Author Archives: Kokanai Digital

सिंधुदुर्ग: जिल्हाधिकाऱ्यांकडून २०२६ वर्षातील ३ स्थानिक सुट्ट्या जाहीर

   Follow us on        

सिंधुदुर्ग: जिल्ह्यात सन २०२६ साठी तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी महसूल विभागाच्या नियमांनुसार अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. ही अधिसूचना दिनांक २० फेब्रुवारी २०२६ रोजी काढण्यात आली असून, ती जिल्ह्यातील शासकीय कार्यालये, महसूल विभाग आणि संबंधित यंत्रणांना लागू राहणार आहे.

या अधिसूचनेनुसार, खालीलप्रमाणे स्थानिक सुट्ट्या जाहीर झाल्या आहेत:

१७ ऑगस्ट २०२६ (सोमवार) – नागपंचमी

१८ सप्टेंबर २०२६ (शुक्रवार) – उज्वळी पौर्णिमा (उज्वळी पौर्णिमा / उज्वळी पौर्णिमा पूजन)

६ नोव्हेंबर २०२६ (शुक्रवार) – धनत्रयोदशी (धनत्रयोदशी / धनत्रयोधशी ज्योतिषी)

या सुट्ट्या जिल्ह्यातील महसूल हद्दीतील शासकीय कार्यालयांसाठी लागू असून, स्थानिक परंपरा आणि सणांचा विचार करून जिल्हाधिकाऱ्यांनी ही घोषणा केली आहे. अधिसूचना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर (sindhudurg.nic.in) उपलब्ध आहे.

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी डिजिटल स्वाक्षरी करून ही अधिसूचना प्रसिद्ध केली असून, ती मुख्य सचिव, सामान्य प्रशासन विभाग, मुंबई यांच्यापर्यंत विविध अधिकाऱ्यांना पाठवण्यात आली आहे. स्थानिक नागरिकांनी या सुट्ट्यांचा लाभ घेऊन सण उत्साहाने साजरा करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Mumbai Local: अतिरिक्‍त महसुलाच्या लोभापायी एसी लोकलच्या खिडक्या जाहिरातींनी झाकल्या; प्रवाशांची मोठी गैरसोय

   Follow us on        

मुंबई: मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या मध्य रेल्वेच्या एसी लोकल (AC EMU) सध्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आणि वादात सापडल्या आहेत. रेल्वेचे उत्पन्न वाढवण्यासाठी एसी लोकलच्या डब्यांच्या बाहेरील भागावर करण्यात आलेल्या जाहिरातींमुळे प्रवाशांच्या त्रासात भर पडली आहे. विशेषतः ‘अरुण आईस्क्रीम’ (Arun Icecreams) च्या जाहिरातीसाठी वापरण्यात आलेल्या जाहिरातींच्या विनाइल रॅपिंगमुळे प्रवाशांना डब्यातून बाहेरचे काहीच दिसत नसल्याच्या तक्रारी सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

​नेमका प्रकार काय?

​प्रसिद्ध पत्रकार आणि रेल्वे प्रवासी राजेंद्र बी. अकलेकर यांनी ट्विटरवर (X) काही फोटो शेअर करत हा गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांच्या दाव्यानुसार, सीएसएमटीहून सुटणाऱ्या रात्री २०:०० वाजताच्या कल्याण एसी लोकलच्या खिडक्यांवर इतक्या जाड थराचे विनाइल रॅपिंग करण्यात आले आहे की, खिडक्या पूर्णपणे अपारदर्शक (Opaque) झाल्या आहेत. यामुळे प्रवाशांना येणारे स्थानक किंवा प्लॅटफॉर्म ओळखणे कठीण होत आहे.

