Author Archives: Kokanai Digital

२५ डिसेंबर पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-दशमी – 22:31:51 पर्यंत
  • नक्षत्र-चित्रा – 15:22:47 पर्यंत
  • करण-वणिज – 09:15:28 पर्यंत, विष्टि – 22:31:51 पर्यंत
  • पक्ष- कृष्ण
  • योग-अतिगंड – 21:45:38 पर्यंत
  • वार- बुधवार
  • सूर्योदय- 07:11
  • सूर्यास्त- 18:07
  • चन्द्र-राशि-तुळ
  • चंद्रोदय- 26:55:00
  • चंद्रास्त- 13:48:59
  • ऋतु- शिशिर
जागतिक दिवस:
  • ख्रिसमस डे : येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस
  • राष्ट्रीय सुशासन दिवस.
महत्त्वाच्या घटना:
  • ०: रोममध्ये पहिल्यांदा नाताळ साजरे करण्यात आले.
  • १७७१: मुघल प्रशासक दुसरा शाह आलम दिल्लीच्या सिंहासनावर बसले.
  • १७६३: भरतपूर चे महाराजा सुरजमल यांची हत्या.
  • १९४६: ताईवान ने संविधानाला स्वीकारले.
  • १९७४: रोम जात असेलेले एअर इंडिया चे बोईंग ७४७ चे अपहरण.
  • १९७६: ’आय. एन. एस. विजयदुर्ग’ ही युद्धनौका भारतीय नौदलात सामील
  • १९९०: वर्ल्ड वाइड वेबची (www) पहिली यशस्वी चाचणी
  • १९९१: मिखाईल गोर्बाचेव्ह यांनी सोविएत संघराज्याच्या (USSR) अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. याच्या दुसऱ्याच दिवशी सोविएत संघराज्याचे विघटन करण्यात आले आणि जनमत चाचपणीच्या आधारे सर्वप्रथम युक्रेन हा देश सोव्हिएत संघराज्यातुन बाहेर पडला.
  • २००२: चीन आणि बांगलादेश मध्ये संरक्षण करार पार पडला.
  • २००५: ४०० वर्षाआधी लुप्त झालेला पक्षी “डोडो” चे दोन ते तीन हजार वर्ष जुने अवशेष आढळले.
  • २००८: भारताने पाठविलेल्या चंद्रयान-१ च्या पेलोडर ने चंद्राचा पहिला नवीन फोटो पाठविला.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १६४२: सर आयझॅक न्यूटन – इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ, गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ. गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडला. गणितातील ‘कॅल्क्युलस’ या शाखेचे जनक (मृत्यू: २० मार्च १७२७)
  • १८२१: अमेरिकन रेड क्रॉसच्या संस्थापिका क्लारा बार्टन यांचा जन्म. (मृत्यू: १२ एप्रिल १९१२)
  • १८६१: पण्डित मदन मोहन मालवीय – बनारस हिन्दू विश्वविद्यालयाचे एक संस्थापक (मृत्यू: १२ नोव्हेंबर १९४६)
  • १८७२: संस्कृत भाषेचे विद्वान पंडित गंगानाथ झा यांचा जन्म.
  • १८७६: बॅ. मुहम्मद अली जिना – पाकिस्तानचे प्रणेते व पहिले गव्हर्नर जनरल (मृत्यू: ११ सप्टेंबर १९४८)
  • १८७८: शेवरले कंपनीचे सहसंस्थापक लुई शेवरोलेट यांचा जन्म. (मृत्यू: ६ जून १९४१)
  • १८८६: पाकिस्तानचे प्रणेते व पहिले गव्हर्नर जनरल बॅ. मुहम्मद अली जिना यांचा जन्म. (मृत्यू: ११ सप्टेंबर १९४८)
  • १८८९: रीडर डायजेस्टच्या सहसंस्थापिका लीला बेल वॉलेस यांचा जन्म. (मृत्यू: ८ मे १९८४)
  • १९११: बर्न होगार्थ – जंगलचा सम्राट टारझन याला कार्टुनद्वारे अजरामर करणारे अमेरिकन व्यंगचित्रकार, लेखक, शिक्षणतज्ञ (मृत्यू: २८ जानेवारी १९९६ – पॅरिस, फ्रान्स)
  • १९१६: अल्जेरियाचे पहिले अध्यक्ष अहमद बेन बेला यांचा जन्म. (मृत्यू: ११ एप्रिल २०१२)
  • १९१८: अन्वर सादात – इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष व नोबेल पारितोषिक विजेते (मृत्यू: ६ आक्टोबर १९८१)
  • १९१९: नौशाद अली – संगीतकार (मृत्यू: ५ मे २००६)
  • १९२१: भारतीय-पाकिस्तानी पत्रकार आणि लेखक झैब-अन-नसीसा हमिदुल्ला यांचा जन्म. (मृत्यू: १० सप्टेंबर २०००)
  • १९२४: अटलबिहारी बाजपेयी – भारताचे १० वे पंतप्रधान, भारतीय जनता पक्षाचे नेते, असामान्य संसदपटू, अलौकिक वक्ते व उत्तुंग प्रतिभेचे ओजस्वी कवी, पद्मविभूषण
  • १९२५: प्रसिद्ध चित्रकार सतीश गुजराल यांचा जन्म.
  • १९२६: चित्त बसू – संसदपटू, ’फॉरवर्ड ब्लॉक’चे सरचिटणीस (मृत्यू: ५ आक्टोबर १९९७)
  • १९२६: डॉ. धर्मवीर भारती – हिन्दी लेखक, कवी, नाटककार, पत्रकार व ’धर्मयुग’ साप्ताहिकाचे २७ वर्षे संपादक, ’अभ्युदय’ व ’संगम’ या नियतकालिकांचे संपादनही त्यांनी केले. (मृत्यू: ४ सप्टेंबर १९९७)
  • १९२७: पं. रामनारायण – सुप्रसिद्ध सारंगीये
  • १९३२: प्रभाकर जोग – व्हायोलिनवादक, संगीत संयोजक व संगीतकार
  • १९३६: भारतीय-इंग्रजी दिग्दर्शक व निर्माते इस्माईल मर्चंट यांचा जन्म. (मृत्यू: २५ मे २००५)
  • १९४९: नवाझ शरीफ – पाकिस्तानचे १२ वे पंतप्रधान
  • १९५९: भारतीय कवी आणि राजकारणी रामदास आठवले यांचा जन्म.
  • १९८०: राष्ट्रवादी मुस्लीम नेते मुख्तार अहमद अंसारी यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १९४९: वॉर्नर ब्रदर्स कार्टूनचे संस्थापक लिओन स्चलिंगर यांचे निधन. (जन्म: २० मे १८८४)
  • १९५७: प्रा. श्रीपाद महादेव तथा श्री. म. माटे – साहित्यिक, विचारवंत व अस्पृश्यता निवारणासाठी सतत प्रयत्‍न करणारे कृतिशील समाजसुधारक. १९१६ मध्ये त्यांनी दलितांसाठी रात्रशाळा काढली व वीस – पंचवीस वर्षे मोफत शिकवले. (जन्म: २ सप्टेंबर १८८६)
  • १९७२: चक्रवर्ती राजगोपालाचारी – भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल, मद्रास इलाख्याचे मुख्यमंत्री, स्वातंत्र्यसेनानी, कायदेपंडित, मुत्सद्दी आणि लेखक (जन्म: १० डिसेंबर १८७८)
  • १९७७: चार्ली चॅपलिन – अभिनेता, दिग्दर्शक आणि संगीतकार. त्यांच्या ‘लाईम लाईट‘ या चित्रपटाला ऑस्कर पारितोषिक मिळाले होते. ’कीड ऑटो रेसेस अ‍ॅट व्हेनिस’ या त्यांच्या दुसर्‍या चित्रपटातील डर्बी हॅट, घट्ट कोट ढगळ पँट, चौकोनी मिशा, बेढब जोडे आणि काठी या वेशभूषेमुळे चार्ली चॅप्लिन म्हणजे लोकांना मूर्तिमंत विनोद वाटू लागले. (जन्म: १६ एप्रिल १८८९)
  • १९८९: रोमेनियाचे पहिले अध्यक्ष निकोला सीउसेस्कु यांचे निधन. (जन्म: २६ जानेवारी १९१८)
  • १९९४: ग्यानी झैलसिंग – भारताचे ७ वे राष्ट्रपती, पंजाबचे मुख्यमंत्री, केंद्रीय गृहमंत्री (जन्म: ५ मे १९१६)
  • १९९५: डीन मार्टिन – अमेरिकन गायक, संगीतकार व निर्माते (जन्म: ७ जून १९१७)
  • १९९८: दत्तात्रय गोविंद तथा दत्ता खेबुडकर – नाटककार व दिग्दर्शक (? ? १९२५)
  • २०१५: भारतीय अभिनेत्री साधना शिवदासानी यांचे निधन.

