Category Archives: कोकण

ब्रेकिंग: ओव्हरहेड वायर तुटल्याने कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत

   Follow us on        
Konkan Railway : आडवली येथे वायर तुटल्याने कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळित झाली आहे. या मार्गावरील दोन्ही  दिशेची  वहतूक बंद झाली आहे. ही घटना दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली असून अनेक गाड्या दीड ते दोन तासांपेक्षा अधिक काळ विविध रेल्वे स्थानकावर अडकून पडलेल्या आहेत.
मुंबई मडगाव मांडवी एक्स्प्रेस संगमेश्वर येथे दीड तासापासुन उभी आहे तर मडगाव मुंबई मांडवी एक्स्प्रेस रेल्वे गाडी वैभववाडी येथे दीड तासांपासून थांबलेली आहे. मुंबई मडगाव तेजस एक्स्प्रेस रेल्वे गाडी दोन तासांपासून रत्नागिरी येथे उभी आहे. तर जनशताब्दी अडीच तासांपासून आडवली येथे थांबवून ठेवण्यात आली आहे.
ओव्हरहेड वायर जोडण्याचे काम यद्धपातळीवर सुरु असून पुढील दीड ते दोन तासात वाहतूक पुर्वत होईल असे कोकण रेल्वे चे जनसंपर्क अधिकारी सचिन देसाई यांनी सांगितले आहे.

Konkan Railway: मंगळुरु, जनशताब्दी आणि तेजस एक्सप्रेस ठाणे-दादरपर्यतच धावणार

   Follow us on        
Konkan Railway: मुंबई सीएसएमटी येथील प्लॅटफॉर्मच्या कामांमुळे कोकण रेल्वे मार्गावरील तीन गाड्यांचे थांबे बदलण्यात आले. ३१ जानेवारीपर्यंत मंगळुरु एक्स्प्रेस ठाणे तर जनशताब्दी, तेजस एक्सप्रेस दादर स्थानकापर्यंत धावणार आहेत.
मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलवरील १२, १३ क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मच्या विस्तारीकरणाच्या कामामुळे कोकण रेल्वे मार्गावरील तीन गाड्यांना ठाणे आणि दादर स्थानकापर्यंत अंतिम थांबा देण्यात येणार आहे. प्लॅटफॉर्मचे काम पूर्ण न झाल्याने या गाड्यांचे अंतिम थांबे बदलण्यात आले आहेत. रेल्वेकडून दिलेल्या माहितीनुसार, गाडी क्र. १२१३४ मंगळुरु जं. मुंबई सीएसएमटी एक्सप्रेसचा प्रवास ३१ जानेवारीपर्यंत ठाणे स्थानकापर्यंत असेल.
गाडी क्र. २२१२० मडगाव जं. मुंबई सीएसएमटी तेजस एक्स्प्रेसचा प्रवासही ३१ जानेवारीपर्यंत दादर स्थानकापर्यंत मर्यादित करण्यात आलेला आहे. गाडी क्र. १२०५२ मडगाव जंक्शन मुंबई सीएसएमटी जनशताब्दी एक्स्प्रेसही ३१ जानेवारीपर्यंत दादर स्थानकापर्यंत धावणार आहे. प्रवाशांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आलेले आहे.

