००६: ला नासाने मार्स ग्लोबल सर्वेयर ने काढलेले फोटो सार्वजनिक केले.
  • २००७: ला ऑस्ट्रेलिया च्या शाळेमध्ये शीख विध्यार्थ्यांना कृपाण आणि मुस्लीम विध्यार्थ्यांना हिजाब नेण्यास परवानगी मिळाली होती.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १४२१: हेन्‍री (सहावा) – इंग्लंडचा राजा (मृत्यू: २१ मे १४७१)
  • १७३२: वॉरन हेस्टिंग्ज – भारताचा पहिला गव्हर्नर जनरल (मृत्यू: २२ ऑगस्ट १८१८)
  • १८२३: मॅक्समुल्लर – जर्मन विचारवंत (मृत्यू: २८ आक्टोबर १९००)
  • १८६१: रेव्हरंड नारायण वामन तथा ना. वा. टिळक – कवी व लेखक (मृत्यू: ९ मे १९१९)
  • १८५३: हरप्रसाद शास्त्री – संस्कृत विद्वान, शिक्षणतज्ञ, इतिहासकार (मृत्यू: १७ नोव्हेंबर १९३१)
  • १९१६: ’गंधर्व भूषण’ जयराम शिलेदार (मृत्यू: ६ नोव्हेंबर १९९२)
  • १९१७: बास्किन-रॉबिन्स चे सहसंस्थापक इरब रोबिन्स यांचा जन्म. (मृत्यू: ५ मे २००८)
  • १९२३: वसंत सबनीस – लेखक व पटकथाकार (मृत्यू: १५ आक्टोबर २००२)
  • १९३२: कमलेश्वर – पद्मभूषण पुरस्कार विजेते हिन्दी लेखक, पटकथालेखक, दूरदर्शनचे अतिरिक्त संचालक (मृत्यू: २७ जानेवारी २००७)
  • १९४५: अभितेने शेखर कपूर यांचा जन्म.
  • १९४८: भरतनाट्यम नृत्यांगना सुचेता भिडे-चापेकर यांचा जन्म.
  • १९८५: भारतीय क्रिकेटपटू आर. पी. सिंग यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १८९२: सीमेन्स कंपनीचे संस्थापक वर्नेर व्होंन सीमेन्स यांचे निधन. (जन्म: १३ डिसेंबर १८१६)
  • १९५६: डॉ. बाबासाहेब आंबेडकर – भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, अस्पृश्यांच्या मुक्तिसंग्रामाचे खंदे नेते, अस्पृश्य समजल्या जाणार्‍या जातितील पहिले मॅट्रिक व पहिले पदवीधर, इंग्लंडमध्ये वकिलीतील बॅरिस्टरची परीक्षा दिली आणि अर्थशास्त्रात डॉक्टरेट मिळवली. (जन्म: १४ एप्रिल १८९१)
  • १९७१: भारतातील भूविज्ञान अध्ययनाचा पाया घालणारे वैज्ञानिक कमलाकांत वामन केळकर यांचे निधन. (जन्म: १ जानेवारी १९०२)
  • १९७६: क्रांतिसिंह नाना पाटील – स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक, ’पत्री सरकार’चे (प्रति सरकार) संस्थापक आणि कम्युनिस्ट पक्षाचे खासदार (जन्म: ३ ऑगस्ट १९००)
  • १९९८: ला परमवीर चक्र विजेता मेजर होशियार यांना वीरमरण.
  • २००९: ला भारतीय अभिनेत्री बिना राय यांचे निधन.
  • २०१३: नेल्सन मंडेला तथा ’मदीबा’ – दक्षिण अफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष, नोबेल पारितोषिक विजेते (जन्म: १८ जुलै १९१८)
  • २०१५: ला भारतीय चित्रपट अभिनेता राम मोहन याचे निधन.

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

Loading

Facebook Comments Box

Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर धावणार हिवाळी विशेष गाडी; आरक्षण ‘या’ तारखेपासून सुरु

