आजचे पंचांग
- तिथि-द्वितीया – 10:58:33 पर्यंत
- नक्षत्र-पुनर्वसु – 24:44:44 पर्यंत
- करण-गर – 10:58:33 पर्यंत, वणिज – 22:28:00 पर्यंत
- पक्ष- कृष्ण
- योग-ब्रह्म – 21:10:11 पर्यंत
- वार- मंगळवार
- सूर्योदय- 07:07
- सूर्यास्त- 18:03
- चन्द्र-राशि-मिथुन – 18:48:12 पर्यंत
- चंद्रोदय- 20:04:59
- चंद्रास्त- 08:56:00
- ऋतु- हेमंत
- राइट ब्रदर्स दिवस.
- १३९८: मंगोल साम्राज्याचा सम्राट तैमुर पहिला याने दिल्ली वर हल्ला केला होता.
- १७१८: ग्रेट ब्रिटनने स्पेनविरुद्ध युद्ध पुकारले.
- १७७७: फ्रान्सने अमेरिका या देशाला मान्यता दिली.
- १८०३: इस्ट इंडिया कंपनी ने ओडीसा वर आपला दावा निर्माण केला.
- १९०३: राईट बंधू यांनी पहिल्यांदा “द फ्लायर” नावाचे विमान १२ सेकंदांसाठी उडवले होते.
- १९२७: हिन्दुस्तान रिपब्लिकन असोसिएशनचे क्रांतिकारक राजेन्द्र नाथ लाहिरी यांना ब्रिटिश सरकारने निर्धारित तारखेच्या दोन दिवस आधीच गोंडा तुरुंगात फाशी दिले.
- १९२८: भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांनी ब्रिटिश पोलिस ऑफिसर जेम्स साँडर्स याची लाहोर येथे हत्या केली.
- १९४०: महात्मा गांधी यांनी वैयक्तिक सत्याग्रह चळवळीला स्थगिती दिली.
- १९४१: दुसरे महायुद्ध – जपानी फौजांचे उत्तर बोर्निओ येथे आगमन
- १९७०: जयंतीलाल छोटालाल शहा यांनी भारताचे १३ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
- १९७१: आजच्या दिवशी भारत आणि पाकिस्तान यांचे युद्ध समाप्त झाले.
- २००२: तुर्की ने भारताला काश्मीर मुद्द्यावर समर्थन केले होते.
- २००८: शीला दीक्षित यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
- २०१६: लेफ्टनंट जनरल बिपीन रावत यांची लष्करप्रमुखपदी आणि एअर चिफ मार्शल बी. एस. धनाओ यांची वायुदलप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली.
- २०१६: विजेंदर सिंग यांनी फ्रान्सिस चेका ला हरवून डब्ल्यूबीओ आशिया पॅसिफिक सुपर मिडलवेट जेतेपद स्वतःकडेच जिकून ठेवले.
- २०१६: आयपीएस ए. के. धस्माना यांची रॉ च्या प्रमुखपदी तर राजीव जैन यांची आयबी च्या प्रमुख पदी निवड करण्यात आली.
- २०१६: शरद पवार यांनी एमसीए (मुंबई क्रिकेट असोसिएशन) च्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
- १५५६: सम्राट अकबर च्या दरबारातील प्रसिद्ध कवी रहीम यांचा जन्म.
