Category Archives: कोकण रेल्वे

वसई-सावंतवाडी पॅसेंजर गाडी लवकरच सुरू होणार – खा. गावित यांची ग्वाही..

पालघर : वसई – विरार भागातील कोकणवासीयांसाठी एक चांगली बातमी आहे. मागील कित्येक गुढीपाडव्यानिमित्त विरार येथून काढण्यात आलेल्या शोभायात्रेत खासदार श्री. गावित  यांनी वसई-सावंतवाडी प्रवासी संघटनेचेच अध्यक्ष शांताराम नाईक यांची भेट घेऊन वसई-सावंतवाडी पॅसेंजर गाडी सुरू होणार असल्याचे सांगितले. आपली मागणी लवकरच पूर्ण होईल, असे ते म्हणाले. त्याबद्दल श्री. नाईक यांनी समाधान व्यक्त केले. पण गाडी लवकर सुरू झाली नाही, तर नाइलाजाने उग्र आंदोलन करावे, लागेल, असा इशाराही त्यांनी श्री. गावित यांना दिला. मात्र तशी वेळच येऊ देणार नाही. गाडी लवकरच सुरू होईल, अशी ग्वाही श्री. गावित यांनी दिली.

बोरिवली ते विरार या पट्ट्यात कोकणातील चाकरमान्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे. उत्तरेकडून येणाऱ्या कोकण मार्गावरील गाड्या वसईमार्गे जातात. पण या गाड्या नियमित नाही आहेत. तसेच या गाड्या कोकणातील काही मोजकेच थांबे घेतात.शिवाय त्या गाड्यांमध्ये जागा मिळत नाही. त्यामुळे येथील प्रवाशांना दादर या स्थानकावर यावे लागत आहे. वेळेचा अपव्यय तर होतोच पण खूप त्रास सहन करावा लागत आहे.

वसई टर्मिनसहून रत्नागिरी, सावंतवाडीकडे जाणाऱ्या पॅसेंजर गाड्या सुरू कराव्यात, अशी मागणी कित्येक वर्षे केली जात आहे. खासदार श्री. गावित यांनी ती मागणी पूर्ण होण्याची ग्वाही दिली आहे. 

Loading

कोकण रेल्वे मार्गावरील दोन गाड्यांना अतिरिक्त डबे

संग्रहित फोटो

Konkan Railway News:कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी काही गाड्यांमध्ये तात्पुरत्या स्वरूपात एक डबा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

गाडी क्र. २२९०८ हापा ते मडगाव एक्स्प्रेसला २९ मार्च रोजी  स्लीपर  कोच१ , परतीसाठी गाडी क्र. २२९०७ मडगाव हापा एक्स्प्रेसला ३१ मार्च रोजी एक डबा जोडण्यात येणार आहे.

गाडी क्र. २२४७५ हिसार ते कोइम्बतूर साप्ताहिक एक्स्प्रेसला टू टायर एसी एक कोच दिनांक ०५ एप्रिल ते २६ एप्रिल पर्यंत वाढविण्यात आला आहे. परतीसाठी २२४७६ कोईम्बतूर जं.- हिसार जं. साप्ताहिक एक्स्प्रेसला दिनांक ०८ एप्रिल ते २९ एप्रिल पर्यंत जादा डबा जोडण्यात येणार आहे.

Loading

जगातील सर्वात उंच रेल्वे पूल असलेल्या चेनाब रेल्वे पूलची यशस्वी चाचणी; पुलाच्या उभारणीत कोकण रेल्वेचे महत्वपूर्ण योगदान

Indian Railway News :पॅरिसमधील आयफेल टॉवर (Eiffel Tower) पेक्षा 35 मीटर उंच असणारे चेनाब रेल्वे पूल पूर्ण झाले असून काल दिनांक 26 मार्च रोजी केंद्रीय रेल्वेमंत्री यांच्या उपस्थितीत उधमपुर – श्रीनगर – बारामुल्ला या रेल्वे मार्गावर एक चाचणी पण घेण्यात आली आहे. ही चाचणी यशस्वी ठरली असून लवकरच हा पूलाचे लोकार्पण करण्याची आशा आहे. 

