Konkan Railway | उन्हाळी हंगामासाठी कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाडी

   Follow us on        
Konkan Railway News:या वर्षी उन्हाळी सुट्टीत कोकणात आपल्या गावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी एक खुशखबर आहे. या वर्षंहीच्या उन्हाळी हंगामात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने कोकण रेल्वे मार्गावर एक  विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तपशील खालीलप्रमाणे आहे.
गाडी क्रमांक ०९०५७/०९०५८ उधना जंक्शन. – मंगळुरू जं. – उधना जं. द्वि-साप्ताहिक विशेष प्रवासी भाड्यावर:
गाडी क्र. ०९०५७ उधना जं. – मंगळुरू जं. ही  द्वि-साप्ताहिक स्पेशल उधना जंक्शन येथून दिनांक  ०७/०४ /२०२४  ते ०५/०६/२०२४ पर्यंत दर बुधवार आणि रविवारी रात्री ८ वाजता निघेल ती  मंगळुरू जंक्शनला  दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ७ वाजता पोहोचेल.
गाडी क्र. ०९०५८ मंगळुरु जं. – उधना जं. द्वि-साप्ताहिक स्पेशल  ही गाडी मंगळुरु जंक्शन येथून दिनांक  ०८/०४/२०२४ ते ०६/०६/२०२४ पर्यंत गुरुवार आणि सोमवारी रात्री १० वाजता वाजता निघून ती उधना जंक्शनला दुसऱ्या दिवशी २१:०५ वाजता पोहोचेल.
ही गाडी वलसाड, वापी, पालघर, वसई रोड, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम, करमाळी, मडगाव जं., कानाकोना, कारवार, अंकोला, गोकर्ण रोड, कुमता, मुर्डेश्वर, भटकळ, मुकांबिका रोड बयंदूर, कुंदापुरा, उडुपी, मुल्की आणि सुरतकल स्टेशन येथे थांबेल.
रचना : एकूण 23 कोच = 2 टियर एसी – 01 कोच, 3 टियर एसी – 03 कोच, स्लीपर – 15 कोच, जनरल – 02 डबे, SLR – 02.
प्रवाशांनी कृपया सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Loading

Facebook Comments Box

“ती बंदूक माझ्याकडे….” दीपक केसरकरांनी दिले ‘त्या’ बंदुकीबद्दल स्पष्टीकरण

   Follow us on        
सावंतवाडी: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर  शस्त्रधारकांना शस्त्र जमा करण्यासंबंधी  काढलेल्या नोटिसीत  शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचे नाव असल्याने खळबळ माजली आहे. मात्र या बाबत दीपक केसकर यांनी आता साष्टीकरण दिले आहे.
मंत्री केसरकर यांनी याबाबत प्रसिध्दी पत्र देऊन बाजू स्पष्ट केली आहे. त्यात म्हटले आहे की, माझ्याकडे कुठल्याही प्रकारची बंदुक नाही, वडिलांच्या कालावधीत त्यांच्याकडे दोन बंदुकांचा परवाना होता. त्यातील एक बंदूक ही वारसाने प्राप्त झाली व एक बंदूक माझ्या वडील बंधूंना प्राप्त झाली. वडिलांची आठवण म्हणून ही शस्त्रात्रे आजही पुजण्यासाठी आम्ही वापरतो. गेल्या पन्नास वर्षांत त्या शस्त्रांचा वापर झाला नाही. निवडणूक काळात शस्त्रे जमा करण्याचे आदेश पारित होतात. वेळोवेळी आम्हीही ती जमा केली आहेत. परंतु, ‘मंत्री केसरकर यांच्यासह १३ जणांना शस्त्र जमा करण्याचे आदेश’ अशी बातमी चुकीची असून जनतेची दिशाभूल करणारी आहे. नव्याने झालेल्या कोर्टाच्या निर्णयानुसार सर्वांची शस्त्रे सरसकट जमा करणे योग्य नसल्याने, योग्य कारण असल्यास ती हत्यारे जमा न करण्याबाबत बंधन प्रशासनावर घालण्यात आले आहे. परंतु, जिल्हा प्रशासनाने सर्व शस्त्रधारकांना नोटीसा दिल्या आहेत. केवळ शस्त्राचा परवाना असल्याने अशाप्रकारची बदनामी होणे गैर आहे, असे मंत्री केसरकर यांनी पत्रात म्हटले आहे.
तालुक्यातील १३ जणांची यादीमध्ये नावे असून सर्वांत शेवटचे नाव दीपक केसरकर यांचे आहे. त्यामुळे आता नेमक्या कोणत्या कारणासाठी त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे, अशी शंका उपस्थित झाली आहे. एखाद्या दंगलीत समावेश होता, की गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे, की एखाद्या प्रकरणात जामीनावर मुक्तता झाल्यामुळे त्यांचे नाव यादीत आहे, असे अनेक प्रश्न विचारले जात होते त्यावर दीपक केसकर यांनी स्पष्टीकरण दिले आहे. .

