Author Archives: Kokanai Digital

Amrit Bharat Express: मुंबईला मिळणार पहिली अमृत भारत एक्सप्रेस

   Follow us on        

Mumbai Amrit Bharat Express : मुंबईमधील रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे, देशाच्या आर्थिक राजधानीला अमृत भारत एक्सप्रेसची भेट मिळणार आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांचा प्रवास आणखी सुपरफास्ट होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार ही अमृत भारत एक्सप्रेस ट्रेन येत्या काही महिन्यांनी मुंबईवरून सुरू होणार आहे. मुंबई ते बिहार दरम्यान ही गाडी चालवली जाणार असून यामुळे बिहार मधून मुंबईला आणि मुंबईमधून बिहारला जाणाऱ्या प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, पुढील आठवड्यापासून बिहार ते मुंबई दरम्यान अमृत भारत एक्सप्रेस ट्रेन चालवली जाईल अशी शक्यता आहे. पंतप्रधान मोदी जेव्हा बिहारला भेट देतील तेव्हा ते या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्याची शक्यता आहे.

दरम्यान ही नवीन अमृत भारत ट्रेन सहरसा आणि मुंबई दरम्यान धावणार आहे. यामुळे मुंबई ते सहरसा हा प्रवास वेगवान होणार आहे. खरे तर बिहारला या आधी सुद्धा अमृतभारत एक्सप्रेस ची भेट मिळालेली आहे.

बिहार मधील पहिली अमृत भारत एक्सप्रेस ट्रेन दरभंगा ते आनंद विहार टर्मिनल (ANVT) या मार्गावर धावत आहे. आता या मार्गानंतर, मुंबई ते सहरसा या मार्गावर अमृत भारत ट्रेन सुरू होण्याची शक्यता असून ही बिहारची दुसरी अमृत भारत एक्सप्रेस ट्रेन असेल.

 

२२ एप्रिल पंचांग आणि दिनविशेष


आजचे पंचांग

  • तिथि-नवमी – 18:16:32 पर्यंत
  • नक्षत्र-श्रवण – 12:45:22 पर्यंत
  • करण-तैतुल – 06:44:50 पर्यंत, गर – 18:16:32 पर्यंत
  • पक्ष- कृष्ण
  • योग-शुभ – 21:12:40 पर्यंत
  • वार- मंगळवार
  • सूर्योदय- 06:19
  • सूर्यास्त- 18:56
  • चन्द्र-राशि-मकर – 24:32:34 पर्यंत
  • चंद्रोदय- 26:49:59
  • चंद्रास्त- 13:33:00
  • ऋतु- ग्रीष्म

जागतिक दिवस :
  • आंतरराष्ट्रीय पृथ्वी दिन
  • राष्ट्रीय आयटी सेवा प्रदाता दिन National IT Service Provider Day
महत्त्वाच्या घटना :
  • 1056 : क्रॅब नेब्युलामध्ये सुपरनोव्हा स्फोट.
  • 1948 : अरब-इस्त्रायली युद्ध – अरबांनी हैफा हे प्रमुख इस्रायली बंदर काबीज केले.
  • 1970 : पृथ्वी दिन प्रथमच साजरा करण्यात आला.
  • 1977 : टेलिफोन वाहतूक सुरू करण्यासाठी ऑप्टिकल फायबरचा प्रथम वापर.
  • 1997 : नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (NIV) संचालक डॉ. कल्याण बॅनर्जी यांना विज्ञान आणि तंत्रज्ञानातील ओमप्रकाश भसीन पुरस्काराने घोषित करण्यात आले.
  • 2006 : कौटुंबिक वादातून प्रवीण महाजन यांनी भाजप नेते प्रमोद महाजन यांच्यावर गोळी झाडली.
  • 2016 : पॅरिस करारावर स्वाक्षरी झाली, ग्लोबल वार्मिंगशी लढा देण्यासाठी एक करार.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 1698 : ‘शिवदिननाथ’ – नाथपरंपरेतील एका शाखेचे प्रमुख सत्पुरुष यांचा जन्म.
  • 1724 : ‘एमॅन्युएल कांट’ – जर्मन तत्त्ववेत्ता यांचा जन्म. (मृत्यू: 12 फेब्रुवारी 1804)
  • 1812 : भारताचा गव्हर्नर जनरल लॉर्ड जेम्स अ‍ॅन्ड्र्यू ब्राउन रॅमसे डलहौसी यांचा जन्म. (मृत्यू: 19 डिसेंबर 1860)
  • 1870 : ‘व्लादिमीर लेनिन’ – रशियन क्रांतिकारक यांचा जन्म. (मृत्यू: 21 जानेवारी 1924)
  • 1904 : ‘जे. रॉबर्ट ओपेनहायमर’ – अणुबॉम्बचे जनक यांचा जन्म. (मृत्यू: 18 फेब्रुवारी 1967)
  • 1914 : ‘बलदेव राज चोपडा’ – भारतीय दिग्दर्शक आणि निर्माता यांचा जन्म. (मृत्यू: 5 नोव्हेंबर 2008)
  • 1916 : ‘काननदेवी’ – अभिनेत्री आणि गायिका यांचा जन्म. (मृत्यू: 17 जुलै 1992)
  • 1916 : व्हायोलिनवादक व वाद्यवृंदसंचालक यहुदी मेन्युहीन यांचा जन्म. (मृत्यू: 12 मार्च 1999)
  • 1929 : चित्रपट रंगभूमी आणि अभिनेत्री उषा मराठे – खेर ऊर्फ ‘उषा किरण’ यांचा जन्म. (मृत्यू: 9 मार्च 2000)
  • 1929 : ‘प्रा. अशोक केळकर’ – भाषाशास्त्रज्ञ तसेच साहित्य समीक्षक यांचा जन्म.
  • 1935 : ‘भामा श्रीनिवासन’ – भारतीय-अमेरिकन गणितज्ञ यांचा जन्म.
  • 1945 : ‘गोपाळकृष्ण गांधी’ – भारतीय प्रशासकीय अधिकारी आणि राजकारणी यांचा जन्म.
  • 1971 : ‘सुमित राघवन’ – भारतीय अभिनेता यांचा जन्म
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 1933 : ‘हेन्री रॉयस’ – रोल्स-रॉयस लिमिटेड चे सहसंस्थापक यांचे निधन. (जन्म: 27 मार्च 1863)
  • 1980 : ‘फ्रिट्झ स्ट्रासमान’ – जर्मन भौतिकशात्रज्ञ यांचे निधन. (जन्म: 22 फेब्रुवारी 1902)
  • 1994 : ‘आचार्य सुशीलमुनी महाराज’ – विचारवंत, समाजसुधारक यांचे निधन.
  • 1994 : ‘रिचर्ड निक्सन’ – अमेरिकेचे 37 वे राष्ट्राध्यक्ष यांचे निधन. (जन्म: 9 जानेवारी 1913)
  • 2003 : ‘बळवंत गार्गी’ – पंजाबी नाटककार, दिग्दर्शक आणि कादंबरीकार यांचे निधन. (जन्म: 4 डिसेंबर 1916)
  • 2013 : ‘लालगुडी जयरामन’ – व्हायोलीन वादक, संगीतकार आणि गायक यांचे निधन. (जन्म: 17 सप्टेंबर 1930)
  • 2013 : ‘जगदीश शरण वर्मा’ – भारताचे 27 वे सरन्यायाधीश यांचे निधन. (जन्म: 18 जानेवारी 1933)


