Category Archives: कोकण

Konkan Railway | मध्य रेल्वेच्या १० मेमू सेवा कोकण रेल्वे विभागात विस्तारित करण्यात याव्यात

   Follow us on        

Konkan Railway: वीर रेल्वे स्टेशन हे रायगड जिल्हातील मध्यवर्ती ठिकाण असून स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडच्या नजीकचे शहर आहे.तसेच कोकण रेल्वे मार्गावरील गर्दी कमी करण्यासाठी अशा मेमू २ेल्वे चालवण आवश्यक आहे. दिवा ते पनवेल / पेन / रोहा मेमू रेल्वेच्या दिवसातून २० फेऱ्या होत असून त्याला प्रवाशांचा चांगला प्रतिसादही मिळत आहे,रायगड जिल्हयातील वीर जवळील महाड हे शिवकालीन ऐतिहासीक वारसा लाभलेले शहर आहे,त्यामुळे वीर रेल्वे स्टेशनला पर्यटणदृष्ट्या खूप महत्व प्राप्त झालेले आहे.तसेच पनवेल ते वीर दरम्याने रेल्वेचा दुहेरी मार्गही आहे.व वीर येथे ४ फलाटही आहेत.मुंबई ते रोहा हा रेल्वे मार्ग मध्य रेल्वेच्या अखत्यारित येतो तर रोहा ते वीर पर्यंतचा रेल्वेमार्ग कोकण रेल्वेच्या अखत्यारित येतो.तरी कृपया मध्य रेल्वेवरील दिवा ते पनवेल / पेन / रोहा आणि पश्चिम रेल्वेवरील वसई ते पनवेल दरम्याने धावणाऱ्या सर्व मेमू रेल्वे कोकण रेल्वे मार्गावरील वीर स्थानकापर्यंत चालवाव्यात,अशी अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती मुंबई च्या वतीने मध्य रेल्वेकडे मागणी करण्यात आली आहे.

दिवा ते पनवेल किंवा डहाणू / वसई रोड ते पनवेल दरम्याने धावणाऱ्या मेमू रेल्वेला वीर स्टेशनपर्यंत चालवल्यास कोकणातील रायगड जिल्हामध्ये पर्यटणासाठी जाणाऱ्या १) रायगड किल्ला २) महाडचे चवदार तळे ३) चौल येथील गरम पाण्याची कुंडे ४) गांधरपाळे लेणी ५) तलोशीचे रांगूमाता देवस्थान ६) वालनकोंड ७) पाचाड येथील जिजाऊंची समाधी अशा ऐतिहासीक स्थळांना भेट देण्यासाठी वीर हे मध्यवर्ती व जवळचे स्टेशन आहे,तरी मध्य रेल्वे,पश्चिम रेल्वे व कोकण रेल्वे यांनी प्रवाशांच्या मागणीचा सहानुभूतिपुर्वक विचार करावा असे सेक्रेटरी श्री.यशवंत जडयार यांनी सांगितले.

दिवा येथील फेऱ्या वीर स्टेशनपर्यंत चालवाव्यात.

१) दिवा रोहा ( ६१०११ ) ८.४५ am,

२) दिवा पनवेल ( ६१०१७ ) ९.१० am,

३) दिवा पेन ( ६१०२३ ) ९.४० am,

४) दिवा पेन ( ६१०१९ ) ११.२० am,

५) दिवा रोहा ( ६१०१५ ) ६.४५ am,

६) दिवा पेन ( ६१०२५ ) ७.५० am,

७) दिवा रोहा ( ६१०१३ ) ८.०० am

वसई रोड पनवेल मेमू :

८) डहाणू पनवेल ( ६९१६४ ) ५.२५ am,

९) वसई पनवेल ( ६९१६८ ) १२.१० pm,

१०) वसई पनवेल ( ६९१६६ ) ४.४० pm

निवेदनावर अध्यक्ष श्री.शेखर बागवे व सेक्रेटरी श्री.यशवंत जडयार यांनी सह्या केल्या असून त्याच्या प्रति कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक श्री.संतोषकुमार झा,जनरल मॅनेजर : पश्चिम रेल्वे,खासदार श्री.सुनिल तटकरे,खासदार श्री.नारायण राणे व खासदार श्री.हेमंत सावरा यांना पाठवल्या आहेत.

सावंतवाडी रेल्वे स्थानकावर रेल हॉटेल्स आणि विविध कामांसाठी ३९ कोटींचा आराखडा तयार – आ. दिपक केसरकर

   Follow us on        

सावंतवाडी, दि. १२ फेब्रु. सावंतवाडी रेल्वे स्थानकावर लागणार्‍या पाण्याची व्यवस्था, रेल हॉटेल व छोटे निवासी रूम तसेच नव्या प्लॅटफॉर्मसाठी जवळपास 39 कोटी रुपये खर्चाच्या कामाचा आरा  खडा तयार करण्यात आला आहे. या कामासाठी लागणारा निधी रत्नसिंधू योजनेतून देण्यात येणार असल्याची माहिती रत्नसिंधू योजनेचे अध्यक्ष आमदार दीपक केसरकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

