Category Archives: कोकण
सिंधुदुर्ग :जिल्ह्यात राजकिय पक्षात होणारे राडे हे काही येथील जनतेला नवीन नाही आहेत. राजकारणातील हे राडे मुख्यतः कार्यकर्त्यांमध्ये होताना दिसतात, पण एका भडकलेला आमदार हातात दांडा घेऊन ह्या राड्यात सहभागी होण्यासाठी चालल्याचे दृश्य काल जिल्हय़ातील कणकवली तालुक्यात पाहायला मिळाले.
(Also Read >कोकणच्या मातीचा गंध असलेला ‘पिकोलो’ २६ जानेवारीला चित्रपटगृहात!)
ह्याबाबत वृत्त असे की काल कणकवली तालुक्यातील कनेडी ह्या गावात भाजपा आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये जुपडलेतना राजकिय राग मनात ठेवून एका कारणाने बाचाबाची झाली होती. त्याचेपडलेत रूपांतर मारहाणीत होऊन त्याला गंभीर स्वरुप आले. ह्या परिसरातील दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकत्र जमले आणि त्यांचात राडा सुरू झाला. त्यानंतर मात्र पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. या सर्व प्रकाराने संतापलेले शिवसेना आमदार वैभव नाईक एका हातात दांडा घेऊन ते ह्या राड्यात सामील होणार होते तेवढय़ात त्यांना पोलीसांनी अडवून माघारी पाठवले.
- कोकण रेल्वेच्या महाराष्ट्र राज्यातील 37 स्थानकांचा कायापालट होणार.
- रेल्वे स्थानकापासून मुख्य रस्त्यांना जोडणाऱ्या प्रमुख रस्त्यांचा लवकरच कायापालट.
- सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत या रस्त्यांची १० वर्षापर्यंत देखभाल दुरुस्ती करण्यात येणार आहे.
- रेल्वे स्थानकाच्या परिसराचेही मोठ्या प्रमाणात सुशोभिकरण होणार आहे
मुंबई : कोकण रेल्वे महामंडळ अंतर्गत येणाऱ्या राज्यातील रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोलाड रेल्वे स्थानकापासून मदूरे रेल्वेस्थानकापर्यंत एकूण ३७ रेल्वेस्थानके आहेत. ही रेल्वे स्थानके मुख्य मार्गापर्यंत जोडणाऱ्या पोहोच मार्गांची देखभाल व दुरुस्तीची कामे लवकरच सुरु करण्यात येणार आहे. यामुळे कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. रेल्वे स्थानकापासून मुख्य रस्त्यांना जोडणाऱ्या प्रमुख रस्त्यांचा लवकरच कायापालट होणार आहे. त्याचप्रमाणे, रेल्वे स्थानकाच्या परिसराचेही मोठ्या प्रमाणात सुशोभिकरण होणार आहे. यासंदर्भात कोकण रेल्वे महामंडळ मर्यादित व सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या दरम्यान सामंजस्य करार करण्यात आला. यामुळे, कोकणातील पर्यटनाला चालना मिळेल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
(Also Read>मराठी भाषेवर पुन्हा अन्याय…सर्वोच्च न्यायालयाच्या निकालपत्रांच्या अनुवाद भाषेत स्थान नाही….)
सह्याद्री अतिथीगृह येथे कोकण रेल्वे महामंडळ मर्यादित व सार्वजनिक बांधकाम विभाग, यांच्यामध्ये सामंजस्य करार झाला, यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, उद्योग मंत्री उदय सामंत, शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आमदार नितेश राणे, आमदार निरंजन डावखरे, आमदार योगेश कदम, कोकण रेल्वेचे संचालक राजेश भडंग, मुख्य अभियंता नागनाथ राव, मुख्य व्यवस्थापक गिरीश करंदीकर, उप अभियंता सुधीर कुलकर्णी, राजन तेली, दिपक पटवर्धन, केदार साठे, आदी उपस्थित होते.
कोकणातील पर्यटन स्थळांची ख्याती देशातच नव्हे तर जागतिक पातळीवर पोचवण्यासाठी येथील पायाभूत सुविधांचा विकास होणे अत्यंत आवश्यक आहे. आज झालेल्या सामंजस्य करारामुळे कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथील रस्त्यांचा विकास होईल, जेणेकरून पर्यटन आणि स्थानिक विकासाला चालना मिळेल असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.