नागपूर – मडगाव एक्सप्रेसचे सावंतवाडीत जोरदार स्वागत

   Follow us on        
सावंतवाडी: नागपूर – मडगाव एक्सप्रेस  या गाडीला मुदतवाढ देताना रेल्वे प्रशासनाने तिला सावंतवाडी येथे थांबा मंजूर केला.  कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडीच्या लढ्याला यश मिळताना दिसत असून त्याचाचं एक भाग म्हणून नागपूर – मडगाव एक्सप्रेस या गाडीला सावंतवाडी रेल्वे स्थानक येथे थांबा देण्यात आला. आज कोकण रेल्वे प्रवासी संघटना (सावंतवाडी) च्या पदाधिकाऱ्यांनी सावंतवाडी स्थानकावर या गाडीचे जोरदार स्वागत केले.
आज ही ट्रेन पहिल्यांदाच सावंतवाडी स्थानकात थांबली, या एक्सप्रेस गाडीचे आज सायंकाळी सावंतवाडी रेल्वे येथे कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडीच्या वतीने गाडी समोर श्रीफळ फोडून मोठ्या आनंदात स्वागत करण्यात आले. यावेळी मोटरमनसह उपस्थित प्रवाशांना पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला.या ट्रेनला सावंतवाडीत थांबा मिळाल्यामुळे आता सावंतवाडी तालुक्यासह वेंगुर्ले, दोडामार्ग येथील प्रवाशांना या गाडीचा लाभ घेता येणार आहे. विदर्भाची पंढरी म्हणून ओळखली जाणाऱ्या श्री क्षेत्र शेगावला जाण्यासाठी कोकणवासीयांना या गाडीचा फायदा होणार आहे.
सावंतवाडी रेल्वे स्थानक येथे थांबा मंजूर होताचं क्षणी माडखोल येथील रेल्वे प्रेमी प्रितेश भागवत यांनी सावंतवाडी स्थानकातून शेगाव दौऱ्यासाठी ३० तिकीटे बुक करुन या गाड्याच्या सावंतवाडीतील थांब्याबाबत रेल्वेचे आभार मानले.
आज झालेल्या मडगाव-नागपूर एक्सप्रेस च्या स्वागतासाठी कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडीचे पदाधिकारी सागर तळवडेकर, मिहीर मठकर, नंदू तारी, सुभाष शिरसाट, गोविंद परब, मेहुल रेडीज, साहील नाईक, राशी परब, विहांग गोठोस्कर, तेसज पोयेकर, राज पवार, शुभम सावंत, रुपेश रेडीज यांच्यासह सावंतवाडी रिक्षा संघटना पदाधिकारी रेल्वेप्रेमी प्रितेश भागवत, नितेश तेली, नितिन गावडे उपस्थित होते.
सावंतवाडी थांबा मिळण्याबाबत संघटनेच्या प्रयत्नांना पाठबळ देणाऱ्या खासदार मा. श्री. नारायण राणे, आमदार मा.श्री. दिपक केसरकर, माजी केंद्रीय मंत्री मा.श्री. सुरेश प्रभू व माजी खासदार श्री. विनायक राउत यांचे यावेळी रेल्वे प्रवासी संघटनेकडून जाहीर आभार मानण्यात आले.

मुंबई गोवा महामार्गावर अपघात; ७ प्रवासी जखमी

   Follow us on        

Mumbai Goa Highway Accident: गोवा राष्ट्रीय महामार्गावरील धामणी येथे एर्टिगा आणि वॅगनर या दोन वाहनांच्या अपघातात दोन्ही वाहनांमधील सात प्रवाशी जखमी झाले आहेतएर्टिगा आणि बॅगनर या दोन वाहनांचा भीषण अपघात मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील संगमेश्वर रोड रेल्वे स्टेशनपासून जवळच असलेल्या मोरया ढाब्यासमोर झाला. एर्टिगा चालक अतुल आंनद किशोर नंदा (34) मूळ राहणार फरिदाबाद हा गोवा ते मुंबई अंधेरी येथे जात होता, तर वॅगनरचालक ओंकार शंकर घाडगे (23), राहणार पाटण (आंबळे) हा सातारा ते गणपतीपुळे जात असताना सुसाट वेगात येणाऱ्या एर्टिगा चालकाने वॅगनरला समोरासमोर जोरदार धडक दिली.

धडक एवढी जोरदार होती की, एर्टिगाच्या एअर बॅग उघडल्याने होणारी जीवितहानी टळली असून या एर्टिगाचालक अतुल नंदा, लिंडा मेलवीन डिकॉस्टा (58) अंधेरी, शॉन मेलवीन डीकॉस्टा (24) राहणार अंधेरी) यांना मार लागला असून लिंडा मेलवीन या महिलेच्या डोक्याला मार लागलावॅगनरमधील ओंकार घाडगे (23), अभिजित अशोक खरात (24) राहणार सातारा, प्रदीप लक्षण माने (20) राहणार सोलापूर यांना मार लागला असून या सर्वांवर संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले असून डोक्याला मार लागलेल्या लिंडा मेलवीन हिच्यावर प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी इतरत्र हलवण्यात आले

Revas-Reddi Coastal Highway: रेवस रेडी सागरी महामार्ग तीन वर्षात पूर्ण होणार – खासदार सुनील तटकरे

