Author Archives: Kokanai Digital

मंगळवारी कोकण रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक; ‘या’ गाड्यांवर परिणाम

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर संगमेश्वर रोड ते रत्नागिरी सेक्शन दरम्यान मार्गाच्या देखभाल दुरुस्तीसाठी मंगळवार दि. २९ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी ७.३० ते १०.३० असा तीन तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ‘मेगा ब्लॉकच्या कालावधीत या मार्गावरुन धावणाऱ्या दोन गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.
1) दिनांक २८ ऑगस्ट रोजी सुटणार्‍या गाडी क्र. १९५७७ – तिरुनेलवेली – जामनगर एक्सप्रेस ठोकूर ते रत्नागिरी दरम्यान सुमारे अडीच तास उशिराने धावणार आहे.
2) दिनांक २८ ऑगस्ट रोजी सुटणार्‍या गाडी क्र. 16346 तिरुवनंतपुरम सेंट्रल – लोकमान्य टिळक (टी) एक्स्प्रेसला ठोकूर – रत्नागिरी दरम्यान सुमारे एक तास उशिराने धावणार आहे.
या मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना होणाऱ्या तसदीबद्दल रेल्वे प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे  

”…. म्हणुन सावंतवाडीला राजधानी एक्सप्रेस आणि अन्य प्रीमियम गाड्यांना थांबा नाही.” रेल्वे अधिकाऱ्याचे संतापजनक वक्तव्य

  • सावंतवाडी स्थानकात राजधानी एक्सप्रेसला पुन्हा थांबा मिळू शकत नाही
  • सावंतवाडीकरांना राजधानी चे तिकीट परवडणारे नाही
  • प्रीमियम /वंदेभारत या गाड्या सावंतवाडीसाठी नाहीत 

पनवेल | सागर तळवडेकर : कोकणात रेल्वे यावी यासाठी बापजाद्यांनी राखून ठेवण्यात आलेल्या आपल्या जमिनींचा त्याग करून कोकणवासीयांनी खूप मोलाचे योगदान दिले आहे. मात्र येथील अनेक स्थानकावर थांबा मिळविण्यासाठी प्रयत्न करूनही, प्रवासी संख्या असूनही अनेक गाड्यांना येथे थांबा देण्यात आला नाही आहे. एवढे कमी होते म्हणुन की काय आता तर रेल्वे अधिकारी चक्क संतापजनक वक्तव्ये करताना दिसत आहेत.

सावंतवाडी स्थानकात अधिकच्या रेल्वे गाड्यांना थांबा मिळावा आणि येथील टर्मिनसचे रेंगाळलेले काम पूर्ण करावे यासाठी काल दिनांक २४ ऑगस्ट ला ठरल्या प्रमाणे मिहिर मठकर आणि सुरेंद्र नेमळेकर यांनी कोंकण रेल्वे कॉर्पोरेशनच्या बेलापूर ऑफिस मधे चीफ ऑपरेटिंग मॅनेजर श्री वी.स. सिन्हा यांची भेट घेतली.

सावंतवाडी रेल्वे स्थानक हे सिंधुदुर्गातील एक महत्वाचे स्थानक आहे, येथील स्थानकात नेहमीच प्रवाशांची वर्दळ असते परंतु अपेक्षित प्रवासी संख्या आणि उत्पन्न असताना देखील येथे गाड्या मात्र हाताचा बोटं मोजण्या इतक्याच थांबत आहेत.सध्या कोकण रेल्वे मार्गावर ४४ गाड्या धावतात त्यापैकी सावंतवाडी स्थानकात एकूण ५ दैनिक आणि ४ साप्ताहिक अश्या ९ गाड्या थांबतात.तसेच सावंतवाडी स्थानकाचे उत्पन्न हे २०२३-२४ च्या पहिल्या तिमाहीत तब्बल ४.४ करोड एवढे आहे आणि आता पुढच्याच महिन्यात गणपती चतुर्थी असल्याने दुसऱ्या तिमाहीत देखील हा आकडा वाढण्याची दाट शक्यता देखील आहे असे असून ही सावंतवाडी स्थानकात रेल्वे गाड्यांचे अधिकचे पर्याय उपलब्ध नाहीत. अलीकडेच संगमेश्वर आणि खेड ला अधिकच्या रेल्वे गाड्यांना थांबा मिळाला, हे सर्व लक्षात घेता रेल्वे अभ्यासक मिहिर मठकर आणि कोंकण रेल्वे समन्वयक समितीचे सदस्य आणि ज्येष्ठ रेल्वे अभ्यासक सुरेंद्र नेमळेकर यांनी नियोजन करून श्री सिन्हा यांची भेट घेतली आणि विविध विषयावर चर्चा केली. यावेळी सावंतवाडी टर्मिनस प्रेमी या व्हॉट्सॲप ग्रुप च्या माध्यमातून श्री सिन्हा यांना निवेदन देण्यात आले.

