Category Archives: कोकण

अबब..! सिंधुदुर्गातील या बागेत सापडत आहेत अर्धाकिलो पेक्षा जास्त वजन असलेले हापूस

   Follow us on        

सिंधुदुर्ग: साधारणपणे आंबा फळाचे वजन ३०० ग्रॅम ते ३५० ग्रॅम असते. मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बापर्डे (ता. देवगड) येथे तब्बल अर्धा किलो पेक्षा जास्त वजन असलेले आंबे एका बागेत सापडत आहेत. येथील बागायतदार बाबूराव वामन राणे यांच्या बागेत ६०५ ग्रॅम वजनाचा हापूस आंबा आढळून आला आहे. या भागात आढळून आलेले हे या हापूसचे सर्वाधिक वजनाचे फळ आहे.

आंबा काढणी करीत असताना श्री. राणे यांना काही झाडांवरील फळे नियमित आंब्यांपेक्षा आकाराने मोठी दिसून आली. त्यामुळे त्यांनी या फळांचे वजन केले असता एका फळांचे वजन ६०५ ग्रॅम आढळून आले. ४५० ग्रॅम ते ६०० ग्रॅमपर्यंत सरासरी फळे दिसून येत आहेत.

साधारणपणे आंबा फळाचे वजन ३०० ग्रॅम ते ३५० ग्रॅम असते. या बागेचे व्यवस्थापन श्री. राणे हे नैसर्गिकरीत्या व सेंद्रिय पद्धतीने करतात. या फळांची माहिती मिळाल्यानंतर तालुका कृषी विभागाचे अमोल सदावर्ते, कृषी सहायक एस. व्ही. उलपे, मंडळ कृषी अधिकारी प्रदीप खाडे यांनी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. वजनाची देखील खात्री केली.

Loading

यंदा गणेशचतुर्थीला रेल्वेने गावी जाण्याचा बेत आहे का? मग ही बातमी वाचाच…

   Follow us on        
मुंबई: गणेशोत्सवाच्या काळात दरवर्षी मुंबईतील हजारो चाकरमानी कोकणातील आपापल्या गावी जातात. त्यामुळे या काळात कोकण रेल्वेचे बुकिंग फुल्ल असते. यंदाचे वर्ष सुरु झाल्यापासून मुंबईतील चाकरमान्यांना गणेशोत्सवाचे वेध लागले आहेत. कोकणात जाण्यासाठी रेल्वेचे बुकिंग कधी सुरु होणार, याकडे अनेक चाकरमानी डोळे लावून बसले होते. या पार्श्वभूमीवर रेल्वेकडून गणेशोत्सवाच्या काळातील गाड्यांचे बुकिंग सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यंदा गणरायाचे आगमन ७ सप्टेंबरला होणार आहे. मात्र त्याआधीच चाकरमानी गावी जायला सुरवात करतात.
गणपतीसाठीच्या रेल्वेगाड्यांचे बुकिंग सुरु झाल्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये तिकीटं संपतात, असा आतापर्यंतचा अनुभव आहे. यंदाही गणेशोत्सवाच्या काळात सोडण्यात येणाऱ्या रेल्वेगाड्यांचा बुकिंगला असाच प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. दरवर्षी गणेशोत्सवापूर्वी चार महिने आधी रेल्वेच्या बुकिंगला सुरुवात होते. त्याप्रमाणेच यंदा ४ मे पासून तिकीट बुकिंगला सुरुवात होईल.