सावंतवाडी स्थानकावर लवकरच ठिकाणी रेल हॉटेल्स व रूम उभारण्यात येणार असून तिलारी धरणाचे पाणी सावंतवाडी रेल्वे टर्मिनसला देण्याची निविदा प्रक्रिया ही राबवण्यात येणार आहे. सावंतवाडी- मळगाव रेल्वे टर्मिनस या ठिकाणी दर्जेदार असे रेल हॉटेल व तुतारी रेल्वे रुळाच्या बाजूला नवे प्लॅटफॉर्म आणि छोट्या निवासी रूमची व्यवस्था करण्यासाठी नवा आराखडा तयार करण्यात आला आहे. या जागेची पाहणी आज श्री केसरकर यांनी केली. यावेळी त्यांनी जवळपास दोन तास सावंतवाडी मळगाव रेल्वे टर्मिनसच्या जागेची पाहणी केली. आणि तुतारी एक्सप्रेसमध्ये बसून नवीन आराखड्याची चर्चा केली यावेळी शिवसेनेचे जिल्हा संघटक संजू परब, जिल्हाप्रमुख अशोक दळवी, स्टेशन मास्टर कृष्णकांत परब , रेल्वेचे जे पी प्रकाश, श्री ए बी फुले, सुरज परब, सुनील परब ,श्री गाड , योगेश तेली सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी वैभव सगरे आदी उपस्थित होते.

आंगणेवाडी जत्रेसाठी कोकण रेल्वे मार्गावर धावणार अजून एक विशेष गाडी

   Follow us on        

Konkan Railway: श्री भराडी देवी आंगणेवाडी जत्रेसाठी जाणार्‍या भाविकांसाठी एक खुशखबर आहे. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी कोकण रेल्वे प्रशासनाने मध्य रेल्वेच्या समन्वयाने अजून काही अतिरिक्त विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या गाड्यांचे तपशील खालीलप्रमाणे आहेतः

गाडी क्र. 01134 / 01133 सावंतवाडी रोड – लोकमान्य टिळक (टी) – सावंतवाडी रोड विशेष:

गाडी क्र. 01134 सावंतवाडी रोड – लोकमान्य टिळक (टी) विशेष गाडी सावंतवाडी रोडवरून रविवार दिनांक २३/०२/२०२५ रोजी १८:०० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी लोकमान्य टिळक (टी) येथे 06:25 वाजता पोहोचेल.

गाडी क्र. 01133 लोकमान्य टिळक (टी) – सावंतवाडी रोड विशेष लोकमान्य टिळक (टी) येथून सोमवार दिनांक 24/02/2025 रोजी सकाळी 08:20 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 19:00 वाजता सावंतवाडी येथे पोहोचेल.

ही गाडी कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, विलवडे, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पेण, पनवेल आणि ठाणे स्थानकावर थांबेल.

डब्यांची रचना : एकूण 20 एलएचबी कोच : दोन टायर एसी – 01 कोच, थ्री टायर एसी – 03 कोच, थ्री टायर एसी इकॉनॉमी – 02 कोच, स्लीपर – 08 कोच, जनरल – 04 कोच, जनरेटर कार – 01, एसएलआर – 01.

या गाडीचे आरक्षण 09/02/2025 रोजी प्रवासी आरक्षण प्रणाली (PRS), इंटरनेट आणि IRCTC संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल

 

Sawantwadi: तुतारी एक्सप्रेसच्या सावंतवाडीतील प्रवाशांची ही गैरसोय दूर होणार

   Follow us on        

सावंतवाडी: सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकातील तुतारी एक्सप्रेसच्या प्रवाशांची होणारी गैरसोय आता दूर होणार असून तीन नंबर प्लॅटफॉर्मलगत पक्का डांबरी रस्ता बनविण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून हाती घेण्यात आले आहे. जिल्हा नियोजनमधून यासाठी निधी उपलब्ध करण्यात आला आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकातून ओव्हरब्रिज ओलांडून तीन नंबर प्लॅटफॉर्मवर येण्याची गैरसोय दूर होणार असून प्रवाशांनी त्याबाबत समाधान व्यक्त केले आहे.

सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकात विशेषतः सावंतवाडी ते दादर जाणारी तुतारी एक्सप्रेस ही तीन नंबर प्लॅटफॉर्मवर थांबवली जाते. त्यामुळे या गाडीतून ये जा करणारे प्रवासी व त्यांचे नातेवाईक यांची गैरसोय होत होती. रेल्वे स्थानकाच्या एक नंबर प्लॅटफॉर्मवरून तीन नंबरवर जाण्यासाठी प्रवाशांना तसेच त्यांच्या नातेवाईकांना सामानासह ओव्हर ब्रिजवर चढण्याची व उतरण्याची कसरत करावी लागत होती. विशेषतः अंध, अपंग तसेच वृद्ध व महिला प्रवाशांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर काही प्रवासी खाजगी वाहने तसेच रिक्षाच्या माध्यमातून तीन नंबर प्लॅटफॉर्मच्या पलीकडे असलेल्या कच्च्या रस्त्यावरुन जीवेघेणा प्रवास करीत त्या ठिकाणी पोहोचत असत त्यामुळे हा रस्ता पक्का व्हावा अशी मागणी स्थानिकांमधून केली जात आहे. मात्र ही जागा रेल्वेच्या ताब्यात असल्याने व कोकण रेल्वे बोर्डाकडून त्यावर खर्च घातला जात नसल्याने अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाने याबाबत पुढाकार घेऊन सदरचा रस्ता पक्का करण्याचे काम हाती घेतले आहे. त्यासाठी जिल्हा नियोजनच्या माध्यमातून तब्बल ३ कोटी १७ लाख ७२ हजार एवढा निधी मंजूर करण्यात आला आहे.