 जम्मू काश्मीरमधील चिनाब ब्रिज जगातील सर्वात उंच सिंगल आर्च (single arch) रेल्वे ब्रिज ठरणार आहे. यामुळे भारताच्या इतिहासात आणखी एक सुवर्ण पान लिहिलं जाणार आहे. ही भारतासाठी मोठी अभिमानास्पद बाब ठरणार आहे. या पुलामुळे भारताचा इतर भाग श्रीनगरशी जोडला जाणार आहे.

1315 मीटर लांबीच्या चेनाब रेल्वे ब्रीजच्या बांधकामात सुमारे 30,350 मेट्रिक टन स्टीलचा वापर करण्यात आला आहे. तर आर्चच्या बांधकामात 10,620 MT स्टीलचा वापर झाला आहे आणि 14,504 MT स्टीलचा वापर ब्रीजच्या डेकच्या बांधकामात झाला आहे. चेनाब ब्रिजमध्ये, 93 डेक सेगमेंट (deck segment), ज्याचे प्रत्येकी वजन सुमारे 85 टन आहे, एकाच वेळी दरीच्या दोन्ही टोकांवरून शक्तिशाली स्टील आर्चवर बसविले गेले आहेत.

कोकण रेल्वेच्या मदतीनं पुलाची उभारणी

उत्तर रेल्वे (NR) आणि कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (KRCL) यांची चिनाब ब्रीजच्या डिझाइनला अंतिम रूप देण्यात महत्त्वाची भूमिका आहे. यावेळी आलेल्या तांत्रिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी उत्तर रेल्वे आणि कोकण रेल्वेची मदत झाली आहे. तसेच मेथड स्टेटमेंट आणि रेखाचित्रांसाठी मान्यता आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे उत्तर रेल्वे आणि कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड या दोघांनी स्थानिक रोजगार निर्माण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने प्रकल्पाच्या ठिकाणी जाण्यासाठी सर्व रस्ते बांधले. या रस्त्यांमुळे या भागातील दूरवरच्या गावांना जोडणी मिळाली आहे.







मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Loading

नेत्रावती-मत्स्यगंधा एक्स्प्रेसच्या संगमेश्वर थांब्यासाठी अनोखे ‘पत्र लिहा’ आंदोलन

