Author Archives: Kokanai Digital

१६ जून पंचांग आणि दिनविशेष


आजचे पंचांग 

  • तिथि-पंचमी – 15:34:43 पर्यंत
  • नक्षत्र-धनिष्ठा – 25:14:40 पर्यंत
  • करण-तैतुल – 15:34:43 पर्यंत, गर – 27:15:24 पर्यंत
  • पक्ष- कृष्ण
  • योग-वैधृति – 11:06:19 पर्यंत
  • वार- सोमवार
  • सूर्योदय- 06:00:46
  • सूर्यास्त- 19:17:18
  • चन्द्र-राशि-मकर – 13:10:55 पर्यंत
  • चंद्रोदय- 23:26:59
  • चंद्रास्त- 10:18:00
  • ऋतु- ग्रीष्म

जागतिक दिन :

  • आंतरराष्ट्रीय कौटुंबिक प्रेषण दिवस
  • जागतिक रिफिल दिवस
  • आफ्रिकन मुलांचा आंतरराष्ट्रीय दिवस
  • जागतिक समुद्री कासव दिन

महत्त्वाच्या घटना :

  • 1903 : फोर्ड मोटर कंपनी सुरू झाली.
  • 1911 : न्यूयॉर्क येथे कॉम्प्युटिंग टॅब्युलेटिंग अँड रेकॉर्डिंग तथा आय. बी. एम. कंपनीची स्थापना.
  • 1914 : लोकमान्य टिळकांची सहा वर्षांच्या तुरुंगवासातून सुटका.
  • 1947 : नव्या, कल्पक उद्योजकांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने बाबुराव पारखे यांनी मराठा चेंबरच्या वतीने कै. गो. स. पारखे औद्योगिक पारितोषिक देण्यास सुरुवात केली.
  • 1963 : व्हॅलेंटिना रेशकोवा अंतराळात प्रवास करणारी पहिली महिला अंतराळवीर ठरली.
  • 1990 : मुंबई शहरात दिवसभरातील सर्वाधिक वृष्टी झाली, 104 वर्षातील एका दिवसात 600.42 मि.मी. पावसाचा उच्चांक.
  • 2010 : तंबाखूवर पूर्णपणे बंदी घालणारा भूतान हा जगातील पहिला देश ठरला.
  • 2013 : उत्तराखंडवर केंद्रित असलेल्या ढगफुटीमुळे विनाशकारी पूर आणि भूस्खलन झाले, 2004 च्या सुनामीनंतर देशातील सर्वात वाईट नैसर्गिक आपत्ती बनली.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

  • 1723 : ‘अ‍ॅडम स्मिथ’ – स्कॉटिश अर्थशास्त्रज्ञ आणि तत्त्ववेत्ता यांचा जन्म. (मृत्यू: 17 जुलै 1790)
  • 1920 : ‘हेमंत कुमार’ – गायक, संगीतकार आणि निर्माता यांचा जन्म. (मृत्यू: 26 सप्टेंबर 1989)
  • 1936 : ‘अखलाक मुहम्मद खान’ – प्रसिद्ध ऊर्दू कवी यांचा जन्म. (मृत्यू: 13 फेब्रुवारी 2012)
  • 1950 : ‘मिथुन चक्रवर्ती’ – भारतीय अभिनेते यांचा जन्म.
  • 1992 : ‘शीना बजाज’ – भारतीय अभिनेत्री यांचा जन्म.
  • 1994 : ‘आर्या आंबेकर’ – मराठी पार्श्वगायिका आणि अभिनेत्री यांचा जन्म.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

  • 1869 : ‘चार्ल्स स्टर्ट’ – भारतीय-इंग्रजी वनस्पतीशास्त्रज्ञ व संशोधक यांचे निधन. (जन्म: 28 एप्रिल 1795)
  • 1925 : ‘चित्तरंजन दास’ – बंगालमधील विख्यात कायदेपंडित आणि स्वातंत्र्यसेनानी देशबंधू यांचे निधन.
  • 1930 : ‘एल्मर अॅम्ब्रोज स्पीरी’ – गायरो होकायंत्र चे सहसंशोधक यांचे निधन.
  • 1944 : ‘आचार्य प्रफुल्लचंद्र रे’ – भारतीय रसायनशास्त्रज्ञ यांचे निधन.
  • 1971 : ‘जॉन रीथ’ – बीबीसी चे सह-संस्थापक यांचे निधन.
  • 1977 : मराठी रंगभूमीवरील गायक-नट श्रीपाद गोविंद नेवरेकर यांचे निधन.
  • 1995 : ‘शुद्धमती माई मंगेशकर’ – दीनानाथ मंगेशकर यांच्या पत्नी यांचे निधन.


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

 

Panvel Express: पनवेल एक्सप्रेसचा सावंतवाडीपर्यंत विस्तार करावा

   Follow us on        

मुंबई: पुणे आणि कोकण जोडणारी विशेष गाडी सुरु करण्यात यावी किंवा गाडी क्रमांक १७६१३/१४ नांदेड-पुणे-पनवेल (पनवेल एक्सप्रेस) या गाडीचा सावंतवाडी पर्यंत विस्तार करण्यात यावा अशी मागणी रेल्वे प्रवाशी संघटनांनी केली आहे.

कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडी यांचे केंद्रीय विमान वाहतूक तसेच सहकार राज्यमंत्री यांना साकडे.