रेल्वे बुकिंग कॅलेंडर

आरक्षण दिनांक प्रवास सुरू दिनांक उत्सव
शनिवार, दि.04 मे 2024 रविवार, दि. 01 सप्टेंबर 2024
रविवार, दि.05 मे 2024 सोमवार, दि. 02 सप्टेंबर 2024
सोमवार, दि. 06 मे 2024 मंगळवार, दि. 03 सप्टेंबर 2024
मंगळवार, दि. 07 मे 2024 बुधवार, दि. 04 सप्टेंबर 2024
बुधवार, दि. 08 मे 2024 गुरूवार, दि. 05 सप्टेंबर 2024
गुरूवार, दि. 09 मे 2024 शुक्रवार, दि. 06 सप्टेंबर 2024 हरतालिका
शुक्रवार, दि. 10 मे 2024 शनिवार, दि. 07 सप्टेंबर 2024 श्री गणेश चतुर्थी
शनिवार, दि. 11 मे 2024 रविवार, दि. 08 सप्टेंबर 2024 ऋषी पंचमी
रविवार, दि.12 मे 2024 सोमवार, दि. 09 सप्टेंबर 2024
सोमवार, दि.13 मे 2024 मंगळवार, दि. 10 सप्टेंबर 2024 गौरी आगमन
मंगळवार, दि.14 मे 2024 बुधवार, दि.11 सप्टेंबर 2024 गौरी पूजन
बुधवार, दि.15 मे 2024 गुरूवार, दि.12 सप्टेंबर 2024 गौरी विसर्जन

Loading

Video | एलटीटी थिवी एक्सप्रेस रत्नागिरीत ११ तास उशिराने पोहचली; प्रवाशांच्या सहनशीलतेचा अंत

   Follow us on        
रत्नागिरी, दि. ०१ मे: कोकण रेल्वे मागार्वर सोडण्यात आलेल्या उन्हाळी विशेष गाड्या ८ ते १० तास उशिराने धावत असल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. खासकरून ०१०१७/०१०१८ एलटीटी थिवी एलटीटी विशेष गाडी पुनर्नियोजित करून सुरवातीपासूनच ८ ते १० तास उशिराने चालविण्यात येत आहे. त्याच बरोबर १००९९/१०१०० एलटीटी मडगाव एलटीटी ही नियमित गाडीही अशीच वारंवार पुनर्नियोजित करून ४ ते ५ तास उशिराने धावत असल्याने  प्रवाशांकडून संताप व्यक्त होत आहे.
प्रवाशांच्या सहनशीलतेचा अंत 
काल दिनांक ३० एप्रिल रोजी रात्री १० वाजून १५ मिनिटांनी सुटणारी गाडी क्र. ०१०१७ एलटीटी – थिवी सुमारे सहा तास उशिराने पहाटे ४ वाजून २७ मिनिटांनी रवाना झाली. आधीच उशिरा सुटलेल्या गाडीला प्रथम प्राधान्य देण्याची गरज असताना रेल्वे प्रशासन अगदी या विरुद्ध करून या गाडीला मागे ठेवून इतर गाडयांना प्राधान्य देत असल्याने ही गाडी रत्नागिरीला तब्बल ११ तास उशिरा दुपारी ३:४५ वाजता पोहोचली. याचा अर्थ रात्री १० वाजता आलेला प्रवासी दुसऱ्या दिवशी संध्याकाळी चार वाजेपर्यंत रत्नागिरी स्थानकातच होता. आता मात्र प्रवाशांच्या सहनशीलतेचा अंत झाला आणि त्यांनी तेथील आरपीएफ कर्मचाऱ्यांना धारेवर धरले. तिकीट निरीक्षक आणि स्टेशन मास्तर नजरेस ही पडत नसल्याने आपली गाऱ्हाणी कोणासमोर मांडायची असे प्रवासी विचारात होते. या बाबतचा एक विडिओ पण व्हायरल झाला आहे.
विशेष गाड्या जर उशिराने चालवायच्या असतील तर अतिरिक्त भाडे का?
हंगामात रेल्वे प्रशासनाकडून विशेष गाड्या चालविण्यात येतात. मात्र या गाड्यांसाठी रेल्वेकडून अतिरिक्त प्रवासी भाडे आकारण्यात येते. उदाहरणार्थ एलटीटी ते सावंतवाडी  थ्री टियर इकॉनॉमी कोचच्या सीटचे कोकणकन्या एक्सप्रेसचे भाडे ९६० रुपये एवढे आहे. त्याच अंतरासाठी समान कोचचे ०१०१७/०१०१८ एलटीटी थिवी एलटीटी विशेष गाडीचे भाडे ११६० रुपये आहे. म्हणजे २०० रुपयांचा फरक आहे. एवढे अतिरिक्त भाडे आकारूनही जर अशी सेवा मिळत असल्याने प्रवासी वर्ग नाराज आहे.

