सावंतवाडी-ठाणे-बोरीवली-मुंबई सेंट्रल स्लीपरकोच बस सुरू करण्याची मागणी.

सिंधुदुर्ग : सावंतवाडी-ठाणे-बोरीवली-मुंबई सेंट्रल स्लीपरकोच बस सुरू करण्याबाबत माजी नगरसेवक तानाजी वाडकर यांनी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना निवेदन दिले आहे.
निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, आपल्या माध्यमातून सावंतवाडी डेपोला दोन स्लीपरकोच बस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. राज्यात पहिली सावंतवाडी- मुंबई ही रातराणी बससेवा सुरूं झाली. कालांतराने हा प्रयोग सर्व राज्यात राबविण्यात आला व यशस्वी झाला. सध्या सावंतवाडीहून मुंबईसाठी बस नाही. सावंतवाडी डेपो सिंधुदुर्ग विभागात सर्वाधिक रहदारीचा असून दोन राज्यांच्या सीमेवर असल्याने रहदारी सुरू असते. तेव्हा प्रवांशाची गरज लक्षात घेऊन उपलब्ध स्लीपरकोच बस रात्री ८.३० वा. मुंबईसाठी सोडण्यात यावी. ठाणे- घोडबंदरमार्गे बोरीवली, अंधेरी, बांद्रा, परेल, मुंबई सेंट्रल असा मार्ग असावा व परतीसाठी मुंबई सेंट्रलहून ५ वाजता सोडून बोरीवलीहून ८ वा. सोडावी. म्हणजे त्याचा लाभ ठाणे परिसर, मुंबई उपनगर व मुंबई-परेल या मध्यवर्ती भागातील प्रवाशांना घेता येईल.

Loading

Facebook Comments Box

Guhagar: गणेश विसर्जन मिरवणुकीत भरधाव टेम्पो शिरल्याने मोठा अपघात; २ ठार तर १५ जखमी

रत्नागिरी : जिल्ह्यात गुहागर तालुक्यामध्ये गणेश विसर्जन मिरवणूकीत एक मोठी दुर्घटना घडली आहे. ब्रेक फेल झाल्याने एक टेम्पो गणेश विसर्जन मिरवणूक शिरल्याने झालेल्या दुर्घटनेमध्ये दोघांचा मृत्यू झाला असून १५ जण जखमी झाले असल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेमुळे गणेश मूर्ती विसर्जनाच्या मिरवणुकीला गालबोट लागले आहे.
कोमल नारायण भुवड (वय १७) आणि दीपक लक्ष्मण भुवड (वय ४८) अशी मृत्यू झालेल्या दोघांची नावं आहेत. अपघातात मृत्यू झालेले हे दोघेजण व जखमी झालेले गणेशभक्त हे सगळे पाचेरी आगर येथील भुवडवाडी येथे राहणारे आहेत.गुहागर तालुक्यात पाचेरी आगर येथे अनंत चतुर्दशीनिमित्त गणपती विसर्जन मिरवणूक सुरू होती. दुर्दैवाने विसर्जन मिरवणूक सुरू असताना टेम्पोचे ब्रेक फेल झाले आणि टेम्पो उताराच्या दिशेने पुढे जाऊ लागला. हा प्रकार टेम्पो ड्रा यव्हरच्या लक्षात येताच त्यांनी टेम्पो मधून उडी मारून टेम्पो थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी त्या ड्रायव्हरच्या अंगावरून टेम्पो गेला. तसेच समोर नाचत असलेल्या भाविकांना या टेम्पोची जोरदार धडक बसली. या दुर्दैवी घटनेत टेम्पोमध्ये बसलेल्या १७ वर्षीय मुलीच्याही डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला आहे. यामधील जखमी झालेला चालक दीपक याला जवळच्या आबलोली ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अधिक उपचाराकरिता त्याला डेरवण येथे नेण्यातयेत होते. मात्र वाटेतच त्याची प्राणज्योत मालवली.

Loading

Facebook Comments Box

Sindhudurg: महाकालेश्वर,काशीविश्वेश्वर मंदिराच्या धर्तीवर कुणकेश्वर मंदिराचा पर्यटन विकास होणार