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

 

….तोपर्यंत आमचा शक्तीपीठ महामार्गाला विरोधच! आंबोली ग्रामस्थांचा निर्धार

   Follow us on        
आंबोली: आंबोली येथील कबुलायतदार प्रश्न सुटत नाही तोपर्यंत येथून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्याचा निर्धार येथील ग्रामस्थांनी केला आहे. शक्तीपीठ महामार्ग ला विरोध करण्यासंदर्भात बैठक आज असून जमिनींचा 7/12 तयार झाल्याशिवाय आणि  ग्रामस्थांना जमीन वाटप होईपर्यंत या महामार्गाला विरोध असल्याचे ग्रामस्थांचे एकमत आहे.
फणसवडे येथून घाटात बोगदा मारून पारपोली हद्दीतून आंबोली तांबुळगे खुळ्याची ढोल,मलई,नारायण गड,सतीची वाडी वरचा डोंगर,कावळेसाद तेथून कितवडे मार्गे कोल्हापूर असा रस्ता जात आहे.हा शक्तीपीठ महामार्ग नागपूर ते गोवा असा सहा पदरी रस्ता जात आहे. आंबोली गेळे येथील कबुलायतदार प्रश्न गेली २५ वर्षे महाराष्ट्र शासन भूमिपुत्रांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले आहे.इथे भूमिपुत्र उपरे ठरत असून अतिक्रमन शासनाच्या आशीर्वादानेच होत आहे.वन खात्याचा प्रश्न सांगून हिरण्यकेशी चा रस्ता देखील होत नाही.तर दुसरीकडे बिल्डर लॉबी ला सगळं रान मोकळ आहे. त्यामुळे इथले स्थानिक हे वर्षानुवर्षे भूमी पासून वंचित राहिले.त्यात एक पिढी जमिनीची प्रतीक्षा करता करता संपली.पुढे भविष्यात देखील कठीन परिस्थिती आहे.
वन  खात्याच्या जमिनी शक्तीपीठ हायवे साठी घेण्यात येतील मात्र आंबोलीतील वन खात्याच्या स्थानिकांच्या जमिनी बाबत निर्णय कधी? शासन आणि लोकप्रतिनिधी ग्रामस्थांना फक्त आश्वासनावर ठेवता २५ वर्षे संपली. त्यामुळे आता शासनाने आंबोली जमिनीबाबत निर्णय घ्यावा.अन्यथा शक्तीपीठ महामार्ग ला ग्रामस्थांचा विरोध करण्याचा एकमुखी ठराव आंबोली ग्रामस्थांनी केला आहे.शक्तीपीठ महामार्ग संघर्ष समितीने याची दखल घ्यावी आणि येथील प्रश्नाबाबत शासनाचे डोळे उघडावे असे आवाहन ही करण्यात आले आहे.२५ वर्षे इथला जमीन प्रश्न शासन सोडवत नसल्यामुळे भूमिपुत्र वंचित राहिले आहेत.त्या मुळे आता ठोस निर्णयाची आवश्यकता असल्याचे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