​रेल्वे प्रशासनाचे स्पष्टीकरण आणि प्रवाशांचा संताप

​या तक्रारीला उत्तर देताना DRM मुंबई (मध्य रेल्वे) यांनी सांगितले की, “एसी लोकलच्या डब्यांवर खिडक्यांसह विनाइल रॅपिंग करण्याची परवानगी आहे, मात्र आतून ८०% दृश्यमानता (Visibility) राखणे बंधनकारक आहे. जर दृश्यमानतेत काही अडथळा येत असेल, तर त्याची तपासणी करून दुरुस्ती केली जाईल.”

रेल्वे प्रशासनाने दिलेल्या या तांत्रिक स्पष्टीकरणानंतर प्रवाशांमधील संताप कमी होण्याऐवजी अधिकच वाढला आहे. प्रवाशांच्या मते, रात्रीच्या वेळी परिस्थिती अत्यंत बिकट होते; दिवसा तरी प्रकाशाच्या जोरावर थोडीफार दृश्यमानता मिळते, परंतु रात्रीच्या काळोखात डब्यातून बाहेरचे स्थानक किंवा प्लॅटफॉर्म ओळखणे अशक्य होते. रेल्वेने ८० टक्के दृश्यमानतेचा जो दावा केला आहे, तो केवळ कागदावरच असून प्रत्यक्षात प्रवाशांना शून्याच्या बरोबरीने दिसत असल्याची टीका होत आहे. केवळ महसूल मिळवण्याच्या ‘लोभी’ वृत्तीपोटी प्रवाशांच्या सुरक्षिततेशी आणि सोयींशी तडजोड केली जात असल्याचा गंभीर आरोप करत, रेल्वेला प्रवाशांच्या हितापेक्षा जाहिरातींचे उत्पन्नच अधिक महत्त्वाचे वाटते का, असा सवाल संतप्त मुंबईकरांनी उपस्थित केला आहे.

​प्रवाशांची मागणी

​सोशल मीडियावर अनेक प्रवाशांनी “DRM साहेबांनी स्वतःच्या केबिनमधून बाहेर पडून प्रत्यक्ष पाहणी करावी,” अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. जाहिरात लावणाऱ्या कंपन्यांच्या निकृष्ट कामामुळे (Poor Workmanship) सामान्य प्रवाशांना हा त्रास सहन करावा लागत आहे. ही समस्या तात्काळ सोडवून खिडक्यांवरील अडथळे दूर करावेत, अशी मागणी आता जोर धरत आहे.

प्रवाशांनो इथे लक्ष द्या! दिवा – चिपळूण मेमूची दिनांक ०१ मार्च रोजीची फेरी रद्द | पनवेलहुन कोकणात जाणाऱ्या अजून एका होळी विशेष गाडीची घोषणा

   Follow us on        

दि. २७ फेब्रुवारी २०२६: कोकण रेल्वे प्रशासनाने चिपळूण – दिवा – चिपळूण मार्गावरील मेमू अनारक्षित विशेष गाडी क्रमांक ०११६० / ०११५९ च्या धावण्याच्या प्रारंभ तारखेत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. गाडी क्रमांक ०११६० ही चिपळूण येथून पूर्वी जाहीर केल्याप्रमाणे ०१ मार्च २०२६ पासून धावणार होती; मात्र सुधारित नियोजनानुसार ती आता ०२ मार्च २०२६ ते ०८ मार्च २०२६ या कालावधीत धावेल. त्यानुसार दिवा येथून सुटणारी गाडी क्रमांक ०११५९ च्याही सेवेत तदनुरूप बदल करण्यात आले आहेत. प्रवाशांनी सुधारित तारखांची नोंद घेऊन आपला प्रवास नियोजित करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

होळी २०२६ निमित्त पनवेलहुन कोकणात जाणाऱ्या अजून एका होळी विशेष गाडीची घोषणा

होळी सणाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने Indian Railways प्रशासनामार्फत मडगाव जं.–पनवेल–मडगाव जं. दरम्यान विशेष साप्ताहिक गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

गाडी क्रमांक 01106 / 01105 मडगाव जं. – पनवेल – मडगाव जं. साप्ताहिक विशेष

गाडी क्रमांक 01106 मडगाव जं.–पनवेल विशेष ही गाडी दि. 04 मार्च 2026 (बुधवार) रोजी मडगाव जंक्शन येथून सायं. 16:30 वाजता सुटेल व दुसऱ्या दिवशी पहाटे 04:00 वाजता पनवेल येथे पोहोचेल.