सिंधुदुर्ग: जिल्ह्यातील प्रसिद्ध कुणकेश्वर मंदिराच्या विकासासाठी येत्या काही महिन्यांत केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून ७५ कोटीचा निधी प्राप्त करून देण्यात येणार असल्याची माहिती आमदार नितेश राणे यांनी दिली आहे.
महाकालेश्वर मंदिर, काशीविश्वेश्वर मंदिराच्या धर्तीवर कोकणची काशी कुणकेश्वर मंदिराचा पर्यटन विकास होणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. याबाबत दिलेल्या एका पत्रकात म्हटले आहे, की सिंधुदुर्गच्या पर्यटन विकासासाठी धोरणात्मक पावले उचलत आहोत. पहिल्या टप्प्यात कणकवली विधानसभा मतदारसंघात देशातील पहिले कंटेनर थिएटर देवगडमध्ये उभारले आणि ते सुस्थितीत सुरू आहे. पर्यटकांसाठी तळकोकणात पहिले वॅक्स म्युझियम देवगडमध्ये सुरू केले आहे. देशातील दुसरे महाराणा प्रताप कलादालन वैभववाडीत बनवले आहे. पोद्दार स्कूल कणकवली मध्ये सुरू केले आहे. पर्यटनाच्या दुसऱ्या टप्प्यात आणखी मोठे मोठे प्रकल्प पर्यटनच्या माध्यमातून आणणार आहे, असेही आमदार श्री. राणे यांनी पत्रकातून नमुद केले आहे.

Loading

Facebook Comments Box

सावंतवाडी: शहरातील धोकादायक झाडे ठरत आहेत जीवघेणी

शहरातील धोकादायक झाडे त्वरित तोडण्यात यावीत अन्यथा…. माजी शिक्षण व आरोग्य सभापती मंगेश तळवणेकर यांचा इशारा 

सावंतवाडी :मंगळवारी रात्री सावंतवाडी शहरात झाड पडून दोन युवकांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. शहरात अशी बरीच धोकादायक झाडे आहेत. अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी स्थानिक प्रशासनाने सावंतवाडी शहरासह परिसरातील रस्त्याच्या लगत जी धोकादायक झाडे आहेत, त्या झाडांच्या मालकांना सांगून ती आठ दिवसांत तोडावीत. अन्यथा शासनासह स्थानिक प्रशासनाला जाब विचारण्यासाठी सावंतवाडी तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा माजी शिक्षण व आरोग्य सभापती मंगेश तळवणेकर यांनी दिला आहे.

सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांना त्यांनी आज एक निवेदन सादर केले. या निवेदनात तळवणेकर यांनी म्हटले आहे की, मंगळवारी जो आठवडा बाजार भरतो त्या ठिकाणी आणि रेस्ट हाऊस जवळ भर रस्त्यावर आलेली अनेक धोकादायक झाडे आहेत मात्र संबंधित प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यामुळेच मंगळवारी रात्री या दोन्ही दुर्दैवी युवकांनी काहीही चूक नसताना त्यांचा बळी गेला शहरातील सर्व धोकादायक झाडे येथे सात दिवसात तोडून घ्यावीत असे तळवणेकर यांनी म्हटले आहे.

मंगळवारी रात्री 11 वाजता सावंतवाडी शहरातील राजवाड्याच्या नजीक एक मोठे झाड पडून दोन तरुणांना आपला जीव गमवावा लागला होता.

Loading

Facebook Comments Box

कोकण रेल्वेमार्गावर चालविण्यात येणार्‍या विशेष गाडीचा ऑक्टोबर अखेरपर्यंत विस्तार..

Konkan Railway News : कोंकण रेल्वेच्या प्रवाशांसाठी एक खुशखबर आहे. या मार्गावर विशेष गाडी म्हणून चालविण्यात येणाऱ्या एका गाडीचा ३० ओक्टोम्बर  २०२३ पर्यंत विस्तार करण्यात आला आहे. ही गाडी या आधीच्या वेळापत्रकानुसार, स्थानकानुसार आणि डब्यांच्या  संरचनेप्रमाणे चालविण्यात येणार आहे.
02198 Jabalpur Jn. – Coimbatore Jn. Weekly Superfast Festival Special
आठवड्यातून दर शुक्रवारी धावणारी हि गाडी ०६/१०/२०२३ पर्यंत चालविण्यात येणार होती तिची सेवा २७/१०/२०२३ पर्यंत विस्तारित केली गेली आहे.
02197 – Coimbatore Jn. – Jabalpur Jn. Weekly Superfast Festival Special
आठवड्यातून दर सोमवारी धावणारी हि गाडी ०९/१०/२०२३ पर्यंत चालविण्यात येणार होती तिची सेवा ३०/१०/२०२३ पर्यंत विस्तारित केली गेली आहे.
या गाड्यांचे मडगावपर्यंत कोकणातील थांबे 
पनवेल,रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली,कुडाळ, थिवीम, मडगाव

Loading

Facebook Comments Box

Konkan Railway | कोकण रेल्वे मार्गावर दुसरी वंदे भारत एक्सप्रेस लवकरच धावणार

Kokan Railway News : कोकण रेल्वे मार्गावर मडगाव ते मंगळुरू दरम्यान वंदे भारत एक्स्प्रेस सुरु करण्याचे संकेत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल दिलेत. दक्षिण कन्नडचे खासदार नलिन कुमार कटील यांनी आज नवी दिल्लीत वैष्णव यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर मडगाव ते मंगळुरू दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस लवकरच चालविण्यात येणार असल्याचे आश्वासन रेल्वेमंत्र्यांनी दिले.

