Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावरील दोन गाड्यांचा स्लीपर डब्यांत मोठी कपात

   Follow us on        
Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या २ गाड्यांच्या रेकचे रूपांतर आधुनिक दर्जाच्या एलएचबी रेक मध्ये करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. मात्र ही सुधारणा करताना या गाड्यांच्या डब्यांच्या संरचनेत मोठा बदल करण्यात आला असून सामान्य प्रवाशांना सोयीच्या ठरणाऱ्या स्लीपर डब्यांत कपात करण्यात आली आहे. याबाबतचा अधिक तपशील खालीलप्रमाणे
१) २२१४९/२२१५०  पुणे जंक्शन – एर्नाकुलम – द्वि-साप्ताहिक एक्सप्रेस ही गाडी दिनांक ६ जुलै २०२५ पासून  सुधारित एलएचबी कोचसहित धावणार आहे.
२ ) ११०९७/११०९८  पुणे जंक्शन – एर्नाकुलम – पुणे जंक्शन साप्ताहिक एक्सप्रेस ही गाडी दिनांक ५ जुलै २०२५ पासून सुधारित एलएचबी कोचसहित धावणार आहे.
या दोन्ही गाड्यांच्या डब्यांची सध्याची आणि सुधारित संरचना खालीलप्रमाणे असणार आहे.
सध्याची संरचना सुधारित संरचना
२ टियर एसी – ०१
२ टियर एसी – ०२
३ टियर एसी – ०४
३ टियर एसी – ०४
स्लीपर – ११ स्लीपर – ०७
जनरल – ०३ जनरल – ०४
पॅन्ट्री कार – ०१ पॅन्ट्री कार – ०१
एसएलआर – ०२ एसएलआर – ०२
एकूण – २२ आयसीएफ कोच
एकूण – २० एलएचबी कोच
LHB मध्ये अपग्रेड करताना दोन्ही या गाड्यांचे तब्बल ४ स्लीपर डबे कमी करण्यात आले आहेत. एकिकडे कोकण रेल्वे मार्गावर स्लीपर आणि जनरल डब्यांमध्ये मोठी गर्दी होत असताना या गाड्यांचे हे डबे कमी केल्याने प्रवाशांकडून नाराजी व्यक्त होत आहे.
Facebook Comments Box

३० एप्रिल पंचांग आणि दिनविशेष


आजचे पंचांग

  • तिथि-तृतीया – 14:15:06 पर्यंत
  • नक्षत्र-रोहिणी – 16:19:11 पर्यंत
  • करण-गर – 14:15:06 पर्यंत, वणिज – 24:46:31 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-शोभन – 12:01:16 पर्यंत
  • वार- बुधवार
  • सूर्योदय- 06:13
  • सूर्यास्त- 18:58
  • चन्द्र-राशि-वृषभ – 27:16:02 पर्यंत
  • चंद्रोदय- 08:05:59
  • चंद्रास्त- 22:03:59
  • ऋतु- ग्रीष्म

