राज्यात मान्सूनचे आगमन लवकरच; कोकणात ‘या’ तारखेला दाखल होणार.. हवामान खात्याने दिली महत्त्वाची माहिती..

Mansoon Updates |भारतीय हवामान विभागाने मान्सून देशभरात कधी पसरणार आहे, याची माहितीच जारी केली आहे. राज्यात १६ जूनपर्यंत मान्सून सर्वत्र दाखल होणार आहे.

हवामान विभागाने मान्सूनचा चार आठवड्यांचा अंदाज जारी केला आहे. त्यानुसार देशात काही भागात २६ मे पासून मान्सूनची प्रगती दाखवली आहे.

कोकणात मान्सूनचे आगमन ९ जूनला होणार आहे. कोल्हापूर सातारा जिल्हय़ात याचवेळी तो पोचणार असला तरी तिथे जोर कमी राहणार आहे.

महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यात मान्सून १६ जूनपासून आगमन करणार आहे. तसेच याच कालावधीत तो देशातील उत्तर भागात पोहोचणार आहे.

शुक्रवारचा पाऊस मान्सून नव्हे
शुक्रवारी राज्यात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस झाला. हा पाऊस म्हणजे वाळवाच्या पावसाला सुरुवात झाल्याचे म्हटले जात आहे. वळवाचा पाऊस मान्सून दाखल होण्यापूर्वी आलेला असतो. यामुळे मान्सूनसाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे.

सध्या कुठे आहे मान्सून

सध्या मान्सूनचे वारेही कमकुवत राहण्याचा अंदाज आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पोर्ट ब्लेअरपासून 425 किमी अंतरावर असलेल्या नानकोवरी बेटावर मान्सून अडकला आहे. त्यामुळे मान्सून चार ते पाच दिवसांच्या विलंबाने देशात पोहोचू शकतो. केरळमध्ये साधारणपणे १ जून रोजी मान्सून दाखल होतो, परंतु यंदा तो ५ जून दरम्यान दाखल होऊ शकतो.

 







मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.
[email-subscribers-form id=”2″]

Loading

Facebook Comments Box

बारावी परीक्षेचा निकाल जाहीर; कोकण विभाग अव्वल

पुणे : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये घेतलेल्या बारावी परीक्षेचा निकाल गुरुवारी (दि.२५) दुपारी दाेन वाजता ऑनलाइन जाहीर झाला आहे.
राज्यात कोकणच्या मुलानी बाजी मारली असून सर्वाधिक निकाल ९६.०१ टक्के तर सर्वात कमी निकाल मुंबई ८८.१३ टक्के एवढा आहे. मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९३.७३ टक्के असून मुलांचा निकाल ८९.१४ टक्के एवढा आहे.मुलांपेक्षा ४.५९ टक्के जास्त आहे.
 महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व काेकण या नऊ विभागीय मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये उच्च माध्यमिक प्रमाणपत्र ( १२ वी ) परीक्षा घेण्यात आल्या हाेत्या. राज्यातील ३ हजार १९५ परीक्षा केंद्रांवर सुमारे १४ लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली हाेती. www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालाबाबतची इतर सांख्यिकीय माहिती मिळणार आहे. तर कनिष्ठ महाविद्यालयांना www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर एकत्रित निकाल उपलब्ध करून देण्यात आला आहे.

Loading

Facebook Comments Box

बारावी परीक्षेचा निकाल उद्या दि. २५ मे रोजी जाहीर होणार; निकाल ‘या’ वेबसाईटसवर पाहता येईल

HSC Result 2023 | राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च – एप्रिल २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल उद्या दि.25 मे रोजी दुपारी 2 वाजता ऑनलाईन जाहीर होणार असल्याची घोषणा राज्य मंडळाच्या वतीने करण्यात आली आहे.पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय शिक्षण मंडळांमार्फत परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण मंडळाच्या संकेतस्थळांवर उद्या दुपारी 2 नंतर उपलब्ध होतील. ऑनलाईन निकालानंतर गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती, पुनर्मूल्यांकना ऑनलाईन अर्ज स्विकारण्यात येतील. याबाबतची सविस्तर माहिती राज्य मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
या वेबसाईटवर पाहता येणार निकाल
www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर निकालासोबतच निकालाची संख्यिकीय माहिती उपलब्ध होईल. तसेच www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.