चिपळूण: अखेर प्रतीक्षा संपली! वाशिष्ठी दाभोळ खाडीत पहिली हाऊसबोट दाखल

   Follow us on        

चिपळूण : रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात आता पर्यटकांना निसर्गाच्या सान्निध्यात खाडी सफारीचा आनंद घेता येणार आहे. शासनाच्या पर्यटन प्रोत्साहन उपक्रमांतर्गत मालदोली येथील अग्निपंख महिला विभाग संघास देण्यात आलेली हाऊसबोट चिपळूणमध्ये दाखल झाली आहे. गोळकोट येथे तिचे आवश्यक जोडणीचे काम सुरू असून, लवकरच ती खाडीत सोडण्यात येणार आहे.या उपक्रमामागचा मुख्य उद्देश म्हणजे पर्यटन उद्योगातून महिला बचत गटांना आर्थिक स्थैर्य मिळवून देणे हे आहे.

पर्यटनाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र प्रथमच रत्नागिरी जिल्ह्यात पाच ठिकाणी हाउसबोट प्रकल्प सुरू होत आहे. त्यामध्ये चिपळूण येथील वाशिष्ठी दाभोळ खाडीचाही समावेश आहे. या खाडीतील जैवविविधता, मगर सफारी, पांडवकालीन लेणी, गरम पाण्याचे कुंड, कांदळवणाची बेटे, नारळी पोफळीच्या बागा या निसर्गरम्य परिसराचा अनुभव या हाउसबोटीतून घेता येईल. एक कोटी खर्चाच्या या हाउसबोटमध्ये दोन वातानुकूलित खोल्या असून, त्यात प्रशस्त बेड, सोफा, बाथरूमची व्यवस्था आहे. हा प्रकल्प सुरळीतपणे चालण्यासाठी सहभागी ३६ महिलांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.सर्वसाधारण हाउस बोटिंगमध्ये पर्यटकांसाठी खाद्यपदार्थांची रेलचेल असणार आहे. वर्षाकाठी एक ते दीड कोटींची उलाढाल या प्रकल्पातून अपेक्षित आहे. हा प्रकल्प सुरळीतपणे सुरू होण्यापूर्वी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, उमेदच्या अधिकाऱ्यांनी, तसेच सहभागी महिलांनी केरळमधील हाउस बोट प्रकल्पाची पाहणी केली आहे.

मालदोली येथील अग्निपंख महिला प्रभाग संघ हा प्रकल्प राबवणार आहे. या प्रभाग संघात ३५५ स्वयंसाहाय्यता समूह १८ ग्रामसंघ, तर ३,८४७ महिला सहभागी आहेत. सिंधुरत्न योजनेतून हा प्रकल्प लवकरच सुरू होत आहे. प्रकल्प सुरळीतपणे चालण्यासाठी या महिलांच्या व्यवस्थापन, देखरेख, विपणन, लेखा अशा चार समित्यांच्या स्थापना केल्या आहेत.

वाशिष्ठी दाभोळखाडीत नयनरम्य असा निसर्ग परिसर आहे. पर्यटकांनी हाउस बोटमधून निसर्गाची पाहणी केल्यास पुन्हा ते सातत्याने इकडे आकर्षित होतील, अशी निसर्गाची उधळण येथे पाहायला मिळते. हा प्रकल्प यशस्वीपणे आम्ही राबवू, असा आम्हाला विश्वास आहे. – दीपिका कुळे, अध्यक्ष, अग्निपंख महिला प्रभाग संघ, मालदोली

२१ एप्रिल पंचांग आणि दिनविशेष


आजचे पंचांग

  • तिथि-सप्तमी – 19:03:51 पर्यंत
  • नक्षत्र-पूर्वाषाढ़ा – 11:48:59 पर्यंत
  • करण-विष्टि – 06:49:12 पर्यंत, भाव – 19:03:51 पर्यंत
  • पक्ष- कृष्ण
  • योग-सिद्ध – 24:11:26 पर्यंत
  • वार- रविवार
  • सूर्योदय- 06:19
  • सूर्यास्त- 18:56
  • चन्द्र-राशि-धनु – 18:05:04 पर्यंत
  • चंद्रोदय- 25:22:59
  • चंद्रास्त- 11:35:59
  • ऋतु- ग्रीष्म

