Grampanchayat Election News : रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणूकीच्या दरम्यान ग्रामपंचायत क्षेत्रातील दारूविक्री दिवसभर बंद राहणार अशी सुचना जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिली आहे. त्यांच्या आदेशानुसार मद्यविक्री दि. १७, १८, २० डिसेंबरला संपूर्ण दिवसभर बंद राहणार आहे.
जिल्हय़ात एकूण 222 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. निवडणुका शांततेत पार पडाव्यात आणि कोणता अनुचित प्रकार घडू नये यासाठी यासाठी हा निर्णय घेतला गेला आहे. मुंबई मद्य निषेध अधिनियमातील तरतुदीनुसार जिल्हाधिकार्यांनी देशी, विदेशी मद्य, माडी विक्री बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. ज्या ग्रामपंचायत क्षेत्रातील निवडणूक बिनविरोध होणार आहेत अशा ग्रामपंचायत क्षेत्रांना मात्र हा आदेश लागु होणार नाही आहे. ह्या आदेशाची अवमानता केल्यास महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ चे कलम ५४, ५६ मधील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येणार आहे याची सर्व संबंधितांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
Konkan Railway News:डिसेंबर महिन्यातील पर्यटन हंगाम, कोकणातील जत्रेला जाणाऱ्या कोकणवासीयांची गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे आणि कोंकण रेल्वेने एक एकेरी मार्गी गाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. गाडी क्रमांक 01427 एकेरी विशेष गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून शनिवार दिनांक ३ डिसेंबर २०२२ रोजी ००.२० वाजता सुटेल आणि मडगाव येथे त्याच दिवशी १२.१५ वाजता पोहोचेल.
Mumbai Goa Highway News : मुंबई-गोवा महामार्ग अपूर्ण असताना तसेच अनेक भागात काम सुमार झाले असताना शासनाने ओसरगाव येथील टोल नाक्यावरून ह्या महामार्गावरील वाहतुकीसाठी टोल वसुली सुरू होणार आहे असे जाहीर केले आहे. आज दिनांक १ डिसेंबर रोजी मध्यरात्री पासून ही टोल वसुली सुरू केली जाणार आहे. यात सिंधुदुर्ग पासिंगच्या नोंदणीकृत व्यावसायिक वाहनांसाठी शुल्कात ५० टक्के सवलत तर अवाणिज्य वाहनांना महिन्यासाठी ३१५ रुपयांचा पास असणार आहे. टोलनाका सुरू होत असल्याची अधिसूचना महामार्ग प्राधिकरणातर्फे आज प्रसिद्ध केली.
असे असणार आहेत टोल वसुलीचे नवे दर
मोटार, जीप, व्हॅन आणि इतर हलकी वाहने : ९० रुपये
मिनी बस आणि हलकी व्यावसायिक वाहने : १४५ रुपये
ट्रक आणि बस (२ ॲक्सल) : ३०५ रुपये
व्यावसायिक वाहने ३ ॲक्सलसाठी : ३३५ रुपये
मल्टी ॲक्सल ४ ते ६ ॲक्सल वाहनांसाठी : ४८० रुपये.
सात किंवा त्याहून जास्त ॲक्सल वाहनांसाठी : ५८५ रुपये
अवाणिज्य प्रकारच्या वाहनांसाठी ३१५ रुपये मासिक पास शुल्क
वसुलीचा ठेका राजस्थान येथील गणेशगढीया कन्स्ट्रक्शन कंपनीला दिला आहे. सिंधुदुर्ग हद्दीवरील खारेपाटण-राजापूर या दरम्यानचा हातीवले टोलनाकाही १ डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून सुरू होणार आहे. येथील वसुलीचा ठेका सिंधुदुर्गातील गणेश मांजरेकर यांना दिला आहे.
ओसरगाव टोल नाक्यावर यापूर्वी १ जूनपासून टोल वसुली होणार होती. त्यासाठी एमडी करिमुन्नीसा या कंपनीला ठेका दिला होता; मात्र प्रखर राजकीय विरोधामुळे ही कंपनी वसुलीची कार्यवाही करू शकली नव्हती. त्यामुळे महामार्ग प्राधिकरणाने तीन महिन्यांसाठी नव्याने वसुलीच्या निविदा मागवल्या. यात टोल वसुली करणाऱ्या कंपन्या निश्चित झाल्यानंतर आता १ डिसेंबरपासून महामार्गावरील वाहनचालकांना टोल द्यावा लागणार आहे.