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

Ladki Bahin Yojana : खुशखबर ,लाडक्या बहिणींना आजपासून पैसे मिळण्यास सुरुवात

   Follow us on        

Ladki Bahin Yojana Installment: मुख्यंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्व महिलांचं लक्ष लागलं होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे विधानसभेत अधिवेशन संपल्यानंतर लाडक्या बहिणींच्या खात्यात रक्कम वर्ग केली जाईल, असं म्हटलं होतं. त्यानुसार या वर्षीच लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळणार आहे. हप्ता देण्याची प्रक्रिया आजपासून सुरु करण्यात येणार आहे. लाडक्या बहिणींना 1500 रुपयांप्रमाणं सहावा हप्ता मिळणार आहे.

डिसेंबरच्या हप्त्यासाठी 3500 कोटी रुपयांची तरतूद

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पाच हप्त्यांची रक्कम पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात वर्ग करण्यात आली होती. जुलै ते नोव्हेंबर पर्यंत 1500 रुपयांप्रमाणं 7500 रुपये महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले होते. निवडणुकीपूर्वीच महिलांच्या खात्यात नोव्हेंबर महिन्याची रक्कम आली होती. आता डिसेंबरच्या हप्त्याची रक्कम आजपासून महिलांच्या खात्यात येणार आहे.

लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता या महिना अखेर मिळणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानसभेतील घोषणेप्रमाणं अधिवेशन संपल्यानंतर 1500 रुपयांची रक्कम मिळणार आहे. डिसेंबरचा हप्ता लाडक्या बहिणींना देण्याची प्रक्रिया आजपासून सुरू होणार आहे. एका महिन्याचा हप्ता देण्यासाठी लागणारी रक्कम लाडक्या बहिणींना वर्ग करण्यात आला आहे.

किती महिलांना मिळणार लाभ मिळणार? 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता दोन टप्प्यात दिला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात 2 कोटी 35 लाख महिलांना पंधराशे रुपये प्रमाणे डिसेंबरचा हप्ता मिळणार आहे. विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी अखेरच्या टप्प्यात महिला व बाल कल्याण विभागाकडे 25 लाख महिलांचे अर्ज आले होते. त्या अर्जांची स्क्रुटिनी राहिली असल्यानं ती पूर्ण करुन या महिलांना देखील डिसेंबरचा हप्ता दुसऱ्या टप्प्यात दिला जाईल.

लाडक्या बहिणींना 2100 रुपयांसाठी वाट पाहावी लागणार

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केल्यानंतर महायुतीनं मोठी घोषणा केली होती. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात महायुतीकडून लाडकी बहीण योजनेची रक्कम 1500 रुपयांवरुन 2100 रुपये करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार 2100 रुपये कधीपासून मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. मात्र, डिसेंबरचा हप्ता 1500 रुपयांप्रमाणं मिळणार आहे. दुसरीकडे, देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपद स्वीकारल्यानंतर अर्थसंकल्पात याबाबत निर्णय घेतला जाईल, असं म्हटलं होतं. त्यानुसार अर्थसंकल्प सादर झाल्यानंतरचं महिलांना 2100 रुपयांचा हप्ता मिळू शकेल, अशी स्थिती आहे.

नववर्ष स्वागतासाठी उत्तर रेल्वे चालविणार विशेष सुपरफास्ट एक्सप्रेस; कोकण विभागात या स्थानकांवर थांबे

   Follow us on        

Special Trains: नववर्षाच्या स्वागतासाठी गोव्यात जाणाऱ्या पर्यटकांसाठी उत्तर रेल्वेने एका सुपरफास्ट विशेष गाडीची घोषणा केली आहे. ही गाडी हजरत निजामुद्दीन आणि तिरुवनंतपुरम सेंट्रल या दरम्यान चालविण्यात येणार आहे.

गाडी क्रमांक ०४०८२/०४०८१ हजरत निजामुद्दीन -तिरुवनंतपुरम सेंट्रल – हजरत निजामुद्दीन सुपरफास्ट एक्सप्रेस स्पेशल:

गाडी क्रमांक ०४०८२ हजरत निजामुद्दीन तिरुअनंतपुरम सेंट्रल सुपरफास्ट एक्सप्रेस २८ डिसेंबर २०२४ (शनिवार) रोजी हजरत निजामुद्दीन येथून १९.२० वाजता सुटेल आणि तिरुवनंतपुरम सेंट्रल येथे तिसऱ्या दिवशी १९.४५ वाजता पोहोचेल.

परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक ०४०८१ तिरुवनंतपुरम सेंट्रल हजरत निजामुद्दीन सुपरफास्ट एक्स्प्रेस तिरुअनंतपुरम सेंट्रलवरून ३१ डिसेंबर २०२४ (मंगळवार) रोजी ०७.५० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी ०६.४५ वाजता हजरत निजामुद्दीनला पोहोचेल.

डब्यांची रचना: एसी टू टायर कोच -०५ , एसी थ्री टायर कोच- १० , जनरल सेकंड क्लास कोच-०२ , सेकंड क्लास कोच (दिव्यांगजन) -०१ आणि लगेज कम ब्रेक व्हॅन- ०१

या गाडीला कोकणात पनवेल, रोहा, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली आणि थिवी या मोजक्याच स्थानकांवर थांबे देण्यात आले आहे.

या गाडीच्या वेळा आणि थांब्याचे तपशील खालीलप्रमाणे आहेत

या विशेष गाडीचे आरक्षण दिनांक २५ डिसेंबर रोजी सुरु होणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