Loading

Facebook Comments Box

Konkan Railway | अजून एक गाडी नव्या स्वरूपात, एलएचबी डब्यांसह धावणार

Konkan railway news : रेल्वेने जुन्या प्रकारातील ICF डब्यांसह धावणाऱ्या गाड्या आता आधुनिक प्रणालीच्या लिंके हॉफमन बुश (एलएचबी) मध्ये रूपांतरित करण्याचा सपाटा लावला आहे. त्याचाच एक भाग म्हणून  कोकण रेल्वेमार्गावरून जुन्या प्रकारातील डब्यांसह धावणारी अजून एक लांब पल्ल्याची एक्सप्रेस गाडी आता  लिंके हॉफमन बुश (एलएचबी) डब्यांसह धावणार आहे. गाडी क्रमांक १६३३७/१६३३८ ओखा एर्नाकुलम ओखा एक्सप्रेस ही गाडी या महिन्याच्या ५ तारखेपासून एलएचबी डब्यांसह चालविण्यात येणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेतर्फे देण्यात आली आहे.
वेगवान प्रवासासाठी आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी इंटिग्रल कोच फॅक्टरी या जुन्या प्रकारातील डब्याचे रुपांतर एलएचबी डब्यात केले जात आहे. भारतीय रेल्वेच्या प्रत्येक विभागात ही प्रक्रिया सुरू असून, शेकडो रेल्वेगाड्या एलएचबी डब्यांसह धावत आहेत. आता कोकण रेल्वेवरील एलएचबी डबे असलेल्या रेल्वेगाड्यांच्या संख्येत वाढ करण्यात येत आहे.
गाडी क्रमांक १६३३७ ओखा एर्नाकुलम एक्सप्रेस दिनांक ८ एप्रिलपासून ओखा येथून तर गाडी क्रमांक १६३३८ एर्नाकुलम ओखा एक्सप्रेस दिनांक 5 एप्रिलपासून एर्नाकुलम येथून एलएचबी डब्यांसह धावणार आहे.  एक्सप्रेस गाड्यांना एलएचबी डबे जोडल्याने रेल्वे गाड्यांच्या डब्याच्या रचनेत थोडा बदल  झाला  आहे. सुधारित डब्यांच्या संचनेनुसार वातानुकूलित द्वितीय श्रेणी २ डबे,  वातानुकूलित इकॉनॉमी तृतीय श्रेणीचे ३ डबे, १२ शयनयान डबे, सामान्य २ डबे, जनरेटर कार एक डबा, एसएलआर डबा एक, पॅन्ट्री कार एक असे एकूण २२ डबे असणार आहेत, अशी माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली.