अनुक्रमे सुरेंद्र नेमळेकर, वी एस सिन्हा, मिहिर मठकर

सावंतवाडी टर्मिनस चे उर्वरित टप्पा २ चे काम पूर्ण करणे आणि येथील स्थानकाचा विकास केंद्राचा अमृत भारत स्थानक योजनेतून करावे इत्यादी मागणया यावेळी करण्यात आल्या, येथील स्थानकात प्रवाशांची वर्दळ पाहता मंगलोर,मत्स्यगंधा,वंदे भारत,मंगला,नेत्रावती,गोवा संपर्क क्रांती,एलटीटी दुरोंतो,मरूसागर,त्रिवेंद्रम निजामुद्दीन आदी एक्सप्रेसला थांबा देण्यात यावा तसेच कोरोना काळात थांबा काढून घेण्यात आलेल्या राजधानी एक्सप्रेस, गरीब रथ एक्सप्रेस आणि नागपूर-मडगाव या गाड्यांचा थांबा तत्काळ चालू करावा अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली. या विषयाला अनुसरून बोलताना श्री सिन्हा हे सावंतवाडीकरांचा मागण्यांबद्दल अनुत्सुकच दिसले, त्यांनी सावंतवाडी स्थानकात राजधानी एक्सप्रेसला पुन्हा थांबा मिळू शकत नाही असे सांगितले, सावंतवाडीकरांना राजधानी चे तिकीट परवडणारे नाही तसेच प्रीमिअम गाड्या ह्या सावंतवाडी साठी नाही असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे येथे राजधानी तर नाहीच पण नव्याने चालू झालेली वंदे भारतचा थांबा देखील येथे मिळण्याचा आशा धूसर झाल्यात.टर्मिनस संदर्भात श्री सिन्हा यांना विचारले असता सावंतवाडी टर्मिनस करिता कोंकण रेल्वे कडे निधीची तरतूद नाही असे स्पष्ट केले त्यामुळे तमाम कोकणवासियांचा जिव्हाळ्याचा विषय असणारा सावंतवाडी टर्मिनस चे भविष्य हे अंधातरीतच आहे असे दिसते. अलीकडेच अनेक प्रवासी संघटना आणि संस्था यांनी या संदर्भात निवेदने सादर केली होती परंतु रेल्वे प्रशासन याची दखल घेत नसल्याची खंत मिहिर मठकर आणि सुरेंद्र नेमळेकर यांनी मांडली.

गणेश चतुर्थी ही वीस दिवसांवर येऊन ठेपली असता सोडलेल्या जादाच्या गाड्या ह्या कुडाळ पर्यंतच आणि पुढे मडगाव आणि दक्षिणेकडील आहेत त्यामुळे यावर्षी तरी निदान अजुन गणपती स्पेशल गाड्या सोडाव्यात अशी मागणी प्रवाशांकडे होत आहे. सध्यातरी सोडलेल्या गाड्या ह्या अपुऱ्या आहेत अजुन गाड्या सोडून गणेश भक्तांचा प्रवास सुखकर करावा अशी मागणी जनतेतून होत आहे.

