
Train no. | Station | Timings | With Effect from Journey commences on |
---|---|---|---|
16345 Lokmanya Tilak (T) - Thiruvananthapuram Central Netravati Express | Sangameshwar Road | 17:34 / 17:36 | 22/08/2023 |
16346 Thiruvananthapuram Central - Lokmanya Tilak (T) Netravati Express | Sangameshwar Road | 09:56 / 09:58 | 22/08/2023 |
12618 H. Nizamuddin - Ernakulam Jn. Mangala Express | Khed | 10:08 / 10:10 | 22/08/2023 |
12617 Ernakulam Jn. - H. Nizamuddin Mangala Express | Khed | 08:12 / 08:14 | 22/08/2023 |
22113 Lokmanya Tilak (T) - Kochuveli Express | Khed | 20:56 / 20:58 | 22/08/2023 |
22114 Kochuveli - Lokmanya Tilak (T) Express | Khed | 02:20 / 02:22 | 24/08/2023 |
Mumbai Goa Highway : कोकणवासीयांना त्रास देणारा आणि येथील राजकारण्यांना शरमेने मान खाली घालाव्या लागणार्या मुंबई गोवा महामार्गाचा विषय महाराष्ट्राची हास्यजत्रा या मराठी विनोदी मालिकेत सुद्धा चांगलाच गाजला आहे. ज्या विनोदी मालिकेत प्रेक्षकांना हसवण्यात येते त्याच विनोदी मालिकेत हा गंभीर विषय दाखविण्यात आला आहे.
मुंबई गोवा महामार्गावरील खड्डे हा कधीच विनोदाचा विषय होऊ शकत नाही यात वाद नाही. कारण या खड्ड्यांमुळे अनेकांना आपले जीव गमवावे लागले आहेत. मात्र या विनोदी मालिकेत या विषयाचे भांडवल न करता साध्या आणि सोप्या पद्धतीने कोकणातील जनतेला एक स्पष्ट मेसेज देण्यात आला आहे. ‘मी एकटा काय करणार?’ ह्या विचाराने कित्येक कोकणवासिय या प्रश्नावर गप्पच असल्याने हा विषय सुटत नाही. या प्रश्नासाठी प्रत्येकाने आपल्या परीने सुरवात केली पाहिजे.
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर वैभववाडी ते रत्नागिरी सेक्शन दरम्यान मार्गाच्या देखभाल दुरुस्तीसाठी बुधवार दि. २३ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी ७.३० ते १०.३० असा तीन तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ‘मेगा ब्लॉकच्या कालावधीत या मार्गावरुन धावणाऱ्या तीन गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.
1) दिनांक २३ ऑगस्ट रोजी सुटणार्या गाडी क्र. 11003 दादर – सावंतवाडी रोड तुतारी एक्स्प्रेसला रोहा ते रत्नागिरी दरम्यान सुमारे अडीच तास रोखून ठेवले जाणार आहे.
2) दिनांक २२ ऑगस्ट रोजी सुटणार्या गाडी क्र. 16346 तिरुवनंतपुरम सेंट्रल – लोकमान्य टिळक (टी) एक्स्प्रेसला उडुपी – कणकवली दरम्यान सुमारे तीन तास रोखून ठेवले जाणार आहे.
3) दिनांक २३ ऑगस्ट रोजी सुटणार्या गाडी क्र. 10106 सावंतवाडी रोड – दिवा जं. एक्स्प्रेसला सावंतवाडी रोड – कणकवली दरम्यान सुमारे तीस मिनिटे रोखून ठेवले जाणार आहे.
सावंतवाडी |सागर तळवडेकर : गेली अनेक वर्षे रेंगाळलेले सावंतवाडी टर्मिनस चे काम पूर्ण करून तेथे वंदे भारत, मत्स्यगंधा, मंगलोर एक्सप्रेस सारख्या रेल्वे गाड्यांना येथे थांबा द्यावा असे निवेदन प्रेरणा फाउंडेशन च्या संस्थापिका दीप्ती दत्ताराम गावकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग चे पालक मंत्री रविन्द्र चव्हाण यांना पाठवले आहे.