Loading

२४ डिसेंबर पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-नवमी – 19:55:11 पर्यंत
  • नक्षत्र-हस्त – 12:17:52 पर्यंत
  • करण-गर – 19:55:11 पर्यंत
  • पक्ष- कृष्ण
  • योग-शोभन – 20:52:37 पर्यंत
  • वार- मंगळवार
  • सूर्योदय- 07:11
  • सूर्यास्त- 18:06
  • चन्द्र-राशि-कन्या – 25:51:41 पर्यंत
  • चंद्रोदय- 26:06:00
  • चंद्रास्त- 13:16:59
  • ऋतु- शिशिर
जागतिक दिवस:
  • राष्ट्रीय ग्राहक दिन;दरवर्षी २४ डिसेंबर हा दिवस भारतात राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो.
महत्त्वाच्या घटना:
  • १७७७: कॅप्टन जेम्स कूकने प्रशांत महासागरातील किरितीमती बेटांचा शोध लावला.
  • १८९२: भारताचे प्रसिद्ध लेखक बनारसीदास चतुर्वेदी यांचा जन्म.
  • १८९४: पहिली वैद्यकीय परिषद कोलकत्ता येथे सुरु झाली.
  • १९०६: रेजिनाल्ड फेसेंडेन याने प्रथमच एक कवितावाचन, व्हायोलिनवादन आणि एक भाषण यांचे रेडिओ प्रक्षेपण केले.
  • १९१०: स्वातंत्र्यवीर सावरकर यांना जन्मठेपेची व काळ्यापाण्याची शिक्षा
  • १९२४: अल्बानिया या देशाला स्वातंत्र्य मिळाले.
  • १९४३: दुसरे महायुद्ध – जनरल ड्वाईट आयसेनहॉवर हा दोस्त राष्ट्रांच्या फौजांचा सरसेनापती बनला.
  • १९५१: लिबीया हा देश (ईटलीकडून) स्वतंत्र झाला.
  • १९७९: सोविएत युनियनने अफगणिस्तानवर आक्रमण केले.
  • १९८६: भारतीय ग्राहक दिन.
  • १९८६: दिल्ली येथील लोटस टेंपल भक्तांसाठी उघडण्यात आले होते.
  • १९८९: मुंबई मध्ये देशातील पहिले मनोरंजन पार्क ‘एस्सेल वर्ल्ड’ उघडल्या गेले.
  • १९९९: काठमांडू येथून नवी दिल्लीला येणार्‍या ’इंडियन एअरलाइन्स फ्लाईट ८१४’ या विमानाचे तालिबानी अतिरेक्यांनी अपहरण करुन ते विमान अफगणिस्तानातील कंदाहार येथे नेले.
  • २०००: भारतीय बुद्धीबळ खेळाडू विश्वनाथ आनंद यांनी बुद्धिबळातील वर्ल्ड चैंपियनशिप आपल्या नावावर केली.
  • २००२: दिल्लीच्या मेट्रोचा शुभारंभ झाला.
  • २०१४: अटल बिहारी वाजपेयी आणि मदन मोहन मालवीय यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची घोषणा करण्यात आली.
  • २०१६: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अरबी समुद्रात उभारल्या जाणाऱ्या छत्रपती शिवस्मारकाचे जलपूजन आणि भूमिपूजन करण्यात आले.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • ११६६: जॉन – इंग्लंडचा राजा (मृत्यू: १९ आक्टोबर १२१६)
  • १८१८: जेम्स प्रेस्कॉट ज्यूल – ऊर्जेच्या संक्रमणाविषयी सिद्धांत मांडणारे ब्रिटिश पदार्थ वैज्ञानिक (मृत्यू: ११ आक्टोबर १८८९)
  • १८६४: विश्वनाथ कार – ओडिया लेखक, संपादक व समाजसुधारक. १८९६ मधे त्यांनी एक छापखाना काढून ’उत्कल साहित्य’ नावाचे सर्वस्वी साहित्याला वाहिलेले दर्जेदार नियतकालिक सुरू केले. (मृत्यू: १९ आक्टोबर १९३४)
  • १८८०: डॉ. भोगराजू पट्टाभी सीतारामय्या – स्वातंत्र्यसैनिक, इतिहासकार आणि काँग्रेसचे नेते. काँग्रेसच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त त्यांनी लिहिलेला ’हिस्ट्री ऑफ द इंडियन नॅशनल काँग्रेस’ हा ग्रंथ महत्त्वपूर्ण आहे. (मृत्यू: १७ डिसेंबर १९५९)
  • १८९९: पांडुरंग सदाशिव साने ऊर्फ ’साने गुरूजी’ – नामवंत साहित्यिक, बालसाहित्यिक, समाजवादी नेते, समाजसुधारक व स्वातंत्र्यसैनिक. त्यांचे ’श्यामची आई’ हे पुस्तक प्रकाशनक्षेत्रातील सर्व विक्रम मोडणारे ठरले आहे. (मृत्यू: ११ जून १९५०)
  • १९२४: मोहम्मद रफी – पार्श्वगायक, पद्मश्री (१९६७) (मृत्यू: ३१ जुलै १९८० – मुंबई)
  • १९३०: देशातील प्रसिद्ध लेखिका उषा प्रियंवदा यांचा जन्म.
  • १९४२: भारतीय अभिनेते, दिग्दर्शक, नाटककार इंद्र बानिया यांचा जन्म. (मृत्यू: २५ मार्च २०१५)
  • १९५६: भारतीय चित्रपट सृष्टीचे प्रसिद्ध अभिनेते अनिल कपूर यांचा जन्म.
  • १९५७: हमीद करझाई – अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष
  • ९५९: अनिल कपूर – हिन्दी चित्रपट कलाकार
  • १९५९: हिन्दी चित्रपट कलाकार अनिल कपूर यांचा जन्म.
  • १९८८: भारतीय क्रिकेट खेळाडू पियुष चावला यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १५२४: वास्को द गामा – पोर्तुगीज दर्यावर्दी. अफ्रिकेला वळसा घालून युरोपातुन भारतात येण्याचा मार्ग त्याने शोधला. (जन्म: ?? १४६९)
  • १९६७: बास्किन-रोबिन्स चे सहसंस्थापक बर्ट बास्कीन यांचे निधन. (जन्म: १७ डिसेंबर १९१३)
  • १९७३: पेरीयार ई. व्ही. रामस्वामी – स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक आणि द्रविड चळवळीचे प्रणेते (जन्म: १७ सप्टेंबर १८७९)
  • १९७७: नलिनीबाला देवी – आसामी कवयित्री व लेखिका (जन्म: २३ मार्च १८९८)
  • १९८७: एम. जी. रामचंद्रन – अभिनेते व तामिळनडुचे मुख्यमंत्री (जन्म: १७ जानेवारी १९१७)
  • १९८८: प्रसिद्ध लेखक जैनेंद्रकुमार यांचे निधन.
  • १९९३: स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक पेरीयार ई. व्ही. रामस्वामी यांचे निधन. (जन्म: १७ सप्टेंबर १८७९)
  • १९९९: नायकी इंक चे सहसंस्थापक बिल बोरमन यांचे निधन. (जन्म: १९ फेब्रुवारी १९११)
  • २०००: कूपर कार कंपनीचे सहसंस्थापक जॉन कूपर यांचे निधन. (जन्म: १७ जुलै १९२३)
  • २००५: भानुमती रामकृष्ण – तामिळ व तेलगू चित्रपटांतील अभिनेत्री, दिग्दर्शक, निर्माती, गीतकार, संगीतकार, गायिका व लेखिका (जन्म: ७ सप्टेंबर १९२५)