कोंकण रेल्वे अधिकाऱ्याकडून मिळालेली तोंडी उत्तरे ही अपेक्षित नसून याबाबत लवकरच सावंतवाडीकरांना घेऊन भूमिका जाहीर करू असे मिहिर मठकर यांनी सांगितले.दिलेल्या निवेदनात मिहिर मठकर, सुरेंद्र नेमळेकर आणि सागर तळवडेकर यांनी सह्या केल्या होत्या.

मुंबई गोवा महामार्ग: मंत्री रवींद्र चव्हाण ‘अ‍ॅक्टिव्ह मोड’ मध्ये; डोंबिवलीत खुल्या चर्चासत्राचे आयोजन

मुंबई: मुंबई गोवा महामार्ग झालाच पाहिजे , १२ वर्षे का रखडले काम ? जर ४ वर्षात समृद्धी महामार्गाचे काम होते मग कोकणच्या मुंबई गोवा महामार्गाचे काम का पूर्ण होत नाही ? निधीची कमतरता नसताना का रखडला ?  या आणि अशा प्रश्नांचे उत्तर शोधण्यासाठी आणि सार्वजनिक बांधकाम  (सार्वजनिक उपक्रम वगळून )मंत्री यांच्याकडून या विषया बाबत माहिती जाणून घेण्यासाठी एक खुले चर्चा सत्र येत्या रविवारी डोंबिवली येथे आयोजित करण्यात आले आहे.

गेली १२ वर्षे मुंबई गोवा महामार्ग वगळता कोणत्याही महामार्गावर अपघात झाला तर त्याची शासन दरबारी तात्काळ दखल घेतली जाते,तातडीने मदत जाहीर केली जाते; मात्र कोकणच्या अपघातग्रस्तांवर अन्याय का? या सर्वांना जबाबदार असलेल्या अधिकारी, राजकारणी,लोकप्रतिनिधी यांची नावे जाहीर करून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल का करीत नाही ? मुंबई गोवा महामार्गाचे काम पूर्ण झाल्या शिवाय टोल आकारणी सुरु करू नका! अशी मागणी असताना टोल सुरु झाले. या व अशा अनेक विषयांवर विविध संघटनांकडून विचारले गेलेल्या प्रश्नांवर आंदोलने केली गेली.

राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मंत्रिपदाची धुरा सांभाळल्यापासून गेल्या एक वर्षात रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाची आठ वेळा पाहणी करून विषयाचा गांभीर्याने अभ्यास केला आहे. या कामातील असंख्य अडचणी हुडकून काढल्यामुळेच आता मुंबई गोवा महामार्ग कामाला गती आली असून पूर्णत्वाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे.

सहभागी होण्यास इच्छुक असलेल्यांनी आपली नावे नोंदविण्यासाठीश्री. जयवंत दरेकर(९८२१५६२५७७) श्री. काका कदम(७५०६२५४४४५) श्री. अक्षय महापदी (८०९७१६७९८७) श्री.राजू मुलुख(८४५१०९७१३६) श्री उदय सुर्वे(७६६६९६५००५) यांच्याशी संपर्क करावा. अशी विशेष सूचनाही केली आहे.

