Author Archives: Kokanai Digital

Konkan Railway: मुंबई गोवा वंदे भारत एक्सप्रेसवर कन्नडीगांचा डोळा

   Follow us on        
Mumbai Goa Vande Bharat Express:
मुंबई गोवा वंदे भारत एक्सप्रेस पुढे मंगुळुरूपर्यंत विस्तारित करण्याचे प्रयत्न चालू झाले आहेत. सध्या कोकण रेल्वे मार्गावर धावत असलेली मुंबई मडगाव वंदे भारत एक्सप्रेस आणि मडगाव मंगुळुरु एक्सप्रेस या दोन्ही गाड्या एकत्र करून  मुंबई – मंगुळुरु अशी अखंड वंदे भारत एक्सप्रेस चालविण्याबाबत रेल्वे प्रशासन योजना आखत असल्याचे वृत्त मातृभूमी या आघाडीच्या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले आहे.  कर्नाटकातील लोकप्रतिनिधींनी यासाठी प्रयत्नशील आहेत.
मुंबई मंगुळुरु वंदे भारत अशी अखंड वंदे भारत सेवा सुरु झाल्यास हे अंतर १२ तासांत कापता येईल आणि कर्नाटक कोस्टल भागातील प्रवाशांना एक जलद वाहतुकीचा पर्याय उपलब्ध होईल. सध्या कोकण रेल्वे मार्गावरील दोन्ही वंदे भारत एक्सप्रेसचा एकत्रित विचार करता त्या सरासरी ७० टक्के क्षमतेने धावत आहेत. मात्र मुंबई मंगुळुरु वंदे भारत अशी अखंड वंदे भारत सेवा सुरु झाल्यास हाच रेट १००% होईल असा युक्तिवाद करून ही मागणी करण्यात येत आहे.
सध्या मंगळुरू-गोवा वंदे भारत हा सर्वात कमी गर्दीच्या मार्गांपैकी एक आहे, ज्यामध्ये प्रवाशांची संख्या ४० टक्क्यांपेक्षा कमी आहे. यावर उपाय म्हणून, रेल्वेने सुरुवातीला कोझिकोडपर्यंत सेवा वाढवण्याचा प्रस्ताव ठेवला होता. तथापि, कर्नाटकातील राजकीय नेत्यांच्या विरोधामुळे ही योजना रद्द करण्यात आली. मुंबई-गोवा वंदे भारतचा प्रवास दर (Occupancy Rate)सुमारे ९० टक्के होता, परंतु त्यानंतर तो सुमारे ७० टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे. रेल्वेचा असा विश्वास आहे की मुंबई-गोवा आणि मंगळुरू-गोवा सेवा एकाच मुंबई-मंगळुरू मार्गात विलीन केल्याने पूर्ण प्रवासी क्षमता साध्य होण्यास मदत होईल.
सध्या, मुंबई-गोवा वंदे भारत सकाळी ५:२५ वाजता मुंबईहून निघते आणि दुपारी १:१० वाजता गोव्यात पोहोचते. प्रस्तावित वेळापत्रकानुसार, ती नंतर मंगळुरूला पोहोचेल तिथे संध्याकाळी ६:०० वाजता पोहोचेल. त्याचप्रमाणे, मंगळुरू-गोवा वंदे भारत सकाळी ८:३० वाजता मंगळुरूहून निघते आणि दुपारी १:१० वाजता गोव्यात पोहोचेल. जर ट्रेन मुंबईकडे निघाली तर ती रात्री ९:०० वाजता पोहोचेल अशी अपेक्षा आहे. तथापि, या वेळी मुंबईच्या रेल्वे प्लॅटफॉर्मवर गर्दीमुळे आव्हान निर्माण होऊ शकते. कारण याच वेळी अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या याच  वेळी मुंबईला येतात. मध्य रेल्वेने मुंबई-मंगळुरू वंदे भारत वेळापत्रकात बदल करण्याची आवश्यकता असल्याचे सूचित केले आहे.
वरील वृत्त मातृभूमी या आघाडीच्या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले आहे. कर्नाटकातील लोकप्रतिनिधींनी यासाठी प्रयत्न चालू केले आहेत. महाराष्ट्रातील कोकण रेल्वे  प्रवासी संघटनांनी याला विरोध केला आहे. . मुंबई-गोवा वंदे भारतचा प्रवास दर (Occupancy Rate) सुमारे ७० टक्क्यांपर्यंत आला असल्याची बातमी खोटी असून सध्या तो ९०% च्या वर आहे.  सध्याची मुंबई  गोवा वंदे भारत एक्सप्रेस तशीच ठेवून मुंबई ते मंगुळुरु दरम्यान स्लीपर वंदे भारत चालू करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्रातील कोकण रेल्वे  प्रवासी संघटनांनी केली आहे.