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

Loading

नवनिर्वाचित मंत्र्यांना दालनांचे आणि बंगल्यांचे वाटप.. कोणाला कुठला बंगला? यादी वाचा….

 

   Follow us on        

मुंबई : फडणवीस सरकारमधील मंत्रिमंडळाचे खातेवाटप झाल्याबरोबर दालनांचे वाटपही लगोलग करण्यात आले आहे. सोमवारी दुपारी कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांना मंत्रालयातील दालने नेमून दिली आहेत.

फडणवीस सरकारचा १५ डिसेंबर रोजी मंत्रिमंडळ विस्तार झाला असून मंत्रिमंडळात एकूण ३३ मंत्री आणि ६ राज्यमंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे. नव्याने मंत्रिमंडळात समावेश झालेल्या मंत्री, राज्यमंत्र्यांना खालीलप्रमाणे कार्यालयीन वाटप करण्यात आले आहे.

कुणाला कुठला बंगला

 

Loading

शिक्षण धोरणात मोठा बदल; पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना पुढील इयत्तेत जाण्यासाठी पास होणे बंधनकारक

   Follow us on        

नवी दिल्ली : केंद्र सरकारने शिक्षण व्यवस्थेत मोठा बदल करण्याची घोषणा केली आहे. शिक्षण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार आता पाचवी आणि आठवीच्या वर्गातही मुलांना नापास केलं जाऊ शकतं. इयत्ता 5वी आणि 8वीच्या वार्षिक परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना दोन महिन्यांत पुन्हा परीक्षेला बसण्याची संधी दिली जाईल. त्यातही ते नापास झाले तर नापास होतील आणि पुन्हा त्याच वर्गात शिकावे लागेल.

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. आता नो डिटेंशन पॉलिसीला समाप्त करण्यात आले आहे. त्यामुळे इयत्ता पाचवी आणि आठवीत नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात थेट ढकलणे बंद केले जाणार आहे. या नापास विद्यार्थ्यांना आता पुन्हा दुसऱ्यांदा परीक्षा देण्याची संधी दिली जाणार आहे. मात्र ते जर दुसऱ्यांदाही नापास झाले तर त्यांना वरच्या वर्गात जाण्याची द्वार बंद केले जाणार आहे.  मात्र तरीही आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शाळेतून काढणार नाही असेही सरकारने म्हटले आहे.

नापास मुलांकडे विशेष लक्ष दिले जाईल

केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने यासंदर्भात अधिसूचनाही जारी केली आहे. जर एखादा विद्यार्थी परीक्षेत अनुत्तीर्ण झाला तर त्याला 2 महिन्यांत पुन्हा परीक्षेला बसण्याची संधी मिळेल, मात्र त्यातही तो अनुत्तीर्ण झाल्यास त्याला पुढील वर्गात पदोन्नती दिली जाणार नाही, असे या अधिसूचनेत म्हटले आहे. मात्र या काळात पुन्हा नापास झालेल्या विद्यार्थ्यांना सुधारण्याची संधी दिली जाईल. अनुत्तीर्ण विद्यार्थ्याकडे शिक्षक विशेष लक्ष देतील आणि पालकांना वेळोवेळी मार्गदर्शनही करतील.