Loading

Facebook Comments Box

शक्तिपीठ महामार्ग | आता सावंतवाडीतील शेतकर्‍यांचाही विरोध

सावंतवाडी :गोवा ते नागपूर असा 805 किलोमीटर लांबीचा प्रस्तावित शक्तिपीठ महामार्ग याला कोल्हापूर सांगली लातूर येथून प्रचंड विरोध होत आहे. आता त्याच बरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील गावांमध्ये देखील सरकारच्या शक्तिपीठ महामार्ग निर्णयाबद्दल नाराजी दिसून येऊ लागली आहे. अखिल भारतीय किसान सभेच्या गिरीश फोंडे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने आज आंबोली, गेळे, नेनेवाडी, पारपोली, तांबोळी, असनिये या सहित अन्य गावांना भेटी दिल्या. ग्रामस्थ व ग्रामपंचायत यांचे पदाधिकारी यांच्याशी झालेल्या चर्चेमध्ये महामार्गामध्ये प्रस्तावित जमीनधारक व ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी आम्हाला या संपूर्ण प्रक्रियेबद्दल महाराष्ट्र सरकारने अंधारात ठेवल्याचे ठासून सांगितले. काही गावांमध्ये शासनाच्या सूचनेनुसार 28 मार्चपूर्वी ग्रामस्थांनी हरकती दाखल केल्याचे दिसून आले. या सर्व गावांमध्ये लवकरच ग्रामसभा घेण्यात येणार आहेत. त्यानंतर सर्व गावांचा मिळून सावंतवाडी तालुक्याचा तालुका मेळावा घेण्याचे नियोजन आहे. या अगोदर खनिज संपत्तीच्या खाणींकरिता खाजगी कंपन्यांकडून शासनाची हात मिळवणी करून गावकर यांच्या जमिनी बळकावण्याचे प्रयत्न झाले आहेत. शक्तिपीठ महामार्ग म्हणजे खनिज संपत्ती यांच्या खाणी तयार करून त्याची मालवाहतूक करण्यासाठीची कंत्राटदार व भांडवलदारांची सोय असल्याचे शेतकऱ्यांनी शिष्टमंडळाला सांगितले. पश्चिम घाटातून जाणाऱ्या रस्त्यामुळे पर्यावरण जैवविविधता धोक्यात येणार आहे अशी चिंता शेतकऱ्यांनी व्यक्त केली.कोल्हापूर सांगली लातूर येथील शेतकरी जर विरोध करत असतील तर त्याबरोबर सिंधुदुर्गचे शेतकरी देखील सोबत असतील असेही काही शेतकऱ्यांनी सांगितले.

या शिष्टमंडळामध्ये अखिल भारतीय किसान सभेचे राज्य कौशल सदस्य गिरीश फोंडे, पर्यावरण तज्ञ काका भिसे,सामाजिक कार्यकर्ते सतीश लळीत, कोल्हापूरचे शेतकरी सुधाकर पाटील, के डी पाटील, तात्यासो पाटील, बाळासाहेब पाटील, प्रवीण नार्वेकर जयसिंग पाटील हे सहभागी झाले होते.

लवकरच या गावांच्या स्वतंत्र सभा व तालुका मेळावा घेण्याचे नियोजन सुरू आहे.

Loading

Facebook Comments Box

आयआरसीटीसी ॲपवरून मर्यादेपेक्षा अधिक तिकीटे काढून विक्री; एकाला अटक

   Follow us on        

कणकवली, दि.०१ : रेल्‍वे तिकीटांचा काळाबाजार केल्‍याप्रकरणी आज कणकवलीतून रेल्‍वे पोलिसांनी एकाला अटक केली. उद्या त्याला येथील न्यायालयात सादर केले जाणार असल्‍याची माहिती रेल्‍वे पोलिसांकडून देण्यात आली आहे.

रेल्‍वे पोलिसांनी बाजारपेठेतील एका दुकानामध्ये कामाला असलेल्‍या तरूणाला सोमवारी दुपारी ताब्‍यात घेतले. त्‍या तरूणाने आयआरसीटीसी ॲपवरून रेल्‍वेची मर्यादेपेक्षा अधिक तिकीटे काढून ग्राहकांना विक्री केली होती. याबाबत आयआरसीटीसीकडून रेल्‍वे पोलिसांना कळविण्यात आले. त्‍यानंतर रेल्‍वे तिकीटे काढून देणाऱ्या त्या संशयित तरूणाची माहिती घेऊन सोमवारी त्याला ताब्‍यात घेण्यात आले.