जागतिक दिन :
  • भारतीय नागरी सेवा दिन
  • जागतिक क्रिएटिव्हिटी आणि इनोव्हेशन दिन World Creativity And Innovation Day
महत्त्वाच्या घटना :
  • 753 : ईसा पूर्व: रोमची स्थापना रोम्युलसने केली.
  • 1944 : फ्रान्समध्ये स्त्रियांना मताधिकार मिळाला.
  • 1960: ब्राझीलची राजधानी रिओ दि जानेरोचे उद्घाटन झाले.
  • 1972: अपोलो 16 अमेरिकन अंतराळवीर जॉन यंग आणि चार्ल्स ड्यूक चंद्रावर उतरले.
  • 1997: भारताचे 12वे पंतप्रधान म्हणून डॉ. इंद्रकुमार गुजराल यांनी पदभार स्वीकारला
  • 2000: सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की आश्रित विधवांना देखील पालकांच्या मालमत्तेचा हक्क आहे.
  • 2019 : श्रीलंकेतील चर्च, हॉटेल आणि इतर ठिकाणी आठ बॉम्बस्फोट; 250 हून अधिक लोक मारले गेले.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 1864 : ‘मॅक्स वेबर’ – जर्मन अर्थशास्त्रज्ञ आणि समाजशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 14 जून 1920)
  • 1922 : ‘अ‍ॅलिएस्टर मॅकलिन’ – स्कॉटिश साहसकथा लेखक यांचा जन्म. (मृत्यू: 2 फेब्रुवारी 1987)
  • 1926 : ‘एलिझाबेथ (दुसरी)’ – इंग्लंडची राणी यांचा जन्म.
  • 1934 : ‘डॉ. गुंथर सोन्थायमर’ – महाराष्ट्र लोकधर्म मराठी संस्कृतीचे जर्मन अभ्यासक यांचा जन्म.
  • 1945 : ‘श्रीनिवासराघवन वेंकटराघवन’ – भारतीय क्रिकेटपटू आणि अंपायर यांचा जन्म.
  • 1950 : ‘शिवाजी साटम’ – हिंदी आणि मराठी चित्रपट अभिनेते यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 1509 : ‘हेन्‍री (सातवा)’ – इंग्लंडचा राजा यांचे निधन. (जन्म: 28 जानेवारी 1457)
  • 1910 : ‘मार्क ट्वेन’ – अमेरिकन विनोदकार आणि कादंबरीकार यांचे निधन. (जन्म: 30 नोव्हेंबर 1835)
  • 1938 : ‘सर मुहम्मद इक्बाल’ – पाकिस्तानी कवी आणि तत्त्वज्ञ यांचे निधन. (जन्म: 9 नोव्हेंबर 1877)
  • 1946 : ‘जॉन मायनार्ड केन्स’ – ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म: 5 जून 1883)
  • 1952 : ‘सर स्टॅफोर्ड क्रिप्स’ – इंग्लिश राजकारणी यांचे निधन. (जन्म: 24 एप्रिल 1889)
  • 2013 : ‘शकुंतलादेवी’ – गणितज्ञ, ज्योतिर्विद आणि अतिवेगाने आकडेमोड करणारी भारतीय महिला यांचे निधन. (जन्म: 4 नोव्हेंबर 1929)


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

 

Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर ‘मान्सून वेळापत्रक’ नकोच!