 

Loading

सामंत बंधुत ‘बिनसलंय’? नारायण राणेंच्या अडचणींत वाढ

   Follow us on        
रत्नागिरी, दि. ०१ मे:  सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात आज एक धक्कादायक प्रकार घडला आहे. रत्नागिरीत सामंत विरुद्ध सामंत असा सामना सुरू झाला आहे. किरण सामंत यांच्या कार्यकर्त्यांनी संपर्क कार्यालयावरील बॅनर बदलला आहे. उदय सामंत जनसंपर्क कार्यालय असा बॅनर होता. आता किरण सामंत संपर्क कार्यालय असे बॅनर लावण्यात आला आहे. त्यामुळे किरण सामंत अद्यापही उमेदवारीवरून नाराज असल्याची चर्चा तळ कोकणात सुरू झाली आहे. नव्याने लावण्यात आलेल्या बॅनरवरून उदय सामंत यांचाही फोटो काढण्यात आला आहे.
उदय सामंत यांचे बॅनर हटवण्यात आल्यानंतर किरण सामंत यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. “माझं कार्यालय आहे. तिथेच मी बसणार. माझ्या कार्यालयात काय करायचं हे मी ठरवणार, अशी प्रतिक्रिया किरण सामंत यांनी दिली आहे. शिवसेनेचं जिल्हा संपर्क कार्यालय हे माझ्या मालकीचं आहे”, असं किरण सामंत यांनी म्हटलं आहे.
नारायण राणेंच्या अडचणींत वाढ
किरण सामंत हे रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात लोकसभेसाठी इच्छुक होते. शेवटपर्यंत ही जागा शिवसेनेकडे जाते कि भाजपाकडे याबाबत रस्सीखेच चालू होता. अखेर भाजपने बाजी मारून नारायण राणे यांना उमेदवारी दिली. उदय सामंत आणि किरण सामंत यांनी पत्रकार परिषद घेतली आणि माघार घेत असल्याची घोषणा केली.. महायुतीचे उमेदवार नारायण राणेंचा प्रचार करणार.. असं आश्वासन उदय सामंत आणि किरण सामंतांनी पत्रकार परिषदेतून दिले होते. मात्र आजची घटना नारायण राणे आणि  भाजपाची झोप उडवणारी ठरणार आहे. किरण सामंत यांची नक्की भूमिका काय आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण किरण सामंत यांनी साथ न दिल्यास ही निवडणूक जिंकणे युतीला कठीण होणार असून सामंत बंधुतील या वाढच फायदा शिवसेना (उबाठा) च्या विनायक राऊत यांना होणार आहे.

Loading

Loksabha Eelection 2024 | केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची रविवारी सावंतवाडीत सभा

   Follow us on        
सावंतवाडी, दि. ०१ मे : येत्या रविवारी (ता.५) केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची सावंतवाडीमध्ये सभा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. महायुतीचे लोकसभा उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी ते सावंतवाडी येथे येणार असल्याची माहिती सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे समन्वयक माजी आमदार राजन तेली यांनी पत्रकार परिषदेत दिली
‘‘निवडणूक अंतिम टप्प्यात आली असून राणेंचा विजय निश्चित आहे. सहाही विधानसभा मतदारसंघातून त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यासाठी भाजप, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी अजित पवार गट व रामदास आठवले आरपीआयच्या माध्यमातून कार्यकर्ते व पदाधिकारी प्रयत्न करत आहेत. केंद्राच्या ५४ योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्य जनतेसाठी आणल्यात त्या आम्ही जनतेसमोर घेऊन जात असून कणखर नेतृत्व म्हणून मोदी हे जगभरात प्रसिद्ध आहेत. आम्ही जनतेसमोर मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने केलेली कामगिरी घेऊन जात आहोत आणि चांगला प्रतिसाद आम्हाला मिळत आहे. ऑनलाइन अर्थात डिजिटल पद्धतीने चलनात पैसा येऊ लागल्याने अर्थव्यवस्था जगात पाचव्या क्रमांकावर आली आहे. ती पुढील काळात तीन नंबरवर आणण्यासाठी मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम होईल. केंद्रीय मंत्री राणे यांनी बेरोजगारीवर पर्याय शोधले असून त्यांनी प्रकल्प साकारण्याचा निश्चय केला आहे. सी वर्ल्ड प्रकल्प झाला असता तर आज मोठ्या प्रमाणात बेरोजगारी दूर झाली असती. पण, खासदार विनायक राऊत आणि ठाकरे यांच्या आमदारांनी त्याला विरोध केला. रिफायनरीला देखील विरोध राहिल्याने तो होऊ शकला नाही. असे राजन तेली  या वेळी म्हणालेत.
‘‘आडाळी एमआयडीसी, दोडामार्ग तालुका निर्मिती राणे यांनी केली आहे. या ठिकाणी देखील रोजगार आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पुढील काळात जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासोबतच रोजगाराच्या प्रश्नावर नारायण राणे यांचे मॉडेल तयार आहे. ते निश्चित काम करतील.’’ असे ते पुढे म्हणालेत