रेल्‍वे तिकीट काळाबाजार प्रकरणी एकाला ताब्‍यात घेतल्याचे वृत्त समजल्‍यानंतर शहरातील इतर तिकीट विक्री एजंटांमध्ये खळबळ उडाली आहे. दरम्‍यान रेल्‍वे तिकीट विक्री आणि बुकींग प्रकरणी रेल्‍वे पोलिसांकडून संशयित तरूणाची चौकशी सुरू आहे. तिकीट बुकिंग साठी वापरला जाणारा मोबाईल, कॉम्प्युटर आदी साहित्‍य देखील पोलिसांनी ताब्‍यात घेतले आहे. या संशयित अधिक चौकशी करून त्‍याला मंगळवारी न्यायालयात सादर केले जाणार असल्‍याची माहिती रेल्‍वे पोलिसांकडून देण्यात आली.

 

 

Loading

Facebook Comments Box

कोकण रेल्वेच्या व्यवस्थापकीय संचालकपदी संतोष कुमार झा यांची वर्णी

   Follow us on        
मुंबई : कोकण रेल्वेचे KRCL व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता हे या पदावरूंन निवृत्त झाल्याने त्या जागी आता संतोष कुमार झा हे कोकण रेल्वेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. कोकण रेल्वेच्या बेलापूर येथील मुख्यालयात उद्या (ता. १) ते पदभार स्वीकारत आहेत.
संतोष कुमार झा यांनी लखनौ विद्यापीठातून (भूविज्ञान) एम.एससी. आणि जमनालाल बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, मुंबई येथून एमबीए (मार्केटिंग) केले आहे. ऑपरेशन्स, पायाभूत सुविधा नियोजन आणि व्यवसाय विकास क्षेत्रात २८ वर्षांपेक्षा जास्त अनुभव असलेले झा यांनी भारतीय रेल्वेच्या प्रमुख विभागांचे संचालन केले आहे. रेल्वे आणि लॉजिस्टिक क्षेत्रातील व्यावसायिक आणि व्यवसाय विकास भूमिकांमध्ये प्रतिकूल स्थितीत परिस्थिती हाताळण्यात त्यांचा हातखंडा आहे. तसेच प्रशिक्षण आणि राजभाषा विभागाने मिळवलेले यश आणि धोरणात्मक नियोजनात तसेच मल्टी-मॉडल लॉजिस्टिक हब, साइडिंग्स आणि प्रायव्हेट फ्रेट टर्मिनल्स (पीएफटी) स्थापन करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. कोकण रेल्वेच्या बेलापूर येथील मुख्यालयात उद्या (ता. १) ते पदभार स्वीकारत आहेत.
   Follow us on        

Loading

Facebook Comments Box

शक्तीपीठ महामार्ग | विघ्ने वाढलीत; महामार्गाच्या विरोधात १ हजार ३११ हरकती दाखल

सांगली : विद्यमान सरकाराच्या महत्त्वाकांक्षी शक्तीपीठ महामार्गाच्या वाटेवरची विघ्ने संपताना दिसत नाही. या महामार्गा विरोधात सांगली सोलापूर, कोल्हापूर या तीनच जिल्ह्यातून १ हजार ३११ हरकती दाखल करण्यात आल्या आहेत. शक्तीपीठाला समांतर महामार्ग उपलब्ध असताना पिकाउ जमिनीतून महामार्गाचा प्रकल्प राबविण्यास एकसंघपणे विरोध करण्याचा निर्णय सांगली येथील कवलापूर येथे शेतकर्‍यांच्या झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

या महामार्गाची कोणीही मागणी केली नव्हती. सध्या नागपूर रत्नागिरी हा महामार्ग नियोजित प्रकल्पाला समांतर असताना पुन्हा हा नव्याने महामार्ग प्रस्तावित करण्याचे काहीच कारण नाही. माणसाच्या जगण्यासाठी संविधानिक तरतुदी आहेत, मारण्यासाठी नाहीत. या मार्गाने शेतकर्‍यांसह अनेक समाजघटक देशोधडीला लागणार आहेत. केवळ मूठभर लोकांचे हित त्यामागे लपले आहे. संघर्ष समितीने महामार्गबाधित शेतकर्‍यांच्या २२ मागण्या शासनापुढे ठेवल्या आहेत. त्या मान्य झाल्या, तरच शेतकरी संमती देतील. हा लढा दीर्घकाळ अविरत चालणार आहे. शेतकर्‍यांची एकजुटच शासनाला नमवेल. महामार्गामुळे शेतकरी देशोधडीला लागणार आहे. असे यावेळी या बैठकीचे निमंत्रक दिगंबर कांबळे म्हणालेत

