Category Archives: मुंबई

Mumbai Local: डायनॅमिक ‘क्यू आर’ कोड लावणार फुकट प्रवासाला लगाम

   Follow us on        

मुंबईतील स्थानिक प्रवासासाठी असलेल्या QR कोडचा मोठ्या प्रमाणात गैरवापर होत असल्याने आता रेल्वे प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांनी डाउनलोड केलेले जुने QR कोड वापरून स्टेशनवरच तिकीट बुक करण्याच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी लवकरच डायनॅमिक QR कोड प्रणाली लागू केली जाणार आहे.

सध्या UTS (Unreserved Ticketing System) अ‍ॅपमधून प्रवासी स्टेशनवरील विशिष्ट QR कोड स्कॅन करून कॅशलेस पद्धतीने तिकीट बुक करू शकतात. यासाठी प्रवाशाला प्लॅटफॉर्मजवळ पोहोचणे आवश्यक असते, जेणेकरून जिओफेन्सिंगमुळे (geofencing) २५ मीटर अंतरापलीकडून तिकीट बुक होऊ नये. परंतु काही प्रवासी डाउनलोड केलेले QR कोड वापरून ही अट चुकवत होते.

आता रेल्वेने ठरवले आहे की प्रत्येक स्टेशनवरील QR कोड दर काही सेकंदांनी बदलणारे डायनॅमिक कोड असतील. त्यामुळे जुना किंवा साठवलेला कोड वापरणे शक्य होणार नाही. हा बदल लागू झाल्यानंतर फक्त त्या क्षणी स्क्रीनवर दिसणारा QR कोडच तिकीट बुकिंगसाठी वैध असेल.

हा निर्णय घेतल्यामुळे तिकीटविना प्रवास करणाऱ्यांवर आळा बसून महसूल वाढण्यास मदत होईल असे रेल्वेच्या अधिकार्‍यांचे म्हणणे आहे.

 

Mumbai: संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात ‘वनराणी’ पुन्हा धावणार

   Follow us on        

मुंबई: बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात लहान-मोठ्यांना आकर्षित करणारी ‘वनराणी’ धावणार आहे. मे 2021 मध्ये ‘तौक्ते’ चक्रीवादळानंतर बंद पडलेली मिनी ट्रॉय ट्रेन आता पर्यटकांच्या सेवेत दाखल होणार आहे. ऑगस्टपासून ही ट्रॉय ट्रेन पर्यटकांसाठी सुरू करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती उद्यान प्रशासनाने दिली आहे.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील कान्हेरी गुंफा, नौकाविहार, वाघ-सिंह सफारी, निसर्ग माहिती केंद्र आदींबरोबरच ‘वनराणी’ ही देखील पर्यटकांचे आकर्षण होती. मुलांबरोबरच त्याचे पालकही ‘वनराणी’ या मिनी टॉय ट्रेन’ मधून उद्यानाची सफर करत मजा लुटत होते. मात्र, 2021 मध्ये आलेल्या ‘तौक्ते’ चक्रीवादळात राष्ट्रीय उद्यानात शेकडो वृक्षांची पडझड झाली. तसेच अनेक रस्ते देखील उखडले गेले. तेव्हा ‘वनराणी’च्या एका वळणावर झाडे पडल्याने रुळांसह स्लीपर्सचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे ही ट्रॉय ट्रेन बंद झाली होती.

Loading

Mumbai Local: ज्येष्ठ नागरिकांना आजपासून लोकल प्रवासात ‘नो टेंशन’, मिळाला हक्काचा डबा

   Follow us on        

Mumbai Local: मध्य रेल्वेने मुंबई लोकलमध्ये प्रथमच ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष डबा सुरू केला. ही पहिली सेवा आज, दिनांक १०.०७.२०२५ रोजी, दुपारी ३:४५ वाजता सीएसएमटी–डोंबिवली लोकलने सुरू झाली. ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रवास अधिक आरामदायक आणि सुलभ करण्याच्या दृष्टीने हे पाऊल उचलण्यात आले आहे.

