Author Archives: Kokanai Digital

पनवेल नांदेड एक्सप्रेस चिपळूणपर्यंत विस्तारित करण्याची मागणी.

ह्या कारणांसाठी होत आहे ही मागणी

  • ही गाडी पुण्यातून येते तेव्हा पुण्यात असलेल्या कोकणी बांधवांना ही लाभदायक ठरेल
  • मराठवाडा विभागातून थेट कोकणात आली तर कोकणात असलेल्या अधिकारी वर्गाला तसेच विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल.
  • ही गाडी पनवेल ते चिपळूण- दिवसा असल्याने या गाडीला प्रतिसादही चांगला मिळेल.

   Follow us on        

मुंबई : नांदेड -पनवेल एक्स्प्रेसचा चिपळूणपर्यंत विस्तार केला जावा, या मागणीसाठी बुधवारी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे एक निवेदन देण्यात आले आहे. जल फाउंडेशन कोकण विभाग या नोंदणीकृत संस्थेच्या एका शिष्टमंडळाकडून हे निवेदन दिले गेले आहे. मराठवाडा विभागातून थेट कोकणात येण्यासाठी ही रेल्वेगाडी उपयुक्त ठरणार असल्याने याकडे रेल्वे राज्य मंत्र्यांचे लक्ष वेधण्यात आले आहे.

गाडीचे सध्याचे वेळापत्रक

17613/17614 ही गाडी पनवेल ते हुजूर साहिब नांदेड स्थानकांदरम्यान चालविण्यात येत आहे. ही गाडी पनवेल स्थानकावरून संध्याकाळी 4 वाजता सुटते आणि दुसर्‍या दिवशी सकाळी 8 वाजून 45 मिनिटांनी हुजूर साहिब नांदेड स्थानकावर पोहोचते. परतीच्या प्रवासात ही गाडी हुजूर साहिब नांदेड ह्या स्थानकावरून संध्याकाळी 6 वाजुन 20 मिनिटांनी सुटते ती पनवेल स्थानकावर दुसर्‍या दिवशी सकाळी 9 वाजता पोहोचते.

(Also Read >कोंकणरेल्वेच्या गाड्यांच्या डब्यांच्या संरचनेत बदल…ह्या गाड्यांचे जनरल डबे कमी केलेत… )

हि गाडी चिपळूणपर्यंत विस्तारित होण्याच्या शक्यता

सकाळी पनवेल स्थानकावर 9 वाजता ही गाडी पोहोचल्यावर संध्याकाळी 4 वाजता नांदेड साठी निघते ह्या दरम्यानच्या वेळेमध्ये ही गाडी पुढे काही स्थानकांपर्यंत चालवता येवू शकते. पनवेल ते चिपळूण मधील अंतर साधारणपणे 3.30 तासाचे आहे. कोकण मार्गावरील इतर गाड्यांचे वेळापत्रक लक्षात घेऊन ह्या गाडीच्या वेळापत्रकात किंचित बदल करून तर ही गाडी पुढे चिपळूण पर्यंत विस्तारित करता येणे शक्य आहे.

(Also Read : कोकण रेल्वेमार्गावर धावणार एकेरीमार्गी विशेष गाडी)

ह्या विस्ताराने हे लाभ मिळतील
ही गाडी मराठवाडा विभागातून थेट कोकणात आली तर कोकणात असलेल्या अधिकारी वर्गाला तसेच विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल. तसेच ही गाडी पुण्यातून येते तेव्हा पुण्यात असलेल्या कोकणी बांधवांना ही प्रवास करायला सोपा पर्याय उपलब्ध होईल. ही गाडी पनवेल ते चिपळूण- दिवसा असल्याने या गाडीला प्रतिसादही चांगला मिळेल आणि आपल्याला एक गाडी मिळेल जेणेकरून इतर गाड्यांवर असलेला ताण कमी करण्यासाठी ही मदत होईल.

