Author Archives: Kokanai Digital

१६ जानेवारी पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-तृतीया – 28:09:19 पर्यंत
  • नक्षत्र-आश्लेषा – 11:17:47 पर्यंत
  • करण-वणिज – 15:42:37 पर्यंत, विष्टि – 28:09:19 पर्यंत
  • पक्ष- कृष्ण
  • योग-आयुष्मान – 25:05:42 पर्यंत
  • वार- गुरूवार
  • सूर्योदय- 07:17
  • सूर्यास्त- 18:20
  • चन्द्र-राशि-कर्क – 11:17:47 पर्यंत
  • चंद्रोदय- 20:41:59
  • चंद्रास्त- 09:03:59
  • ऋतु- शिशिर
महत्त्वाच्या घटना:
  • १६६०: रुस्तुम झमान आणि फाजल खान हे आदिलशहाचे सेनापती शिवाजी महाराजांवर चालुन आले आणि पराभूत होऊन परत गेले.
  • १६६६: नेताजी पालकर वेळेवर न आल्याने पन्हाळगड जिंकण्याचा शिवाजीराजांचा डाव फसला
  • १६८१: छत्रपती संभाजी राजे यांचा ’छत्रपती’ म्हणून राज्याभिषेक झाला.
  • १९०५: लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी केली, तेव्हा वायभंगाच्या चळवळीत देशभक्तानी वंदे मातरम् चा जल्लोष केला.
  • १९१९: अमेरिकेच्या संविधानात १८ वा बदल करण्यात आला आणि संपूर्ण देशात दारूबंदी लागू करण्यात आली.
  • १९२०: अमेरिकेचे अध्यक्ष वूड्रो विल्सन यांच्या १४ कलमी कार्यक्रमानुसार स्थापन झालेल्या राष्ट्रसंघाची (League of Nations) पहिली बैठक झाली.
  • १९४१: नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे देशाबाहेर प्रयाण
  • १९५५: पुणे येथील नॅशनल डिफेन्स अकॅडमीच्या इमारतीचे (तात्कालीन) मुंबई राज्याचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्या हस्ते उदघाट्न
  • १९७९: शहा ऑफ इराण यांनी कुटुंबासह इजिप्तमध्ये पलायन केले.
  • १९७८: रु. १,००० आणि अधिक किमतीच्या नोटा चलनातून रद्द
  • १९९५: आयएनएस विद्युत या संपूर्ण देशी बनावटीच्या क्षेपणास्त्र नौकेचे गोवा येथे जलाव तरण झाले.
  • १९९६: पुण्याचे शिल्पकार दिनकर शंकरराव थोपटे यांची ललित कला अकादमीच्या पुरस्कारासाठी निवड
  • १९९८: ऊर्दू लेखक व कवी अली सरदार जाफरी यांना ’ज्ञानपीठ पुरस्कार’ जाहीर
  • २००८: टाटा मोटर्सच्या नॅनो या एक लाख रुपये किंमतीच्या ‘पीपल्स कार’चे अनावरण
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १६३०: शिखांचे सातवे गुरु गुरु हर राय यांचा जन्म.
  • १८५३: आंद्रे मिचेलिन – फ्रेन्च उद्योगपती (मृत्यू: ४ एप्रिल १९३१)
  • १९२०: नानाभॉय अर्देशीर ऊर्फ ’नानी’ पालखीवाला – कायदेपंडित आणि अर्थतज्ञ (मृत्यू: ११ डिसेंबर २००२)
  • १९२६: ओंकार प्रसाद तथा ओ. पी. नय्यर – संगीतकार (मृत्यू: २८ जानेवारी २००७)
  • १९२७: भारतीय चित्रपट अभिनेत्री कामिनी कौशल यांचा जन्म.
  • १९४६: कबीर बेदी – चित्रपट अभिनेते

