Category Archives: महाराष्ट्र

दहावी व बारावीच्या परीक्षा होणार वर्षातून दोनदा

पुणे : इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा पद्धतीत मोठा बदल केला जाणार आहे. आता त्यांची वर्षातून दोनदा परीक्षा होतील. दिवाळीपूर्वी एक सत्र आणि मार्चमध्ये दुसरे व अंतिम सत्र होईल. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार या बदलाची अंमलबजावणी आगामी २०२४-२५ किंवा २०२५-२६च्या शैक्षणिक वर्षापासून होऊ शकते, अशी माहिती पुणे बोर्डातील वरिष्ठ सूत्रांनी दिली.

दहावी, बारावीच्या परीक्षा या विद्यार्थ्यांच्या करिअरचा पाया मानला जातो. विद्यार्थ्यांमध्ये त्या परीक्षांची नेहमीच चिंता असते आणि पालकांवरही ताण असतो. अनेकजण विशेषत: मुली अनुत्तीर्ण झाल्यावर अर्ध्यातूनच शिक्षण सोडतात.या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या माध्यमातून हा बदल प्रस्तावित करण्यात आला आहे. त्याची तयारी सुरू झाली असून, केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने बोर्ड परीक्षा, अभ्यासक्रमासह इतर १० मुद्द्यांवर पालक, शिक्षक, अभ्यासकांसह सर्वसामान्य लोकांची मते मागविली आहेत. बोर्डाच्या परीक्षेत विद्यार्थ्यांची खरी क्षमता तपासता येत नाही, असे तुम्हाला वाटते का? बोर्डाच्या परीक्षा घेण्याच्या सध्याच्या पद्धतीत बदल काही करण्याची गरज आहे का? बोर्डाच्या परीक्षेची जी पद्धत सुरू आहे ती तशीच राहू द्यावी की बदलावी, असे तुम्हाला वाटते का? अशा प्रश्नांवर त्यांची मते मागवून घेतली आहेत. त्याचा विचार करून दोन वर्षांत नवीन पद्धत अवलंबली जाणार आहे.पाठांतराची सवय कमी करण्याचा प्रयत्ननवीन अभ्यासक्रमात पुस्तकांचा मजकूर कमी करून ते मनोरंजक आणि समर्पक बनविण्यात येणार आहे. त्याचबरोबर पुस्तकांच्या आशयाची सांगड घातली जाणार असून, विद्यार्थ्यांसाठी सामग्री लक्षात ठेवण्याऐवजी, ती वैचारिक बनविण्याचाही अभ्यासक्रमातून प्रयत्न होईल, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

नवीन बदल असा असणार… शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक विद्यार्थ्यांना नेहमीप्रमाणेच अध्यापन करतील. पण, पदवी तथा पदव्युत्तर पदवीच्या परीक्षांप्रमाणे दहावी- बारावीच्या परीक्षाही सत्र पद्धतीनेच होतील. पहिले सत्र दिवाळीपूर्वी घेले जाणार असून पुढील सत्र मार्च महिन्यात होईल. तत्पूर्वी, त्यांची प्रात्यक्षिक परीक्षा पार पडेल. शेवटी दोन्ही सत्र परीक्षांचे गुण एकत्रित करून बोर्डाच्या माध्यमातून निकाल प्रसिद्ध केला जाणार आहे. तत्पूर्वी, पहिल्या सत्राचे गुण विद्यार्थ्यांना पहायला मिळणार आहेत.सेमिस्टर पॅटर्नचा हेतू…विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल आणि त्यांच्यावरील ताण कमी होईलएका सत्रात कमी गुण मिळाल्यास दुसऱ्या सत्रात त्यांना जास्त अभ्यास करण्याची संधीअनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढच्या सहा महिन्यातच पुन्हा संधी मिळेल आणि त्यामुळे अर्ध्यातून शाळा सोडणे थांबेल