जागतिक दिवस :
  • प्रामाणिकपणा दिवस National Honesty Day
महत्त्वाच्या घटना :
  • 1492 : स्पेनने ख्रिस्तोफर कोलंबस यांना त्यांच्या शोधाकार्यासाठी नियुक्त केले.
  • 1657 : शिवाजी महाराजांनी मुघलांच्या ताब्यात असलेल्या जुन्नर शहरावर हल्ला करून लुटले.
  • 1789 : जॉर्ज वॉशिंग्टन अमेरिकेचे पहिले निर्वाचित राष्ट्राध्यक्ष बनले.
  • 1905 : अल्बर्ट आइनस्टाईन यांनी झुरिच विद्यापीठात डॉक्टरेट प्रबंध पूर्ण केला.
  • 1936 : महात्मा गांधींनी वर्ध्याजवळ सेवाग्राम आश्रम स्थापन केला.
  • 1977 : 9 राज्यांमधील विधानसभा विसर्जित करण्यात आली आणि जनसंघ, समाजवादी पक्ष, केंद्रीय काँग्रेस आणि भारतीय लोक दल यांनी जनता पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला.
  • 1982 : कलकत्ता येथे बिजन सेतू हत्याकांड घडले.
  • 1995 : बिल क्लिंटन उत्तर आयर्लंडला भेट देणारे पहिले अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बनले.
  • 1996 : थेऊर येथील श्री चिंतामणी मंदिराच्या प्रांगणात श्रीमंत माधवराव पेशव्यांच्या स्मृतिस्थळाचे उद्घाटन करण्यात आले.
  • 2009 : ख्रायस्लर कंपनीने दिवाळखोरी घोषित केली.
  • 2013 : विलेम-अलेक्झांडर नेदरलँड्सचा राजा बनल्यानंतर त्याची आई राणी बीट्रिक्सने राजीनामा दिला; ती 33 वर्षांपूर्वी सिंहासनावर आरूढ झाली होती.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 1777 : ‘कार्ल फ्रेड्रिक गाऊस’ – जर्मन गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 23 फेब्रुवारी 1855)
  • 1870 : ‘दादासाहेब फाळके’ – भारतीय चित्रपट उद्योगाचे जनक यांचा जन्म. (मृत्यू: 16 फेब्रुवारी 1944)
  • 1909 : माणिक बंडोजी इंगळे ऊर्फ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज – यांचा जन्म. (मृत्यू: 11 ऑक्टोबर 1968)
  • 1910 : श्रीरंगम श्रीनिवास राव ऊर्फ ‘श्री श्री राव’ – साहित्य अकादमी पुरस्कार विजेते तेलुगू कवी आणि गीतकार यांचा जन्म. (मृत्यू: 15 जून 1983)
  • 1921 : ‘रॉजर एल. ईस्टन’ – जीपीएस चे सहसंशोधक यांचा जन्म. (मृत्यू: 8 मे 2014)
  • 1926 : ‘श्रीनिवास खळे’ – मराठी संगीतकार यांचा जन्म. (मृत्यू: 2 सप्टेंबर 2011)
  • 1987 : ‘रोहित शर्मा’ – भारतीय क्रिकेटपटू यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 1030 : ‘मोहंमद गझनी’ – तुर्कीच्या गझनवी साम्राज्याचा शासक यांचे निधन. (जन्म: 2 ऑक्टोबर 971)
  • 1878 : साक्षात्कारी सत्पुरुष व दत्तावतारी स्वामीमहाराज अक्‍कलकोट यांनी समाधी घेतली.
  • 1913 : ‘मोरो केशव दामले’ – व्याकरणकार आणि निबंधकार यांचे निधन. (जन्म: 7 नोव्हेंबर 1868)
  • 1945 : ‘अ‍ॅडॉल्फ हिटलर’ – जर्मनीचे नाझी हुकूमशहा यांनी आत्महत्या केली. (जन्म: 20 एप्रिल 1889)
  • 2001 : ‘श्रीपाद अच्युत दाभोळकर’ – प्रयोग परिवार या संकल्पनेचे प्रवर्तक, गणितज्ञ आणि कृषी शास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म: 21 ऑगस्ट 1924)
  • 2003 : ‘वसंत पोतदार’ – मराठी साहित्यिक यांचे निधन. (जन्म: 20 नोव्हेंबर 1939)
  • 2014 : ‘खालिद चौधरी’ – भारतीय चित्रकार आणि सेट डिझायनर यांचे निधन. (जन्म: 20 डिसेंबर 1919)
  • 2020 : ‘ऋषि कपूर’ – चित्रपट अभिनेता यांचे निधन.


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

 

Facebook Comments Box

२९ एप्रिल पंचांग आणि दिनविशेष


आजचे पंचांग

  • तिथि-द्वितीया – 17:34:05 पर्यंत
  • नक्षत्र-कृत्तिका – 18:48:09 पर्यंत
  • करण-बालव – 07:21:58 पर्यंत, कौलव – 17:34:05 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-सौभाग्य – 15:53:16 पर्यंत
  • वार- मंगळवार
  • सूर्योदय- 06:14
  • सूर्यास्त- 18:58
  • चन्द्र-राशि-वृषभ
  • चंद्रोदय- 07:09:00
  • चंद्रास्त- 20:56:00
  • ऋतु- ग्रीष्म