- १७७८: सर हंफ्रे डेव्ही – विद्युत पृथक्करणाद्वारे सोडिअम आणि पोटॅशिअम ही मूलद्रव्ये प्रथमच वेगळी करणारे इंग्लिश भौतिक व रसायनशास्त्रज्ञ (मृत्यू: २९ मे १८२९)
- १८४९: लालमोहन घोष – देशभक्त, काँग्रेसचे १६ वे अध्यक्ष, भारताच्या विविध राजकीय हक्कांकरिता त्यांनी इंग्लंडमधील ब्रिटिश जनतेत प्रचार केला. (मृत्यू: १८ आक्टोबर १९०९)
- १९००: मेरी कार्टराइट – इंग्लिश गणितज्ञ (मृत्यू: ३ एप्रिल १९९८)
- १९०१: यशवंत गोपाळ तथा य. गो. जोशी – मराठी लघुकथाकार व ’प्रसाद’ मासिकाचे संपादक. ’वहिनीच्या बांगड्या’, ’शेवग्याच्या शेंगा’ या त्यांच्या कथांवर चित्रपट काढण्यात आले. ’दुधाची घागर’ हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. (मृत्यू: ७ नोव्हेंबर १९६३)
- १९०५: मुहम्मद हिदायतुल्लाह – भारताचे सहावे उपराष्ट्रपती (२० ऑगस्ट १९७९ – २० ऑगस्ट १९८४) आणि अकरावे सरन्यायाधीश (२५ फेब्रुवारी १९६८ – १६ डिसेंबर १९७०) (मृत्यू: १८ सप्टेंबर १९९२)
- १९११: डी. डी. रेगे – विलक्षण बोलक्या आणि जिवंत व्यक्तिचित्रणाच्या अत्यंत दुर्मिळ हातोटीमुळे अनेक नामवंतांकडून सन्मानित झालेले चित्रकार व लेखक, लोकसभा व विधानसभेतील अनेक राष्ट्रपुरुषांची चित्रे त्यांनी काढलेली आहेत. (मृत्यू: २ सप्टेंबर १९९९)
- १९२४: गोपालन कस्तुरी – पत्रकार, ’द हिन्दू’ चे संपादक (मृत्यू: २१ सप्टेंबर २०१२)
- १९४७: दीपक हळदणकर – दिग्दर्शक व चलचित्रकार (Cinematographer)
- १९७२: जॉन अब्राहम – अभिनेता व मॉडेल
- १७४०: चिमाजी अप्पा – पेशवाईतील पराक्रमी सेनापती. त्यांनी पोर्तुगीजांच्या ताब्यातून पश्चिम किनारा मुक्त केला. मोठ्या निकराची झुंज देऊन पोर्तुगीजांच्या ताब्यातील वसईचा किल्ला व साष्टी बेट जिंकून घेतले. (जन्म: ? ? ????)
- १९०७: लॉर्ड केल्व्हिन – इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ व गणितज्ञ (जन्म: २६ जून १८२४)
- १९२७: राजेन्द्र नाथ लाहिरी – क्रांतिकारक (जन्म: २३ जून १९०१)
- १९३३: थुब्तेन ग्यात्सो – १३ वे दलाई लामा (जन्म: १२ फेब्रुवारी १८७६)
- १९३८: चारुचंद्र बंदोपाध्याय – बंगाली कथालेखक व कादंबरीकार. ’प्रवासी’, ’मॉडर्न’, ’रिव्ह्यू’ इ. पत्रकांच्या संपादनात त्यांचा वाटा होता. (जन्म: ११ आक्टोबर १८७६ – चांचल, माल्डा, बांगला देश)
- १९४५: हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीचे कलाकार विजू खोटे यांचा जन्म.
- १९५६: पं. शंकररावdabholkar व्यास – गायक व संगीतशिक्षक, पं. विष्णू दिगंबर पलुसकर यांचे शिष्य (जन्म: २३ जानेवारी १८९८)
- १९५९: डॉ. भोगराजू पट्टाभी सीतारामय्या – स्वातंत्र्यसैनिक, इतिहासकार आणि काँग्रेसचे नेते. काँग्रेसच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त त्यांनी लिहिलेला ’हिस्ट्री ऑफ द इंडियन नॅशनल काँग्रेस’ हा ग्रंथ महत्त्वपूर्ण आहे. (जन्म: २४ डिसेंबर १८८० – गुंडुगोलानू, पश्चिम गोदावरी, आंध्र प्रदेश)
- १९६५: जनरल कोडेन्डेरा सुबय्या तथा के. एस. थिमय्या – भारतीय भूदलाचे ६ वे सरसेनापती, पद्मभूषण, मवावीरचक्र. १९४८ मdevdatt dabholkarधे काश्मीरमधील पाकिस्तानी आक्रमकांचा पराभव करणार्या भारतीय सैन्याचे ते प्रमुख होते. (जन्म: ३० मार्च १९०६)devdatt dabholkar
- १९८५: मधुसूदन कालेलकर – नाटककार, कथाकार आणि पटकथाकार (जन्म: २२ मार्च १९२४)
- २०००: जाल पारडीवाला – अॅथलॅटिक्सचे पितामह आणि नामवंत प्रशिक्षक (जन्म: ? ? ????)