सध्या २२१४९/५० पुणे – एर्नाकुलम एक्सप्रेस ही एकमेव गाडी पुण्याहून कोकणमार्गे चालवली जाते. मात्र ही गाडी आठवड्यातून फक्त दोन दिवसच धावत असून कोकणात काही मोजक्याच स्थानकावर थांबा घेत असल्याने या गाडीची सेवा अपुरी पडते. त्यामुळे पुणे आणि कोकण जोडणारी विशेष गाडी सुरु करण्यात यावी किंवा गाडी क्रमांक १७६१३/१४ नांदेड-पुणे-पनवेल या गाडीचा सावंतवाडी पर्यंत विस्तार करण्यात यावा या मागणीसाठी कोकण रेल्वे प्रवासी संघटना (सावंतवाडी) वतीने संघटनेचे सचिव मिहीर मठकर यांनी केंद्रीय विमान वाहतूक तसेच सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना निवेदन दिले आहे.

“आपण पुणे – जोधपूर ही नवीन रेल्वे पुण्यातून सुरू केलीत, आणि आता आपण पुणे – रीवा वाया जबलपूर ही रेल्वे गाडीची घोषणा केलीत, फक्त एका वर्षात आपण रेल्वे संदर्भात जे कार्य केले आहे त्याला प्रेरित होऊन आम्ही कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडी, आपल्याला विनंती करत आहोत की पुण्याहून सावंतवाडीसाठी देखील नवीन रेल्वे किंवा सध्या सुरू असलेली १७६१३/१४ नांदेड – पुणे – पनवेल या दैनिक गाडीचा सावंतवाडी पर्यंत विस्तार करावा, जेणेकरून पुण्यात राहणाऱ्या लाखो कोकणी जनतेला याचा फायदा होईल.” अशी विनंती करणारे निवेदन त्यांना देण्यात आले आहे. या बरोबरच सावंतवाडी टर्मिनस स्थानकावरील विविध समस्या सोडवण्यासाठी तसेच स्थानकाचा विकास करण्यासाठी या स्थानकाचा समावेश ‘अमृत भारत स्थानक योजने’त समावेश करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी विनंती केली आहे.

गाडी क्रमांक १७६१३/१४ नांदेड-पुणे-पनवेल या गाडीचा सावंतवाडी पर्यंत विस्तार करण्यात यावा अशी मागणी अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती तर्फे करण्यात आलेली आहे. या समितीचे सचिव अक्षय महापदी यांनी अशी मागणी करणारे निवेदन समितीच्या वतीने संबंधित रेल्वे आस्थापना आणि अधिकाऱ्यांना दिले आहे.

या गाडीसाठी एका अतिरिक्त रेकची सोया करून तिचा विस्तार केला गेल्यास मराठवाडा-पुणे-कोकण अशी कनेक्टिव्हिटी मिळेल. या गाडीचा विस्तार करताना तिला पेण, नागोठणे, रोहा, माणगाव, वीर, सापे वामणे, करंजाडी, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, आणि सावंतवाडी रोड या स्थानकांवर थांबे देण्यात यावेत अशी मागणी या निवेदनात केली आहे.

याशिवाय ही गाडी पुणे-कर्जत-कल्याण- पनवेल या मार्गाने चालविण्यात यावी. जेणेकरून ‘लोको रिव्हर्सल’ साठी लागणार वेळही वाचेल आणि कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, टिटवाळा या परिसरात मोठ्या प्रमाणात राहणाऱ्या प्रवाशांचीही सोय होईल. त्याच प्रमाणे या गाडीला आधुनिक एलएचबी कोच जोडण्यात यावेत अशी मागणी करण्यात या निवेदनांत करण्यात आली आहे.

गाडी क्रमांक १७६१३/१४ नांदेड-पुणे-पनवेल ही नांदेड (NED) ते पनवेल (PNVL) दरम्यान चालणारी एक्सप्रेस गाडी आहे. गाडी क्रमांक १७६१४ नांदेड-पनवेल ही नांदेड येथून संध्याकाळी ६:२० वाजता सुटते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ८:३५ वाजता पनवेलला पोहोचते. परतीच्या प्रवासासाठी, गाडीक्रमांक १७६१३ पनवेल येथून दुपारी ४:०० वाजता सुटते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ८:४५ वाजता नांदेडला पोहोचते.

