Konkan Railway: कोकण रेल्वेचे दुहेरीकरण कधी? रेल्वे मंत्र्याकडून मोठी माहिती समोर

   Follow us on        

नवी दिल्ली: कोकण रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प लवकरच मार्गी लागणार असून, यामुळे कोकणातील प्रवासी वाहतूक आणि मालवाहतुकीला मोठा दिलासा मिळणार आहे. कोकण रेल्वे मार्गावरील प्रवासी व मालवाहतुकीची वाढती मागणी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार केला असून, या प्रस्तावाला केंद्र सरकारकडून तत्त्वतः सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याची माहिती केंदीय रेल्वे मंत्र्यानी दिली आहे.

रुळ अपग्रेड, बोगदे बंद, क्षमतेत वाढ

दुहेरीकरणाच्या या प्रस्तावांतर्गत कोकण रेल्वे मार्गावरील रुळांचे अपग्रेडेशन करण्यात येणार आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या काही जुन्या बोगद्यांना बंद करून आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने नवीन बोगदे उभारण्याचा विचार आहे. यामुळे रेल्वे वाहतुकीचा वेग वाढणार असून, सुरक्षिततेतही लक्षणीय सुधारणा होणार आहे.

दुहेरीकरण पूर्ण झाल्यानंतर कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढवता येणार आहे. सध्या एकेरी मार्गामुळे अनेक गाड्यांना क्रॉसिंगसाठी थांबावे लागते, मात्र दुहेरी मार्गामुळे ही अडचण दूर होणार आहे.

प्रवासी आणि मालवाहतुकीला फायदा

या प्रकल्पामुळे प्रवासी गाड्यांसह मालवाहतुकीची क्षमता वाढणार आहे. विशेषतः कोकणातील आंबा, काजू, मासे तसेच औद्योगिक मालाची वाहतूक अधिक जलद आणि सुलभ होणार आहे. परिणामी, कोकणातील व्यापार, पर्यटन आणि आर्थिक विकासाला चालना मिळेल, असा विश्वास तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

 

Facebook Comments Box

जिल्हा परिषद निवडणुकीत सावंतवाडी टर्मिनसचा ‘पाणी’ मुद्दा निर्णायक

   Follow us on        

सावंतवाडी : रेल्वे प्रकल्प हा जरी केंद्र सरकारच्या अखत्यारित येत असला, तरी सावंतवाडी रेल्वे टर्मिनस पूर्ण क्षमतेने सुरू होण्यासाठी आवश्यक असलेली पाणीपुरवठा योजना ही पूर्णतः जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या कार्यक्षेत्रात येते. त्यामुळेच हा विषय केवळ प्रशासकीय न राहता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांशी थेट जोडला गेला आहे.

तिलारी धरणातून रेल्वे टर्मिनससाठी पाणीपुरवठा करण्याची योजना सावंतवाडी पंचायत समितीने तयार केली असून, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने ती मंजुरीसाठी पुढे पाठवली आहे. या योजनेची अंमलबजावणी, पाठपुरावा, निधी मिळवणे आणि काम वेळेत पूर्ण करणे ही जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थांवरच आहे. त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती किती सक्षमपणे हा विषय हाताळतात, यावरच टर्मिनस प्रत्यक्षात सुरू होणार की नाही, हे ठरणार आहे.

याच कारणामुळे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये हा मुद्दा ऐरणीवर आला आहे. नागरिक आता केवळ आश्वासनांवर समाधानी न राहता, या पाणीपुरवठा योजनेला निधी मिळवून देण्यासाठी कोणता लोकप्रतिनिधी ठोस पाठपुरावा करतो, याकडे लक्ष ठेवून आहेत.

विशेष म्हणजे, या योजनेचा लाभ केवळ सावंतवाडी रेल्वे टर्मिनसपुरता मर्यादित नसून मळगाव, कुंभार्ली आणि ब्राह्मणपाट या गावांतील नागरिकांनाही शुद्ध पिण्याचे पाणी मिळणार आहे. त्यामुळे हा प्रश्न विकास, सुविधा आणि लोकजीवनाशी थेट निगडित असल्याने तो स्थानिक निवडणुकांतील प्रमुख मुद्दा ठरला आहे.

या संदर्भात कोकण रेल्वे प्रवासी समितीचे पदाधिकारी सागर तळवडेकर यांनी माहिती देताना सांगितले की, रेल्वे प्रकल्प केंद्र सरकारच्या अखत्यारित असला तरी सावंतवाडी रेल्वे टर्मिनससाठी आवश्यक असलेली पाणीपुरवठा योजना ही जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या कार्यक्षेत्रातील आहे. त्यामुळे या योजनेचा पाठपुरावा करणे, निधी मिळवून देणे आणि अंमलबजावणी सुनिश्चित करणे ही जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थांचीच आहे.