महसूल विभाग अंतर्गत (Talathi) ‘तलाठी’च्या 4122 पदांची भरती होणार असल्याचा एक शासन निर्णय जाहीर झाला आहे.
Follow us on
Mumbai :राज्यात तलाठी पदाच्या जागा रिक्त असल्यामुळे शासकीय कामाला ब्रेक लागलेला आहे. एकाच तलाठ्याकडे अनेक गावं सोपवण्यात आलेले आहेत. हा प्रश्न सोडवण्यासाठी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुंबईमध्ये बैठक घेतली. या बैठकीसाठी राज्यातील तलाठ्यांना निमंत्रित केलं होतं. या बैठकीला महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव असिम गुप्ता, महसूल विभागाचे सहसचिव श्रीराम यादव, सहसचिव संजय बनकर यांच्यासह महाराष्ट्र राज्य तलाठी संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
शासनाने प्रसिद्ध केलेल्या माहितीपत्रकानुसार नाशिक विभागात १०३५, औरंगाबाद विभागात ८४७, कोकण विभागात ७३१, नागपूर विभागात ५८०, अमरावती विभागात १८३ तर पुणे विभागात ७४६ अशा एकूण ४१२२ पदांची महाभरती लवकरच सुरु होणार आहे.
श्री. विखे-पाटील म्हणाले की, गावात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा तलाठी यांच्याशी संबंध येत असतो. सातबारा, दाखले यासाठी नियमितपणे तलाठी यांच्या संपर्कात राहावे लागते. सध्या तलाठ्याकडे 3 ते 4 गावांचा पदभार असल्याने गावोगावी जावे लागते. गावोगावच्या कार्यालयीन कामकाजाचे नियोजन करताना वार ठरवून घेण्याबरोबरच वेळही ठरवून घेणे आवश्यक आहे. शेतकरी वर्ग सकाळच्या वेळातच महसूल किंवा तहसील कार्यालयात येत असल्याने तलाठी वर्गाने सकाळच्या वेळेत लवकर कामांचे नियोजन करणे आवश्यक आहे. तलाठी भरतीमुळे सध्या कार्यरत असलेल्या तलाठी वर्गाचा भार कमी होण्यास मदत होणार असून यामुळे भरती प्रक्रियेला गती देण्यात येईल.
तलाठी/ पटवारी आणि मंडळ अधिकारी यांना प्रवास भत्त्यात वाढ देणे, कार्यालयीन भाडे देणे तसेच लॅपटॉप आणि प्रिंटर देण्याबाबत विभागाने कार्यवाही करावी. याशिवाय महसूल विभागाअंतर्गत नायब तहसीलदार परीक्षा आणि पदोन्नतीबाबतचे निकष तपासून याबाबत बैठकीचे नियोजन करण्यात येईल, असेही मंत्री श्री. विखे-पाटील यावेळी म्हणाले.
संपूर्ण जिल्हावार भरली जाणारी पदसंख्या पाहण्यासाठी खालील फाईल ओपन करून शासननिर्णय पहावा.
तलाठी भरती (नवनिर्मीत पदासह).Pdf
Vision Abroad
मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
konkan Tourism News :पर्यटन संचालनालयामार्फत “टूरसर्किट द्वारे” दि.3 व 4 तसेच 7 व 8 डिसेंबर, 2022 या कालावधीत कोकणातल्या महाड येथील चवदार तळे आणि गांधारपाले बौध्द लेणी या पर्यटनस्थळांना भेट देण्यासाठी नि:शुल्क एकदिवशीय सहलीचे आयोजन करण्यात आले आहे.
या सहलींसाठीच्या बसेस सीबीडी, बेलापूर/कोकण भवन, नवी मुंबई या बसस्थानकांवरून नियोजित वेळेवर वर नमूद तारखांना सोडण्यात येतील.
या सहलीमध्ये पर्यटकांसाठी बससेवा, गाईड, अल्पोपहार, दुपारचे जेवण व पिण्याचे पाणी या सर्व सुविधा नि:शुल्क पुरविण्यात येणार आहेत. “प्रथम येणाऱ्यास प्रथम सेवा प्राधान्य” या शर्तीवर सहलीचे आरक्षण स्विकारण्यात येणार आहे.
दि.3 व 4 डिसेंबर,22 साठी आगाऊ आरक्षण दि.1 डिसेंबर,22 पर्यंत व दि.7 व 8 डिसेंबर,22 साठी आगाऊ आरक्षण दि.5 डिसेंबर,22 पर्यंत करणे अनिवार्य आहे. आगाऊ आरक्षण आणि अधिक माहितीसाठी 9930359384/9421051708 या क्रमांकांवर तसेच [email protected] या ई-मेल पत्त्यावर संपर्क साधावा.