कोकण रेल्वे मार्गावरील अजून दोन गाड्या आधुनिक प्रणालीच्या LHB रेकसह धावणार

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरून  जुन्या आयसीएफ  Integral Coach Factory (ICF) coaches रेकसह धावणाऱ्या दोन लांब पल्ल्याच्या गाड्या आता आधुनिक प्रणालीच्या एलएचबी  Linke Hofmann Busch (LHB) coaches रेकसह धावणार आहेत.
या संदर्भात रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार
१) Jamnagar – Tirunelveli – Jamnagar Bi-Weekly Express
कोकण रेल्वे मार्गे आठवड्यातून दोन दिवस धावणारी एक्सप्रेस आता एल एच बी डब्यांसह धावणार आहे.
गाडी क्रमांक 19578 जामनगर-तेरूनेलवेली एक्सप्रेस  दि. 26 ऑगस्ट 2023 च्या फेरीपासून तर गाडी क्रमांक 19577  तिरुनेलवेली – जामनगर दिनांक 29 ऑगस्ट च्या फेरीपासून एलएचबी रेक सह धावणार आहे.
२) Hapa – Madgaon Jn. –  Hapa Weekly Express  (22908 / 22907)
आठवड्यातून एक दिवस धावणारी ही  गाडी आता एलएचबी रेकसह धावणार आहे.
गाडी क्रमांक 22908  हापा -मडगाव एक्सप्रेस ही गाडी  दि. 30 ऑगस्ट पासून तर गाडी क्रमांक 22908  मडगाव – हापा एक्सप्रेस  दि. 1 सप्टेंबर 2023 च्या फेरीपासून एलएचबी श्रेणीच्या रेकसह धावणार आहे.
डब्यांच्या संरचनेत बदल
या गाडयांच्या डब्यांच्या संरचनेत पण काहीसा बदल करण्यात आला असून तो पुढीलप्रमाणे.
श्रेणीसध्याची संरचनासुधारित संरचना
टू टियर एसी22
थ्री टायर एसी6-
इकॉनॉमी थ्री टायर एसी-6
स्लीपर98
जनरल33
जनरेटर कार-1
एसएलआर21
पेन्ट्री कार11
एकूण2322

कुडाळच्या शिरपेचात मानाचा तुरा; ठरला स्वच्छतेतील पंचतारांकित मानांकन मिळवणारा राज्यातील पहिला तालुका

सिंधुदुर्ग: हागणदारी मुक्त अभियानात सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कुडाळ तालुक्यानं बाजी मारली आहे. राज्यातल्या 351 तालुक्यामध्ये सर्वप्रथम स्वच्छतेतील पंचतारांकित मानांकन मिळवणारा कुडाळ हा पहिला तालुका ठरला आहे. याआधीच सिंधुदुर्ग जिल्हा हागणदारी मुक्त अभियानात संपूर्ण राज्यात सर्वात प्रथम संपूर्णपणे हागणदारी मुक्त झाला आहे. श्रावण महोत्सवात स्वच्छ्ता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकूर यांनी ही घोषणा केली.

कुडाळ पंचायत समिती आयोजित ‘आझादी का अमृत महोत्सव’ या उपक्रमाचा सांगता समारंभ काल संपन्न झाला. तसेच यावेळी श्रावणमेळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या श्रावण महोत्सवाला पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. यावेळी कुडाळ तालुक्यातल्या ६० गावांमधली माती दिल्लीला पाठवण्यात येणाऱ्या कलशात एकत्र करुन तो कलश पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे सोपवण्यात आला.

 

 

रोहा स्थानकावर आजपासून २ एक्सप्रेस गाड्या थांबणार

Konkan Railway News : रेल्वे बोर्डाने या आधी जाहीर केल्याप्रमाणे कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या दोन गाड्या आजपासून रोहा स्थानकावर थांबविण्यात येणार आहेत. रेल्वेने जाहीर केलेल्या माहितीनुसार खालील वेळात या गाड्या या स्थानकावर थांबणार आहेत.

१) रोहा स्थानकावर नेत्रावती एक्सप्रेसला थांबा
16345 Lokmanya Tilak (T) – Thiruvananthapuram Central Netravati Express हि एक्सप्रेस आज दिनांक २५/०८/२०२३ पासून रोहा स्थानकावर थांबणार आहे. रोहा स्थानकावर या गाडीची वेळ दुपारी २ वाजता आहे.

परतीच्या प्रवासात 16346 Thiruvananthapuram Central – Lokmanya Tilak (T) Netravati Express या गाडीची वेळ रोहा स्थानकावर दुपारी १ वाजून ३५ मिनिटे अशी असणार आहे.

हा थांबा ५ मिनिटांसाठी असणार आहे.

२) रोहा स्थानकावर दिवा सावंतवाडी दिवा एक्सप्रेसला थांबा
10105 Diva – Sawantwadi Express ही गाडी आज दिनांक २५/०८/२०२३ पासून रोहा स्थानकावर थांबणार आहे. रोहा स्थानकावर या गाडीची वेळ सकाळी ९ वाजता आहे.