जागतिक दिवस :
  • आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस International Dance Day
  • जागतिक इच्छा दिन World Wish Day
  • जागतिक पुरवठा दिवस National Supply Chain Day
महत्त्वाच्या घटना :
  • 1639: मुघल सम्राट शाहजहानने दिल्लीतील लाल किल्ल्याची पायाभरणी केली.
  • 1930: ब्रिटन आणि ऑस्ट्रेलियामध्ये टेलिफोन सेवा सुरू करण्यात आली.
  • 1933: प्रभात कंपनीचा सिंहगड हा चित्रपट प्रदर्शित झाला.
  • 1945: दुसरे महायुद्ध इटलीतील जर्मन सैन्याने मित्र राष्ट्रांना बिनशर्त आत्मसमर्पण केले.
  • 1986: लॉस एंजेलिस सेंट्रल लायब्ररीला लागलेल्या आगीत सुमारे 400,000 पुस्तके नष्ट झाली.
  • 1991: बांगलादेशच्या दक्षिणेकडील चितगाव जिल्ह्यात आलेल्या तीव्र चक्रीवादळामुळे सुमारे 1,38,000 लोकांचा मृत्यू झाला आणि सुमारे एक कोटी लोक बेघर झाले.
  • 2010 : शत्रूच्या रडारने न पकडली जाणारी मुंबईतील मांजगाव येथे बांधण्यात आलेली आधुनिक उपकरणे असलेली INS शिवालिक ही युद्धनौका भारताने नौदलात सामील केली.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 1727 : ‘जीन-जॉर्जेस नोव्हर’ – फ्रेंच नर्तक आणि बॅलेट चे निर्माते यांचा जन्म. (मृत्यू: 19 ऑक्टोबर 1810)
  • 1848 : ‘राजा रवि वर्मा’ – चित्रकार यांचा जन्म. (मृत्यू: 2 ऑक्टोबर 1906)
  • 1867 : ‘डॉ. शंकर आबाजी भिसे’ – भारतीय शास्त्रज्ञ आणि अग्रगण्य शोधक यांचा जन्म. (मृत्यू: 7 एप्रिल 1935)
  • 1891 : ‘भारतीदासन’ – भारतीय कवी आणि कार्यकर्ते यांचा जन्म. (मृत्यू: 21 एप्रिल 1964)
  • 1901 : ‘मिचेनोमिया हिरोहितो’ – दुसऱ्या महायुद्धाच्या आधी व नंतरच्या काळातील जपानी सम्राट यांचा जन्म. (मृत्यू: 7 जानेवारी 1989)
  • 1936 : ‘झुबिन मेहता’ – भारतीय संगीतकार यांचा जन्म.
  • 1966 : ‘फिल टफनेल’ – इंग्लिश फिरकी गोलंदाज यांचा जन्म.
  • 1970 : ‘आंद्रे आगासी’ – अमेरिकन लॉन टेनिस खेळाडू यांचा जन्म.
  • 1979 : ‘आशिष नेहरा’ – भारतीय क्रिकेट खेळाडू
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 1945 : ‘हेन्रिच हिमलर’ – जर्मन नाझी अधिकारी यांचे निधन. (जन्म: 7 ऑक्टोबर 1900)
  • 1960 : ‘पं. बाळकृष्ण शर्मा’ – हिंदी कवी यांचे निधन. (जन्म: 8 डिसेंबर 1897)
  • 1980 : ‘श्रीकृष्ण के. क्षीरसागर’ – लेखक, विचारवंत आणि समीक्षक यांचे निधन. (जन्म: 6 नोव्हेंबर 1901)
  • 1980 : ‘सर अल्फ्रेड हिचकॉक’ – चित्रपट दिग्दर्शक यांचे निधन. (जन्म: 13 ऑगस्ट 1899)
  • 2006 : ‘जे. के. गालब्रेथ’ – कॅनेडियन-अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म: 15 ऑक्टोबर 1908)
  • 2020 – ‘इरफान खान’ – भारतीय अभिनेता यांचे निधन.


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

 

Facebook Comments Box

Monsoon 2025: मान्सूनची चाहुल! पावसाची वर्दी देणारा ‘नवरंग’ कोकणात दाखल

   Follow us on        

रत्नागिरी: पावसाची वर्दी घेऊन येणारा पक्षी म्हणून ओळख असलेला नवरंग म्हणजेच ‘इंडियन पिट्टा’ कोकणात दाखल झाला आहे (indian pitta migration). पावसाची जशी चाहूल लागते तशी कोकणामध्ये नवरंग पक्षाचं आगमन होत. हा अतिशय दुर्मिळ पक्षी असून वर्षभरातील फक्त चारच महिने आपल्याला पाहायला मिळतो. पावसाला पोषक वातावरण निर्माण झालं की नवरंग पक्षी कोकणात दाखल होतो. हवामान विभागानेदेखील यंदा पाऊस लवकर असल्याची माहिती दिली आहे. त्यातच आता नवरंग पक्षाच्या आगमनाने पावसाच्या आगमनाची चाहूल दिली आहे. नवरंग पक्षी हा शेतकऱ्यांचा मित्र म्हणून संबोधला जातो. पावसाच्या आगमनाची चाहूल लागताच आपल्या विशिष्ट आवाजाने शेतकऱ्यांना हा पक्षी जणू पावसाला लवकर सुरू होणार असल्याची वर्दी0 देतो. नवरंग पक्षाच्या आगमनाने पक्षी प्रेमींही सुखावले असून त्याची छबी टिपण्याचा मोह आवरत नाही.

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक ठिकाणी या पक्ष्याची मधुर शीळ कानी पडू लागली आहे (indian pitta migration). पावसाळ्याच्या तोंडावर हा पक्षी स्थानिक स्वरुपाचे स्थलांतर करत असला तरी, कोकणात या पक्ष्याची काही संख्या घरटी देखील बांधते. (indian pitta migration)

भारतीय पिट्टा या नावाने ओळखला जाणारा हा पक्षी भारतात स्थानिक स्वरुपाचे स्थलांतर करतो. ‘पिट्टा’ हा शब्द तेलुगू भाषेतून आला आहे. ज्याचा अर्थ ‘लहान पक्षी’ असा होतो. याला मराठीत स्थानिक भाषेत नवरंग, बहिरा पाखर, बंदी, पाऊसपेव असेही म्हटले जाते. हा पक्षी हिवाळ्यात दक्षिण भारत आणि श्रीलंकेत स्थलांतर करतो, तर पावसाळ्याच्या तोंंडावर अगदी हिमालयाच्या पायथ्यापर्यंत प्रजननाकरिता जातो. एप्रिल महिन्यात श्रीलंका आणि दक्षिण भारतात स्थलांतर केलेले नवरंग पक्षी पश्चिम घाटाच्या धारेला धरुनच उत्तरेकडे सरकू लागतात. सध्या या पक्ष्यांचे आगमन रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात झाले आहे. जिल्ह्यातील पक्षीनिरीक्षक या पक्ष्यांची छायाचित्र टिपत आहेत.

मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात नवरंग पक्षी मुंबई आणि रायगड जिल्ह्यात सरकेल आणि तिथून गुजरातमध्ये जाऊन प्रजनन करेल. पश्चिम घाटामार्गे स्थलांतर करणारे ९० टक्के नवरंग पक्षी हे गुजरात किंवा त्यावरील भागात जाऊन प्रजनन करत असले तरी, काही पक्षी हे कोकणात देखील घरटी बांधतात. लहान आकाराचा हा पक्षी आपल्या रंगासाठी ओळखला जातो. त्याचे पाय लाब आणि मजबूत असतात. चोच जाड असते. हा पक्षी सहसा दाट झाडी असलेल्या जंगलात जमिनीवर खाद्य शोधताना दिसतो. पालापाचोळ्यामधील कीटक शोधताना दिसतो. सकाळी आणि सायंकाळी हा पक्षी आवाज देताना दिसतो. यामधील नर आणि मादी हे एकसारखेच दिसतात.

Facebook Comments Box

Mumbai to Konkan RORO Service: अवघ्या ५ तासांत मुंबईतून तळकोकणात! वाहतुकीचा जलद पर्याय लवकरच खुला होणार

   Follow us on        
मुंबई: यावर्षी कोकणात जाण्यासाठी वाहतुकीचा नवीन पर्याय खुला होणार आहे. राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी चाकरमान्यांना  मोठी खुशखबर दिली असून माझगाव ते मालवण जलवाहतुकीने अवघ्या पाच तासांत पोहोचता येणार आहे. येत्या गणेशचतुर्थी पर्यंत ही वाहतूक खुली होणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे
या वॉटर मेट्रोमुळे मुंबई महानगर प्रदेशातील रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवरचा पडणारा मोठा ताण हा विभागला जाणार असून जलवाहतुकीचा मोठा पर्याय आगामी काळात मुंबईकरांना खुला होऊ शकणार आहे, असेही मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी यावेळी स्पष्ट केले.
रेल्वेचे तिकीट जरी मिळाले नाही तरी काळजी करण्याचे कारण नाही. कारण महाराष्ट्र सागरी मंडळाने रो-रो बोट सेवेद्वारे जलवाहतुकीची जलद सेवा चाकरमान्यांसाठी गणेश चतुर्थीला उपलब्ध करून दिली आहे. एनडीटीव्ही मराठीच्या कॉन्क्लेव्हमध्ये बोलताना मंत्री नितेश राणे यांनी ही घोषणा केली. मालवणला जाऊ इच्छिणारे थेट दुचाकी, चारचाकी गाडी घेऊन माझगाव ते मालवण हा जलप्रवास जलद गतीने करता येणे शक्य आहे. याकरता मालवण आणि विजयदुर्ग असे दोन पर्याय देण्यात आले आहेत. ज्यांना मालवणी येथे पोहोचायचे असेल त्यांनी मालवणला, तर ज्यांना विजयदुर्ग येथून कोकणातील आपल्या गावी जायचे असेल त्यांच्याकरता विजयदुर्ग येथे दुसरा पर्याय देण्यात आलेला आहे.
सरकार जलवाहतुकीच्या क्षेत्रात मोठे काम करत असून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या क्षेत्रात आपल्याला अधिकाधिक काम करण्यास सांगितले आहे. मुंबई महानगर प्रदेशातील वॉटर ट्रान्सपोर्टला म्हणजेच जलवाहतुकीला शासकीय पातळीवर गती देण्याचे काम प्रगतिपथावर असून याबाबतचे डीपीआर (प्रकल्प अहवाल) तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. यावर्षी नसला तरी आगामी वर्षात साधारणपणे फेब्रुवारी, मार्चच्या सुमारास कोचीनच्या धर्तीवर मुंबई महानगर प्रदेशातील वॉटर मेट्रोला मान्यता देण्यात येईल.
यंदाच्या गणपती उत्सवात सिंधुदुर्गात जाऊ इच्छिणाऱ्या गणेश भक्तांसाठी माझगाव पासून ते थेट मालवणपर्यंत रो-रो बोट सेवेद्वारे जलवाहतूक सुरू करण्यात येणार आहे.
Facebook Comments Box