तळवडेकर पुढे म्हणाले की, याच कारणामुळे हा मुद्दा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांशी थेट जोडला गेला असून, येणाऱ्या निवडणुकांमध्ये नागरिकांनी या विषयावर ठोस भूमिका घेणाऱ्या उमेदवारांकडे लक्ष द्यावे. पाणीपुरवठ्याचा प्रश्न सुटल्याशिवाय टर्मिनस पूर्ण क्षमतेने सुरू होणे शक्य नसून, हा प्रश्न केवळ रेल्वेपुरता न राहता संपूर्ण परिसराच्या विकासाशी संबंधित आहे.

Facebook Comments Box

पुढील ५ ते १० वर्षात महाराष्ट्रात ५,७०० किमीच्या २२ एक्स्प्रेसवेचे महाजाळे; जाणून घ्या सर्व प्रकल्पांची सद्यस्थिती

]block id=”google-news”]

मुंबई: महाराष्ट्र राज्य सध्या पायाभूत सुविधांच्या बाबतीत देशाचे ‘इंजिन’ म्हणून उदयास येत आहे. रस्ते विकास महामंडळ (MSRDC) आणि केंद्र सरकारच्या मदतीने राज्यात एकूण ५,७५९.५ किलोमीटर लांबीच्या २२ एक्स्प्रेसवेचे काम विविध टप्प्यांवर सुरू आहे. ‘इन्फ्रा न्यूज इंडिया’ने प्रसिद्ध केलेल्या ताज्या अहवालानुसार, या प्रकल्पांमुळे महाराष्ट्रातील दळणवळण केवळ वेगवान होणार नाही, तर राज्याच्या अर्थव्यवस्थेलाही मोठी गती मिळणार आहे.

समृद्धीनंतर आता ‘शक्तीपीठ’ आणि ‘उत्तर महाराष्ट्र’ एक्स्प्रेसवेचा बोलबाला
मुंबई-पुणे आणि समृद्धी महामार्गाच्या यशानंतर आता राज्य सरकारचे लक्ष मोठ्या प्रकल्पांकडे आहे.

शक्तीपीठ एक्स्प्रेसवे (८५६ किमी): नागपूर ते गोवा (पावनार ते पात्रादेवी) दरम्यानचा हा महामार्ग राज्यातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग ठरणार आहे. याचा सुधारित डीपीआर (DPR) तयार असून अंतिम मंजुरीची प्रतीक्षा आहे.

उत्तर महाराष्ट्र एक्स्प्रेसवे (६४५ किमी): नाशिक-जळगाव-नागपूर हा मार्ग उत्तर महाराष्ट्राला थेट विदर्भाशी जोडेल.

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राचा कायापालट

कोकणच्या पर्यटन आणि आर्थिक विकासासाठी बलवली-पात्रादेवी कोकण एक्स्प्रेसवे (३८९ किमी) हा गेमचेंजर ठरेल. याशिवाय, पुण्यातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पुणे आउटर रिंग रोड (१७३ किमी) चे काम वेगाने सुरू करण्यात आले आहे.

हे एक्स्प्रेसवे केवळ प्रवासाचा वेळ वाचवणार नाहीत, तर त्यांच्या बाजूने ‘इंडस्ट्रियल क्लस्टर्स’ विकसित केले जाणार आहेत. शेतमालाची वाहतूक जलद झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठी बाजारपेठ उपलब्ध होईल. विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यातील मागास जिल्ह्यांना या महाजाळ्याचा मोठा फायदा होणार आहे.

या २२ प्रकल्पांपैकी बहुतांश प्रकल्पांची जबाबदारी MSRDC (महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ) कडे आहे. तर NHAI (भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण) दिल्ली-मुंबई आणि पुणे-बेंगळुरू सारखे राष्ट्रीय स्तरावरील प्रकल्प सांभाळत आहे. नागपूर शहरासाठी NMRDA द्वारे आउटर रिंग रोडचे नियोजन पूर्ण झाले आहे.

येणाऱ्या ५ ते १० वर्षांत जेव्हा हे २२ मार्ग पूर्ण क्षमतेने सुरू होतील, तेव्हा महाराष्ट्र हे रस्ते कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत जगातील सर्वोत्तम राज्यांच्या पंक्तीत जाऊन बसेल. यामुळे रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील आणि राज्याचे ‘ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी’चे स्वप्न पूर्ण होण्यास मदत होईल.