   Follow us on        
अलिबाग: कोकणच्या विकासात महत्वपूर्ण ठरणार्‍या रेवस रेडी सागरी महामार्गावरील आठ पूलांच्या कामाकरिता निधी मंजूर झालेला आहे. त्यांची कामे आता वेगाने होतील. त्यात बरोबर महामार्गाच्या कामात  गती देण्यात येईल. परिणामी सागरी महामार्गाचे काम येत्या तीन वर्षात पूर्ण होईल असा विश्वास रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी अलिबाग येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
या महामार्गामुळे किनारपट्टीचा प्रवास गतिमान होवू शकणार आहे. हा महामार्ग पूर्ण होण्यासाठी पाच मोठी सागरी पुले बांधावी लागणार आहेत. यामध्ये उरण-रेवस या सागरी पुलाचे काम सुरू झालेले आहे. दुसरे पूल आहे, आगरदांडा-दिवेआगर तर तिसरे पूल आहे हरिहरेश्वर-बाणकोट, चौथेपूल आहे दाभोळ-जयगड या सर्व पूलांना ग्रिनफिल्ड सागरी महामार्गाच्या नव्या रचनेत मंजूरी देण्यात आली आहे. किनारपट्टी सागरी महामार्गाची नवी रचना होत असताना दुसर्‍या बाजुला आजच्या डिजिटल युगामध्ये नवतंत्रज्ञानाद्वारे सागरी किनारपट्टी विकास हाती घेण्यात आला आहे. देशातील 12 बंदरे आंतरराष्ट्रीय बंदरे म्हणून विकसीत होत आहेत.
या 12 विकसीत होणार्‍या बंदरांमध्ये पालघरचे वाढवण बंदर आंतरराष्ट्रीय बंदर म्हणून विकसीत होईल. हे बंदर जेएनपीटीच्या बरोबरीचे विकसीत होणारे बंदर ठरेल. यामुळे जलवाहतूकीला मोठा वाव मिळणार आहे. याशिवाय पालघर, रायगड, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमधील 48 छोटी बंदरे विकसीत करण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. सागरमाला प्रकल्पांतर्गत बंदरांजवळील 12 शहरांचा स्मार्ट सिटी म्हणून विकास करण्यात येणार आहे. यामुळे पर्यटनाला चालना मिळण्यास मदत होईल. केंद्र सरकारचे औद्योगिक प्रकल्प, महामार्ग प्रकल्प, विशेष आर्थिक क्षेत्र यांच्याशी सागरमालातील विविध प्रकल्पांचा समन्वय साधला जाणार असल्यामुळे देशाच्या विकासाला गती मिळेल.

सावंतवाडीकरांना रेल्वेकडून नववर्षाची भेट; नागपूर-मडगाव एक्सप्रेसला सावंतवाडी येथे थांबा मंजूर

   Follow us on        
Konkan Railway:सावंतवाडी पंचक्रोशी प्रवाशांना रेल्वेकडून एक खुशखबर आहे. रेल्वे प्रशासनाने नागपूर  ते मडगाव दरम्यान चालविण्यात येणाऱ्या नागपूर -मडगाव-नागपूर या द्विसाप्ताहिक विशेष गाडीला मुदतवाढ देताना सावंतवाडी स्थानकावर थांबा मंजूर केला आहे.
गाडी क्रमांक ०११३९/०११४० नागपूर-मडगाव-नागपूर विशेष गाडीची मुदत या महिन्याच्या अखेरीस समाप्त होणार होती. मात्र तिला आता पुढील सूचना येईपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. गाडी क्रमांक ०११३९ नागपूर- मडगाव या गाडीला दिनांक ०१ जानेवारी २०२५ पासून तर गाडी क्रमांक ०११४० मडगाव नागपूर या गाडीला दिनांक ०२ जानेवारी २०२५ पासून मुदतवाढ देण्यात आली आहे.
सावंतवाडी येथे थांबा मंजूर, कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या मागणीला यश. 
सुरवातीला या गाडीला सावंतवाडी सावंतवाडी येथे थांबा देण्यात आला होता. मात्र चांगल्या प्रमाणात प्रवासी संख्या असतानाही या गाडीचा सावंतवाडी येथील थांबा रद्द करण्यात आला होता. त्यावेळेपासून हा थांबा पूर्ववत करण्यात यावा यासाठी कोकण रेल्वे प्रवासी संघटना (सावंतवाडी) ने अनेकदा निवेदने दिली होती. त्यांच्या या मागणीला अखेर यश आले आहे. संघटने तर्फे अध्यक्ष अँड संदीप निंबाळकर, मिहिर मठकर, विनोद नाईक, भूषण बांदिवडेकर, सागर तळवडेकर, सुभाष शिरसाट यांनी रेल्वे प्रशासनाचे,  कोकण रेल्वेचे क्षेत्रीय रेल्वे प्रबंधक शैलेश बापट, आमदार दीपक केसरकर, खासदार नारायण राणे यांचे आभार मानले आहेत
या गाडीचे सावंतवाडी स्थानकावरील वेळापत्रक
नागपूर येथून मडगावला जाताना ही गाडी (गाडी क्र. ०११३९) दुपारी १२.५६ वाजता सावंतवाडी स्थानकावर येईल, तर मडगाव वरून नागपूर येथे जाताना (गाडी क्र. ०११४०) रात्री २१.४८ वाजता सावंतवाडी स्थानकावर येईल.