Loading

कोकण रेल्वेमध्ये १९० जागांसाठी भरती; ‘असा’ करा अर्ज

मुंबई : कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत अप्रेंटिस पदांच्या काही रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० डिसेंबर २०२३ आहे. कोकण रेल्वे भरती २०२३ साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
पदाचे नाव –
पदवीधर अप्रेंटिस, जनरल स्ट्रीम पदवीधर अप्रेंटिस, टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिस
एकूण रिक्त पदे – १९०
शैक्षणिक पात्रता –
  • पदवीधर अप्रेंटिस : संबंधित विषयात इंजिनीअरिंग.
  • जनरल स्ट्रीम पदवीधर अप्रेंटिस : B.A/ B.Com/ B.Sc/ BBA /BMS/पत्रकारिता आणि जनसंवाद/ व्यवसाय अभ्यास पदवी.
  • टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिस : संबंधित विषयात इंजिनीअरिंग डिप्लोमा.
वयोमर्यादा –
खुला प्रवर्ग – १८ ते २५ वर्षे.
ओबीसी – ३ वर्षे सूट.
मागासवर्गीय – ५ वर्षे सूट.
अर्ज फी –
खुला/ ओबीसी प्रवर्ग – १०० रुपये.
मागासवर्गीय/ महिला/ EWS – फी नाही.
नोकरीचे ठिकाण – महाराष्ट्र-गोवा आणि कर्नाटक.
अधिकृत वेबसाईट – https://konkanrailway.com/
महत्वाच्या तारखा –
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात – १५ नोव्हेंबर २०२३
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – १० डिसेंबर २०२३
भरती संबंधित अधिकची आणि सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खालील जाहिरात अवश्य पाहा.

Loading

अतिरिक्त गर्दी टाळण्यासाठी ‘या’ स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटांच्या विक्रीवर मर्यादा.

मुंबई :सध्याच्या सणासुदीच्या काळात रेल्वे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी सर्वच महत्त्वाच्या स्थानकावर पाहण्यास मिळत आहे. या गर्दी मुळे कोणतीही विपरीत घटना घडू नये यासाठी दक्षता घेण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने काही उपाययोजना अंमलात आणत आहे. त्याचाच एक भाग म्हणुन गर्दीच्या वेळेत मुंबई मधील महत्वाच्या स्थानकांवर होणार्‍या प्लॅटफॉर्म तिकिटांच्या विक्रीवर मर्यादा घालण्यात येणार आहे.

दिनांक 16 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबर पर्यंत सीएसएमटी, दादर, एलटीटी, ठाणे, कल्याण आणि पनवेल या स्थानकावर ही मर्यादा असणार आहेत. गर्दीच्या ठराविक वेळेत या स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट बंद ठेवण्यात येणार आहे. मात्र वरीष्ठ नागरिक, अपंग तसेच लहान मुल असलेल्या महिलांसाठी या मर्यादेतून वगळण्यात आले आहे. 

प्रवाशांना गाडीमध्ये बसवण्यासाठी त्यांच्यासोबत येणार्‍या नातेवाईकांची मोठी गर्दी असते. प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवर मर्यादा आणल्यास ही अतिरिक्त गर्दी कमी करण्याचा मध्य रेल्वेचा हेतू आहे. 

 

Loading

दहावी आणि बारावी परीक्षांचं वेळापत्रक जाहीर

पुणेः माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी आणि बारावी परीक्षांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे. बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून तर दहावीची परीक्षा १ मार्चपासून सुरु होत आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी-बारावी परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी २०२४ पासून २३ मार्च २०२४पर्यंत असेल तर दहावीची परीक्षा १ मार्च २०२४ पासून २६ मार्च २०२४ पर्यंत होईल.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आलेल्या निवेदनामध्ये याबाबत सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. त्यानुसार उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (१२ वी) सर्वसाधारण व द्विलक्षी अभ्यासक्रम- बुधवार, दि. २१ फेब्रुवारी २०२४ ते मंगळवार दि. १९ मार्च २०२४ या कालावधीमध्ये होईल.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आलेल्या निवेदनामध्ये याबाबत सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. त्यानुसार उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (१२ वी) सर्वसाधारण व द्विलक्षी अभ्यासक्रम- बुधवार, दि. २१ फेब्रुवारी २०२४ ते मंगळवार दि. १९ मार्च २०२४ या कालावधीमध्ये होईल.