Vision Abroad
मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
Ratnagiri News :कोल्हापूर-रत्नागिरी महामार्ग चौपदरीकरणाचे काम आता मार्गी लागणार आहे. गेली पाच वर्षे राखलेल्या ह्या कामाच्या भूसंपादनासह सर्व अडथळे दूर झाले आहेत. डिसेंबरमध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल.
ह्या कामासाठी ठेकेदार नियुक्त करण्यात आला आहे. ह्या कामासाठी 2 हजार 114 कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे. एकूण 134 कि.मी. रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात येणार आहे. त्याकरिता 667.13 हेक्टर जमीन आवश्यक आहे. यापैकी बहुतांश जमीन संपादित करण्यात आली आहे. हा महामार्ग पूर्वी शहरातून जात होता. आता केर्ली बायपास काढण्यात आला आहे. केर्ली-शिये-चोकाकमार्गे रत्नागिरी-नागपूर या महामार्गास जोडला जाणार आहे.
Konkan Railway News : पर्यटनाचा हंगाम, तळकोंकणातील जत्रेचा हंगाम तसेच कोकण मार्गावरील गाडयांना गर्दी होत असल्याने कोंकण रेल्वेने ह्यावर उपाय म्हणून कोंकण मार्गावरील काही गाडयांना अतिरिक्त डबे जोडण्याचा निर्णय घेतला आहे.
अधिक माहितीसाठी ww.enquiry.indianrail.gov.in ह्या अधिकृत संकेतस्थळास भेट देण्यात यावी. प्रवाशांनी ह्या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन रेल्वे प्रशासनामार्फत केले गेले आहे.
मुंबई :दादर रेल्वे स्थानका फलाट क्रमांक-४ आणि ५ क्रमांक फलाटाला दुहेरी जोडणी देण्यासाठी चाचपणी सुरू केली आहे. फलाट क्रमांक-४ आणि ५ यांच्यामध्ये फलाट क्रमांक ‘४ ए’ उभारण्यासाठी रेल्वे प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. दादर स्थानकावरील गर्दी विभागण्यासाठी मध्य रेल्वेने ह्या हालचाली सुरू केल्या आहेत.
स्थानकातील फलाट क्रमांक-३वरून सीएसएमटीकडे जाणाऱ्या धीम्या लोकल थांबतात. फलाट ४ आणि ५ यांच्यामध्ये लोखंडी जाळीचे कुंपण आहे. ते हटवून लोकल पकडण्यासाठी फलाट ५चा देखील पर्याय खुला करून देण्याचे काम सुरू आहे. सर्व तपासणीअंती आणि रेल्वेगाड्यांची वाहतूक अबाधित ठेवून हे शक्य झाल्यास फलाट क्रमांक ‘४ ए’ या नव्या फलाटावरून प्रवाशांना लोकल पकडणे शक्य होईल, असे वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.
फलाट ५वरून अगदी मोजक्याच मेल-एक्स्प्रेस धावतात. या गाड्यांच्या वेळा वगळता अन्य वेळेत या फलाटावर शुकशुकाट असतो. आपत्कालीन स्थितीत या फलाटावर लोकल वाहतूक होते. यालगत असलेल्या फलाट-४वर सकाळ, दुपार आणि संध्याकाळी प्रवाशांची मोठी गर्दी असते. मुख्य पुलाच्या आणि स्वामी नारायण मंदिरदिशेकडे उतरणाऱ्या पुलांच्या पायऱ्यांची जोडणी फलाट ५वर आहे. फलाटावर ठाण्याच्या दिशेला लिफ्ट आणि बंद अवस्थेत रेल्वे कार्यालय आहे. कार्यालय आणि लिफ्टची नव्या ठिकाणी उभारणी आणि पुलांच्या पायऱ्या ही प्रमुख आव्हाने रेल्वे प्रशासनासमोर आहेत. संबंधित तज्ज्ञ रेल्वे अधिकाऱ्यांशी चर्चा करून याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
फलाट ४वरील स्टॉल, अकार्यान्वित पाणी देणारे मशिन आणि प्रवासी वर्दळीसाठी अडथळे असणारी अन्य बांधकामे हटवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. यामुळे फलाट ३ आणि ४वर अधिक जागा उपलब्ध होणार आहे. मार्च २०२३अखेर हे काम पूर्ण होणार आहे.