मुंबई – एकीकडे नेत्रावती-मत्स्यगंधा एक्स्प्रेस या गाडयांना दक्षणेकडील राज्यात थांबे देण्याचा सपाटा लावला असताना अनेक वेळा आंदोलने करूनही रेल्वे प्रशासनाने या गाडयांना संगमेश्वर रोड या स्थानकावर प्रायोगिक तत्वावरसुद्धा थांबा दिला नसल्याने संगमेश्वरवासीय प्रवाशांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. आपली नाराजी व्यक्त करून संबंधित अधिकाऱ्यांच्या संयुक्त बैठकीच्या मागणीसाठी रेल्वे राज्यमंत्र्यांना ‘पत्र लिहा’ हे अनोखे आंदोलन संमेश्वरवासियांनी सुरु केले आहे.
नेत्रावती-मत्स्यगंधा एक्स्प्रेस संगमेश्वर रोड थांब्या संदर्भात संयुक्त बैठक घेण्याबाबत प्रवाशांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना जन शिकायत कार्यालय, पहिला मजला, चर्चगेट रेल्वे स्टेशन, मुंबई-400020 येथे पाठवावे असे सर्व प्रवाशांना आवाहन करण्यात आले आहे. तसेच आपल्या घरामधील जेवढे सदस्य आणि मित्र परिवार मंडळी असतील त्याचे प्रत्येकाचे वेगवेगळे फ्रॉम भरून एकत्र पोस्टाने पाठवावे. आणि त्याची पावती 9819200887 ह्या नंबर वर पाठवणे असेही आवाहन केले गेले आहे. 
जास्तीत जास्त नागरिकांनी या पत्राची प्रिंट काढून आपला नाव, पत्ता व संपर्क भरून रेल्वे राज्यमंत्र्यांच्या जनसंपर्क कार्यालयात पाठवल्यास संगमेश्वर रोड थांब्यासंदर्भातील संयुक्त बैठक घेण्याबाबत विचार होईल आणि आपल्या मागणी संदर्भात विचार करण्यास भाग पडेल असा या आंदोलनाच्या मागे हेतू आहे.
दिवा शहरात जोरदार प्रतिसाद
आज दिवा शहरातील कोकणवासीय प्रवाशांनी या आंदोलनाला जोरदार प्रतिसाद देत याविषयी संबंधित अधिकाऱ्यांच्या  संयुक्त बैठकीच्या मागणीसाठी रेल्वे राज्यमंत्री श्री रावसाहेब दानवे  यांना पत्रे लिहुन मागणी केली आहे. आज दिवा शहरातील कोंकण रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांनी अवघ्या दोन तासात सुमारे 1743 मागणीपत्रे तयार करून देऊन उत्स्फुर्द प्रतिसाद दिला. अजुनही हजारो  प्रवाशी अशी मागणीपत्र देणार असुन ती लवकरच रेल्वे राज्यमंत्र्यांच्या कार्यालयात पाठवण्यात येतील असे पत्रकार श्री संदेश जिमन यांनी यावेळी सांगितले.

Continue reading

Loading

कोकणरेल्वेचा दक्षिणेकडील राज्यातील स्थानकांना थांबे देण्याचा सपाटा; महाराष्ट्रातील स्थानकांच्या थांब्याच्या मागण्यांकडे दुर्लक्ष…

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या नेत्रावती तसेच गांधीधाम एक्सप्रेसला दक्षिण गोव्यातील काणकोण स्थानकावर प्रायोगिक तत्त्वावर थांबा मंजूर करण्यात आला आहे.  
या संदर्भात कोकण रेल्वे कडून प्राप्त माहितीनुसार लोकमान्य टिळक टर्मिनस ते तिरुअनंतपुरम ( १६३४५ ) या डाऊन नेत्रावती एक्सप्रेसला दि. 2 एप्रिलपासून तर अप दिशेने धावणाऱ्या नेत्रावती एक्सप्रेसला( १६३४६)  1 एप्रिल 2023 पासून प्रायोगिक तत्त्वावर थांबा मंजूर करण्यात आला आहे.
तसेच कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या नागरकोईल ते गांधीधाम  ( 16336 ) एक्सप्रेसला दिनांक 4 एप्रिल पासून तर गांधीधाम ते नागरकोईल ( 16335 ) या गाडीला दि. 7 एप्रिल 2023 पासून दक्षिण गोव्यातील काणकोण स्थानकावर प्रायोगिक तत्त्वावर थांबा मंजूर करण्यात आला आहे.
दरम्यान, कोकण रेल्वेने दक्षिणेकडील राज्यातील स्थानकांना लांब पल्ल्याच्या गाड्यांचे थांबे देण्याचा सपाटा लावला असून महाराष्ट्रातील काही स्थानकांना या गाड्यांचे थांबे देण्यात यावे अशी वारंवार मागणी केली असूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. याच महिन्यात नेत्रावती एक्सप्रेसला भटकळ आणि कुंदापूरा या स्थानकांवर थांबे मंजूर करण्यात आले आहेत, तर मत्सगंधा एक्सप्रेसला बारकुर येथे थांबा देण्यात आला आहे. तसेच गरिबरथ एक्सप्रेसला अंकोला येथे थांबा देण्यात आला आहे. नेत्रावती एक्सप्रेस या गाडीच्या थांब्यासाठी पाठपुरावा केल्या जाणाऱ्या संगमेश्वर स्थानकावर प्रायोगिक तत्त्वावर का होईना थांबा मंजूर करण्याबाबत मात्र रेल्वेने कोणतेही पाऊल उचललेले नाही.






मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Loading

कराड ते चिपळूण रेल्वे मार्गाचे नक्की काय झाले? विरोधकांचा प्रश्न आणि सरकारचे उत्तर…

   Follow us on        

मुंबई – पश्चिम महाराष्ट्रातील महत्वाचा प्रकल्प असलेल्या पुणे-कोल्हापूर रेल्वे मार्गावरील कराडपासून कोकणाला जोडणाऱ्या कराड-चिपळूण या नव्या रेल्वे मार्गाबाबत आज अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभा सदस्य पृथ्वीराज चव्हाण, योगेश सागर, शेखर निकम, नाना पटोले, डॉ. देवराव होळी यांनी चिपळूण-कराड रेल्वे मार्गाचे कामाबाबतची लक्षवेधी मांडत शिंदे-फडणवीस सरकारला धारेवर धरले.

यावेळी पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, अनेक वर्षांपासून महाराष्ट्राच्या कोकण व पश्चिम महाराष्ट्र या दोन विभागांना जोडणाऱ्या रेल्वेमार्गाची कराड ते चिपळूण प्रकल्पाची संकल्पना अनेक वर्षे चर्चेत आहे. २०१२ साली तत्कालीन आघाडी  मंत्रिमंडळाने हा प्रकल्प केंद्र सरकारने 50 तर राज्य सरकारने 50 टक्के खर्च करून अमलात आणावा असा निर्णय घेतला. त्याला मान्यता देत निधीही देण्याची घोषणा केली. मात्र, काही दिवसांनी हा प्रकल्प 26 टक्के कोकण रेल्वे व 74 टक्के व्यावसायिक शापूरजी पालनजी कंपनीने करावा, असा निर्णय घेतला गेला. त्यानंतर तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी कराडला आले. त्यांच्या हस्ते भुमिपुजन पण केले.

पश्चिम महाराष्ट्रात पुणे-बंगळूर हा महामार्ग आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात औदयोगिक प्रकल्प आहेत. आणि कोकण जरी अविकसित असला तरी या याठिकाणी मोठी जलसंपदा, बंदरे आहेत. पुढे सरकारने समृद्धी महामार्गालाप्राधान्य द्यायचे ठरवले. मात्र, या रेल्वे मार्गाला कमी लेखण्यात आले. समृद्धी महामार्गासाठी हा प्रकल्प रद्द केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः सातारा जिल्ह्यातील आहेत. संपूर्ण जिल्ह्याचा विकास करण्याचा त्याचा विचार आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या या प्रकल्पासाठी काही त्रुटी आहेत त्या दूर करून मुख्यमंत्री शिंदे या रेल्वेमार्गाला चालना देणार का?असा प्रश्न अधिवेशनात चव्हाण यांनी उपस्थित केला. 

या प्रश्नावर उत्तर देताना मंत्री दादाजी भुसे म्हणाले की  कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रास जोडणाऱ्या चिपळूण – कराड रेल्वे मार्ग प्रकल्पासंदर्भातील बैठक येत्या महिन्याभरात घेण्यात येईल.

श्री. भुसे पुढे  म्हणाले की, कराड- चिपळूण नवीन रेल्वे लाईन प्रकल्पासाठी राज्य आणि केंद्र शासनाचा प्रत्येकी 50 टक्के हिस्सा निश्चित करण्यात आला असून 7 मार्च 2012 रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. यावेळी या प्रकल्पाची किंमत 928.10 कोटी रुपये होती, त्यानुसार राज्य शासनाची 50 टक्के हिश्श्याची रक्कम 464.05 कोटी इतकी होती तर केंद्र शासनाने त्यांच्या हिश्श्याची रक्कम पुढील तीन वर्षात द्यावी, अशी विनंती करण्यात आली होती. या दरम्यान कोकण रेल्वे महामंडळाने केलेल्या सर्वेक्षणानुसार या प्रकल्पाची सुधारीत अंदाजित रक्कम 3 हजार 196 कोटी झाली.