वाढीव आसनव्यवस्था, सुरक्षेची अधिक व्यवस्था आणि आकर्षक देखणं सजावट असलेला हा खास डबा आता सर्व लोकल गाड्यांना जोडण्यात येणार आहे. हा डबा केवळ ज्येष्ठ नागरिकांसाठी आरक्षित आहे, ज्यामुळे त्यांना गर्दीतून थोडा दिलासा मिळेल. आसने मऊ असून, वयोवृद्ध प्रवाशांच्या सोयीसाठी खास डिझाइन करण्यात आली आहेत. हँडरेल, सुरक्षिततेसाठी कॅमेरे, तसेच प्रभावी प्रकाश व्यवस्था उपलब्ध आहे. डब्याची सजावट सौंदर्यपूर्ण आणि आरामदायक ठेवण्यात आली आहे, जेणेकरून प्रवास अधिक सुखद होईल.

हे डबे एमयूएम लोकल रेकमध्ये हळूहळू इतर गाड्यांमध्येही समाविष्ट केले जाणार आहेत. जेणेकरून ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या डब्यात सुरक्षित आणि सन्मानाने प्रवास करता येईल.

 

 

 

Mumbai Local: ‘एम इंडिकेटर’ आणि ‘युटीएस’ ठरत आहेत फुकट्या प्रवाशांसाठी वरदान

   Follow us on        
Mumbai Local: मुंबई उपनगरीय लोकलचे टाईमटेबल पाहण्यासाठी एम इंडिकेटर हे लोकप्रिय अँप आहे. या अँप मध्ये ग्रुप चॅटिंगचीही सोय आहे. मात्र या चॅटिंगचा गैरवापर होत असल्याचे समोर आले आहे. काही प्रवासी  या ग्रुप चॅटिंगमध्ये एखाद्या ठिकाणी टीसी आहे अशी माहिती देत असतात. त्यामुळे टीसी विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवासी सावध होतात  आणि ते टीसीच्या हाती लागत नाहीत.
प्रत्येक स्टेशन्सवर UTS अँपवरून तिकीट काढण्यासाठी क्यु आर कोर्ड असतो. पण काही प्रवासी या क्युआर कोडचा फोटो काढून कुठूनही तिकीट काढतात. यामुळेही विनातिकीट प्रवासी टीसीला पाहून दूरुनच तिकीट काढतात आणि दंड देण्यापासून वाचतात.
मुंबई लोकलमधून लाखो लोक प्रवासी करतात. अनेक प्रवासी विना तिकीट किंवा विना पास प्रवास करतात. लोकलने प्रवास करताना लाखो प्रवासी लोकलची वेळ कळावी म्हणून एम इंडिकेटर हे अँप वापरतात. या अँपमध्ये ग्रुप चॅटिंगची सोय आहे. कुठली गाडी कुठे आहे, गाड्या वेळेवर आहेत का, गाड्या रद्द तर झाल्या नाही ना याचे अपडेट्स प्रवासी एकमेकांना देत असतात. पण अनेक प्रवासी विशिष्ट ठिकाणी टीसी आहे याची माहिती देतात. त्यामुळे विनातिकीट प्रवास करणारे प्रवासी सतर्क होतात. त्यामुळे रेल्वेचे नुकसान होतं. या बाबत ‘एम इंडिकेटर’ अँप चालवणारे सचिन टेके म्हणाले की अँपमध्ये अश्लील आणि वादग्रस्त चॅट असेल तर ते हटवता येतात. प्रवासी एकमेकांना टीसीबाबत माहिती देत असतील त्यात काहीच करता येत नाही असे टेके म्हणाले.
प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेने UTS अँप बनवले आहे. या अँपमधून प्रवशांना आपल्या मोबाईलमध्येच तिकीट किंवा पास काढता येतात. हे तिकीट प्रवासी स्टेशनवरूनही काढू शकता. त्यासाठी रेल्वेने स्टेशन्सवर क्यु आर कोड लावले आहेत. अनेक प्रवाशांनी या क्यु आर कोडचे फोटो काढून ठेवले आहेत. टीसी असल्याचे कळताच हे प्रवासी कुठल्याही स्थानकावरून तिकीट काढतात. त्यामुळे त्यांना दंड भरावा लागत नाही.