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

  • १६६७: अमेरिकन पदार्थवैज्ञानिक रॉबर्ट व्हॅन डी ग्राफ यांचे निधन. (जन्म: २० डिसेंबर १९०१)
  • १९०१: समाजसुधारक, स्वातंत्र्य सैनिक न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचे निधन.
  • १९०९: न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे – समाजसुधारक, धर्मसुधारक, अर्थशास्त्रज्ञ व न्यायाधीश (जन्म: १८ जानेवारी १८४२)
  • १९३८: शरदचंद्र चट्टोपाध्याय – बंगाली साहित्यिक, त्यांच्या ‘पथेर दाबी’ या कादंबरीतील क्रांतिकारक विचारांनी ब्रिटिश राज्यकर्त्यांतही खळबळ उडवून दिली होती. पु.बा. कुलकर्णी यांनी त्या कादंबरीचे ’भारती’ या नावाने मराठीत भाषांतर केले आहे. (जन्म: १५ सप्टेंबर १८७६)
  • १९५४: बाबूराव पेंटर – चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, चित्रकार, शिल्पकार आणि ’कलामहर्षी’ (जन्म: ३ जून १८९०)
  • १९६२: प्रसिद्ध लेखक राम नरेश त्रिपाठी यांचे निधन.
  • १९६६: साधू वासवानी – आध्यात्मिक गुरु व शिक्षणतज्ञ (जन्म: २५ नोव्हेंबर १८७९)
  • १९६७: रॉबर्ट व्हॅन डी ग्राफ – अमेरिकन पदार्थवैज्ञानिक (जन्म: २० डिसेंबर १९०१)
  • १९८८: डॉ. लक्ष्मीकांत झा – आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अर्थतज्ञ, मुत्सद्दी, कुशल प्रशासक, रिझर्व बँकेचे गव्हर्नर, जम्मू काश्मीरचे राज्यपाल व भारताचे अमेरिकेतील राजदूत (जन्म: २२ नोव्हेंबर १९१३ – भागलपूर, बिहार)
  • १९८९: तमिळ चित्रपट सृष्टीचे प्रसिद्ध अभिनेते प्रेम नाझीर यांचे निधन.
  • १९९७: कामगार नेते डॉ. दत्ता सामंत यांची गोळ्या घालून हत्या (जन्म: ? ? १९३३)
  • २०००: त्रिलोकीनाथ कौल – मुरब्बी मुत्सद्दी, परराष्ट्र सचिव, रशिया, अमेरिका व इराणमधील भारताचे राजदूत (जन्म: ? ? १९१३ – बारामुल्ला, जम्मू काश्मीर)
  • २००३: रामविलास जगन्नाथ राठी – सुदर्शन केमिकल्स उद्योगसमुहाचे संस्थापक (जन्म: ? ? ????)
  • २००५: श्रीकृष्ण हरी मेहेंदळे – संगीतकार, ’पेटीवाले’ मेहेंदळे (जन्म: ? ? ????)

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

मुंबई लोकल्स समोरा समोर आल्याची ‘ती’ बातमी खोटी

   Follow us on        

Mumbai Local: मिरा रोड रेल्वे स्थानकावर एकाच ट्रॅकवर दोन लोकल समोरासमोर आल्याची धक्कादायक बातमी आज समाज माध्यमांवर आज मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती. मोठा अपघात थोडक्यात टळला अशा या शीर्षकाखाली न्यूज चॅनेल्सने सुद्धा या बातमीचा मोठा गाजावाजा केला होता. मात्र ही बातमी खोटी असल्याचा खुलासा पाश्चिम रेल्वेने केला आहे.

“सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ दिशाभूल करणारा आहे. मीरा रोड स्थानकावर एकाच रुळावर गाड्या जवळपास समोरासमोर आल्याची कोणतीही घटना घडलेली नाही. आज 17.00 वाजता, एक लोकल ट्रेन पुरेशा आणि सुरक्षित अंतर राखून त्याच ट्रॅकवर दुसऱ्याच्या मागे उभी होती. हे ऑपरेशनल नियमांनुसार होते. उपनगरीय ट्रेन ऑपरेशन नियमानुसार, जर सिग्नल दिवसा 1 मिनिटांपेक्षा जास्त काळ लाल असेल (आणि रात्री 2 मिनिटे) तर EMU ट्रेन मर्यादित वेगाने पुढे जाऊ शकते आणि पुढील ट्रेनच्या जवळ येऊ शकते.सुरक्षा प्रोटोकॉलनुसार हे पूर्णपणे सुरक्षित आहे. नागरिकांना विनंती आहे की त्यांनी अफवा पसरवणे आणि दहशत पसरवणे थांबवावे.” अशा शब्दात पाश्चिम रेल्वे प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे.

   Follow us on        

 

 

 

सिंधुदुर्ग जिल्हा लवकरच ‘4G’ अपग्रेड होणार

   Follow us on        
4G Service in Sindhudurg: सिंधुदुर्गात येत्या ४ महिन्यात सर्वत्र ‘४जी’ सेवा कार्यान्वित होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विस्कळीत बीएसएनएलची सेवा सुधारण्यासाठी विद्यमान खासदार  नारायण राणे साहेब यांनी केंद्रीय दळणवळण व दूरसंचार विभाग मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांना पत्र लिहिले होते. त्या पत्राची दखल घेण्यात आली आहे.
मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १८७ साईट पैकी १५५ नवीन आणि ३२ विद्यमान 2G व 3G टॉवर 4G टॉवर मध्ये रूपांतरित करण्याचे ठरवले आहे. त्यापैकी २५ टॉवर कार्यान्वित झालेले आहेत. फेस टू प्रकल्पांतर्गत 4G अपग्रेडेशनसाठी ३२३ साईट पैकी ३८ साईट 4G आणि २८५ विद्यमान साईट कार्यवाहीत करण्याची ठरवलेली आहेत. यातील ४ साइट्स कार्यान्वित झालेल्या आहेत, उर्वरित टॉवर हे जून २०२५ पर्यंत कार्यान्वित करण्याचे ठरवलेले आहे.
या निर्णयामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला याचा फायदा होईल असा विश्वास कुडाळ-मालवण मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांनी  व्यक्त केला आहे.