Loading

Konkan Railway | नेत्रावती एक्सप्रेसला महिनाभर लागणार ‘लेटमार्क’; कारण काय?

   Follow us on        
Konkan Railway News:रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय, नवी दिल्ली (MORTH) आणि राष्ट्रीय महामार्ग (NH) PWD गोवा तर्फे माजोर्डा जं- मडगाव जं.  विभागातील  रोड ओव्हर ब्रिजच्या बांधकामासाठी, मडगाव वेस्टर्न बायपाससाठी स्टील गर्डर्स लाँच करण्यासाठी लाइन आणि पॉवर ब्लॉक घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जवळपास महिनाभर चालणाऱ्या या ब्लॉकचा परिणाम कोकण रेल्वे मार्गावर रोज धावणाऱ्या नेत्रावती एक्सप्रेसवर होणार आहे.
कोकण रेल्वे तर्फे आलेल्या माहितीनुसार लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दर दिवशी ११ वाजून ४० मिनिटांनी सुटणारी गाडी क्रमांक  १६३४५ लोकमान्य टिळक  – तिरुवनंतपुरम सेंट्रल नेत्रावती एक्सप्रेस दिनांक ०२ मे  ते २९ मे पर्यंत करमाळी ते रत्नागिरी दरम्यान सुमारे ७० मिनिटे उशिराने धावणार आहे. या गाडीला कोकणात रोहा, खेड, चिपळूण संगमेश्वर रोड, रत्नागिरी आणि कुडाळ येथे थांबे आहेत.
Ad -

मराठी मुलांमुलींना युरोप, पोर्तुगाल,माल्टा,इटली आणि पोलंड येथे नोकरीच्या संधी....
🔸Retail Jobs 🔸Malls 🔸Corporate Staff 🔸Sales 🔸Back Office 🔸Hotels
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Loading

उत्पन्नाच्या बाबतीतही सावंतवाडी रेल्वे स्थानक सरस.. 

   Follow us on        

आवाज कोकणचा | सागर तळवडेकर : गेल्या वर्षी मी लिहिलेला मालवणी माणूस आणि रेल्वे हा उत्पन्नासंदर्भात लेख प्रचंड व्हायरल झाला होता त्याबद्दल सर्वांचे अजूनही आभार.

त्याच प्रमाणे आज मी कोकण रेल्वे मार्गावरील आर्थिक वर्ष २०२३-२४ चे प्रत्येक स्थानकाचे प्रवासी उत्पन्न आणि प्रवासी संख्या या ठिकाणी मांडणार आहे. हा सर्व डाटा माझा नसून माहितीच्या अधिकाराचा उपयोग करून मिळविलेला आहे. प्रत्येक स्थानकावर प्रवासी सुविधा ही त्या स्टेशनच्या वापरावर अवलंबून असते. ज्या ठिकाणी जास्त प्रवासी वर्दळ आणि त्यापासून मिळालेले उत्पन्न,त्या ठिकाणी जास्त सुविधा.

आज मी ह्या माहितीच्या आधारे काही तथ्य मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. मला काही यातील जास्त माहिती नाहीय परंतु जेवढे समजते तेवढे मांडण्याचा नक्की प्रयत्न करतोय.

