Author Archives: Kokanai Digital
खेड : खेड शहरातील जगबुडी नदीमध्ये अनेक मगरींचा वावर असल्याने दीड दिवसाचे गणपती विसर्जन करताना येथील विसर्जन कट्टा मंडळाच्या सदस्यांना आपला जीव मुठीत धरून गणरायाचे विसर्जन करावे लागत होते. या मगरींना पळवून लावण्यासाठी नदीमध्ये फटाक्यांचे बॉम्ब फोडून त्यांना पळवून लावावे लागले.
याची दखल वनविभागाने (Forest Department) घेऊन पाच दिवसाच्या गणपती विसर्जनामध्ये (Konkan Ganeshotsav) कोणती अडचण येऊ नये, यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. खेड शहरातून वाहणाऱ्या जगबुडी नदीत अनेक छोट्या मोठ्या मगरी पावसाच्या पाण्यामुळे आल्या आहेत. त्या येथील प्रवाहात मुक्त फिरताना दिसत असल्याने अनेकांनी जगबुडी नदीत उतरणे बंद केले आहे.
Konkan Railway: पनवेल रेल्वेस्थानक हे मध्य रेल्वेचे एक महत्वाचे स्थानक आहे. कोकणात जाणार्या पाश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेच्या सर्व गाड्या येथूनच कोकणात जातात. मात्र या रेल्वे स्थानकाच्या भोंगळ कारभारामुळे आणि अपुऱ्या सुविधांमुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी येत आहेत.
पनवेल रेल्वे स्थानक प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा त्रास सहन कराव्या लागलेल्या नरेश नाईक यांनी काल रेल्वे च्या तक्रार निवारण पोर्टल वर एक तक्रार केली आहे.
नरेश नाईक यांच्याकडे मुंबई सेंट्रल येथून सुटणार्या विशेष गाडीचे आरक्षण होते. ही गाडी पकडण्यासाठी ते काल दुपारी 3 वाजता पनवेल स्थानकावर आले होते. गाडी वेळेवर पनवेल स्थानकावर आली मात्र गाडीच्या डब्यांचा क्रम बदललेला होता. पनवेल स्थानक प्रशासनाने याबाबत कोणतीच घोषणा announcement केली नाही. त्यामुळे सगळ्याच प्रवाशांचा गोंधळ उडाला. एवढेच नाही तर अवघ्या तीन मिनिटांत ही गाडी निघाली. त्यामुळे अनेक प्रवाशांना या गाडीत चढायला भेटले नाही. अनेक प्रवासी चालत्या गाडीत चढण्याचा प्रयत्न करत होते. नरेश नाईक यांच्या पत्नी सुद्धा प्लॅटफॉर्मवरून गाडी पकडण्यासाठी धावत होत्या. प्रवाशांनी आरडा ओरडा केल्याने सुदैवाने गाडीतील प्रवाशांनी चैन आणि खेचली आणि गाडी थांबवली गेली.
हा अनुभव नरेश नाईक आणि इतर प्रवाशांसाठी खूपच भयानक ठरला. गाडी पकडल्यावर सुद्धा प्रवाशांना आपआपली सीट गाठण्यासाठी मोठी कसरत करावी लागली.
पनवेल स्थानकावर अनेक सुविधांची वानवा आहे. मेल आणि एक्सप्रेस गाड्या 5,6 आणि 7 नंबर प्लॅटफॉर्मवरून सोडण्यात येतात. मात्र येथील इंडिकेटर्स योग्य माहिती पुरविण्यात येत नसल्याने त्यामुळे मोठा गोंधळ निर्माण होत आहे. कालच्या घटनेमुळे अपघात होऊन जीव गेला असता तर त्याची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे
मुंबई :गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना पथकर (टोल) माफी देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी उद्यापासून होणार आहे. मुंबई – बेंगळुरू राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48, मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 आणि सार्वजनिक बांधकाम विभागांच्या इतर रस्त्यांवरील पथकर नाक्यांवर ही सवलत 01 ऑक्टोबरपर्यंत असणार आहे
अलीकडेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणेशभक्तांना टोलमाफी देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार आज दिनांक 15 सप्टेंबरला सार्वजनिक बांधकाम विभागानं शासन निर्णय काढला आहे. त्यानुसार उद्या 16 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर या कालावधीत गणेशभक्तांना पथकरातून सूट मिळेल.
असे मिळतील पास
टोलमाफी सवलतीसाठी ‘गणेशोत्सव 2023′ , ‘कोकण दर्शन’ अशा आशयाचे स्टीकर्स स्वरुपाचे पथकर माफी पास दिले जाणार आहेत. त्यावर वाहन क्रमांक, चालकाचं नाव असेल. हे पास गणेशभक्तांना पोलीस ठाण्यात, वाहतूक पोलीस चौकी व आरटीओ कार्यालयात मिळतील. संबंधित ठिकाणी हे पास पुरेशा प्रमाणात उपलब्ध व्हावेत याची काळजी परिवहन विभाग, वाहतूक पोलीस/पोलीस, संबंधित प्रादेशिक परिवहन विभागानं घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. परतीच्या प्रवासासाठी देखील हाच पास ग्राह्य धरण्यात येईल.
