देवगड: हापूस आंबा, विशेषतः देवगड हापूस, याच्या अस्सलपणाची खात्री करण्यासाठी आणि ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी आता युनिक आयडी (UID) कोड वापरला जाणार आहे. देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या युनिक आयडी कोडद्वारे ग्राहकांना खात्रीशीरपणे खरा देवगड हापूस आंबा मिळू शकेल.
हा कोड आंब्याच्या पेटीवर आणि उत्पादनावर लावला जाईल, ज्यामुळे बनावट किंवा इतर प्रजातींच्या आंब्यांना हापूस म्हणून विकण्याच्या प्रकारांना आळा बसेल. हा उपक्रम या वर्षाच्या हंगामापासून प्रभावीपणे लागू होत असल्याची माहिती आहे, ज्यामुळे ग्राहकांना त्यांच्या खरेदीची पडताळणी करता येईल आणि हापूसच्या नावाने होणारी तोतयागिरी थांबेल.
हापूस आंब्यासाठी युनिक आयडी (UID) प्रक्रिया
ही देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेने सुरू केलेली एक नाविन्यपूर्ण पद्धत आहे, ज्याचा उद्देश ग्राहकांना अस्सल देवगड हापूस आंब्याची खात्री देणे आणि बनावट आंब्यांना बाजारातून हद्दपार करणे हा आहे.
नोंदणी आणि कोड निर्मिती:
देवगडमधील प्रमाणित आंबा उत्पादक आणि विक्रेते यांची नोंदणी संस्थेकडे केली जाते. नोंदणीकृत उत्पादकाला संस्थेकडून त्याच्या उत्पादन क्षमतेच्या संख्येनुसार स्टिकर देण्यात येतील. या स्टिकर वर त्या शेतकर्याची माहिती असलेला UID नंबर असणार आहे.
आंब्यावर कोड लावणे:
हा युनिक आयडी कोड आंब्याच्या पेटीवर किंवा काही प्रकरणांमध्ये थेट आंब्याच्या स्टिकरवर लावला जाईल.
कोडमध्ये उत्पादकाची माहिती, आंब्याचा हंगाम, आणि उत्पत्तीचा तपशील (उदा., देवगड) समाविष्ट असणार आहे.
ग्राहकाद्वारे पडताळणी:
ग्राहक हा कोड स्कॅन करून (QR कोड असल्यास मोबाइलद्वारे) किंवा संस्थेच्या संकेतस्थळावर/अॅपवर टाकून आंब्याची अस्सलता तपासू शकतील.
यामुळे आंबा खरोखर देवगडचा हापूस आहे की नाही, याची खात्री पटेल.

या उपक्रमाचा उद्देश:
- बनावट हापूस आंब्यांची विक्री रोखणे.
- ग्राहकांचा विश्वास वाढवणे आणि हापूसच्या ब्रँडचे संरक्षण करणे.
- उत्पादकांना त्यांच्या मेहनतीचे योग्य मूल्य मिळवून देणे.
आजचे पंचांग
- तिथि-सप्तमी – 28:26:39 पर्यंत
- नक्षत्र-ज्येष्ठा – 25:46:15 पर्यंत
- करण-विष्टि – 15:41:50 पर्यंत, भाव – 28:26:39 पर्यंत
- पक्ष- कृष्ण
- योग-सिद्वि – 18:40:05 पर्यंत
- वार- शुक्रवार
- सूर्योदय- 06:44
- सूर्यास्त- 18:48
- चन्द्र-राशि-वृश्चिक – 25:46:15 पर्यंत
- चंद्रोदय- 24:55:00
- चंद्रास्त- 10:58:00
- ऋतु- वसंत
- आंतरराष्ट्रीय वन दिवस
- 1680 : शिवाजी महाराजांनी कुलाबा रायगड किल्ल्याची बांधणी सुरू केली.
- 1858 : ब्रिटीश जनरल सर ह्यू रोज यांनी झाशीला वेढा घातला.