महाराष्ट्रातील द्रुतगती मार्गांची संपूर्ण यादी आणि सद्यस्थिती

महामार्गाचे नाव लांबी (Km) लेन (Lanes) सद्यस्थिती (Status)
मुंबई-पुणे एक्सप्रेसवे 94.5 6 कार्यरत (Operational)
नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग 701 6 कार्यरत (Operational)
जालना-नांदेड एक्सप्रेसवे 179 6
बांधकाम सुरू (Under construction)
दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवे (महा. टप्पा) 170 8
बांधकाम सुरू (Under construction)
पुणे आउटर रिंग रोड 173 6
बांधकाम सुरू (Under construction)
नागपूर-गोवा (शक्तीपीठ) एक्सप्रेसवे 856 6 अंतिम मंजुरी प्रलंबित
बलावली-पत्रादेवी कोकण एक्सप्रेसवे 389 6 अंतिम मंजुरी प्रलंबित
पुणे-शिरूर-संभाजीनगर एक्सप्रेसवे 220 6 निविदा प्रक्रिया/DPR सुधारणा
पुणे-बेंगळुरू एक्सप्रेसवे (महा. टप्पा) 204 6
केंद्र सरकारच्या मंजुरीची प्रतीक्षा
विरार-अलिबाग मल्टि मॉडेल कॉरिडॉर 126 8
फेर-निविदा प्रक्रिया (Retendered)
नागपूर-भंडारा-गोंदिया एक्सप्रेसवे 141 4/6 कंत्राट लवकरच दिले जाईल
नागपूर-चंद्रपूर एक्सप्रेसवे 204 4 कंत्राट लवकरच दिले जाईल
भंडारा-गडचिरोली एक्सप्रेसवे 116 4 कंत्राट लवकरच दिले जाईल
पुणे-नाशिक एक्सप्रेसवे 210 6 भूसंपादन अधिसूचना जारी
सुरत-नाशिक-चेन्नई कॉरिडॉर 400 6
फेर-निविदा प्रक्रिया (BOT मॉडेल)
पागोठे-चौक एक्सप्रेसवे 29 6
निविदा प्रक्रिया सुरू (Under bidding)
समृद्धी-वाढवण बंदर कनेक्टर 104 6 मंजूर (भूसंपादन लवकरच)
शेगाव कनेक्टर (समृद्धी महामार्ग) 109 4 मंजूर
नाशिक-जळगाव-नागपूर एक्सप्रेसवे 645 6 प्रस्तावित
जळगाव-नंदुरबार एक्सप्रेसवे 150 4 प्रस्तावित
कल्याण-लातूर एक्सप्रेसवे 445 6
DPR तयार करण्याचे काम सुरू
नागपूर आउटर रिंग रोड 148 6 मंजूर
Facebook Comments Box

कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्गाला अखेर ‘ग्रीन सिग्नल’! २०२७ मध्ये कामाला होणार सुरुवात

   Follow us on        

कोल्हापूर: पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण रेल्वेला जोडण्याचे अनेक वर्षांचे स्वप्न अखेर सत्यात उतरणार आहे. गेल्या नऊ वर्षांपासून रखडलेल्या कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्गाच्या प्रत्यक्ष कामाला पुढील वर्षी म्हणजेच २०२७ साली प्रारंभ होणार आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी रेल्वेच्या ३० हजार कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली असून, त्यापैकी ३,४११ कोटी रुपये या महत्त्वाकांक्षी मार्गासाठी केंद्राचा हिस्सा म्हणून दिले जाणार आहेत. राज्य शासन देखील आपला वाटा तातडीने देणार असून लवकरच भूसंपादनाच्या प्रक्रियेला गती मिळणार आहे.

कोल्हापूरला कोकण रेल्वेने जोडावे ही मागणी गेल्या ४० वर्षांपासून प्रलंबित होती. २०१६ च्या रेल्वे अर्थसंकल्पात तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी या मार्गाला मंजुरी देऊन निधीची तरतूद केली होती. त्यानंतरच्या १० वर्षांत सर्वेक्षण, डीपीआर (DPR) आणि केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी अशा विविध तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या. आता केंद्राने रेल्वेसाठी एकूण २ लाख ५५ हजार ४४५ कोटी रुपयांची मोठी तरतूद केल्याने या मार्गाचा मार्ग मोकळा झाला असून, यामुळे पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण यांच्यातील कनेक्टिव्हिटी आणि व्यापाराला मोठी चालना मिळणार आहे.

कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्गाचा प्रकल्प हा केवळ एक रेल्वे मार्ग नसून पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण या दोन समृद्ध क्षेत्रांना जोडणारा एक महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. गेल्या ४० वर्षांपासून या मार्गाची मागणी प्रलंबित होती, कारण तांत्रिक आणि भौगोलिक आव्हानांमुळे हा प्रकल्प रखडला होता. या मार्गामुळे कोल्हापूर आणि वैभववाडी दरम्यान थेट कनेक्टिव्हिटी निर्माण होणार असून, यामुळे या दोन्ही विभागांतील प्रवास सुखकर आणि जलद होईल.