कर्नाटकच्या किनारपट्टीवर वंदे भारत एक्स्प्रेस धावत नसल्याचे कटील यांनी वैष्णव यांच्या निदर्शनास आणून दिले. मंगळुरु आणि गोवा दरम्यानच्या किनारपट्टीचा भाग देशाच्या दक्षिणेकडील महत्त्वपूर्ण आहे. हा प्रदेश निसर्गसौंदर्य, समृद्ध वारसा आणि वैशिष्ट्यपूर्ण सांस्कृतिक परंपरांसाठी ओळखला जातो. वंदे भारत एक्स्प्रेस सुरू झाल्यानंतर या भागात कनेक्टिव्हिटी वाढेल आणि आर्थिक आणि पर्यटनाला चालना मिळेल, असेही कटील यांनी सांगितले.

दरम्यान, मंगळुरू रेल्वे क्षेत्राचा दक्षिण पश्चिम रेल्वेच्या म्हैसूर रेल्वे विभागाच्या प्रशासकीय आणि प्रादेशिक अधिकारक्षेत्रात समावेश करण्याची विनंती खासदार कटील यांनी वैष्णव याना केली होती. मंगळुरू रेल्वे क्षेत्राला दक्षिण रेल्वेने सावत्र वागणूक दिल्याने त्याचा पुरेसा विकास झालेला नाही, असेही कटील म्हणाले.

ही वंदे भारत एक्सप्रेस चालू झाल्यास कोकण रेल्वे मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सेवेचा विस्तार होणार आहे. तसेच ही एक्सप्रेस कोकण रेल्वे मार्गावरील दुसरी वंदे भारत एक्सप्रेस ठरणार आहे. यापूर्वी मुंबई ते मडगाव दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस चालविण्यात आली आहे.

Loading

Facebook Comments Box

कोकण रेल्वे मार्गावर आजपासून ३ दिवसांचा मेगाब्लॉक; ५ गाड्यांच्या वेळापत्रकांवर परिणाम

Konkan Railway News:  कोकण रेल्वे मार्गावरील ठोकूर या स्थानकावर  मंगळवार दिनांक २६ सप्टेंबर ते गुरुवार दिनांक २८  सप्टेंबर पर्यंत रेल्वेच्या कामासाठी मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. या मेगाब्लॉकमुळे या मार्गावर धावणाऱ्या ५ गाड्यांच्या वेळापत्रकांवर परिणाम होणार आहे.
१)Train no. 12619 Lokmanya Tilak (T) – Mangaluru Central Matsyagandha Express
दिनांक २६ सप्टेंबर रोजी प्रवास सुरु करणारी ही गाडी सुरतकल या स्थानकावर पन्नास मिनिटे थांबवून ठेवण्यात येणार आहे.
२) Train no. 16585 Sir M Visvesvaraya Terminal  Bengaluru – Murdeshwar Express
दिनांक २६ सप्टेंबर रोजी प्रवास सुरु करणारी ही गाडी मंगुळुरु या स्थानकावर पंचवीस मिनिटे थांबवून ठेवण्यात येणार आहे.
३)Train No. 22113 Lokmanya Tilak (T) – Kochuveli Express
दिनांक २६ सप्टेंबर रोजी प्रवास सुरु करणारी ही गाडी सुरतकल या स्थानकावर तीस मिनिटे थांबवून ठेवण्यात येणार आहे.
४) Train No. 16311 Sri Ganganagar – Kochuveli Express
दिनांक २६ सप्टेंबर रोजी प्रवास सुरु करणारी ही गाडी मुलकी या स्थानकावर १ तास १०  मिनिटे थांबवून ठेवण्यात येणार आहे.
५) Train no. 12619 Lokmanya Tilak (T) – Mangaluru Central Matsyagandha Express
 दिनांक २७ सप्टेंबर रोजी प्रवास सुरु करणारी ही गाडी मुलकी या स्थानकावर १ तास  थांबवून ठेवण्यात येणार आहे.