प्रस्तावित महामार्गाबाबत सांगलीतून ६११, कोल्हापूरमधून ४५० आणि सोलापूरमधून २५० अशा १ हजार ३११ हरकती शासनापुढे मांडण्यात आल्या आहेत. या हरकतीवर सुनावणीची प्रक्रिया लवकरच सुरू होण्याची अपेक्षा आहे.

 

 

 

 

Loading

Facebook Comments Box

खुशखबर! रंगपंचमी निमित्त कोकण रेल्वे मार्गावर अजून एक विशेष गाडी; एकूण ४ फेऱ्या

   Follow us on        
Konkan Railway News कोकणात होळीसाठी जाणाऱ्या आणि परतीच्या प्रवाशांसाठी एक खुशखबर आहे.  होळी सणासाठी चाकरमान्यांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने कोकण रेल्वे मार्गावर एक विशेष गाडी विशेष प्रवासी भाड्यावर  चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या गाडीच्या जात येत एकूण ४ फेऱ्या होणार आहेत. तपशील खालीलप्रमाणे आहे.
गाडी क्र. 09057/09058 उधना जं. – मंगळुरू जं. – उधना जं. द्वि-साप्ताहिक विशेष :
गाडी क्र. 09057 उधना जं. – मंगळुरू जं.  ही गाडी उधना जंक्शन येथून रविवार दिनांक  31/03/2024 आणि बुधवार दिनांक  03/04/2024  रोजी रात्री 08 वाजता सुटून मंगळुरू जंक्शनला दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 07 वाजता पोहोचेल.
गाडी क्र. 09058 मंगलोर जं. – उधना जं. ही गाडी सोमवार दिनांक 01/04/2024आणि गुरुवार दिनांक 04/04/2024 रोजी रात्री  मंगलोर जं. वरून रात्री 10 वाजता ट्रेन सुटेल ती उधना जंक्शनला दुसऱ्या दिवशी रात्री 9 वाजून 5 मिनिटांनी पोहोचेल.
थांबे: 
वलसाड, वापी, पालघर, वसई रोड, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम, करमाळी, मडगाव जंक्शन, कानाकोना, कारवार, अंकोला, गोकर्ण रोड, कुमटा, मुर्डेश्वर, भटकळ, मुकांबिका रोड बयंदूर, कुंदापुरा, उडुपी, मुल्की आणि सुरथकल स्टेशन.
डब्यांची रचना : एकूण 23 कोच = 2 टियर एसी – 01 कोच, 3 टियर एसी – 03 कोच, स्लीपर – 15 कोच, जनरल – 02 कोच , SLR – 02.