मुंबई गोवा मार्ग पुढील ६ महिन्यात पूर्ण होणार; प्रकल्पाचा खर्च १९,४६९ कोटी रुपयांपर्यंत वाढणार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

   Follow us on        
Mumbai Goa Highway:
संपूर्ण गोवा-मुंबई राष्ट्रीय महामार्ग-६६ चे चौपदरीकरण पुढील सहा महिन्यांत पूर्ण होणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. या मार्गाचे जवळजवळ ४६३ किमी लांबीचे काम आधीच पूर्ण झाले आहे, त्यामुळे संबंधित राज्य सरकारांशी झालेल्या चर्चेनंतर प्रकल्पाशी संबंधित सर्व प्रलंबित समस्या सोडवण्यात आल्या आहेत.
मुंबई आणि गोवादरम्यान कनेक्टिव्हिटी सुधारणे आणि प्रवासाचा वेळ कमी करणे हे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे, त्यामुळे या प्रदेशातील पायाभूत सुविधांमध्ये लक्षणीय वाढ होईल. तथापि, विविध समायोजन आणि व्याप्ती बदलांमुळे संपूर्ण प्रकल्पाचा खर्च १९,४६९ कोटी रुपयांपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे, असेही गडकरी यांनी सांगितले.
या प्रकल्पाच्या पूर्णतेमुळे वाहतूक कार्यक्षमता सुधारेल, आर्थिक फायदे मिळतील आणि गोवा आणि मुंबई दरम्यान प्रवास करणाऱ्या लोकांसाठी एकूण प्रवास अनुभव वाढेल अशी अपेक्षा आहे असे ते पुढे म्हणालेत.

मुंबई – सिंधुदुर्ग विमानसेवा पुन्हा सुरु करण्यासाठी प्रयत्न सुरु

   Follow us on        
सिंधुदुर्ग:
गेले काही महिने चिपी विमानतळ मुंबई ते सिंधुदुर्ग बंद असेलेली विमानसेवा सुरु होण्याची आशा निर्माण झाली आहे. अलीकडेच खा. नारायण राणे यांनी नागरी विमान वाहतूक मंत्री के. राम मोहन नायडू तसेच नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची यांची भेट घेतली. मंत्री के.राम मोहन नायडू यांनी याबाबत विशेष योजना अंमलात आणण्यात येईल असे खा. नारायण राणे यांना आश्वासीत केले आहे.
Recently, MP Narayan Rane met with Civil Aviation Minister K. Ram Mohan Naidu and Minister of State for Civil Aviation Muralidhar Mohol. Minister K. Ram Mohan Naidu assured MP Narayan Rane that the Mumbai-Singhudurg airline service will be restarted very soon.
अलायन्स एअरने मुंबई-सिंधुदुर्गा-मुंबई दरम्यान उड्डाणे सुरू केली होती. आरसीएस चा कालावधी ३ वर्षांचा होता, जो ऑक्टोबर २०२४ मध्ये संपला. उड्डाण सेवा थांबवल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन आणि अर्थव्यवस्थेवर तसेच एअरलाइन वापरकर्त्यांवर वाईट परिणाम झाला आहे. मुंबई ते चिपी सेवा कार्यान्वित असताना पर्यटकांना, जिल्हावासीयांना मोठा लाभ होत होता. स्थानिक प्रवासी आणि जिल्ह्यातील अर्थव्यवस्थेला मिळणारि उभारी लक्षात घेता सिंधुदुर्गासाठी आरसीएस आणखी पाच वर्षांसाठी वाढवावी, सिंधुदुर्गासाठी अलायन्स एअर सेवा पुन्हा सुरू करावी. अशी भुमिका खा. राणे यांनी स्पष्ट केली. ही सेवा पुनः मुंबई-सिंधुदुर्ग-मुंबई अशी सेवा सुरु करण्यासाठी उड्डाण संचालनालयाने विशेष धोरण अंमलात आणावे यासाठी खा. नारायण राणे आग्रही आहेत.