सावंतवाडी स्थानकाचे मागील आर्थिक वर्षी म्हणजेच २०२२-२३ ला १३ कोटी ४२ लाख एवढे होते.आणि एकूण प्रवासी संख्या ही ०६ लाख ९४ हजार एवढी होती. म्हणजेच प्रतिदिन सरासरी १९०२ प्रवाशांनी या स्थानकाचा वापर प्रवासासाठी केला.

या वर्षी म्हणजेच आर्थिक वर्ष २०२३-२४ ला सावंतवाडी स्थानकाचे उत्पन्न हे १४ कोटी ६८ लाख एवढे आहे. येथील प्रवासी संख्या ही ०७ लाख ७९ हजार एवढी आहे. आणि प्रतिदिन सरासरी २१३४ प्रवाशांनी या स्थानकाचा वापर प्रवासासाठी केला. या माहितीच्या आधारे आपण असा निष्कर्ष काढू शकतो की सावंतवाडी स्थानकाचे उत्पन्न गेल्यावर्षीच्या तुलनेत १.२६ कोटीने रुपयांनी वाढले,आणि एकूण प्रवास करणारे प्रवासी ८५ हजार ने वाढले म्हणजेच प्रवासी संख्या सरासरी प्रतिदिन २३२ ने वाढली देखील. परंतु या असे असताना देखील या स्थानकात नवीन एकही गाडीचा थांबा देण्यात आला नाही. कोरोना काळात काढून घेण्यात आलेल्या त्रिवेंद्रम राजधानी एक्स्प्रेस आणि कोचिवेली गरीबरथ एक्स्प्रेस चा थांबा देखील पुन्हा देण्यात आला नाही. आता अजून स्पष्ट समजण्यासाठी एक उदाहरण घेऊ.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रमुख ३ स्थानके अनुक्रमे कुडाळ, कणकवली आणि सावंतवाडी.

कुडाळ स्थानकाचे उत्पन्न हे ३१ कोटी ६३ लाख एवढे आहे. आणि मागच्या वर्षीच्या तुलनेत ३.१ कोटी रुपयांनी ते वाढले. या ठिकाणी एकूण १६ गाड्या म्हणजेच ७ दैनिक, एक प्रीमियम गाडी तेजस एक्स्प्रेस, जी आठवड्यातून ५ दिवस धावते, अजून एक प्रीमियम गाडी मडगाव राजधानी,जी आठवड्यातून २ दिवस धावते,५ साप्ताहिक गाड्या आणि २ स्पेशल गाड्या ज्या बरीच वर्षे स्पेशल म्हणून धावतात त्या मधे नागपूर मडगाव एक्स्प्रेस आणि जबलपूर कोइंबतूर एक्स्प्रेस चा समावेश आहे. ह्या गाड्या अप आणि डाऊन अश्या दोन्ही बाजूला धावत असल्याने त्यांचा एकूण फेऱ्या एका आठवड्यात ह्या १२८ एवढ्या आहेत.

कणकवली स्थानकाचा विचार केल्यास ह्या वर्षी कणकवली स्थानकाचे उत्पन्न हे ३० कोटी ६५ लाख एवढे आहे. मागच्या वर्षीचा तुलनेत हे ०४.५२ कोटी रुपयांनी हे वाढले या ठिकाणी एकूण १५ गाड्या (वंदे भारत पकडुन) थांबतात. या मध्ये ७ दैनिक, एक प्रिमियम गाडी वंदे भारत, एक आठवड्यातून ४ वेळा धावणारी (पावसाळ्यात आठवड्यातून दोन वेळा), २ गाड्या आठवड्यातून दोन वेळा धावणाऱ्या, आणि २ साप्ताहिक व दोन स्पेशल गाड्या (कुडाळ ला थांबतात त्याच) थांबतात. या गाड्यांचा दोन्ही बाजूने फेऱ्या असल्याने या ठिकाणी आठवड्यातून एकूण १२४ फेऱ्या (वंदे भारत वगळून, कारण या ठिकाणी ही ट्रेन नवीन सुरू केली असून वंदे भारतच्या वर्ष भरात केवळ १८० फेऱ्या झाल्यात. त्या पकडल्या तर कुडाळ पेक्षा जास्त फेऱ्या होतील.)