२८ एप्रिल पंचांग आणि दिनविशेष


आजचे पंचांग

  • तिथि-प्रथम – 21:13:41 पर्यंत
  • नक्षत्र-भरणी – 21:38:36 पर्यंत
  • करण-किन्स्तुघ्ना – 11:07:55 पर्यंत, भाव – 21:13:41 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-आयुष्मान – 20:01:52 पर्यंत
  • वार- सोमवार
  • सूर्योदय- 06:15
  • सूर्यास्त- 18:58
  • चन्द्र-राशि-मेष – 26:54:34 पर्यंत
  • चंद्रोदय- 06:16:59
  • चंद्रास्त- 19:45:59
  • ऋतु- ग्रीष्म

जागतिक दिन :
  • कामाच्या ठिकाणी सुरक्षितता आणि आरोग्यासाठी जागतिक दिवस World Day For Safety And Health At Work
महत्त्वाच्या घटना :
  • 1916 : होम रुल लीगची स्थापना झाली.
  • 1920: अझरबैजान सोव्हिएत युनियनमध्ये सामील झाला.
  • 1969 : चार्ल्स गॉल यांनी फ्रान्सच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
  • 2001 : डेनिस टिटो हे पैसे देउन अंतराळात प्रवास करणारे पहिला अंतराळ प्रवासी झाले.
  • 2003 : ऍपल कम्प्यूटर इन्क. ने आयट्यून्स स्टोअर प्रकाशित केले.
  • 2007 : 2007 साली श्रीलंकेला हरवून ऑस्ट्रेलिया चौथ्यांदा वर्ल्ड क्रिकेट चॅम्पियन बनला, श्रीलंकेला हरवून ऑस्ट्रेलिया चौथ्यांदा वर्ल्ड क्रिकेट चॅम्पियन बनला.
  • 2008 : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने ‘PSLV-C9’ उपग्रह प्रक्षेपित केला.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 1758 : ‘जेम्स मोन्‍रो’ – अमेरिकेचे 5 वे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू: 4 जुलै 1831)
  • 1854 : ‘वासुकाका जोशी’ – लोकमान्य टिळकांचे निकटचे सहकारी यांचा जन्म. (मृत्यू: 12 जानेवारी 1944)
  • 1908 : ऑस्ट्रियाचे व्यापारी व नाझीविरोधी ऑस्कार शिंडलर यांचा जन्म.
  • 1916 : प्रसिद्ध लक्झरी स्पोर्ट्स कार लॅम्बोर्गिनी चे निर्माते फारूशियो लॅम्बोर्गिनी यांचा इटली येथे जन्म. (मृत्यू: 20 फेब्रुवारी 1993)
  • 1931 : लेखक मधु मंगेश कर्णिक यांचा जन्म.
  • 1937 : इराकी हुकूमशहा आणि इराकचे ५वे अध्यक्ष सद्दाम हुसेन यांचा जन्म. (मृत्यू: 30 डिसेंबर 2006)
  • 1942 : इंग्लिश क्रिकेटर माईक ब्रेअर्ली यांचा जन्म.
  • 1968 : झिम्बाब्वेचे क्रिकेटपटू अँडी फ्लॉवर यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 1740 : थोरले बाजीराव पेशवे ऊर्फ श्रीमंत बाजीराव बल्लाळ बाळाजी भट यांचे नर्मदातीरी रावेरखेडी येथे निधन. (जन्म: 18 ऑगस्ट 1700)
  • 1903 : ‘जोशिया विलार्ड गिब्स’ – भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या विषयांमध्ये आपले महत्वपूर्ण योगदान देणारे अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ यांचे निधन.
  • 1945 : इटलीचे हुकूमशहा बेनिटो मुसोलिनी यांचा गोळ्या घालून मृत्यू. (जन्म: 29 जुलै 1883)
  • 1978 : अफगाणिस्तानचे पहिले अध्यक्ष मोहम्मद दाऊद खान यांचे निधन. (जन्म: 18 जुलै 1909)
  • 1992 : ‘डॉ. विनायक कृष्ण गोकाक’ – ज्ञानपीठ पुरस्कारविजेते कन्नड साहित्यिक आणि शिक्षणतज्ज्ञ यांचे निधन. (जन्म: 9 ऑगस्ट 1909)
  • 1998 : ‘रमाकांत देसाई’ – जलदगती गोलंदाज यांचे निधन. (जन्म: 20 जून 1939)


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

 

Facebook Comments Box

Konkan Wildlife: रत्नागिरीत पांढर्‍या बिबटय़ाचे दर्शन

   Follow us on        

Ratnagiri: रत्नागिरीतील एका शेताच्या जवळील जंगलात एका मादी बिबट्याने एका पांढर्‍या रंगाच्या पिल्लाला जन्म दिल्याची अजब घटना घडली आहे. मात्र या पिल्ला सोबत जन्म घेतलेली ईतर पिल्ले मात्र सामान्य रंगाची आहेत.