धक्कादायक! राज्य सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या महामार्गाच्या दिशादर्शक फलकांवरील गावांची नावे चक्क हिंदीत.

   Follow us on        
महाराष्ट्र:-
मराठी भाषेला अलीकडेच अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. मात्र राज्यात मराठीचे महत्व कमी करून त्याजागी हिंदीचा वापर होत असल्याने मराठी भाषिक जनता दुखावली जात आहे. असाच एक प्रकार नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावर घडला आहे.
या महामार्गाच्या फलकावरची नावे चक्क हिंदीत छापण्यात आली आहेत. उदाहरणार्थ जंबारगांवच्या जागी जंबारगाँव, करंजगावच्या जागी करंजगाँव तर हडस पिंपळगांवच्या जागी  हडस पिंपलगाँव अशा नावाचे फलक लावण्यात आले आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे समृद्धी महामार्ग केंद्र सरकारच्या अखत्यारीत न येत तो राज्य सरकारच्या अखत्यारीत येत आहे. असे असूनही इथे मराठी भाषा डावलली जात असल्याने मराठी भाषिक जनता दुखावली गेली आहे. या महामार्गावरील सर्व फलकांवरची  नावे ताबडतोब मराठीमध्ये करण्यात यावीत अशी मागणी करण्यात येत आहे.

Konkan Railway Disruption: मुंबईहून कोकणात जाणार्‍या दोन गाड्या उशिरा सुटणार

   Follow us on        

Konkan Railway 07:45 PM:

कोकण रेल्वे मार्गावर आज आडवली स्थानका जवळ ओव्हरहेड सपोर्ट वायर तुटल्याने कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळित झाली होती. परिणामी (पेअरींग गाड्या उशिराने धावत असल्याने) मुंबईहून गोव्यासाठी सुटणार्‍या दोन गाड्या उशिराने सोडण्यात येणार आहेत.

मध्य रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार आज दिनांक २२ मार्च रोजी सीएसएमटी मुंबई स्थानकावरून रात्री ११ वाजता सुटणारी गाडी क्रमांक २०१११ सीएसएमटी-मडगाव कोकणकन्या एक्सप्रेस २३ मार्च रोजी पहाटे ४:०० वाजता सोडण्यात येणार आहे.

एलटीटी मुंबई या स्थानकावरून दिनांक २३ मार्च रोजी ००:४५ वाजता सुटणारी गाडी क्रमांक ११०९९ एलटीटी मडगाव एक्सप्रेस ही गाडी २३ मार्च रोजी सकाळी ०४:०० वाजता सोडण्यात येणार आहे.


Konkan Railway 06:15 PM:

कोकण रेल्वे मार्गावर आज आडवली जवळ ओव्हरहेड वायरला सपोर्ट करणारी वायर तुटल्याने कोकण रेल्वेची वाहतूक काही काळ बंद झाली होती. वायर तुटल्याने मंगला एक्स्प्रेस व मांडवी व अन्य काही गाड्या वेगवेगळ्या स्थानकांवर थांबवण्यात आल्या होत्या.

आता ही वायर जोडण्यात आली असून रेल्वे मार्गावरील वाहतूक सुरू झाली असल्याचे कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सचिन देसाई यांनी सांगितले आहे. तरी देखील त्याचा परिणाम कोकण रेल्वेच्या वेळापत्रकावर झाला असून कोकण रेल्वेच्या गाड्या अजूनही सुमारे दोन ते तीन उशिराने धावत आहेत.