(Also Read> कोकणातील ग्रामपंचायतीचा हायटेक फंडा! करवसुलीसाठी ‘क्यूआर कोड’ सुविधा देणारी राज्यातील पहिली ग्रामपंचायत…)
सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत १० वर्षापर्यंत देखभाल दुरुस्ती करणार – मंत्री रविंद्र चव्हाण
कोकण रेल्वे महामंडळ मर्यादित व सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या परस्पर सहकार्यामुळे ही सर्व कामी गतीने पूर्ण होतील, तसेच कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्या लाखो चाकरमान्यांना याचा खऱ्याअर्थाने लवकरच फायदा होईल, असा विश्वास सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केला.
कोकणातील पर्यटनाला चालना देण्याकरिता रायगड, रत्नागिरी व सिंधुदूर्ग कोकण रेल्वे स्थानकाच्या पोहोच मार्गाची देखभाल दुरुस्ती व परिसरातील सुशोभीकरण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत या रस्त्यांची १० वर्षापर्यंत देखभाल दुरुस्ती करण्यात येणार आहे. भविष्यात हा सामंजस्य करार ३० वर्षापर्यंत वाढविण्याची तरतूद करण्यात आली आहे.
या सामंजस्य करारानुसार सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत या रेल्वे स्थानकांच्या पोहोचमार्गाचे डांबरीकरण व सिमेंट काँक्रिटीकरण करुन या परिसराचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे या सर्व प्रमुख रेल्वे स्थानक परिसराचे सुशोभीकरण याच सामंजस्य कराराअंतर्गत हाती घेण्यात येणार आहे. या सुशोभीकरणाच्या अंतर्गत रेल्वे प्रवाश्यांसाठी विविध सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. या रेल्वे स्थानकांचा परिसर हा अत्याधुनिक स्वरुपाचा करण्याचा आमचा मानस असल्याचेही मंत्री श्री. चव्हाण यांनी यावेळी स्पष्ट केले.

Konkan Railway News : प्रजासत्ताक दिन आणि माघी गणेशोत्सवासाठी कोकणात गावी जाणार्या प्रवाशांच्या सोयीसाठी कोंकण रेल्वेने या मार्गावर एक विशेष गाडी गाडी सोडायचा निर्णय घेतला आहे.
खालील गाडी पाश्चिम रेल्वेच्या सहकार्याने विशेष शुल्कासह यामार्गावर चालविण्यात येणार आहे.
Train no. 09470/ 09469 Ahmedabad Jn. – Karmali – Ahmedabad Jn. (Weekly) Special on Special Fare.
ह्या गाडी अहमदाबाद ते करमाळी ह्या स्थानकांदरम्यान चालविण्यात येणार आहे.
Train no. 09470 Ahmedabad Jn. – Karmali
ही गाडी दिनांक 24/01/2023 रोजी मंगळवारी ही गाडी अहमदाबाद या स्थानकावरुन सकाळी 09.30 वाजता सुटेल आणि दुसर्या दिवशी संध्याकाळी 04.30 वाजता करमाळी स्थानकावर पोहोचेल.
Train no. 09469 Karmali – Ahmedabad Jn
ही गाडी दिनांक 25/01/2023 रोजी बुधवारी ही गाडी करमाळी स्थानकावरुन सकाळी 09.20 वाजता सुटेल आणि दुसर्या दिवशी संध्याकाळी 07.00 वाजता अहमदाबाद स्थानकावर पोहोचेल.
या गाडीचे थांबे
वडोदरा, सूरत, वापी, पालघर, वसई रोड ,पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड , नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवीम.
डब्यांची संरचना
एसएलआर – 01 + जनरेटर कार – 01 + सेकंड सीटिंग – ०4 + स्लीपर – 08 + थ्री टायर एसी – 06 + टू टायर एसी 02 असे मिळून एकूण 22 डबे
आरक्षण
09469 या गाडीचे आरक्षण उद्या दिनांक 21/01/2023 रोजी रेल्वेच्या सर्व अधिकृत तिकीट खिडक्यांवर आणि ऑनलाइन पोर्टल वर उपलब्ध होईल अशी माहिती कोकण रेल्वे तर्फे देण्यात आली आहे.