१५ जून पंचांग आणि दिनविशेष


आजचे पंचांग 

  • तिथि-चतुर्थी – 15:54:22 पर्यंत
  • नक्षत्र-श्रवण – 25:00:56 पर्यंत
  • करण-बालव – 15:54:22 पर्यंत, कौलव – 27:47:39 पर्यंत
  • पक्ष- कृष्ण
  • योग-इंद्रा – 12:18:48 पर्यंत
  • वार- रविवार
  • सूर्योदय- 06:03
  • सूर्यास्त- 19:15
  • चन्द्र-राशि-मकर
  • चंद्रोदय- 22:47:00
  • चंद्रास्त- 09:20:59
  • ऋतु- ग्रीष्म
जागतिक दिन :
  • जागतिक वृद्ध अत्याचार जागरूकता दिवस
  • जागतिक पवन दिवस
महत्त्वाच्या घटना :
  • 1667 : वैद्यकीय इतिहासात प्रथमच, जॉन बॅप्टिस्ट डेनिस या डॉक्टरने 15 वर्षांच्या फ्रेंच मुलाच्या शरीरात कोकरूचे रक्त टोचले.
  • 1762 : ऑस्ट्रिया देशांत कागदी नोटाचे चलन सुरु करण्यात आले.
  • 1844 : चार्ल्स गुडइयरने रबरच्या व्हल्कनीकरणाचे पेटंट घेतले.
  • 1869 : महाराष्ट्रातील पहिला विधवा विवाह साजरा झाला.
  • 1908 : कलकत्ता स्टॉक एक्सचेंज सुरू झाले.
  • 1919 : कॅप्टन जॉन अल्कॉक, लेफ्टनंट आर्थर ब्राउन यांनी अटलांटिक महासागर ओलांडून पहिले उड्डाण केले.
  • 1970 : बा. पां. आपटे पुणे विद्यापीठाचे आठवे कुलगुरू झाले.
  • 1977 : स्पेनमध्ये 40 वर्षांनी मुक्त निवडणुका झाल्या.
  • 1993 : संपूर्ण देशी बनावटीच्या सहा ‘अर्जुन’ रणगाड्यांची पहिली तुकडी लष्कराकडे सुपूर्द करण्यात आली.
  • 1994 : इस्रायल आणि व्हॅटिकन सिटी यांच्यात पूर्ण राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले.
  • 1997 : सर्वोच्च न्यायालयाने अजामीनपात्र गुन्ह्यातील आरोपी फरार असल्यास, त्याच्याविरुद्ध आरोपपत्र नसतानाही न्यायाधीश अटक वॉरंट जारी करू शकतात, असा ऐतिहासिक निर्णय दिला.
  • 2001 : ग्रँडमास्टर विजयालक्ष्मी सुब्रह्मण्यम यांनी राष्ट्रीय ‘अ’ बुद्धिबळ स्पर्धा विक्रमी पाचव्यांदा जिंकली.
  • 2007 : जागतिक पवन दिवस वार्षिक कार्यक्रमाची सुरुवात, युरोपियन विंड एनर्जी असोसिएशन द्वारे पवन ऊर्जेच्या स्वच्छ, नूतनीकरणीय स्त्रोताला प्रोत्साहन देण्यासाठी केली गेली.
  • 2008 : लेहमन ब्रदर्स या वित्तसंस्थेने दिवाळखोरी जाहीर केली.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 1878 : ‘गोल्फर मार्गारेट अॅबॉट’ – भारतीय-अमेरिकन यांचा जन्म. (मृत्यू: 10 जून 1955)
  • 1898 : ‘गजानन श्रीपत’ तथा ‘अण्णासाहेब खेर’ – पुणे विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू: 29 ऑगस्ट 1986)
  • 1907 : ‘ना. ग. गोरे’ – स्वातंत्र्यसैनिक, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील नेते आणि समाजवादी विचारवंत यांचा जन्म.
  • 1917 : ‘सज्जाद हुसेन’ – संगीतकार मेंडोलीनवादक यांचा जन्म.
  • 1923 : ‘केशवजगन्नाथ पुरोहित’ ऊर्फ ‘शांताराम’ – साहित्यिक यांचा जन्म.
  • 1927 : ‘इब्न-ए-इनशा’ – भारतीय-पाकिस्तानी कवी आणि लेखक यांचा जन्म.
  • 1928 : ‘शंकर वैद्य’ – साहित्यिक यांचा जन्म.
  • 1929 : ‘सुरैय्या जमाल शेख’ – गायिका व अभिनेत्री यांचा जन्म. (मृत्यू: 31 जानेवारी 2004)
  • 1932 : ‘झिया फरिदुद्दीन डागर’ – धृपद गायक यांचा जन्म. (मृत्यू: 8 मे 2013)
  • 1933 : ‘सरोजिनी वैद्य’ – लेखिका यांचा जन्म. (मृत्यू: 3 ऑगस्ट 2007)
  • 1937 : ‘अण्णा हजारे’ – समाजसेवक यांचा जन्म.
  • 1947 : ‘प्रेमानंद गज्वी’ – साहित्यिक आणि नाटककार यांचा जन्म.
  • 1950 : ‘लक्ष्मी मित्तल’ – भारतीय-इंग्रजी व्यापारी यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 1534 : योगी चैतन्य महाप्रभू यांचे निधन. (जन्म: 18 फेब्रुवारी 1486)
  • 1931 : ‘अच्युत बळवंत कोल्हटकर’ – अर्वाचीन मराठीतील सुलभ लेखन शैलीचे प्रवर्तक, संदेशकार यांचे निधन.
  • 1979 : ‘सूर्यकांत रामचंद्र खांडेकर’ – कवी गीतकार यांचे निधन. (जन्म: 2 एप्रिल 1926)
  • 1983 : ‘श्रीरंगम श्रीनिवास’ – साहित्य अकादमी पुरस्कार विजेते तेलुगू कवी गीतकार यांचे निधन. (जन्म: 30 एप्रिल 1910)


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

 