परतीच्या प्रवासासाठी गाडी क्रमांक 01105 पनवेल–मडगाव जं. विशेष ही गाडी दि. 05 मार्च 2026 (गुरुवार) रोजी पनवेल येथून सकाळी 05:45 वाजता सुटेल व त्याच दिवशी सायं. 18:10 वाजता मडगाव जंक्शन येथे पोहोचेल.

थांबे खालीलप्रमाणे असतील :
करमाळी, थिवीम, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, विलवडे, अडावली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा आणि पेन.

रचना (Composition) :
एकूण 20 डबे – 18 स्लीपर कोच व 2 एसएलआर डबे.

गाडी क्रमांक 01106 साठी आरक्षण दि. 28/02/2026 पासून सर्व प्रवासी आरक्षण प्रणाली (PRS), इंटरनेट तसेच IRCTCच्या संकेतस्थळावर उपलब्ध होईल.

अधिक माहितीसाठी व सविस्तर वेळापत्रक पाहण्यासाठी प्रवाशांनी Indian Railwaysच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

होळीच्या सणासाठी कोकण व मुंबईदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या विशेष गाडीचा मोठा दिलासा मिळणार आहे.

दोडामार्ग आणि सावंतवाडीतील २५ गावांना ‘इको सेन्सिटिव्ह झोन’चा दर्जा; खाणकाम आणि प्रदूषणकारी प्रकल्पांवर बंदी

   Follow us on        

सावंतवाडी: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग आणि सावंतवाडी तालुक्यातील २५ गावांसाठी केंद्र सरकारने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने या गावांना ‘इको सेन्सिटिव्ह झोन’ (ESZ) म्हणून जाहीर करणारी अंतिम अधिसूचना प्रसिद्ध केली असून, यामुळे या भागात प्रस्तावित असलेल्या खाणकामांना आणि पर्यावरणाचे नुकसान करणाऱ्या मोठ्या प्रकल्पांना आता अधिकृतपणे चाप बसणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही प्रक्रिया राबवण्यात आली असून, मंगळवारी केंद्र सरकारने यावर अंतिम शिक्कामोर्तब केले. विशेष म्हणजे, २०१० सालापासून ‘वनशक्ती’ या संस्थेच्या माध्यमातून स्टॅलिन दयानंद यांनी हा न्यायालयीन लढा यशस्वीपणे सुरू ठेवला होता.

या नव्या अधिसूचनेमुळे आता संबंधित गावांमध्ये खाणकाम, ‘लाल श्रेणी’तील प्रदूषणकारी उद्योग आणि वनसंपदेला धोका निर्माण करणाऱ्या प्रकल्पांवर पूर्णपणे बंदी असेल. या निर्णयाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय समिती स्थापन करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी या समितीचे अध्यक्ष असतील, तर उपवनसंरक्षक हे सचिव म्हणून काम पाहतील. ही समिती वर्षभराच्या आत स्थापन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या पर्यावरणपूरक निर्णयामध्ये केसरी, फणसवडे, उडेली, दाभील-नेवली, सरमळे, ओटवणे, घारपी, असनिये, फुकेरी, तांबोळी, कोनशी, भालावल, भेकुर्ली, कुंभवडे, खडपडे, तळकट, झोळंबे, कोलझर, शिरवल, कुंभरल, पणतूर्ली, उगाडे, भिकेकोनाळ, कळणे आणि पडवे माजगाव या २५ गावांचा समावेश आहे.