Mumbai Local Accident: धक्कादायक! लोकल आणि पुष्पक एक्सप्रेस एकमेंकांना घासल्या, प्रवासी जण ट्रॅकवर पडले; ५ ते ६ जणांचा मृत्यू

   Follow us on        

Mumbai Locals: मुंब्रा आणि दिवा दरम्यान आज मोठी दुर्घटना घडली आहे. मध्य रेल्वेची लोकल आणि पुष्पक एक्सप्रेस एकमेकांना जोरदार घासल्यामुळे लोकलच्या दारात उभं असणारे ८ ते १० प्रवासी धावत्या ट्रेनमधून पटरीवर पडल्याचे समोर आले आहे.या अपघातामध्ये ५ जणांचा मृत्यू झाल्याचे समजतेय. ही दुर्घटना सकाळच्या गर्दीच्या वेळेस घडली असून जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी कामावर जाण्यासाठी मुंबईकर लोकलने प्रवास निघाले. पण गर्दी प्रचंड असल्याने अनेकजन दरात लटकत उभे होते. पण मुंब्रा-दिवा या स्थानकादरम्यान लोकल आणि ट्रेन एकमेकांना घासल्या गेल्या. दोन्ही गाड्याचा स्पीड अतिशय जास्त होता, त्यामुळे जोरात धडक झाली अन् एकच आवाज झाला. त्यामुळे लोकलमधून ८ ते १०प्रवासी पटरीवर खाली पडले. त्यामुळे त्यांना गंभीर दुखापत झाल्याचे समजतेय. दोन्ही ट्रेन एकमेंकाना घासल्यामुळे मोठा आवाज झाला अन् लोकलमधील प्रवाशांमध्ये भीतीचे वातवरण निर्माण झाले. सध्या रेल्वेकडून या घटनेची माहिती घेतली जात आहे. जखमी प्रवाशांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रेल्वेकडून या घटनेची गंभीर दखल घेतली असून पूर्णपणे चौकशी करण्यात येणार आहे.

“Happy Birthday Mandovi Express!” मांडवी एक्सप्रेसचा २६ वा वाढदिवस मुंबईत उत्साहात आणि जल्लोषात साजरा

   Follow us on        

मुंबई: तत्कालीन रेल्वेमंत्री श्री. नितीश कुमार यांनी रेल्वे अर्थसंकल्पात सांगितल्यानुसार १ जुलै, १९९९ पासून मुंबई आणि मडगाव दरम्यान इंटरसिटी एक्सप्रेस सुरु झाली. मुंबई गोवा मार्गावर दिवसाची सेवा देणारी ही पहिलीच एक्सप्रेस होती. तत्पूर्वी सुरु असणारी कोकणकन्या एक्सप्रेस रात्रीची सेवा देत होती तर दिवा सावंतवाडी पॅसेंजर संथ गतीने जात असल्यामुळे लांबच्या प्रवाशांना अडचणी येत होत्या. कोकणवासीयांना दिवसाच्या जलद प्रवासाची सवय याच इंटरसिटी एक्सप्रेसने लावली.