रेल्वे मंत्रालयाने सहभाग धोरण 2012 अंतर्गत चिपळूण- कराड रेल्वेमार्गास संयुक्त उपक्रमाद्वारे राबविण्यास मंजुरी दिली. या उपक्रमात मेसर्स शापूरजी पालनजी यांची भागीदार म्हणून निवड करण्यात आली आणि भविष्यकालीन संयुक्त उपक्रम म्हणून कोकण रेल्वे आणि शापूरजी पालनजी यांचे दरम्यान प्रत्येकी 26 टक्के आणि 74 टक्के या प्रमाणात सहभाग निश्चितीचा करार करण्यात आला. दरम्यानच्या काळात हा प्रकल्प व्यवहार्य नसून या प्रकल्पामध्ये शापूरजी पालनजी कंपनी सहभागी होणार नसल्याचे कंपनीने pस्पष्ट केले .  यानंतरच्या काळात केंद्रीय रेल्वे मंत्री यांनी राज्य शासनाने या मार्गाची अंमलबजावणी महाराष्ट्र लोहमार्ग पायाभूत विकास कंपनीमार्फत करावी आणि राज्य शासनाने 80 टक्के भार उचलावा, असे राज्य शासनास कळविले. मात्र राज्यासमोरील परिस्थिती पाहता समप्रमाणात केंद्र आणि राज्याने आर्थिक सहभाग उचलावा, अशी विनंती रेल्वे मंत्रालयाला करण्यात आली, यावर केंद्राकडून अद्याप काही कळविण्यात आलेले नसल्याचे श्री. भुसे यांनी सांगितले.

संबधित बातमी >कोल्हापूर – वैभववाडी रेल्वेमार्ग; घोडे नेमके अडले कुठे?

महाराष्ट्र लोहमार्ग पायाभूत विकास कंपनीकडून कराड – चिपळूण आणि वैभववाडी – कोल्हापूर रेल्वेमार्गाचे सादरीकरण करण्यात आले. दरम्यान रेल्वे मंत्रालयाने वैभववाडी – कोल्हापूर या रेल्वे प्रकल्पास मान्यता दिली असून त्याचा समावेश पिंकबुक मध्ये करण्यात आला आहे. कराड – चिपळूण रेल्वेमार्गासाठी पुन्हा एकदा शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल, असेही मंत्री श्री. भुसे यांनी यावेळी सांगितले.

   

 







मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Loading

भोर तालुक्यातून कोकण रेल्वेला महाडजवळ जोडणारा लोहमार्ग बनवला जावा – खा. सुप्रिया सुळे