Holi Special Trains: कोकण रेल्वे मार्गावर १ मार्च रोजी धावणार सीएसएमटी – सावंतवाडी विशेष एक्सप्रेस

   Follow us on        

मुंबई: होळी आणि आगामी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने मुंबई ते सावंतवाडी दरम्यान विशेष वातानुकूलित (AC) गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. ही गाडी पूर्णतः आरक्षित असून १ मार्च २०२६ रोजी दोन्ही बाजूंनी धावणार आहे.

​गाडीचे वेळापत्रक खालीलप्रमाणे:

​गाडी क्र. ०१०७१ (मुंबई ते सावंतवाडी):

ही गाडी रविवार, १ मार्च २०२६ रोजी मध्यरात्री ००:२० वाजता (म्हणजेच २८ फेब्रुवारीच्या रात्री) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी १२:३० वाजता सावंतवाडीला पोहोचेल.

​गाडी क्र. ०१०७२ (सावंतवाडी ते मुंबई):

परतीच्या प्रवासासाठी ही गाडी रविवार, १ मार्च २०२६ रोजी संध्याकाळी १७:२० वाजता सावंतवाडीहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ३:४५ वाजता मुंबईला पोहोचेल.

​सर्व थांब्यांची यादी (List of Halts):

​या विशेष गाडीला कोकण रेल्वे मार्गावरील महत्त्वाच्या स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे. स्थानकांची संपूर्ण यादी खालीलप्रमाणे आहे:

​१. दादर

२. ठाणे

३. पनवेल

४. पेण

५. रोहा

६. माणगाव

७. वीर

८. खेड

९. चिपळूण

१०. सावर्डा

११. आरवली रोड

१२. संगमेश्वर रोड

१३. रत्नागिरी १४. आडवली

१५. विलवडे

१६. राजापूर रोड

१७. वैभववाडी रोड

१८. नांदगाव रोड

१९. कणकवली

२०. सिंधुदुर्ग

२१. कुडाळ

​महत्त्वाची माहिती:

​डब्यांचे स्वरूप: या गाडीला ‘एसी थ्री टायर इकॉनॉमी’ (AC 3 Tier Economy) डबे जोडण्यात आले आहेत.

​आरक्षण: गाडी क्र. ०१०७१ चे बुकिंग सध्या सुरू झाले आहे. प्रवाशांनी अधिकृत संकेतस्थळ किंवा रेल्वेच्या ॲपवरून आपले आरक्षण निश्चित करावे.

​टीप: अधिकृत माहितीसाठी प्रवाशांनी www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा NTES ॲपचा वापर करावा.

Konkan Railway Recruitment: कोकण रेल्वेत १९० जागांसाठी भरती जाहीर; अर्ज कसा कराल?

   Follow us on        

नवी मुंबई: कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (KRCL) द्वारे अभियांत्रिकी पदवीधर, डिप्लोमा धारक आणि सामान्य प्रवाहातील पदवीधरांसाठी शिकाऊ उमेदवारी (Apprentice) प्रशिक्षणाची मोठी संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. ‘शिकाऊ उमेदवारी कायदा १९६१/१९७३’ अंतर्गत एकूण १९० जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे.

महत्त्वाचे तपशील:

संस्था: कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (भारत सरकारचा उपक्रम).

एकूण पदे: १९० जागा.

पात्रता: ज्या उमेदवारांनी २०२१, २०२२, २०२३, २०२४ आणि २०२५ या वर्षांत आपली पदवी किंवा डिप्लोमा पूर्ण केला आहे, ते यासाठी पात्र आहेत.

प्रशिक्षण कालावधी: १ वर्ष.

कामाचे ठिकाण: महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक राज्यातील कोकण रेल्वेची विविध स्थानके आणि कार्यक्षेत्रे.

पदनिहाय रिक्त जागांचा तपशील:

अर्ज करण्याची शेवटची तारीख: २१ मार्च २०२६

अर्ज कसा कराल? (How to Apply)

१. अधिकृत वेबसाइटला भेट द्या: सर्वात आधी कोकण रेल्वेच्या https://konkanrailway.com या अधिकृत संकेतस्थळावर जा.