गेज बदलण्यापूर्वी मिरज वास्को दरम्यान मांडवी एक्सप्रेस धावत असे. परंतु ब्रॉडगेज मार्ग झाल्यावर ती बंद करण्यात आली व मुंबई मडगाव दरम्यानच्या इंटरसिटी एक्सप्रेसचे नामकरण मांडवी एक्सप्रेस म्हणून करण्यात आले. तसेच पूर्वी केवळ आसनी डबे असणाऱ्या गाडीचे रेक नंतर कोकणकन्या एक्सप्रेस सोबत एकत्रित करण्यात आल्यामुळे मांडवी एक्सप्रेसला स्लीपर डबे मिळाले. पुढे १० जून, २०१९ पासून या दोन्ही गाड्यांना आधुनिक एलएचबी डबे देण्यात आले. १ फेब्रुवारी,२०२४ पासून मांडवी एक्सप्रेसला दोन अद्ययावत एसी थ्री टायर इकॉनॉमी डबे जोडण्यात आले. अशाप्रकारे वेगवेगळी स्थित्यंतरं पाहत मांडवी एक्सप्रेस गेली २६ वर्षे कोकणवासीयांची अविरत सेवा करत आहे.

रेल्वेप्रेमी व नियमित प्रवाशांमध्ये खाद्य राणी (फूड क्वीन) म्हणून प्रसिद्ध असलेल्या मुंबई मडगाव मांडवी एक्सप्रेसच्या २६ व्या वर्षपूर्तीचा सोहळा मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे शनिवार दि. ७ जून, २०२५ सकाळी ६ पासून रेल्वेप्रेमींनी मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा केला.

सर्वप्रथम रेल्वेप्रेमींनी रात्रभर जागून गाडीचे इंजिन सजवले. त्यानंतर पहाटे ५:४५ ला मडगावहून कोकणकन्या एक्सप्रेस मुंबईत दाखल झाल्यानंतर गाडीचे काही डबेही सजवण्यात आले. चिन्मय कोले यांनी नारळ वाढवून पुढील कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर पारंपरिक मराठमोळ्या पद्धतीने ढोल ताशा व तुतारीच्या गजरात गाडीचे इंजिन जोडण्यात आले. गाडीचे चालक (लोको पायलट व सहाय्यक लोको पायलट), तिकीट तपासनीस, पॅन्ट्री कार कर्मचारी यांचा सत्कार करून त्यांच्याच हस्ते केक कापून हा कार्यक्रम साजरा झाला.

यासाठी चिन्मय कोले, साहिल कोसिरेड्डी, अमित फाटक, राहुल नायर, जिनेश सावंत, शुभम नागपुरे, अभय आभाळे, अनुष जाधव, यश राणे, ओमकार फाटक, आदित्य कांबळी आणि अक्षय महापदी यांनी विशेष मेहनत घेतली. यातील काही रेल्वेप्रेमी केवळ या कामासाठी रात्री पुण्याहून मुंबईला येऊन सकाळी पुन्हा पुण्याला गेले.याचसोबत श्रेयश हुले, मंदार सहस्त्रबुद्धे, पौरव शहा, दीपक नागमोती, सुमन घोष, जोशुआ मेंडोसा, प्रथमेश प्रभू, सुनीत चव्हाण, निलेश परुळेकर, परम, इंद्रजित रावराणे, रोहित नायर, अभिषेक असोलकर, तमिळ सेल्व्हन, पवन, प्रणित शिवलकर, निलय काटदरे, जयशंकर, कमल, जेसन कोएल्हो, मिहीर मठकर, सौरभ सावंत, धनुष चंदन, कुणाल जाधव, तेजस भिवंडे, हिमांशू शर्मा, टायरोन डिसूझा, चिंतन नाईक यांनीही सहकार्य केले.