परतीच्या प्रवासात 10106 Sawantwadi – Diva Express ही गाडी आज दिनांक २५/०८/२०२३ पासून रोहा स्थानकावर थांबणार आहे. रोहा स्थानकावर या गाडीची वेळ सकाळी संध्याकाळी ५ वाजून २० मिनिटे अशी असणार आहे.

हा थांबा ५ मिनिटांसाठी असणार आहे.

 

Ratnagiri : नमन आणि जाखडी या लोककलांना राजाश्रय मिळणार

रत्नागिरी : कोकणातील अनेक लोककला आज लोकप्रिय आहेत. त्यातील नमन आणि जाखडी या लोककलांना राज्य शासनाने मान्यता द्यावी अशा आशयाची मागणी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे रत्नागिरी  जिल्हा नमन मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर कांबळे आणि हरिश्चंद्र बंडबे, श्रीकांत बोंबबों ले यांनी केली होती. या मागणीची तात्काळ दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेत उदय सामंत यांच्या विनंतीनुसार ती मागणी तात्काळ मान्य केली.
रत्नागिरी जिल्ह्यासह कोकणातील नमन, जाखडी या लोककला आजही येथील मंडळींनी ळीं जीवापाड जपल्या आहेत. पण नमन लोककलेची साधी नोंदही शासकीय दरबारी केली नाही. सध्या नमन कलाकारांची ‘रात्री राजा आणि सकाळी डोक्यावर बोजा’ अशी वाईट स्थिती आहे. त्यामुळे या लोककलेला राजाश्रयाची खऱ्या अर्थाने गरज आहे.
नमन अनेक नाट्यसंमेलनांच्या माध्यमातून जगभर पोहचले. पण कोकणातील नमन, जाखडी सादर करणारी हजारो मंडळे मात्र दुर्लक्षित होत आहेत आणि ही हजारो मंडळे राजाश्रयाच्या प्रतिक्षेत आहेत. या कलेची शासन दरबारी आजही नोंदनों व्हावी अशी मागणी आहे. कोकणात नमन तथा खेळे, शक्तीतुरा म्हणजे जाखाडी नृत्य या कलांचा समावेश आहे. कोकणातील विशेषत: रत्नागिरी जिल्ह्यातील नमन या लोककलेची प्रसिद्धी जगभर पसरली आहे.

ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव काळाच्या पडद्याआड

मुंबई :ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे आज दुःखद निधन झाले आहे त्या ८१ वर्षांच्या होत्या. सीमा देव यांच्या जाण्याने मराठी तसेच हिंदी सृष्टीला मोठा धक्का बसला आहे.

 

यंदा कर्तव्य आहे,माझी आई, सुवासिनी, मोलकरीण, पाहू रे किती वाट अशा चित्रपटात त्या महत्वपूर्ण भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. सालस, सोशिक अशा बहुढंगी भूमिकेतून सीमा देव यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली होती. जगाच्या पाठीवर चित्रपटात त्या आंधळ्या मुलीच्या भूमिकेत दिसल्या. आनंद सारख्या हिंदी चित्रपटातही त्या आपल्या अभिनयाचा ठसा उमटवताना दिसल्या. सीमा देव गेल्या काही वर्षांपासून अल्झायमर या आजाराने त्रासलेल्या होत्या. रमेश देव हयातीत असतानाही त्या त्यांना ओळखत नव्हत्या. रमेश देव यांचे निधन झाले हेही त्यांना ठाऊक नव्हते. आपल्या मुलांना सुनानाही त्या ओळखत नसत. त्यामुळे अशा दिवसांत मुलगा अजिंक्य देव आपल्या आईची योग्य ती काळजी घेत असे.