२. भरतीचा विभाग शोधा: होमपेजवर गेल्यावर ‘Quick Links’ हा विभाग शोधा. त्यामध्ये ‘Graduate Apprentice / Technician Apprentice for training in KRCL’ या पर्यायावर क्लिक करा.

३. अधिसूचना वाचा: अर्ज करण्यापूर्वी दिलेली अधिकृत जाहिरात (Notification No: CO/APPR/2026/01) काळजीपूर्वक वाचा, जेणेकरून पात्रता आणि कागदपत्रांची स्पष्टता येईल.

४. नोंदणी आणि अर्ज: दिलेल्या ‘Apply Online’ लिंकवर क्लिक करा.

तुमची वैयक्तिक माहिती, शैक्षणिक पात्रता (Degree/Diploma) आणि इतर तपशील अचूक भरा.

जर तुम्ही अभियांत्रिकीचे विद्यार्थी असाल, तर तुम्हाला NATS (National Apprenticeship Training Scheme) पोर्टलवर नोंदणी केलेली असणे आवश्यक असू शकते.

५. कागदपत्रे अपलोड करा: तुमचे फोटो, स्वाक्षरी आणि आवश्यक शैक्षणिक प्रमाणपत्रे स्कॅन करून अपलोड करा.

६. अर्ज सबमिट करा: सर्व माहिती तपासून झाल्यावर ‘Submit’ बटणावर क्लिक करा आणि अर्जाची एक प्रिंट आऊट भविष्यातील संदर्भासाठी काढून ठेवा.

कर्जत-पळसदरी घाटात उतारावर मालगाडीचे नियंत्रण सुटले; थोडक्यात अनर्थ टळला! थरारक व्हिडिओ समोर

   Follow us on        

ठाणे: मध्य रेल्वेच्या पळसदरी आणि कर्जत रेल्वे स्थानकांदरम्यान गुरुवारी एक थरारक घटना घडली. उतारावरून धावणाऱ्या एका मालगाडीवरील नियंत्रण सुटल्याने ही गाडी प्रचंड वेगात धावू लागली. सुदैवाने, या वेळी अपघात झाला नाही आणि मोठा अनर्थ टळला आहे. मात्र, या गंभीर प्रकारामुळे रेल्वे प्रशासनात मोठी खळबळ उडाली असून मध्य रेल्वेने तातडीने चौकशीचे आदेश दिले आहेत.

​मिळालेल्या माहितीनुसार, तीन इंजिन असलेली ही मालगाडी मालवाहतूक करत असताना अचानक उतारावर तिचा वेग अनियंत्रित झाला. ही मालगाडी पळसदरी ते कर्जत दरम्यानच्या तीव्र उतारावरून धावत असताना रेल्वे कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आली. घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सतर्क करण्यात आले आणि पुढील धोके टाळण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली. सुदैवाने गाडी रुळावरून घसरली नाही किंवा दुसऱ्या कोणत्याही गाडीला धडकली नाही, ज्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

​प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, या मालगाडीच्या इंजिनमध्ये काही प्रशिक्षणार्थी लोको पायलट्स (Trainee Loco Pilots) कार्यरत होते. गाडी उतारावरून खाली येत असताना वेगावर योग्य नियंत्रण ठेवण्यास ते अपयशी ठरल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी या घटनेची पुष्टी केली असून, तांत्रिक बिघाड होता की मानवी चूक, याचा शोध घेण्यासाठी उच्चस्तरीय चौकशी सुरू केली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

व्हिडिओ येथे पहा 👇

मुंबईतील शाळकरी विद्यार्थ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी!