नो डिटेन्शन पॉलिसी ही शिक्षण हक्क कायदा 2009 चे महत्त्वाचे धोरण होते. या धोरणांतर्गत इयत्ता पाचवी आणि आठवीच्या मुलांना वार्षिक परीक्षेत अनुत्तीर्ण करण्यात आले नाही. या धोरणांतर्गत पारंपारिक परीक्षांना सामोरे न जाता सर्व विद्यार्थ्यांना आपोआप पुढील वर्गात बढती देण्यात आली. या धोरणात मुलांचे सतत आणि सर्वसमावेशक मूल्यमापन करण्यावर भर देण्यात आला होता.

Loading

मुंबई मडगाव वंदे भारत एक्सप्रेस ठाण्यावरून कल्याणला वळवली.. कारण काय?

   Follow us on        

मुंबई: आजची मुंबई मडगाव वंदे भारत एक्सप्रेस तांत्रिक बिघाडामुळे ठाणे ते पनवेल दरम्यान तिच्या नियमित मार्गावरून वळविण्यात आली. या कारणाने पुढे तिचा गोव्याला जाणारा प्रवास ९० मिनिटे उशिराने झाला.

कोकणात जाणारी ही गाडी दिवा-पनवेल रेल्वे मार्गावर पनवेल स्थानकाकडे जाण्याऐवजी सकाळी ६:१० वाजता कल्याण मार्गावरून निघाली.

या घटनेमुळे मध्य रेल्वेवरील मुंबई लोकल सेवेवरही परिमाण झाला आणि या दरम्यानच्या लोकल गाड्यांनी लेटमार्क लावला.

मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील निला यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, दिवा जंक्शनवरील कोकणात जाणार्‍या गाड्यांचा मार्गावर म्हणजे डाऊन फास्ट लाईन आणि पाचव्या लाईन दरम्यान पॉइंट क्रमांक १०३ वर सिग्नलिंग आणि टेलिकम्युनिकेशन सिस्टममध्ये बिघाड झाल्यामुळे ही घटना घडली.

ट्रेनने नियोजित मार्गावरून मार्ग बदलल्यानंतर, ती कल्याण स्टेशनला रवाना झाली आणि दिवा जंक्शनवर परत फिरविण्यात आली आणि दिवा-पनवेल मार्गावर मडगावकडे परत प्रवास सुरू केला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

नीला म्हणाले की, सकाळी ६:१० ते ६:४५ पर्यंत कल्याणकडे जाण्यापूर्वी ही गाडी दिवा जंक्शनवर सुमारे ३५ मिनिटे थांबली होती.

जून २०२३ मध्ये सुरू झालेली प्रीमियम सीएसएमटी-मडगाव वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन मुंबईतील सीएसएमटी (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) येथून सकाळी ५:२५ वाजता निघते आणि त्याच दिवशी दुपारी १:१० वाजता गोव्यातील मडगावला पोहोचते.

 

 

 

 

