Author Archives: Kokanai Digital

“एकाचे काम करायचे आहे; झोप नाही लागणार त्याशिवाय”… पत्रकार वारिसे हत्या प्रकरणी आरोपीची कॉल रेकॉर्डिंग पोलिसांच्या हाती.

Warishe Murder Case | पत्रकार शशिकांत वारीशे  यांच्या हत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी 11सदस्यीय एसआयटी लावण्यात आली आहे. या प्रकरणासाठी चार्जशीट दाखल करण्यात आली असून त्यात अनेक खुलाशे करण्यात आले आहेत. 
या प्रकरणाची चौकशी करताना पोलिसांच्या हाती एक कॉल रेकॉर्डिंग लागली आहे. या कॉल रेकॉर्डिंग मध्ये आपण वारीशे याला संपवणार आहे असे आरोपी पंढरीनाथ आंबेरकर समोरच्याला म्हणाला आहे. ही कॉल रेकॉर्डिंग आरोपीच्या जप्त केलेल्या मोबाईल फोन मध्ये पोलिसांना मिळाली आहे. 
कॉल रेकॉर्डिंग अशी होती 
“एकाच काम करायच आहे ….आज करणार त्याचं…..झोप नाही लागणार त्याशिवाय….बातमी वाचली?……वाचली बातमी?…….थांब पाठवतो…. “
या रेकॉर्डिंगतील मजकुरामुळे वारीशे यांची हत्या पूर्वनियोजित असल्याचे चार्जेशीट मध्ये नमूद केले गेले आहे.  या चार्जशीट नुसार आरोपी पंढरीनाथ आंबेरकर याने या आधीही अनेकदा पत्रकार वारीशे यांना त्यांच्या रिफायनरी विरोधी आणि आपल्या विरोधी लिखाणावरून धमक्या दिल्या होत्या. आंबेरकर याने याआधीही रिफायनरीला विरोध करणाऱ्या एका सरपंचाच्या २१ वर्षीय मुलाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला असल्याने आरोपीची गुन्हेगारी प्रवृत्ती दिसून येत आहे असेही चार्जशीटमध्ये नमूद केले गेले आहे. एका अग्रगण्य इंग्रजी वृत्तपत्राने ही चार्जशीट मिळवली आहे.
 नक्की काय घडले होते? 
सोमवारी सकाळी म्हणजे 6 फेब्रुवारीला सकाळी 8 वाजून 3 मिनिटांनी पत्रकार शशिकांत वारिसे यांनी वॉट्सअपवरील रिफायनरी ग्रुपवर एका बातमीची पोस्ट पाठवली होती.
‘पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो असलेल्या बॅनरवर त्यांच्यासोबत गंभीर गुन्ह्यातील आरोपींचे फोटो’ अशा आशयाच्या बातमीचे कात्रण शशिकांत वारिसे यांनी त्या वॉट्सअप ग्रुपवर पाठवले होते.
कोकणातील रिफायनरीचे समर्थक पंढरीनाथ आंबेरकर यांच्या जाहिरातींसंदर्भात ही बातमी होती. यानंतर दुपारी 1 वाजून 15 मिनिटांच्या आसपास शशिकांत वारिसे राजापूर-कोदवली या परिसरातून आपल्या दुचाकी वाहनावरून जात होते. त्याचवेळी तिथे असलेल्या पेट्रोल पंपासमोर भरधाव वेगाने समोरून ‘थार’ गाडी आली. या गाडीने शशिकांत वारिसे यांच्या दुचाकीला धडक दिली. यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी कोल्हापूरला हलवण्यात आलं. परंतु दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी 7 फेब्रुवारीला सकाळी त्यांचं निधन झालं. चौकशीअंती ती गाडी रिफायनरीचे समर्थक पंढरीनाथ आंबेरकर यांची असल्याचे आणि ते चालवत असल्याचे समोर आले होते. या प्रकरणाची सीआयटी चौकशी लावावी अशी मागणी करण्यात आली होती.

