

2) गाडी क्रमांक. २२११३ /२२११४ लोकमान्य टिळक (टी) – कोचुवेली – लोकमान्य टिळक (टी) एक्सप्रेस
वरील फोटो कोलाड येथे मुंबई गोवा महामार्गावर पडलेल्या मोठ्या खड्ड्याचा आहे. या खड्ड्यात पाणी साचून अक्षरशः तळे बनले आहे. त्यामुळे रस्त्यात गाडी घेऊन उतरायचे कि होडी असा प्रश्न कोकणकरांना पडला आहे.
Follow us onMumbai Goa Highway: कोकणातील लोकप्रतिनिधींसाठी अत्यंत शरमेची गोष्ट बनलेल्या, गेल्या १७ वर्षे रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गावर पुन्हा एकदा खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. या खड्डयांमुळे या मार्गावरून प्रवास करणे धोकादायक बनले आहे. काही ठिकणी परिस्थिती इतकी खराब झाली आहे कि या महामार्गाला राष्ट्रीय महामार्ग बोलणेच हास्यास्पद ठरेल. वरील फोटो कोलाड येथील असून अजून बर्याच ठिकाणी अशीच परिस्थिती आहे. गणेश चतुर्थीला आता फक्त एकच महिना बाकी आहे. मग काय लोकांच्या समाधानासाठी तात्पुरती डागडुगी होईल आणि पुढील वर्षी पुन्हा तेच. महामार्गबाबत लोकप्रतिनिधी उदासीन असून कोकणकर देखील कमालीचे शांत आहेत, या महामार्गाची गरज चाकरमान्यांना फक्त गणेशोत्सव आणि शिमगोत्सव मध्येच भासते उर्वरित वेळेस कोकणात माणसच राहत नाहीत का असा प्रश्न पडतो.
सरकार गणेशोत्सव आणि शिमगोत्सव मध्ये डागडुजी करतात आणि कोकणकर आनंद मानतात पण आपण कधी विचार केलाय का? हा महामार्ग गणेशोत्सव आणि शिमगोत्सव पुरता मर्यादित नसून विकासाचा महामार्ग आहे. दळणवळण सुविधा नसल्याने कोकणात रोजगार नाही परिणामी गावच्या-गाव ओसाड पडून कोकणकरांनी पुणे -मुंबईची वाट पकडली. पण ही वाट पकडावीच का लागली कारण आपण कोकणकर आपल्या मागण्यांसाठी एकत्र झालोच नाही आणि याचाच फायदा लोकप्रतिनिधीनी घेतला. गणेशोत्सव करीता एसटी बुकिंग साठी, रेल्वे तिकीट साठी धडपड सुरु झालेय पण एसटी ने आपल्या गावी जाण्यासाठी रस्ता सुरक्षित आहे का? रेल्वे तिकीट मिळतोय का? तर याचा उत्तर आपल्याकडे नाही असच असेल. मग आपल्या हक्काच्या मागण्यांसाठी, आपल्या महामार्गासाठी आपण पाठी का राहतोय? असा सवाल मुंबई गोवा महामार्गासाठी झटणाऱ्या जनआक्रोश समितीने केला आहे.
जनआक्रोश समिती तर्फे होमहवन
संकटे टाळण्यासाठी, सुखशांती आणण्यासाठी आपण आपल्या घरी होमहवन करतो. तसेच होमहवन आता या रखडलेल्या महामार्गाची आपल्याला करावयाचे आहे. त्यासाठी स्थळ आहे आता मागे न राहता २८ जुलै २०२४ रोजी माणगाव ST डेपोजवळ सकाळी ११:०० वाजता होमहवनकरीता एकत्रित येऊया आणि कोकणकरांची एकी दाखवूया असे आवाहन जनआक्रोश समितीचे सचिव रुपेश दर्गे यांनी केले आहे.
जागतिक दिवस:
✳️ वनसंवर्धन दिन
महत्त्वाच्या घटना:
✳️१८४०: कॅनडाचे प्रांत एकतीकरण कायद्याने तयार केले गेले.
✳️१९०३: फोर्ड मोटर कंपनीने पहिली कार विकली.
✳️१९२७: मुंबईत ’रेडिओ क्लब’ ने पहिले रेडिओ प्रसारण सुरू केले. यात इंग्रजी भाषेतुन बातम्या देण्यात आल्या. याचेच पुढे ’आकाशवाणी’ (All India Radio) मधे रुपांतर झाले.
✳️१९२९: इटलीतील फासिस्ट सरकारने परकीय शब्दांच्या वापरावर बंदी घातली.