 

यावर्षीचा नौसेना दिवस सिंधुदुर्ग किल्ल्यावर साजरा होणार; पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार

सिंधुदुर्ग : भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कर्तृत्वाला अभिवादन म्हणून यावर्षीचा नौसेना दिवस (४ डिसेंबर ) सिंधुदुर्ग किल्ला येथे  आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या लौकिकाला साजेसा आणि भव्यदिव्य अशा स्वरूपात व्हावा, असे निर्देश काल झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ  शिंदे यांनी  दिले आहेत.

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार भारतीय नौदलाच्यावतीने या कार्यक्रमांचे नियोजन करण्यात येत आहे.  प्रधानमंत्री तसेच विविध मान्यवर या नौसेना दिवस कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार असल्याने आवश्यक बाबींचे काटेकोरपणे नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

बैठकीस सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण,  महाराष्ट्र नौसेना क्षेत्राचे ध्वज अधिकारी रियर ॲडमिरल ए.एन.प्रमोद, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनिषा म्हैसकर- पाटणकर आदी उपस्थित होते.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच सिंधुदुर्ग जिल्ह्यात

या वर्षीचा नौसेना दिन साजरा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 4 डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग किल्ल्यावर येणार आहेत. त्याचवेळी सिंधुदुर्ग किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा ब्राँझ पुतळ्याचे अनावरण पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिल्यांदाच सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणार आहेत.

एलटीटी – एर्नाकुलम दुरांतो एक्सप्रेस पनवेल स्थानकावर थांबणार

 

Konkan Railway News :कोंकण रेल्वे मार्गावर धावणारी लांब पल्ल्याची एलटीटी – एर्नाकुलम दुरांतो एक्सप्रेस या जलद गाडीला  पनवेल या स्थानकावर थांबा मिळणार आहे. 26 ऑगस्ट पासून हा बदल अमलात आणला जाणार असल्याचे मध्य रेल्वेने जाहीर केले आहे.

आठवड्यातुन दोन दिवस धावणारी या गाडीची पनवेल स्थानकावर थांबण्याची वेळ जाहीर करण्यात आली आहे. एलटीटी स्थानकावरून रात्री 20:50 वाजता सुटणारी गाडी क्रमांक 12223 एलटीटी – एर्नाकुलम दुरांतो एक्सप्रेस  पनवेल स्थानकावर रात्री 21: 44 वाजता येणार असून दोन मिनिटांचा थांबा घेऊन निघणार आहे. या गाडीचा रत्नागिरी या स्थानकावरील वेळ रात्री 02:25 असून या स्थानकावर तिचा पाच मिनिटांचा थांबा आहे.

परतीच्या प्रवासात एर्नाकुलम स्थानकावरून रात्री 21:45 वाजता सुटणारी गाडी क्रमांक 12224 एलटीटी – एर्नाकुलम दुरांतो एक्सप्रेस  पनवेल स्थानकावर संध्याकाळी 17:02 वाजता येणार असून दोन मिनिटांचा थांबा घेऊन निघणार आहे. या गाडीचा रत्नागिरी या स्थानकावरील वेळ दुपारी 15:30 असून या स्थानकावर तिचा पाच मिनिटांचा थांबा आहे.

अतिजलद आणि आरामशीर प्रवासासाठी दुरांतो एक्सप्रेस ओळखली जाते. एलटीटी – एर्नाकुलम दुरांतो एक्सप्रेस  12223/24 ही गाडी  एलटीटी – एर्नाकुलम या स्थानकादरम्यान ही  फक्त रत्नागिरी, मडगाव, कोझिकोडे मेन आणि मंगुळुरु या चार स्थानकावर थांबते. एलटीटी वरून सुटून ही गाडी डायरेक्ट रत्नागिरी स्थानकावर थांबत होती. या गाडीला पनवेल येथे थांबा मिळावा यासाठी अनेक दिवसांपासून मागणी होती. रेल्वे बोर्डाने ही मागणी पूर्ण केली आहे. मात्र दक्षिणेकडील कुन्नूर, कासारगोड आणि शोरानूर या स्थानकावर या गाडीला थांबा मिळावा या मागणीकडे रेल्वे बोर्डाने दुर्लक्ष केले आहे.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search