Vande Bharat Express | नवा कोरा रेक मडगाव रेल्वे स्थानकावर दाखल; लवकरच उद्घाटन

Konkan Railway News | मुंबई गोवा वंदे भारत एक्सप्रेस बद्दल एक महत्त्वाची बातमी आहे. चेन्नई येथील कोच फॅक्टरी मधून आठ डब्यांचा वंदे भारतचा नवा कोरा रेक आज मडगाव रेल्वे स्थानकावर दाखल होणार आहे. हा नवा रेक काल 27 मे ला रात्री साडेदहा वाजता उडपी स्थानक सोडून मडगाव रेल्वे स्थानकाकडे रवाना झाला होता.

मुंबई गोवा रेल्वे मार्गावर वंदे भारत एक्सप्रेसची यशस्वी चाचणी झाल्याने या मार्गावर ही एक्सप्रेस चालू होणार आहे हे निश्चित झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मडगाव स्थानकावर या एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन करणार आहेत. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत या सोहोळ्याला उपस्थितीत राहणार आहेत. कोकण रेल्वे मार्ग धावणारी पहिली वंदे भारत एक्सप्रेस ही उद्घाटनाच्या फेरीवेळी केवळ निमंत्रितांना घेऊन धावणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

या आधी रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या गाडीचे उद्घाटन मे महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात होणार आहे असे सांगण्यात आले होते. मात्र सद्यस्थिती पाहता हे उद्घाटन जून महिन्यात होण्याची शक्यता आहे.

 

 

बारसू सडा पुन्हा गजबजला; घालण्यात आले सरकारच ‘तेरावं’; मुंडण करून पिंडदानही केले

रत्नागिरी – बारसू येथील रिफायनरीला होणारा विरोध काही कमी होण्याची चिन्हे दिसत नाही आहेत. हल्लीच येथे जमिनीचा सर्व्हे करताना विरोधकांचा खूप मोठा विरोध पाहावयास मिळाला. त्यानंतर आंदोलने, उपोषण मोर्चा या मार्गाने कमी अधिक प्रमाणात विरोध होत होता. मात्र आता विरोधकांनी विरोध करण्यासाठी एका वेगळ्याच प्रकारचा अवलंब केला आहे.

ज्याठिकाणी मातीपरीक्षण करण्यासाठी खोदले होते नेमक्या त्याच ठिकाणी ग्रामस्थांनी सरकारचे श्राद्ध मांडले होते. त्यासाठी ग्रामस्थांनी चक्क मुंडण करून सरकारच्या नावाने बोंब मारली आहे.

सरकारने येथे जी दडपशाही चालवली आहे त्याविरोधात आम्ही सरकारचे श्राद्ध मांडून पिंडदान केले आहे. सरकारची दडपशाही अशीच चालू राहिली तर एकेदिवशी सरकारचे खरे श्राद्ध घातल्याशिवाय येथील शेतकरी स्वस्थ बसणार नाही असा इशारा यावेळी ग्रामस्थांनी सरकारला दिला आहे. 

विद्युत इंजिनचा तुटवडा; कोकण रेल्वे मार्गावरील ३ गाड्या डिझेल इंजिनसह धावणार

Konkan Railway News |कोकण रेल्वेमार्गाचे १००% विद्युतीकरण झाले असून जवळपास सर्व गाड्या विद्युत इंजिनसह धावत आहेत. मात्र विद्युत इंजिनाचा तुटवडा निर्माण झाल्याने या मार्गावरील तिन गाड्या डिझेल लोको जोडून चालवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाला घ्यावा लागला आहे.

कोकण रेल्वे मार्गावर इलेक्ट्रिक ट्रॅक्शनवर चालवल्या जाणाऱ्या मुंबई सीएसएमटी ते मडगाव (10103/20104) मांडवी एक्सप्रेस तसेच दिवा सावंतवाडी एक्सप्रेस (10105/10106) तसेच 50107/50108) सावंतवाडी- मडगाव -सावंतवाडी या तीन गाड्या दिनांक 27 मे रोजी च्या फेरीपासून इलेक्ट्रिक ऐवजी डिझेल लोको जोडून चालवण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. इलेक्ट्रिक लोकोचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे रेल्वेवर ही वेळ आली आहे. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या गाड्या आता पुन्हा एकदा डिझेल इंजिनसह धावणार आहेत. रेल्वेने हा निर्णय पुढील सूचना मिळेपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात घेतला आहे.