- २००१: पुणे विद्यापीठाचे कुलगुरू देवदत्त दाभोळकर यांचे निधन. (जन्म: २३ सप्टेंबर १९१९
- २००७: प्रसिद्ध गायक हरिओम शरण यांचे निधन.
- २००८: केंद्रीय जहाजबांधणी मंत्री वेद प्रकाश गोयल यांचे निधन.
- २०१०: देवदत्त दाभोळकर – पुणे विद्यापीठाचे कुलगुरू, शिक्षणतज्ञ, गांधीवादी व समाजवादी (जन्म: २३ सप्टेंबर १९१९)




सावंतवाडी: कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडी ची बैठक दिनांक १४/१२/२०२४ रोजी श्रीराम वाचन मंदिर सावंतवाडी येथे पार पडली.बैठकीत सावंतवाडी रेल्वे टर्मिनसच्या अपूर्ण कामासंदर्भात सखोल चिंतन केले गेले. संघटनेने आतापर्यंत घेतलेल्या मोहिमा त्यात मेल मोहीम, राष्ट्रपतींना पत्र मोहीम आदींचा आढावा घेण्यात आला त्याच बरोबर काही महत्त्वाचे ठराव या बैठकीत पारित केले गेले. त्यात प्रामुख्याने कोकण रेल्वे महामंडळाचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण करून कोकण रेल्वेचा रत्नागिरी विभाग हा मध्य रेल्वेला हस्तांतरित करावा असा एकमुखी ठराव घेण्यात आला, त्यानंतर सावंतवाडी येथील अपूर्ण टर्मिनस साठी जर कोकण रेल्वे महामंडळ आणि राज्य शासन निधीची तरतूद करण्यास असमर्थ असल्यास हे अपूर्ण काम केंद्राच्या अमृत भारत स्थानक योजनेतून करावा त्यासाठी येथील खासदार आणि आमदारांनी योग्य तो पाठपुरावा करावा त्यासाठी संघटनेकडून त्याबद्दल संबंधित लोकप्रतिनिधींना सखोल,अभ्यासपूर्ण निवेदन देण्या संदर्भात चर्चा झाली, सावंतवाडी स्थानकात मंगलोर एक्स्प्रेस, राजधानी एक्स्प्रेस, नागपूर – मडगाव एक्स्प्रेस, गरीबरथ एक्स्प्रेस आदी गाड्यांना येत्या १५ दिवसात थांबा मिळावा, तसेच आजच्या घडीला कोल्हापूर – संकेश्वर – बेळगाव असा रेल्वे मार्गासाठी सर्वे सुरू आहे, काही महिन्यात त्या रेल्वे मार्गाचे काम देखील सुरू होईल त्यामुळे सावंतवाडी ते संकेश्र्वर असा रेल्वे मार्ग होण्यासाठी योग्य तो प्रयत्न करावा जेणे करून कोकणातून बेळगाव आणि कोल्हापूर या दोन्ही ठिकाणी कनेक्टिव्हिटी मिळेल,
आदी ठराव घेण्यात आले. या मागण्या येत्या ३० दिवसात पूर्ण नाही झाल्या तर २६ जानेवारी २०२५ ला रेल रोको करण्यात येईल असे एकमुखी ठरवण्यात आले. त्याच बरोबर गाडी क्रमांक ०११५१/५२ मुंबई – करमळी विशेष गाडीचा सावंतवाडी थांब्यासाठी प्रयत्न करणारे आमदार श्री नितेश राणे आणि कोकण रेल्वेचे क्षेत्रीय प्रबंधक श्री शैलेश बापट यांच्या अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला.
महाराष्ट्र राज्याच्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती महाराष्ट्र आणि कोकण रेल्वे प्रवासी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण आणि सावंतवाडी टर्मिनस संदर्भात मेल मोहीम हाती घेण्यात येणार असल्याचे सचिव मिहिर मठकर यांनी यावेळी सांगितले.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष ऍडव्होकेट संदीप निंबाळकर, सचिव मिहिर मठकर, संघटनेचे मुंबई अध्यक्ष श्री विनोद नाईक, सौ सायली दुभाषी, नंदू तारी,सुभाष शिरसाट , तेजस पोयेकर,स्वप्नील नाईक, रामकृष्ण मुंज, विहंग, भूषण, सागर आदी संघटनेचे पदाधिकारी आणि प्रवासी जनता उपस्थित होते.