Konkan Raiwlay:या महिन्यात कोकणात गावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी एक खुशखबर आहे. पश्चिम रेल्वे कोकण रेल्वे मार्गावर एक दिनांक ०८ डिसेंबर पासून एक द्विसाप्ताहिक विशेष गाडी चालविणार आहे. या गाडीच्या एकूण १६ फेऱ्या होणार असून या गाडीचे आरक्षण दिनांक ०७ डिसेंबर रोजी पासून सुरु होणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनातर्फे देण्यात आली आहे. या गाडी बद्दल अधिक माहिती खालीलप्रमाणे
०९४१२/०९४११ अहमदाबाद – थिवी  – अहमदाबाद द्विसाप्ताहिक विशेष (एकूण १६ फेऱ्या)
गाडी क्रमांक ०९४१२ विशेष अहमदाबाद येथून दिनांक ०८ डिसेंबर ते १ जानेवारी २०२५ पर्यंत दर रविवार आणि बुधवार या दिवशी दुपारी १४:१० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी  ११ वाजता थिवी  येथे पोहोचेल.
गाडी क्रमांक ०९४११ विशेष थिवी येथून दिनांक ०९ डिसेंबर ते २ जानेवारी २०२५ पर्यंत दर सोमवार आणि गुरुवार या दिवशी सकाळी ११:४० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री ०८:४५ वाजता अहमदाबाद येथे पोहोचेल.
थांबे:  आनंद,वडोदरा, भारूच, उधना, वलसाड, वापी, पालघर, वसई रोड, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी,राजापूर रोड, कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी
ही गाडी एसी टू टायर, एसी थ्री टायर, स्लीपर क्लास आणि जनरल कोचसहीत चालविण्यात येणार आहे.

Loading

Facebook Comments Box

महापरिनिर्वाण दिनानिमित्त दि.६ डिसेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त दि. ६ डिसेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुंबई व मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना ही सुटी लागू राहणार आहे. बुधवारी या सुटीचे परिपत्रक काढण्यात आले.

चैत्यभूमी परिसरात महापरिनिर्वाण दिनानिमित्त जय्यत तयारी सुरु आहे. ६ डिसेंबर रोजी राज्यभरातून मोठ्या संख्येने चैत्यभूमी येथे अनुयायी येतात. दरम्यान, त्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी सार्वजनिक सुट्टीचा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार, शुक्रवारी मुंबईतील शाळा आणि महाविद्यालये बंद राहणार असून दादर-वरळी परिसरात २ दिवस ड्राय-डे घोषित करण्यात आला आहे.

 

Loading

Facebook Comments Box

देवरुख: महापरिनिर्वाण दिनानिमित्त महाआरोग्य शिबीर आणि रक्तदान शिबिराचे आयोजन

देवरुख: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून दिनांक 6 डिसेंबर 2024 रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि कोकण विकास संघर्ष समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आज आरोग्य शिबीर आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे नेतृत्व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आदरणीय रोहित तांबे यांनी केले आहे.

कार्यक्रमाचे आयोजन 6 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या शेजारील सभापती निवास मध्ये, देवरुख पोलीस स्टेशनसमोर करण्यात आले असून दुपारी 3 वाजेपर्यंत चालणार आहे. या शिबिरामध्ये नागरिकांना मोफत आरोग्य तपासणीसह विविध वैद्यकीय सेवांचा लाभ घेता येणार आहे. जिल्ह्या रुग्णालयात रुग्णांना रक्ताचा तुटवता भासत असून रक्तदान शिबिराद्वारे समाजहितासाठी रक्तदानाची चळवळ पुढे नेण्याचा उद्देश ठेवण्यात आला आहे.

या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, अनेकांनी आरोग्य तपासणीसाठी आणि रक्तदानासाठी नोंदणी केली आहे. “समाजासाठी ही एक छोटी सेवा आहे जी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन करणारी आहे,” असे रोहित तांबे यांनी सांगितले.

शिबिरात सहभागी होण्यासाठी आणि अधिक माहिती घेण्यासाठी नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. अशा उपक्रमांमुळे समाजातील आरोग्यविषयक जागरूकता आणि सामाजिक बांधिलकी वाढण्यास हातभार लागतो.