Vision Abroad
मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
मुंबई :देशाच्या स्वराज्याच्या आणि स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये कोकण प्रदेशाचे मोठे योगदान आहे. संपूर्ण भारत देशाचे दैवत स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची राजधानी कोकणात म्हणजे रायगड किल्ल्यावर केली. , सरखेल कानोजी आंग्रे ,नरवीर तानाजी मालुसरे, सरसेनापती नेताजी पालकर, महान सेनानी बाजीराव पेशवे, लोकमान्य टिळक , महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके , मातृशक्तीचे देशातील सर्वात मोठे प्रतीक झाशीची राणी लक्ष्मीबाई भारतरत्न विनोबा भावे ,भारतरत्न महर्षी कर्वे अशी अनेक नररत्न या देशाला कोकण प्रदेशाने दिली. या महान व्यक्तिमत्त्वांना राष्ट्रपुरुषांना मानवंदनादेण्यासाठी भव्य स्वराज्य भूमी कोकण महोत्सव आणि अभियान कोकण बिझनेस फोरम व मी मुंबई तर्फे आयोजित करण्यात येत आहे.
राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणिउपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे विशेष सहकार्य या अभियानाला मिळणार आहे. कोकणचे सुपुत्र मुंबई प्रदेश भाजपा अध्यक्ष आमदार आशिषजी शेलार हे या अभियानाचे अध्यक्ष आहेत, विधान परिषदेतील मा. प्रवीण दरेकर याचे संयोजक आहेत.यावेळी भव्य उद्योग प्रदर्शन , सांस्कृतिक महोत्सव आयोजित केला आहे
कोकणातील इतिहास संस्कृती परंपरा लोककला उद्योग यांचा भव्य महोत्सव स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आला आहे. देशाचे उद्योग मंत्री नारायणराव राणे आणि त्यांचे एमएसएमई मंत्रालय या उपक्रमाला विशेष सहकार्य करत आहेत. राज्याच्या उद्योग मंत्री उदय जी सामंत या महोत्सवात सहभागी झाले आहेत. आत्मनिर्भर कोकण अंतर्गत कोकणातील तरुणांना कोकणात उद्योग उभारण्यासाठी विशेष मार्गदर्शन आणि समन्वय याच कार्यक्रमात करण्यात येणार आहे. यासाठी भव्य परिषदांचे आयोजन करण्यात आले आहे. याकरिता आमदार प्रसादजी लाड यांनी पुढाकार घेतला आहे. कोकण विकास आघाडीचे अध्यक्ष सुहास आडेवरेकर यांची संपूर्ण टीम या उपक्रमात सहभागी झाली आहे.
स्वराज्य भूमी कोकण महोत्सव कार्यक्रमाची रूपरेषा
कालावधी :६ ते ९ डिसेंबर
स्थळ : नेस्को कॉम्प्लेक्स ,वेस्टन एक्सप्रेस हायवे गोरेगाव
कार्यक्रमपत्रिका
६ डिसेंबर
सकाळी ८-३०. भव्य उद्घाटन
प्रमुख उपस्थिती आणि उद्घाटक
माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब, माननीय केंद्रीयमंत्री नारायणराव राणे साहेब, महोत्सव प्रमुख, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय पर्यटन मंत्री मंगल प्रभातजी लोढा साहेब
संध्याकाळी ४ ते ६
स्वराज्यभूमी मंथन परिषद
प्रमुख अतिथी रघुजीराजे आंग्रे , सरखेल कान्होजी आंग्रे यांची वंशज. व अन्य प्रमुख व्यक्तिमत्वांचे वंशज
संध्याकाळी ६ ते ९
आंबा काजू उद्योग परिषद
प्रमुख अतिथी. माननीय गिरीशजी महाजन, ग्राम विकास मंत्री, महाराष्ट्र
सचिव, / व्यवस्थापकीय संचालक. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ
दिनांक ७ डिसेंबर
सकाळी ११ ते दुपारी ४
कोकण मत्स्य उद्योग परिषद आणि निसर्ग संवर्धन परिषद
प्रमुख उपस्थिती वन आणि मत्स्य उद्योग मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार साहेब , सचिव- मत्स्य उद्योग विभाग / सचिव -वनविभाग
संध्याकाळी चार ते आठ
स्वराज्यभूमी सागरी परिषद
प्रमुख अतिथी. माननीय दादाजी भुसे बंदर विकास मंत्री महाराष्ट्र शासन
सचिव बंदर विकास, सी ई ओ महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड
गुरुवार दिनांक 8 डिसेंबर
सकाळी दहा ते दुपारी चार
स्वराज्य भूमी कोकण पायाभूत सुविधा व उद्योग विकास परिषद
प्रमुख उपस्थिती.