कोकण रेल्वे मार्गावरील काही गाड्यांची सध्याची स्थिती.. (06:15 pm) 

सीएसएमटी मडगाव मांडवी एक्सप्रेस वैभववाडी स्थानकावर पोहोचली असून ती सुमारे ४ तास उशिराने धावत आहे तर मडगाव सीएसएमटी मांडवी एक्सप्रेस आडवली स्थानकावरून नुकतीच निघाली असून ती सुमारे चार तास उशिराने धावत आहे. दिवा सावंतवाडी एक्सप्रेस आताच आडवली स्थानकावर आली असून ती सुमारे साडेतीन तास उशिराने धावत आहे. मडगाव एलटीटी सिंधुदुर्ग स्थानकावर असून ती तीन तास उशिराने धावत आहे.

कोकण रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण आणि अन्य मागण्यांसाठी खासदार रविंद्र वायकर यांची केंद्रीय रेल्वे मंत्र्यांसोबत भेट

   Follow us on        

Konkan Railway: कोकण रेल्वेच्या दुपदरीकरणाचे काम लवकरात लवकर सुरु करण्यात यावे तसेच महाराष्ट्रात रेल्वेच्या कारभारात मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर करण्यात यावा अशी मागणी मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्राचे शिंदे सेनेचे खासदार रविंद्र वायकर यांनी निवेदनाद्वारे केंद्रीय रेल्वे मंत्री अश्वनी वैष्णव यांच्याकडे केली आहे. खासदार वायकर यांनी काल केंद्रीय रेल्वे मंत्र्यांची लोकसभेतील त्यांच्या दालनात भेट घेतली. रेल्वेशी निगडीत विविध विषयांचे त्यांना निवेदन दिले. यात जोगेश्वरी येथे नव्याने टर्मिनल बनवण्यात येत आहे, या टर्मिनलला हाँगकाँगच्या धर्तीवर मल्टीमोडेल कनेक्टीविटीने जोडण्यात यावे. येथे पार्किंग, हॉटेल्स तसेच मॉल्सची सुविधा करण्यात यावी.

कोकण रेल्वेच्या दुपदरी कामासाठी बैठक घेण्यात येईल असे आश्वासन बजेट मध्ये देण्यात आले होते. पण हो बैठक अद्याप घेण्यात आली नसल्याकडे लक्ष वेधत कोकण रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाचे (३७० किलो मीटर) काम सुरु करण्यात यावे. कोकण रेल्वे स्वतंत्र महामंडळ असले तरी गोवा व महाराष्ट्र सरकारने भारतीय रेल्वे मध्ये विलीनिकरणास तयारी दर्शवली आहे अशी माहिती खासदार वायकर यांनी रेल्वे मंत्री यांनी दिली.

माननीय मंत्री महोदयांना दिलेल्या निवेदनात मांडलेल्या काही महत्त्वाच्या समस्या : 

  • जोगेश्वरीला जंक्शन हे हाँगकाँगच्या धर्तीवर मल्टी-मॉडल कनेक्टिव्हिटीने जोडलेले असावे. तसेच तिथे कार पार्किंग, हॉटेल, मॉल आदी सुविधा उपलब्ध असाव्या .
  • रेल्वे स्थानकांवरील, विशेषतः कल्याणच्या पुढच्या स्थानकांच्या, स्वच्छतागृहांची अवस्था बिकट आहे. दुर्गंधी, पाण्याचा अभाव, स्तनपान कक्षांची अनुपलब्धता इत्यादी सुधारणा करण्याची आवश्यकता आहे.
  • मराठी भाषेला आता राजभाषेचा दर्जा मिळाला असल्याने महाराष्ट्रात सर्वच कारभारात, विशेषतः रेल्वेच्या कारभारात मराठी भाषा अनिवार्य असावी.
  • एसी लोकलची फ्रिक्वेन्सी किंवा एसी गाड्यांची संख्या वाढवण्यात याव्या
  • उपनगरीय रेल्वेमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी राखीव डबा असूनही कित्येकदा इतर नागरिक त्या डब्यात प्रवास करत असल्याने ज्येष्ठ नागरिकांना उभे राहून प्रवास करावा लागतो. ज्येष्ठ नागरिकांच्या या गैरसोयींवर ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे.