   Follow us on        

मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) ने २०२६-२७ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात इयत्ता १ ली ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी BEST बसने मोफत प्रवासाची सुविधा जाहीर केली आहे. हा निर्णय विशेषतः गणवेशधारी विद्यार्थ्यांसाठी असून, त्यांच्या घरापासून शाळेपर्यंतचा प्रवास आता पूर्णपणे मोफत होणार आहे.

या योजनेअंतर्गत ‘चलो कार्ड’ (Chalo Card) चा वापर करून विद्यार्थी मोफत प्रवास करू शकतात. गेल्या वर्षी (२०२५-२६) या योजनेचा लाभ ९,६२७ विद्यार्थ्यांना मिळाला होता, ज्यात प्राथमिक शाळेतील ६,०१८ आणि माध्यमिक शाळेतील ३,६०९ विद्यार्थी समाविष्ट होते.शिक्षण विभागासाठी एकूण ४,२४८ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मांडण्यात आला आहे, जो मागील वर्षीच्या तुलनेत १५% ने जास्त आहे.

या योजनेसाठी सुमारे ८.७० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ज्या भागांमध्ये नियमित BEST बस सेवा उपलब्ध नाही, तिथे विशेष बस सेवा सुरू करण्यात येणार आहे.पालकांवरील आर्थिक भार कमी होण्याबरोबरच विद्यार्थ्यांचा शाळेकडे जाण्याचा प्रवास सुरक्षित आणि सुलभ होईल, ज्यामुळे उपस्थिती वाढण्यास आणि शिक्षणाचा दर्जा सुधारण्यास मदत होईल.हे पाऊल मुंबईतील सार्वजनिक वाहतूक वाढवण्याबरोबरच शिक्षणाला प्रोत्साहन देणारे ठरेल!

 

 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालयातील शिक्षण मराठीतून सुरू व्हावे

मानवता विकास परिषद संस्थापक अध्यक्ष श्री. श्रीकांत सावंत यांनी मराठी भाषा गौरव दिनाच्या पार्श्वभूमीवर आग्रहाचे आवाहन.

   Follow us on        

मुंबई : मानवता विकास परिषद संस्थापक अध्यक्ष तसेच रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा सर्वांगीण विकास परीषद संस्थापक अध्यक्ष श्रीकांत सावंत यांनी एका प्रसिद्धी संदेशाद्वारे ‘मराठी भाषा गौरव दिन २०२६’ चे औचित्य साधून सरकारकडे मातृभाषेतून वैद्यकीय शिक्षणासाठी आग्रहपूर्वक आवाहन करत मागणी केली आहे. श्रीकांत सावंत यांनी प्रसिद्धी संदेशात नमूद केले आहे की ही मागणी, गेली अनेक वर्षे शासन तथा विविध लोकप्रतिनिधी, प्रशासन यांची थेट भेट घेत तसेच सामाजिक स्तरावरून देखिल पाठपुरावा करत सातत्याने लावून धरलेली आहे.

यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालयातील शिक्षण मराठीतून सुरू व्हावे, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे.

श्रीकांत सावंत प्रसिद्धी संदेशात म्हणतात की महाराष्ट्रात एमबीबीएस, आयुर्वेद, होमिओपॅथी, दंतचिकित्सा व नर्सिंग यांसारखे वैद्यकीय शिक्षण मराठी भाषेतून उपलब्ध होणे आवश्यक आहे.

कोकण व सिंधुदुर्गातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा बुद्धयांक तसेच कौशल्य हे अव्वल असल्याचे वारंवार सिद्ध होत आहे परंतु वैद्यकीय शिक्षणादरम्यान इंग्रजी भाषेतील न्यूनगंड दूर करण्यासाठी राज्य सरकारने हा निर्णय घ्यावा असे नमूद करताना हे शिक्षण ‘ऐच्छिक करा पण करा…’ असेही विशेष आग्रहपूर्वक आवाहन केले आहे.