Loading

२३ डिसेंबर पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-अष्टमी – 17:10:38 पर्यंत
  • नक्षत्र-उत्तरा-फाल्गुनी – 09:09:52 पर्यंत
  • करण-कौलव – 17:10:38 पर्यंत, तैतुल – 30:32:52 पर्यंत
  • पक्ष- कृष्ण
  • योग-सौभाग्य – 19:53:21 पर्यंत
  • वार- सोमवार
  • सूर्योदय- 07:10
  • सूर्यास्त- 18:06
  • चन्द्र-राशि-कन्या
  • चंद्रोदय- 25:18:00
  • चंद्रास्त- 12:46:00
  • ऋतु- शिशिर
जागतिक दिवस:
  • शेतकरी दिन; भारताचे पाचवे पंतप्रधान श्री चौधरी चरणसिंग यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी 23 डिसेंबर रोजी शेतकरी दिन किंवा किसान दिवस साजरा केला जातो.
महत्त्वाच्या घटना:
  • १६७२: ला जियान डोमेनेको कॅसिनी यांनी आजच्या दिवशी शनीचा उपग्रह रिया शोधून काढला होता.
  • १८९३: ’हॅन्सेल अ‍ॅंड ग्रेटेल’ या प्रसिद्ध सांगितिक परिकथेचा पहिला प्रयोग झाला.
  • १८९४: रवींद्रनाथ टागोर यांनी आजच्या दिवशी पूस जत्रेचे उद्घाटन केले होते.
  • १९१४: पहिले विश्वयुद्ध – ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडच्या सैन्याचे कैरो (इजिप्त) येथे आगमन.
  • १९२१: शांतिनिकेतन येथे ’विश्व भारती’ विश्वविद्यालयाची स्थापना.
  • १९४०: वालचंद हिराचंद यांनी बंगळुरु येथे ‘हिन्दुस्थान एअरक्राफ्ट‘ हा कारखाना सुरू करून भारतातील विमाननिर्मिती उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली.
  • १९४७: अमेरिकेतील ’बेल रिसर्च लॅब्ज’ या संशोधन संस्थेने ’ट्रॅन्झिस्टर’ या उपकरणाचा शोध लावल्याची घोषणा केली. इलेक्ट्रॉनिक्स उद्योगामधे होणार्‍या मोठ्या क्रांतीची ही सुरुवात होती.
  • १९५४: बिजन कुमार मुखरेजा यांनी भारताचे चौथे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
  • १९५४: डॉ. जे. हार्टवेल हॅरिसन आणि डॉ. जोसेफ इ. मरे यांनी जिवंत व्यक्तिमधील मूत्रपिंड काढुन पहिली यशस्वी मूत्रपिंडारोपण शस्त्रक्रिया केली.
  • १९६८: हवामान संबंधी माहिती मिळविण्यासाठी देशाचे पहिले मेनका रॉकेट चे यशस्वी प्रक्षेपण.
  • १९६९: चंद्रावरून आणल्या गेलेले काही दगडांचे नमुने दिल्लीला एका प्रदर्शनी मध्ये ठेवण्यात आले.
  • १९७०: धी गोवा हिन्दू असोसिएशन निर्मित, वि. वा. शिरवाडकर लिखित व पुरुषोत्तम दारव्हेकर दिग्दर्शित ’नटसम्राट’ या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबई येथील बिर्ला मातोश्री सभागृहात झाला.
  • २०००: कलकत्ता शहराचे नाव ’कोलकता’ असे बदलण्यास केंद्र सरकारची मंजुरी
  • २००१: बिहारमधील चंपारण्य जिल्ह्यातील केसरिया गाव येथे जगातील सर्वात मोठा बौद्ध स्तूप सापडला. त्याची उंची १०४ फूट आहे.
  • २००८: वर्ल्ड बँक ने सत्यम सॉफ्टवेअर कंपनी वर प्रतिबंध आणला होता.
  • २००८: भारताचे प्रसिद्ध कादंबरीकार गोविन्द मिश्रा यांना साहित्य साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित केल्या गेले.
  • २०१३: सलमान खान विरुद्ध १७ साक्षीदारांनी साक्ष नोदवल्यानंतर सत्र न्यायालयाने सलमान खान विरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करत, खटला सत्र न्यायालयात वर्ग केला.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १६९०: मणिपूर साम्राज्याचे सम्राट पामेबा यांचा जन्म.
  • १८५४: हेन्‍री बी. गुप्पी – ब्रिटिश वनस्पतीशास्त्रज्ञ (मृत्यू: २३ एप्रिल १९२६)
  • १८९७: कविचंद्र कालिचरण पटनाईक – ओरिसातील कवी, नाटककार व पत्रकार (मृत्यू: ? ? ????)
  • १९०२: चौधरी चरण सिंग – भारताचे ५ वे पंतप्रधान व ’लोकदल’ पक्षाचे संस्थापक (मृत्यू: २९ मे १९८७)
  • १९१८: चित्रपट पात्र अभिनेते कुमार पल्लना यांचा जन्म.
  • १९४२: भारतीय चित्रपट कलाकार अरुण बाली यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १८३४: थॉमस माल्थस – प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ (जन्म: १३ फेब्रुवारी १७६६)
  • १९२६: स्वामी दयानंदांचे शिष्य, गुरुकुल विश्वविद्यालयाचे संस्थापक, शिक्षणमहर्षी आणि आर्य समाजाचे प्रसारक स्वामी श्रद्धानंद यांची हत्या (जन्म: २ फेब्रुवारी १८५६)
  • १९४७: ला भारतीय गणितज्ञ जियाउद्दीन अहमद यांचे निधन.
  • १९६५: गणेश गोविंद तथा ’गणपतराव’ बोडस – नट व गायक, ’गंधर्व नाटक मंडळी’चे एक संस्थापक (जन्म: २ जुलै १८८०)
  • १९७९: दत्ता कोरगावकर – हिन्दी व मराठी चित्रपट संगीतकार (याद, बडी माँ, दामन, नादान, रिश्ता, चंद्रराव मोरे, सुखाचा शोध, गीता, गोरखनाथ, गोरा कुंभार, सूनबाई, महात्मा विदूर, हरिहर भक्ती, रायगडचा बंदी) (जन्म: ? ? ????)
  • १९९८: रत्‍नाप्पा कुंभार – स्वातंत्र्यसैनिक, सहकारी चळवळीतील अग्रणी नेते, इचलकरंजीच्या पंचगंगा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष, पद्मश्री (१९८५), खासदार (१९५२), आमदार (शिरोळ), महाराष्ट्र सरकारचे गहराज्य मंत्री, भारतीय राज्यघटना समितीचे सदस्य (जन्म: १५ सप्टेंबर १९०९ – निमशिरगाव, शिरोळ, कोल्हापूर)
  • २०००: ’मलिका-ए-तरन्नुम’ म्हणून ख्यातनाम असलेल्या गायिका नूरजहाँ ऊर्फ अल्लाह वसई यांचे पाकिस्तानमधील कराची येथे निधन (जन्म: २१ सप्टेंबर १९२६ – कसुर, पंजाब, भारत)
  • २००४: नरसिंह राव – भारताचे ९ वे पंतप्रधान, वाणिज्य व उद्योगमंत्री (जन्म: २८ जून १९२१
  • २००८: गंगाधर महांबरे – गीतकार कवी व लेखक (जन्म: ३१ जानेवारी १९३१)
  • २०१०: के. करुणाकरन – केंद्रीय उद्योगमंत्री व केरळचे मुख्यमंत्री व गृहमंत्री आणि केरळमधील ’युनायटेड डेव्हलपमेंट फ्रंट’ चे संस्थापक (जन्म: ५जुलै १९१६)
  • २०१०: ज्ञानेश्वर नाडकर्णी – कला समीक्षक व लेखक. त्यांचे ’पाऊस’, ’भरती’, ’चिद्‌घोष’,हे कथासंग्रह, ’दोन बहिणी’, ’ ’कोंडी’ या कादंबर्‍या व ’पिकासो’ हे चरित्र प्रसिद्ध आहे. (जन्म: २१ मे १९२८)
  • २०१३: एके ४७ रायफलचे निर्माते मिखाईल कलाशनिको यांचे निधन. (जन्म: १० नोव्हेंबर १९१९)

