Category Archives: कोकण

Konkan Railway | शनिवारची तेजस एक्सप्रेस रद्द तर ‘या’ गाड्यांच्या आरंभ स्थानकात बदल 

   Follow us on        
Konkan Railway News: मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथील १०-११ फलाटांच्या विस्तारीकरणाच्या पायाभूत कामासाठी तर ठाणे येथील फलाटांचे रुंदीकरण करण्यासाठी मध्यरेल्वेने तीन दिवसांचा जम्बोब्लॉक घेतला आहे. या ब्लॉक दरम्यान उपनगरीय लोकल आणि एक्सप्रेस गाड्यांच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहे.
या ब्लॉक चा परिणाम कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या गाड्यांवर झाला आहे.



रद्द करण्यात आलेल्या गाड्या 
मध्य रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार उद्या शनिवार दिनांक ०१ जून रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक २२११९ तेजस एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे.
आरंभ स्थानकात बदल करण्यात आलेल्या गाड्या (Short Origination)
पनवेल येथून सोडण्यात येणाऱ्या गाड्या 
उद्या दिनांक ०१ जून रोजी प्रवास सुरु करणाऱ्या १०१०३ सीएसएमटी – मडगाव मांडवी एक्सप्रेस, १२१३३ सीएसएमट-मंगलोर एक्सप्रेस, २०१११ सीएसएमटी- मडगाव कोकणकन्या एक्सप्रेस या गाड्यांचा प्रवास पनवेल स्थानकावरून सुरु होणार आहे.
दादर येथून सोडण्यात येणाऱ्या गाड्या 
उद्या दिनांक ०१ जून रोजी प्रवास सुरु करणाऱ्या १२०५१ सीएसएमटी – मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस आणि २२२२० सीएसएमटी – मडगाव वंदेभारत एक्सप्रेस या दोन्ही गाड्यांचा प्रवास दादर स्थानकावरून सुरु होणार आहे.

Loading

Konkan Railway | “…….तर सावंतवाडी स्थानकाच्या उत्पन्नात ५०% वाढ झाली असती.”

   Follow us on        
सावंतवाडी, प्रतिनिधी: गर्दीच्या स्थानकांत गाडयांना थांबे दिलेत कि प्रवासी संख्या वाढते आणि परिणामी  त्या स्थानकाचे उत्पन्न वाढते हे सरळ गणित आहे. गेल्या वर्षी गोवा आणि दक्षणेकडील  काही स्थानकावर गाडयांना थांबे मंजूर झालेत, त्यांचे फलित म्हणून त्या त्या स्थानकाचे उत्त्पन्न चांगल्या टक्क्यांनी वाढले. गोव्याच्या कानाकोना या स्थानकावर गांधीधाम-नागरकोईल आणि नेत्रावती या गाड्यांचे थांबे मंजूर करण्यात आले. त्याचा चांगला परिणाम होऊन त्या स्थानकांच्या उत्पन्नात २३२% भरीव वाढ झाली. तर बारकुर या स्थानकावर मत्यगंधा या गाडीला थांबा देण्यात आला. त्या स्थानकाचे उत्पन्न सुमारे ४४% वाढले.
मात्र गरज आणि मागणी असूनही कोकण रेल्वे मार्गावरील सावंतवाडी (टर्मिनस) स्थानकावर गेल्या काही वर्षात गाडयांना थांबे न देऊनही या स्थानकांच्या उत्पन्नात चांगली वाढ झाल्याची दिसत आहे.  २०२३-२४ या आर्थिक वर्षात प्रवासी संख्येत आणि उत्पन्नात अनुक्रमे १२% आणि ९% इतकी वाढ झाली. मागणी आणि गरज असूनही एकाही गाडीला येथे थांबा दिला नसताना ही वाढ झाली ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. काही नियमित गाडयांना येथे थांबे दिले असते तर  या स्थानकापासून मिळणाऱ्या उत्पन्नात जवळपास ३०% ते ५०% ने वाढ झाली असती असे रेल्वे अभ्यासकांचे मत आहे.



