Category Archives: सिंधुदुर्ग

एमआरएफ टायर कंपनीत बंपर भरती; सिंधुदुर्गात २५० पदांसाठी मुलाखत

   Follow us on        

कुडाळ : भारतातील नामांकित एमआरएफ टायर कंपनीत प्रशिक्षणार्थी (Trainee) पदांसाठी तब्बल २५० जागांची भरती करण्यात आली असून, या भरतीसाठी मुलाखतीचे आयोजन १२ सप्टेंबर रोजी कुडाळ येथे करण्यात आले आहे.

ही भरती मनसेच्या माध्यमातून होत असून, निवड प्रक्रियेसाठी कंपनीची भरती टीम थेट ठिकाणी उपस्थित राहणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना तात्काळ जॉब लेटर देण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

नोकरीचे ठिकाण फोंडा (गोवा युनिट) असून, उमेदवारांना दरमहा ₹१७,५०० ते ₹१९,००० इतका पगार मिळणार आहे. त्यासोबतच मोफत राहण्याची व कॅन्टीनची सोय, युनिफॉर्म तसेच भविष्यात कायमस्वरूपी नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. दरवर्षी पगारात वाढ होणार असल्याचेही सांगण्यात आले.

शैक्षणिक पात्रता : ८वी ते १२वी उत्तीर्ण, आयटीआय, डिप्लोमा किंवा पदवीधर उमेदवार या भरतीस पात्र आहेत.

मुलाखतीचे तपशील :
🗓️ तारीख : १२ सप्टेंबर २०२५
वेळ : सकाळी १०.३० ते दुपारी २.३०
📍 स्थळ : बै. नाथ पै शिक्षण संस्था, एमआयडीसी, कुडाळ

ही प्रक्रिया पूर्णपणे विनामूल्य असून, सिंधुदुर्गातील तरुणांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी केले आहे.

📞 अधिक माहितीसाठी संपर्क :

  • चौगुले : ९३८४०-०३३०५

  • खांडेकर : ९६९९२-९०२२४

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेत ७३ लिपिक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू

ऑनलाईन अर्ज ५ सप्टेंबर ते ३० सप्टेंबरपर्यंत स्वीकारले जाणार

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., सिंधुदुर्गमध्ये लिपिक पदांच्या भरतीला सुरुवात झाली आहे. बँकेच्या आस्थापनेवरील व अधिपत्याखालील लिपिक या श्रेणीतील ७३ रिक्त पदे सरळसेवा पद्धतीने भरण्यात येणार असून, यासाठीची प्रक्रिया आय.बी.पी.एस. (इन्स्टिट्युट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन) या संस्थेमार्फत राबविण्यात येणार आहे.


📌 महत्त्वाच्या तारखा :

  • ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यास सुरुवात : ५ सप्टेंबर २०२५

  • शेवटची तारीख : ३० सप्टेंबर २०२५ (रात्री ११.५९ पर्यंत)

  • परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत : ३० सप्टेंबर २०२५

  • ऑनलाईन परीक्षा दिनांक : लवकरच बँकेच्या संकेतस्थळावर जाहीर होणार

  • प्रवेशपत्र डाऊनलोड करण्याची अंतिम तारीख : लवकरच प्रसिद्ध

  • मुलाखती व कागदपत्र पडताळणी : परीक्षेच्या निकालानंतर जाहीर


📑 अटी व पात्रता :

  • उमेदवार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रहिवासी असणे बंधनकारक. अधिवास दाखला (Domicile Certificate) अपलोड करावा लागेल.

  • अर्ज करताना शैक्षणिक पात्रता, ई-मेल आयडी, मोबाईल क्रमांक व आधारकार्ड क्रमांक अचूक भरणे आवश्यक. एकदा भरलेला अर्ज दुरुस्त करता येणार नाही.

  • परीक्षा शुल्क ऑनलाईन मोडद्वारे भरावे लागेल. भरलेले शुल्क न परतविण्यायोग्य (Non-Refundable) असेल.