- 1871 : ओटो फॉन बिस्मार्क जर्मनीचे चांसलर बनले
- 1935 : शाह रजा पेहलवी यांनी पर्शियाचे नाव इराण ठेवण्याची मागणी केली.
- 1977 : भारतातील आणीबाणी संपुष्टात आली.
- 1780 : अमेरिकेने मॉस्को ऑलिम्पिक खेळांवर बहिष्कार टाकला.
- 1990 : नामिबियाला दक्षिण अफ्रिकेपासून स्वातंत्र्य मिळाले.
- 2000 : भारताचा इनसॅट 3B उपग्रह एरियन 505 ने कौरॉक्स, फ्रेंच गयाना येथून यशस्वीरित्या प्रक्षेपित केला.
- 2003 : जळगाव महानगरपालीकेची स्थापना.
- 2006 : सोशल मीडिया साइट ट्विटर ची स्थापना झाली.
- 1768 : ‘जोसेफ फोरियर’ – फ्रेन्च गणितज्ञ व भौतिकशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 16 मे 1830)
- 1847 : ‘बाळाजी प्रभाकर मोडक’ – मराठी लेखक,त्यांनी विज्ञान व इतिहास ह्या विषयांवर ग्रंथलेखन केले यांचा जन्म. (मृत्यू: 2 डिसेंबर 1906)
- 1887 : ‘मानवेंद्रनाथ रॉय’ – देशभक्त, क्रांतिकारक व भारतातील कम्यूनिस्ट पक्षाचे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू: 26 जानेवारी 1954)
- 1916 : ‘बिस्मिल्ला खान’ – भारतरत्न शहनाईवादक यांचा जन्म. (मृत्यू: 21 ऑगस्ट 2006)
- 1923 : ‘निर्मला श्रीवास्तव’ – सहजयोगच्या संस्थापिका आणि अध्यात्म गुरु यांचा जन्म. (मृत्यू: 23 फेब्रुवारी 2011)
- 1978 : ‘राणी मुखर्जी’ – अभिनेत्री यांचा जन्म.
- 1973 : कोशकार ‘यशवंत रामकृष्ण दाते’ – यांचे निधन. (जन्म: 17 एप्रिल 1891)
- 1973 : आतुन कीर्तन वरुण तमाशा या नाटकाची तालीम सुरू असताना नटवर्य ‘शंकर घाणेकर’ यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
- 1985 : सर ‘मायकेल रेडग्रेव्ह’ – ब्रिटिश अभिनेता यांचे निधन. (जन्म: 20 मार्च 1908)
- 2001 : ‘चुंग जू-युंग’ – दक्षिण कोरियन कंपनी ह्युंदाई ग्रुप चे संस्थापक यांचे निधन. (जन्म: 25 नोव्हेंबर 1915)
- 2003 : ‘शिवानी’ – भारतीय लेखक यांचे निधन. (जन्म: 17 ऑक्टोबर 1923)
- 2005 : ‘दिनकर द. पाटील’ – चित्रपट दिग्दर्शक, पटकथा व संवाद लेखक यांचे निधन. (जन्म: 6 नोव्हेंबर 1915)
- 2010 : पांडुरंग लक्ष्मण तथा ‘बाळ गाडगीळ’ – अर्थशास्त्रज्ञ व विनोदी लेखक यांचे निधन. (जन्म: 29 मार्च 1926)
Mumbai Local: लोकलने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबईकरांचा प्रवास आता आणखी सुसाट होणार आहे. मुंबईसाठी उच्च दर्जाच्या 238 लोकल गाड्या तयार करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. यामुळे लोकलची गर्दी कमी होण्यासही मदत होणार आहे. त्यामुळे लाखो मुंबईकरांना याचा फायदा होणार आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी राज्यसभेत मुंबई लोकलविषयी महत्वाची माहिती