नवी दिल्ली: पश्चिम आशियातील युद्धामुळे भारतात गॅस संकट निर्माण झाल्याने केंद्र सरकारने बुधवारी (२६ मार्च) एक महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. ज्या शहरांमध्ये पाईप्ड नॅचरल गॅस (पीएनजी) उपलब्ध आहे, तेथील नागरिकांना एलपीजी (एलपीजी सिलिंडर) कनेक्शन बंद करून पीएनजी कनेक्शन घेणे अनिवार्य करण्यात आले आहे.
केंद्र सरकारने स्पष्ट केले की, पीएनजी उपलब्ध असलेल्या शहरांमधील लोकांनी ताबडतोब एलपीजी कनेक्शन बदलून पीएनजी कनेक्शन घ्यावे. ज्या कुटुंबांकडे पीएनजी सुविधा उपलब्ध असूनही ते अद्याप एलपीजी वापरत आहेत, त्यांच्या एलपीजी कनेक्शनची संख्या कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. पीएनजी उपलब्ध नसलेल्या ठिकाणी मात्र एलपीजी कनेक्शन सुरू राहणार आहे.
सरकारने कनेक्शन बदलण्यासाठी तीन महिन्यांचा वेळ दिला आहे. यामुळे गॅस पुरवठा व्यवस्थापन अधिक सुधारेल आणि इंधन आयात कमी होण्यास मदत होईल, असे सरकारचे म्हणणे आहे.
महाराष्ट्रातही परिणाम:
मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, नागपूर, नाशिक अशा मोठ्या शहरांमध्ये पीएनजी उपलब्ध असल्याने येथील अनेक कुटुंबांना एलपीजी ते पीएनजी स्विच करावे लागणार आहे.
का घेतला हा निर्णय?
पश्चिम आशियातील युद्धामुळे गॅस आणि तेलाची टंचाई निर्माण झाली आहे.
देशभरात अनेक शहरांत आणि ग्रामीण भागात सिलिंडर मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.
पीएनजी हा स्वच्छ, सतत पुरवठा होणारा आणि तुलनेने स्वस्त पर्याय मानला जातो.
नागरिकांना सूचना:
जर तुमच्या भागात पीएनजी सुविधा उपलब्ध असेल तर लवकरात लवकर पीएनजी कनेक्शन घ्या. तीन महिन्यांच्या आत कनेक्शन न बदलल्यास एलपीजी कनेक्शन बंद केले जाऊ शकते.