पहिल्या टप्प्यात रस्त्याचा आकार मातीचा भरावा तसेच जीएसबी मटेरियलचा थर त्यानंतर खडीकरण व डांबरीकरण अशा स्वरूपात ही पक्की सडक निर्माण केली जात असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या देखरेखीखाली हा रस्ता करण्याचे काम केले जात आहे. सावंतवाडी येथील गणेश इन्फ्रा या ठेकेदार कंपनीच्या माध्यमातून हे काम सुरु आहे. तब्बल ७ मीटर रुंदीचा हा रस्ता राज्यमार्ग क्रमांक १८५ ला जोडत असून कोकण रेल्वेच्या तीन नंबर प्लॅटफॉर्मला समांतर असा हा रस्ता सावंतवाडी वेंगुर्ला रस्त्यालाही जोडला जाणार आहे. या रस्त्यावर असलेल्या ओहोळावर ३ मीटर लांबी व रुंदीचा बॉक्स सेल बांधण्यात येणार आहे. सद्या या रस्त्याचे पहिल्या टप्प्यातील भरावाचे तसेच जीएसबी मटेरियल पसरण्याचे काम वेगाने सुरु आहे. लवकरच हा रस्ता पूर्ण होणार असून त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय दूर होणार आहे. तसेच मळगाव शिवाजी चौक येथून रेल्वे फाटकातून निरवडेच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांना देखील फाटक पडल्यावर होणारा विलंब टाळण्यासाठी हा रस्ता पर्यायी मार्ग म्हणून उपयुक्त ठरु शकणार आहे. त्यामुळे प्रवाशांमधून या रस्त्याबाबत समाधान व्यक्त होत आहे.

Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावरील दोन गाड्यांच्या अंतिम स्थानकात तात्पुरत्या स्वरूपात बदल

   Follow us on        

Konkan Railway: या महिन्यात दरम्यान तेजस एक्सप्रेस किंवा जन शताब्दी एक्सप्रेसने प्रवास करणार असाल तर तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथे सुरु असलेल्या प्लॅटफॉर्म अपग्रेडेशनमुळे या दोन्ही गाड्या दिनांक 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत सीएसएमटीऐवजी दादर पर्यंतच धावणार आहेत.

सध्या, तेजस एक्सप्रेस (ट्रेन क्र. 22120) आणि जन शताब्दी एक्सप्रेस (ट्रेन क्र. 12051), ज्या सीएसएमटी येथून प्रवास सुरु करतात आणि संपवतात त्यांचे अंतिम स्थानक काही कालावधीसाठी दादर असणार आहे. हा तात्पुरता बदल 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत असणार आहे. त्यानंतर, गाड्या त्यांच्या नेहमीच्या ठिकाणाहून सुटतील आणि थांबतील. मध्य रेल्वेच्या या निर्णयामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ शकते. विशेषतः नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांची. याशिवाय, मुंबईत (Mumbai) येणाऱ्या प्रवाशांना त्यांच्या अंतिम ठिकाणी पोहोचण्यासाठी पर्यायी व्यवस्था करावी लागेल, जसे की लोकल ट्रेन, टॅक्सी किंवा इतर वाहतूक पर्यायांचा वापर करावा लागेल.

Special Trains on Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर धावणार दोन ‘आंगणेवाडी जत्रोत्सव विशेष’ गाड्या

   Follow us on        

Konkan Railway: कोकणातील प्रसिद्ध आंगणेवाडी जत्रे दरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी कोकण रेल्वेने मध्य रेल्वेच्या समन्वयाने दोन विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्यांचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

1) गाडी क्र. 01129 / 01130 लोकमान्य टिळक (T) – सावंतवाडी रोड – लोकमान्य टिळक (T) विशेष: 

गाडी क्र. 01129 लोकमान्य टिळक (T) – सावंतवाडी रोड विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस येथून शुक्रवार दिनांक 21/02/2025 रोजी 00:55 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी 12 वाजता सावंतवाडी रोडला पोहोचेल.

गाडी क्र. 01130 सावंतवाडी रोड – लोकमान्य टिळक (T) ही विशेष गाडी सावंतवाडी रोडवरून शुक्रवार दिनांक 21/02/2025 रोजी 18:00 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी लोकमान्य टिळक टर्मिनस येथे 06:10 वाजता पोहोचेल.

ही गाडी ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ स्थानकावर थांबेल.

डब्यांची रचना : एकूण 19 एलएचबी कोच : फर्स्ट एसी – 01 कोच, टू टायर एसी – 02 कोच, थ्री टायर एसी – 06 कोच, स्लीपर – 08 कोच, जनरेटर कार – 02

2) गाडी क्र. 01131 / 01132 लोकमान्य टिळक (T) – सावंतवाडी रोड – लोकमान्य टिळक (T) विशेष: 

गाडी क्र. 01131 लोकमान्य टिळक (T) – सावंतवाडी रोड विशेष ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून शनिवार दिनांक 22/02/2025 रोजी 00:55 वाजता सुटेल आणि गाडी त्याच दिवशी दुपारी 12.00 वाजता सावंतवाडी रोडला पोहोचेल.