कोकण रेल्वे मार्गावरील महत्वाचे स्थानक असणारे सावंतवाडी स्थानकात विविध समस्या अनेक दिवसांपासून आहेत, या समस्या लवकरात लवकर मार्गी लागाव्या तसेच टर्मिनस चे टप्पा २ चे काम पूर्ण व्हावे आणि येथे मंगलोर,वंदेभारत,नेत्रावती,मत्स्यगंधा,मंगला या दैनिक गाड्यांना व नागपूर मडगाव ह्या विदर्भ कोकण जोडणाऱ्या रेल्वेगाडीला या स्थानकात थांबा मिळावा म्हणून प्रवाशांनी तसेच विविध संघटनांनी रेल्वे प्रशासनाला वेळोवेळी विनंती केली आहे परंतु या समस्या अजूनही जैसे थे आहेत
कोकणातील गणेशोत्सव हा एका महिन्यावर आलाय, हा उत्सव राज्यात नाही तर संपूर्ण देशातील पारंपरिक पद्धतीने साजरा केला जाणारा मोठा उत्सव आहे, लाखो चाकरमानी या उत्सवासाठी लवकरच कोकणाकडे रवाना होणार आहेत ही बाब लक्षात घेऊन सावंतवाडी स्थानकातील वरील समस्या लवकरात लवकर सोडवून कोकणातील प्रवाशांना दिलासा द्यावा अशी मागणी केली आहे.
[pdf-embedder url=”https://kokanai.in/wp-content/uploads/2023/08/letter-for-chief-minister.pdf” title=”letter for chief minister”]👆झूम करण्यासाठी / पान परतण्यासाठी कृपया फोटो वर क्लिक करावे
कोकण विकास समितीची मागणी केली मान्य!
मुंबई | जयवंत दरेकर : मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरण करताना जुन्या रस्त्याच्या दुतर्फा असलेली नैसर्गिक मोठी झाडे तोडावी लागली त्यामुळे रस्ते परिसर ओसाड झाला, झाडांची सावलीच नष्ट झाल्यामुळे नैसर्गिक गारवा नाहीसा झाला. हा नाहीसा झालेला नैसर्गिक गारवा – सावली अर्थातच कोकणाचे रस्त्याचे नैसर्गिक सौंदर्य पुन्हा प्राप्त व्हावे यासाठी कोकणच्या मातीत सहज वाढणारी आणि दिर्घ आयुष्य असलेले वड,पिंपळ, किंजल, उंबर, चिंच, जांभूळ, गुलमोहर, पारिजात,आणि इतर वृक्षांची डिसेंबर महिन्यात चौपदरीकरण काम पूर्ण झाल्यानंतर लागवड करण्याची पूर्व तयारी करण्यासाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविन्द्र चव्हाण यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, आणि महाराष्ट्र राज्याच्या वन विभागाचे अधिकारी यांची बैठक आयोजित केली होती.
या बैठकीत रविन्द्र चव्हाण यांनी आजपासूनच दापोलीच्या कोंकण कृषी विद्यापीठापासून ते कोकणात असलेल्या नर्सरी केंद्रांना संपर्क करून निदान ३ ते ४ वर्ष जुनी रोपे यांचा शोध करून कोणतीही हयगय न करता डिसेंबरपर्यंत उपलब्ध होतील या पूर्व तयारीला लागा असे आदेश वन खात्याच्या चीफ कन्झर्वेटिव ऑफिसर (आयएफएस) श्री गोवेकर साहेब याना दिले. या बैठकीत सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग , कोंकण चे मुख्य अभियंता श्री शरद राजभोज साहेब, राष्ट्रीय महामार्ग( सां . बा. विभागचे )’मुख्य अभियंता श्री.संतोष शेलार साहेब, अधीक्षक अभियंता श्रीमती तृप्ती नाग मॅडम, उप अभियंता अकांक्षा मेश्राम मॅडम, उप अभियंता श्री पंकज गोसावी साहेब, स्वीय सहाय्यक श्री उत्तम मुळे साहेब, श्री एकनाथ घागरे साहेब, श्री अनिकेत पटवर्धन साहेब या विषयावर सतत पाठपुरावा करणारे आणि चर्चेसाठी मागणी करणारे कोकण विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष श्री. जयवंत दरेकर आणि त्यांना सक्रियपणे सहकार्य करणारे श्री. श्रीधर@काका कदम त्यांचे सहकारी श्री उदय सुर्वे, श्री संतोष गुरव, श्री राजू मुलुक, ॲड. प्रथमेश रावराणे,श्री शंकर उंबाळकर,श्री.हरिश्चंद्र शिर्के, आणि वृक्षप्रेमी श्री सुनील नलावडे हेही उपस्थित होते.