Samruddi Expressway: आता बोगद्यांमध्ये सुद्धा फुल्ल मोबाईल नेटवर्क मिळणार

   Follow us on        
कल्याण : महामार्गावरील बोगद्यांमधून प्रवास करत असताना मोबाईलवरून बोलत असताना प्रवाशांचे संभाषण मोबाईल नेटवर्क अभावी अचानक खंडित होते. प्रवाशांची ही अडचण विचारात घेऊन बोगद्यांमध्ये आणि महामार्गावर कोणत्याही भागात मोबाईल सुरू राहावेत यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने मुंबई – नागपूर समृध्दी महामार्गावरील ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात प
बोगद्यांच्या बाहेर आणि महामार्गाच्या अन्य भागात मोबाईल मनोरे आणि बोगद्यांमध्ये आवश्यक मोबाईल जाळे उभारणीचा निर्णय घेतला आहे.
शहापूर तालुक्यातील समृध्दी महामार्गाचा भाग हा १२ किलोमीटर लांबीच्या कसारा घाट डोंगर रांगांमधून गेला आहे. या घाट मार्गावरील शहापूर ते इगतपुरी डोंगर रांगांमध्ये सर्वाधिक बोगदे आहेत. खर्डी गाव परिसरातील फुगाळे ते वाशाळा गाव हद्दीतील डोंगर रांगांमधील आठ किलोमीटरचा बोगदा हा या महामार्गावरील सर्वाधिक लांबीचा बोगदा आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून या बोगद्याची उभारणी करण्यात आली आहे. गेल्या पंधरा दिवसापूर्वी समृध्दी महामार्गाच्या इगतपुरी ते आमणे (भिवंडी) या ७६ किलोमीटर लांबीच्या बोगद्याचे लोकार्पण करण्यात आले.
मुंबई ते नागपूर राज्याच्या नऊ जिल्ह्यांमधून गेलेल्या समृध्दी महामार्गाला तालुका, जिल्ह्याप्रमाणे महामार्गावरून बाहेर पडण्यासाठी बाह्यवळणे आहेत. कमी वेळात सुसाट वेगाने प्रवास करण्यासाठी नागरिक या महामार्गाला पसंती देत आहेत.प्रवासात बहुतांशी प्रवासी मोबाईलवर संभाषण सुरू करतात. हे प्रवासी ठाणे जिल्ह्यातील शहापूर परिसरातील डोंगर रांगांमध्ये, कसारा, इगतपुरी घाट मार्गावरील बोगद्यांमधून जात असताना काही ठिकाणी, बोगद्यांमध्ये मोबाईलवरील मोबाईल जाळ्यांअभावी खंडित (डिसकनेक्ट) होत होते. समृध्दीवरील बोगद्यांमध्ये वाहन गेल्यावर मोबाईलचे जाळे (नेटवर्क) गायब होत होते. याविषयी अनेक जागरूक प्रवाशांनी शासनाकडे तक्रारी केल्या होत्या.
प्रवाशांच्या सूचनांची दखल घेऊन राज्य रस्ते विकास महामंडळाने शहापूर तालुक्यातील समृध्दीच्या बोगदे असलेल्या भागात, महामार्गावर ज्याठिकाणी मोबाईल जाळ्याच्या अडचणी आहेत तेथे मोबाईल मनोरे उभारणीची कामे हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. शहापूर, कसारा, इगतपुरी परिसरातील पाचही बोगद्यांमधून जात असताना प्रवाशांना मोबाईल खंडित होण्याचा अनुभव येऊ नये यासाठी बोगद्यांमध्ये ठराविक अंतराने राऊटर, कनेक्टर बसविण्यात येणार आहेत. लिकी केबल्सच्या माध्यमातून बिनतारी संदेशवहन यंत्रणा बोगद्यात कार्यान्वित करण्यात येणार आहे. राऊटरला रेंज येण्यासाठी एक्सटेंडर, बुस्टर सुविधा बसविण्यात येणार आहे, असे एमएमआरडीसीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

Vande Bharat Express: महाराष्ट्रातील अजून दोन जिल्ह्य़ांना मिळणार वंदे भारत एक्सप्रेसची सेवा