Loading

कोंकणरेल्वेच्या गाड्यांच्या डब्यांच्या संरचनेत बदल…ह्या गाड्यांचे जनरल डबे कमी केलेत… 

Konkan Railway News:कोकण रेल्वेमार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे. रेल्वे प्रशासनाने या मार्गावरील काही गाड्यांच्या डब्यांच्या संरचनेत बदल केला आहे. या  गाड्यांच्या  प्रत्येकी  २ जनरल डब्यांचे  इकॉनॉमी थ्री टायर एसी डब्यांमध्ये रूपांतर केले आहे.
या  गाड्या याआधी टु टायर एसी – ०२ + थ्री टायर एसी – ०६ + स्लीपर – ०८ + जनरल – ०४ + जनरेटर कार – ०२ असे मिळून एकूण २२ डब्याच्या संरचनेनुसार चालविण्यात येत होत्या  त्या आता खालील सुधारित डब्यांच्या संरचनेनुसार चालविण्यात येणार आहे.
टु टायर एसी – ०२ + थ्री टायर एसी – ०६ + इकॉनॉमी थ्री टायर एसी – ०२ +  स्लीपर – ०८ + जनरल – ०२ + जनरेटर कार – ०२ असे मिळून एकूण २२ डबे. ह्या गाड्यांच्या सर्व डबे LBH स्वरूपाचे असणार आहेत.
कोणत्या आहेत ह्या गाड्या?
1) 22653 / 22654 – तिरुवनंतपुरम सेंट्रल – हजरत निजामुद्दीन – तिरुवनंतपुरम सेंट्रल वीकली  एक्सप्रेस.
22653 ही गाडी दिनांक १७/१२/२०२२ तर 22654 हि गाडी दिनांक १९/१२/२०२२ पासून ह्या सुधारित डब्यांच्या रचनेनुसार धावणार आहेत.
ह्या गाडीचे कोकणातील थांबे.
वसई रोड, पनवेल, रत्नागिरी आणि  मडगाव.
2) 22633 / 22634 तिरुवनंतपुरम सेंट्रल – हजरत निजामुद्दीन – तिरुवनंतपुरम सेंट्रल वीकली  एक्सप्रेस
22633 ही गाडी दिनांक २१/१२/२०२२ तर 22634 हि गाडी दिनांक २३/१२/२०२२ पासून ह्या सुधारित डब्यांच्या रचनेनुसार धावणार आहेत.
ह्या गाडीचे कोकणातील थांबे.
वसई रोड, पनवेल, चिपळूण,रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पेडणे आणि मडगाव.
   Follow us on        
3) 22659 / 22660  कोचुवेली – योगनगरी ऋषिकेश- कोचुवेली वीकली  एक्सप्रेस
22659 ही गाडी दिनांक २३/१२/२०२२ तर 22660 हि गाडी दिनांक २६/१२/२०२२ पासून ह्या सुधारित डब्यांच्या रचनेनुसार धावणार आहेत.
ह्या गाडीचे कोकणातील थांबे.
वसई रोड, पनवेल, रत्नागिरी आणि मडगाव.

Loading

ओसरगाव येथे मोफत सर्व रोग निदान व औषधोपचार शिबीराचे आयोजन

 

सिंधुदुर्ग:ग्रामिण भागातील नागरीकांना आपल्या घराच्या जवळ चांगल्या दर्जाची आरोग्य सेवा देण्याच्या उददेशाने श्री.मंगेशजी सांवत यांच्या प्रेरणेतून मंगळवार, 21 डिसेंबर 2022 रोजी साईलिला हॉस्पिटल नाटळ, प्रथमेश हॉटेल्स प्रा.ली. मुंबई आणि माता वैष्णोदवी महाविद्यालय ओसरगांव यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत सर्व रोग निदान व औषधोपचार शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

हेही वाचाकोकण आणि कोल्हापुरातील काजू उत्पादकांसाठी खुशखबर, राज्यात काजू फळपीक विकास योजना

हे शिबीर माता वैष्णोदेवी महाविद्यालय, ओसरगांव, मुंबई-गोवा हायवे, ओसरगांव तलाव शेजारी आयोजीत करण्यात आले आहे. शिबीराची वेळ सकाळी 10 ते दुपारी 02 अशी आहे. तरी कणकवली, ओसरगांव,कसाल, आंब्रड, हेवाळे, पोखरण, कुंदे, बोर्डवे या पंचक्रोशीतील सर्व नागरीकांनी या मोफत आरोग्य शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. अधिक माहीती व नावनोंदणी करीता साईलिला हॉस्पिटल नाटळ संपर्क क्रमांक 02367 246099 / 246100 / 8275137575 यावर संपर्क करावा.

 

Loading

कोकण आणि कोल्हापुरातील काजू उत्पादकांसाठी खुशखबर, राज्यात काजू फळपीक विकास योजना

मुंबई: कोकणातील काजूपीक घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे मंत्रिमंडळ बैठकीत राज्यात काजू फळपीक विकास योजना लागू करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे .संपूर्ण कोकण व कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड, आजरा तालुक्यातील क्षेत्रात ही योजना असणार आहे. या योजनेमध्ये 5 वर्षांसाठी 1175 कोटींची तरतूद असणार आहे. कृषी, पणन व सहकार मिळून ही योजना राबवणार आहेत.