१५ जानेवारी पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-द्वितीया – 27:26:20 पर्यंत
  • नक्षत्र-पुष्य – 10:29:17 पर्यंत
  • करण-तैतुल – 15:20:20 पर्यंत, गर – 27:26:20 पर्यंत
  • पक्ष- कृष्ण
  • योग-प्रीति – 25:46:18 पर्यंत
  • वार- बुधवार
  • सूर्योदय- 07:17:46
  • सूर्यास्त- 18:20:01
  • चन्द्र-राशि-कर्क
  • चंद्रोदय- 19:48:00
  • चंद्रास्त- 08:22:59
  • ऋतु- शिशिर
जागतिक दिवस:
  • राष्ट्रीय सैन्य दिवस.
महत्त्वाच्या घटना:
  • १५५९: राणी एलिझाबेथ (पहिली) हिचा इंग्लंडची राणी म्हणून वेस्टमिन्स्टर अ‍ॅबे येथे राज्याभिषेक झाला.
  • १७६१: पानिपतचे तिसरे युद्ध संपले.
  • १८६१: एलिशा जी. ओटिस या संशोधकाला सुरक्षित उद्‌वाहकाचे (Lift) जगातील पहिले पेटंट मिळाले.
  • १८८९: द पेंबरटन मेडिसिन कंपनी या कंपनीची अटलांटा, जॉर्जिया, यू. एस. ए. येथे स्थापना झाली. ही कंपनी सध्या द कोका कोला कंपनी म्हणून प्रसिद्ध आहे.
  • १९४९: जनरल करिअप्पा यांनी ब्रिटिशांकडुन भारतीय सेनेची सूत्रे हाती घेतली.
  • १९७०: मुअम्मर गडाफी लीबीयाचे सर्वेसर्वा झाले.
  • १९७३: जनरल गोपाळ गुरुनाथ बेवूर यांनी भारताचे ९ वे लष्करप्रमुख म्हणून सूत्रे हाती घेतली. हे लष्करप्रमुख होणारे पहिले महाराष्ट्रीयन आहेत.
  • १९९६: भारतातील रेल्वेयुगाच्या प्रारंभापासून ब्रिटिश परंपरा व संस्कृतीचा डौल मिरवणाऱ्या बोरीबंदर (व्हिक्टोरिया टर्मिनस) या स्थानकाचे नाव बदलुन ते छत्रपती शिवाजी टर्मिनस (CST) असे करण्यात आले.
  • १९९९: गायिका ज्योत्स्‍ना भोळे यांना राज्य सरकारच्या वतीने गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान करण्यात आला.
  • २००१: सर्वांना मोफत असलेला ज्ञानकोश ’विकीपिडिया’ हा इंटरनेटवर प्रथमच उपलब्ध झाला.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १७७९: रॉबर्ट ग्रँट – मुंबई इलाख्याचे राज्यपाल, मुंबईतील ग्रँट मेडिकल कॉलेजचे एक संस्थापक, मुंबईतील ग्रँट रोड हा त्यांच्याच नावाने ओळखला जातो. (मृत्यू: ? ? १८३८)
  • १८५६: भारताचे प्रसिध्द राजनीती मर्मज्ञ, सामाजिक कार्यकर्ते अश्विनी कुमार दत्त यांचा जन्म.
  • १९१८: भारताचे प्रसिद्ध स्वातंत्र्य सैनिक यशवंत अग्रवाडेकर यांचा जन्म.
  • १९२०: डॉ. आर. सी. हिरेमठ – कन्नड साहित्यिक, कर्नाटक विद्यापीठाचे कुलगुरू (मृत्यू: ३ नोव्हेंबर १९९८)
  • १९२१: बाबासाहेब भोसले – महाराष्ट्राचे ९ वे मुख्यमंत्री [कार्यकाल: २१ जानेवारी १९८२ ते १ फेब्रुवारी १९८३] (मृत्यू: ६ आक्टोबर २००७)
  • १९२६: कुस्तीगीर खाशाबा दादासाहेब जाधव – १९५२ च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमधे वैयक्तिक पदक मिळवणारे पहिले भारतीय, शिवछत्रपती पुरस्कार [मरणोत्तर] (मृत्यू: १४ ऑगस्ट १९८४)
  • १९२९: मार्टिन ल्युथर किंग (ज्युनिअर) – कृष्णवर्णीयांचे गांधी म्हणून ओळखले जाणारे अमेरिकेतील मानवी हक्क कार्यकर्ते आणि नोबेल पारितोषिक विजेते (मृत्यू: ४ एप्रिल १९६८)
  • १९३१: मराठीह कथाकार शरच्चंद्र वासुदेव चिरमुले यांचा जन्म.
  • १९३८: भारतीय फुटबॉलर चुनी गोस्वामी यांचा जन्म.
  • १९४७: पत्रकार नितीश नंदी यांचा जन्म.
  • १९५६: बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांचा जन्म.
  • १९८२: प्रसिद्ध अभिनेता नील नितीन मुकेश यांचा जन्म.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