गाडी क्र. 01132 सावंतवाडी रोड – लोकमान्य टिळक (T) विशेष गाडी सावंतवाडी रोडवरून शनिवार दिनांक 22/02/2025 रोजी 18:00 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी लोकमान्य टिळक टर्मिनस येथे 06:10 वाजता पोहोचेल.

ही गाडी ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ स्थानकावर थांबेल.

डब्यांची रचना : एकूण 22 एलएचबी कोच : दोन टायर एसी – 01 कोच, थ्री टायर एसी – 06 कोच, स्लीपर – 09 कोच, जनरल – 04 कोच, जनरेटर कार – 01, एसएलआर – 01.

गाडी क्रमांक 01130 आणि 01132 या गाड्यांचे आरक्षण दिनांक 09/02/2025 रोजी सर्व प्रवासी आरक्षण प्रणाली (PRS), इंटरनेट आणि IRCTC संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे.

रत्नागिरी: कातळशिल्पांकडे लोकांचा कल वाढवा यासाठी अनोखा उपक्रम

   Follow us on        

रत्नागिरी:कोकणातील कातळशिल्पांकडे लोकांचा कल आणखी वाढावा, त्यांच्याविषयी कुतूहल निर्माण व्हावं, या निमित्ताने या अश्मयुगीन कातळशिल्प रेखांकित टीशर्टचे अनावरण रत्नागिरीतील कातळशिल्प वारसा संशोधन केंद्र येथे करण्यात आले. कातळशिल्प संशोधक धनंजय मराठे यांच्या मागणीनुसार माजी मंत्री रविन्द्र चव्हाण यांच्या स्वनिधीतून आणि अनिकेत पटवर्धन यांच्या सहकार्याने आणि वारसा संवर्धनाच्या जनजागृतीसाठी या कातळशिल्प रेखांकित टीशर्टचे अनावरण केले गेले.

यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष वर्षा ढेकणे, प्रदेश सचिव शिल्पा मराठे , युवा मोर्चा प्रदेश सचिव विक्रम जैन, दक्षिण तालुका अध्यक्ष दादा दळी, उत्तर तालुका अध्यक्ष विवेक सुर्वे, शहर अध्यक्ष राजन फाळके, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष संकेत कदम, मनोर दळी, भक्ती दळी, निलेश आखाडे, उमेश देसाई आणि मोठ्या संख्येने भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

कोकण रेल्वे मार्गावर वाढीव थांबे देण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाच्या अधिकारक्षेत्रात – संतोषकुमार झा, व्यवस्थापकीय संचालक (कोरे)

   Follow us on        
रत्नागिरी : कोकण रेल्वेमार्गावर स्थानकांवर गाड्या थांबवण्याबाबत अनेक मागण्यांचे प्रस्ताव आमच्याकडे आले आहेत. गाड्यांच्या थांब्यांबाबतचा निर्णय रेल्वे मंत्रालय घेत असते. त्यामुळे आम्ही रेल्वे मंत्रालयाकडे हे प्रस्ताव सादर केले आहेत. रत्नागिरी-दादर पॅसेंजर ही गाडी दादरपर्यंत नेण्याचा निर्णय मध्यरेल्वेचा आहे. ही गाडी दादरपर्यंत गेली तर आम्हाला निश्चितच आनंद होईल असे, कोकण रेल्वेचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांनी आज सांगितले. रत्नागिरी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
कोकण रेल्वेच्या संपूर्ण म्हणजे ७४० किलोमीटर रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण गेल्यावर्षी पूर्ण झाले असल्याने कोकण रेल्वे ही देशात १०० टके ग्रीन रेल्वे झाल्याची माहिती कोकण रेल्वेचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांनी दिली. विद्युतीकरणामुळे डिझेलच्या तुलनेमध्ये दर वर्षाला जवळपास १९० कोटी रुपयांची बचत होत असल्याची माहितीही त्यांनी दिली.
कोकण रेल्वेला आता २६ वर्ष पूर्ण झाली आहेत. कोकण रेल्वे उभारणीचा कालावधी पकडला तर तो काळ ३३  वर्षांचा आहे. गेल्या वित्तीय वर्षामध्ये कोकण रेल्वेला 301 कोटी रुपयांचा नफा झाला आहे. हा नफा रेल्वे वाहतूक आणि प्रकल्प उभारणीतून झाला आहे. कोकण रेल्वे केवळ ६४४ किमी रेल्वेमार्गापुरती आता मर्यादित राहिली नसून रेल्वे प्रकल्पाच्या माध्यमातून कोकण रेल्वे देशातील 16 राज्यांमध्ये काम करत असल्याचा अभिमान कोकण त्यांनी या पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
कोकण रेल्वेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संतोषकुमार झा आज रत्नागिरीमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी कोकण रेल्वेच्या प्रगतीविषयी माहिती दिली. कोकण रेल्वेने जम्मूमध्ये १९  हजार कोटी रुपयांचे कटरा-उधमपूर येथे रेल्वेमार्गाचे यशस्वी काम केले आहे. या मार्गावर १६ बोगदे आणि २२ रेल्वेपूल आहेत. आयफेल टॉवरपेक्षा उंच असलेला चिनाब रेल्वेपूल कोकण रेल्वेने उभारलेला आहे. तसेच एनजी रेल्वेपूल केबलवर उभारण्यात आलेला आहे. त्याचबरोबर कोकण रेल्वे नेपाळ आणि नैरोबीमध्येही काम करत असल्याचे झा यांनी सांगितले.
प्रवासी सुविधांमध्ये कोकण रेल्वेने लक्ष केंद्रित केले आहे. रत्नागिरी विभागामध्ये खेड तसेच चिपळूण येथे सर्व कॅटेगिरीतील प्रवाशांसाठी एक्झिक्यूटिव्ह लाऊंज ही सुविधा पुरवली आहे. पुढील प्रत्येक वर्षी कोकण रेल्वे मार्गावरील स्थानकांवर वर्षी सात ते आठ एक्झिक्युटिव्ह लाऊंज निर्माण केले जाणार आहेत.यावेळी मुख्य वाणिज्य प्रबंधक आशुतोष श्रीवास्तव, प्रधान मुख्य अभियंता आर नागदत्त, मुख्य जनसंपर्क अधिकारी गिरीश करंदीकर, विभागीय रेल्वे व्यवस्थापक शैलेश बापट आदी उपस्थित होते.