आजचे पंचांग
- तिथि-प्रथम – 12:29:35 पर्यंत
- नक्षत्र-आर्द्रा – 25:14:10 पर्यंत
- करण-कौलव – 12:29:35 पर्यंत, तैतुल – 23:39:24 पर्यंत
- पक्ष- कृष्ण
- योग-शुक्ल – 23:21:49 पर्यंत
- वार- सोमवार
- सूर्योदय- 07:07
- सूर्यास्त- 18:02
- चन्द्र-राशि-मिथुन
- चंद्रोदय- 19:00:59
- चंद्रास्त-07:58:00
- ऋतु- हेमंत
- बांगला देशचा स्वातंत्र्यदिन
- भारतीय विजय दिवस
- १४९७: वास्को-द-गामाने केप ऑफ गुड होपला वळसा घातला.
- १७०७: जपान च्या माउंट फुजी या पर्वतावर या दिवशी शेवटचा ज्वालामुखी उद्रेक झाला होता.
- १७७३: अमेरिकन राज्यक्रांती – बॉस्टन टी पार्टी
- १८५४: भारतातील पहिल्या इंजिनीअरिंग कॉलेजची स्थापना पुणे येथे झाली.
- १९०३: मुंबईतील ताजमहाल पॅलेस हॉटेल ग्राहकांसाठी खुले करण्यात आले.
- १९२८: मुंबई-पुणे रेल्वे वाहतूक बोगद्यातून सुरु झाली.
- १९३२: ’प्रभात’चा ’मायामच्छिंद्र’ हा चित्रपट प्रदर्शित झाला.
- १९४५: जपान चे दोन वेळा राहिलेले प्रधानमंत्री फ्युमिमारो कोनी यांनी आत्महत्या केली होती.
- १९४६: थायलँडचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश
- १९५१: हैदराबाद चे सालार जंग संग्रहालयाची स्थापना.
- १९७१: भारत पाक युद्ध – पाक सैन्याची शरणागती, बांगलादेशची निर्मिती
- १९८५: कल्पक्कम येथील ’इंदिरा गांधी अणूसंशोधन केंद्रातील (IGCAR) प्रायोगिक ’फास्ट ब्रीडर रिअॅक्टर’ राष्ट्राला समर्पित
- १९९१: पुर्वीच्या सोविएत संघराज्यातुन (USSR) फुटून कझाकस्तान हा स्वतंत्र देश झाला.
- १९९३: दिल्लीला सर्वांसाठी शिक्षण हे चर्चासत्र पार पडले.
- २००६: अंतराळवीर सुनिता विल्यम यांनी एका सोबत्यासोबत अंतराळयानाच्या बाहेर जाऊन ७ तास ३१ मिनिटात विद्युत प्रणालीची दुरुस्ती केली.
- २००७: बांग्लादेश ने पाकिस्तान पासून मुक्तीचा ३६ वा विजय दिवस साजरा केला होता.
- २०१४: पाकिस्तान च्या पेशावर येथे दहशदवादी हल्ल्यात १५० लोकांचा जीव गेला होता त्यामध्ये १३४ लहान मुले होती
- १७७०: लुडविग व्हान बीथोव्हेन या कर्णबधिर संगीतकाराचा जन्म. मी स्वर्गात नक्कीच संगीत ऐकू शकेन, हे त्याचे अखेरचे शब्द होते. (मृत्यू: २६ मार्च १८२७)
- १७७५: जेन ऑस्टिन – इंग्लिश लेखिका (मृत्यू: १८ जुलै १८१७)
- १८८२: जॅक हॉब्ज – इंग्लिश क्रिकेट खेळाडू (मृत्यू: २१ डिसेंबर १९६३)
- १९१७: सर आर्थर सी. क्लार्क – विज्ञान कथालेखक व संशोधक (मृत्यू: १९ मार्च २००८)
- १९३७: भारतीय कुश्तीपटू हवा सिंग यांचा जन्म.