सावंतवाडी स्थानकाचा विचार केल्यास या ठिकाणी एका आठवड्यात एकूण ९२ (८८ – ९२ फेऱ्या, त्यातील एक गाडी पावसाळ्यात आठवड्यातून २ दिवस धावते आणि इतर वेळी ४ दिवस धावते) फेऱ्या होतात. आणि या ठिकाणी एकाही प्रीमियम दर्जाच्या गाडीला थांबा नाही.

असे असताना देखील येथील प्रवासी संख्या आणि उत्पन्न हे कमालीचे वाढले आणि भविष्यात ते वाढत जाईल. या ठिकाणी अजून एखादी नवीन दैनिक गाडी, एक प्रिमियम दर्जाची गाडी आणि एक साप्ताहिक गाडी चा थांबा दिल्यास आताच्या उत्पन्नात अधिक भर पडेल हे नक्कीच..

परंतु कोकण रेल्वे आणि रेल्वे बोर्ड थांबे देण्यासाठी आणि थांबे काढून घेण्यासाठी फक्त सावंतवाडी साठी असा कोणता निकष लावते ते माझ्या तरी समजण्याचा पलीकडे आहे. आम्ही गेल्या वर्ष भरात या ठिकाणी मंगलोर एक्स्प्रेस, वंदे भारत एक्स्प्रेस आणि नागपूर मडगाव एक्स्प्रेस किंवा दिल्ली ला जाणाऱ्या एर्नाकुलम – निजामुद्दीन एक्स्प्रेसचा थांबा मिळावा म्हणून कृतिशील पणे कोकण रेल्वे महामंडळ, खासदार, आमदार, मंत्री, केंद्रीय मंत्री आणि रेल्वे बोर्डाकडे सतत पाठपुरावा करतच आहोत तरी देखील आम्हाला यश आले नाही. आंदोलन करून देखील थांब्यासंदर्भात काही हालचाल होताना दिसत नाही.

परंतु आम्ही देखील हार मानणारे नाहीत. आमच्या हक्काचे एकूण तीन थांबे या स्थानकातून हया नाहीतर त्या कारणाने काढून घेण्यात आले, आम्ही देखील तीन थांबे मिळवण्यासाठी मेहनत घेऊच. रेल्वे जर बिझनेस बघते तर तो सावंतवाडीला आहे.

परंतु सावंतवाडीकडे रेल्वे का बघत नाही हाच माझ्या समोर मोठ्ठा प्रश्न आहे.येणाऱ्या काळात सावंतवाडीकरांचा भावनांचा उद्रेक नक्कीच होईल हे लक्षात असूद्या.आपल्याला जर हा लेख आवडला असेल तर शेअर नक्की करा.धन्यवाद.

सागर तळवडेकर

उपाध्यक्ष, कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडी.

Loading

मटण भाकरीच्या प्रसादासाठी प्रसिद्ध असलेला नांदगाव येथील श्री देव कोळंबा देवाचा जत्रोत्सव पुढील आठवड्यात

   Follow us on        
नांदगाव, दि. २८ एप्रिल : मटण भाकरीच्या प्रसादासाठी प्रसिद्ध असलेला नांदगाव येथील श्री देव कोळंबा देवाचा जत्रोत्सव येत्या रविवारी (दि. ०५ मे) होणार आहे. राज्यभरात प्रसिद्ध असलेल्या या उत्सवाला भाविकांची मोठी गर्दी होते.
‘कोळंब्याचा चाळा’ म्हणून महाराष्ट्रासह इतर राज्यात प्रसिद्ध असणारा आणि विशेष करून मुक्या प्राण्यांचा रक्षणकर्ता म्हणून कोळंबा देवाची सर्वदूर ख्याती आहे. श्री देव कोळंबाचा नवस फेडण्यासाठी श्रीफळासह कोंबड्या, बकरीचा बळी देण्याची व मटण भाकरीच्या प्रसादासाठीची जत्रा म्हणून याची ओळख आहे.
येथे हजारो वर्षांपासून श्रीदेव महादेवाचे निराकाररुपी लिंग गर्द अशा झाडीत होते. याच लिंगरुपी पाषाणाला स्थानिक ग्रामस्थ ‘श्री देव कोळंबा’, या नावाने गावाचा रक्षणकर्ता म्हणून पूजाअर्चा करतात. ‘‘आपल्या घराचे-गावाचे रक्षण कर, सांभाळ कर’’, असे म्हणून श्रद्धेने देवाच्या चाळ्याला कोंबडा व देवाला श्रीफळ अर्पण करतात. याच्या श्रद्धेची प्रचिती आल्याने आज लाखाहून अधिक श्री देव कोळंबाचे भक्त आहेत. पूर्वी जत्रेला शे-दीडशे भाविक दर्शनास येत. त्यांची संख्या आता लाखाच्या घरात पोचली असून प्रत्येक भक्ताला अनुभूती मिळत आहे. यानिमित्त सकाळी ८ ते ९ पूजाविधी, ९ ते २ नवस फेडणे, दुपारी १२ ते ४ नवीन नवस बोलणे आणि सायंकाळी चारनंतर महाप्रसाद वाटप असे कार्यक्रम होणार आहेत.