नववर्ष स्वागतासाठी उत्तर रेल्वे चालविणार विशेष सुपरफास्ट एक्सप्रेस; कोकण विभागात या स्थानकांवर थांबे

   Follow us on        

Special Trains: नववर्षाच्या स्वागतासाठी गोव्यात जाणाऱ्या पर्यटकांसाठी उत्तर रेल्वेने एका सुपरफास्ट विशेष गाडीची घोषणा केली आहे. ही गाडी हजरत निजामुद्दीन आणि तिरुवनंतपुरम सेंट्रल या दरम्यान चालविण्यात येणार आहे.

गाडी क्रमांक ०४०८२/०४०८१ हजरत निजामुद्दीन -तिरुवनंतपुरम सेंट्रल – हजरत निजामुद्दीन सुपरफास्ट एक्सप्रेस स्पेशल:

गाडी क्रमांक ०४०८२ हजरत निजामुद्दीन तिरुअनंतपुरम सेंट्रल सुपरफास्ट एक्सप्रेस २८ डिसेंबर २०२४ (शनिवार) रोजी हजरत निजामुद्दीन येथून १९.२० वाजता सुटेल आणि तिरुवनंतपुरम सेंट्रल येथे तिसऱ्या दिवशी १९.४५ वाजता पोहोचेल.

परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक ०४०८१ तिरुवनंतपुरम सेंट्रल हजरत निजामुद्दीन सुपरफास्ट एक्स्प्रेस तिरुअनंतपुरम सेंट्रलवरून ३१ डिसेंबर २०२४ (मंगळवार) रोजी ०७.५० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी ०६.४५ वाजता हजरत निजामुद्दीनला पोहोचेल.

डब्यांची रचना: एसी टू टायर कोच -०५ , एसी थ्री टायर कोच- १० , जनरल सेकंड क्लास कोच-०२ , सेकंड क्लास कोच (दिव्यांगजन) -०१ आणि लगेज कम ब्रेक व्हॅन- ०१

या गाडीला कोकणात पनवेल, रोहा, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली आणि थिवी या मोजक्याच स्थानकांवर थांबे देण्यात आले आहे.

या गाडीच्या वेळा आणि थांब्याचे तपशील खालीलप्रमाणे आहेत

या विशेष गाडीचे आरक्षण दिनांक २५ डिसेंबर रोजी सुरु होणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

Loading

मुंबई मडगाव वंदे भारत एक्सप्रेस ठाण्यावरून कल्याणला वळवली.. कारण काय?

   Follow us on        

मुंबई: आजची मुंबई मडगाव वंदे भारत एक्सप्रेस तांत्रिक बिघाडामुळे ठाणे ते पनवेल दरम्यान तिच्या नियमित मार्गावरून वळविण्यात आली. या कारणाने पुढे तिचा गोव्याला जाणारा प्रवास ९० मिनिटे उशिराने झाला.

कोकणात जाणारी ही गाडी दिवा-पनवेल रेल्वे मार्गावर पनवेल स्थानकाकडे जाण्याऐवजी सकाळी ६:१० वाजता कल्याण मार्गावरून निघाली.

या घटनेमुळे मध्य रेल्वेवरील मुंबई लोकल सेवेवरही परिमाण झाला आणि या दरम्यानच्या लोकल गाड्यांनी लेटमार्क लावला.

मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील निला यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, दिवा जंक्शनवरील कोकणात जाणार्‍या गाड्यांचा मार्गावर म्हणजे डाऊन फास्ट लाईन आणि पाचव्या लाईन दरम्यान पॉइंट क्रमांक १०३ वर सिग्नलिंग आणि टेलिकम्युनिकेशन सिस्टममध्ये बिघाड झाल्यामुळे ही घटना घडली.

ट्रेनने नियोजित मार्गावरून मार्ग बदलल्यानंतर, ती कल्याण स्टेशनला रवाना झाली आणि दिवा जंक्शनवर परत फिरविण्यात आली आणि दिवा-पनवेल मार्गावर मडगावकडे परत प्रवास सुरू केला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

नीला म्हणाले की, सकाळी ६:१० ते ६:४५ पर्यंत कल्याणकडे जाण्यापूर्वी ही गाडी दिवा जंक्शनवर सुमारे ३५ मिनिटे थांबली होती.