Loading

मराठा आंदोलनाचा भडका..बीडमध्ये 70 एसटी बस फोडल्या, 36 आगाराची वाहतूक पूर्णपणे बंद

मुंबई : मराठा आरक्षणासाठीच्या (Maratha Reservation) आंदोलनाला अनेक ठिकाणी हिंसक वळण लागलं आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून अनेक जिल्ह्यातील एसटी बसच्या(ST Bus) फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.

सोलापूर विभागातील सर्व एसटी आगाराची वाहतूक पूर्ण बंद आहे. तर बुलढाणा जिल्ह्यातून मराठवाड्यात जाणाऱ्या 70 हून अधिक बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. पुणे, छत्रपती संभाजीनगर, पंढरपूर, बीड, अंबड, लातूर, नांदेड याठिकाणी जाणाऱ्या सर्व बस फेऱ्या आजपासून रद्द केल्या आहेत. याशिवाय संभाजीनगरमध्ये सोमवारी दुपारपासून बस सेवा ठप्प आहे. खबरदारीचा उपाय म्हणून 1400 रोजच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. 160 बसेस मध्यवर्ती बस स्थानकात उभ्या आहेत.

राज्यात मराठा समाजाचे आंदोलन सुरु आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी सुरु असलेल्या या आंदोलनाची झळ एसटी बसेसला बसत आहे. पुणे, नागपूरसह राज्यातील अनेक भागांतून मराठवाड्याकडे जाणाऱ्या एसटी बसेस रद्द करण्यात आल्या आहेत. एसटी बसेसची जाळपोळ आणि तोडफोडीच्या घटना घडल्या आहेत. बीडमध्ये शंभरपेक्षा जास्त बसेसची तोडफोड करण्यात आली आहे. यामुळे लालपरीची सेवा ठप्प झाली आहे. एसटी महामंडळाच्या ताफ्यात आलेल्या नवीन स्लीपर बसेस परत बोलवण्यात आल्या आहेत. छत्रपती संभाजी नगरहून निघणाऱ्या आणि छत्रपती संभाजी नगरमध्ये येणाऱ्या सर्व बसेस बंद करण्यात आल्या आहेत.

    • गेल्या 3-4 दिवसांपासून मराठवाड्यातील परभणी, धाराशीव, लातूर, जालना, नांदेड या जिल्ह्यातील सर्व एसटी वाहतूक बंद
    • बीड, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर जिल्ह्यातील एसटी वाहतूक अंशतः बंद आहे.
    • तसेच बीड, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर जिल्ह्यातील 36 आगाराची वाहतूक पूर्णतः बंद आहे.
    • गेल्या चार दिवसांत राज्यभरात 80 पेक्षा जास्त एसटी बसेसची मोडतोड तर दोन एसटी बसेसची जाळपोळ
    • एसटी बसेसची मोडतोड, जाळपोळ झाल्याने अंदाजे एक कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
    • विभागातील वाहतूक पूर्णतः, अथवा अंशतः बंद असल्याने दररोज एसटीचा दोन ते अडीच कोटी रुपयांचा महसूल बुडत आहे.

    बुलढाणा जिल्ह्यातून मराठवाड्यात जाणाऱ्या 70 बस फेऱ्या रद्द

    बुलढाणा जिल्ह्यातील विविध आगारातून 70 पेक्षा जास्त बस फेऱ्या या मराठवाड्यात होत असतात. मात्र परिवहन महामंडळाने सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून पुणे, छत्रपती संभाजीनगर, पंढरपूर, बीड, अंबड, लातूर, नांदेड याठिकाणी जाणाऱ्या सर्व बस फेऱ्या आजपासून रद्द केल्या आहेत. यामुळे एसटी महामंडळाला आर्थिक नुकसान सहन करावे लागणार असून प्रवाशांचे देखील हाल होणार आहेत.