Loading

Facebook Comments Box

गणेशोत्सवास कोकणात जाण्यासाठी विमान सेवेचा पर्याय उपलब्ध; तिकीटदरही आवाक्यात…

Ganesh Chaturthi 2023 | गणेश चतुर्थीला गावी जाणाऱ्या भाविकांसाठी रेल्वेचे आरक्षण मिळण्यासाठी खूप मोठी कसरत करावी लागत आहे. येथे दलालांचा सुळसुळाट असल्याने कसरत करूनही तिकीट मिळणे कठीण झाले आहे. शेवटी दुसरा कोणता पर्याय नसल्याने दुप्पट ते तिप्पट भावात याच दलालांकडून तिकीट खरेदी करून प्रवास करावा लागतो. पण एसी वगळता ईतर श्रेणीतुन प्रवास करताना आरक्षण असूनही मोठा त्रास सहन करावा लागतो. या डब्यांना जनरल डब्यांचे स्वरुप येते.
दुसरीकडे मुंबई गोवा महामार्ग अजूनपर्यंत अपूर्ण आहे. अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाचे काम केल्याने रस्त्यावर खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी अजूनही एकेरी मार्गाने वाहतुक सुरू आहे. या कारणांमुळे गणेश चतुर्थी उत्सवा दरम्यान या मार्गावर वाहतुकीच्या अनेक समस्या निर्माण होणार आहेत.
या सर्व गोष्टीचा सर्वात जास्त त्रास सहन करावा लागतो तो तळकोकणातील चाकरमान्यांना. कारण अशा स्थितीत 500 किलोमीटर प्रवास करणे म्हणजे एक दिव्यच म्हणावे लागेल. मात्र आता त्यांना एक प्रवासाचा सोयीचा पर्याय उपलब्ध झाला आहे. सिंधुदुर्ग आणि गोवा सीमेवर पेडणे MOPA येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ झाल्याने आता मुंबईवरून तळकोकणात काही तासांत पोहचणे शक्य झाले आहे. या विमानतळावरून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग, सावंतवाडी, वेंगुर्ला आणि कुडाळ तालुके जवळ आहेत, त्यामुळे या तालुक्यातील प्रवाशांसाठी गावी पोहोचण्यासाठी हा एक सोयीचा व जलद पर्याय होऊ शकतो. 
आमच्या प्रतिनिधीने https://www.ixigo.com/ या ऑनलाईन फ्लाईट बुकिंग करणाऱ्या वेब पोर्टल वर चेक केले असता मुंबई ते गोवा SpiceJet या विमानसेवा देणार्‍या कंपनीचा तिकीटदर किमान १८१८ रुपये एव्हढा दाखवत आहे. त्यात INSTANT  हा कुपन कोडे अप्लाय केल्यावर ३०० रुपये सूट मिळत आहे. मात्र सुविधा शुल्क पकडून एक तिकीट १८१७ रुपये एवढ्या वाजवी दराला मिळत आहे. 
टीप –  बातमीत दिलेले तिकीट दर दिनांक 24 मे रोजी चेक करण्यात आले आहेत . विमानसेवेच्या तिकिटांचे दर काही बाबींवर अवलंबून असून ते अस्थिर असतात याची कृपया नोंद घ्यावी






मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Loading

Facebook Comments Box

कोकण रेल्वे मार्गावरील ६ गाडयांना तात्पुरत्या स्वरूपात अतिरिक्त डबे

Konkan Railway News | उन्हाळी सुट्टीत कोकण रेल्वेमार्गे प्रवास करणाऱ्या प्रशांसाठी एक रेल्वेकडून महत्वाची बातमी आहे. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेतून रेल्वे प्रशासनाने या मार्गावर धावणाऱ्या काही गाडयांना तात्पुरत्या स्वरूपात अतिरिक्त डबे जोडण्याचा निर्णय घेतला आहे. या अतिरिक्त डब्यांमुळे प्रतीक्षा यादीतील प्रवाशांचा फायदा होणार आहे.

रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार खालील गाड्या अतिरिक्त डब्यांसहित समोर दिलेल्या तारखांना चालविण्यात येतील.

गाडी क्र./नाव अतिरिक्त डबे दिनांक
22908 Hapa - Madgaon Express01- Sleeper२४/०५/२३ बुधवार
22907 Madgaon Jn.  - Hapa Express01- Sleeper२६/०५/२०२३ शुक्रवार
20910 Porbandar - Kochuveli Express01- Sleeper२५/०५/२०२३ गुरुवार
20909 Kochuveli - Porbandar  Express01- Sleeper२८/०५/२०२३ रविवार
12431 Thiruvananthapuram Central - H. Nizamuddin “Rajdhani” Express01 - Three Tier AC२३/०५/२०२३ मंगळवार
12432 H. Nizamuddin - Thiruvananthapuram Central - “Rajdhani” Express01 - Three Tier AC२८/०५/२०२३ रविवार

Loading

Facebook Comments Box

OYO पर्यटन सर्व्हे; उन्हाळी पर्यटनासाठी समुद्रकिनाऱ्यांना व पर्वतीय प्रदेशांना पर्यटकांची पसंती

पर्यटन | उन्हाळी पर्यटनासाठी देशभरातील पर्यटकांनी पहिली पसंती गोवा आणि मनाली या ठिकाणांना दिल्याचे समोर आले आहे. OYO Summer Vacation index 2023 नुसार ही माहिती समोर आली आहे.

हॉटेलमध्ये वास्तव्यासाठी ऑनलाईन बुकिंग सेवा देणाऱ्या ओयो या कंपनीने केलेल्या सर्व्हेक्षणातून ही बाब समोर आली आहे.

OYO ने आपल्या अॅप द्वारे हे सर्व्हेक्षण केले आहे. या सर्वेक्षणात देशभरातील 15,000 लोकांना प्रश्न विचारण्यात आले. ओयोच्या सर्व्हेक्षणात सहभागी झालेल्यांपैकी एकूण 92 टक्के लोक देशातील विविध ठिकाणांना भेट देण्याचे नियोजन करत आहेत.

या सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की, लोकांचे प्राधान्य 1 ते 3 दिवसांच्या मुक्कामासह लहान सहलींना आहे. तसेच पर्यटन स्थळ कोणते आहे, हे देखील पर्यटकांसाठी खूप महत्वाचे असते.

या सर्व्हेक्षणात पर्यटकांनी पर्वतीय प्रदेशांना पर्यटनासाठी सर्वाधिक 30 टक्के पसंती दर्शवली आहे. तर त्या खालोखाल समुद्रकिनाऱ्यांना 26 टक्के मते मिळाली आहेत. ओयोने एका निवेदनाद्वारे ही माहिती दिली आहे.

ओयोने म्हटले आहे की, “भारताचे आवडते माउंटन डेस्टिनेशन मनाली आहे, त्यानंतर काश्मीर, मॅक्लॉड गंज, उटी आणि कूर्ग आहेत. तर समुद्रकिनाऱ्यांसाठी गोवा हा भारतीयांसाठी पसंतीचा मुख्य पर्याय आहे. एकूण 50 टक्के लोक गोव्यात प्रवास करू इच्छितात.

7 मे ते 14 मे 2023 या काळात हे संशोधन झाले आहे. त्यात म्हटले आहे की, “गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत गोव्यातील हॉटेल्सच्या मागणीत 20 टक्केपेक्षा जास्त वाढ झाली आहे. त्यानंतर अंदमान निकोबार, केरळ, पाँडेचेरी आणि गोकर्णचा समावेश आहे.”