सावंतवाडी स्थानकांच्या टर्मिनस चे काम रखडले आहे. अनेक सुविधांचा अभाव आहे. स्थानकाचे बाहेरून सुशोभीकरण करण्याचे काम चालू आहे. ही एक चांगली गोष्ट आहे पण काही मूलभूत बाबींचा पण विचार करणे गरजेचे आहे.  येथील प्लॅटफॉर्म वर पुरेशा प्रमाणात निवारा शेडची सोय नाही; त्यामुळे पावसाळ्यात प्रवाशांचे हाल होत आहेत. इतर स्थानकावर गाड्यांचे थांबे सहज मंजूर होत असताना येथे अत्यंत गरज असताना वारंवार आंदोलने, मागण्या करूनही थांबे का मंजूर होत नाही आहेत हा एक यक्षप्रश्नच म्हणावा लागेल.

Loading

आंबोलीत पुन्हा जमीन हडपण्याचा प्रयत्न; वातावरण तापणार

भलताच सातबारा दाखवून भूमिअभिलेख अधिकार्‍यांना हाताशी धरून जमीन प्रयत्न. स्थानिक ग्रामस्थांचा आंदोलनाचा ईशारा. 

   Follow us on        

आंबोली, दि-३०:– महिन्याभरापूर्वी येथील जमीन बेकायदा हडपून त्यावर बांधकाम केल्याच्या विरोधात ग्रामस्थांनी आंदोलन छेडले होते. तसाच प्रकार आंबोलीत दुसऱ्या भूखंडात घडत आहे. सर्वे क्रमांक ८४ड मध्ये परप्रांतीयांनी अतिक्रमण केले असून, भलताच सातबारा दाखवून आपली नावे असल्याचे सांगत भूमिअभिलेख ला हाताशी धरत मोजणी करत आहे,याला स्थानिक ग्रामस्थांनी विरोध केला असून पुन्हा एकदा आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

23 नंबर सर्वे मध्ये झालेले अतिक्रमण हटवण्यात आले त्याला एक महिना ही पूर्ण न होता परत तोच प्रकार आंबोलीत चालू आहे आंबोली मधील सर्वे नंबर 84 ड महाराष्ट्र शासनाच्या जमिनीमध्ये परप्रांतीयांनी सर्वे करून जमीन हडपण्याचा प्रकार चालू केला आहे. आंबोलीतील जमिनी महाराष्ट्र शासनच्या नावावर करून सरकारचा धन दांडगे आणि भूमापिया यांच्याकडून महाराष्ट्र शासनाच्या जमिनी बळकवण्याचा प्रयत्न चालू आहे असा आरोप केला जात आहे. महाराष्ट्र शासन या नावाने सातबारा असूनही भूमी अभिलेख अधिकारी पोलीस प्रोटेक्शन सह महाराष्ट्र शासनाच्या जमिनीचा सर्वे करत आहेत आणि भूमाफियांना जमीन वाटप करत आहेत .महाराष्ट्र शासनाच्या जागेवर परप्रांतीयांचा परस्पर सर्वे करून भूमी अभिलेख काय सिद्ध करत आहे असा प्रश्न येथील ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. या प्रकारामुळे आंबोलीतील भूमिपुत्रांमध्ये संतापाचे वातावरण आहे. महाराष्ट्र शासनाच्या जमिनीत परप्रांतीयांनी अतिक्रमण केले तर पुन्हा एकदा त्रीव आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

Loading

धक्कादायक! सावंतवाडी तालुक्यातील वेत्येत सापडली मानवी हाडे

   Follow us on        

सावंतवाडी दि. २८ मे. सावंतवाडी तालुक्यातील वेत्ये गावातील कैलास धाब्याच्या पाठीमागे मानवी हाड कवटी सहित आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

वेत्ये रोडवर असलेल्या कैलास धाब्याच्या पाठीमागे काल संध्याकाळी येथील एका स्थानिकाला मानवी हाडे असल्याचे दिसली, त्यांनी संबंधित धाबे मालकाला याची कल्पना दिली त्यानंतर वेत्ये सरपंच गुणाजी गावडे यांनी घटनास्थळी येत पाहणी करून पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले व सदरची हाडे पंचनामा करून ताब्यात घेतली अधिक तपास सुरू आहे.