    बीडमध्ये 70 बस फोडल्या

    आमदार संदीप क्षीरसागर यांच्या बंगल्याला आग लावल्यानंतर हा जमाव बीडमध्ये बस स्थानकामध्ये पोहोचला. यावेळी बस स्टँडमध्ये 70 पेक्षा जास्त एसटी उभ्या होत्या. जमावाने या सगळ्या बस फोडल्या आहेत.

Loading

IFFI 2023: इफ्फीत दाखवल्या जाणाऱ्या 25 फीचर फिल्म्सची यादी प्रसिद्ध; मराठी सिनेमाला स्‍थान नाही

Iffi Goa 2023: गोवा चित्रपट महोत्सवात या वर्षी भारतीय पॅनोरमामध्ये दाखवल्या जाणाऱ्या 25 फीचर फिल्म्स आणि 20 नॉन फीचर फिल्म्सची यादी सोमवारी राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाने (NFDC) प्रसिद्ध केली.

इंडियन पॅनोरमा श्रेणी अंतर्गत निवडलेले हे 45 चित्रपट 20 ते 28 नोव्हेंबर या कालावधीत गोवा चित्रपट महोत्सवात दाखवले जाणार आहेत. या चित्रपटांची निवड 12 तज्ज्ञांच्या ज्युरीने केली होती. ज्युरींना फीचर फिल्म श्रेणीसाठी एकूण 408 चित्रपटांकडून अर्ज प्राप्त झाले, त्यापैकी 25 चित्रपट निवडले गेले आहेत. मात्र  मुख्य विभागात एकही मराठी चित्रपटांचा समावेश करण्यात आलेला नाही.

निवडले गेलेल्या चित्रपटांची नावे आणि दिग्दर्शक खालीलप्रमाणे:

  • आरारीरारू – कन्नड – संदीप कुमार वी
  • आट्टम – मल्याळम – आनंद एकर्षि
  • अर्धांगिनी – बंगाली – कौशिक गांगुली
  • डीप फ्रिज – बंगाली – अर्जुन दत्ता
  • ढाई आखर – हिंदी – प्रवीण अरोड़ा
  • इरट्टा – मल्याळम- रोहित एम जी कृष्णन
  • कादल एनबातु पोतु उदमाई – तमिळ- जयप्रकाश राधाकृष्णन
  • काथल – मल्याळम- जेओ बेबी
  • कांतारा – कन्नड – ऋषभ शेट्टी
  • मलिकाप्पुरम – मल्याळम- विष्णु शशि शंकर
  • मंडली – हिंदी – राकेश चतुर्वेदी ओम
  • नीला नीरा सूरियां  – तमिळ- संयुक्ता विजयन
  • न्ना थान केस कोडू – मल्याळम- गणेश राज
  • रबींद्र काब्य रहस्य – बंगाली – सयांतन घोषाल
  • सना – हिंदी – सुधांशु सरियाद
  • वैक्सीन वार – हिंदी – विवेक अग्निहोत्री
  • वध – हिंदी – जसपाल सिंह संधू
  • विदुथलाई पार्ट 1- तमिळ- वेट्री मारन
  • 2018 एवरीवन इज ए हीरो – मल्याळम – जे ए जोसफ
  • गुलमोहर – हिंदी – राहुल वी चिट्टेला
  • पोन्नियिन सेल्वन पार्ट – तमिळ- मणिरत्नम
  • सिर्फ एक बंदा काफी है – हिंदी – अपूर्व सिंह कर्की
  • द केरल स्टोरी – हिंदी – सुदीप्तो सेन

Loading

Vande Bharat Express : वंदे भारत स्लीपर कोचचा श्रीगणेशा महाराष्ट्रात?