   Follow us on        
Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर गेल्या दोन दशकांपासून पावसाळ्यात म्हणजेच 10 जून ते 30 ऑक्टोबर दरम्यान मान्सून वेळापत्रक अंगिकारले जाते. मात्र या पावसाळी वेळापत्रकाची अंमलबजावणी सुरू ठेवण्यामागील तर्कावर कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड नेटवर्कमधील रेल्वे प्रवासी संघटनांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. कोकण रेल्वे मार्गावरील दुहेरी वेळापत्रकामुळे गाड्यांचा कृत्रिम तुटवडा निर्माण होतो आणि जनतेचे तसेच रेल्वेचे नुकसान होते असा दावा त्यांनी केला आहे.
कोकण रेल्वे मार्गावर  २२ जून २००३ रोजी वैभववाडी येथे आणि १६ जून २००४ रोजी करंजडी येथे भूस्खलनामुळे झालेल्या दोन अपघातांनंतर, कोकण रेल्वे प्रशासनाने १० जून २००५ पासून मान्सून वेळापत्रक लागू करण्यास सुरुवात केली ज्यामध्ये गाड्या कमी वेगाने धावतात. दरवर्षी १० जून ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत मान्सून वेळापत्रक लागू केले जाते.
रेल्वे सुरक्षा आयुक्तांचे CRS चे निर्देश
मुंबईस्थित वेस्टर्न इंडिया पॅसेंजर असोसिएशनचे सरचिटणीस थॉमस सायमन म्हणाले की, रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी (CRS) केआरसीएलला कायमस्वरूपी उपाययोजना लागू होईपर्यंत फक्त मुसळधार पावसात काही वेगाचे निर्बंध लादण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर महामंडळाने भूस्खलन रोखण्यासाठी व्यापक भू-तांत्रिक कामे करण्यासाठी शेकडो कोटी रुपये खर्च केले आहेत, असे त्यांनी नमूद केले.
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना लिहिलेल्या मेलमध्ये, श्री. सायमन म्हणाले की, मुंबई येथील सेंट्रल सर्कलच्या CRS ने २०१८ मध्ये WIPA प्रतिनिधींना सांगितले होते की आयुक्तांनी कोकण रेल्वे कॉर्पोरेशन KRCL किंवा इतर संस्थांना मान्सून वेळापत्रक कायम सुरू ठेवण्याचे निर्देश दिले नव्हते, तरीपण हे मान्सून वेळापत्रक कोकण रेल्वेमार्गावर अंगिकारले जात आहे. कोकण रेल्वे मार्गावर दुहेरी वेळापत्रक न अंगिकारता एकच वेळापत्रक कायम ठेवावे अशी मागणी त्यांनी केली आहे.
श्री. सायमन यांच्या मते मान्सून वेळापत्रक केआर नेटवर्कवरील प्रत्येक ट्रेनसाठी दोन मार्ग आणि वेळेचे संच तयार करते ज्यामुळे गाड्यांची कृत्रिम कमतरता निर्माण होते, ज्यामुळे प्रवाशांची गैरसोय होते आणि रेल्वेचे नुकसान होते. केआरसीएलवरील प्रत्येक ट्रेनला मान्सून आणि मान्सून नसलेल्या कालावधीसाठी दोन वेगवेगळे मार्ग दिले पाहिजेत ज्यामुळे एक स्लॉट कायमचा रिकामा राहील. कोकण रेल्वे २४ तासांच्या दिवसात सुमारे २४ गाड्या चालवते. प्रत्यक्षात जर मान्सून वेळापत्रक नसेल तर ते दर १० मिनिटांनी एक ट्रेन चालवू शकते.
मान्सून वेळापत्रक रद्द केल्यास, कोकण रेल्वे (केआर) नेटवर्कद्वारे अधिक गाड्या चालवता येतील; १२० किमी प्रतितास वेगाची परवानगी, मुंबई ते तिरुवनंतपुरम पर्यंत पूर्ण विद्युतीकरण आणि मुंबई एलटीटी ते वीर दरम्यान १७१ किमी दुहेरी ट्रॅकसह, तिप्पट जास्त गाड्या धावू शकतात, असा त्यांनी युक्तिवाद केला आहे. गेल्या काही वर्षांत केआर नेटवर्कवर कोणतेही मोठे भूस्खलन झालेले नाही याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे.
कोकण रेल्वे मार्गावर तिरुअनंतपुरम ते नवी दिल्ली या नेटवर्क दरम्यानच्या  गाड्या चालविण्यात येतात. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गाच्या दुहेरी वेळापत्रकाचा परिणाम संपूर्ण भारतात  होतो असेही  ते म्हणालेत.
वेग निर्बंध
WIPA ने वारंवार असे सुचवले होते की गरज पडल्यास रत्नागिरी आणि आडवली दरम्यान गाड्या कायमस्वरूपी गतीने चालवता येतील. भारतात अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे जवळजवळ दरवर्षी भूस्खलन, पूर इत्यादी घटना घडतात मात्र तरीही तिथे पावसाळ्याचे वेगळे वेळापत्रक नाही आहे. कुंडापुरा रेल्वे प्रयत्न समितीचे गौतम शेट्टी म्हणाले की, उत्तर भारतात दरवर्षी दाट धुके पडत असले तरी तिथे हिवाळ्यातील वेळापत्रक नाही आहे.
पावसाळ्याचे वेळापत्रक अनावश्यकपणे संसाधने वाया जात आहेत. केवळ जेथे धोका जास्त आहे अशा  ठिकाणी मुसळधार पावसातच हे निर्बंध लादले जावेत असे मत अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती, महाराष्ट्राचे सचिव अक्षय सरोज मधुकर महापदी यांनी मांडले आहे.

Mansoon Updates: यंदाच्या मान्सूनबाबत महत्वाची बातमी…हवामान खात्याने वर्तविली ‘ही’ शक्यता

   Follow us on        

Mansoon Updates: यंदाचा उन्हाळा यंदा फेब्रुवारीपासूनच कडक उन्हाळा राज्यात सुरू झाला आहे. त्यामुळे सुमारे शंभर वर्षातील सर्वांत उष्ण फेब्रुवारी ठरला. वातावरणातील या बदलाचा परीणाम मान्सूनच्या आगमनावर करणारा ठरणार आहे. यंदा मान्सून नियोजित वेळेपेक्षा चार ते पाच दिवस आधीच केरळमध्ये येण्याची शक्यता शास्त्रज्ञांनी वर्तविली आहे. गेल्या आठवडय़ात वातावरणात मोठे बदल झाले असून, मान्सूनच्या हालचाली अंदमानात दिसण्यास सुरुवात होत आहे.

यंदा फेब्रुवारीपासूनच कडक उन्हाळा राज्यात सुरू झाला. थंडी कमी अन् ऊन जास्त, असे वातावरण होते. त्यामुळे सुमारे शंभर वर्षातील सर्वांत उष्ण फेब्रुवारी ठरला. त्यापाठोपाठ मार्च आणि एप्रिलमध्येही तीच स्थिती आहे. मार्चमध्ये कमाल तापमानाचा पारा 40 अंशांवर गेला तसेच सरासरी पाऊस कमीच झाला. त्यामुळे मार्च महिना पूर्ण उष्ण ठरला.एप्रिलची सुरुवातही खूप कडक उष्ण झळांनी झाली. गत अनेक वर्षांतील यंदाचा एप्रिल उष्ण ठरत आहे. हे वातावरण मान्सूनच्या तयारीसाठी अत्यंत अनुकूल आणि पोषक असे आहे.