मुंबई गोवा महामार्ग यावर्षीचीही ‘डेडलाईन’ चुकविणार? जनआक्रोश समितीने महामार्गावरील अपूर्ण कामांची यादीच काढली

   Follow us on        

Mumbai Goa Highway:गेल्या १७ वर्षांपासून रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाला आता नवीन डेडलाईन मिळाली आहे. दिनांक ३१ डिसेंबर २०२५ रोजी पर्यंत मुंबई गोवा महामार्गाचे काम पूर्ण होणार असल्याचे सांगितले जात आहे मात्र महामार्गाची सध्याची स्थिती आणि चालू असलेल्या कामाची गती पाहता प्रशासन ही नवीन डेडलाईन पाळण्यास अपयशी ठरणार असल्याचा आरोप मुंबई गोवा महामार्ग जनआक्रोश समितीने केला आहे. एवढ्यावरच न थांबता समितीने या महामार्गावरील प्रत्येक किलोमीटरच्या कामाची सध्याची  स्थिती लिखित स्वरूपात सादर केली आहे. समितीने बनविलेल्या यादीनुसार बरेच काम अपूर्ण असून कामाचा वेग पाहता दिलेल्या मुदतीत काम पूर्ण होणे अशक्य असल्याचे समितीचे म्हणणे आहे.

समितीने मांडलेली महामार्गाची सद्यस्तिस्थि

टप्पा-०१ पनवेल ते कास -००/०० किमी ४२ किमी (४२ किमी)-
सदर टप्याची वर्क ऑर्डर २८ मार्च २०२३ रोजी देण्यात आलेली असून ३१ डिसेंबर २०२३ काम पूर्ण करण्याची मुदत देण्यात आलेली होती. सदर टप्प्यात ३८ किमी कॉन्क्रीट पूर्ण झालेली असून नित्कृष्ठ दर्जाचे काम करण्यात आलेले आहे. तर अद्यापही साईट पट्टी, दुभाजकांमध्ये शोभिवंत झाडे लावणे, ड्रेनेज लाईन, सूचना फलक यांसारखी कामे अद्यापही अपूर्ण आहेत व सदर टप्प्यात ०६ महिन्याच्या आतमध्ये खड्डे महामार्गाला पडलेले आहेत. सदर टप्पा ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करण्यात येणार होते परंतु अद्यापही हे काम पूर्ण होण्यास किती कालावधी लागेल याची शाश्वती आम्हा कोकणवासीयांना नाही.

टप्पा-०२ कासु ते इंदापुर -४२ किमी ते ८४ किमी (४२ किमी)-
सदर टप्याची वर्क ऑर्डर ऑक्टोबर २०२२ रोजी देण्यात आलेली असून ३१ मे २०२४ पर्यंत काम पूर्ण करण्याची मुदत देण्यात आलेली होती. सदर टप्याची परिस्थिती अतिशय दयनीय आहे. अद्यापही या टप्प्याची एक मार्गिका झालेली नाही. कासू ते वाकण महामार्ग नसून पायवाट झालेली आहे. महामार्गाला पेव्हर ब्लॉक दिसत आहेत. सदर टप्याचे काम दिवसाला १०० मीटर होत आहे यानुसार अंदाज लावल्यास हा महामार्ग पूर्ण होईल याची शाश्वती आम्हा कोकणकरांना नाही. तसेच या टप्यातील सर्व उड्डाणपुलाचे काम बाकी आहे, जनावरे, वहानांसाठीभुयारी मार्ग, साईटपट्टीचे काम बाकी आहे तर अद्यापही जमिनी ताब्यात घेतलेल्या नाहीत व अतिक्रमण हटावलेला नाही. या टप्प्यातील १२ किमी मध्ये ११ ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या भुयारी मार्गाचे काम १५-२० टक्के झालेला आहे तर नागोठणे येथील पुलाचे काम २०-२५ टक्के पूर्ण करण्यात आलेला आहे. याठिकाणी पेव्हर ब्लॉक असून वर खाली झाल्याने अपघात वाढत आहेत. सदर टप्प्याचे काम २००५ साली बनविण्यात आलेल्या आराखड्यानुसार होत असून २००५ साली वाहनांची संख्या व लोकसंख्या कमी होती व त्याआधारे काम चालू असल्याने भुयारी मार्ग अडचण ठरत आहेत. तसेच महामार्गावर भराव टाकल्याने शेतकऱ्या ची जमीन नकसान होत आहे.