Vande Bharat Express : वेगवान आणि आरामदायक प्रवास होत असल्यामुळे वंदे भारत एक्स्प्रेस संपूर्ण देशात लोकप्रिय होताना दिसत आहे. त्यामुळे सध्या  34 वंदे भारत एक्स्प्रेसची  संख्या 200 पर्यंत नेण्यात येणार आहे. वंदे भारत सेमी हायस्पीड ट्रेनमुळे भारतीय रेल्वेचा चेहरामोहरा बदलला आहे. सध्या महाराष्ट्रातून चार वंदे भारत एक्स्प्रेस धावत आहेत. आता वंदे भारतची स्लीपर कोच येत आहे. ही ट्रेन पुणे रेल्वे स्टेशनवरुन धावणार आहे.
प्रवासाचा कमी वेळ, चांगल्या सुविधा आणि वाजवी भाडे यामुळे विमान प्रवासापेक्षा अनेक जण वंदे भारत एक्स्प्रेसला प्राधान्य देतात. वंदे भारत एक्स्प्रेसमुळे काही मार्गांवर विमान कंपन्यांनी भाडे कमी केले आहे. देशभरात लोकप्रिय झालेल्या या ट्रेनमध्ये स्लीपर कोच सुरु होणार आहे. ही ट्रेन पुणे ते बेंगळुरु दरम्यान असणार आहे. मार्च 2024 पर्यंत स्लीपर वंदे भारत सुरु होण्याची शक्यता आहे.
स्लीपर वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये 16 कोच असणार आहेत. त्यात दोन कोच विमानच्या धर्तीवर असणार आहे. त्या कोचमधून किती वजन घेऊन जात येईल, हे निश्चित असणार आहे. वंदे भारत स्लीपरमध्ये 11 एसी टियर असून त्यात 611 सीटे असणार आहेत. 4 एसी टियर-2 मध्ये 188 बर्थ असतील. एक फर्स्ट एसी असणार असून त्यात 24 बर्थ असणार आहेत. एकूण 823 सीट या ट्रेनमध्ये असणार आहेत.

Loading

‘जगह दिखाओ’ अभियान; एसटीला मराठी भाषेचे वावडे?

मुंबई : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ आणि “अक्षरा केंद्र” या स्वयंसेवी संस्थेने मिळून सार्वजनिक गर्दीच्या ठिकाणी महिलांच्या लैगिक छळाच्या विरोधात जनजागृती मोहीम सुरु केलेल्या माहिती शुक्रवारी समाजमाध्यमांवर प्रसारित करण्यात आली. मात्र या मोहिमेस देण्यात आलेल्या ‘जगह दिखाओ’ या नावावरून मराठी भाषिक जनतेतून नाराजीचे स्वर ऐकू येताना दिसत आहेत.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ MSRTC हे महाराष्ट्र राज्य सरकारच्या अखत्यारीत येते. त्यामुळे महामंडळाने जनतेशी संवाद साधताना मराठी भाषेला प्राधान्य देणे अपेक्षित आहे. त्यामुळे अभियानाचे  माहितीपत्रक मराठीत असून अभियानाचे नाव हिंदीत का असा प्रश्न समोर येणे स्वाभाविकच आहे.
वाचकांचे विचार 
संयुक्त महाराष्ट्राची निर्मित एक भाषिक राज्य म्हणून झालेली असून मराठी भाषिक एकमेव राज्य आहे. राज्य परिवहन मंडळाची सेवा बहुतांश मराठी भाषिकांकडून वापरली जात असल्यामुळे व महाराष्ट्र शासनाचा उपक्रम म्हणून महामंडळाचे कामकाज संपूर्ण कामकाज मराठीतच होणे आवश्यक आहे. तरी, “जगह दिखाओ” अभियानाचे नाव शुद्ध मराठीतच करावे, ही विनंती.
–अक्षय म्हापदी,कळवा 

 

Loading

Mumbai Goa Highway | “माझ्या घरासमोरचा दोन किलोमीटरचा रस्ता तेरा वर्षापासून बांधू शकलो नाही…” केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची जाहीर कबुली