  • शैक्षणिक पात्रता, अनुभव, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, निवड पद्धती व इतर सविस्तर माहिती बँकेच्या www.sindhudurgdcc.com या संकेतस्थळावर उपलब्ध राहील.


📢 उमेदवारांसाठी सूचना :

भरतीसंबंधी अधिक माहितीसाठी उमेदवारांनी वेळोवेळी बँकेच्या संकेतस्थळाला भेट देणे आवश्यक आहे. अर्ज प्रक्रियेबाबत काही शंका असल्यास आयबीपीएसच्या CGRS पोर्टलवर (https://cgrs.ibps.in/) तक्रार किंवा विचारणा करता येईल.


👉 सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इच्छुक व पात्र उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी असून, दिलेल्या कालावधीत ऑनलाईन अर्ज करून आपली नोंदणी पूर्ण करण्याचे आवाहन बँकेकडून करण्यात आले आहे.

खुशखबर! पुणे – सिंधुदुर्ग मार्गावर ‘फ्लाय९१’ कडून गणेशोत्सवासाठी विशेष उड्डाणांची घोषणा

   Follow us on        

पुणे, १८ ऑगस्ट : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणवासीयांच्या प्रवासाची सोय लक्षात घेऊन फ्लाय९१ (FLY91) या विमानसेवेने पुणे–सिंधुदुर्ग–पुणे मार्गावरील उड्डाणांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

गणेश चतुर्थीच्या काळात कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी होते. या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सोयीसाठी फ्लाय९१ने विशेष उड्डाणांची घोषणा केली आहे. २४ ऑगस्ट, २९ ऑगस्ट, ३१ ऑगस्ट तसेच ५ व ७ सप्टेंबर २०२५ या दिवशी अतिरिक्त उड्डाणे सुरू राहतील.

या विशेष उड्डाणांची तिकिटे फ्लाय९१च्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असून प्रवाशांनी लवकरात लवकर आरक्षण करून घ्यावे, असे आवाहन कंपनीकडून करण्यात आले आहे.

यामुळे पुण्यातील कोकणवासीयांसाठी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रवास आणखी सुलभ व सुखकर होणार आहे.

   

गणेशोत्सव हा आमच्या ग्राहकांसाठी अतिशय महत्त्वाचा काळ आहे. अनेक जण आपल्या कुटुंबासह कोकणात प्रवास करतात. पुणे–सिंधुदुर्ग मार्गावरील उड्डाणांची संख्या वाढवल्याने प्रवाशांना अधिक सोयी, लवचिकता आणि विश्वासार्ह सेवा मिळणार आहे. 

मनोज चाको

व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी (फ्लाय९१) 

शिरशिंगे नदीपात्रात आठ फूटांची मगर; खडकांत दुरून लक्षात येत नसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

   Follow us on        

सावंतवाडी : माडखोल-धवडकी परिसरातील शिरशिंगे नदीपात्रात तब्बल आठ फूट लांबीच्या महाकाय मगरीचे दर्शन झाल्याने ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली आहे. नदीकाठावर कपडे धुण्यासाठी जाणाऱ्या महिलांपासून गुरे पाजण्यासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांपर्यंत सर्वांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ग्रामपंचायत सदस्य दत्ताराम कोळमेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेची दखल घेऊन ग्रामपंचायत व वनविभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. यापूर्वीही अशा घटना घडल्या असल्या तरी यावेळी दिसलेली मगरीची लांबी आणि आकार मोठा आहे. तसेच मगरीचा रंग आणि नदीपात्रातील खडकांचा रंग समान असल्याने ही मगर जवळ गेल्याशिवाय लक्षात येत नाही.

स्थानिकांनी वनविभागाने तातडीने योग्य ती उपाययोजना करावी, तसेच गावोगावी जनजागृती करून नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करावे, अशी मागणी केली आहे.