 

कोकण रेल्वे

  • प्रवाशांची वाढती गर्दी आणि कोकण रेल्वेचा सिंगल ट्रॅक यामुळे होणाऱ्या अडचणींवर उपाय म्हणून कोकण रेल्वे डबल ट्रॅक करण्यासाठी प्रयत्न करून हा प्रकल्प पुढे नेण्यात यावा.
  • अनेक स्थानकांची स्वच्छता अत्यंत निकृष्ट आहे. पाणीपुरवठा आणि स्वच्छतागृहांची स्थितीही समाधानकारक नाही. आजही अनेक स्थानकांवर छत नसल्याने प्रवाशांना नाहक ऊन, पावसाचा सामना करावा लागत आहे.
  • कोकण रेल्वे मार्गावरील सर्व स्थानकांवर सोलर पॅनल बसवावेत.
  • कोकण रेल्वे मार्गावरील सर्व जुने बोगदे व पुलांचे सर्वेक्षण करून वेळोवेळी आवश्यकतेनुसार दुरुस्तीचे काम करण्यात यावे.
  • मालगाड्यांचे वेळापत्रक अशा प्रकारे ठरवावे की त्यामुळे प्रवासी गाड्यांच्या वेळापत्रकात अडथळा येणार नाही.

२२ मार्च पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-अष्टमी – 29:26:23 पर्यंत
  • नक्षत्र-मूळ – 27:24:09 पर्यंत
  • करण-बालव – 17:01:48 पर्यंत, कौलव – 29:26:23 पर्यंत
  • पक्ष- कृष्ण
  • योग-व्यतापता – 18:35:04 पर्यंत
  • वार- शनिवार
  • सूर्योदय- 06:43
  • सूर्यास्त- 18:48
  • चन्द्र-राशि-धनु
  • चंद्रोदय- 25:48:59
  • चंद्रास्त- 11:50:00
  • ऋतु- वसंत

जागतिक दिन :
  • World Water Day – जागतिक पाणी दिवस
  • Bihar Diwas – बिहार दिवस
महत्त्वाच्या घटना :
  • 1739 : नादिरशहाने दिल्ली ताब्यात घेतली.
  • 1933 : डखाऊ छळछावणीची सुरुवात झाली, डखाउची छळछावणी म्युनिकच्या डखाऊ उपनगरात नाझी राजवटीच्या काळातील छळछावणी होती.
  • 1945 : अरब लीगची स्थापना झाली.
  • 1970 : हमीद दलवाई यांनी पुण्यात मुस्लिम सत्यशोधक मंडळाची स्थापना केली.
  • 1980 : पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ एनिमल्स (PETA) प्राणी हक्क संस्थाची स्थापना
  • 1996 : नासाचे स्पेस शटल अटलांटिस त्याच्या 16व्या मोहिमेवर प्रक्षेपित झाले
  • 1999 : लता मंगेशकर आणि भीमसेन जोशी यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर.
  • 2020 : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोविड-19 च्या प्रसाराशी लढा देण्यासाठी देशातील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या कर्फ्यूची घोषणा केली.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 1797 : विल्हेल्म (पहिला) – जर्मन सम्राट यांचा जन्म. (मृत्यू: 9 मार्च 1888)
  • 1924 : अल नेउहार्थ ( Allen Harold “Al” Neuharth) – यूए.एस.ए. टुडे चे स्थापक यांचा जन्म. (मृत्यू: 19 एप्रिल 2013)
  • 1924 : ‘मधुसूदन कालेलकर’ – नाटककार आणि पटकथाकार यांचा जन्म. (मृत्यू: 17 डिसेंबर 1985)
  • 1930 : ‘पॅट रॉबर्टसन’ – ख्रिश्चन प्रसारण नेटवर्क चे स्थापक यांचा जन्म.
  • 1933 : ‘अबोलहसन बनीसद्र’ – इराण चे पहिले अध्यक्ष यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 1832 : ‘योहान वूल्फगाँग गटें’ – जर्मन महाकवी आणि लेखक यांचे निधन. (जन्म: 28 ऑगस्ट 1749)
  • 1984 : ‘प्रभाकर पाध्ये’ – लेखक आणि पत्रकार यांचे निधन.
  • 2004 : ‘व्ही. एम. तारकुंडे’ – कायदेपंडित आणि मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बॅरिस्टर यांचे निधन. (जन्म: 3 जुलै 1909)