Loading

Facebook Comments Box

०५ डिसेंबर पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग 

  • तिथि-चतुर्थी – 12:51:44 पर्यंत
  • नक्षत्र-उत्तराषाढ़ा – 17:27:20 पर्यंत
  • करण-विष्टि – 12:51:44 पर्यंत, भाव – 24:33:24 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-वृद्वि – 12:27:23 पर्यंत
  • वार- गुरूवार
  • सूर्योदय- 06:58:11
  • सूर्यास्त- 18:00:21
  • चन्द्र-राशि-मकर
  • चंद्रोदय- 10:31:00
  • चंद्रास्त- 21:45:00
  • ऋतु- हेमंत
जागतिक दिवस:
  • International Volunteer Day for Economic and Social Development
  • World Soil Day
महत्त्वाच्या घटना:
  • १८१२: मध्ये नेपोलियन बोनापार्ट ला रशियामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते त्यामुळे तो फ्रांस मध्ये परत आला होता.
  • १८४८: अमेरिकन संसदेसमोर केलेल्या भाषणात राष्ट्राध्यक्ष जेम्स पोल्क यांनी कॅलिफोर्नियात मोठ्या प्रमाणात सोने सापडल्याचे सांगितले
  • १९०६: नॅशनल इन्शुरन्स कंपनी ची स्थापना.
  • १९३२: जर्मनीत जन्मलेले स्विस भौतिकशास्त्रज अल्बर्ट आईनस्टाईन यांना अमेरिकन व्हिसा देण्यात आला.
  • १९४५: फ्लाईट १९, फ्लोरिडा येथून निघालेली अमेरिकन नौदलाची ५ टी.बी. एम. ऍव्हेंजर विमाने स्क्वॉड्रन बर्म्युडा त्रिकोणात गायब झाली.
  • १९४६: भारतामध्ये होम गार्ड संघटनेची स्थापना झाली होती.
  • १९५०: मध्ये आताचे सिक्कीम हे राज्य भारताच्या संरक्षणाखाली आले होते.
  • १९५७: इंडोनेशियाचे अध्यक्ष सुकार्नो यांनी सर्व डच नागरिकांना हद्दपार केले.
  • १९७१: भारताने बांगलादेश ला एक पूर्ण रुपी देश म्हणून मान्यता दिली होती.
  • १९७३: गेराल्ड फोर्ड यांनी अमेरिकेच्या ४० वे उपराष्ट्रपती म्हणून पदभार सांभाळला.
  • १९८९: फ्रांसच्या टीजीव्ही रेल्वेने ताशी ४८२.४ किमी गती गाठून विश्वविक्रम केला.
  • १९८९: मुलायम सिंह यादव पहिल्यांदा उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री बनले.
  • १९९३: मुलायम सिंह यादव पुन्हा उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री बनले.
  • २००५: ब्रिटन ने समलिंगी पुरुष आणि समलिंगी स्त्री यांचे संबंध वैध मानल्या जातील असे नवीन कायदा अमलात आणला.
  • २००८: कॉंग्रेस ने अशोक चव्हाण यांना महाराष्टाचे मुख्यमंत्री बनविण्यची घोषणा केली होती.
  • २०१४: जागतिक मृदा दिन.
  • २०१६: गौरव गिल यांनी आशिया पॅसिफिक रॅली चॅम्पिअनशिप किताब जिंकला.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १८१८: भारतीय-पाकिस्तानी कवी आणि अनुवादक जोश मलिहाबादी यांचा जन्म. (मृत्यू: २२ फेब्रुवारी १९८२)
  • १८६३: पॉल पेनलीव्ह – फ्रान्सचे पंतप्रधान आणि गणितज्ञ (मृत्यू: २९ आक्टोबर १९३३)
  • १८७२: भारताचे प्रसिद्ध पंजाबी लेखक, कवी, भाई वीर सिंह यांचा जन्म.
  • १८९४: भारताचे माजी रेल्वे मंत्री राहिलेले एच. सी. दासप्पा यांचा जन्म
  • १८९६: नोबेल पारितोषिक विजेते शास्रज्ञ कार्ल कोरी यांचा जन्म.
  • १८९७: सेसेना एअरक्राफ्ट कॉर्पोरेशनचे संस्थापक क्लाईड व्हर्नन सेसेना यांचा जन्म. (मृत्यू: २० नोव्हेंबर १९५४)
  • १८९८: भारताचे आणि पाकिस्तानचे प्रसिद्ध कवी जोश मलीहाबादी यांचा जन्म.
  • १९०१: वेर्नर हायसेनबर्ग – ’क्‍वांटम मॅकॅनिक्स’मधील मूलभूत संशोधनासाठी नोबेल पारितोषिक मिळवणारे (१९३२) जर्मन भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू: १ फेब्रुवारी १९७६)