हवामानशास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा खूप कडक उन्हाळा आहे. त्यामुळे बाष्पीभवनाचा वेगही जास्त आहे. ढगांची निर्मिती वेगाने होते असून, सॅटेलाइट इमेज पाहिल्यावर असे लक्षात येते की, मान्सून आपल्या तयारीला लागला आहे. संपूर्ण देशाला ढगांनी वेढले आहे. बाष्प मोठ्या प्रमाणावर तयार होत असून, ते आपल्या देशाकडे येत आहे. त्यामुळे मान्सूनपूर्व पाऊस पडण्यास सुरुवात झाली आहे.

शास्त्रज्ञांनी सांगितले की, मान्सूनच्या हालचाली या समुद्रातील पाण्याचे तापमान, वार्‍याची दिशा, हवेचे दाब यावर अवलंबून असतात. सध्या अरबी समुद्रातील तापमान 31, तर हिंदी महासागराचे तापमान 30 अंश सेल्सिअस इतके आहे. पाणी खूप तापल्याने वेगाने बाष्पीभवन होत आहे. हवेचे दाब सध्या समुद्रावर 1005 ते 1010 हेक्टा पास्कल इतके आहेत.

देशात हवेचे दाब 1005 ते 1008 दरम्यान आहेत. देशातील दाब कमी झाले की वारे समुद्राकडून देशाच्या दिशेने वाहू लागतात. अंदमानात मान्सून हा तयारीला यंदा लवकर लागला आहे. काही दिवसांतच त्याच्या हालचाली सॅटेलाइट इमेजवर दिसण्याची शक्यता आहे.

यंदा एप्रिलमध्ये पारा 43 ते 44 अंशांवर गेल्याने समुद्रातील पाणी वेगाने तापले. परिणामी, बाष्पीभवनाचा वेग प्रचंड वाढल्याने देशाभोवती सर्व बाजूंनी बाष्प मोठ्या प्रमाणावर तयार झाल्याचे सॅटेलाइट इमेजमध्ये दिसत आहे.

” यंदा मान्सून लवकर येण्याची शक्यता जास्त आहे. कारण, सर्व लक्षणे अनुकूल दिसत आहेत. कडक उन्हाळ्यामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढल्याने बाष्प वेगाने तयार होऊन मान्सूनपूर्व पावसाची तयारी सुरू झाली आहे. तसेच हवेचा दाब, वार्‍याची दिशा अन् समुद्राचे तापमान, ही मान्सूनसाठी पोषक असणारी लक्षणे यंदा अनुकूल दिसत आहेत. त्यामुळे मान्सून यंदा वेळेआधीच केरळमध्ये दाखल होऊ शकेल, अशी शक्यता आहे.” 

– डॉ. रामचंद्र साबळे, ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ, पुणे

ठाणे: फिरत्या ट्रॅफिक सिग्नलचा अनोखा प्रयोग

   Follow us on        

डोंबिवली : कल्याण डोंबिवलीतील वाहतूक कोंडीची समस्या काही प्रमाणात संपुष्टात आणण्यासाठी कल्याण पश्चिमेतील सर्वात वर्दळीच्या सहजानंद चौकामध्ये केडीएमसी आणि वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांतर्फे फिरत्या ट्रॅफिक सिग्नलचा अनोखा प्रयोग राबविण्यात येत आहे.

सहजानंद चौकात असलेले 5 रस्त्यांचा विचार करता याठिकाणी सोलर बेस पोर्टेबल स्टँड अलोन सिग्नल यंत्रणा प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आली आहे. पुढील महिनाभर ही सिग्नल यंत्रणा कार्यान्वित ठेवून त्यातून येणाऱ्या निष्कर्षानंतर अभ्यास करून केडीएमसीतर्फे याठिकाणी कायमस्वरूपी सिग्नल यंत्रणा बसविण्यात येणार असल्याची माहिती विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत यांनी दिली.

स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सहजानंद चौकात कायमस्वरूपी सिग्नल यंत्रणा उभारण्यात येणार आहे. मात्र इथल्या वाहतुकीचा, वर्दळीचा आणि वाहनांच्या संख्येचा अभ्यास न करता सिग्नल यंत्रणा बसवली गेल्यास केडीएमसीचा पैसा वाया जाऊ शकतो. कल्याणकरांच्या कराचा हा पैसा विचारात घेऊन कायमस्वरूपी सिग्नल यंत्रणा बसविण्यापूर्वी त्याचा अभ्यास करण्याच्या उद्देशाने ही सोलर बेस पोर्टेबल स्टँड अलोन सिग्नल यंत्रणा प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आली आहे. पुढील 1 महिनाभर त्याद्वारे इथल्या वाहतुकीचा अभ्यास करण्यात येणार त्यासोबतच कोणते रस्ते वन वे करणे, कोणता डिव्हायडर मागे घेणे, कोणता हायमास्ट शिफ्ट करणे आदींचा विचारही केला जाणार आहे. आणि मग त्यानंतर या चौकाच्या आणि इथल्या वाहतुकीच्या अनुषंगाने कायमस्वरुपी सिग्नल यंत्रणा बसविण्यात येणार असल्याची माहिती केडीएमसीचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत यांनी दिली. अशाच प्रकारची सिग्नल यंत्रणा नागपूर शहरात सुरू असून त्याचे चांगले रिझल्ट मिळत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