“चार दिवसांपूर्वी, शेताच्या मालकाने आम्हाला एका पांढऱ्या रंगाच्या बिबट्याच्या पिल्लाबद्दल माहिती दिली, जी दुर्मिळ आहे. मात्र मादी बिबट्याची ईतर पिल्ले सामान्य रंगांची आहेत.” या पिल्लाची आई शेतात पिल्लांसह आहे, परंतु ती तिच्या सध्याच्या ठिकाणी किती काळ राहील हे आम्हाला माहित नाही. अल्बिनिझम किंवा ल्युसिझम – दोन्ही अनुवांशिक स्थितींमुळे – हे पिल्लू पांढरे जन्माला आले आहे की नाही हे अद्याप निश्चित झालेले नाही.असे रत्नागिरीच्या विभागीय वन अधिकारी गिरीजा देसाई म्हणाल्यात. वन्यजीव प्रेमी आणि जनतेला शेतात येण्यापासून रोखण्यासाठी देसाई यांनी स्थान उघड केले नाही.

“त्वचा, केस आणि डोळ्यांना रंग देणारे रंगद्रव्य मेलेनिनच्या पूर्ण अनुपस्थितीमुळे अल्बिनिझम होतो. जास्त मेलेनिनमुळे त्वचा गडद आणि काळी होते. ब्लॅक पेंथरचे मूळ हेच आहे. या स्थितीला मेलेनिझम म्हणतात. तर मेलेनिनच नव्हे तर सर्व रंगद्रव्ये कमी झाल्यामुळे किंवा आंशिकपणे नष्ट झाल्यामुळे ल्युसिझम होतो आणि त्यामुळे प्राण्याचा रंग फिकट असू शकतो.” असे महाराष्ट्राचे माजी मुख्य वन्यजीव वॉर्डन सुनील लिमये याबद्दल अधिक माहिती देताना म्हणालेत.

Facebook Comments Box

२७ एप्रिल पंचांग आणि दिनविशेष


आजचे पंचांग

  • तिथि-अमावस्या – 25:03:20 पर्यंत
  • नक्षत्र-अश्विनी – 24:39:27 पर्यंत
  • करण-चतुष्पाद – 14:58:34 पर्यंत, नागा – 25:03:20 पर्यंत
  • पक्ष- कृष्ण
  • योग-प्रीति – 24:18:26 पर्यंत
  • वार- रविवार
  • सूर्योदय- 06:15
  • सूर्यास्त- 18:58
  • चन्द्र-राशि-मेष
  • चंद्रोदय- चंद्रोदय नाही
  • चंद्रास्त- 18:37:59
  • ऋतु- ग्रीष्म

जागतिक दिन :
  • वर्ल्ड डिझाईन डे
महत्त्वाच्या घटना :
  • 1854: पुणे ते मुंबईला उपग्रहाद्वारे पहिला संदेश पाठवण्यात आला
  • 1908: लंडनमध्ये चौथ्या ऑलिम्पिक खेळांना सुरुवात झाली.
  • 1941: दुसरे महायुद्ध – जर्मन सैन्याने अथेन्समध्ये प्रवेश केला.
  • 1961: सिएरा लिओनला ग्रेट ब्रिटनपासून स्वातंत्र्य मिळाले
  • 1974: अमेरिकेतील वॉशिंग्टन येथे 10,000 लोकांनी निदर्शने करून राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली.
  • 1992: बेट्टी बूथरॉइड ब्रिटिश हाऊस ऑफ कॉमन्सवर निवडून आलेल्या पहिल्या महिला बनल्या.
  • 1999: एकाच रॉकेटने अनेक उपग्रह प्रक्षेपित करण्याची प्रणाली भारतात विकसित करण्यात आली.
  • 2005: एअरबस A-380 विमानाचे पहिले प्रात्यक्षिक.
  • 2018 : उत्तर आणि दक्षिण कोरिया यांच्यात पानमुनजोम घोषणापत्रावर स्वाक्षरी करण्यात आली, कोरियन संघर्ष संपवण्याचा त्यांचा हेतू अधिकृतपणे घोषित केला.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 1791 : ‘सॅम्युअल मोर्स’ – मोर्स कोड व तारायंत्राचे जनक आणि चित्रकार यांचा जन्म. (मृत्यू: 2 एप्रिल 1872)
  • 1822 : ‘युलिसीस एस. ग्रॅन्ट’ – अमेरिकेचे 18 वे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू: 23 जुलै 1885)
  • 1883 : भार्गवराम विठ्ठल वरेरकर उर्फ ‘मामा वरेरकर’ – नाटककार यांचा जन्म. (मृत्यू: 23 सप्टेंबर 1964)
  • 1912 : ‘जोहरा सेहगल’ – भारतीय अभिनेत्री, नृत्यांगना, आणि कोरिओग्राफर यांचा जन्म. (मृत्यू: 10 जुलै 2014)
  • 1920 : ‘डॉ. मणिभाई भीमभाई देसाई’ – महात्मा गांधींचे अनुयायी यांचा जन्म. (मृत्यू: 14 नोव्हेंबर 1993)
  • 1927 : ‘कोरेटा स्कॉट किंग’ – मार्टिन ल्युथर किंग यांची पत्नी यांचा जन्म.
  • 1976 : ‘फैसल सैफ’ – पटकथालेखक भारतीय दिग्दर्शक यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 1521 : ‘फर्डिनांड मॅगेलन’ – पोर्तुगीज शोधक यांचे निधन.
  • 1980 : ‘विठ्ठलराव एकनाथराव विखे पाटील’ – पद्मश्री सहकारमहर्षी यांचे निधन. (जन्म: 29 ऑगस्ट 1901)
  • 1882 : ‘राल्फ वाल्डो इमर्सन’ – अमेरिकन लेखक व तत्वज्ञ यांचे निधन. (जन्म: 25 मे 1803)
  • 1989 : ‘कोनोसुके मात्सुशिता’ – पॅनासोनिक कंपनी चे स्थापक यांचे निधन. (जन्म: 27 नोव्हेंबर 1894)
  • 1898 : ‘शंकर बाळकृष्ण दीक्षित’ – ज्योतिर्विद यांचे निधन. (जन्म: 21 जुलै 1853)
  • 2002 : ‘रुथ हँडलर’ – बार्बी डॉल या प्रसिद्ध बाहुली च्या जनक यांचे निधन. (जन्म: 4 नोव्हेंबर 1916)
  • 2017 : ‘विनोद खन्ना’ – भारतीय अभिनेते यांचे निधन. (जन्म: 6 ऑक्टोबर 1946)