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

Konkan Railway: उन्हाळी हंगाम विशेष गाड्यांच्या आरक्षणाची तारीख जाहीर

   Follow us on        

Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर चालविण्यात येणाऱ्या उन्हाळी विशेष गाड्यांच्या आरक्षणाची तारीख जाहीर करण्यात आहे या गाड्यांचे आरक्षण दिनांक २४ मार्च २०२५ रोजी संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सकाळी ८ वाजल्यापासून उपलब्ध होणार असल्याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

या गाड्यांचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

१) गाडी क्रमांक ०११५१ / ०११५२ मुंबई सीएसएमटी- करमाळी. – मुंबई सीएसएमटी स्पेशल (साप्ताहिक): 

गाडी क्रमांक ०११५१ मुंबई सीएसएमटी – करमाळी स्पेशल (साप्ताहिक) दर गुरुवारी, १०/०४/२०२५ ते ०५/०६/२०२५ पर्यंत मुंबई सीएसएमटीहून ००:२० वाजता सुटेल आणि ट्रेन त्याच दिवशी दुपारी १:३० वाजता करमाळीला पोहोचेल.

गाडी क्रमांक ०११५२ करमाळी. – मुंबई सीएसएमटी स्पेशल (साप्ताहिक) दर गुरुवारी, १०/०४/२०२५ ते ०५/०६/२०२५ पर्यंत करमाळीहून दुपारी १:१५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ०३:४५ वाजता मुंबई सीएसएमटीला पोहोचेल.

ही गाडी दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिविम या स्थानकांवर थांबेल.

डब्यांची रचना : एकूण २२ कोच : दोन टायर एसी – ०१ कोच, थ्री टायर एसी – ०५ कोच, स्लीपर – १० कोच, जनरल – ०४ कोच , SLR – ०२

२) गाडी क्रमांक ०११२९ / ०११३० लोकमान्य टिळक (टी) – करमाळी – लोकमान्य टिळक (टी) विशेष (साप्ताहिक): 

गाडी क्रमांक ०११२९ लोकमान्य टिळक (टी) – करमाळी विशेष साप्ताहिक १०/०४/२०२५ ते ०५/०६/२०२५ पर्यंत दर गुरुवारी लोकमान्य टिळक (टी) येथून २२:१५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १२:०० वाजता करमाळीला पोहोचेल.

गाडी क्रमांक ०११३० करमाळी – लोकमान्य टिळक (टी) विशेष साप्ताहिक ११/०४/२०२५ ते ०६/०६/२०२५ पर्यंत दर शुक्रवारी करमाळीहून दुपारी २:३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ०४:०५ वाजता लोकमान्य टिळक (टी) येथे पोहोचेल.

ही गाडी ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिवि या स्थानकांवर थांबेल.

डब्यांची रचना : एकूण १९ एलएचबी कोच : फर्स्ट एसी – ०१ कोच, टू टायर एसी – ०२ कोच, थ्री टायर एसी – ०६ कोच, स्लीपर – ०८ कोच, जनरेटर कार – ०२

३) गाडी क्रमांक ०१०६३/०१०६४ लोकमान्य टिळक (टी) – तिरुवनंतपुरम उत्तर – लोकमान्य टिळक (टी) विशेष साप्ताहिक: 

गाडी क्रमांक ०१०६३ लोकमान्य टिळक (टी) – तिरुवनंतपुरम उत्तर विशेष साप्ताहिक ही गाडी दर गुरुवारी, ०३/०४/२०२५ ते २९/०५/२०२५ पर्यंत लोकमान्य टिळक (टी) येथून दुपारी ४:०० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी २२:४५ वाजता तिरुवनंतपुरम उत्तर येथे पोहोचेल.