२० एप्रिल पंचांग आणि दिनविशेष


आजचे पंचांग

  • तिथि-सप्तमी – 19:03:51 पर्यंत
  • नक्षत्र-पूर्वाषाढ़ा – 11:48:59 पर्यंत
  • करण-विष्टि – 06:49:12 पर्यंत, भाव – 19:03:51 पर्यंत
  • पक्ष- कृष्ण
  • योग-सिद्ध – 24:11:26 पर्यंत
  • वार- रविवार
  • सूर्योदय- 06:20
  • सूर्यास्त- 18:55
  • चन्द्र-राशि-धनु – 18:05:04 पर्यंत
  • चंद्रोदय- 25:22:59
  • चंद्रास्त- 11:35:59
  • ऋतु- ग्रीष्म

जागतिक दिन :
  • पिझ्झा डिलिव्हरी ड्रायव्हर प्रशंसा दिवस Pizza Delivery Driver Appreciation Day
महत्त्वाच्या घटना :
  • 1770 : कॅप्टन जेम्स कुक, प्रसिद्ध महासागर संशोधक, यांनी ऑस्ट्रेलिया खंडाचा शोध लावला.
  • 1939 : ॲडॉल्फ हिटलरचा 50 वा वाढदिवस जर्मनीमध्ये सार्वजनिक सुट्टीसह साजरा करण्यात आला.
  • 1945 : दुसरे महायुद्ध – अमेरिकन सैन्याने लीपझिग शहर ताब्यात घेतले.
  • 1946 : संयुक्त राष्ट्र संघाची संघटना विसर्जित करण्यात आली आणि नंतर तिचे संयुक्त राष्ट्रात रूपांतर झाले.
  • 1972 : अपोलो प्रोग्राम: अपोलो 16 लुनार मॉड्यूल, जॉन यंगच्या आदेशाने आणि चार्ल्स ड्यूकने पायलट असलेले, चंद्रावर उतरले.
  • 1992 : जी.एम.आर.टी.ची पहिली ॲंटेना पुणे जिल्ह्यातल्या खोडदमध्ये उभारली गेली. ही आशियातली सगळ्यात मोठी रेडिओ दुर्बिण आहे.
  • 2008 : इंडी कार शर्यत जिंकणारी डॅनिका पॅट्रिक पहिली महिला चालक ठरली.
  • 2020 – रशिया-सौदी अरेबिया तेल किंमत युद्धाचा परिणाम – इतिहासात प्रथमच, तेलाच्या किमती शून्याच्या खाली आल्या.
  • 2023 : SpaceX चे स्टारशिप रॉकेट, आतापर्यंतचे सर्वात मोठे आणि सर्वात शक्तिशाली रॉकेट, प्रथमच प्रक्षेपित झाले. उड्डाणाच्या 4 मिनिटांत त्याचा स्फोट होतो
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 788 ई .पुर्व : आदि शंकराचार्य यांचा जन्म.
  • 1749 : ‘नानासाहेब पेशवे’ – मराठा सत्तेचा ध्वज अटकेपार नेणार्‍या पेशव्यांचे श्रद्धास्थान असलेल्या देवदेवेश्वर मंदिराची यांनी पर्वतीवर स्थापना केली.
  • 1808 : अध्यक्ष नेपोलियन (तिसरे) – फ्रान्सचे पहिले यांचा जन्म. (मृत्यू: 9 जानेवारी 1873)
  • 1889 : ‘अ‍ॅडॉल्फ हिटलर’ – नाझी हुकूमशहा तसेच दुसऱ्या महायुद्धाचा प्रारंभ करणारे यांचा जन्म. (मृत्यू: 30 एप्रिल 1945)
  • 1896 : सार्थ ज्ञानेश्वरी चे लेखक प्रा. ह. भ. प. शंकर वामन उर्फ सोनोपंत (मामासाहेब) दांडेकर यांचा माहीम, ठाणे येथे जन्म. (मृत्यू: 9 जुलै 1968)
  • 1914 : ज्ञानपीठ विजेते ओरिया साहित्यिक गोपीनाथ मोहंती यांचा जन्म. (मृत्यू: 20 ऑगस्ट 1991)
  • 1939 : ‘सईदुद्दीन डागर’ – ध्रुपद गायक यांचा जन्म.
  • 1950 : मुख्यमंत्री ‘चंद्राबाबू नायडू’ आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचा जन्म.
  • 1966 : ‘डेव्हिड फिलो’ – याहू चे सहसंस्थापक यांचा जन्म.
  • 1972 : ‘ममता कुलकर्णी’ – अभिनेत्री
  • 1980 : ‘अरीन पॉल’ – भारतीय दिग्दर्शक आणि पटकथालेखक यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 1918 : ‘कार्ल ब्राऊन’ – नोबेल पारितोषिक विजेते जर्मन भौतिकशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म: 6 जून 1850)
  • 1938 : ‘चिंतामणराव वैद्य’ – न्यायाधीश व कायदेपंडित यांचे निधन. (जन्म: 18 ऑक्टोबर 1861)
  • 1960 : ‘पन्नालाल घोष’ – बासरीवादक संगीतकार यांचे निधन. (जन्म: 24 जुलै 1911)
  • 1970 : गीतकार आणि शायर शकील बदायूँनी याचे निधन. (जन्म: 3 ऑगस्ट 1916)
  • 1999 : ‘कमलाबाई कृष्णाजी ओगले’ – रुचिरा पुस्तकाच्या लेखिका याचे निधन. (जन्म: 16 सप्टेंबर 1913)