नवी दिल्ली : बेलसर-वाल्हा-लोणंद पासून भोर तालुक्यातून महाड जवळ कोकण रेल्वेला जोडणारा लोहमार्ग होऊ शकतो. तसे सर्वेक्षण करुन याबाबत निर्णय घ्यावा, असा एक मोठा पर्याय खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारला सुचवला आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना याबाबत त्यांनी पत्र लिहिले असून याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी केली आहे.
पश्चिम महाराष्ट्राला कोकण रेल्वेशी जोडणारा कोणताही रेल्वेमार्ग सध्या नाही. इतकेच नाही, तर कोकणातील विविध बंदरे आणि सागरी मार्गांवरील मालवाहतूक करण्यासाठी राज्याच्या पूर्व भागाला जोडणारा समर्पित असा रेल्वेमार्गही कोणता नाही. हे पाहता लोणंद पासून भोर मार्गे महाड मध्ये रेल्वे मार्ग झाल्यास या रेल्वेमार्गाचा पश्चिम महाराष्ट्रातील माल आणि प्रवासी वाहतूकीसाठी खूप मोठा फायदा होईल, असे खासदार सुळे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. शिवाय ही वाहतूक आर्थिक दृष्ट्याही स्वस्त होईल, असे त्यांनी म्हटले आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघात पुरंदर येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रस्तावित आहे. याचा परिसराच्या विकासाला चालना देण्यासाठी मोठा फायदा होणार असून यासाठी येथील दळणवळण व्यवस्था मजबूत आणि लोकांच्या सोयीची असणे आवश्यक आहे. त्यासाठी पश्चिम महाराष्ट्राला कोकण रेल्वेशी जोडणारा रेल्वेमार्ग असणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले आहे.
असा मार्ग झाला तर पुणे जिल्ह्यातील बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर, भोर, वेल्हा, मुळशी हे तालुके, खडकवासला विधानसभा मतदार संघ तसेच सातारा जिल्ह्यातील खंडाळा, फलटण, वाई, माण आदी भागाबरोबरच पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण भागाच्या औद्योगिक आणि इतर विकासाला चालना मिळू शकेल. हा मार्ग पुणे – मिरज – बंगळूर या मार्गाला देखील जोडता येईल. हा मार्ग अतिशय कमी अंतराचा असून तो जनतेच्या सोयीचा आहे. त्यामुळे या मार्गाचे सर्वेक्षण करुन याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, असे खासदार सुळे यांनी म्हटले आहे.
या आधीही कोकण रेल्वे पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांना जोडण्याचे प्रयत्न करण्यात आले होते. कराड ते चिपळूण तसेच कोल्हापूर ते वैभववाडी लोहमार्गाचे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यापैकी कोल्हापूर ते वैभववाडी या लोहमार्गाला मंजुरी मिळाली आहे पण निधीअभावी त्याचे काम अजूनही चालू झाले नाही आहे.

Loading

कोकणरेल्वे मार्गावर चालणार्‍या दुरांतो एक्सप्रेसच्या डब्यांच्या संरचनेत मोठा बदल.

Konkan Railway News :गाडी नंबर 12284 / 12283 H. Nizamuddin – Ernakulam Jn. – H. Nizamuddin Duronto Weekly Express या गाडीच्या डब्यांच्या संरचनेत मोठा बदल करण्यात आला आहे. या गाडीचे स्लीपरचे ६ डबे एसी डब्यांमध्ये परावर्तीत केले जाणार आहे. ५ थर्ड एसी आणि १ सेकंड एसी डबे त्या जागी जोडले जाणार आहेत.

हा बदल दिनांक गाडी क्रमांक 12284 H. Nizamuddin – Ernakulam Jn या गाडीसाठी दिनांक 22 जुलै 2023 पासून तर 12283 H. Nizamuddin – Ernakulam Jn या गाडीसाठी दिनांक 25 जुलै 2023 पासून अंमलात आणला जाणार आहे असे रेल्वे प्रशासनाने जाहीर केले आहे. या गाडीला पनवेल आणि रत्नागिरी येथे थांबा आहे. 

या गाडीच्या सध्याची डब्यांची संरचना

स्लीपर – 09 + थ्री टायर एसी – 05 + टू टायर एसी – 01  + फर्स्ट एसी – 01 + जनरेटर कार – 02 + पॅन्ट्री कार – 01असे मिळून एकूण 19 LHB  डबे

सुधारित संरचना

स्लीपर – 03 + थ्री टायर एसी – 10 + टू टायर एसी – 02  + फर्स्ट एसी – 01 + जनरेटर कार – 01 + पॅन्ट्री कार – 01 + एसएलआर – 01 असे मिळून एकूण 19 LHB  डबे

हेही वाचा – कोकणातील ग्रामपंचायतीचा अनोखा उपक्रम; भरवणार ‘चाकरमान्यांची ग्रामसभा’

Loading

कोंकणरेल्वेला माकडांपासून ‘असाही’ त्रास; उपायासाठी करावे लागणार लाखो खर्च…..