   Follow us on        
मुंबई : राज्यभरात वंदे भारत एक्स्प्रेसचे जाळे विणले जात असून प्रत्येक जिल्ह्यात वंदे भारत धावण्यासाठी तिचे विस्तारीकरण केले जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते जालना या मार्गावर धावणारी वंदे भारत एक्स्प्रेस आता नांदेडपर्यंत धावणार आहे. तसेच या गाडीला परभणी रेल्वे स्थानकात थांबा दिला आहे. त्यामुळे ही वंदे भारत आणखीन दोन जिल्ह्यांना जोडली जाणार आहे.
मुंबईत ये-जा करण्यासाठी, प्रवासाचा कालावधी कमी करण्यासाठी, प्रवाशांना आरामदायी सेवा पुरविण्यासाठी राज्यासह देशभरातील महत्त्वाची ठिकाणे वंदे भारतने जोडली जात आहेत. गांधीनगर, शिर्डी, सोलापूर, मडगाव या धार्मिक, व्यावसायिक, शैक्षणिक स्थळांना वंदे भारत जोडली आहे. तसेच मुंबई ते जालना या वंदे भारतमुळे नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना या जिल्ह्यांना जोडली आहे.
आता या मार्गाचा विस्तार झाल्याने परभणी आणि नांदेड या जिल्ह्यातील प्रवाशांना मुंबईत येण्यासाठी पर्यायी सोय उपलब्ध झाली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून मुंबई-जालना वंदे भारत एक्स्प्रेस हुजूर साहिब नांदेड या रेल्वे स्थानकापर्यंत चालवण्याची मागणी होती. प्रवाशांच्या मागणीवर विचार करून रेल्वे मंडळाने १२ जून रोजी विस्तारीकरणाला मंजुरी दिली आहे.
स्थानक – स्थानकात येण्याची वेळ/ स्थानकातून सुटण्याची वेळ
  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – दुपारी १.१० वाजता
  • दादर – दुपारी १.१७ वाजता / दुपारी १.१९ वाजता
  • ठाणे – दुपारी १.४० वाजता / दुपारी १.४२ वाजता
  • कल्याण – दुपारी २.०४ वाजता / २.०६ वाजता –
  • नाशिक रोड – दुपारी ४.१८ वाजता / दुपारी ४.२० वाजता
  • मनमाड जंक्शन – सायंकाळी ५.१८ वाजता / सायंकाळी ५.२० वाजता –
  • अंकाई – सायंकाळी ५.५० वाजता –
  • छत्रपती संभाजीनगर – सायंकाळी ७.०५ वाजता / सायंकाळी ७.१० वाजता –
  • जालना – रात्री ८.५० वाजता / रात्री ८.०७ वाजता
  • परभणी – रात्री ९.४३ वाजता / रात्री ९.४५ वाजता
  • हुजूर साहिब नांदेड – रात्री ११.५० वाजता
स्थानक – स्थानकात येण्याची वेळ/ स्थानकातून सुटण्याची वेळ
  • हुजुर साहिब नांदेड – पहाटे ५.०० वाजता
  • परभणी – पहाटे ५.४० वाजता / पहाटे ५.४२ वाजता –
  • जालना – सकाळी ७.२० वाजता / सकाळी ७.२२ वाजता –
  • छत्रपती संभाजीनगर – सकाळी ८.१३ वाजता / पहाटे ८.१५ वाजता
  • अंकाई – सकाळी ९.४० वाजता
  • मनमाड जंक्शन – सकाळी ९.५८ वाजता / सकाळी १०.०३ वाजता –
  • नाशिक रोड – सकाळी ११ वाजता / सकाळी ११.०२ वाजता
  • कल्याण जंक्शन – दुपारी १.२० वाजता / दुपारी १.२२ वाजता
  • ठाणे – दुपारी १.४० वाजता / दुपारी १.४२ वाजता
  • दादर – दुपारी २.०८ वाजता / दुपारी २.१० वाजता –
  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – दुपारी २.२५ वाजता
दोन्ही दिशेकडून येणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसला दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड अंकाई, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी येथे थांबे देण्यात आले आहेत.