  • १९७१: दीनानाथ दलाल – अत्यंत लोकप्रिय व प्रतिभावान चित्रकार (जन्म: ३० मे १९१६)
  • १९९४: हरिलाल उपाध्याय – गुजराथी लेखक, कवी व ज्योतिषी (जन्म: २२ जानेवारी १९१६)
  • १९९८: गुलजारीलाल नंदा – भारताचे दुसरे पंतप्रधान, स्वातंत्र्यसैनिक व गांधीवादी कार्यकर्ते (जन्म: ४ जुलै १८९८)
  • २००२: विठाबाई भाऊ (मांग) नारायणगावकर – राष्ट्रपतिपदक विजेत्या तमाशा कलावंत (जन्म: ? ? १९३५)
  • २००९: दादासाहेब फाळके पुरस्कार जिंकणारे तपन सिन्हा यांचे निधन.
  • २०१२: भारताच्या पहिल्या महिला फोटोग्राफर होमाई व्यारावाला यांचे निधन.
  • २०१३: डॉ. शरदचंद्र गोखले – समाजसेवक (जन्म: २९ सप्टेंबर १९२५)
  • २०१४: नामदेव लक्ष्मण ढसाळ – दलित साहित्यिक (जन्म: १५ फेब्रुवारी १९४९)

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

NHAI बांधणार 30 किमी लांबीचा ‘एक्सप्रेस वे’; मुंबई ते गोवा अंतर अर्ध्या तासाने कमी होणार….

   Follow us on        

मुंबई: भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) नवीन एक्सप्रेस वे बांधणार आहे. हा द्रुतगती मार्ग जेएनपीटीजवळील पागोटे ते जुन्या पुणे महामार्गावरील चौक जंक्शनपर्यंत 30 किमी लांबीचा असेल. या प्रकल्पासाठी अंदाजे 3,700 कोटी रुपये खर्च येणार असून 30 महिन्यांत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.

यामुळे एमटीएचएल (अटल सेतू) ते गोव्याला जाणाऱ्या महामार्गापर्यंतचा प्रवास अवघ्या 20-30 मिनिटांत पूर्ण होणार आहे. या मार्गामुळे मुंबई ते गोवा या महामार्गावरील प्रवासाचा वेळ कमी होणार आहेहा द्रुतगती मार्ग उरण-चिरनेर महामार्ग, गोवा महामार्ग आणि पुणे द्रुतगती महामार्ग अशा अनेक महत्त्वाच्या महामार्गांना जोडेल. भविष्यात हा महामार्ग अलिबाग-विरार मल्टीमॉडल कॉरिडॉर, मुरबाड-जुन्नर महामार्ग, समृद्धी द्रुतगती महामार्ग आणि नाशिक महामार्गाशी देखील जोडला जाईल.

तसेच तो वडोदरा-मुंबई ग्रीनफिल्ड एक्स्प्रेस वेशी जोडला जाणार आहे. यामुळे बंदर आणि विमानतळ परिसरात मालवाहतूक सुलभ होईल आणि जेएनपीटी, गोवा, पुणे आणि मुंबई दरम्यानचा प्रवास वेळही कमी होईहा नवीन एक्स्प्रेस वे अटल सेतूच्या शिवडी टोकाला असलेल्या कोस्टल रोडला आणि वरळीजवळील सी लिंकला जोडेल. त्याचा पुढील विस्तार अलिबाग-विरार मल्टीमॉडल कॉरिडॉर, मुरबाड-जुन्नर महामार्ग, समृद्धी द्रुतगती महामार्ग आणि पडघाजवळील नाशिक महामार्ग (मोरबे, कर्जत, शेलू, वाघणी आणि बदलापूर मार्गे) यांना जोडतील. हा दिल्ली-मुंबई कॉरिडॉरच्या वडोदरा-मुंबई ग्रीनफील्ड एक्सप्रेसवेचाही भाग असेल.NHAI लवकरच या कामाचा कार्यादेश जारी करुन, येत्या सात महिन्यांत बांधकाम सुरू होण्याची अपेक्षा आहे. या कॉरिडॉरमुळे 10,000 हून अधिक वाहनांसाठी वाहतूक सुरळीत होणार आहे. यामुळे मल्टी-एक्सल कंटेनर ट्रक यांचा प्रवास सुलभ होणार आहे.

नव्या एक्स्प्रेस वेमुळे रस्त्यांवरील गर्दी कमी होणार असून प्रवासाचा वेळही वाचणार आहे, असे NHAI च्या प्रादेशिक व्यवस्थापक अंशुमाली श्रीवास्तव यांनी प्रसार माध्यमांना माहिती दिली.