Ξ श्री. अक्षय महापदी 

 

Mumbai to Konkan RoRo Service : मांडवा -माझगाव ते रत्नागिरी -मालवण सागरी मार्गावर गणेशचतुर्थीपूर्वी रो रो सेवा सुरु करणार – मंत्री नितेश राणे

   Follow us on        
रत्नागिरी : राज्यातील रस्ते आणि रेल्वे मार्गासोबतच जलवाहतुकीला प्राधान्य देण्यासाठी लवकरच मांडवा, माझगाव ते रत्नागिरी आणि मालवण सागरी मार्गाद्वारे रो रो सेवा सुरु करण्यात येणार आहे, या निमित्ताने नवा अध्याय राज्यात सुरु होईल, असे मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी सांगितले.
रत्नागिरीच्या दौ-यावर असताना ते म्हणाले, राज्यात दळणवळण व्यवस्था भक्कम करण्यासाठी रस्ते आणि रेल्वे बरोबर जलवाहतूक वाढावी यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून येत्या गणेशोत्सवापर्यंत मांडवा आणि माजगाव येथून रो रो जलसेवा सुरू करण्यात येणार असल्याचे राणे यांनी सांगितले. या रो रो जलसेवेमुळे रत्नागिरीपर्यंत तीन तासात तर मालवण, विजयदुर्गपर्यंत साडेचार ते पाच तासात पोहोचता येणार आहे.
या रो रो जलसेवेमध्ये जवळपास १०० गाड्या आणि ५०० प्रवासी घेऊन माजगाव येथून सोडणे शक्य होणार आहे. यासाठी लागणारी बोट किंवा क्रूज महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर आली आहे. गणेश चतुर्थीच्यापूर्वी हि सेवा सुरू करण्यासाठी आमचा प्रयत्न असल्याचे नितेश राणे यावेळ पत्रकारांना सांगितले.

कोकण रेल्वेचे विलीनीकरण, दुपदरीकरण आणि इतर विषयांसाठी खासदार रवींद्र वायकर यांची रेल्वे मंत्र्यांशी भेट

   Follow us on        
Konkan Railway:कोकण रेल्वेचे विलीनीकरण, दुपदरीकरण आणि इतर विषयांसाठी खासदार रवींद्र वायकर यांनी काल  केंद्रीय रेल्वेमंत्री मा. श्री.अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलून जगन्नाथ उर्फ नाना शंकर शेठ स्टेशन करण्याबाबत तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) मुंबई येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्याबाबत निवेदन दिले.
याचबरोबर त्यांनी अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत गोरेगाव स्थानकाचा विकास करण्यात यावा तसेच कोकण रेल्वे बोर्डाचे भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरण करण्याविषयी चर्चा केली.

खासदार रवींद्र वायकर यांनी दिलेली निवेदने

Panvel: पनवेल स्थानकावरून जाणार्‍या गाड्यांची वाहतुक जलद करण्यासाठी मध्य रेल्वेचा मोठा निर्णय

   Follow us on        
पनवेल: मुंबईत रेल्वेची क्षमता वाढवणे आणि रेल्वे वाहतूक सुव्यवस्थित करण्याच्या उद्देशाने, रेल्वे मंत्रालयाने पनवेल-सोमाटणे आणि पनवेल-चिखलीदरम्यान एकूण ७.५४ किमी लांबीच्या पनवेल कॉर्ड लाइन्स बांधण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. यासाठी ४४४.६४ कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प मध्य रेल्वेकडून राबविला जाईल. पनवेल हे मुंबई उपनगरीय रेल्वेच्या हार्बर मार्गावरील एक महत्त्वाचे टर्मिनल आहे. उत्तरेकडे दिवा, दक्षिणेकडे रोहा, पश्चिमेकडे जेएनपीटी आणि पूर्वेकडे कर्जत महत्त्वाचे जंक्शन आहे. सध्या, ग्रेड सेपरेटेड क्रॉसिंग नसल्यामुळे इंजिन रिव्हर्सने वाहतुकीसाठी विलंब होतो. यावर मात करण्यासाठी, दोन कॉर्ड लाइन्स प्रस्तावित केल्या होत्या. आता त्यांना मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे पनवेल स्थानकाहून होणारी वाहतूक जलदगतीने होणार आहे.
खालील दोन कॉर्ड लाइन्सना मान्यता देण्यात आली आहे. 
१)जेएनपीटी ते कर्जत कॉरिडॉरवर दिवा-पनवेल लाइन फ्लायओव्हर मार्गे कॉर्ड लाइन
२) काळटुंरीगाव केबिन आणि सोमाटणे स्थानकादरम्यान कॉर्ड लाइन