गाडी क्रमांक ०१०६४ तिरुवनंतपुरम उत्तर – लोकमान्य टिळक (टी) विशेष साप्ताहिक ही गाडी ०५/०४/२०२५ ते ३१/०५/२०२५ पर्यंत दर शनिवारी तिरुवनंतपुरम उत्तर येथून सायंकाळी ४:२० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी लोकमान्य टिळक (टी) येथे ००:४५ वाजता पोहोचेल.

ही गाडी ठाणे, पनवेल, पेण, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम, करमाळी, मडगाव जंक्शन, कारवार, गोकर्ण रोड, कुमठा, मुर्डेश्वर, भटकळ, मुकुंदोब रोड, मुकुंदोब रोड, कुंडुरा रोड सुरथकल, मंगळुरु जं., कासरगोड, कन्नूर, कालिकत, तिरूर, शोरानूर जं., त्रिसूर, एर्नाकुलम टाउन, कोट्टायम, तिरुवल्ला, चेंगन्नूर, मावेलीकारा, कायनकुलम आणि कोल्लम जं. या स्थानकांवर थांबेल.

डब्यांची रचना : एकूण २२ एलएचबी कोच : टू टायर एसी – ०१ कोच, थ्री टायर एसी – ०६ कोच, स्लीपर – ०९ कोच, जनरल – ०४ कोच, जनरेटर कार – ०१, एसएलआर – ०१.

Konkan Tourism: समुद्रावरून जाणाऱ्या कोकणातील पहिल्या रोपवेला मंजुरी

   Follow us on        
दापोली: दापोलीतील हर्णे येथे गोवा किल्ला ते सुवर्णदुर्ग किल्ला असा समुद्रावरून जाणारा रोपवे व्हावा हे दापोलीतील पर्यटन प्रेमींचे आणि अभ्यासकांचे स्वप्न आता पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. दापोलीतील बांधकाम व्यावसायिक व सामाजिक कार्यकर्ते, मिहीर दीपक महाजन यांनी दिल्ली येथे २०२० च्या ऑक्टोबर महिन्यात मा. नितीनजी गडकरी यांची भेट घेत दापोलीतील हर्णे येथे गोवा किल्ला ते सुवर्णदुर्ग किल्ला असा समुद्रावरून जाणारा रोपवे करण्याची मागणी केली असता ” महाराष्ट्र शासनाकडून प्रस्ताव आल्यास तात्काळ मान्यता देण्यात येईल असे आश्वाशित केले होते. या प्रस्तावाचा पाठपुरावा करण्यासाठी विधान परिषदेच्या भाजपच्या आ. मा.सौ.उमा खापरे यांचे मोलाचे यांचे सहकार्य लाभले. महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन पर्यटन मंत्री मा. मंगलप्रभात लोढा यांनी रोपवेसाठी पर्यटन विभागाला तसा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले. पुरातत्व विभागाची देखील म्हत्वाची भूमिका असल्याने तत्कालीन सांस्कृतिक विभागाचे मंत्री मा. सुधीर मुनगंटीवार यांनी सहकार्य करत रोपवेला गती देण्यात महत्वाची भूमिका निभावली होती.
महायुतीच्या गतिमान सरकारच्या दि. १८ फेब्रुवारीच्या कॅबिनेट मिटिंग मध्ये या रोपवे ला हिरवा कंदील देण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या पर्वतमाला योजनेअंतर्गत गोवा किल्ला- सुवर्णदुर्ग किल्ला हा रोपवे घेण्यात आला असून, केंद्र सरकारचे NHLM आणि महाराष्ट्र शासनाचा सार्वजनिक बांधकाम विभाग या रोपवेचे काम कार्यान्वित करणार असल्याचा शासन निर्णय दि. १९ मार्च रोजी  झाला आहे.
ऐतिहासिक पार्श्वभूमी असणाऱ्या आणि सरखेल कान्होजी आंग्रेचे जन्मस्थान असणाऱ्या सुवर्णदुर्ग किल्ल्यावर जाण्यासाठी रोप वे झाल्याने दापोलीचे ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि पर्यटन क्षेत्रातील महत्व अधोरेखित होणार आहे. विशेषत्वाने प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती आणि अर्थव्यवस्थेला देखील मोठी चालना मिळणार असून गृहराज्य मंत्री योगेश कदम नेतृत्वात हा प्रकल्प पूर्णत्वाला जाण्याची खात्री आहे. रोप-वे करीता या सर्वाचे सहकार्य लाभल्याने समस्त दापोलीकरांच्या वतीने मिहीर महाजन यांनी आभार मानले आहेत.