१४ जून पंचांग आणि दिनविशेष


आजचे पंचांग 

  • तिथि-तृतीया – 15:49:44 पर्यंत
  • नक्षत्र-उत्तराषाढ़ा – 24:22:52 पर्यंत
  • करण-विष्टि – 15:49:44 पर्यंत, भाव – 27:55:01 पर्यंत
  • पक्ष- कृष्ण
  • योग-ब्रह्म – 13:12:11 पर्यंत
  • वार- शनिवार
  • सूर्योदय- 06:03
  • सूर्यास्त- 19:15
  • चन्द्र-राशि-मकर
  • चंद्रोदय- 22:04:59
  • चंद्रास्त- 08:22:59
  • ऋतु- ग्रीष्म
जागतिक दिन :
  • जागतिक रक्तदाता दिन
महत्त्वाच्या घटना :
  • 1158 : म्युनिक शहराची स्थापना इसार नदीच्या काठावर झाली.
  • 1704 : मुघलांच्या कैदेत असलेल्या संभाजीराजे यांच्या मुलाचे औरंगजेबाने लग्न लावून दिले.
  • 1777 : अमेरिकेने तारे आणि पट्टे असलेला ध्वज स्वीकारला.
  • 1789 : कॉर्नपासून बनवलेली पहिली व्हिस्की. तिचे नाव बोर्बन असे होते.
  • 1896 : महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी अनाथ बालिकाश्रम ही संस्था स्थापन केली.
  • 1907 : नॉर्वेमध्ये महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला.
  • 1926 : ब्राझील लीग ऑफ नेशन्समधून बाहेर पडले.
  • 1938 : सुपरमॅन चित्रपटाची कथा प्रथम प्रकाशित.
  • 1940 : दुसरे महायुद्ध – मित्र राष्ट्रांनी पॅरिस जर्मनीच्या स्वाधीन केले.
  • 1945 : भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी वेव्हेल योजना जाहीर करण्यात आली.
  • 1952 : अमेरिकेची पहिली अणुशक्तीवर चालणारी पाणबुडी, यू.एस. ने नॉटिलस बांधण्यास सुरुवात केली.
  • 1962 : पॅरिसमध्ये युरोपियन स्पेस एजन्सीची स्थापना झाली.
  • 1967 : मरीनर स्पेसक्राफ्ट व्हीनसवर प्रक्षेपित.
  • 1967 : चीनने पहिल्या हायड्रोजन बॉम्बची चाचणी केली.
  • 1972 : डी.डी.टी. या कीटकनाशकाच्या वापरावर अमेरिकेत बंदी घालण्यात आली.
  • 1972 : जपान एअरलाइन्सचे फ्लाइट 471 नवी दिल्ली, भारतातील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ जवळ येताना क्रॅश झाले, त्यात विमानातील 87 पैकी 82 लोक आणि जमिनीवर आणखी चार लोक ठार झाले.
  • 1999 : दक्षिण आफ्रिकेचे पहिले श्वेतवर्णीय राष्ट्राध्यक्ष नोबेल पारितोषिक विजेते नेल्सन मंडेला यांचा कायर्काळ संपला.
  • 2001 : ए.सी. किंवा डी.सी. यापैकी कोणत्याही विद्युतप्रवाहावर चालणार्‍या उपनगरी गाडीचा शुभारंभ पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक वासुदेव गुप्ता यांच्या हस्ते झाले.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 1444 : ‘निळकंथा सोमायाजी’ – भारतीय खगोलशास्त्रज्ञ आणि गणितज्ञ यांचा जन्म.
  • 1736 : ‘चार्ल्स कुलोम’ – फ्रेन्च भौतिकशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 23 ऑगस्ट 1806)
  • 1864 : ‘अलॉइस अल्झायमर’ – जर्मन मेंदुविकारतज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 19 डिसेंबर 1915)
  • 1868 : ‘कार्ल लॅन्ड्स्टायनर’ – नोबेल पारितोषिक विजेते ऑस्ट्रियन जीवशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 26 जून 1943)
  • 1899 : ‘ब्रिगेडियर राजिंदर सिंह’ – महावीर चक्र सन्मानित माजी भारतीय सैन्य अधिकारी यांचा जन्म.
  • 1969 : ‘स्टेफी ग्राफ’ – प्रसिद्ध जर्मन टेनिस खेळाडू यांचा जन्म.
  • 1916 : ‘दिवान प्रेम चंद’ – माजी भारतीय लष्कर प्रमुख अधिकारी यांचा जन्म.
  • 1922 : ‘के. आसिफ’ – हिंदी चित्रपट दिग्दर्शक, निर्माता आणि पटकथा लेखक यांचा जन्म.
  • 1946 : ‘डॉनल्ड ट्रम्प’ – अमेरिकेचे 45वे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म.
  • 1955 : ‘किरण अनुपम खेर’ – सुप्रसिद्ध भारतीय हिंदी चित्रपट अभिनेत्री यांचा जन्म.
  • 1967 : ‘कुमार मंगलम बिर्ला’ – प्रसिद्ध भारतीय उद्योगपती आणि आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष यांचा जन्म.
  • 1968 : ‘राज ठाकरे’ – प्रसिद्ध भारतीय महाराष्ट्रीयन राजकारणी तसचं, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक, अध्यक्ष यांचा जन्म.
  • 1969 : ‘स्टेफनी मारिया’ – प्रसिद्ध जर्मन माजी टेनिसपटू यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 1825 : ‘पिअर चार्ल्स एल्फांट’ – वॉशिंग्टन शहराचे रचनाकार फ्रेन्च अमेरिकन वास्तुविशारद आणि स्थापत्य अभियंता यांचे निधन. (जन्म: 9 ऑगस्ट 1754)
  • 1916 : ‘गोविंद बल्लाळ देवल’ – मराठी नाटककार नाट्यदिग्दर्शक यांचे निधन. (जन्म: 13 नोव्हेंबर 1855)
  • 1920 : ‘मॅक्स वेबर’ जर्मन अर्थशास्त्रज्ञ आणि समाजशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म: 21 एप्रिल 1864)
  • 1946 : ‘जॉन लोगी बेअर्ड’ – ब्रिटिश शास्त्रज्ञ, आद्य दूरचित्रवाणी संशोधक यांचे निधन. (जन्म: 13 ऑगस्ट 1888)
  • 1989 : ‘सुहासिनी मुळगावकर’ – मराठी अभिनेत्री संस्कृत पंडित यांचे निधन.
  • 2007 : ‘कुर्त वाल्ढहाईम’ – संयुक्त राष्ट्रांचे चौथे सरचिटणीस यांचे निधन. (जन्म: 21 डिसेंबर 1918)
  • 2010 : ‘मनोहर माळगावकर’ – इंग्रजी लेखक यांचे निधन. (जन्म: 12 जुलै 1913)
  • 2020 : ‘सुशांत सिंग राजपुत’ – बॉलीवूड अभिनेता यांच निधन.


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

 

Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या एक्सप्रेसचे डबे वाढले

   Follow us on        

Konkan Raiwlay:कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या एका लांब पल्ल्याच्या गाडीच्या डब्यांच्या संरचनेत बदल करण्यात आला आहे. गाडी क्रमांक १२२२३ /१२२२४ लोकमान्य टिळक (टी) – एर्नाकुलम जं. – लोकमान्य टिळक (टी) दुरांतो” एक्सप्रेस (द्वि-साप्ताहिक) या गाडीच्या डब्यांत वाढ करण्यात येणार आहे.

या गाडीच्या डब्यांची सध्याची संरचना अशी आहे: फर्स्ट एसी – ०१, टू टायर एसी – ०२, थ्री टायर एसी – ०६, स्लीपर – ०८,पॅन्ट्री कार – ०१, जनरेटर कार – ०२ असे मिळून एकूण २० एलएचबी डबे

सुधारित संरचना: फर्स्ट एसी – ०१, टू टायर एसी – ०३, थ्री टायर एसी – ०७, स्लीपर – ०८,पॅन्ट्री कार – ०१, जनरेटर कार – ०२ असे मिळून एकूण २२ एलएचबी डबे

थ्री टायर एसी आणि स्लीपर स्लीपर श्रेणीचा प्रत्येकी एक डबा वाढवून या गाडीच्या डब्यांची संख्या २० वरून २२ करण्यात आली आहे. मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस येथून प्रवास चालू करताना गाडी क्रमांक १२२२३ तर एर्नाकुलम येथून प्रवास सुरु करताना गाडी क्रमांक १२२२४ या सुधारित संरचनेनुसार चालविण्यात येणार आहे.