महाराष्ट्र, कोकणसह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागातल्या तळागाळातील विद्यार्थी विद्यार्थीनीना मातृभाषेतून वैद्यकीय शिक्षणाचा लाभ झाला तर स्थानिक स्तरावरील विविध वैद्यकीय रिक्त पदांचा आपसुक, तत्काळ तसेच स्पर्धात्मक गुणवत्ता वाढ होत भरणा होईल. ग्रामीण भागातील वैद्यकीय सुविधा सुधारल्या की नगरे, महानगरे व शहरांतील वैद्यकीय यंत्रणांवरचा ताण देखिल नियंत्रणात येत संपूर्ण राष्ट्राची आरोग्य व्यवस्था सुधारेल अशी विशेष सूचना देखिल श्रीकांत सावंत यांनी प्रसिद्धी संदेशात केली आहे.

बदलत्या काळात ‘एआय’ ची अत्यावश्यकता आहे सोबतच मातृभाषेतून वैद्यकीय शिक्षण मिळाले तर जिल्ह्यातील असंख्य वैद्यकीय शिक्षण इच्छुकांना त्यांच्या बुद्धी व कौशल्थाला न्याय देण्याचे महत्वाचे कार्य घडेल असाही आशावाद ‘मराठी भाषा दिन २०२६’ च्या पार्श्वभूमीवर मानवता विकास परिषद व रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा सर्वांगीण विकास परीषद संस्थापक अध्यक्ष श्रीकांत सावंत यांनी व्यक्त केला आहे.

Konkan Railway: होळीसाठी कोकणात जाण्यासाठी पनवेलहून विशेष गाड्या

   Follow us on        

मडगाव: होळीच्या सणानिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची होणारी गर्दी पाहता रेल्वे प्रशासनाने जादा विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये मडगाव-पनवेल साप्ताहिक स्पेशल आणि रत्नागिरी-पनवेल दरम्यान मेमू (MEMU) स्पेशल ट्रेनचा समावेश आहे.

​१. मडगाव जं. – पनवेल – मडगाव जं. साप्ताहिक स्पेशल (01106 / 01105)

​गाडी क्र. 01106: मडगाव येथून शुक्रवार, २७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ०७:३० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी संध्याकाळी १८:५० वाजता पनवेलला पोहोचेल.

​गाडी क्र. 01105: पनवेल येथून शुक्रवार, २७ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री १९:५० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ०८:०० वाजता मडगावला पोहोचेल.

​या स्थानकांवर असेल थांबा:

करमळी, थिवि, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, विलवडे, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा आणि पेण.

​डब्यांची रचना: एकूण २० डबे (१८ शयनयान/Sleeper, २ एसएलआर).

​२. रत्नागिरी – पनवेल – रत्नागिरी अनारक्षित मेमू स्पेशल (01158 / 01157)

​गाडी क्र. 01158: रत्नागिरी येथून २७ फेब्रुवारी, २८ फेब्रुवारी आणि ०१ मार्च २०२६ रोजी सकाळी ०९:०० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी १६:१० वाजता पनवेलला पोहोचेल.

​गाडी क्र. 01157: पनवेल येथून २७ फेब्रुवारी, २८ फेब्रुवारी आणि ०१ मार्च २०२६ रोजी दुपारी १६:४० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री २३:५५ वाजता रत्नागिरीला पोहोचेल.

​या स्थानकांवर असेल थांबा:

भोके, उक्षी, संगमेश्वर रोड, कडवई, आरवली रोड, सावर्डे, कामथे, चिपळूण, अंजनी, खेड, कळंबणी बुद्रुक, दिवाणखवटी, विन्हेरे, करंजाडी, सापे वामणे, वीर, गोरेगाव रोड, माणगाव, इंदापूर, कोलाड, रोहा, नागोठणे, कासू, पेण, जिते, आपटा आणि सोमाटणे.

​डब्यांची रचना: एकूण ०८ मेमू डबे.

​प्रवाशांना आवाहन: होळीच्या काळात होणारी गैरसोय टाळण्यासाठी प्रवाशांनी या विशेष गाड्यांच्या सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search