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

 

Facebook Comments Box

Konkan Railway: अखेर ‘त्या’ तीन गाड्यांचे पावसाळी आरक्षण सुरु; फेऱ्यांमध्ये मात्र कपात

   Follow us on        
Konkan Railway News: दरवर्षीप्रमाणे कोकण रेल्वे मार्गावर पावसाळी वेळापत्रक लागू होणार आहे. मात्र दोन महिन्याचे आगाऊ आरक्षण चालू झाले असताना त्यात वंदे भारत एक्सप्रेस, तेजस एक्सप्रेस आणि एलटीटी मडगाव एक्सप्रेस या गाड्यांची नावे दिसत नसल्याने आरक्षण करणाऱ्या प्रवाशांच्या संभ्रम निर्माण झाला होता. या गाड्यांची सेवा पावसाळी हंगामात बंद राहणार कि काय अशी शंका निर्माण झाली होती. मात्र आता या गाड्यांचे आरक्षण आयआरसीटीसी संकेतस्थळावर दिसत असल्याने या शंकेचे निरसन झाले आहे. मात्र या गाड्यांच्या फेऱ्यात मोठ्या प्रमाणात कपात करण्यात आली आहे.
रेक्स च्या कमतरतेमुळे कपात
वेळापत्रक बदलल्या मुळे रेक अभावी काही गाड्यांच्या फेऱ्या कमी कराव्या लागतात. जसे की सकाळी सीएसएमटी वरून सुटणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस चा तोच रेक दुपारी मडगाव वरून सीएसएमटी साठी वापरला जातो. मात्र पावसाळी हंगामात गाड्यांचा वेग धीमा होत असल्याने तोच रेक समान दिवशी वापरता येत नाही. साहजिकच दुसऱ्या दिवशी मडगाव वरून सीएसएमटी साठी  तो रेक वापरला जातो. या कारणामुळे आठवड्यातून ६ दिवस धावणारी  ही गाडी पावसाळी हंगामात फक्त तीनच दिवस चालविण्यात येणार आहे. या कारणाने अजून काही  गाड्यांच्या फेऱ्यात कपात केली जाणार आहे. त्याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे
1) 11099/11100 Lokmanya Tilak (T) – Madgaon Jn. – Lokmanya Tilak (T) Express
11099 Lokmanya Tilak (T) – Madgaon Jn. Express
ही गाडी आठवड्यातून ४ दिवस म्हणजे मंगळवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार या दिवशी धावते. ती पावसाळी हंगामात दिनांक १०/०६/२०२४ ते ३१/१०/२०२४ पर्यंत पावसाळी वेळापत्रकानुसार फक्त शुक्रवार आणि रविवार या दोन दिवशी धावणार आहे.
11100 Madgaon Jn. – Lokmanya Tilak (T)  Express
ही गाडी आठवड्यातून ४ दिवस म्हणजे मंगळवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार या दिवशी धावते. ती पावसाळी हंगामात दिनांक १०/०६/२०२४ ते ३१/१०/२०२४ पर्यंत पावसाळी वेळापत्रकानुसार फक्त शनिवार आणि सोमवार या दोन दिवशी धावणार आहे.
2) 22119/22120 Mumbai CSMT – Madgaon Jn. – Mumbai CSMT Tejas Express
22119 Mumbai CSMT – Madgaon Jn. Tejas Express
ही गाडी सोमवार आणि गुरुवार वगळता आठवड्यातून ५ दिवस धावते. ती पावसाळी हंगामात दिनांक१०/०६/२०२४ ते ३१/१०/२०२४ पर्यंत पावसाळी वेळापत्रकानुसार फक्त मंगळवार,गुरुवार आणि शनिवार या तीनच दिवशी दिवशीच धावणार आहे.
22120 Madgaon Jn. – Mumbai CSMT Tejas Express
ही गाडी सोमवार आणि गुरुवार वगळता आठवड्यातून ५ दिवस धावते. ती पावसाळी हंगामात दिनांक१०/०६/२०२४ ते ३१/१०/२०२४ पर्यंत पावसाळी वेळापत्रकानुसार फक्त बुधवार ,शुक्रवार, आणि रविवार  या तीनच दिवशी दिवशीच धावणार आहे.
३) 22229 /22230  Mumbai CSMT – Madgaon – Mumbai CSMT Vande Bharat Express
22229 CSMT MADGAON VANDE BHARAT EXPRESS
ही गाडी आठवड्यातून शुक्रवार वगळता ६ दिवस धावते. मात्र ती पावसाळी हंगामात दिनांक १०/०६/२०२४ ते ३१/१०/२०२४ पर्यंत पावसाळी वेळापत्रकानुसार आठवड्यातून फक्त सोमवार, बुधवार आणि शुक्रवार या तीनच दिवशी धावणार आहे.
22230 MADGAON CSMT VANDE BHARAT EXPRESS
ही गाडी आठवड्यातून शुक्रवार वगळता ६ दिवस धावते. मात्र ती पावसाळी हंगामात दिनांक १०/०६/२०२४ ते ३१/१०/२०२४ पर्यंत पावसाळी वेळापत्रकानुसार आठवड्यातून फक्त मंगळवार, गुरुवार आणि शनिवार या तीनच दिवशी धावणार आहे.
Facebook Comments Box