- १९५९: कर्नाटक चे माजी मुख्यमंत्री एच.डी.कुमारस्वामी यांचा जन्म.
- १९७०: महाराष्ट्राचे लोकसभेचे सदस्य हेमंत श्रीराम पाटील यांचा जन्म.
- १९७७: ध्यानचंद यांचे भाऊ आणि हॉकी चे प्रसिद्ध खेळाडू रूपसिंग यांचे निधन.
- १९८६: भारतीय गायिका हर्षदीप कौर यांचा जन्म.
- १९९३: जगातील सगळ्यात लहान उंचीची महिला ज्योती आमगे यांचा जन्म.
- १९६०: चिंतामण गणेश कर्वे – मराठी कोशकार व लेखक, महाराष्ट्र शब्दकोश, महाराष्ट्र वाक्संप्रदाय कोश, शास्त्रीय परिभाषा कोश यांचे संपादक (जन्म: ४ फेब्रुवारी १८९३)
- १९६५: डब्ल्यू. सॉमरसेट मॉम – इंग्लिश लेखक व नाटककार (जन्म: २५ जानेवारी १८७४)
- १९८०: कर्नल सँडर्स – ’केंटुकी फ्राईड चिकन’ (KFC) चे संस्थापक (जन्म: ९ सप्टेंबर १८९०)
- २०००: सुमारे ४० वर्षे नवनवे चित्तथरारक खेळ व कसरती सादर करुन परदेशातही वाहवा मिळवलेले सर्कस सम्राट काशिनाथ सखाराम तथा बंडोपंत देवल यांचे वयाच्या १०१ व्या वर्षी मिरज येथे निधन झाले. त्यांनी वयाच्या अकराव्या वर्षी सर्कसमधे काम करण्यास सुरूवात केली होती. (जन्म: ? ? १८९९)
- २००४: लक्ष्मीकांत बेर्डे – अभिनेता (जन्म: ३ नोव्हेंबर १९५४)२००२: भारतीय अभिनेत्री कव्वाल शकीला बानो यांचे निधन.
- २००२: सर्कस सम्राट काशिनाथ सखाराम तथा बंडोपंत देवल निधन.
- २००४: लक्ष्मीकांत बेर्डे – अभिनेता (जन्म: ३ नोव्हेंबर १९५४)
- २०१३: भारतीय क्रिकेटर मधुसूदन रेगे यांचे निधन.




नागपुर:महाराष्ट्रातील नवनिर्वाचित सत्ताधारी महायुतीच्या आमदारांचा शपथविधी सोहळा आजच पार पाडला. अपेक्षेप्रमाणे कणकवली मतदारसंघातील भाजपचे आमदार यांनी पहिल्यांदाच मंत्रिपदाची शपथ घेतली. या पार्श्वभूमीवर निलेश राणे यांनी एक पोस्ट ‘एक्स’ माध्यमावर पोस्ट केली आहे. या पोस्ट मध्ये त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
तुम्हाला सांगायला आनंद होतोय, तीन राणे तीन सभागृहात पोहोचले आहेत. एक खासदार, एक मंत्री आणि एक आमदार. तुम्ही २००५ पासून राणे कुटुंबाला संपविण्याचे टोकाचे प्रयत्न केले, काही काळ तुम्हाला यश मिळालं पण आज नितेशला मंत्रीपदाची शपथ घेताना बघितल्यावर एक जाणीव झाली की देव काही काळ परीक्षा घेतो पण नंतर जो प्रमाणिक आहे त्याच्या सोबत उभा राहतो आणि जो कपटी असतो त्याला काही काळ यश मिळते पण नंतर त्याचा बंदोबस्त होतो. उद्धव ठाकरे तुम्ही कुणासोबत चांगले वागलात नाहीत म्हणून तुमच्यावर ही परिस्थिती आली.
राणेंना संपवता संपवता तुमचं काय झालं बघा…
आता तरी कुणासोबत कपटीपणाने वागू नका, तुम्हाला ही मी शुभेच्छा देतो कारणं पडत्या काळात समोरच्याला कमी लेखायचे नसते. तुमच्या मुलांनाही अक्कल द्या जर त्यांची घमेंड उतरली असेल तर, नाहीतर तुमच अजून कठिन होईल.
जय महाराष्ट्र!