१४ जानेवारी पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-प्रथम – 27:24:14 पर्यंत
  • नक्षत्र-पुनर्वसु – 10:18:07 पर्यंत
  • करण-बालव – 15:37:27 पर्यंत, कौलव – 27:24:14 पर्यंत
  • पक्ष- कृष्ण
  • योग-विश्कुम्भ – 26:58:11 पर्यंत
  • वार- मंगळवार
  • सूर्योदय- 07:17
  • सूर्यास्त- 18:19
  • चन्द्र-राशि-कर्क
  • चंद्रोदय- 18:48:59
  • चंद्रास्त- 07:35:59
  • ऋतु- शिशिर
जागतिक दिवस:
  • मकर संक्रमण
\
महत्त्वाच्या घटना:
  • १७६१: मराठे आणि अफगाणी यांमध्ये पानिपतची तिसरी लढाई झाली. दुसर्‍याच दिवशी संपलेल्या या युद्धात अफगाण्यांचा विजय झाल्यामुळे भारतीय इतिहासाचा चेहरामोहराच बदलुन गेला.
  • १९२३: विदर्भ साहित्य संघाची स्थापना झाली.
  • १९४८: ’लोकसत्ता’ हे मराठी वृत्तपत्र सुरू झाले.
  • १९९४: मराठवाडा विद्यापीठाचा ’डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ’ असा नामविस्तार करण्यात आला.
  • १९९८: दाक्षिणात्य गायिका एम.एस. सुब्बलक्ष्मी यांना ‘भारतरत्‍न’ हा सर्वोच्‍च सन्मान जाहीर.
  • २०००: ज्येष्ठ समाजसेवक व गांधीवादी विचारवंत मुरलीधर देविदास ऊर्फ ’बाबा’ आमटे यांना १९९९ चा गांधी शांतता पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १५५१: अकबराच्या नऊ रत्नांपैकी एक अबुल फ़ज़ल यांचा जन्म.
  • १८८२: रघुनाथ धोंडो तथा र. धों. कर्वे – समाजस्वास्थ्यासाठी संततिनियमन आणि लैंगिक शिक्षण यांसाठी बुद्धिवादी विचारप्रवर्तन व प्रत्यक्ष कार्य करणारे विचारवंत, महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे ज्येष्ठ पुत्र (मृत्यू: १४ आक्टोबर १९५३)
  • १८८३: निना रिकी – जन्माने इटालियन असलेल्या फ्रेंच फॅशन डिझायनर (मृत्यू: ३० नोव्हेंबर १९७०)
  • १८९२: शतायुषी क्रिकेटमहर्षी प्रा. दिनकर बळवंत तथा दि. ब. देवधर – प्रथमश्रेणीचे ६२ सामने, १०० डाव, ११ वेळा नाबाद, ९ शतके, ३९५१ एकूण धावा, ४४.३९ सरासरी. भारत सरकारतर्फे त्यांना पद्मश्री (१९६५) व पद्मविभूषण (१९९१) या पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते. (मृत्यू: २४ ऑगस्ट १९९३)
  • १८९६: ’रिझर्व बँक ऑफ ईंडिया’ चे पहिले गव्हर्नर सर चिंतामणराव द्वारकानाथ देशमुख उर्फ सी. डी. देशमुख (मृत्यू: २ आक्टोबर १९८२)
  • १९०५: दुर्गा खोटे – हिन्दी व मराठी चित्रपटातील अभिनेत्री. सुमारे ५० वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी ३०० हून अधिक चित्रपटांत भूमिका केला. १९८२ मध्ये ’मी दुर्गा खोटे’ हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध झाले. (मृत्यू: २२ सप्टेंबर १९९१)
  • १९०८: ज्येष्ठ पत्रकार आणि रॉयवादी विचारवंत द्वा. भ. कर्णिक यांचा जन्म.
  • १९१८: भारतीय महिला स्वातंत्र्य सैनिक सुधाताई जोशी याचा जन्म.
  • १९१९: सय्यद अख्तर हुसेन रिझवी ऊर्फ ’कैफी आझमी’ – गीतकार (मृत्यू: १० मे २००२)
  • १९२३: चित्तरंजन कोल्हटकर – अभिनेते (मृत्यू: २५ आक्टोबर २००९)
  • १९२६: महाश्वेता देवी – बंगाली लेखिका
  • १९३१: सईद अहमद शाह ऊर्फ ’अहमद फराज’ – ऊर्दू शायर (मृत्यू: २५ ऑगस्ट २००८)
  • १९७७: नारायण कार्तिकेयन – भारतीय फॉर्म्यूला कार रेसिंग ड्रायव्हर
  • १९८२: माजी प्रधान मंत्री इंदिरा गांधींनी २ सूत्री कार्यक्रमाची घोषणा.
  • १९९२: माजी भारतीय क्रिकेटर दिनकर बळवंत देवधर यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १७४२: एडमंड हॅले – हॅलेच्या धूमकेतूचा शोध लावणारे ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ, भूवैज्ञानिक, गणितज्ञ, हवामानशास्त्रज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: ८ नोव्हेंबर १६५६)
  • १७६१: सदाशिवराव भाऊ – पानिपतच्या तिसर्‍या युद्धातील सरसेनापती (जन्म: ४ ऑगस्ट १७३०)
  • १७६१: विश्वासराव – पानिपतच्या ३ र्‍या युद्धात मारले गेलेले नानासाहेब पेशव्यांचे ज्येष्ठ चिरंजीव (जन्म: २ मार्च १७४२)
  • १८९८: इंग्लिश लेखक आणि गणितज्ञ लुईस कॅरोल यांचे निधन.
  • १९२०: डॉज ऑटोमोबाईल कंपनीचे सहसंस्थापक जॉन फ्रान्सिस लबाडी यांचे निधन. (जन्म: २५ ऑक्टोबर १८६४)
  • १९९१: चित्रगुप्त श्रीवास्तव ऊर्फ ’चित्रगुप्त’ – संगीतकार (जन्म: १६ नोव्हेंबर १९१७)
  • २००१: फली बिलिमोरिया – माहितीपट निर्माते (जन्म: ? ? ????)