✳️१९४२: ज्यूंचेशिरकाण – त्रेब्लिंका छळछावणी उघडण्यात आली.
✳️१९८२: ’इंटरनॅशनल व्हेलिंग कमिशन’ ने व्हेल माशांच्या व्यापारी पद्धतीच्या मासेमारीवर १९८५-८६ पर्यंत बंदी घालण्याचा निर्णय घेतला.
✳️१९८३: एल.टी.टी.ई. ने श्रीलंकेच्या १३ सैनिकांची हत्या केली. याचा वचपा म्हणून श्रीलंकेच्या सरकारने तमिळवंशीय नागरिकांवर हल्ला केला. जुलै महिन्यात १,००० नागरिक ठार. १,००,००० नागरिकांनी भारत, युरोप आणि कॅनडात पलायन केले. येथून श्रीलंकेच्या नागरी युद्धाला सुरुवात झाली.
✳️१९८३: माँट्रिअलहुन एडमंटनला जाणाऱ्या एअर कॅनडा फ्लाइट १४३ या बोईंग ७६७ – २३३ विमानातील इंधन अचानक संपले. वैमानिकांनी अतिकुशलतेने विमान तसेच झेपावत गिमली, मॅनिटोबा येथे उतरवले. (या घटनेची चित्रफित पाहण्यासाठी येथे क्लिक करा.)
✳️१९८६: जैवअभियांत्रिकी तंत्रज्ञान वापरुन जगात सर्वप्रथम तयार केलेल्या ’हेपेटायटिस-बी’ या रोगावरील लशीच्या वापरास अमेरिकेत परवानगी मिळाली.
✳️१९९५: दोन अमेरिकन खगोलशास्त्रज्ञांनी हेल-बॉप धूमकेतूचा शोध लावला.
✳️१९९९: केनेडी अवकाश केंद्रावरुन (Kennedy Space Center) कोलंबिया यानाचे यशस्वी उड्डाण. या यानातील अंतराळवीरांनी ’चंद्रा’ ही अवकाशातील सर्वात मोठी दुर्बिण प्रक्षेपित केली.
✳️२००१: इंडोनेशियाच्या राष्ट्राध्यक्ष पदी मेघावती सुकर्णोपुत्री (Megawati Sukarnoputri) यांची नियुक्ती करण्यत आली.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
✳️१८५६: लोकमान्य बाळ (केशव) गंगाधर टिळक – समाजसुधारक आणि प्रखर राष्ट्रवादी, भगव्दगीतेचे भाष्यकार (मृत्यू: १ ऑगस्ट १९२० – मुंबई)
✳️१८६४: अपोलिनारियो माबिनी, फिलिपाईन्सचा पहिला पंतप्रधान.
✳️१८८५: युलिसीस एस. ग्रॅन्ट – अमेरिकेचे १८ वे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: २७ एप्रिल १८२२)
✳️१८८६: वॉल्टर शॉटकी – जर्मन भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू: ४ मार्च १९७६)
✳️१८९८: ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध बंगाली भाषिक कादंबरीकार व लेखक ताराशंकर बंद्योपाध्याय यांचा जन्मदिन.
✳️१८९९: पश्चिम जर्मनीचे ३रे राष्ट्राध्यक्ष गुस्ताफ हाइनिमान यांचा जन्म.
✳️१९०६: चंद्रशेखर आझाद – स्वातंत्र्यलढ्यातील आघाडीचे क्रांतिकारक (मृत्यू: २७ फेब्रुवारी १९३१)
✳️१९१७: लक्ष्मीबाई यशवंत तथा ’ माई’ भिडे – नाट्य-चित्रपट अभिनेत्री (मृत्यू: ? ? ???
✳️१९२५: बांगलादेश चे पहिले पंतप्रधान ताजुद्दीन अहमद यांचा जन्म. (मृत्यू: ३ नोव्हेंबर १९७५)
✳️१९२७: धोंडुताई कुलकर्णी – जयपूर-अत्रौली घराण्याच्या गायिका
✳️१९४७: डॉ. मोहन आगाशे – अभिनेते व मानसोपचारतज्ञ
✳️१९५३: इंग्लिश क्रिकेट खेळाडू ग्रॅहम गूच यांचा जन्म.
✳️१९६१: भारतीय अभिनेते मिलिंद गुणाजी यांचा जन्म.
✳️१९७३: भारतीय गायक-गीतकार, निर्माता, अभिनेता आणि दिग्दर्शक हिमेश रेशमिया यांचा जन्म.
✳️१९७५: तमिळ अभिनेता सूर्य शिवकुमार यांचा जन्म.