नागपूर: मुंबई गोवा हा महामार्ग इतके वर्ष बनू शकला नाही त्यासाठी मी स्वतः जबाबदार आहे. मी त्यासाठी कोणालाही जबाबदार धरणार नाही, असं खुद्द केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी एका मुलाखतीत बोलताना म्हटलं आहे. तसेच या डिसेंबर अखेरपर्यंत मुंबई गोवा महामार्ग बनवून पूर्ण होईल अशी ग्वाही नितीन गडकरी यांनी दिली आहे. नागपुरात एका वृत्तपत्र समूहाच्या वतीने आयोजित ”मनातले गडकरी” या मुलाखतीत मुलाखतकार प्रसिध्द अभिनेता प्रशांत दामले यांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना नितीन गडकरी बोलत होते.
“मुंबई गोवा मार्ग पहिले महाराष्ट्र सरकारला काम दिलं होतं. त्यानंतर बऱ्याच अडचणी आल्या. जागा हस्तांतरित करण्याच्या अजूनही येतात. त्यासाठी कोणाला जबाबदार धरत नाही. या रस्त्यासाठी मी 75 ते 80 म्हणजे सर्वात जास्त बैठका घेतल्या आहेत. तरी पण मला म्हणावं तसं यश मिळालं नाही. यावर यावर्षी डिसेंबर महिन्याच्या आत मुंबई गोवा मार्ग पूर्ण होईल. मी मुंबई ते दिल्ली 1380 किलोमीटरचा रस्ता जवळपास पूर्ण केला. पण माझ्या घरासमोरचा दोन किलोमीटरचा रस्ता मी तेरा वर्षापासून बांधू शकलो नाही. नागपुरात बाराशे कोटीचा मल्टी मॉडेल हब स्टेशन होतं ते एकदा मी रद्द केलं. पण आता ते स्टेशन रेल्वे बांधत असून 1200 कोटी लॉजिस्टिक कॅपिटल साठी भारत सरकारने दिले. भारतातील सर्वात मोठा लॉजिस्टिक पार्क तयार करत आहे वादाचे मुद्दे सोडवले भारतातील सगळ्यात मोठा प्रोजेक्ट बनवण्याचा ते स्वप्न आहे ते पूर्ण करेल,” असेही नितीन गडकरी म्हणाले.

विडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

 

Loading

VIDEO : खाजगी बस चालकाचा प्रवाशांच्या जीवाशी खेळ; बस चालवत असताना मोबाईलवर…….

नागपूर :समृद्धी महामार्गावर होत असलेले जीवघेणे अपघात खूपच चर्चेचा विषय बनला आहे. शासनाने महामार्गावरील प्रवासी वाहने सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या कसोट्यांच्या पूर्तता केल्या नसल्याने हे अपघात होत असल्याचे आरोपही होत आहेत. मात्र अशातच एका खाजगी बस ड्रायव्हरचा धक्कादायक विडिओ समोर आला असल्याने येथे होणाऱ्या अपघातास चालकांचा निष्काळजीपणा  कसा जबाबदार आहे हे सुद्धा दिसून आले आहे.
एका प्रवाशाने हा विडिओ व्हायरल केला आहे. गाडी वारंवार रस्ता सोडत असल्याने त्याला संशय आल्याने तो चालकाच्या केबिनजवळ गेला. तेथील प्रकार पाहून त्याला धक्काच बसला. बस चालकाने बस स्टिअरिंग च्या खाली आपला मोबाईल ठेवून त्यावर एक  चित्रपट चालू ठेवला होता. बस चालवता चालवता तो वारंवार मोबाईल कडे पाहत होता. १०/१० सेकंड मान खाली घालत होता.  
प्रवाशांनी सांगूनसुद्धा त्याने आपले वर्तन बदलेले नाही..केवळ नशीब बलवत्तर म्हणून कोणती दुर्घटना न होता आम्ही सुखरूप अंतिम स्थानकावर पोहोचलो असे त्या प्रवाशाने ट्विट केलेल्या पोस्ट मध्ये म्हंटले आहे.

 

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search