वेळापत्रक
मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यात हॉटेल व्यावसायिक आणि ‘होम स्टे’ धारक यांची संख्या लक्षणीय आहे. सरकारच्या पर्यटन विभागामार्फत या उद्योगाला चालना देण्यासाठी अशा हॉटेल आणि ‘होम स्टे’ला उद्योगाचा दर्जा देण्यात आला आहे. उद्योगाला ला महावितरण मार्फत होणारा वीजपुरवठा विशिष्ठ सवलतीच्या दराने केला जातो. परंतु, अजूनही पर्यटन उद्योजकांना – हॉटेल/होम स्टे चालकांना मात्र व्यावसायिक दराने वीजपुरवठा केला जातो. या दोन वीजदरातील फरकमोठा असल्याने, पर्यटन व्यवसायिकांना नाहक प्रचंड मोठा भुर्दंड पडतो आहे. ही बाब सरकार दरबारी पोचविण्यासाठी आमदार ऊमा खापरे आणि दापोलीतील मिहीर महाजन यांनी सुरुवातीला पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांची भेट घेतली. तसेच हा विषय महावितरणकडून मार्गी लागण्याचे आवश्यक असल्याने राज्याचे ऊर्जा मंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट देखील घेतली.
रत्नागिरी : कोकण रेल्वे सुरू होऊन अनेक वर्षे लोटली तरी राजापूरवासीयांच्या स्थानकावरील समस्या अजूनही सुटलेल्या नाहीत. राजापूर रोड रेल्वे स्थानकाच्या पाहणीसाठी आलेले कोकण रेल्वे चीफ मॅनेजिंग डायरेक्टर संजय गुप्ता यांची पंचक्रोशी ग्रामविकास समितीचे पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी भेट घेतली. त्यांच्याशी रेल्वेस्थानकावरील सुविधा आणि समस्यांबाबत संदर्भात चर्चा करून एक निवेदन सादर केले.
त्यांना दिलेल्या निवेदनात राजापूर रेल्वेस्थानकासाठी खालील मागण्या करण्यात आलेल्या आहेत.
- स्थानकात लिफ्ट सुरू करणे
- जनशताब्दी तसेच गोवा संपर्कक्रांती एक्स्प्रेस किंवा इतर एक्स्प्रेस गाड्यांना राजापूरचा थांबा देणे फलाट क्रमांक २ चे काम करून सुसज्ज करावे,
- कोविड काळात बंद करण्यात आलेला तिकिटांचा कोटा पूर्ववत सुरू करून त्यात वाढ करण्यात यावी
- पॅसेंजर रिझर्वेशन सिस्टीम सुरू करणे
- राजापूर शहरात पोस्ट कार्यालयात तिकीट आरक्षण सुविधा उपलब्ध करून द्यावी
- प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेस्टेशन ते राजापूर शहर बस सेवा कायम सुरू ठेवावी,
- स्टेशनबाहेर रिक्षा स्टँड सुरू करावा
- या समस्यांबाबत यापूर्वी खासदार विनायक राऊत यांनाही निवेदन देण्यात आले होते

Vision Abroad

सिंधुदुर्गः मुंबई गोवा महामार्गावर आजची पहाट प्रवाशांसाठी काळरात्र ठरली आहे. माणगाव येथे भीषण कार आणि ट्रक च्या धडकेने ९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर मुंबई-गोवा महामार्गावर आज पहाटेच्या सुमारास . कणकवली येथे खासगी बस उलटून २ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, २३ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
{Also Read >मुंबई गोवा महामार्गावर माणगाव येथे भीषण अपघात.. अपघातात ९ जणांचा मृत्यू.)
कणकवली येथे वागदे पुलानजीक खासगी बसला अपघात झाला आहे. पहाटे चारच्या सुमारास हा अपघात झाला असून गडनदी पूलावर धोकादायक वळणावर चालकाचा ताबा सुटून हा अपघात झाला आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.