कोकण रेल्वेच्या अखत्यारीत येणाऱ्या 741 किलोमीटर मार्गांवर विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. विद्युतीकरण झाल्यामुलळे इंधनाची बचत होत असून प्रवाशांना वेगवान आणि प्रदूषणमुक्त वातावरणात प्रवास करणे शक्य होत आहे.

राज्यात मान्सूनचे आगमन लवकरच; कोकणात ‘या’ तारखेला दाखल होणार.. हवामान खात्याने दिली महत्त्वाची माहिती..

Mansoon Updates |भारतीय हवामान विभागाने मान्सून देशभरात कधी पसरणार आहे, याची माहितीच जारी केली आहे. राज्यात १६ जूनपर्यंत मान्सून सर्वत्र दाखल होणार आहे.

हवामान विभागाने मान्सूनचा चार आठवड्यांचा अंदाज जारी केला आहे. त्यानुसार देशात काही भागात २६ मे पासून मान्सूनची प्रगती दाखवली आहे.

कोकणात मान्सूनचे आगमन ९ जूनला होणार आहे. कोल्हापूर सातारा जिल्हय़ात याचवेळी तो पोचणार असला तरी तिथे जोर कमी राहणार आहे.

महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यात मान्सून १६ जूनपासून आगमन करणार आहे. तसेच याच कालावधीत तो देशातील उत्तर भागात पोहोचणार आहे.

शुक्रवारचा पाऊस मान्सून नव्हे
शुक्रवारी राज्यात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस झाला. हा पाऊस म्हणजे वाळवाच्या पावसाला सुरुवात झाल्याचे म्हटले जात आहे. वळवाचा पाऊस मान्सून दाखल होण्यापूर्वी आलेला असतो. यामुळे मान्सूनसाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे.

सध्या कुठे आहे मान्सून

सध्या मान्सूनचे वारेही कमकुवत राहण्याचा अंदाज आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पोर्ट ब्लेअरपासून 425 किमी अंतरावर असलेल्या नानकोवरी बेटावर मान्सून अडकला आहे. त्यामुळे मान्सून चार ते पाच दिवसांच्या विलंबाने देशात पोहोचू शकतो. केरळमध्ये साधारणपणे १ जून रोजी मान्सून दाखल होतो, परंतु यंदा तो ५ जून दरम्यान दाखल होऊ शकतो.

 







मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.
[email-subscribers-form id=”2″]

बारावी परीक्षेचा निकाल जाहीर; कोकण विभाग अव्वल

पुणे : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये घेतलेल्या बारावी परीक्षेचा निकाल गुरुवारी (दि.२५) दुपारी दाेन वाजता ऑनलाइन जाहीर झाला आहे.
राज्यात कोकणच्या मुलानी बाजी मारली असून सर्वाधिक निकाल ९६.०१ टक्के तर सर्वात कमी निकाल मुंबई ८८.१३ टक्के एवढा आहे. मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९३.७३ टक्के असून मुलांचा निकाल ८९.१४ टक्के एवढा आहे.मुलांपेक्षा ४.५९ टक्के जास्त आहे.
 महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व काेकण या नऊ विभागीय मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये उच्च माध्यमिक प्रमाणपत्र ( १२ वी ) परीक्षा घेण्यात आल्या हाेत्या. राज्यातील ३ हजार १९५ परीक्षा केंद्रांवर सुमारे १४ लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली हाेती. www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालाबाबतची इतर सांख्यिकीय माहिती मिळणार आहे. तर कनिष्ठ महाविद्यालयांना www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर एकत्रित निकाल उपलब्ध करून देण्यात आला आहे.