श्री. उद्धव ठाकरे,
तुम्हाला सांगायला आनंद होतोय, तीन राणे तीन सभागृहात पोहोचले आहेत. एक खासदार, एक मंत्री आणि एक आमदार. तुम्ही २००५ पासून राणे कुटुंबाला संपविण्याचे टोकाचे प्रयत्न केले, काही काळ तुम्हाला यश मिळालं पण आज नितेशला मंत्रीपदाची शपथ घेताना बघितल्यावर एक जाणीव झाली की… pic.twitter.com/xUVE216rlu
— Nilesh N Rane (Modi ka Parivaar) (@meNeeleshNRane) December 15, 2024




Maharashtra Cabinet list: नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा आज (15 डिसेंबर) महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरमध्ये शपधविधी सोहळा पार पडलाा. ज्यामध्ये एकूण 39 मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. ज्यामध्ये भाजपच्या 20, शिवसेनेच्या 11 आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या 9 मंत्र्यांनी शपथ घेतली
भाजपचे मंत्री
देवेंद्र फडणवीस – मुख्यमंत्री
- चंद्रशेखर बावनकुळे
- राधाकृष्ण विखे-पाटील
- चंद्रकांत पाटील
- गिरीश महाजन
- गणेश नाईक
- मंगलप्रभात लोढा
- जयकुमार रावल
- पंकजा मुंडे
- अतुल सावे
- अशोक उईके
- आशिष शेलार
- शिवेंद्रराजे भोसले
- जयकुमार गोरे
- संजय सावकारे
- नितेश राणे
- आकाश फुंडकर
- माधुरी मिसाळ (राज्यमंत्री)
- पंकज भोयर (राज्यमंत्री)
- मेघना बोर्डिकर (राज्यमंत्री)
शिवसेनेचे मंत्री
एकनाथ शिंदे – उपमुख्यमंत्री
- गुलाबराव पाटील
- दादा भुसे
- संजय राठोड
- उदय सामंत
- शंभूराज देसाई
- संजय शिरसाट
- प्रताप सरनाईक
- भरतशेठ गोगावले
- प्रकाश आबिटकर
- आशिष जैस्वाल (राज्यमंत्री)
- योगेश कदम (राज्यमंत्री)
राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री
अजित पवार – उपमुख्यमंत्री
- हसन मुश्रीफ
- धनंजय मुंडे
- दत्तात्रय भरणे
- आदिती तटकरे
- माणिकराव कोकाटे
- नरहरी झिरवाळ
- मकरंद पाटील
- बाबासाहेब पाटील
- इंद्रनील नाईक (राज्यमंत्री)
कोकणाला ५ मंत्रीपदे
फडणवीसांच्या मंत्रिमंडळात कोकणातील ५ आमदारांना मंत्रीपदे देण्यात आली आहेत. उदय सामंत, नितेश राणे, भरत गोगावले, आदिती तटकरे, योगेश कदम यांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
आजचे पंचांग
- तिथि-पौर्णिमा – 14:33:29 पर्यंत
- नक्षत्र-मृगशिरा – 26:20:36 पर्यंत
- करण-भाव – 14:33:29 पर्यंत, बालव – 25:28:00 पर्यंत
- पक्ष- शुक्ल
- योग-शुभ – 26:02:49 पर्यंत
- वार- रविवार
- सूर्योदय- 07:06
- सूर्यास्त- 18:02
- चन्द्र-राशि-वृषभ – 15:05:00 पर्यंत
- चंद्रोदय- 17:57:59
- चंद्रास्त- चंद्रोस्त नहीं
- ऋतु- हेमंत




सावंतवाडी: कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडीची आज महत्त्वाची बैठक सावंतवाडीतील श्रीराम वाचन मंदीर, सावंतवाडी येथे सायंकाळी ५:३० वाजता आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीत सावंतवाडी रेल्वे स्थानकातील समस्या, अपूर्ण अवस्थेत असलेले सावंतवाडी टर्मिनस, प्रवाश्यांच्या समस्या आदी विषयांवर चर्चा होणार असून या बैठकीत कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या सदस्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कोकण रेल्वे प्रवासी संघटना,सावंतवाडी अध्यक्ष/सचिव यांच्याकडून करण्यात आले आहे.