 

Loading

Palghar Train Accident: कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या गाड्या पर्यायी मार्गाने चालविण्यात येणार

   Follow us on        
Konkan Railway News:मंगळवारी संध्याकाळी पालघर स्थानकावरील दुर्घटनेमुळे गुजरात मुंबई दरम्यान होणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. अजूनही रूळ वाहतुकीसाठी उपलब्ध झाले नसून काही गाड्या रद्द, शॉर्ट टर्मिनेट व पर्यायी मार्गावरून वळविण्यात आलेल्या आहेत. या दुर्घटनेचा फटका कोंकण रेल्वेलाही फटका बसला असून पश्चिम रेल्वे मार्गावरून कोकण मार्गे दक्षिणेकडे जाणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे. यातील काही गाड्या पर्यायी मार्गाने वळविण्यात आलेल्या असून त्याबाबत पश्चिम रेल्वेने प्रवाशांना प्रसिद्धी माध्यमातून सूचित केले आहे.
पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार खालील दोन गाड्या सुरत – जळगाव – इगतपुरी – कल्याण – पनवेल – रोहा या मार्गाने वळविण्यात आलेल्या आहेत.
१) दिनांक २८ मे रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक १६३११  श्रीगंगानगर – कोचुवेली एक्सप्रेस
२) दिनांक २८ मे रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक २०९३२ इंदोर – कोचुवेली एक्सप्रेस

Loading

पालघर मालगाडी दुर्घटना: कोकण रेल्वे मार्गावरील दोन गाड्या रखडणार

   Follow us on        

Palghar Train Derailment : पश्चिम रेल्वेच्या पालघर येथे यार्डात मालगाडी घसरल्याने सुरत ते मुंबई अप मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाल्याची घटना आज मंगळवारी सायंकाळी घडली. यामुळे घटनास्थळी एकच खळबळ उडाली. मालगाडीत मोठ्या प्रमाणावर लोखंडी प्लेटची वाहतूक केली जात होती. या घटनेनंतर मालगाडीचा डबे उचलण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु झाले आहे. या अपघातानंतर अनेक गाड्यांना शॉर्ट टर्मिनेट केले आहे तर काही गाड्यांना वळविण्यात आले आहे. मात्र या मार्गावरील धावणाऱ्या एक्सप्रेस गाड्यांचे वेळापत्रक विस्कळित झाले आहे. यामध्ये पश्चिम रेल्वे मार्गावरून कोकणात जाणार्‍या खालील दोन गाड्यांचा समावेश आहे.

आज दिनांक २८ मे या दिवशी प्रवास सुरू करणारी गाडी क्रमांक १२४३२ – हजरत निजामुद्दीन-तिरुवनंतपुरम राजधानी एक्सप्रेस.

आज दिनांक २८ मे या दिवशी प्रवास सुरू करणारी गाडी क्रमांक १९२६०– कोचुवेली एक्सप्रेस.

पालघर रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर मालगाडीचे 7 डब्बे रुळावरून घसरले आहेत. डहाणूवरून मुंबईच्या दिशेने येणारी सर्व रेल्वे वाहतूक सेवा त्यामुळे ठप्प झाली आहे. लोखंडी कॉइल घेऊन गुजरातवरून मुंबईच्या अप दिशेने येणाऱ्या मालगाडीचे डबे पालघर रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर घसरले आहेत. रुळावर मालगाडीचे डब्बे तीन डबे घसल्याने, दोन्ही रेल्वे रुळावरील वाहतूक सध्या ठप्प झाली आहे. पालघर रेल्वेस्थानाकात एकूण चार रेल्वे मार्ग आहेत. सध्या मुंबई, विरारहून डहाणू, गुजरातच्या दिशेला जाणारी रेल्वे सेवा धीम्या गतीने सुरू आहे. मात्र गुजरातवरून मुंबई, विरारकडे येणारी सेवा ठप्प झाली आहे. रेल्वे प्रशासन, पोलीस, रेल्वे पोलीस, आरपीएफ सर्व यंत्रणा घटनास्थळावर दाखल झाली आहे. यंत्रसामुग्री आणून घसरलेले डब्बे बाजूला करून रेल्वे सेवा लवकरच सुरळीत करण्यात येईल असे म्हटले जात आहे.