टप्पा-०३ इंदापूर ते वडपाले-८४ किमी ते ११० (२६.७५ किमी)-
सदर टप्प्यात इंदापूर व माणगाव हे दोन बायपास येत असून सदर बायपासचे काम ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करण्यात येईल असे अधिकारी वर्गाकडून ०४ जुलै २०२३ रोजी माणगाव येथे करण्यात आलेल्या आंदोलन दरम्यान आश्वासन देण्यात आलेले होते परंतु अद्यापही या दोन्ही बायपासचीही अवस्था बिकट आहे. सर्व अडचणी सुटल्या असून काम धीम्या गतीने का चालू आहे याबाबत आपण स्वतः पाठपुरावा करून सदर काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे. सदर ठिकाणी जनआक्रोश समितीच्यावतीने पाहणी केली असता अद्यापही सदर कामाला गती देण्यात आलेली नाही. सद्यस्थितीत पूर्णता काम बंद असून नवीन ठेकेदार निवडन्यात येणार आहे. आपण स्वतः निरिक्षण केले असल्यास माणगांव शहरात दररोज वाहनांच्या ०४-०५ किलोमीटरच्या रांगा पहावयास मिळत असतील परिणामी सदर ठिकाणी कोकणकर व स्थानिक वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून नागरिकांना व प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. तर लोणेरे येथील ब्रिजचे काम अद्यापही बंद आहे.

टप्पा-०५ – भोगाव १४९ किमी ते कशेडी १६१ किमी
एका बोगद्याचे काम झालेले असून पहिल्याच पावसात गळती पहायला मिळली तर दूसऱ्या बोगद्याचे काम डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करण्यात येणार होते परंतु अद्यापही बोगदा व त्यापुढील ब्रिजचे काम बाकी आहे.

टप्पा-०६ – कशेडी १६१ किमी ते परशुराम घाट २०५ किमी
सदर टप्प्यात खेड रेल्वे स्थानक येथील ब्रिजचे काम अपूर्ण असून परशुराम घाटातील परिस्थिती बिकट आहे, सदर घाट क्षेत्रात योग्यरित्या व सुरक्षेच्या दृष्टीकोनातून काम अपेक्षित आहे.

टप्पा-०७ – परशुराम घाट २०५ किमी ते आरवली २४१ किमी-
सदर टप्प्यातील चिपळूण येथील ब्रिज दुर्घटना घडली व यानंतर सदर ब्रिज तोडण्यात आले व नव्याने सदर ब्रिजचे काम होणे अपेक्षित असताना अद्यापही कामाला सुरुवात नाही.

टप्पा-०८ व ०९-आरवली ते वाकेड –
सदर टप्यातील ३५% काम झालेले असून उर्वरित सर्व काम रखडलेले आहे व सदर कामाची किलोमीटरनुसार परिस्थिती दर्शवीत आहोत. तरी सदर कामाला गती देऊन लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे.