बारावी परीक्षेचा निकाल उद्या दि. २५ मे रोजी जाहीर होणार; निकाल ‘या’ वेबसाईटसवर पाहता येईल

HSC Result 2023 | राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च – एप्रिल २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल उद्या दि.25 मे रोजी दुपारी 2 वाजता ऑनलाईन जाहीर होणार असल्याची घोषणा राज्य मंडळाच्या वतीने करण्यात आली आहे.पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय शिक्षण मंडळांमार्फत परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण मंडळाच्या संकेतस्थळांवर उद्या दुपारी 2 नंतर उपलब्ध होतील. ऑनलाईन निकालानंतर गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती, पुनर्मूल्यांकना ऑनलाईन अर्ज स्विकारण्यात येतील. याबाबतची सविस्तर माहिती राज्य मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
या वेबसाईटवर पाहता येणार निकाल
www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर निकालासोबतच निकालाची संख्यिकीय माहिती उपलब्ध होईल. तसेच www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.

गणेशोत्सवास कोकणात जाण्यासाठी विमान सेवेचा पर्याय उपलब्ध; तिकीटदरही आवाक्यात…

Ganesh Chaturthi 2023 | गणेश चतुर्थीला गावी जाणाऱ्या भाविकांसाठी रेल्वेचे आरक्षण मिळण्यासाठी खूप मोठी कसरत करावी लागत आहे. येथे दलालांचा सुळसुळाट असल्याने कसरत करूनही तिकीट मिळणे कठीण झाले आहे. शेवटी दुसरा कोणता पर्याय नसल्याने दुप्पट ते तिप्पट भावात याच दलालांकडून तिकीट खरेदी करून प्रवास करावा लागतो. पण एसी वगळता ईतर श्रेणीतुन प्रवास करताना आरक्षण असूनही मोठा त्रास सहन करावा लागतो. या डब्यांना जनरल डब्यांचे स्वरुप येते.
दुसरीकडे मुंबई गोवा महामार्ग अजूनपर्यंत अपूर्ण आहे. अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाचे काम केल्याने रस्त्यावर खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी अजूनही एकेरी मार्गाने वाहतुक सुरू आहे. या कारणांमुळे गणेश चतुर्थी उत्सवा दरम्यान या मार्गावर वाहतुकीच्या अनेक समस्या निर्माण होणार आहेत.
या सर्व गोष्टीचा सर्वात जास्त त्रास सहन करावा लागतो तो तळकोकणातील चाकरमान्यांना. कारण अशा स्थितीत 500 किलोमीटर प्रवास करणे म्हणजे एक दिव्यच म्हणावे लागेल. मात्र आता त्यांना एक प्रवासाचा सोयीचा पर्याय उपलब्ध झाला आहे. सिंधुदुर्ग आणि गोवा सीमेवर पेडणे MOPA येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ झाल्याने आता मुंबईवरून तळकोकणात काही तासांत पोहचणे शक्य झाले आहे. या विमानतळावरून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग, सावंतवाडी, वेंगुर्ला आणि कुडाळ तालुके जवळ आहेत, त्यामुळे या तालुक्यातील प्रवाशांसाठी गावी पोहोचण्यासाठी हा एक सोयीचा व जलद पर्याय होऊ शकतो. 
आमच्या प्रतिनिधीने https://www.ixigo.com/ या ऑनलाईन फ्लाईट बुकिंग करणाऱ्या वेब पोर्टल वर चेक केले असता मुंबई ते गोवा SpiceJet या विमानसेवा देणार्‍या कंपनीचा तिकीटदर किमान १८१८ रुपये एव्हढा दाखवत आहे. त्यात INSTANT  हा कुपन कोडे अप्लाय केल्यावर ३०० रुपये सूट मिळत आहे. मात्र सुविधा शुल्क पकडून एक तिकीट १८१७ रुपये एवढ्या वाजवी दराला मिळत आहे. 
टीप –  बातमीत दिलेले तिकीट दर दिनांक 24 मे रोजी चेक करण्यात आले आहेत . विमानसेवेच्या तिकिटांचे दर काही बाबींवर अवलंबून असून ते अस्थिर असतात याची कृपया नोंद घ्यावी






मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

कोकण रेल्वे मार्गावरील ६ गाडयांना तात्पुरत्या स्वरूपात अतिरिक्त डबे

Konkan Railway News | उन्हाळी सुट्टीत कोकण रेल्वेमार्गे प्रवास करणाऱ्या प्रशांसाठी एक रेल्वेकडून महत्वाची बातमी आहे. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेतून रेल्वे प्रशासनाने या मार्गावर धावणाऱ्या काही गाडयांना तात्पुरत्या स्वरूपात अतिरिक्त डबे जोडण्याचा निर्णय घेतला आहे. या अतिरिक्त डब्यांमुळे प्रतीक्षा यादीतील प्रवाशांचा फायदा होणार आहे.

रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार खालील गाड्या अतिरिक्त डब्यांसहित समोर दिलेल्या तारखांना चालविण्यात येतील.

गाडी क्र./नाव अतिरिक्त डबे दिनांक
22908 Hapa - Madgaon Express01- Sleeper२४/०५/२३ बुधवार
22907 Madgaon Jn.  - Hapa Express01- Sleeper२६/०५/२०२३ शुक्रवार
20910 Porbandar - Kochuveli Express01- Sleeper२५/०५/२०२३ गुरुवार
20909 Kochuveli - Porbandar  Express01- Sleeper२८/०५/२०२३ रविवार
12431 Thiruvananthapuram Central - H. Nizamuddin “Rajdhani” Express01 - Three Tier AC२३/०५/२०२३ मंगळवार
12432 H. Nizamuddin - Thiruvananthapuram Central - “Rajdhani” Express01 - Three Tier AC२८/०५/२०२३ रविवार

OYO पर्यटन सर्व्हे; उन्हाळी पर्यटनासाठी समुद्रकिनाऱ्यांना व पर्वतीय प्रदेशांना पर्यटकांची पसंती

पर्यटन | उन्हाळी पर्यटनासाठी देशभरातील पर्यटकांनी पहिली पसंती गोवा आणि मनाली या ठिकाणांना दिल्याचे समोर आले आहे. OYO Summer Vacation index 2023 नुसार ही माहिती समोर आली आहे.

हॉटेलमध्ये वास्तव्यासाठी ऑनलाईन बुकिंग सेवा देणाऱ्या ओयो या कंपनीने केलेल्या सर्व्हेक्षणातून ही बाब समोर आली आहे.

OYO ने आपल्या अॅप द्वारे हे सर्व्हेक्षण केले आहे. या सर्वेक्षणात देशभरातील 15,000 लोकांना प्रश्न विचारण्यात आले. ओयोच्या सर्व्हेक्षणात सहभागी झालेल्यांपैकी एकूण 92 टक्के लोक देशातील विविध ठिकाणांना भेट देण्याचे नियोजन करत आहेत.

या सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की, लोकांचे प्राधान्य 1 ते 3 दिवसांच्या मुक्कामासह लहान सहलींना आहे. तसेच पर्यटन स्थळ कोणते आहे, हे देखील पर्यटकांसाठी खूप महत्वाचे असते.

या सर्व्हेक्षणात पर्यटकांनी पर्वतीय प्रदेशांना पर्यटनासाठी सर्वाधिक 30 टक्के पसंती दर्शवली आहे. तर त्या खालोखाल समुद्रकिनाऱ्यांना 26 टक्के मते मिळाली आहेत. ओयोने एका निवेदनाद्वारे ही माहिती दिली आहे.

ओयोने म्हटले आहे की, “भारताचे आवडते माउंटन डेस्टिनेशन मनाली आहे, त्यानंतर काश्मीर, मॅक्लॉड गंज, उटी आणि कूर्ग आहेत. तर समुद्रकिनाऱ्यांसाठी गोवा हा भारतीयांसाठी पसंतीचा मुख्य पर्याय आहे. एकूण 50 टक्के लोक गोव्यात प्रवास करू इच्छितात.

7 मे ते 14 मे 2023 या काळात हे संशोधन झाले आहे. त्यात म्हटले आहे की, “गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत गोव्यातील हॉटेल्सच्या मागणीत 20 टक्केपेक्षा जास्त वाढ झाली आहे. त्यानंतर अंदमान निकोबार, केरळ, पाँडेचेरी आणि गोकर्णचा समावेश आहे.”

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search