Konkan Railway News | कोकण रेल्वेमार्गाचे १००% विद्युतीकरण झाले असून जवळपास सर्व गाड्या विद्युत इंजिनावर चालविण्यात येत आहेत. पण या बदलामुळे रेल्वे समोर काही नव्या समस्या निर्माण झाल्या आहे. त्यातील एक समस्या म्हणजे या मार्गावरील माकडांपासून होणारा त्रास.

कोकण रेल्वेच्या रत्नागिरी ते राजापूर या विभागातील OHE पोर्टल्स तसेच मास्ट्स यावर माकडे चढून उड्या मारू लागल्याने या विभागात विजेवर चालणाऱ्या गाड्यांच्या प्रवासात व्यत्यय निर्माण होण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. ज्यावर रेल्वे गाड्या चालतात त्या रेल्वेच्या ओव्हर हेड वायरमधून अतिउच्च क्षमतेचा विद्युत प्रवाह सुरू असल्याने रत्नागिरी ते राजापूर या टप्प्यात माकडांचा वाढलेला उपद्रव कोकण रेल्वेसाठी डोकेदुखी ठरली आहे.

कोकणातील शेतकऱ्यांच्या शेतांची बागेंची नासधूस करून या माकडांनी शेतकऱ्यांना अक्षरशः रडवले आहे. आता त्यांचा त्रास कोकण रेल्वे मार्गावर होताना दिसत आहे. आता यावर उपाय म्हणून या भागात अँटी क्लाइंबिंग उपकरणे कोकण रेल्वेला बसवावी लागणार आहेत. त्यासाठी रेल्वेतर्फे निविदा देखिल काढण्यात आली आहेत. सुमारे 6 लाख 62 हजार 663 रुपये इतक्या अंदाजीत खर्चाची ही निविदा आहे

Loading

मत्स्यगंधा एक्सप्रेस २५ वर्षाची होणार; रौप्यमहोत्सव साजरा केला जाणार

Konkan Railway News|कोकण रेल्वेच्या रोहा ते ठोकूर दरम्यान 741 किमी पूर्ण नेटवर्कवर धावणारी  पहिली प्रवासीसेवा गाडी मत्स्यगंधा एक्सप्रेस येत्या मे महिन्यामध्ये २५ वर्षाची होणार आहे. ट्रेन क्रमांक १२६१९/६२० मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस-मंगळुरु सेंट्रल-मुंबई एलटीटी मत्स्यगंधा एक्सप्रेसला १ मे १९९८ रोजी हिरवा झेंडा दाखवण्यात आला होता, तेव्हा तत्कालीन पंतप्रधान ए.बी. वाजपेयी आणि रेल्वे मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांनी ही गाडी कोकण रेल्वे कॉर्पोरेशनला समर्पित केली होती. 
ही गाडी मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस ते कर्नाटकातील मंगळूर स्थानकांदरम्यान रोज धावते. कोकण रेल्वेमार्गे धावणारी मत्स्यगंधा एक्सप्रेस मुंबई ते मंगळूर दरम्यानचे १,१८६ किमी अंतर १६ तासांत पूर्ण करते. महाराष्ट्रातील कोकण प्रदेशामधून जात असलेल्या ह्या गाडीला येथील मासेमारी उद्योगाशी निगडीत मत्स्यगंधा हे नाव दिले गेले आहे.
कुंदापुरा रेलू प्रयाणिकारा हितरक्षण समिती (कर्नाटक) या निमित्ताने या गाडीचा रौप्यमहोत्सव साजरा करणार आहे. त्यामध्ये अनेक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. कोकण रेल्वेचा प्रवास, सद्यस्थिती आणि भविष्यातील योजना यावर चर्चासत्रे आणि कार्यशाळा आयोजित करण्याची समितीची योजना आहे. 

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search