Loading

प्रवाशांचे हाल संपता संपेनात; अजून एका एक्सप्रेसची सेवा ठाणे स्थानकापर्यंत मर्यादित

   Follow us on        
Konkan Railway News:छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे प्लॅटफॉर्म नंबर 10 आणि 11 चे काम सुरू असल्यामुळे कोंकण रेल्वे मार्गावरील काही गाड्यांची सेवा दादर आणि पनवेल पर्यंत काही  कालावधीसाठी मर्यादित केली आहे, त्यामध्ये आता ११००४ सावंतवाडी – दादर तुतारी एक्सप्रेस या गाडीचीही भर पडली आहे.
कोकण रेल्वेने आज दिनांक २८ मे रोजी प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धिपत्रकानुसार दिनांक २८ मे ते ०२ जून पर्यंत ११००४ सावंतवाडी – दादर तुतारी एक्सप्रेस या गाडीची सेवा ठाणे स्थानकापर्यंत मर्यादित Terminate करण्यात येणार आहे.
ऐन हंगामात प्रवाशांना मनस्ताप
कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या नियमित गाड्यांची सेवा पनवेल, दादर आणि ठाणे या स्थानकापर्यंत मर्यादित केली असल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. मांडवी एक्सप्रेस ही गाडी पनवेल स्थानकापर्यंत  चालविण्यात येत आहे. मात्र तिचे वेळापत्रक पाळले जात नसून तिला पनवेल पर्यंत पोहोचायला उशीर होत आहे. अनेकदा त्या वेळेपर्यंत पनवेल ते ठाणे या लोकल मार्गावरील लोकल सेवा रात्री बंद होत असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. प्रवासात वरिष्ठ नागरिक, लहान मुलांना सांभाळत घरी पोहोचणे जिकरीचे झाले आहे.

Loading

खळबळजनक: रत्नागिरीतील कंपनीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७८ जणांची फसवणूक केल्याचे उघड; गुन्हा दाखल

   Follow us on        
कुडाळ, दि.२८ मे: रत्नागिरी येथील एका कंपनीने सिंधुदुर्गात २.२५ कोटीची फसवणूक केल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे. रत्नागिरी येथील एका जॉब वकर्सच्या नावाखाली प्रस्थापित झालेल्या प्रा. लि. कंपनीच्या विरोधात सिंधुदूर्गातील ७८ जणांनी आपली २.२५ कोटीची फसवणूक झाल्याचा गुन्हा कुडाळ पोलिसांत दाखल केला आहे.
ही कंपनी रत्नागिरी जिल्ह्यातील असून जॉब वकर्सच्या नावाने या कंपनीने सिंधुदुर्गातही आपली शाखा उघडली होती. विशेष म्हणजे पोलिस स्थानकापासून हाकेच्या अंतरावर ही शाखा कार्यरत होती. रत्नागिरीत या कंपनीकडून गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याची माहिती सिंधुदुर्गात वाऱ्यासारखी पसरताच सिंधुदुर्गातील गुंतवणूकदारांनी सोमवारी सकाळी कुडाळ पोलिस ठाणे आवारात गर्दी केली. यावेळी ७८ जणांनी एकत्र येत आपल्या फसवणूकीची तक्रार कुडाळ पोलिसांकडे दिली आहे. त्यावर ७८ जणांची नावे व त्यासमोर आपण जमा केलेली रक्कम टाकण्यात आल्याचे समजते. यामध्ये २५ हजारांपासून १ लाख ७५ हजारांपर्यंतची रक्कम नमुद करण्यात आल्याचे सांगण्यात आले. जवळपास २ कोटी २५ लाख रुपयांची ही ७८ जणांची रक्कम आहे.
दरम्यान, फसवणूक झालेल्यांचा आकडा अजुनही मोठा असून रक्कमही त्याच पटीत वाढण्याची शक्यता आहे.
याबाबत कुडाळ पोलिसांत रितसर तक्रार झाली नसल्याचे सांगण्यात आले असून या फसवणुकीत अनेक जनसामान्यांना गंडा बसल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे पोलिसांनी तकार दारांच्या अर्जाची दखल घेऊन फसवणूक झालेल्यांनी तक्रार देण्यास पुढे येण्याचे आवाहन केले आहे.