पोलीस व परिवहन विभागानं गणेशोत्सवाच्या काळात पास सुविधा आणि त्यांच्या उपलब्धतेबाबतची माहिती नागरिकांना द्यावी, अशा सूचना सरकारनं केल्या आहेत.
Rain Alert : भारतीय हवामान खात्याने आज राज्यात पुढील पाच दिवसांचा हवामान अंदाज जाहीर केला आहे. पुढील चार दिवस म्हणजे दिनांक 15 सप्टेंबर ते 18 सप्टेंबर या कालावधीत कोकणातील जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
उद्या दिनांक 15 सप्टेंबर रोजी संपूर्ण कोकणातील जिल्ह्यांना ‘यलो’ अलर्ट देण्यात आला आहे. मात्र 16 आणि 17 या तारखेस कोकणातील जिल्ह्यांना ‘ऑरेंज’ अलर्ट देण्यात आला असून मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 18 तारखेस कोकणातील जिल्ह्यांना ‘यलो’ अलर्ट देण्यात आला आहे.
आजपासून चाकरमानी गणेशोत्सवासाठी कोकणात गावाला जायला सुरू झाले आहेत. मुसळधार पाऊस लागल्यास चाकरमान्यांची प्रवास करताना गैरसोय होऊ शकते. खासकरून मुंबई गोवा महामार्गाने जाणार्या गाड्यांना रस्त्यांच्या अपूर्ण कामामुळे प्रवास करणे त्रासदायक ठरू शकते.
मुंबई :आता भारतीय रेल्वेच्या आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावरून एसटी बसचे आरक्षण करता येणे शक्य होणार आहे. एसटीची सेवा रेल्वेच्या प्रवाशांना देखील सोयीची होईल यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीमध्ये आज सामंजस्य करार करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ आणि रेल्वेच्या आयआरसीटीसी यांच्या दरम्यान आरक्षण व्यवस्थापन प्रणालीसंदर्भात हा सामंजस्य करार करण्यात आला. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ आणि रेल्वेच्या आयआरसीटीसी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या सामजंस्य करारावर सह्या केल्या. या करारामुळे आयआरसीटीसी च्या bus.irctc.co.in संकेतस्थळावरुन प्रवाशांना एसटीचे तिकीटदेखील आरक्षित करता येणार आहे.
सध्या आयआरसीटीसी च्या संकेतस्थळावरून रेल्वेसेवा, विमानसेवा आणि खाजगी बससेवांची तिकीट आरक्षणाची तसेच हॉटेल बूकिंगची सुविधा उपलब्ध होती. आता या निर्णयामुळे एसटीचे तिकीट प्रवाशांना येथून आरक्षित करता येणार आहे.
Kokan Railway News : गणेशोत्सवासाठी दिवा सावंतवाडी एक्सप्रेसने प्रवास करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. रेल्वे प्रशासनाने या गाडीच्या डब्यांच्या संरचनेत महिन्याभरासाठी बदल केला आहे. या गाडीला दोन जनरल डब्यांच्या जागी इकॉनॉमी श्रेणीतील थ्री टायरचे दोन डबे जोडले जाणार आहेत. या बदलामुळे या गाडीच्या जनरल डब्यांची संख्या 14 वरुन 12 होणार आहे.
रेल्वे प्रशासनाने जाहीर केलेल्या माहितीनुसार
1)गाडी क्रमांक 50108 मडगाव – सावंतवाडी आणि त्याच रेकसह पुढे जाणारी गाडी क्रमांक 10106 सावंतवाडी – दिवा एक्सप्रेस या गाड्यांना दिनांक 15 सप्टेंबर 2023 ते 14 ऑक्टोबर 2023 अशा महिन्याभराच्या कालावधीसाठी तात्पुरत्या स्वरुपात दोन जनरल डब्यांच्या जागी इकॉनॉमी श्रेणीतील थ्री टायर एसीचे दोन डबे जोडले जाणार आहेत.
2)गाडी क्रमांक 10105 दिवा – सावंतवाडी आणि त्याच रेकसह पुढे जाणारी गाडी क्रमांक 50107 सावंतवाडी – मडगाव एक्सप्रेस या गाड्यांना दिनांक 16 सप्टेंबर 2023 ते 15 ऑक्टोबर 2023 अशा महिन्याभराच्या कालावधीसाठी तात्पुरत्या स्वरुपात दोन जनरल डब्यांच्या जागी इकॉनॉमी श्रेणीतील थ्री टायर एसीचे दोन डबे जोडले जाणार आहेत.
कोकण विकास समितीने कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या मडगाव -सावंतवाडी- दिवा एक्सप्रेसला किमान एक एसी डबा जोडण्यात यावा यासाठी कोकण रेल्वेकडे मागणी केली होती. या मागणीची रेल्वे प्रशासनाने दखल घेतली आहे.