 

Konkan Railway: आषाढी वारीसाठी सावंतवाडी-पंढरपुर विशेष गाडी चालविण्यात यावी

   Follow us on        

Konkan Railway: अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरीच्या विठूरायाची भेट घेण्यासाठी वारकरी आषाढी एकादशीला पंढरपूरला जातात. मध्य रेल्वेने नागपूर, अमरावती, कोल्हापूर, भुसावळ, लातूर, मिरज अशा महाराष्ट्रातील सर्वच विभागांतून पंढपूरला जाण्यासाठी विशेष गाड्यांची घोषणा केली आहे.

रेल्वेने आजपर्यंत एकदाही सावंतवाडीतून पंढरपूरला जाणारी गाडी सोडलेली नाही.

कोकणातूनही बरेच भाविक आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरीला जातात. या भाविकांमध्ये वयस्कर नागरिक मोठ्या प्रमाणात असतात. कोकणातून पंढरपूर रस्तेमार्गे जवळ असले तरी घाटमार्गावरील प्रवासामुळे वेळ अधिक लागतो त्यांचा प्रवास त्रासदायक होतो. रेल्वेने गेल्यास आरामदायक प्रवास होऊ शकतो.

रेल्वे प्रशासनाने याकडे लक्ष देवून दिनांक १ जुलै, २०२५ ते १० जुलै, २०२५ पर्यंत सावंतवाडी – पंढरपूर मार्गावर विशेष गाड्या सोडाव्यात अशी मागणी अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती, महाराष्ट्र च्या वतीने समितीचे सचिव अक्षय महापदी यांनी केली आहे. ही मागणी करणारे निवेदन ईमेल द्वारे संबधित अधिकारी आणि प्रशासकीय कार्यालयांना पाठविण्यात आले आहे.

१३ जून पंचांग आणि दिनविशेष


आजचे पंचांग 

  • तिथि-द्वितीया – 15:21:37 पर्यंत
  • नक्षत्र-पूर्वाषाढ़ा – 23:21:37 पर्यंत
  • करण-गर – 15:21:37 पर्यंत, वणिज – 27:38:35 पर्यंत
  • पक्ष- कृष्ण
  • योग-शुक्ल – 13:47:08 पर्यंत
  • वार- शुक्रवार
  • सूर्योदय- 06:03
  • सूर्यास्त- 19:15
  • चन्द्र-राशि-धनु – 29:39:04 पर्यंत
  • चंद्रोदय- 21:18:00
  • चंद्रास्त- 07:25:00
  • ऋतु- ग्रीष्म
जागतिक दिन :
  • आंतरराष्ट्रीय अल्बिनिझम जागरूकता दिवस
  • जागतिक सॉफ्टबॉल दिवस
महत्त्वाच्या घटना :
1881 : यू. एस. एस. जीनेट आर्क्टिक समुद्रात नष्ट.
1886 : कॅनडातील व्हँकुव्हर शहर आगीत नष्ट झाले.
1934 : ॲडॉल्फ हिटलर आणि बेनिटो मुसोलिनी व्हेनिसमध्ये भेटले.
1956 : पहिली युरोपियन चॅम्पियन्स कप फुटबॉल स्पर्धा रिअल माद्रिदने जिंकली.
1978 : इस्रायली सैन्याने लेबनॉनमधून माघार घेतली.
1983 : पायोनियर 10 अंतराळयान हे सौर मंडळ बाहेर जाणारे पहिले मानवनिर्मित वस्तू बनले.
1997 : दक्षिण दिल्लीतील उपहार सिनेमाला लागलेल्या आगीत 59 लोकांचा मृत्यू झाला आणि 100 जण जखमी झाले.
2000 : ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंदने माद्रिद, स्पेन येथे एकाच वेळी 15 स्पर्धकांविरुद्ध बारा सामने जिंकले.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 1822 : ‘कार्ल श्मिट’ – जर्मन रसायनशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 27 फेब्रुवारी 1894)
  • 1831 : ‘जेम्सक्लार्क मॅक्सवेल’ – प्रकाश हा विद्युत चुंबकीय तरंगांनी बनतो, असा सिद्धांत मांडणारे ब्रिटिश पदार्थ वैज्ञानिक गणितज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 5 नोव्हेंबर 1879)
  • 1879 : ‘गणेश दामोदर सावरकर’ – अभिनव भारत संघटनेचे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू: 16 मार्च 1945)
  • 1905 : ‘कुमार श्री दुलीपसिंहजी’ – इंग्लंडचे क्रिकेटपटू यांचा जन्म, कुमार श्री दुलीपसिंहजी’ यांच्या स्मरणार्थ भारतात दुलीप ट्रॉफी खेळली जाते. (मृत्यू: 5 डिसेंबर 1959 )
  • 1909 :  ‘इ. एम. एस. नंबूद्रीपाद’ – केरळचे पहिले मुख्यमंत्री व भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते यांचा जन्म. (मृत्यू: 19 मार्च 1998)
  • 1923 : ‘प्रेम धवन’ – गीतकार, पद्मश्री पुरस्काराने सन्मानित यांचा जन्म. (मृत्यू: 7 मे 2001 )
  • 1937 : ‘आंद्रेस व्हिटॅम स्मिथ’ – द इंडिपेंडंट चे सहसंस्थापक यांचा जन्म.
  • 1964 : ‘पीयूष गोयल’ – भारतीय राजकारणी, (2017 रेल्वे मंत्री)  यांचा जन्म.
  • 1965 : ‘मनिंदर सिंग’ – भारतीय क्रिकेटपटू यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 1950 : ‘दिवाण बहादूर सर गोपाठी’ – भारतीय राजकारणी व अर्थशास्त्रज्ञ यांचे निधन.
  • 1967 : ‘विनायक पांडुरंग करमरकर’ – भारतीय शिल्पकार यांचे निधन. (जन्म: 2 ऑक्टोबर 1891)
  • 1969 : ‘प्रल्हाद केशव अत्रे’ – विनोदी लेखक, नाटकाकर, कवी, पत्रकार, शिक्षणशास्त्रज्ञ, टीकाकार, प्रभावी वक्ता, राजकारणी केशवकुमार उर्फ यांचे निधन. (जन्म: 13 ऑगस्ट 1898)
  • 1996 : ‘पंडित प्राण नाथ’ – प्रसिद्ध भारतीय शास्त्रीय गायक व शास्त्रीय संगीताच्या किराणा घराण्याचे प्रशिक्षक यांचे निधन
  • 2008 : ‘जे. चितरंजन’ – भारतीय कामगार नेते, राजकारणी तसचं भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेता यांचे निधन
  • 2012 : ‘मेहंदी हसन’ – पाकिस्तानी गझल गायक यांचे निधन. (जन्म: 18 जुलै 1927)
  • 2013 : ‘डेव्हिड ड्यूईश’ – ड्यूईश इंक. कंपनी चे संस्थापक यांचे निधन.