रत्नागिरी : चिपळूण एस. टी. आगारातर्फे खास श्रावण महिन्यानिमित्त अष्टविनायक दर्शन आणि मार्लेश्वर दर्शन जादा एस.टी. बससेवा सुरू करण्यात येणार आहे. भाविकांना दर सोमवारी मार्लेश्वर दर्शनासाठी चिपळूण ते मार्लेश्वर आणि मार्लेश्वर ते चिपळूण अशी एस.टी. ची सेवा सुरू करण्यात येईल. यासंदर्भात आगारप्रमुख रणजित राजेशिर्के यांनी पत्रकारांना माहिती दिली.
श्रावण महिना सुरू झाला आहे. या निमित्ताने २१, २८ऑगस्ट, ४ व ११ सप्टेंबर रोजी श्रावणी सोमवारनिमित्त मार्लेश्वर जादा एस. टी. गाडी सोडण्यात येणार आहे. सकाळी ८ वा. चिपळूण मार्लेश्वर व दुपारी ३:३० वा. मार्लेश्वर चिपळूण अशी बस निघेल. या गाडीचा तिकीट दर १३० रुपये असून, महिला व ज्येष्ठ नागरिकांना सवलत लागू आहे. या गाडीचे बुकिंगदेखील सुरू करण्यात आले आहे. त्याच पद्धतीने अष्टविनायक दर्शनासाठीदेखील चिपळूण आगारातून एस.टी. बस सोडली जाणार आहे. त्याचेही बुकिंग सुरू करण्यात आले आहे. ही गाडी खास महिलांसाठी असून, ६५५ रुपयांत अष्टविनायक दर्शन घेता येणार आहे. श्रावण
महिन्यामध्ये अनेकजण देवदर्शन घेत असतात. या निमित्ताने प्रवाशांची सोय व्हावी आणि एस.टी.च्या उत्पन्नात वाढ व्हावी, या उद्देशाने या गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. चिपळूण आगारातून अष्टविनायक दर्शन गाडी सुटेल. यासाठी जास्तीत जास्त महिलांनी बुकिंग करावे. महिलांना प्रवासात ५० टक्के सवलत देण्यात येणार आहे. या सवलतीमुळे एस. टी. च्या उत्पन्नात वाढ होत असल्याचे राजेशिर्के यांनी सांगितले.
सिंधुदुर्ग : मडगावच्या दिशेने जाणाऱ्या नेत्रावती एक्सप्रेसची धडक बसून बोर्डवे रेल्वे फटका नजीक तीन गवेरेडे ठार झाले. ही घटना शुक्रवारी रात्री 10.15 वाजण्याच्या सुमारास घडली. मोटरमन कडून याबाबत माहिती मिळतच कणकवली रेल्वे स्टेशन वरील आरपीएफ कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच याबाबत वनविभागाला देखील माहिती देण्यात आली. गवे रेड्यांना बसलेली रेल्वेची धडक ही एवढी जोरात होती की यात काही गवे ट्रॅक पासून दूरवर जाऊन पडले. तर काही एका गव्याचा अक्षरशा मांसाचा सडा रेल्वे ट्रॅक वर पडला होता.
Content Protected! Please Share it instead.