किमी  -कामाचे स्वरुप 
३२०.० – ओणी पासून सुरुवात
३१६ ते ३१३ – खराब टप्पा व अजुनही डांबरी रस्ता
३१४.० – संरक्षण भिंत आवश्यक
३१३.० – एक बाजू चालू
३१३ ते ३१२ – मुंबईकड़े येणारी बाजु डांबरी रस्ता
३१२ ते ३११ – कोकणात येणारी बाजु डांबरी रस्ता
३११.० – मुंबईकडे येणारी बाजु डांबरी रस्ता व दुसरी बाजु काम चालु
३०९.०  – मुंबईकडे येणारी बाजु डांबरी रस्ता
३०९.०  – मुंबईकडे येणारी बाजु मोरीचे काम बाकी
३०७.० – मुंबईकडे येणारी बाजु कॉन्क्रीट तर कोकणात येणारी बाजु डांबरी रस्ता
३०६.०  – दोन्ही बाजूचे काम बाकी तर दूसरी लेन दिसतही नाही
३०३.० – एक बाजू कॉन्क्रीट
३०२.०  – डांबरी रस्ता
३०१.० – कोकणात येणारी बाजु कॉन्क्रीट तर मुंबईकडे येणारी बाजु डांबरी रस्ता
३०१.० – ब्रिजचे काम चालु
३००.० – कोकणात येणारी बाजु कॉन्क्रीट तर मुंबईकडे येणारी बाजु डांबरी रस्ता
२९९-२९८ – एक बाजु डांबरी रस्ता तर दूसरी लेन अस्तित्वात नाही
२९७.० – डोंगर कटिंगचे काम चालु
२९७.० – कोकणात येणारी बाजु कॉन्क्रीट तर मुंबईकडे येणारी बाजु डांबरी रस्ता
२९६.०  – मुंबईकडे येणारी बाजु कॉन्क्रीट तर कोकणात येणारी बाजु डांबरी रस्ता
२९५.० – काम चालु
२९४.५ – एकच मार्गिका
२९४.० – नदिवरील पुलाचे काम बाकी
२९३.० – काम चालु
२९३.०  – मुंबईकडे येणारी बाजु कॉन्क्रीट तर कोकणात येणारी बाजु डांबरी रस्ता
२९३.० – संरक्षण भिंत आवश्यक
२९२.० – एकच मार्गिका – पर्यायी मार्गाचा काम चालु
२९२.० – मुंबईकडे येणारी बाजु कॉन्क्रीट तर कोकणात येणारी बाजु डांबरी रस्ता
२९१.०  – कोकणात येणारी बाजु कॉन्क्रीट तर मुंबईकडे येणारी बाजु डांबरी रस्ता
२९०.० – मुंबईकडे येणारी बाजु कॉन्क्रीट तर कोकणात येणारी बाजु डांबरी रस्ता
२८८.० – एकच मार्गिका तर थोडेफार दोन्ही बाजु कॉन्क्रीट
२८७.० – एक मार्गिका डांबरी रस्ता
२८७.० – पाली ब्रिजचे काम चालु
पाली ते आरवली महामार्गाची स्थिती 
पाली ते पलस्पे गूगल मॅपद्वारे किलोमीटर दर्शविन्यात आले आहेत
२९१.० – दोन्ही बाजु कॉन्क्रीट
२९०.० – कॉन्क्रीट काम चालू
२८९.० – सिंगल लेन –
२८८.५- दोन्ही बाजु कॉन्क्रीट
२८८.० – मोरीचे काम बाकी
२८७.० – एकच मार्गिका कॉन्क्रीट दूसरी बाजु कॉन्क्रीट काम चालू
२८७.० – संरक्षण भिंत आवश्यक
२८६.० – दोन्ही बाजु कॉन्क्रीट
२८५.० – कोकणात येणारी बाजु कॉन्क्रीट तर मुंबईकडे येणारी बाजु काम चालू
२८४.० – सिंगल लेन दूसरी बाजु काम चालू
२८२.०  – एकच मार्गिका कॉन्क्रीट
२८१.० – ब्रिजचे काम चाल
२८०.० – एकच मार्गिका कॉन्क्रीट
२७९.० – काम चालु
२७८.० – एक मार्गिका डांबरी रस्ता
२७७.० – काम चालु
२७६.० – काम चालु
२७५.० – बावनदी ब्रिज बाकी
२७५.० – तलेकाटे काम बाकी
२७४.० – अद्यापही जुनी लेन
२७३.० – एकच मार्गिका कॉन्क्रीट
२७३.० – तलेकाटे पोस्ट ऑफिस जवळ संरक्षण भिंत आवश्यक
२७२.० – काम चालु
२७२.० – कोकणात येणारी बाजु कॉन्क्रीट
२७१.० – एक मार्गिका डांबरी रस्ता
२६९.० – संरक्षण भिंत आवश्यक
२६७.० – कोकणात येणारी बाजु कॉन्क्रीट
२६४.० – कोकणात येणारी बाजु कॉन्क्रीट
२६३.० – अद्यापही जुनी लेन
२६२.० – कोलंबे येथे काम चालु
२६१.० –  अद्यापही जुनी लेन
२५९.० – कोकणात येणारी बाजु कॉन्क्रीट
२५८.० – अद्यापही जुनी लेन-ब्रिजचे काम चालु
२५७.०   – कोकणात येणारी बाजु कॉन्क्रीट
२५६.० – अद्यापही जुनी लेन
२५५.०  – संगमेश्वर डेपो (गडगडी नदी ब्रिज काम बाकी)
२४९.० – एक मार्गिका डांबरी रस्ता
२४८.० – खराब टप्पा व अजुनही डांबरी रस्ता
२३६.० –  ब्रिजचे काम चालु
२३५.० – आरवली टोल प्लाझा

ST Bus Fare Hike: मुंबई-पुण्यातून कोकणात एसटीने जाण्यासाठी आता किती पैसे मोजावे लागणार?

   Follow us on        

ST Fare Hike:हकिम  समितीने निश्चित केलेल्या सुत्रानुसार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, मुंबई यांना टप्पा वाहतूक सेवांच्या भाडेदरामध्ये  १४.९५  टक्के वाढ केल्यामुळे एसटी प्रवास आता महागला आहे. भाडेवाढ दिनांक २५ जानेवारीपासून एसटीच्या  गाडयांना लागू करण्या आली आहे. ही भाडेवाढ खालीलप्रमाणे आहे. 