✳️१९७६: ज्यूडीथ पोल्गार – हंगेरीची बुद्धीबळपटू
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
✳️१८८५: युलिसिस ग्रांट – अमेरिकेचे १८ वे राष्ट्राध्यक्ष (जन्म: २७ एप्रिल १८२२)
✳️१९९३: छत्तीसगड राज्यातील भारतीय स्वातंत्र्यसेनानी लक्ष्मण प्रसाद दुबे यांचे निधन.
✳️१९९७: वसुंधरा पंडित – गायिका (जन्म: ? ? ????)
✳️१९९९: दामोदर तात्याबा तथा दादासाहेब रुपवते – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी आणि आंबेडकरी चळवळीचे नेते (जन्म: २८ फेब्रुवारी १९२५ – अकोले, अहमदनगर)
✳️२००४: महमूद – विनोदी अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता (जन्म: २९ सप्टेंबर १९३२)
✳️२०१२: लक्ष्मी सहगल – आझाद हिंद सेनेतील झाशी राणी रेजिमेंटच्या कॅप्टन (जन्म: २४ आक्टोबर १९१४)
✳️२०१६: पद्मविभूषण, पद्मभूषण, पद्मश्री, कालिदास सन्मान पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय चित्रकार एस. एच. रजा यांचा यांचे निधन.
Proposal for Special Trains:कोकणातील गणेशभक्तांसाठी पश्चिम रेल्वेकडून एक खुशखबर आहे. मध्यरेल्वेने गणपती विशेष गाड्यांची यादी जाहीर केल्यानंतर पश्चिम रेल्वेनेही आपली गणपती विशेष गाड्यांची यादी तयार केली असून ती कोकण रेल्वे, मध्यरेल्वे आणि दक्षिण रेल्वेला मंजुरीसाठी पाठवली आहे. या यादीला या विभागांकडून हिरवा कंदील भेटल्यानंतर ती लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. याआधी मध्यरेल्वेने जाहीर केलेल्या गणपती विशेष गाड्यांचे आरक्षण अवघे काही मिनिटातच फुल झाल्याने तिकिटे न मिळालेल्या प्रवाशांना आरक्षित तिकिटे मिळवण्याची अजून एक संधी भेटणार आहे.
View this post on Instagram
चिपळूण: जय भवानी एज्युकेशन सोसायटी संचालित सुमन विद्यालय टेरव या प्रशालेमध्ये शुक्रवार दिनांक १९ जुलै २०२४ रोजी बेस्ट हनुमान मंदिर ट्रस्ट सांताक्रुझ, मुंबई यांच्यावतीने इयत्ता ८ वी ते इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांना एकूण ७०८ वह्यांचे वितरण करण्यात आले.
सदर कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून जय भवानी एज्युकेशन सोसायटीचे संचालक तसेच सरस्वती कोचिंग क्लासेस, सरस्वती एज्युकेशन ट्रस्ट, सरस्वती फाउंडेशन मुंबईचे विश्वस्त व महाराष्ट्र शासनाचे विशेष कार्यकारी अधिकारी श्री.सुधाकरराव कदम उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच प्रशालाचे मुख्याध्यापक श्री. मंदार सुर्वे सर यांनी श्री. सुधाकरराव कदम यांचा विशेष सन्मान केला. त्याचप्रमाणे बेस्ट हनुमान मंदिर ट्रस्ट मुंबईचे अध्यक्ष श्री.नंदकुमार राणे साहेब आणि न्यासाचे चिटणीस व काडवली गावचे सुपुत्र श्री.नारायण चव्हाण साहेब यांचे जय भवानी एज्युकेशन सोसायटी आणि सुमन विद्यालय टेरव यांच्या वतीने विशेष आभार मानण्यात आले. त्यानंतर इयत्ता ८ वी ते इयत्ता १० वीच्या सर्व विद्यार्थ्यांना वर्गवार वह्यांचे वितरण करण्यात आले. सदर शैक्षणिक मदत विद्यार्थ्यांना मिळवून देण्यासाठी सरस्वती कोचिंग क्लासेस मुंबईचे संस्थापक तसेच जय भवानी एज्युकेशन सोसायटीचे खजिनदार श्री.अजितराव कदम त्याचप्रमाणे श्री.सुधाकरराव कदम यांनी विशेष प्रयत्न केले. सदर मोफत वह्या वाटप कार्यक्रम प्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. मंदार सुर्वे सर तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.अमोल टाकळे सर यांनी केले.
Content Protected! Please Share it instead.