Loading

Facebook Comments Box

गणेश विसर्जनात मगरींचे विघ्न; उपाययोजना करण्याची होत आहे मागणी

खेड : खेड शहरातील जगबुडी नदीमध्ये अनेक मगरींचा  वावर असल्याने दीड दिवसाचे गणपती विसर्जन करताना येथील विसर्जन कट्टा मंडळाच्या सदस्यांना आपला जीव मुठीत धरून गणरायाचे विसर्जन करावे लागत होते. या मगरींना पळवून लावण्यासाठी नदीमध्ये फटाक्यांचे बॉम्ब फोडून त्यांना पळवून लावावे लागले.

याची दखल वनविभागाने (Forest Department) घेऊन पाच दिवसाच्या गणपती विसर्जनामध्ये (Konkan Ganeshotsav) कोणती अडचण येऊ नये, यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. खेड शहरातून वाहणाऱ्या जगबुडी नदीत अनेक छोट्या मोठ्या मगरी पावसाच्या पाण्यामुळे आल्या आहेत. त्या येथील प्रवाहात मुक्त फिरताना दिसत असल्याने अनेकांनी जगबुडी नदीत उतरणे बंद केले आहे.

 

Loading

Facebook Comments Box

Train No. 10105 | डब्यांवर लिहिलेल्या चुकीच्या क्रमांकामुळे चाकरमन्यांची गाडी चुकली

मुंबई :चार महिने अगोदर कसेबसे आरक्षित तिकीट मिळवायचे, नाही मिळाल्यास  दुप्पट तिप्पट भावाने दलालांकडून तिकीट विकत घ्यायचे आणि शेवटी रेल्वेच्या भोंगळ कारभारामुळे गाडी चुकणाऱ्या प्रवाशांनी आपल्या त्रासाबद्दल नेमकी कोणाकडे दाद मागायची असा प्रश्न विचारण्याची वेळ या दोन दिवसांत कोकणात जाणाऱ्या प्रवाशांवर यायला लागलीआहे.
रेल्वेच्या अशाच भोंगळ कारभारामुळे काल ४ ते ५ प्रवांशांची गाडी चुकल्याचा प्रकार घडला आहे.  विनोद सुरेशराव मोरे यांच्याकडे दिवा-सावंतवाडी एक्स्प्रेस-ट्रेन क्रमांक १०१०५ या गाडीची कन्फर्म तिकिटे होती. त्या गाडीवरील ट्रेन क्रमांक ठराविक बोगिंवर चुकीचा टाकला आहे. या चुकीमुळे त्यांच्यासहीत सुमारे ४ ते ५ कन्फर्म तिकीट असलेल्या कुटुंबीयांची ही ट्रेन काल १६ तारखेला चुकली.
दिवा – सावंतवाडी गाडीचा गाडीवरील १०१०५ क्रमांक नमूद करून ही चूक सुधारावी. सोबत काल रेल्वे कडूनही या गाडीबाबत ठराविक कालांतराने उद्घोषणा करून प्रवाशांना सूचित करणे गरजेचे होते ते मी अर्धा तिथे उपस्थित असूनही झालेले नव्हते असा आरोप त्यांनी केला आहे.
रेल्वे प्रशासन यावर्षी गणेशोत्सवासाठी दरवर्षी प्रमाणे अतिरिक्त गाड्या चालवत आहे. मात्र यात नियोजनाचा अभाव दिसून येत आहे. महत्वाच्या स्थानकावर सोडण्यात येणाऱ्या गाड्यांची उद्घोषणा Announcement योग्य प्रकारे केली जात नाही आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे महत्वाच्या स्थानकावर प्रवासी मदत कक्षाची उभारणी करणे आवश्यक होते. मात्र तशी काहीच सोय न केल्याने प्रवाशांची गैरसोय होताना दिसत आहे.

Loading

Facebook Comments Box

मुंबई गोवा महामार्गावर माणगाव जवळ एसटी बसला भीषण अपघात; १ ठार १९ जखमी

रायगड: गेले काही दिवस वर्दळीच्या ठरलेल्या मुंबई गोवा महामार्गावर आज पहाटे भीषण अपघात झाला आहे. माणगाव जवळ रेपोली इथे पहाटे साडेचार वाजता एसटी बसने मागून ट्रकला जोरदार धडक दिली. यामध्ये एक जण ठार तर १९ जण जखमी झाले असून सर्वांना माणगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे. यामध्ये दोघांची प्रकृती गंभीर आहे.
एसटी बस मुंबई राजापूरकडे ( MH 14 BT 2664 ) जाणारी असल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघाताचे नेमके कारण अजून स्पष्ट झालेले नाही . अपघातानंतर या मार्गावरची वाहतूक काही काळ विस्कळित झाली होती, मात्र वाहतूक पोलिसांनी काही वेळेत हा मार्ग वाहतुकीसाठी सुरळीत केला.

Loading

Facebook Comments Box

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search