Loading

कोकण रेल्वे मार्गावर शुक्रवारी मेगाब्लॉक; दोन गाड्या उशिराने धावणार

   Follow us on        
Konkan Railway News: कोकण रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी  आहे. येत्या शुक्रवारी दिनांक २४/०५/२०२४ रोजी सकाळी  ०७:०० ते ०९:०० या वेळेत सावर्डा – भोके विभाग दरम्यान मालमत्तेच्या देखभालीसाठी अडीच तासांचा मेगाब्लॉक घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या ब्लॉकमुळे रेल्वेसेवेवर होणारे परिणाम खालीलप्रमाणे आहेत:
गाडी क्र. १२६१७ एर्नाकुलम जं. – हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेसचा या गाडीचा दिनांक २३/०५/२०२४ रोजी सुरू होणारा प्रवास रत्नागिरी ते मडगाव जंक्शन दरम्यान ११० मिनिटांसाठी थांबविण्यात येणार आहे.
गाडी क्र. २०९२३ तिरुनेलवेली – गांधीधाम एक्सप्रेसचा दिनांक २३/०५/२०२४ रोजी सुरू होणारा प्रवास रत्नागिरी ते मडगाव जंक्शन दरम्यान ७० मिनिटांसाठी थांबविण्यात येणार आहे
Ad -

मराठी मुलांमुलींना युरोप, पोर्तुगाल,माल्टा,इटली आणि पोलंड येथे नोकरीच्या संधी....
🔸Retail Jobs 🔸Malls 🔸Corporate Staff 🔸Sales 🔸Back Office 🔸Hotels
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Loading

प्रवाशांना दिलासा; कोकण रेल्वे मार्गावरील विशेष गाडीचा जून १५ पर्यंत विस्तार

   Follow us on        
Konkan Railway News: उन्हाळी सुट्टीत कोकणात गावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी एक खुशखबर आहे. प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने या मार्गावर चालविण्यात येणाऱ्या एका विशेष गाडीची सेवा १५ जूनपर्यंत विस्तारित करण्याचा निर्णय घेतला आहे. पश्चिम रेल्वेच्या समन्वयाने चालविण्यात येणाऱ्या गाडी क्रमांक 07309 / 07310  वास्को दा गामा – मुझफ्फरपूर जं. – वास्को द गामा विशेष (साप्ताहिक) गाडीच्या सेवेचा विस्तार होणार आहे. संपूर्ण तपशील खालीलप्रमाणे
07309 वास्को दा गामा – मुझफ्फरपूर जं. (साप्ताहिक) विशेष  या गाडीची सेवा दिनांक 08/05/2024 या दिवशी समाप्त होणार होती. मात्र आता ही गाडी दिनांक 12/06/2024 पर्यंत चालविण्यात येणार आहे.ही गाडी  वास्को द गामा येथून दर बुधवारी संध्याकाळी 16:00 वाजता सुटेल ती  मुझफ्फरपूर जंक्शनला तिसऱ्या दिवशी सकाळी 09:45 वाजता पोहोचेल.
07310 मुझफ्फरपूर जं. – वास्को दा गामा (साप्ताहिक) विशेष  या गाडीची सेवा दिनांक 11/05/2024 या दिवशी समाप्त होणार होती. मात्र आता ही गाडी दिनांक 15/06/2024 पर्यंत चालविण्यात येणार आहे. ही गाडी मुझफ्फरपूर जंक्शन येथून दर शनिवारी दुपारी 13:00 वाजता निघेल ती तिसऱ्या दिवशी सकाळी 06:30 वाजता वास्को द गामाला पोहोचेल.
ही गाडी मडगाव जंक्शन, थिविम, सावंतवाडी रोड, रत्नागिरी, चिपळूण, पनवेल, कल्याण जंक्शन, नाशिक रोड, मनमाड जंक्शन, भुसावळ, खांडवा जंक्शन, इटारसी जंक्शन, जबलपूर, कटनी, सतना, प्रयागराज छोकी, पं. . दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा, दानापूर, पाटलीपुत्र आणि हाजीपूर जंक्शन या स्थानकांवर थांबेल.
रचना : एकूण 20 एलएचबी कोच = 2 टायर एसी – 01 कोच, 3 टायर एसी – 01 कोच, 3 टायर एसी इकॉनॉमी – 02 कोच, स्लीपर – 10 डबे, जनरल – 04 कोच, जनरेटर कार – 01, एसएलआर – 01.
Ad -

मराठी मुलांमुलींना युरोप, पोर्तुगाल,माल्टा,इटली आणि पोलंड येथे नोकरीच्या संधी....
🔸Retail Jobs 🔸Malls 🔸Corporate Staff 🔸Sales 🔸Back Office 🔸Hotels
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search