Loading

Facebook Comments Box

ओसरगाव येथील टोलनाका बांदा किंवा खारेपाटण येथे हलविण्यात यावा – सिंधुदुर्ग टोलमुक्ती समिती

सिंधुदुर्ग – येत्या ०१ जूनला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओसरगाव येथील टोल नाका सुरू होणार आहे. या टोल नाक्याला स्थानिकांकडून विरोध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.सिंधुदुर्ग टोलमुक्ती समितीने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

जर ओसरगाव येथे टोल वसुली करणार असाल तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात नोंदणी केलेल्या MH07 वाहनांना टोलमुक्ती मिळावी अशी सिंधुदुर्ग टोलमुक्ती समितीची भूमिका आहे. मात्र जर हा टोल नाका खारेपाटण किंवा बांदा या ठिकाणी शिफ्ट केल्यास आपला त्याला कोणताही विरोध नसेल अथवा टोल मुक्तीची मागणी नसेल असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

१ जूनला ओसरगाव टोल नाका सुरू झाल्यास टोलमुक्ती समितीतर्फे लाक्षणीय आंदोलन छेडले जाईल. असा इशारा टोलमुक्ती कृती सिमतीचेअध्यक्ष द्वारकानाथ घुर्ये आणि पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे. टोलमुक्ती कृती सिमती तर्फे कणकवली येथे संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली होती.

Loading

Facebook Comments Box

मुंबई – गोवा वंदे भारत एक्सप्रेस | संभाव्य वेळापत्रक, तिकीट दर आणि थांबे

Vande Bharat Express : चार दिवसांपूर्वी मुंबई-गोवा-मुंबई रेल्वे मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस रेल्वेची यशस्वी चाचणी झाल्यानंतर ही रेल्वे नियमितपणे कधी सुरू होणार याबद्दल लोकांना कुतूहल होते. आता ही रेल्वे जून पासून नियमितपणे सुरू होणार असल्याची माहिती रेल्वेकडून मिळाली. या रेल्वेचा शुभारंभ मडगावहून होईल व पंतप्रधान नरेंद्र मोदी रेल्वेला हिरवा झेंडा दाखवतील, अशीही माहिती मिळाली आहे.

संभाव्य वेळापत्रक 
या गाडीचे वेळापत्रक जाहीर झाले नसले तरी ही गाडी तेजस आणि जनशताब्दी एक्सप्रेसच्या वेळापत्रकाच्या आसपास चालवली जाण्याची शक्यता आहे. संभाव्य वेळापत्रकानुसार ही गाडी सीएसएमटी स्थानकावरून ५.३० सुटून मडगाव या स्थानकावर दुपारी १२:३० वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात ती मडगाव स्थानकावरून दुपारी १:३० वाजता सुटेल ती मडगाव स्थानकावर रात्री ८:३० वाजता पोहोचेल. 
गाडीचे थांबे
या गाडीला कोणते थांबे असतील याबाबत माहिती उपलब्ध नसली तरी रत्नागिरी जिल्ह्यात २ तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात १ थांबा या गाडीला मिळण्याचे संकेत आहेत. ठाणे या स्थानकावर या गाडीला थांबा असेल. पनवेल या स्थानकाचे महत्व पाहता या गाडीला येथेही थांबा मिळण्याची शक्यता आहे. मात्र रेल्वे प्रशासनकडून थांब्याबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही आहे. 
तिकीटदर 
वंदे भारत एक्सप्रेस एसी चेअर क्लास आणि एक्झिक्युटिव्ह चेअर क्लास या दोन श्रेणीसह चालविण्यात येणार आहे. दोन्ही मिळून एकूण १६ डबे असणार आहेत,त्यात एकूण ११२८ प्रवासी प्रवास करू शकणार आहेत.  चेअर क्लास या श्रेणीचे मुंबई ते मडगाव तिकीट भाडे सुमारे १५८० असेल तर एक्झिक्युटिव्ह चेअर क्लासचा तिकीटदर अंदाजे २८७० रुपये एवढा असेल.






मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Loading

Facebook Comments Box

सावधान | आंबोलीत ‘तो’ टस्कर परत येत आहे….