   Follow us on        

राज्यात रोपवाटिका सुविधा निर्माण करणे.काजू उत्पादकता वाढ, काजू बोन्डावरील प्रक्रिया उद्योगांना चालना, अर्थसहाय्य, प्रक्रिया, मार्केटिंग आणि रोजगारनिर्मितीसाठी हि योजना राबविण्यात येणार आहे.

 

Loading

दादर येथील श्री सिद्धिविनायक मंदिरातील श्रींच्या मुर्तींचे दर्शन ५ दिवस बंद राहणार.

 

मुंबई :श्री सिध्दीविनायक गणपती मंदिरातील श्रीच्या मूर्तीला येत्या बुधवारी १४ ते रविवार १८ डिसेंबर २०२२ या कालावधीत सिंदूर लेपन करण्यात येणार आहे. त्यामुळे या काळात भाविकांना श्रींच्या मुर्तींच्या दर्शन घेता येणार नसून याऐवजी श्रींच्या प्रतिमेचे दर्शन भाविकांना घेता येणार आहे.

   Follow us on        

श्री सिध्दीविनायक गणपती मंदिर न्यासाने प्रसिध्दी पत्रकाद्वारे भाविकांना आवाहन करत बुधवार दिनांक १४ डिसेंबरपासून ते रविवारी दिनांक १८ डिसेंबर २०२२च्या कालावधीमध्ये श्रींच्या मूर्तीला सिंदूर लेपन करण्यात येणार असल्याची माहिती दिली. त्यामुळे त्या कालावधीमध्ये भाविकांना प्रत्यक्ष श्रींच्या मूर्तींचे दर्शन बंद असेल, याऐवजी श्रींच्या प्रतिमेचे दर्शन घेता येईल असे श्री सिध्दीविनायक गणपती मंदिर न्यासाने प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळवले आहे.

 

या सिंदूर लेपनानंतर सोमवार १८ डिसेंबरला दुपारी एक वाजल्यापासून नेहमीप्रमाण गाभाऱ्यातून भाविकांना श्रींच्या मूर्तींचे दर्शन घेता येईल,असे न्यासाने कळवले आहे.

Loading

विश्वास नांगरे पाटील यांच्यासह बड्या पोलिस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या……

vishvas nangare patil

   Follow us on        

पुणे : आज सरकारकडून (Maharashtra Government) राज्यातील बड्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. तर काही अधिकाऱ्यांची पदोन्नती करण्यात आली आहे. या बदलीच्या यादीत विश्वास नांगरे पाटील (Vishwas Nangre Patil) सदानंद दाते (Sadanand Date) यांचीहा समावेश आहे.

खालील अधिकाऱ्यांची बदली/पदोन्नती करण्यात आलेली आहे.

विश्वास नांगरे पाटील

विश्वास नांगरे पाटील यांना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या अप्पर महासंचालकपदी पदोन्नती देण्यात आली आहे. विश्वास नांगरे पाटील हे आतापर्यंत मुंबई सहपोलीस आयुक्त पदावर होते.

सदानंद दाते 

मिरा भाईंदरचे पोलीस आयुक्त असलेले सदानंद दाते यांची बदली ही राज्याच्या दहशतवादी विरोधी पथकाच्या (Anti-Terrorism Squad) अप्पर पोलीस महासंचालकपदी करण्यात आली आहे.

अमिताभ गुप्ता

अमिताभ गुप्तांची पुणे आयुक्तपदावरून बदली झालीय. ते आता अमिताभ गुप्ता कायदा सुव्यवस्थेचे अप्पर पोलीस महासंचालक असणार आहेत.

तर खालील शहराच्या पोलीस आयुक्तपदी नवीन नावाची वर्णी लागली आहे.