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

Ratnagiri ST Bus Accident: “काळ आला होता पण…” प्रवाशांनी भरलेली एसटी बस धरणात पडता पडता वाचली

   Follow us on        

Ratnagiri bus accident: रत्नागिरीच्या शेनाळे घाटात एका एसटी बसचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. ही एसटी बस रविवारी रात्री दाभोळवरुन मुंबईच्या दिशेने येत होती. त्यावेळी शेनाळे घाटातील एका तीव्र उतारावर चालकाचे एसटी बसवरील नियंत्रण सुटले आणि ही बस दरीत घरंगळत गेली. मात्र, त्याठिकाणी असणाऱ्या एका झाडाला धडकून बस तिथेच थांबली. ही बस आणखी पुढे घरंगळत गेली असती तर ती धरणात कोसळून मोठा अनर्थ घडला असता. मात्र, सुदैवाने आणि प्रवाशांचे दैव बलवत्तर असल्याने प्रवाशांचे जीव वाचले.

प्राथमिक माहितीनुसार, हा अपघात झाला त्यावेळी एसटी बस रविवारी रात्री मंडणगड शेनाळे घाटातून जात होती. या घाटात अतितीव्र उताराचा रस्ता आहे. यापैकी एका उतारावर एसटी बसवरील नियंत्रण सुटून ती दरीत कोसळली. दरीतील झाडाझुडपांमधून ही एसटी बस खाली घरंगळत जात होती. बस दरीत कोसळताना प्रवाशांना जाग आली तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला. या दरीच्या खालच्या बाजला धरण होते. ही एसटी बस आणखी खाली घरंगळत गेली असती तर थेट धरणात कोसळली असती आणि अनेक प्रवाशांचा जीव जाण्याची शक्यता होती. मात्र, दरीतील एका झाडला धडकून एसटी बस तिथेच अडकून पडली. यानंतर बचावपथकांनी घटनास्थळी धाव घेऊन एसटी बसमधील प्रवाशांना सुखरुप बाहेर काढले. रात्रीची वेळ असल्यामुळे बसपर्यंत मदत पोहोचण्यास विलंब झाला. तोपर्यंत अनेक प्रवाशी बसमध्ये जीव मुठीत धरुन बसले होते.

 