Vaibhavwadi Railway Station: चांगले उत्त्पन्न मिळत असून सुद्धा कोकण रेल्वेचे वैभववाडी स्थानकाकडे दुर्लक्ष

   Follow us on        
Vaibhavwadi Railway Station:  कोकण रेल्वे मार्गावरील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी रोड रेल्वे स्थानकाला लागलेले समस्यांचे ग्रहण सुटायला तयार नाही. या स्थानकापासून रेल्वे प्रशासनाला चांगले उत्त्पन्न भेटत असताना सुद्धा या स्थानकावरील मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष होत होत असल्याचा आरोप येथील प्रवाशांकडून होत आहे.
गेल्यावर्षी म्हणजेच २०२४-२५ ला या स्थानकावरून कोकण रेल्वेला ७ कोटी २२ लाख इतके उत्पन्न भेटले असल्याचे माहिती रेल्वे अभ्यासक श्री ओंकार लाड यांनी माहिती अधिकारातून प्राप्त केली आहे. २०२३-२४ या वर्षाच्या उत्पन्नाशी तुलना करता गेल्या वर्षीच्या उत्पन्नात जवळपास ९.५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. उत्पन्नाच्या बाबतीत हे स्थानक  कोकण रेल्वेच्या पहिल्या १५ स्थानकामध्ये मोडत आहे. असे असून देखील या स्थानकांवर मूलभूत सुविधांची मारामारी असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
या स्थानकावर प्लॅटफॉर्मवर बसायला नीट जागा नाही. ऊन्ह आणि पावसासाठी छप्पर नाही. ५ वर्षे होत आली; तरी आरक्षण खिडकी उघडायला तयार नाही, एकाही जलद गाडीला थांबा नाही. अशा अनेक समस्यांनी वैभववाडी रेल्वे स्थानकाला ग्रासलेले आहे. परंतु, या समस्या सोडविण्यासाठी लागणारी राजकीय इच्छाशक्ती काहीशी कोमेजून गेलेली दिसते. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या सीमेवर मध्यवर्ती रेल्वे स्थानक वैभववाडी आहे. त्यामुळे रत्नागिरीतून थेट कुडाळ सावंतवाडीत थांबणाऱ्या काही सुपरफास्ट रेल्वे गाड्यांना वैभववाडीत थांबा मिळावा ही रेल्वे प्रवाशांची खूप वर्षांपासूनची मागणी आहे. परंतु, या मागणीला राजकीय पाठबळ देण्यासाठी कोणीही पुढाकार घेत नाही. वैभववाडी तालुक्यासह कणकवली तालुक्यातील नांदगाव, तळेरे खारेपाटण पट्टा तसेच देवगड तालुक्यातील शिरगाव पासून विजयदुर्ग पर्यंतच्या आणि घाटमाथ्यावरील गगनबावडा तालुक्यालाही वैभववाडी रोड रेल्वे स्थानकाचा मोठा आधार आहे. या स्थानकातून दररोज हजारो प्रवाशाची ये-जा सुरु आहे. तरीही येथे दिवा, मांडवी, तुतारी आणि कोकणकन्या या चारच रेल्वेगाड्यांना थांबा आहे. यामध्ये मागील १५ नियमित गाडीच्या थांब्याची वाढ होऊ शकलेली नाही. यांचे मूळ राजकीय उदासीनता हेच आहे.
Facebook Comments Box

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search

Join Our Whatsapp Group.