दिली आहे. ‘मुंबईसाठी उच्च दर्जाच्या 238 लोकल गाड्या तयार करण्यात येणार आहेत. याबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी नव्या तंत्रज्ञानाच्या डब्यांविषयी चर्चा झाली आहे. तसेच मुंबईतील जुन्या गाड्या आणि डबे बदलण्यावर भर देण्यात येणार आहे’ अशी माहितीही वैष्णव यांनी दिली आहे. रेल्वे मंत्रालयाच्या या निर्णयाचा फायदा लाखो मुंबईकरांना होणार आहेकमी भाड्यात उत्तम सेवा देण्याचा प्रयत्न
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सेवेबद्दलही माहिती दिली आहे. ‘प्रवासाचा खर्च प्रति किलोमीटर 1.38 रुपये आहे, मात्र आम्ही प्रवाशांकडून फक्त 73 पैसे घेतो. म्हणजेच आम्ही 47 % अनुदान देतो. आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये प्रवाशांना 57 हजार कोटींचे अनुदान दिले होते, ते 2023-24 मध्ये वाढून सुमारे 60 हजार कोटी झाले होते. आमचे ध्येय कमी भाड्यात सुरक्षित आणि उत्तम सेवा पुरवणे हे आहे’ अशी माहितीही वैष्णव यांनी दिली आहे..
- आजचे पंचांग
- तिथि-षष्ठी – 26:48:21 पर्यंत
- नक्षत्र-अनुराधा – 23:32:11 पर्यंत
- करण-गर – 13:47:24 पर्यंत, वणिज – 26:48:21 पर्यंत
- पक्ष- कृष्ण
- योग-वज्र – 18:18:18 पर्यंत
- वार- गुरूवार
- सूर्योदय- 06:45
- सूर्यास्त- 18:48
- चन्द्र-राशि-वृश्चिक
- चंद्रोदय- 24:00:00
- चंद्रास्त- 10:11:00
- ऋतु- वसंत
- जागतिक चिमणी दिवस
- जागतिक मौखिक स्वास्थ्य दिवस
- 1602 : डच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली.
- 1739 : नादिरशहाने दिल्ली बरखास्त केली. मयुरासनासह नवरत्न लुटून इराणला पाठवले.
- 1854 : रिपब्लिकन पार्टी ऑफ अमेरिकाची स्थापना झाली.
- 1904 : चर्च ऑफ इंग्लंडचे धर्मगुरू चार्ल्स फ्रीर अँड्र्यूज हे महात्मा गांधींसोबत स्वातंत्र्य चळवळीत भाग घेण्यासाठी भारतात आले.
- 1916 : अल्बर्ट आइनस्टाईन यांनी सापेक्षता सिद्धांत मांडला.
- 1917 : महाडचा चवदार तळे सत्याग्रह सुरु झाला.
- 1956 : ट्युनिशियाला फ्रान्सकडून स्वातंत्र्य मिळाले.
- 1982 : फ्रान्सने अणुचाचणी केली.
- 2015 : सूर्यग्रहण, रात्र व दिवस सारखा असण्याचा काळ, आणि चंद्र पृथ्वीच्या सगळ्यात जवळ येणे हे सर्व एकाच दिवशी झाले.
- 1828 : ‘हेनरिक इब्सेन’ – नॉर्वेजीयन नाटककार आणि कवी यांचा जन्म. (मृत्यू: 23 मे 1906)
- 1908 : ‘मायकेल रेडग्रेव्ह’ – ब्रिटिश अभिनेता सर यांचा जन्म. (मृत्यू: 21 मार्च 1985)
- 1920 : ‘वसंत कानेटकर’ – नाटककार यांचा जन्म. (मृत्यू: 31 जानेवारी 2000)
- 1966 : ‘अलका याज्ञिक’ – पार्श्वगायिका यांचा जन्म.
- 1973 : ‘अर्जुन अटवाल’ – भारतीय गॉल्फ़र खेळाडू यांचा जन्मदिन.