 

   

सावंतवाडीतील युवा सामाजिक कार्यकर्त्यांचा ‘राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट समाजरत्न पुरस्कार २०२५’ ने गौरव

   Follow us on        

सावंतवाडी, १५ ऑगस्ट:

सावंतवाडीतील युवकांच्या सामाजिक कार्याला राज्यस्तरीय पातळीवर मोठा सन्मान मिळाला आहे. कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडीचे उपाध्यक्ष सागर तळवडेकर आणि सचिव मिहिर मठकर यांची ‘राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट समाजरत्न पुरस्कार २०२५’ साठी निवड करण्यात आली आहे. जनजागृती सेवा संस्था (रजि.) यांच्यातर्फे हा प्रतिष्ठित पुरस्कार १६ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता कणकवली येथील भवानी सभागृहात आयोजित समारंभात प्रदान करण्यात येणार आहे.

संस्थेने जारी केलेल्या निवडपत्रानुसार, सागर तळवडेकर व मिहिर मठकर यांनी सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या कार्याची स्तुती करताना संस्थेने म्हटले आहे की, “त्यांचे सामाजिक योगदान हे भूषणावह आहे व तरुणांसाठी प्रेरणादायक आहे.”

पुरस्कार वितरण समारंभात अनेक मान्यवर उपस्थित राहणार असून, संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात हा पुरस्कार एक मानाचा तुरा ठरणार आहे. या निवडीमुळे सावंतवाडी आणि संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव उज्वल झाले असून, स्थानिक पातळीवर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

जनजागृती सेवा संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ म. तिरपणकर आणि सचिव संचिता भंडारी यांनी श्री. तळवडेकर व श्री. मठकर यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

सावंतवाडी: नाकर्त्या प्रशासनाचा अजून एक बळी

   Follow us on        

सावंतवाडी: रविवारी चराठे-ओटवणे रस्त्यावर झालेल्या अपघतात कारिवडे गावातील ३२ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. बाजारातून दुचाकीवरून घरी जात असताना येथील एका वळणावर त्याचा दुचाकीवरून ताबा सुटून ती एका मोठ्या दगडावर आढळली. यात तो गंभीर जखमी झाला. उपचारासाठी त्याला सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र या रुग्णालयात गंभीर जखमी रुग्णांना उपचार करण्याची सोय नसल्याने रुग्णालय प्रशासनाने त्याला बांबुळी येथील रुग्णालयात नेण्यास सांगितले.

मात्र तिथे कोणतीही रुग्णवाहिका नसल्याने नातेवाईकांना रुग्णवाहिका शोधण्यासाठी पळापळ करावी लागली. १०८ वरून मागवलेली रुग्णवाहिका बांद्यावरून जवळपास सव्वा ते दिड तासाने आली. रुग्णाला घेऊन ती रुग्णवाहिका निघाली खरी मात्र बांबुळी रुग्णालयात पोहोचेपर्यंत परशुरामची प्राणज्योत मालवली.

वेळेत रुग्णवाहिका उपलब्ध झाली असती आणि परशुरामवर वेळेत उपचार चालू झाले असते तर त्याचा जीव वाचवता आला असता. मात्र प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे त्याचा जीव गेला. असे अजून किती बळी प्रशासन घेणार असा प्रश्न विचारला जात आहे. L