अशी आहे भाडेवाढ

  • सेवेचा प्रकार :  साधी बस – सध्याचे भाडे प्रति टप्पा ६  कि.मी. ८.७० रुपये, दिनांक २५ जानेवारी २०२५  पासून सुधारीत भाडेदर, ६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी  प्रवास भाडेदर १०.०५ रुपये, प्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) (१ रुपये पटीत) ११ रुपये,
  • जलद सेवा (साधारण) : सध्याचे भाडे प्रति टप्पा ६  कि.मी. ८.७० रुपये, दिनांक २५ जानेवारी २०२५  पासून सुधारीत भाडेदर, ६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी  प्रवास भाडेदर १०.०५ रुपये, प्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) (१ रुपये पटीत) ११ रुपये.
  • रात्र सेवा (साधारण बस) : सध्याचे भाडे प्रति टप्पा ६  कि.मी. ८.७० रुपये, दिनांक २५ जानेवारी २०२५  पासून सुधारीत भाडेदर, ६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी  प्रवास भाडेदर १०.०५ रुपये, प्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) (१ रुपये पटीत) ११ रुपये.
  • निम आराम : सध्याचे भाडे प्रति टप्पा ६  कि.मी. ११.८५ रुपये, दिनांक २५ जानेवारी २०२५  पासून सुधारीत भाडेदर, ६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी  प्रवास भाडेदर १३.६५ रुपये, प्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) (१ रुपये पटीत) १५ रुपये.
  • विनावातानुकूलीत शयन आसनी: सध्याचे भाडे प्रति टप्पा ६  कि.मी. ११.८५ रुपये, दिनांक २५ जानेवारी २०२५  पासून सुधारीत भाडेदर ६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी  प्रवास भाडेदर १३.६५ रुपये, प्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) (१ रुपये पटीत) १५ रुपये.
  • विनावातानुकूलीत शयनयान : सध्याचे भाडे प्रति टप्पा ६  कि.मी. ११.८५ रुपये, दिनांक २५ जानेवारी २०२५  पासून सुधारीत भाडेदर ६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी  प्रवास भाडेदर १४.७५ रुपये, प्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) (१ रुपये पटीत) १६ रुपये.
  • शिवशाही (वातानुकूलीत): सध्याचे भाडे प्रति टप्पा ६  कि.मी. १२.३५ रुपये, दिनांक २५ जानेवारी २०२५  पासून सुधारीत भाडेदर ६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी  प्रवास भाडेदर १४.२० रुपये, प्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) (१ रुपये पटीत) १६ रुपये.
  • जनशिवनेरी (वातानुकूलीत) : सध्याचे भाडे प्रति टप्पा ६  कि.मी. १२.९५ रुपये, दिनांक २५ जानेवारी २०२५  पासून सुधारीत भाडेदर ६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी  प्रवास भाडेदर १४.९० रुपये, प्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) (१ रुपये पटीत) १७ रुपये.
  • शिवशाही स्लिपर (वातानुकूलीत) : सध्याचे भाडे प्रति टप्पा ६  कि.मी. १३.३५ रुपये, दिनांक २५ जानेवारी २०२५  पासून सुधारीत भाडेदर ६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी  प्रवास भाडेदर १५.३५ रुपये, प्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) (१ रुपये पटीत) १७ रुपये.
  • शिवनेरी (वातानुकूलीत) : सध्याचे भाडे प्रति टप्पा ६  कि.मी. १८.५० रुपये, दिनांक २५ जानेवारी २०२५  पासून सुधारीत भाडेदर ६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी  प्रवास भाडेदर २१.२५ रुपये, प्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) (१ रुपये पटीत) २३ रुपये.
  • शिवनेरी स्लिपर (वातानुकूलीत): सध्याचे भाडे प्रति टप्पा ६  कि.मी. २२ रुपये, दिनांक २५ जानेवारी २०२५  पासून सुधारीत भाडेदर ६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी  प्रवास भाडेदर २५.३५ रुपये, प्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) (१ रुपये पटीत) २८ रुपये,
  • ई बस ०९ मिटर (वातानुकूलीत): सध्याचे भाडे प्रति टप्पा ६  कि.मी. १२ रुपये, दिनांक २५ जानेवारी २०२५  पासून सुधारीत भाडेदर ६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी  प्रवास भाडेदर १३.८० रुपये, प्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) (१ रुपये पटीत) १५ रुपये,
  • ई-शिवाई / ई बस १२ मिटर (वातानुकूलीत): सध्याचे भाडे प्रति टप्पा ६  कि.मी. १३.२० रुपये, दिनांक २५ जानेवारी २०२५  पासून सुधारीत भाडेदर ६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी  प्रवास भाडेदर १५.१५ रुपये, प्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) (१ रुपये पटीत) १७ रुपये.

मुंबई पुण्यातून कोकणात जाण्यासाठी उपलब्ध असेलल्या काही सेवांचे सुधारित भाडे

प्रवास साधी सेवा सेमी लक्झरी शिवशाही सामान्य स्लीपर
पुणे ते सावंतवाडी ६५३ ९४८ ९६७
पुणे ते कणकवली ६०९ ८२५ ९०३ ८९१
पुणे ते रत्नागिरी ५३९ ७९९
पुणे ते चिपळूण ४२८ ६३६ ५७९
कोल्हापूर ते सावंतवाडी २५१ ४०२
कोल्हापूर ते कणकवली २०७ २७९
कोल्हापूर ते रत्नागिरी २३७
कोल्हापूर ते चिपळूण २८७
मुंबई ते खेड ३९८ ५३८
मुंबई ते चिपळूण ४५८ ६२० ६२०
मुंबई ते दापोली ३९८ ५३८
बोरिवली ते रत्नागिरी ६३९
मुंबई ते कणकवली ७५० ११५६
मुंबई ते मालवण १२६०
बोरिवली ते महाड ५०२

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search