आता हापूसच्या नावाने हापूसच विकला जाईल; आंबा उत्पादक शेतकर्‍यांनी घेतला हा महत्वपूर्ण निर्णय

   Follow us on        

देवगड: हापूस आंबा, विशेषतः देवगड हापूस, याच्या अस्सलपणाची खात्री करण्यासाठी आणि ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी आता युनिक आयडी (UID) कोड वापरला जाणार आहे. देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या युनिक आयडी कोडद्वारे ग्राहकांना खात्रीशीरपणे खरा देवगड हापूस आंबा मिळू शकेल.

हा कोड आंब्याच्या पेटीवर आणि उत्पादनावर लावला जाईल, ज्यामुळे बनावट किंवा इतर प्रजातींच्या आंब्यांना हापूस म्हणून विकण्याच्या प्रकारांना आळा बसेल. हा उपक्रम या वर्षाच्या हंगामापासून प्रभावीपणे लागू होत असल्याची माहिती आहे, ज्यामुळे ग्राहकांना त्यांच्या खरेदीची पडताळणी करता येईल आणि हापूसच्या नावाने होणारी तोतयागिरी थांबेल.

हापूस आंब्यासाठी युनिक आयडी (UID) प्रक्रिया

ही देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेने सुरू केलेली एक नाविन्यपूर्ण पद्धत आहे, ज्याचा उद्देश ग्राहकांना अस्सल देवगड हापूस आंब्याची खात्री देणे आणि बनावट आंब्यांना बाजारातून हद्दपार करणे हा आहे.

नोंदणी आणि कोड निर्मिती:

देवगडमधील प्रमाणित आंबा उत्पादक आणि विक्रेते यांची नोंदणी संस्थेकडे केली जाते. नोंदणीकृत उत्पादकाला संस्थेकडून त्याच्या उत्पादन क्षमतेच्या संख्येनुसार स्टिकर देण्यात येतील. या स्टिकर वर त्या शेतकर्‍याची माहिती असलेला UID नंबर असणार आहे.

आंब्यावर कोड लावणे:

हा युनिक आयडी कोड आंब्याच्या पेटीवर किंवा काही प्रकरणांमध्ये थेट आंब्याच्या स्टिकरवर लावला जाईल.

कोडमध्ये उत्पादकाची माहिती, आंब्याचा हंगाम, आणि उत्पत्तीचा तपशील (उदा., देवगड) समाविष्ट असणार आहे.

ग्राहकाद्वारे पडताळणी:

ग्राहक हा कोड स्कॅन करून (QR कोड असल्यास मोबाइलद्वारे) किंवा संस्थेच्या संकेतस्थळावर/अॅपवर टाकून आंब्याची अस्सलता तपासू शकतील.

यामुळे आंबा खरोखर देवगडचा हापूस आहे की नाही, याची खात्री पटेल.

 

या उपक्रमाचा उद्देश:

  • बनावट हापूस आंब्यांची विक्री रोखणे.
  • ग्राहकांचा विश्वास वाढवणे आणि हापूसच्या ब्रँडचे संरक्षण करणे.
  • उत्पादकांना त्यांच्या मेहनतीचे योग्य मूल्य मिळवून देणे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search