Special Trains: मुंबई – गुजरात दरम्यान धावणार अतिजलद तेजस विशेष गाड्या

   Follow us on        

मुंबई :प्रवाशांच्या सोयीसाठी आणि विशेषतः उन्हाळी हंगामात प्रवाशांची वाढती मागणी गर्दी लक्षात घेता पश्चिम रेल्वेने मुंबई सेंट्रल ते राजकोट आणि मुंबई सेंट्रल ते गांधीधाम दरम्यान विशेष भाड्याने अतिजलद तेजस विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय, प्रवाशांची मागणी पूर्ण करण्यासाठी, पश्चिम रेल्वेने विशेष भाड्याने दोन विशेष गाड्यांच्या कालावधीत वाढ करण्यात आली आहे .

ट्रेन क्रमांक ०९००५ मुंबई सेंट्रल -राजकोट स्पेशल दर बुधवार आणि शुक्रवारी मुंबई सेंट्रलहून रात्री ११.२० वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ११ .४५ वाजता राजकोटला पोहोचेल. ही ट्रेन ३० मे ते २७ जून पर्यंत धावेल. त्याचप्रमाणे,

ट्रेन क्र. ०९००६ राजकोट-मुंबई सेंट्रल स्पेशल दर गुरुवार आणि शनिवारी संध्याकाळी ६.३० वाजता राजकोटहून निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ७.३० वाजता मुंबई सेंट्रलला पोहोचेल. ही ट्रेन ३१ मे ते २८ जून पर्यंत धावेल.ही गाडी बोरिवली, वापी, सुरत, वडोदरा, आनंद, अहमदाबाद, विरमगाम, सुरेंद्रनगर आणि वांकानेर स्थानकावर दोन्ही दिशेने थांबेल. या ट्रेनमध्ये फर्स्ट एसी, एसी २-टायर आणि एसी ३-टायर कोच असतील.

ट्रेन क्रमांक ०९०१७ मुंबई सेंट्रल – गांधीधाम स्पेशल ही गाडी दर सोमवारी मुंबई सेंट्रलहून रात्री ११. २० वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी १२.५५ वाजता गांधीधामला पोहोचेल. ही ट्रेन ०२ जून ते ३० जूनपर्यंत धावेल. त्याचप्रमाणे, ट्रेन क्रमांक ०९०१८ गांधीधाम-मुंबई सेंट्रल स्पेशल दर मंगळवारी गांधीधामहून संध्याकाळी ६. ५५ वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ७.३० वाजता मुंबई सेंट्रलला पोहोचेल. ही ट्रेन ०३ जून ते ०१ जुलैपर्यंत धावेल. ही ट्रेन दोन्ही दिशांना बोरिवली, वापी, सुरत, वडोदरा, आनंद, अहमदाबाद, विरमगाम, समख्याली आणि भचाऊ स्थानकांवर थांबेल. या ट्रेनमध्ये फर्स्ट एसी, एसी २-टायर आणि एसी ३-टायर
कोच आहेत.

कालावधी वाढवण्यात आलेल्या विशेष गाड्या: ट्रेन क्रमांक ०९०६७ उधना-जयनगर अनारक्षित विशेष गाडी २९ जून पर्यंत,ट्रेन क्रमांक ०९०६८ जयनगर-उधना अनारक्षित विशेष गाडी ३० जून पर्यंत , ट्रेन क्रमांक ०६०९६ उधना-समस्तीपूर स्पेशल २८ जून पर्यंत आणि ट्रेन क्रमांक ०९०७० समस्तीपूर-उधना स्पेशल ३० जून पर्यंत वाढवण्यात आली आहे.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search