सिंधुदुर्ग : आंबोलीच्या नागिरकांमध्ये चिंता निर्माण होईल अशी एक बातमी आहे. आंबोली परिसरात गेली काही वर्षे ये-जा करणार्‍या महाकाय टस्करने आपला मोर्चा पुन्हा आंबोलीकडे वळवला आहे. शुकवारी तो आजरा येथे दिसला होता . येत्या 2 ते 4 दिवसांत हा टस्कर आंबोली परिसरात दाखल होण्याची शक्यता आहे. 
हा टस्कर अचानक रस्त्यावर येत असल्याने काही वेळा येथील वाहन चालकांची भंबेरी उडाली आहे. या टस्कर ने आंबोलीतील लोकवस्तीत शिरून तेथे हैदोस मांडला होता. दिवसा जंगलात राहून तो रात्री लोकवस्तीत धुडगूस घालतो. त्यामुळे त्याच्या येण्याने आंबोलीच्या जनतेमध्ये चिंतेचे वातावरण आहे. कारवाईच्या नावाखाली सिंधुदुर्ग वन विभागाचे कर्मचारी त्याला कोल्हापूर जिल्हा हद्दीत हुसकावून लावत आहेत. पण तिथे कोल्हापूर वन विभागाचे कर्मचारी त्याला पुन्हा आंबोली हद्दीत हुसकावतात यामुळे हा टस्कर गेली काही वर्षे सतत आंबोलीसह आजरा परिसरात ये-जा करत असतो.






मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Loading

Facebook Comments Box

अवघ्या एका मिनिटात सर्व गाड्यांच्या सर्व श्रेणींचेआरक्षण फुल्ल कसे? दाल मे जरूर कुछ काला; प्रवाशांचा आरोप…

संग्रहित छायाचित्र
Konkan Railway News | सकाळी ८ वाजता आरक्षण चालू होते आणि ८ वाजून १ मिनिटाला सर्व गाड्यांच्या सर्व श्रेणीची आरक्षण स्थिती ‘रिग्रेट’ दाखवते. असा प्रकार मागील २/३ दिवसांपासून गणेश चतुर्थीला गावी जाण्यासाठी आरक्षण करण्याचा अयशस्वी प्रयत्न करणाऱ्या चाकरमान्यांनी अनुभवला आहे. एका मिनिटात सर्वच गाड्यांतील सर्वच वर्गाचे आरक्षण स्थिती ‘रिग्रेट’ कशी काय होऊ शकते असा प्रश्न प्रवाशांकडून उपस्थित केला जात असून दलाल आणि काही रेल्वे अधिकारी मिळून काळा बाजार करीत असा संशय मूळ धरत आहे. याबाबत रेल्वे प्रशासनाने चौकशी करून कारवाई करावी अशीही मागणी होत आहे. 
याआधी याविषयी अनेकदा तक्रारी करूनसुद्धा कोकण रेल्वेने याबाबत काही चौकशी केली नाही असा आरोप येथील प्रवाशांद्वारे केला जात आहे. कोंकण रेल्वेमार्गावर मोठ्या प्रमाणात प्रवासी प्रवास करतात. प्रवासी संख्या जास्त आणि गाड्या कमी यामुळे येथे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या दलालांचा सुळसुळाट वाढला आहे. हंगामात ३०० ते ४०० रुपये असलेले तिकीट १००० ते १५०० रुपयांपर्यंत विकून हे दलाल प्रवाशांच्या मजबुरीचा फायदा घेतात. प्रवाशांकडे दुसरा पर्याय नसल्याने हे महागडे तिकीट खरेदी करून प्रवास करावा लागतो.
तिकिटे मिळवण्यासाठी  हे  दलाल गैरमार्गाचा वापर सुद्धा करत आहेत. कधी रेल्वे कर्मचाऱ्यांना हाताशी धरून किंवा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सर्वर हॅक करण्याचा प्रकार पण ते अवलंबत असल्याचा दाट संशय व्यक्त केला जात आहे. 
या दलालांमुळे सामान्य प्रवाशांना चांगलाच फटका बसत आहे. त्यामुळे या दलालांना आवर घालण्यासाठी त्यांच्यावर कारवाईची मागणी केली जात आहे. 

Loading

Facebook Comments Box

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search