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

 

AI ST Buses: चालकाला डुलकी लागली की अलार्म वाजणार! एसटीच्या ताफ्यात दाखल होणार अत्याधुनिक Ai बसेस

   Follow us on        

मुंबई: एसटी महामंडळाने अत्याधुनिक ‘एआय’ तंत्रज्ञानाच्या बसेस विकत घेण्याचा निर्णय घेतला आहे. यात चालकांवर नजर ठेवणारे कॅमेरे असतील. हे कॅमेरे चालकांच्या प्रत्येक कृतीवर नजर ठेवणार आहेत. गाडी चालवत असताना चालक जर अपघात होण्यास कारणीभूत होईल अशी कृती करत असेल तर  (उदा. झोप लागणे, डुलकी घेणे, जांभई देणे) मोबाईल वापरणे असली तरी हे कॅमेरे अलार्म वाजवतील असे म्हटले जात आहे.

एसटी महामंडळ एकूण पाच हजार बसेस विकत घेणार आहे. त्यातील किमान एक हजार बसेस या ई-बसेस असणार आहेत. या बसेस टप्प्या टप्प्याने एसटी महामंडळाच्या ताफ्यात येणार आहेत.
पुण्यामध्ये आज स्मार्ट ई-बसेसच सादरीकरण झाले. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना मंत्री सरनाईक म्हणाले की, राज्य शासनाचे ई- वाहनांना प्रोत्साहन देण्याचे धोरण एसटी महामंडळाने देखील अंगीकारले असून भविष्यात घेण्यात येणाऱ्या स्वमालकीच्या ५ हजार बसेस पैकी दरवर्षी किमान १ हजार बसेस या ई-बसेस घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अर्थात,एसटी महामंडळात दाखल होणाऱ्या ई-बसेस एआय तंत्रज्ञानावर आधारित आणि एकात्मिक सुरक्षा प्रणाली असलेल्या असाव्यात अशा सूचना संबंधित बस तयार करणाऱ्या कंपनीला आम्ही दिल्या होत्या असे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.त्यानुसार आज उत्तर प्रदेश परिवहन महामंडळासाठी तयार केलेल्या स्मार्ट ई-बसचे आज  सादरीकरण करण्यात आले.

नव्या ई-बसमध्ये चालकांच्या हालचालींवर लक्ष ठेवणारे एआय तंत्रज्ञानावर आधारित CCTV कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. गाडी चालवताना जर चालक जांभई देत असेल किंवा मोबाईल वापरत असेल तर सदर कॅमेरे मागील प्रवाशांना याबाबत अलर्ट करतील तशा प्रकारचा धोक्याचा अलार्म देखील वाजवला जाईल, अशी यंत्रणा नव्या स्मार्ट ई-बसेस मध्ये असणार आहे. तसेच महिलांची सुरक्षितता लक्षात घेता प्रवाशांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी देखील बसमध्ये दोन सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत.

आणखी काय उपाययोजना ?
बसला अचानक आग लागल्यास ती आग अल्पावधीत विझवण्यासाठी फोम बेस अग्नीशामक यंत्रणा बसमध्ये असावी असे मत यावेळी मंत्री सरनाईक यांनी व्यक्त केले. याबरोबरच स्वारगेटच्या घटनेनंतर बंद बस ही कोणत्याही बाह्य हस्तक्षेपामुळे उघडली जाणार नाही. तसा प्रयत्न केल्यास धोक्याचा अलार्म वाजेल अशी यंत्रणा देखील नव्या स्मार्ट ई-बसमध्ये बसविण्यात येणार असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यावेळी सांगितले.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search