जून २०२३ मध्ये सुरू झालेली प्रीमियम सीएसएमटी-मडगाव वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन मुंबईतील सीएसएमटी (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) येथून सकाळी ५:२५ वाजता निघते आणि त्याच दिवशी दुपारी १:१० वाजता गोव्यातील मडगावला पोहोचते.

 

 

 

 

Loading

धक्कादायक! मुंबई गोवा महामार्गावर धावत्या बसला आग

   Follow us on        
अलिबाग: मुंबई गोवा महामार्गावर कोलाड इथे खाजगी प्रवासी बस जळून खाक झाली. रात्री १२ वाजण्‍याच्‍या सुमारास ही घटना घडली. सुदैवाने यात कुठलीही जीवीत हानी झाली नाही. मात्र बससह प्रवाशांचे सर्व सामान जळून खाक झाले.
धाटाव एमआयडीसी, दीपक नायट्रेट कंपनी यांचे अग्‍नीशमन दल, कोलाड रेस्‍क्‍यू टीम आणि पोलीस यांनी बचाव कार्य केले व आगीवर नियंत्रण आणले. बसमध्‍ये चालक आणि क्लिनरसह ३४ प्रवासी होते. खापरोबा ट्रॅव्हल्सची ही एसी स्लीपर कोच बस मुंबईतील जोगेश्‍वरी येथून मालवणकडे निघाली होती. कोलाड रेल्‍वे पुलाजवळ आली असता बसच्‍या मागील बाजूस मोठा आवाज झाला. तेव्‍हां ड्रायव्‍हरने गाडी थांबवून पाहिले असता बसने मागील बाजूस पेट घेतल्‍याचे दिसले. तातडीने बसमधील सर्व प्रवाशांना खाली उतरवण्‍यात आले. त्‍यानंतर आगीचा भडका उडाला.

Loading

कोकण रेल्वेच्या दुपदरीकरणासाठी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांचे केंद्राला ५ हजार कोटींचे साकडे

   Follow us on        

पणजी: जैसलमेर येथे केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी घेतलेल्या अर्थसंकल्पपूर्व बैठकीत गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्यासाठी ९ हजार ७०० कोटी रुपयांच्या अर्थसाहाय्याची मागणी नोंदविली आहे. कोकण रेल्वेचे दुपदरीकरण, पश्चिम घाटाचे संवर्धन आणि राज्याचा विकासाच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या घटकांसाठी त्यांनी सहाय्याची मागणी केली आहे. केंद्रीय अर्थसंकल्पासाठी गोवा राज्यातर्फे त्यांनी निवेदन सादर केले आहे.
रेल्वेसाठी ५ हजार कोटींचे साकडे
कोकण रेल्वे पश्चिम किनाऱ्यावरील बंदरांना (मंगळूर ते मुंबई) जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे. या मार्गाचे दुहेरीकरण काही भागांतच पूर्ण झाले असून उर्वरित प्रकल्प निधीअभावी प्रलंबित आहे. या प्रकल्पासाठी ५ हजार कोटी रुपयांचे विशेष साहाय्य मंजूर करावे. जुने गोवे तसेच पेडणे येथे १९९२-१९९७ दरम्यान बांधलेल्या जुन्या बोगद्यांची स्थिती धोकादायक आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणि सलग संपर्कासाठी नवीन बोगद्यांच्या बांधणीसाठी दीड हजार कोटी रुपयांचे अनुदान मंजूर करावे, अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी केली.

कोकण रेल्वेचे दुपदरीकरण करणे अत्यावश्यक बनले आहे. सध्या वीर ते मडगाव दरम्यान एकपदरी मार्ग असल्याने मोठ्या प्रमाणात मागणी असूनही गाड्या वाढविणे शक्य होत नाही. याचा परिमाण कोकण आणि गोवा राज्याच्या विकासावर पर्यटनावर होत आहे. या मार्गाचे दुपदरीकरण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची गरज आहे. मात्र अजूनपर्यंत सादर केलेल्या अर्थसंकल्पात कोकण रेल्वेला नेहमीच डावलले गेले आहे. त्यामुळे कोकण रेल्वेचे विलीनीकरण करण्याची मागणी आता लोकप्रतिनिधींकडून आणि प्रवासी संघटनांकडून होत आहे. केंद्राची आणि चार राज्याची भागीदारी असलेल्या कोकण रेल्वेच्या विलीनीकरणाला गोवा राज्याने या आधीच आपली संमत्ती दर्शवली आहे.

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search