सावंतवाडी तालुक्यात मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटल व्हावे ही मागणी खूप वर्षांपासून केली जात आहे. मात्र प्रखर राजकीय इच्छाशक्तीच्या अभावी ते अजून काही वर्षे होण्याची चिन्हे दिसत नाही आहेत. मात्र ते होईपर्यंत किमान गंभीर जखमी रुग्णांना गोवा राज्यात जलद गतीने नेण्यासाठी रुग्णवाहिका तरी उपलब्ध करून द्यावी. येथील उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचारी रुग्णाला गोव्यातील बांबुळी येथील रुग्णालयात हलविण्याचा सल्ला देऊन सरळ आपले हात वर करतात. त्यानंतर रुग्णाच्या नातेवाईकांचा रुग्णवाहिकेचा शोध घ्यावा लागतो. साहजिकच याबाबत त्यांना कल्पना नसल्याने खूप वेळ वाया जातो. येथील प्रशासन अशा गंभीर जखमी रुग्णांना दुसरीकडे हलविण्यासाठी एक-दोन रुग्णवाहिका का ठेवू शकत नाही हा पण एक प्रश्नच आहे.
सावंतवाडीतील प्रस्तावित मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटल चे काय झाले?
१६ जुलै २०२२ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विकासकामांचा आढावा घेताना या हॉस्पिटलच्या कामास गती देण्याचे निर्देश दिले होते. त्यांनी संबंधित सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे असे स्पष्टपणे सांगितले होते. दरम्यान, सावंतवाडी संस्थानचे युवराज लखम सावंत यांनी या हॉस्पिटलसाठीची जागा सध्याच्या कुटीर रुग्णालयाच्या परिसरातच असावी, अशी भूमिका घेतली आहे. मात्र काही राजकीय मंडळी हा प्रकल्प दुसऱ्या ठिकाणी नेण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

दुसरीकडे, सामाजिक कार्यकर्ते अमोल टेंबकर यांनी सावंतवाडीतील ‘यशराज मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटल’ या पर्यायी प्रकल्पाला महात्मा फुले आरोग्य योजनेअंतर्गत मंजुरी देण्यात यावी, अशी मागणी केली आहे. त्यांनी सांगितले की जागेचा वाद सुटला तरी हॉस्पिटल उभारणीस किमान तीन वर्षे लागतील. त्यामुळे सध्या या प्रकल्पाची वाटचाल ठप्प झाली असून अद्याप कोणतेही ठोस पाऊल पुढे पडलेले नाही.

सावंतवाडी आणि आजूबाजूचा परिसर अजूनही अशा प्रकारच्या गंभीर रुग्णांच्या उपचारासाठी गोवा राज्यावर अवलंबून आहे. सावंतवाडीत एक सुसज्ज मल्टिस्पेशालिटी हॉस्पटिल व्हावे ही मागणी राजकीय इच्छा शक्ती अभावी पूर्ण होण्याची चिन्हे दिसत नाही आहेत.

सावंतवाडी: दुचाकी अपघातात तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

सावंतवाडी, ता.०३ –

चराठा-नमसवाडी रस्त्यावर दुचाकीवरील नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृताचे नाव परशुराम प्रकाश पोखरे (वय ३२) असे आहे. हा अपघात आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, परशुराम पोखरे हे म्हापसा येथील एका कंपनीत नोकरी करत होते. रविवारी सुट्टीमुळे ते काही कामानिमित्त गावी आले होते. चराठा येथे चिकन घेऊन ते आपल्या घरी परत जात होते. दरम्यान, ओटवणे रस्त्यावर ग्रामपंचायतीपासून सुमारे ५० मीटर अंतरावर असलेल्या नमसवाडी येथील चढावावर त्यांच्या दुचाकीवरील ताबा सुटला व दुचाकी बाजूच्या दगडाला धडकली. धडक इतकी जोरदार होती की, परशुराम गाडीसह रस्त्यावर आपटले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाला.

अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तात्काळ धाव घेऊन त्यांना सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती खूप गंभीर असल्याने त्यांना तातडीने गोवा-बांबोळी येथील रुग्णालयात हलविण्याचा निर्णय झाला. मात्र दुर्दैवाने रुग्णालयात नेत असतानाच वाटेत त्यांचा मृत्यू झाला.

या अपघाताची नोंद सावंतवाडी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

मुंबई-गोवा महामार्गावर अपघातात युवती गंभीर जखमी

   Follow us on        

मुंबई-गोवा महामार्ग | ३० जुलै: मुंबई-गोवा महामार्गावरील इन्सुली खामदेव नाका येथे एका भरधाव ट्रकने मोटारसायकलला जोरदार धडक दिली. या अपघातात दिशा ज्ञानेश्वर नारुजी (वय २६, रा. बांदा पानवळ) या तरुणी गंभीररीत्या जखमी झाली.