Loading

Facebook Comments Box

Save Konkan | भूमिपुत्र जागा होतोय……

दापोली, दि. २९: कोकणाला लाभलेला समुद्रकिनारा आणि निसर्गसौंदर्यामुळे परप्रांतीयांचा कोकणातील जमिनीवर डोळा आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील  गावागावातील जमिनीची खरेदी परप्रांतीय तसेच बाहेरील मंडळींनी केलेली आहे.परप्रांतीय मंडळींनी कोकणातील जमिनीची किंमत आणि महत्व ओळखल्याने ते दलालांच्या माध्यमातून जमिनी खरेदी करत आहेत.आपल्या वडीलोपार्जित जमिनी कवडीमोल भावाने खरेदी केल्या जात असल्याची जाणीव आता कोकणी माणसाला झाली  आहे. गेल्याच महिन्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली गावातील ग्रामस्थांनी परप्रांतीयांनी गैरव्यवहारातून केलेल्या जमीन खरेदीविरोधात आवाज उठवला होता. अशीच सुरवात आता  रत्नागिरी तालुक्यातील दापोलीतील छोट्याशा ओळगावातून झाली आहे.
ओळगावातील एक जमिनी बाहेरील व्यक्तीने खरेदी केल्याची कुणकुण गावकऱ्यांना लागताच गावकरी एकवटले आणि त्यांनी यापुढे गावातील जमिन परप्रांतीयांना तसेच गावाबाहेरील व्यक्तीला विकायची नाही असा कठोर निर्णय घेतला. त्या आशयाचे गावकऱ्यांनी फलकही गावात लावले आहेत.त्या फलकावर ठळक अक्षरात असे लिहिण्यात आले आहे की “ओळगाव मधील जमीन बाहेरील व्यक्तीला खरेदी करण्यास सक्त मनाई आहे”. हे फलक गावकऱ्यांनीच गावात लावले असल्याने कोकणाला जमिनीचे महत्व कळले असून गावकरी जागे झाल्याची चर्चा रंगली आहे.ओळगावातील ग्रामस्थ मंडळाने एकत्र येत हा कठोर निर्णय घेतला आहे.स्थानिक ग्रामस्थांच्या जमिनी बाहेरील मढळी विकत घेतात आणि जागेला कुंपण घालतात अशावेळी अन्य गावकऱ्यांचा रस्ता बंद होतो.अशाप्रकारच्या अनेक घटना घडून गावचे गावपण निघून जाऊन सामाजिक संतुलनही बिघडते.अनेकवेळा दलालांच्या अमिषाला बळी पडून गावकरी जमीन कवडीमोलाने विकतात आणि फसतात.अशा घटना घडू नयेत म्हणून गावकरी एकवटले आहेत.

Loading

Facebook Comments Box

Konkan Railway | रंगपंचमी निमित्त कोकण रेल्वे मार्गावर अनारक्षित मेमूच्या ४ विशेष फेऱ्या

Konkan Railway: कोकणातील होळी सण पाच ते नऊ दिवसांपर्यंत साजरा होतो. अनेक ठिकाणी उद्या शनिवारी रंगपंचमी सण मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. या निमित्ताने रेल्वे प्रशासनाने कोकण रेल्वे मार्गावर दोन विशेष अनारक्षित मेमू चालविण्याचा निर्णय घेतला आहे. पनवेल ते चिपळूण /रत्नागिरी या दरम्यान जाता येता या गाड्यांच्या एकूण चार फेऱ्या चालविण्यात येणार आहेत
१) गाडी क्रमांक ०११६० चिपळूण – पनवेल मेमू अनारक्षित विशेष :
गाडी क्रमांक ०११६० चिपळूण – पनवेल मेमू अनारक्षित विशेष चिपळूण येथून ३०/०३/२०२४ (शनिवार) आणि ०१/०४/२०२४ (सोमवार) रोजी १५:२५ वाजता सुटेल. ट्रेन त्याच दिवशी २०:५० वाजता पनवेलला पोहोचेल.
गाडी अंजनी, खेड, कळंबणी बुद्रुक, दिवाणखवटी, विन्हेरे, करंजाडी, सापे-वामणे, वीर, गोरेगाव रोड, माणगाव, इंदापूर, कोलाड, रोहा, निडी, नागोठणे, कासू, पेण, हमरापूर, जिते, आपटा, रसायनी आणि सोमाटणे येथे थांबेल.
२) गाडी क्र. ०११५९ पनवेल – रत्नागिरी मेमू अनारक्षित विशेष :
गाडी क्र. ०११५९ पनवेल – रत्नागिरी मेमू अनारक्षित विशेष पनवेल येथून ३०/०३/२०२४ (शनिवार) आणि ०१/०४/२०२४ (सोमवार) रोजी २१:०० वाजता सुटेल. ट्रेन दुसऱ्या दिवशी ०४:३५ वाजता रत्नागिरीला पोहोचेल.
गाडी सोमाटणे, रसायनी, आपटा, जिते, हमरापूर, पेण, कासू, नागोठणे, निडी, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सापे-वामणे, करंजाडी, विन्हेरे, दिवाणखवटी, कळंबणी बुद्रुक, खेड, अंजणी, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड येथे थांबेल.
वरील अनारक्षित स्पेशलची रचना: एकूण ८ मेमू डबे.
वरील ट्रेनच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा.
प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Loading

Facebook Comments Box

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search