सार्वजनिक बांधकाम मंत्री मा. रवींद्र जी चव्हाण साहेब.
एम एम आर डी ए , सिडको , एमएसआरडीसी ,कोकण रेल्वे विविध विभागाचे प्रमुख.
एम एस एम इ , खादी ग्रामोद्योग, नाबार्ड, अण्णासाहेब पाटील महामंडळ उद्योग संचालनालय विविध उद्योग विकासाच्या योजना आणि त्या विभागाचे प्रमुख.
संध्याकाळी चार ते आठ
स्वराज्यभुमी सीएसआर परिषद
कोकणातील मोठे उद्योग समूह आणि कोकणातील मोठ्या सामाजिक ग्रामीण विकास शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था यांचे स्नेहसंमेलन.
प्रमुख उपस्थिती
राज्याचे उद्योग मंत्री मा. उदयजी सामंत साहेब
शुक्रवार दिनांक 9 डिसेंबर
स्वराज्यभूमी पर्यटन उद्योग विकास परिषद
प्रमुख उपस्थिती मा. मंगल प्रभात लोढा साहेब, पर्यटन मंत्री, सचिव पर्यटन विभागसं, चालक पर्यटन संचनालय
संध्याकाळी सहा वाजता भव्य समारोप
प्रमुख उपस्थिती महोत्सव प्रमुख आणि केंद्रीय सूक्ष्म आणि लघु उद्योग मंत्री मा नारायणराव राणे साहेब
निमंत्रक /शब्दांकन : माननीय संजय यादवराव, संयोजक आणि समन्वयक
Konkan Railway News :मुंबई गोवा महामार्ग गेल्या १२ वर्षांपासून रखडला आहे, अनेक ठिकाणी रस्त्याची दुर्दशा झाली असल्याने ह्या महामार्गाने वाहतूक करणे खूपच गैरसोयीचे झाले आहे. ह्या सर्वात कोकणातील उद्योजकांना कोकण रेल्वेने एक दिलासादायक बातमी दिली आहे. मुंबईतील जेएनपीटी बंदरापासून रत्नागिरीपर्यंत मालवाहतूक करण्यासाठी कोकण रेल्वे प्रशासनाकडून कंटेनर ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
सुरक्षित प्रवास आणि वेळेची बचत असा दृष्टिकोन रेल्वेने ठेवला असून पहिली कंटेनर ट्रेन २९ नोव्हेंबर २०२२ रोजी रत्नागिरी स्थानकातून सोडण्यात येणार आहे. या सुविधेचा व्यापाऱ्यांकडून लाभ घ्यावा, असे आवाहन कोकण रेल्वे प्रशासनाकडून केले गेले आहे. ह्या सुविधेंचा लाभ कोकणातील स्थानिक उद्योजकांना होणार आहे. मालाची वाहतूक अधिक वेगवान आणि कमी खर्चात करण्यासाठी ह्या सेवेचा लाभ घेता येईल. कोकणात उत्पादित उत्पादने मुंबईतील जेएनपीटी बंदरातून जगाच्या विविध भागात निर्यात केली जातात. येथील उत्पादनेही त्यांच्या गुणांसाठी ओळखले जातात. त्यामुळेच जगभरात प्रचंड मागणी असते. मुंबई गोवा हायवे वाहतुकीस योग्य नाही आहे. त्यावरुन वाहतूक करताना दमछाक होते आणि वेळही अधिक लागतो. रस्ते अपघाताची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे जेएनपीटी आणि रत्नागिरी दरम्यानचा हा प्रवास सुरळीत करण्यासाठी कोकण रेल्वेच्या रत्नागिरी विभागाने कंटेनर ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या ट्रेनमध्ये चाळीस फूट आणि वीस फूट लांबीचे कंटेनर मालाच्या वाहतुकीसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहेत. निर्यातीसाठी वातानुकूलीत आणि कोरडे कंटेनरही यामध्ये वापरले जाणार आहेत. मालाची वाहतूक सुलभ आणि गतिमान होण्यासाठी कोकण रेल्वेची ही सेवा उपयुक्त ठरणार आहे. कोकणातून होणाऱ्या व्यापाराला मोठ्या प्रमाणात चालना मिळेल.
Vision Abroad
मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.