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

Loading

धक्कादायक! मुंबई गोवा महामार्गावर धावत्या बसला आग

   Follow us on        
अलिबाग: मुंबई गोवा महामार्गावर कोलाड इथे खाजगी प्रवासी बस जळून खाक झाली. रात्री १२ वाजण्‍याच्‍या सुमारास ही घटना घडली. सुदैवाने यात कुठलीही जीवीत हानी झाली नाही. मात्र बससह प्रवाशांचे सर्व सामान जळून खाक झाले.
धाटाव एमआयडीसी, दीपक नायट्रेट कंपनी यांचे अग्‍नीशमन दल, कोलाड रेस्‍क्‍यू टीम आणि पोलीस यांनी बचाव कार्य केले व आगीवर नियंत्रण आणले. बसमध्‍ये चालक आणि क्लिनरसह ३४ प्रवासी होते. खापरोबा ट्रॅव्हल्सची ही एसी स्लीपर कोच बस मुंबईतील जोगेश्‍वरी येथून मालवणकडे निघाली होती. कोलाड रेल्‍वे पुलाजवळ आली असता बसच्‍या मागील बाजूस मोठा आवाज झाला. तेव्‍हां ड्रायव्‍हरने गाडी थांबवून पाहिले असता बसने मागील बाजूस पेट घेतल्‍याचे दिसले. तातडीने बसमधील सर्व प्रवाशांना खाली उतरवण्‍यात आले. त्‍यानंतर आगीचा भडका उडाला.

Loading

कोकण रेल्वेच्या दुपदरीकरणासाठी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांचे केंद्राला ५ हजार कोटींचे साकडे

   Follow us on        

पणजी: जैसलमेर येथे केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी घेतलेल्या अर्थसंकल्पपूर्व बैठकीत गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्यासाठी ९ हजार ७०० कोटी रुपयांच्या अर्थसाहाय्याची मागणी नोंदविली आहे. कोकण रेल्वेचे दुपदरीकरण, पश्चिम घाटाचे संवर्धन आणि राज्याचा विकासाच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या घटकांसाठी त्यांनी सहाय्याची मागणी केली आहे. केंद्रीय अर्थसंकल्पासाठी गोवा राज्यातर्फे त्यांनी निवेदन सादर केले आहे.
रेल्वेसाठी ५ हजार कोटींचे साकडे
कोकण रेल्वे पश्चिम किनाऱ्यावरील बंदरांना (मंगळूर ते मुंबई) जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे. या मार्गाचे दुहेरीकरण काही भागांतच पूर्ण झाले असून उर्वरित प्रकल्प निधीअभावी प्रलंबित आहे. या प्रकल्पासाठी ५ हजार कोटी रुपयांचे विशेष साहाय्य मंजूर करावे. जुने गोवे तसेच पेडणे येथे १९९२-१९९७ दरम्यान बांधलेल्या जुन्या बोगद्यांची स्थिती धोकादायक आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणि सलग संपर्कासाठी नवीन बोगद्यांच्या बांधणीसाठी दीड हजार कोटी रुपयांचे अनुदान मंजूर करावे, अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी केली.

कोकण रेल्वेचे दुपदरीकरण करणे अत्यावश्यक बनले आहे. सध्या वीर ते मडगाव दरम्यान एकपदरी मार्ग असल्याने मोठ्या प्रमाणात मागणी असूनही गाड्या वाढविणे शक्य होत नाही. याचा परिमाण कोकण आणि गोवा राज्याच्या विकासावर पर्यटनावर होत आहे. या मार्गाचे दुपदरीकरण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची गरज आहे. मात्र अजूनपर्यंत सादर केलेल्या अर्थसंकल्पात कोकण रेल्वेला नेहमीच डावलले गेले आहे. त्यामुळे कोकण रेल्वेचे विलीनीकरण करण्याची मागणी आता लोकप्रतिनिधींकडून आणि प्रवासी संघटनांकडून होत आहे. केंद्राची आणि चार राज्याची भागीदारी असलेल्या कोकण रेल्वेच्या विलीनीकरणाला गोवा राज्याने या आधीच आपली संमत्ती दर्शवली आहे.

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search