रितेश कुमार – पुणे

विनय कुमार चौबे – पिंपरी-चिंचवड

मिलिंद भारंबे – नवी मुंबई

अमरावती – आरती सिंह

Loading

कोकण रेल्वेमार्गावर धावणार एकेरीमार्गी विशेष गाडी

   Follow us on        
Konkan Railway News 13/12/2022: कोकण रेल्वे प्रवाशांसाठी एक खुशखबर आहे. कोकणरेल्वेने एक एकेरी मार्गी गाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. गाडी क्रमांक 01430 एकेरी विशेष गाडी मडगाव जंक्शन येथून रविवार दिनांक १८ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ०८.३० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे त्याच दिवशी रात्री २३.०० वाजता पोहोचेल.
ह्या गाडीचे थांबे 
करमळी, थीविम, सावंतवाडी रोड,कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पनवेल, ठाणे आणि दादर.
डब्यांची रचना
१५ शयनयान (Sleeper Coach)आणि २ सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन.
आरक्षण
या गाडीचे आरक्षण दिनांक 14 डिसेंबर पासून रेल्वेच्या सर्व तिकीट खिडक्यांवर आणि ऑनलाईन पोर्टल वर चालू होणार आहे.
या गाडीच्या अधिक माहितीसाठी www.enquiry indianrail.gov.in ह्या संकेतस्थळावर भेट देण्याचे आवाहन कोकणरेल्वे प्रशासनामार्फत केले गेले आहे.

Loading

आमदार नितेश राणे यांचे धक्कादायक विधान! “माझ्या विचारांचा सरपंच निवडून आला तरच निधी नाहीतर…….”

GRAMPANCHAYAT ELECTION 2022 :भाजपा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी धक्कादायक विधान केल्याचं समोर आलं आहे. जर माझ्या विचारांचा सरपंच निवडून आला नाहीतर मी तुमच्या गावाला निधी देणार नाही अशी थेट धमकीच गावकर्यांना दिली आहे.
भाजपा आमदार नितेश राणे हे कणकवलीमधील (Kankavali) नांदगाव या ठिकाणी बोलत होते. राणे म्हणाले. आता कोणत्या गावाला निधी द्यायचा, कोणत्या नाही हे माझ्या हातात आहे. त्यामुळे मतदान करतानाच विचार करा. जर माझ्या विचारांचा सरपंच तुमच्या गावात निवडून आला तरच निधी देईल, नाहीतर मी निधी देणार नाही असं वादग्रस्त विधान आमदार राणे यांनी केलं आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड, दोडामार्ग , कणकवली , कुडाळ, मालवण सावंतवाडी , वैभववाडी, वेंगुर्ला तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीच्या कार्यक्रमात बोलतानाचा राणे यांचा व्हिडिओ समोर आला होता. ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नितेश राणेंकडून प्रलोभनाचा प्रयत्न केला गेला असल्याचे या व्हिडिओतून समोर आले होते.

Loading

आता दप्तरदिरंगाई नाही… शासनाच्या सर्व सेवा 1 जानेवारीपासून ऑनलाईन….

 

   Follow us on        

 

मुंबई : येणार्‍या १ जानेवारीपासून राज्यातील सर्व सेवा ऑनलाइन स्वरूपात देण्याची शासकीय विभागांना सक्ती करण्यात आली आहे. सर्व विभागांना मुख्य सचिवांनी तसे आदेश दिले आहेत. नागरिकांना पारदर्शक, वेळेत आणि कार्यक्षम पद्धतीने सेवा उपलब्ध करून देण्यासाठी हे पाउल उचलले आहे. सर्व विभागांना मुख्य सचिवांनी तसे आदेश दिले आहेत. यानुसार महसूल विभागानेही आपल्या सर्व कार्यालय प्रमुखांना आदेश दिले आहेत. तर उर्वरित विभागांना या आदेशाची अंमलबजावणी करावीच लागणार आहे. या निर्णयाने राज्यातील नागरिकांची सरकारी दप्तरदिरंगाईतून सुटका होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सध्या ऑनलाइन तसेच ऑफलाइन स्वरूपात प्रशासनाकडून सेवा दिली जाते.यानुसार महसूल विभागानेही आपल्या सर्व कार्यालय प्रमुखांना आदेश दिले आहेत. तर उर्वरित विभागांना या आदेशाची अंमलबजावणी करावीच लागणार आहे.

Also Read :ग्रामपंचायत निवडणूक -२०२२! उमेदवार आणि मतदार यांना माहिती असाव्यात अशा महत्वाच्या काही गोष्टी.

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ च्या परिणामकारक अंमलबजावणीसाठी या कायद्याखाली अधिसूचित केलेल्या सर्व सेवा १ जानेवारी २०२३ पासून शंभर टक्के ऑनलाइन स्वरूपात केल्या जाणार आहेत. कोणतेही कारण सांगून कोणतीही सेवा शासकीय कर्मचाऱ्यांना यापुढे ऑफलाइन देता येणार नाही. ज्या सेवा ऑनलाइन स्वरूपात देता येणार नाहीत त्याची स्पष्टीकरणासह उत्तरे ३१ डिसेंबपर्यंत द्यावी लागणार आहेत.