Loading

कोकण रेल्वेचा HDN आणि HUN यादीत समावेश नसणे हे अनेक समस्यांचे कारण. -सागर तळवडेकर 

कोकण विकास समितीचे रेल्वे अभ्यासक अक्षय मधुकर महापदी यांनी आर टी आय मधून एक माहिती मिळवलेली आहे. या माहितीत भारतीय रेल्वाच्या अति महत्त्वाचे, अति मागणीचे आणि व्यस्त असलेले मार्ग High Density Network (HDN) आणि Highly Utilized Network (HUN) रेल्वे मार्गाची यादी दिलेली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या यादीत क्षमेतपेक्षा जास्त वापर असेलेल्या कोकण रेल्वेचा समावेश नाही आहे.
   Follow us on        
आवाज कोकणचा: आपल्या गावाला टंचाई असेल आणि टँकर सुरू करायचा असेल तर आपल्या गावचं नाव टंचाईच्या यादीत असणं गरजेचं असतं. जर हे नाव टंचाईचे यादीत असेल तर आपल्याला शासनाकडून टँकर उपलब्ध केला जातो.
तसेच भारतीय रेल्वेच्या वतीने अति महत्त्वाचे, अति मागणीचे आणि व्यस्त असलेले मार्ग High Density Network (HDN) आणि Highly Utilized Network (HUN) या दोन याद्यांमध्ये सूचीबद्ध झालेले आहेत. भारतीय रेल्वे या मार्गावर चांगल्या प्रकारे लक्ष देऊन अनेक नवनवीन प्रकल्प, दुहेरीकरण, गती-शक्ती सारख्या माध्यमातून क्षमतावृद्धीचे प्रयत्न करत आहे. याकडे रेल्वे मंत्री आणि पंतप्रधान कार्यालयाचे विशेष लक्ष असते.पण या यादीमध्ये अतिशय व्यस्त असलेला कोकण रेल्वे मार्ग (एकूण क्षमतेच्या १६८% वापर असूनही) स्थान घेऊ शकला नाही कारण कोकण रेल्वे स्वतंत्र महामंडळ असल्यामुळे भारतीय रेल्वेमध्ये त्याला स्थान नाही.जर या यादीमध्ये कोकण रेल्वे मार्गाची नोंद झाली तर या ठिकाणी भारतीय रेल्वेच्या माध्यमातून अनेक उपाययोजना करून प्रवाशांना वाढीव सोयी सुविधा व गाड्या पुरवल्या जाऊ शकतात.
त्यामुळेच कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलिनीकरण झालेच पाहिजे. त्यानंतर महाराष्ट्रातील मार्ग मध्य रेल्वेच्या ताब्यात जायला हवा.
आतापर्यंत कोकणातील खासदारांनी याचा विचार केला नाही पण आता निवडून येणाऱ्या खासदारांनी संसदेत विषय चर्चेत घेऊन लवकरात लवकर मार्गी लावावा.