- 1726 : ‘आयझॅक न्युटन’ – इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ,गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ सर यांचे निधन. (जन्म: 25 डिसेंबर 1642)
- 1925 : ब्रिटीश मुत्सदी आणि भारताचे व्हॉइसराय लॉर्ड कर्झन यांचे निधन. (जन्म: 11 जानेवारी 1859)
- 1956 : मराठी नावकाव्याचे प्रणेते बा. सी. मर्ढेकर यांचे निधन. (जन्म: 1 डिसेंबर 1909)
- 1970 : माजी भारतीय हॉकी खेळाडू जयपालसिंग मुंडा यांचे निधन.
- 2014 : भारतीय पत्रकार आणि लेखक खुशवंत सिंग यांचे निधन. (जन्म: 2 फेब्रुवारी 1915)
Konkan Railway: उन्हाळी सुट्टी साठी कोकण रेल्वे मार्गावर होणारी अतिरिक्त गर्दी विचारात घेऊन कोकण रेल्वेने मध्य रेल्वेच्या समन्वयाने काही विशेष गाडय़ा कोकण रेल्वे मार्गावर चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्यांचा तपशील खालीलप्रमाणे आहे.
१) गाडी क्रमांक ०११५१ / ०११५२ मुंबई सीएसएमटी- करमाळी. – मुंबई सीएसएमटी स्पेशल (साप्ताहिक):
गाडी क्रमांक ०११५१ मुंबई सीएसएमटी – करमाळी स्पेशल (साप्ताहिक) दर गुरुवारी, १०/०४/२०२५ ते ०५/०६/२०२५ पर्यंत मुंबई सीएसएमटीहून ००:२० वाजता सुटेल आणि ट्रेन त्याच दिवशी दुपारी १:३० वाजता करमाळीला पोहोचेल.
गाडी क्रमांक ०११५२ करमाळी. – मुंबई सीएसएमटी स्पेशल (साप्ताहिक) दर गुरुवारी, १०/०४/२०२५ ते ०५/०६/२०२५ पर्यंत करमाळीहून दुपारी १:१५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ०३:४५ वाजता मुंबई सीएसएमटीला पोहोचेल.
ही गाडी दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिविम या स्थानकांवर थांबेल.
डब्यांची रचना : एकूण २२ कोच : दोन टायर एसी – ०१ कोच, थ्री टायर एसी – ०५ कोच, स्लीपर – १० कोच, जनरल – ०४ कोच , SLR – ०२
२) गाडी क्रमांक ०११२९ / ०११३० लोकमान्य टिळक (टी) – करमाळी – लोकमान्य टिळक (टी) विशेष (साप्ताहिक):
गाडी क्रमांक ०११२९ लोकमान्य टिळक (टी) – करमाळी विशेष साप्ताहिक १०/०४/२०२५ ते ०५/०६/२०२५ पर्यंत दर गुरुवारी लोकमान्य टिळक (टी) येथून २२:१५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १२:०० वाजता करमाळीला पोहोचेल.
गाडी क्रमांक ०११३० करमाळी – लोकमान्य टिळक (टी) विशेष साप्ताहिक ११/०४/२०२५ ते ०६/०६/२०२५ पर्यंत दर शुक्रवारी करमाळीहून दुपारी २:३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ०४:०५ वाजता लोकमान्य टिळक (टी) येथे पोहोचेल.
ही गाडी ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिवि या स्थानकांवर थांबेल.
डब्यांची रचना : एकूण १९ एलएचबी कोच : फर्स्ट एसी – ०१ कोच, टू टायर एसी – ०२ कोच, थ्री टायर एसी – ०६ कोच, स्लीपर – ०८ कोच, जनरेटर कार – ०२
३) गाडी क्रमांक ०१०६३/०१०६४ लोकमान्य टिळक (टी) – तिरुवनंतपुरम उत्तर – लोकमान्य टिळक (टी) विशेष साप्ताहिक:
गाडी क्रमांक ०१०६३ लोकमान्य टिळक (टी) – तिरुवनंतपुरम उत्तर विशेष साप्ताहिक ही गाडी दर गुरुवारी, ०३/०४/२०२५ ते २९/०५/२०२५ पर्यंत लोकमान्य टिळक (टी) येथून दुपारी ४:०० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी २२:४५ वाजता तिरुवनंतपुरम उत्तर येथे पोहोचेल.