Als Read :….तर दोडामार्ग तालुका भविष्यात गोवा राज्याचा भाग असेल!!!!

ह्या सेवा उपलब्ध..

जन्म-मृत्यूचा दाखला, नळ, वीजजोडणी, जात प्रमाणपत्र, विविध प्रकारच्या परवानग्या, मंजुरी आदींसह विविध प्रकारच्या ५०६ सेवा कालबद्ध पद्धतीने नागरिकांना देणे प्रशासनास बंधनकारक आहे. विविध विभागांच्या अधिसूचित ५०६ सेवांपैकी ४०० सेवा ऑनलाइन स्वरूपात सध्या देण्यात येतात. उरलेल्या १०६ सेवा ऑफलाइन पद्धतीने देण्यात येतात. या सेवा ‘आपले सरकार पोर्टल’, सेवा अधिकारांसाठी तयार करण्यात आलेले मोबाइल अ‍ॅप याद्वारे उपलब्ध आहेत. त्याचबरोबर ‘आपले सरकार सेवा केंद्रा’च्या ३५ हजार केंद्रांतून या सेवा राज्यभर ऑनलाइन पद्धतीने दिल्या जातात.

Also Read :मराठी अभिनेता अभिजीत केळकरची मुंबई-गोवा महामार्गाविषयी संतप्त पोस्ट! तो म्हणाला आमचं कोकण….

Loading

मराठी अभिनेता अभिजीत केळकरची मुंबई-गोवा महामार्गाविषयी संतप्त पोस्ट! तो म्हणाला आमचं कोकण….

   Follow us on        
Mumbai -Goa Highway News: एकीकडे समृद्धी महामार्ग अवघ्या ५/६ वर्षात पूर्ण करून महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी हा महामार्ग पूर्ण करून दाखवल्याच्या आपल्या कर्तृत्वाचे गोडवे गाण्यात मग्न आहेत. तर दुसरीकडे “खड्ड्यात” गेलेला  मुंबई गोवा महामार्ग पूर्ण करण्यासाठी काही ठोस पावले तर सोडा तर ह्या प्रश्नावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बोलणे पण टाळत आहेत. त्यामुळे शांत असणारा कोकणी माणूस आता आपला राग  विविध माध्यमातून व्यक्त करू लागला आहे. ह्यात आता मराठी कलाकार पण सामील झाल्याचे दिसत आहे. मराठी अभिनेता अभिजीत केळकर याने इन्स्ट्राग्राम पोस्टच्या माध्यमातून आपला राग व्यक्त केला आहे.
एका युझर च्या पोस्ट ला त्याने रिप्लाय देताना नक्की काय म्हणाला अभिजीत?
 
 मुंबई गोवा महामार्गाच्या कामाची 12 वर्ष कोणत्या हिशोबाने मोजली ते कळेल का ? नाही म्हणजे तसा भारत स्वतंत्र होऊन 75 वर्ष होऊन गेली , आपल्याला संताप व्यक्त करायला आपलं हक्काच स्थान मिळालय मग 12 वर्षच का ? आधीची 60-65 वर्ष काय कोकणात सोन्याचा धुर निघत होता का ? ह्यासाठी नुसत्या संतापी पोस्ट टाकून आणि वर्षातून एकदा सुट्टीला कोकणात जाऊन कस भागेल ? त्यासाठी स्थानिक प्रतिनिधी जबाबदार आहेत ना ? त्यांना निवडून द्यायला पुण्या मुंबईची किंवा उर्वरित महाराष्ट्रातील लोक येत नाहीत. आधी कोकणकरांनी सुधारावे मग कोकण सुधारेल ! समृद्धी म्हणजे काय बँकेत ठेवलेली ठेव नाही की काढली आणि दिली कुणालाही ! मोठ्या महामार्गांवर अपेक्षित असलेली जड वाहतूक किती प्रमाणात आहे हो कोकणात ? त्यामुळे उगाच तुमच्या वैयक्तिक संतापाला सामाजिक करून इतरांचे सामाजिक जीवन आनंदमय करू नका.

 

View this post on Instagram

 

A post shared by Abhi Kelkar (@abhijeetkelkarofficial)

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search