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

 

१९ एप्रिल पंचांग आणि दिनविशेष


आजचे पंचांग

  • तिथि-षष्ठी – 18:24:57 पर्यंत
  • नक्षत्र-मूळ – 10:21:31 पर्यंत
  • करण-वणिज – 18:24:57 पर्यंत
  • पक्ष- कृष्ण
  • योग-शिव – 24:50:59 पर्यंत
  • वार- शनिवार
  • सूर्योदय- 06:21
  • सूर्यास्त- 18:55
  • चन्द्र-राशि-धनु
  • चंद्रोदय- 24:33:59
  • चंद्रास्त- 10:37:59
  • ऋतु- वसंत

जागतिक दिन :
  • World Liver Day जागतिक यकृत दिवस
महत्त्वाच्या घटना :
  • 1526 : मुघल साम्राज्याचा संस्थापक बाबर याने मुघल साम्राज्याचा पाया घातला.
  • 1945 : सोविएत रशिया आणि ग्वाटेमालामधे राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले.
  • 1948 : ब्रह्मदेशाचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश.
  • 1956 : गीतरामायणातील शेवटचे गाणे पुणे आकाशवाणीवरुन प्रसारित झाले.
  • 1971 : सिएरा लिओन प्रजासत्ताक बनले.
  • 1975 : भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्ट रशियन अंतराळ स्थानकावरून प्रक्षेपित करण्यात आला.
  • 2021 : इनजीनुटी हेलिकॉप्टर दुसऱ्या ग्रहावर उड्डाण करणारे पहिले विमान ठरले
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 1868 : ‘पॉल हॅरिस’ – रोटरी क्लबचे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू: 27 जानेवारी 1947)
  • 1892 : ‘ताराबाई मोडक’ – शिक्षणतज्ज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 31 ऑगस्ट 1973)
  • 1912 : ‘ग्लेन सीबोर्ग’ – नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 25 फेब्रुवारी 1999)
  • 1933 : ‘डिकी बर्ड’ – ख्यातनाम क्रिकेट पंच यांचा जन्म.
  • 1957 : ‘मुकेश अंबानी’ – भारतीय उद्योगपती यांचा जन्म.
  • 1977 : ‘अंजू बॉबी जॉर्ज’ – भारतीय लाँग जम्पर यांचा जन्म.
  • 1987 : ‘मारिया शारापोव्हा’ – रशियन लॉनटेनिस खेळाडू यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 1881 : ‘बेंजामिन डिझरेली’ – इंग्लंडचे पंतप्रधान यांचे निधन. (जन्म: 21 डिसेंबर 1804)
  • 1882 : ‘चार्ल्स डार्विन’ – ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म: 12 फेब्रुवारी 1809)
  • 1906 : ‘पिअर क्यूरी’ – नोबेल पारितोषिक विजेते फ्रेन्च भौतिकशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म: 15 मे 1859)
  • 1910 : ‘अनंत कान्हेरे’ – क्रांतिकारक यांचे निधन.
  • 1955 : ‘जिम कॉर्बेट’ – ब्रिटिश-भारतीय वन्यजीव तज्ज्ञ आणि लेखक यांचे निधन. (जन्म: 25 जुलै 1875)
  • 1974 : ‘आयुब खान’ – फील्ड मार्शल आणि पाकिस्तानचे दुसरे राष्ट्राध्यक्ष यांचे निधन. (जन्म: 14 मे 1907)
  • 1993 : ‘डॉ. उत्तमराव पाटील’ – स्वातंत्र्यसैनिक यांचे निधन.
  • 1994 : मेजर जनरल राजिंदरसिंग उर्फ स्पॅरो – पंजाबचे माजी मंत्री यांचे निधन.
  • 1998 : ‘सौ. विमलाबाई गरवारे’ – उद्योजीका यांचे निधन. (जन्म: 18 डिसेंबर 1928)
  • 2003 : ‘मिर्जा ताहिर अहमद’ – भारतीय-इंग्रजी खलीफा यांचे निधन. (जन्म: 12 ऑगस्ट 1925)
  • 2004 : ‘नॉरिस मॅक्विहिर’ – गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड चे सहसंस्थापक यांचे निधन.
  • 2008 : ‘सरोजिनी बाबर’ – लेखिका, संतसाहित्याच्या अभ्यासिका व राजकारणी यांचे निधन. (जन्म: 7 जानेवारी 1920)
  • 2009 : ‘अहिल्या रांगणेकर’ – मार्क्सवादी कम्युनिस्ट नेत्या यांचे निधन. (जन्म: 8 जुलै 1922)
  • 2010 : ‘मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष’ – लेखक आणि टीकाकार यांचे निधन. (जन्म: 7 जून 1913)


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

 

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search