गाडी क्रमांक ०१०६४ तिरुवनंतपुरम उत्तर – लोकमान्य टिळक (टी) विशेष साप्ताहिक ही गाडी ०५/०४/२०२५ ते ३१/०५/२०२५ पर्यंत दर शनिवारी तिरुवनंतपुरम उत्तर येथून सायंकाळी ४:२० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी लोकमान्य टिळक (टी) येथे ००:४५ वाजता पोहोचेल.
ही गाडी ठाणे, पनवेल, पेण, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम, करमाळी, मडगाव जंक्शन, कारवार, गोकर्ण रोड, कुमठा, मुर्डेश्वर, भटकळ, मुकुंदोब रोड, मुकुंदोब रोड, कुंडुरा रोड सुरथकल, मंगळुरु जं., कासरगोड, कन्नूर, कालिकत, तिरूर, शोरानूर जं., त्रिसूर, एर्नाकुलम टाउन, कोट्टायम, तिरुवल्ला, चेंगन्नूर, मावेलीकारा, कायनकुलम आणि कोल्लम जं. या स्थानकांवर थांबेल.
डब्यांची रचना : एकूण २२ एलएचबी कोच : टू टायर एसी – ०१ कोच, थ्री टायर एसी – ०६ कोच, स्लीपर – ०९ कोच, जनरल – ०४ कोच, जनरेटर कार – ०१, एसएलआर – ०१.
New Traffic Rules Fine : बेदरकार वाहतूक करून नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर जरब बसवण्यासाठी सरकारने आता कडक पाऊले उचलली आहेत. दिनांक 1 मार्च 2025 पासून वाहतूक नियमांचे उल्लंघन करताना पकडलेल्या गुन्हेगारांना वाढीव दंड, संभाव्य तुरुंगवास आणि अनिवार्य समुदाय सेवेसह कठोर परिणामांना सामोरे जावे लागेल. वाहतूक नियम दंडात आता दुरुस्ती करण्यात आली असून या दुरुस्तीचे उद्दिष्ट निष्काळजीपणे वाहन चालवण्याच्या वर्तनांना आळा घालणे आणि देशभरातील रस्ते सुरक्षा वाढवणे हे आहे.
नियमभंग करुन वाहन चालवल्याबद्दलच्या दंडांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. सुरुवातीला, अशा गुन्ह्यांसाठी 1,000 ते 1,500 रुपयांपर्यंत दंड आकारला जात होता. आता नवीन नियमांनुसार, प्रथमच नियम मोडणारांसाठी 10 हजार रुपयांपर्यंत दंड वाढला आहे आणि सहा महिन्यांच्या तुरुंगवासही भोगावा लागू शकतो. ज्यांच्या नियमभंग करुन वाहन चालवताना वारंवार पकडले जाणाऱ्यांसाठी, दंडाची रक्कम 15 हजारांपर्यंत वाढली आहे. तर दोन वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा ही होऊ शकतो.
असे असणार सुधारित आहे दंड
वैध परवाना किंवा विमा यासारख्या आवश्यक कागदपत्रे नसताना वाहन चालवल्यास अनुक्रमे 5 हजार आणि 2 हजार रुपये दंड आकारला जाईल.
याच नियमभंगाची पुनरावृत्ती करणाऱ्यांना अतिरिक्त दंड बसू शकतो, त्यांना तीन महिन्यांपर्यंत तुरुंगवास भोगावा लागू शकतो
विशेष म्हणजे, प्रदूषण प्रमाणपत्र (PoC) नसल्याबद्दलचा दंड 10 हजार रुपयांपर्यंत वाढला आहे. संभाव्यत: सहा महिन्यांचा तुरुंगवास होऊ शकतो.