श्री. सागर तळवडेकर 
सामाजिक कार्यकर्ते व रेल्वे अभ्यासक
Ad -

मराठी मुलांमुलींना युरोप, पोर्तुगाल,माल्टा,इटली आणि पोलंड येथे नोकरीच्या संधी....
🔸Retail Jobs 🔸Malls 🔸Corporate Staff 🔸Sales 🔸Back Office 🔸Hotels
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Loading

नागपूर पत्रादेवी शक्तीपीठ महामार्गाला कोकणात निर्माण झाला सर्वात मोठा अडथळा

   Follow us on        
सावंतवाडी: प्रस्तावित नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाच्या वाटेतील विघ्ने वाढत चालली आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी या महामार्गाला मोठया प्रमाणावर विरोध केला आहे. आता तर तळकोकणातही ज्या पट्ट्यातून हा महामार्ग जात आहे तो पट्टा ‘पर्यावरणीयदृष्टीने संवेदनशील’  क्षेत्र Eco Sensitive Zone जाहीर करण्याचे आदेश उच्च न्यायालायने सरकारला दिले असल्याने या महामार्गासमोरील सर्वात मोठा अडथळा निर्माण झाला आहे.
प्रस्तावित महामार्ग आंबोली, कीतवडे,गेळे,वेर्ले, पारपोली, नेने, फणसवडे, उदेली, घारपी, फुकेरी,असनिये, तांबोळी, डेगवे, बांदा या गावातून जाणार आहे. मात्र यातील फणसवडे, उडेली, घारपी, फुकेरी,असनिये, तांबोळी ही गावे या इको सेन्सेटिव्ह झोन ESZ मध्ये येत आहेत. येथे वृक्षतोड करणे आणि महामार्ग बांधकामास मर्यादा येणार आहेत. त्यामुळे या महामार्गाच्या वाटेवरील अडचणी वाढल्या आहेत. या महार्गासाठी   या भागातून नेण्यास मंजुरी मिळवणे खूप कठीण होणार आहे.
सावंतवाडी – दोडामार्ग तालुक्यातील २५ गावांच्या क्षेत्राला ‘पर्यावरणीयदृष्टीने संवेदनशील’  क्षेत्र Eco Sensitive Zone ESZ जाहीर करण्यात  यावे असेच आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकार व केंद्र सरकारला दिले होते. त्यानुसार राज्य सरकार व केंद्र सरकारने २७ सप्टेंबर २०१३ मध्ये कॉरिडॉरचा हा भाग ‘पर्यावरणीयदृष्टीने संवेदनशील’ भाग म्हणून जाहीर करण्याचे आश्वासन न्यायालयाला दिले होते. मात्र गेल्या ११ वर्षात या आदेशांचे पालन झाले नसल्याने  केंद्र व राज्य सरकारने केवळ न्यायालयाच्या आदेशाचा भंग केला नाही तर कर्तव्य पार पाडण्यातही ते अपयशी ठरल्याचे म्हणत न्यायालयाने ताशेरे ओढले होते.आता मात्र उच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि राज्य सरकारला सहा महिन्यांचा अल्टिमेटम दिला आहे. राज्य सरकारने  चार महिन्यांत केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवावा. केंद्र सरकारने पुढील दोन महिन्यांत अंतिम अधिसूचना काढावी असा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे.
सवांवाडी दोडामार्ग कॉरिडॉर दरम्यान २५ गावे येतात. सिंधदुर्गतील केसरी, फणसवडे , उडेली, दाभील- नेवली, सरंबळे, ओटावणे, घारपी, असनिये, फुकेरी, तांबोळी, कोनशी, भालावल, भेकुर्ली, कुंभवडे, खडपडे, तळकट, झोळंबे, कोलझर, शिरवळ, कुंब्रल, पांतुर्ली, भिके कोनाळ, कळणे, उगडे, पडवे माजगाव ही २५ गावे या कॉरिडॉर मध्ये मोडतात.या मार्गिकेतून अनेक वन्य प्राणी येजा करतात. याठिकाणी मोठ्याप्रमाणात जैवविविधता आहे. तसेच वनस्पतींच्या अनेक दुर्मिळ प्रजाती आहेत. मात्र या भागातून असे महामार्ग बनवताना मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होऊन जैवविविधतेची मोठी हानी होऊ शकते. या महामार्गामुळे पन्नास टक्के वन्यजीव विस्थापित होणार असल्याने येथील जनतेने याला विरोध केला पाहिजे, असे वनशक्ती संस्थेच्या स्टॅलिन दयानंद यांनी मत मांडले आहे.

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search