Amboli Waterfall: आंबोली पर्यटन स्थळी वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. सायंकाळी पाच वाजल्यानंतर मुख्य धबधबा बंद करण्यात येणार आहे.
मुख्य धबधब्यावरील पर्यटकांना खाली उतरवून धबधब्यावर जाणाऱ्या पर्यटकांना मज्जाव करण्यात येणार असून सायंकाळी पाच वाजल्यानंतर मुख्य धबधबा बंद करण्यात येणार आहे. पावसाळ्यात आंबोलीतील मुख्य धबधबा परिसरात मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते. मुख्य धबधबा, हिरण्यकेशी, कावळेसाद, महादेवगड पॉईंट या ठिकाणी आता शनिवार आणि रविवार सायंकाळी 5 नंतर प्रवेशास मज्जाव असणार आहे. 5 वाजता धबधबा परिसरात असलेल्या पर्यटकांना खाली उतरवण्यात येणार आहे आणि नवीन पर्यटकांना वर जाण्याची परवानगी दिली जाणार नाही. सर्व स्टॉलही 5 वाजता बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.
पावसामुळे आंबोली घाटात सुरु झालेल्या धबधब्यामुळे परिसरात दृश्यमानता कमी होते. त्यामुळे ज्या भागात दृश्यमानता कमी असेल अशा भागात पर्यटकांना जाण्यास मज्जाव करण्यात आला असून परिस्थितीनुरुप पुढील निर्देश केले जातील असे आदेश पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी सांगितलं.
Facebook Comments Box