संतप्त ग्रामस्थांनी घटनास्थळी एकत्र येत वाहतूक रोखून धरली. अपघातग्रस्त ट्रकला घेराव घालण्यात आला आणि चालकाविरुद्ध तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. स्थानिक पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.

दरम्यान, अपघातानंतर परिसरात काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. जखमी युवतीला तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

स्थानिक नागरिकांनी महामार्गावरील वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अधिक गस्त आणि वेगमर्यादा काटेकोरपणे पाळण्याची मागणी केली आहे.

 

गणेशोत्सवात कोकण रेल्वे मार्गावर धावणार ‘शिवसेना एक्सप्रेस’

   Follow us on        

मुंबई, दि. २९: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात आपल्या गावी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी शिवसेनेच्या वतीने एक विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे. ‘शिवसेना एक्सप्रेस’ नावाने मोफत विशेष रेल्वे सेवा सुरु करण्यात येत असून, या सेवेमुळे अनेक चाकरमान्यांना वेळेवर आणि विनाखर्च आपल्या गावी गणपती साजरा करण्याची संधी मिळणार आहे.

ही विशेष रेल्वे २५ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १० वाजता दादर रेल्वे स्थानकातून कुडाळकडे रवाना होणार आहे. मात्र ही मोफत सेवा फक्त पूर्वनियोजित बुकिंग केलेल्या प्रवाशांसाठीच उपलब्ध असणार आहे. बुकिंगसाठी सोमवार ते शनिवार दरम्यान सकाळी ११ ते संध्याकाळी ५ या वेळेत संपर्क साधता येईल.

 

या उपक्रमाचे आयोजन कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश नारायणराव राणे यांच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ९६६५८९६९६६ किंवा ९६६५२७०२३१ या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पेंडूर येथे २० फूट लांबीचा महाकाय अजगर आढळल्याने खळबळ; शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण

   Follow us on        

पेंडूर (ता. मालवण) – मालवण तालुक्यातील कट्टा-नेरुरपार मार्गे कुडाळ येथे जाणाऱ्या हमरस्त्यावर, पेंडूर गावाच्या हद्दीत सुमारे १५ ते २० फूट लांबीचा एक महाकाय अजगर रस्ता ओलांडताना दिसून आला. रस्त्याने जात असलेल्या गावातील वाहनचालक व त्यांच्या सोबत असलेल्या व्यक्तींनी हा अजगर प्रत्यक्ष पाहिला असून, त्यातील एका युवकाने हा क्षण मोबाईलमध्ये चित्रीत केला. सध्या हाच व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

या महाकाय सापाचे पहिल्यांदाच दर्शन झाल्यामुळे गावातील शेतकरी वर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. “कधी हा अजगर गुरांना गिळंकृत करेल की काय?” अशी काळजी शेतकऱ्यांच्या मनात आहे.

गावाच्या एका बाजूने वाहणारी कर्ली नदी, तसेच आजूबाजूच्या निसर्गसंपन्न भागामुळे यापूर्वी देखील वन्य प्राणी आढळले आहेत. काही वर्षांपूर्वी, एक भली मोठी मगर पेंडूर तलावात सापडली होती. ती स्थानिक नागरिकांनी वनविभागाच्या मदतीने पकडून पुन्हा नदीत सोडली होती.

   

याच पार्श्वभूमीवर गावकऱ्यांची मागणी आहे की, या अजगरालाही तात्काळ पकडून जंगलात सोडावे, जेणेकरून शेतकऱ्यांच्या गुरांना किंवा इतर जनावरांना धोका पोहोचणार नाही.

पेंडूर ग्रामस्थ आणि शेतकरी वर्गाकडून वनविभागाकडे या संदर्भात तात्काळ कार्यवाहीची मागणी करण्यात येत आहे.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search