ओव्हरलोडिंग वाहनचालकांकडून जर नियमभंग झाला तर पूर्वी 2 हजार रुपये दंड होता, परंतु आता तो 20 हजारांपर्यंत वाढला आहे.
अल्पवयीन मुलांसंदर्भात वाहतूक नियमभंगाच्या प्रकरणात दंड आणखीनच कठोर करण्यात आला आहे. त्यांना 25 हजारांचा दंड, तीन वर्षांपर्यंतचा तुरुंगवास, वाहन नोंदणी रद्द करणे आणि वयाच्या 25 व्या वर्षापर्यंत परवाना मिळणार नाही असा नियम आहे
मद्यपान करून वाहन चालवल्याबद्दल सुधारित दंडामध्ये आता 10 हजार रुपये दंड आणि पहिल्या गुन्ह्यासाठी 15 हजार रुपये आणि त्यानंतरच्या उल्लंघनासाठी दोन वर्षांपर्यंत तुरुंगवास, 10,000 रुपये दंड आणि सहा महिन्यांच्या तुरुंगवासाचा समावेश आहे.
हेल्मेटशिवाय वाहन चालवल्यास 1,000 रुपये दंड आणि तीन महिन्यांसाठी परवाना निलंबन
वाहन चालवताना मोबाईल फोन वापरल्यास दंडाची रक्कम 5 हजार रुपये झाली आहे.
वैध कागदपत्रांशिवाय वाहन चालवल्यास लायसन्स नसल्यास 5 हजार रुपये आणि विमा नसल्यास 2 हजार रुपये दंड होऊ शकतो.
आजचे पंचांग
- तिथि-पंचमी – 24:40:13 पर्यंत
- नक्षत्र-विशाखा – 20:50:54 पर्यंत
- करण-कौलव – 11:28:10 पर्यंत, तैतुल – 24:40:13 पर्यंत
- पक्ष- कृष्ण
- योग-हर्शण – 17:36:38 पर्यंत
- वार- बुधवार
- सूर्योदय- 06:46
- सूर्यास्त- 18:47
- चन्द्र-राशि-तुळ – 14:07:31 पर्यंत
- चंद्रोदय- 23:04:59
- चंद्रास्त- 09:30:00
- ऋतु- वसंत
- राष्ट्रीय पोल्ट्री दिवस
- 1822 : अमेरिकेतील ‘बॉस्टन’ हे शहर म्हणून प्रस्थापित करण्यात आले.
- 1848 : लोकहितवादी ‘गोपाळ हरी देशमुख’ यांच्या शतपत्रांपैकी पहिले पत्र मुंबईतील प्रभाकर वृत्तपत्रात प्रकाशित झाले.
- 1932: ऑस्ट्रेलिया मधील सिडनी हार्बर ब्रिज सुरू झाला, याचे काम 28 जुलै 1923 रोजी सुरु करण्यात आले होते.
- 1972 : भारत -बांगलादेश यांच्यात मैत्री, सहकार्य आणि शांतता हा 25 वर्षांचा करार करण्यात आला.
- 1998 : भारतीय जनता पार्टीचे सदस्य अटल बिहारी वाजपेयी यांची दुसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून निवड झाली.
- 2003: अमेरिकेचे अध्यक्ष जॉर्ज बुश यांनी इराकवर युद्ध घोषित केले.
- 1821 : सर ‘रिचर्ड बर्टन’ – ब्रिटिश लेखक, कवी, संशोधक, मुत्सद्दी आणि गुप्तहेर यांचा जन्म. (मृत्यू: 20 ऑक्टोबर 1890)
- 1897 : शंकर विष्णू तथा दादा चांदेकर – चित्रपट संगीतकार यांचा जन्म.