  • १९०१: वॉल्ट इलायन डिस्‍ने – अ‍ॅनिमेशनपटांचे प्रणेते, ’मिकी माऊस’चे जनक (मृत्यू: १५ डिसेंबर १९६६)
  • १९०५: शेख अब्दुल्ला – शेर – ए – कश्मीर (मृत्यू: ८ सप्टेंबर १९८२)
  • १९२७: भुमिबोल अदुल्यतेज ऊर्फ राम (नववा) – थायलँडचा राजा
  • १९३१: अ‍ॅडमिरल जयंत नाडकर्णी – १४ वे नौसेनाप्रमुख
  • १९३१: १४ वे नौसेनाप्रमुख अ‍ॅडमिरल जयंत नाडकर्णी यांचा जन्म.
  • १९३२: ला भारतीय चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री नादिरा यांचा जन्म.
  • १९३८: ला गुजरातचे प्रसिद्ध साहित्यकार रघुवीर चौधरी यांचा जन्म.
  • १९४३: लक्ष्मण देशपांडे – ’वर्‍हाड निघालंय लंडनला’ साठी प्रसिद्ध असलेले लेखक, दिग्दर्शक व प्राध्यापक (मृत्यू: २२ फेब्रुवारी २००९)
  • १९६५: भारतीय फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांचा जन्म.
  • १९६९: ला भारतीय शुटर अंजली भागवत यांचा जन्म.
  • १९७४: भारतीय पत्रकार आणि लेखक रविश कुमार यांचा जन्म.
  • १९८५: भारतीय क्रिकेटपटू शिखर धवन यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १७९१: वूल्फगँग मोझार्ट – ऑस्ट्रियन संगीतकार (जन्म: २७ जानेवारी १७५६)
  • १९२३: फ्रेंच चित्रकार क्लोद मोने यांचे निधन.
  • १९२४: ला भारताचे प्रसिद्ध सामाजिक सेवक तसेच स्वतंत्र सैनिक एस. सुब्रह्मण्य अय्यर यांचे निधन.
  • १९४१: ला भारताच्या प्रसिद्ध महिला चित्रकार अमृता शेरगिल यांचे निधन.
  • १९४६: प्रवचनकार दादामहाराज सातारकर यांचे निधन.
  • १९५०: योगी अरविंद घोष – क्रांतिकारक, तत्त्वचिंतक, योगी व कवी (जन्म: १५ ऑगस्ट १८७२ – कलकत्ता, पश्चिम बंगाल)
  • १९५१: अवनींद्र नाथ टागोर – जलरंगचित्रकार (जन्म: ७ ऑगस्ट १८७१)
  • १९५५: ला भारताचे प्रसिद्ध कवी, शायर मजाज़ यांचे निधन.
  • १९५९: कुमार श्री दुलीपसिंहजी – इंग्लंडचे क्रिकेटपटू, यांच्या स्मरणार्थ भारतात ’दुलीप ट्रॉफी’ खेळली जाते. (जन्म: १३ जून १९०५ – नवानगर, काठियावाड, गुजराथ)
  • १९६१: ला परमवीर चक्राने सन्मानित गुरबचन सिंह सालारिया यांना वीरमरण.
  • १९७३: राकेश मोहन – हिन्दी नाटककार (जन्म: ८ जानेवारी १९२५)
  • १९७३: रडार यंत्रणेचे शोधक रॉबर्ट वॉटसन-वॅट यांचे निधन. (जन्म: १२ एप्रिल १८९२)
  • १९९१: डॉ. वासुदेव विश्वनाथ गोखले – संस्कृततज्ञ आणि बौद्ध धर्माचे अभ्यासक (जन्म: ? ? ????)
  • १९९९: वसंत गणेश तथा बापूसाहेब उपाध्ये – स्वातंत्र्यसैनिक, समाजवादी नेते, आमदार आणि शेती व सिंचन या विषयांतील व्यासंगी मार्गदर्शक (जन्म: ? ? ????)
  • २००४: ब्राझिलियन फुटबॉलपटू ख्रिश्चन जुनियर यांचे सामना सुरु असताना बेंगलोर येथे निधन.
  • २००७: राकेश मोहन – हिन्दी नाटककार म. वा. धोंड – टीकाकार (जन्म: ३ आक्टोबर १९१४)
  • २०१३: दक्षिण आफ्रिकेचे पहिले श्वेतवर्णीय राष्ट्राध्यक्ष नोबेल पारितोषिक विजेते नेल्सन मंडेला यांचे निधन. (जन्म: १८ जुलै १९१८)
  • २०१५: ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक किशनराव भुजंगराव राजूरकर यांचे निधन.
  • २०१६: तामिळ नाडू च्या मुख्यमंत्री जे. जयललिता उर्फ अम्मा यांचे तीव्र हृदयविकारानंतर निधन. (जन्म: २४ फेब्रुवारी १९४८)

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

Loading

Facebook Comments Box

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search