१३ जानेवारी पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-पौर्णिमा – 27:59:20 पर्यंत
  • नक्षत्र-आर्द्रा – 10:39:08 पर्यंत
  • करण-विष्टि – 16:29:03 पर्यंत, भाव – 27:59:20 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-वैधृति – 28:38:52 पर्यंत
  • वार- सोमवार
  • सूर्योदय- 07:17
  • सूर्यास्त- 18:18
  • चन्द्र-राशि-मिथुन – 28:20:36 पर्यंत
  • चंद्रोदय- 17:47:00
  • चंद्रास्त- चंद्रोस्त नहीं
  • ऋतु- शिशिर
महत्त्वाच्या घटना:
  • १६१०: गॅलिलियो यांनी गुरूचा चौथा उपग्रह कॅलीस्टोचा शोध लावला.
  • १८८९: नाट्याचार्य गोविंद बल्लाळ देवल यांनी लिहिलेल्या शारदा नाटकाचा पहिला प्रयोग इंदूर येथे झाला.
  • १८९९: गोविन्द बल्लाळ देवल यांच्या ’संगीत शारदा’ या नाटकाचा पहिला प्रयोग इंदूर येथे झाला.
  • १९१५: इटलीतील अवेझानो येथे भूकंप. २९८०० लोकांचे निधन.
  • १९१०: न्यूयार्क मध्ये पहिल्यांदा सार्वजनिक रेडीओ च्या माध्यमातून प्रसारण.
  • १९३०: मिकी माऊसची चित्रकथा प्रथम प्रकाशित.
  • १९४८: १२ जानेवारीच्या संध्याकाळी महात्मा गांधींनी हिंदू मुस्लीम एकतेसाठी उपोषणाला बसण्याचे घोषित केले आणि आजच्या दिवशी ते उपोषणाला बसले.
  • १९५३: मार्शल टिटो युगोस्लाव्हियाच्या अध्यक्षपदी
  • १९५७: हिराकूड धरणाचे पंडित नेहरूंच्या हस्ते उद्‍घाटन झाले.
  • १९६४: कोलकता येथे झालेल्या मुस्लिमविरोधी दंग्यात १०० जण ठार
  • १९६७: पुण्यातील स.प. महाविद्यालयाचा सुवर्णमहोत्सव श्री. चिंतामणराव देशमुख यांच्या हस्ते संपन्न.
  • १९७८: अमेरिकेने पहिल्यांदा महिला अंतरिक्षयात्री निवडली.
  • १९९६: पुणे – मुंबई दरम्यान ’शताब्दी एक्सप्रेस’ सुरू झाली.
  • २००७: के. जी. बालकृष्णन यांनी भारताचे ३७ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
  • २००९: जम्मू काश्मीर चे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला नॅशनल कांफ्रेंस चे अध्यक्ष बनले.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १९१९: एम. चेन्‍ना रेड्डी – आंध्र प्रदेशचे ११ वे मुख्यमंत्री, उत्तर प्रदेशचे राज्यपाल (१९७४ – १९७७), पंजाबचे राज्यपाल (१९८२ – १९८३), राजस्थानचे राज्यपाल (१९९२ – १९९३), तामिळनाडूचे राज्यपाल (१९९३ – १९९६) (मृत्यू: २ डिसेंबर १९९६)
  • १९२६: शक्ती सामंत – हिन्दी व बंगाली चित्रपट दिग्दर्शक व निर्माते (मृत्यू: ९ एप्रिल २००९)
  • १९३८: पं. शिवकुमार शर्मा – प्रसिद्ध संतूरवादक व संगीतकार
  • १९४९: राकेश शर्मा – एकूण १३८ वा व पहिला भारतीय अंतराळवीर
  • १९७८: भारतीय अभिनेता अस्मित पटेल यांचा जन्म.
  • १९८२: कमरान अकमल – पाकिस्तानी क्रिकेटपटू
  • १९८३: इम्रान खान – भारतीय चित्रपट कलाकार
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १८३२: थॉमस लॉर्ड – लॉर्डस क्रिकेट ग्राउंडचे संस्थापक (जन्म: २३ नोव्हेंबर १७५५)
  • १९७६: अहमद जाँ थिरकवा – सुप्रसिद्ध तबला वादक (जन्म: ? ? १८९२?)
  • १९८५: मदन पुरी – हिन्दी व पंजाबी चित्रपटांतील चरित्र अभिनेता (जन्म: ? ? १९१५)
  • १९९७: मल्हार सदाशिव तथा ’बाबूराव’ पारखे – उद्योजक व वेदाभ्यासक (जन्म: १५ एप्रिल १९१२)
  • १९९८: शंभू सेन – संगीत दिग्दर्शक व नृत्य दिग्दर्शक (जन्म: ? ? ????)
  • २००१: श्रीधर गणेश दाढे – संस्कृत पंडित व लेखक. कालिदासाचे ’मेघदूत’ कवींद्र परमानंद यांचे ’शिवभारत’ यांचे पद्यमय अनुवाद त्यांनी केले आहेत. (जन्म: ? ? ????)
  • २०११: प्रभाकर पणशीकर – ख्यातनाम अभिनेते (जन्म: १४ मार्च १९३१)
  • २०१३: रुसी सुरती – क्रिकेटपटू (जन्म: २५ मे १९३६)

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

Shaktipeeth Expressway: नागपूर-गोवा महामार्गाच्या पर्यावरणीय मंजुरीसाठी सुधारित संरेखनासह अर्ज दाखल

   Follow us on        

Nagpur Goa Shaktipeeth Expressway: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील शक्तीपीठे, काही महत्त्वाची तीर्थक्षेत्रे आणि तीर्थक्षेत्रे यांना जोडणारा नागपूर आणि गोवा दरम्यान द्रुतगती मार्ग बांधण्याच्या महायुती सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला आता गती मिळू लागली आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) नागपूर-गोवा शक्तीपीठ द्रुतगती मार्गासाठी पर्यावरण मंजुरीसाठी नवीन अर्ज सादर केला आहे.

ऑगस्टच्या सुरुवातीला, स्थानिक शेतकऱ्यांसह शिष्टमंडळाने कोल्हापुरात एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची भेट घेऊन प्रकल्प रद्द करण्याची मागणी केल्यानंतर, एमएसआरडीसीने प्रकल्पासाठी पर्यावरण मंजुरी घेण्याची योजना मागे घेतली होती.मात्र MSRDC ने आता पुन्हा अर्ज केला आहे. या सुधारित अर्जात वर्धा ते सिंधुदुर्ग पर्यंतच्या सर्व पॅकेजेससाठी काही संरेखन पर्याय सादर केले आहेत.