- 1900 : ‘जीन फ्रेडरिक जोलिओट’ – मूलद्रव्याच्या समस्थानिकांच्या (Isotopes) शोधाबद्दल नोबेल पारितोषिक मिळवणारे फ्रेन्च पदार्थवैज्ञानिक यांचा जन्म. (मृत्यू: 14 ऑगस्ट 1958)
- 1924 : ‘फकीरचंद कोहली’ – पद्म भूषण, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे संस्थापक (TCS)
- 1936 : ‘ऊर्सुला अँड्रेस’ – स्विस अभिनेत्री यांचा जन्म.
- 1938 : ‘सई परांजपे’ – बालनाटय लेखिका आणि नामवंत चित्रपट दिग्दर्शिका यांचा जन्म.
- 1982 : ‘एड्वार्डो सावेरीन’ – फेसबुक चे सहसंस्थापक यांचा जन्म.
- 1674 : ‘काशीबाई’ – ‘शिवाजी महाराजांच्या’ सर्वात धाकट्या यांचे निधन.
- 1884 : ‘केरुनाना लक्ष्मण छत्रे’ – आधुनिक गणित व खगोलशास्त्र यांचे अभ्यासक यांचे निधन. (जन्म: 16 मे 1825)
- 1978 : ‘एम. ए. अय्यंगार’ – भारतीय वकील आणि राजकारणी यांचे निधन. (जन्म: 4 फेब्रुवारी 1891)
- 1982 : ‘जीवटराम भगवानदास’ तथा आचार्य कॄपलानी स्वातंत्र्यसेनानी, गांधीवादी, समाजवादी आणि पर्यावरणवादी यांचे निधन. (जन्म: 11 नोव्हेंबर 1888)
- 1998 : ‘इ. एम. एस. नंबूद्रीपाद’ – केरळचे माजी मुख्यमंत्री व भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते यांचे निधन. (जन्म: 13 जून 1909)
- 2002 : ‘नरेन ताम्हाणे’ – यष्टीरक्षक आणि फलंदाज यांचे निधन. (जन्म: 4 ऑगस्ट 1931)
- 2005 : ‘जॉन डेलोरेअन’ – डेलोरेअन मोटर कंपनी चे सहसंस्थापक यांचे निधन. (जन्म: 6 जानेवारी 1925)
- 2008 : सर आर्थर सी. क्लार्क – विज्ञान कथालेखक व संशोधक यांचे निधन. (जन्म: 16 डिसेंबर 1917)
Bank Holiday March 2025 : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सरकारी व्यवहार करणाऱ्या सर्व बँकांना ३१ मार्च २०२५ ला बँका सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. ३१ मार्च रोजी ईद उल फित्र (रमजान ईद) असल्याने यादिवशी सार्वजनिक सुट्टी असते. पण आर्थिक व्यवहारातील गोंधळ टाळण्यासाठी आरबीआयने हा निर्णय घेतला आहे. इकॉनॉमिक्स टाईम्सने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
रमजान ईद निमित्त हिमाचल प्रदेश आणि मिझोराम वगळता सर्व राज्यांमध्ये ३१ मार्च रोजी बँक हॉलिडे जाहीर करण्यात आला होता. ३१ मार्च २०२५ रोजी संपणाऱ्या २०२४-२५ या आर्थिक वर्षात पावत्या आणि देयकांसह सर्व सरकारशी संबंधित आर्थिक व्यवहारांचा योग्य हिशेब करण्यासाठी या दिवसाची सुट्टी रद्द करण्यात आली आहे.
३१ मार्च २०२५ रोजी कोणत्या बँकिंग सुविधा सुरू असणार?
प्राप्तिकर, जीएसटी, सीमाशुल्क आणि उत्पादन शुल्कासह सरकारी कर देयके.
पेन्शन पेमेंट आणि सरकारी अनुदाने
सरकारी वेतन आणि भत्त्यांचे वितरण
सरकारी योजना आणि अनुदानांशी संबंधित सार्वजनिक व्यवहार