प्रस्तावित सहा-लेन प्रवेश-नियंत्रित शक्तीपीठ एक्सप्रेसवे लांबीमध्ये नागपूर-मुंबई द्रुतगती महामार्गापेक्षा लांबीला (802 किलोमीटर) मोठा असणार आहे. शक्तीपीठ द्रुतगती मार्ग वर्धा जिल्ह्यातील पवनार येथून सुरू होईल आणि महाराष्ट्र-गोवा राज्य सीमेवरील पत्रादेवी येथे संपेल. हा महामार्ग वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर, बीड, उस्मानाबाद, सोलापूर, कोल्हापूर आणि सिंधुदुर्गमधून जाण्याचा प्रस्ताव आहे. एक्स्प्रेस वेमुळे नागपूर आणि गोवा दरम्यानचा प्रवास वेळ 18-20 तासांवरून 8-10 तासांपर्यंत कमी होण्याची अपेक्षा आहे. वृत्तानुसार, विदर्भ आणि मराठवाड्यातील जमीन मालक या प्रकल्पाला पाठिंबा देत आहेत, तर सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातून याला मोठा विरोध होत होता.

या विरोधामुळे प्रकल्पासाठी एकापेक्षा जास्त संरेखन पर्याय सादर करण्यात आलेले आहेत. हे पर्याय ठरविताना हा मार्ग सुपीक जमिनी नाश करणारा नसेल आणि पर्यावरणाला जास्त हानी पोहोचवणारा नसेल याची दक्षता यावेळी घेतली असल्याचे संबधित अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.

 

 

“…अन्यथा प्रजासत्ताक दिनी सावंतवाडी स्थानकावर रेल रोको आंदोलन…” कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचा इशारा

   Follow us on        
सावंतवाडी:  भूमीपूजन होऊन तब्बल ९ वर्षे उलटूनही अद्यापही अपूर्ण अवस्थेत असलेल्या सावंतवाडी रेल्वे टर्मिनस बाबत सावंतवाडी रेल्वे प्रवासी संघटनेकडून प्रशासनाला जाग आणण्यासाठी येत्या प्रजासत्ताक दिनी सावंतवाडी रेल्वे स्थानक येथे मोठ्या प्रमाणात प्रवासी एकञ करून रेल रोको आंदोलन करण्यात येणार आहे. रेल्वे प्रवासी संघटनेकडून वेळोवेळी आंदोलने करूनही मागण्यांची दखल घेतली जात नसल्या कारणाने नाराज झाल्याने अखेर रेल रोको आंदोलन करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
याबाबतची नोटीस प्रवासी संघटनेकडून सावंतवाडी रेल्वे स्थानक स्टेशनमास्तर यांना देण्यात आली.या नोटीस मध्ये असे म्हटले आहे की, सावंतवाडी रोड स्थानकावर प्रस्तावित टर्मिनस चे भूमिपूजन दिनांक २०/०६/२०१५ रोजी मा. मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, मा. रेल्वे मंत्री श्री सुरेश प्रभू, मा. पालकमंत्री श्री दिपक केसरकर, मा. खासदार श्री विनायक राऊत, लोकप्रतिनिधी, व रेल्वे अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडलेले आहे. तसेच या कामाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन देखील झाले आहे, असे असताना या स्थानकाच्या नामकरणाचा विषय अजूनही प्रलंबित आहे. याचबरोबर २६ जानेवारी २०२४ रोजी संघटनेतर्फे सावंतवाडी स्थानकावर लाक्षणिक उपोषण आंदोलन देखील करण्यात आले होते. त्यावर देखील आपणाकडून आलेल्या पत्रात असंख्य चुका करण्यात आल्या होत्या. आपण अजूनही सावंतवाडी येथील टर्मिनसच्या कामावर आणि येथील प्रवासी सुविधांवर गंभीर नाहीत हेच यावरून निदर्शनास येते.
     
तसेचं कोकण रेल्वे महामंडळाने सावंतवाडी येथील टर्मिनसच्या उर्वरित कामासाठी निधीची तरतूद करावी. कोकण रेल्वे महामंडळाने सावंतवाडी टर्मिनस च्या नामकरण संदर्भात आपला प्रस्ताव संबंधित प्रशासनाला पाठवावा. कोकण रेल्वे महामंडळाने सावंतवाडी स्थानकाचा समावेश केंद्राचा अमृत भारत स्थानक योजनेत करण्यासाठी पुन्हा एकदा योग्य तो पाठपुरावा संबंधित प्रशासनाकडे करावा. सावंतवाडी स्थानकात खालील रेल्वे गाड्यांना थांबा देण्यात यावा. सावंतवाडी स्थानकावरून कल्याण पुणे मार्गावर नवीन ट्रेन चालू करणे. सावंतवाडी ते बेळगाव ह्या नवीन रेल्वे मार्गाचे काम सुरु करणे. या मागण्या संघटनेकडून करण्यात आल्या आहेत, या मागण्या मान्य न झाल्यास प्रजासत्ताक दिनी मोठ्या प्रमाणात रेल्वे प्रवासी एकञ येऊन रेल रोको करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search