या कनेक्टिव्हिटीचा सर्वात मोठा फायदा व्यापार आणि पर्यटनाला मिळणार आहे. कोल्हापूरची बाजारपेठ आणि कोकणातील बंदरं यांच्यातील दळणवळण सोपे झाल्यामुळे औद्योगिक मालाची ने-आण वाढेल, ज्याचा थेट सकारात्मक परिणाम स्थानिक अर्थव्यवस्थेवर होईल. त्याचबरोबर, पश्चिम महाराष्ट्रातील पर्यटकांना कोकणात जाण्यासाठी आणि कोकणातील भाविकांना कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी कमी वेळात प्रवास करणे शक्य होईल, ज्यामुळे पर्यटन क्षेत्राला मोठी चालना मिळून रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील.

Facebook Comments Box

Konkan  Railway: सीएसएमटी स्थानकावर ८५ दिवसांचा ‘ब्लॉक’; विदर्भ, मराठवाडा आणि कोकणात जाणार्‍या गाड्यांवर परिणाम

   Follow us on        

मुंबई, दि. (प्रतिनिधी) — छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथे सुरू असलेल्या पायाभूत सुविधा विकासकामांमुळे प्लॅटफॉर्म क्रमांक १६ आणि १७ हे १ फेब्रुवारीपासून पुढील ८५ दिवसांसाठी बंद ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे २६ एप्रिलपर्यंत या दोन्ही प्लॅटफॉर्मवरून होणारी वाहतूक बंद राहणार आहे.

या कालावधीत कोकणवासियांची पसंती असलेली मडगाव–सीएसएमटी ‘तेजस एक्सप्रेस’ ही सीएसएमटीऐवजी दादर स्थानकावरच टर्मिनेट होईल. तसेच मंगळुरु–सीएसएमटी एक्सप्रेसचा प्रवास आता ठाणे स्थानकावरच संपणार आहे.

सीएसएमटी स्थानकाचा सुमारे २,४५० कोटी रुपये खर्चून जागतिक दर्जाचा पुनर्विकास करण्यात येत असून, या कामाची जबाबदारी अहलूवालिया कॉन्ट्रॅक्ट्स लिमिटेडकडे देण्यात आली आहे. या प्रकल्पात नवीन इमारतींचे बांधकाम, प्रवाशांसाठी अद्ययावत सुविधा, पार्सल सेवा तसेच हेरिटेज इमारतीचे जतन यांचा समावेश आहे. काम पूर्ण झाल्यानंतर प्रवाशांची गर्दी विभागली जाऊन प्रवास अधिक सुकर होईल, असा दावा रेल्वे प्रशासनाने केला आहे.

दरम्यान, विदर्भ, मराठवाडा आणि कोकणातून येणाऱ्या काही गाड्यांच्या वेळापत्रकात आणि टर्मिनसमध्ये बदल करण्यात आले आहेत. अमरावती–सीएसएमटी एक्सप्रेस, बल्लारशाह–सीएसएमटी नंदीग्राम एक्सप्रेस, हावडा मेल, भुवनेश्वर कोणार्क एक्सप्रेस, बिदर एक्सप्रेस आणि लातूर एक्सप्रेस या गाड्या आता सीएसएमटीऐवजी दादर स्थानकापर्यंतच धावतील.

खालील गाड्या त्यांच्या निर्धारित स्थानकापर्यंत (CSMT) न जाता दादर स्थानकावरच थांबतील:

​१२११२ अमरावती-CSMT एक्सप्रेस

​११००२ बल्लारशाह-CSMT नंदीग्राम एक्सप्रेस

​१२८१० हावडा-CSMT एक्सप्रेस

​११०२० भुवनेश्वर-CSMT कोणार्क एक्सप्रेस

​२२१४४ बिदर-CSMT एक्सप्रेस / २२१०८ लातूर-CSMT एक्सप्रेस

​२२१२० मडगाव-CSMT तेजस एक्सप्रेस

​ठाणे स्थानकावर थांबणारी गाडी (Short Terminated at Thane)

​१२१३४ मंगळुरू-CSMT एक्सप्रेस ही गाडी आता फक्त ठाणे स्थानकापर्यंतच धावेल.

Facebook Comments Box

कसबा पंचायत समिती गणात संदेश जिमन यांच्या प्रचाराचा झंझावात; बदलाचे वारे वेगाने वाहू लागले

   Follow us on        

रुपेश मनोहर कदम / सायले: कसबा पंचायत समिती गणामध्ये निवडणूक रणधुमाळीला वेग आला असून, अपक्ष उमेदवार संदेश सुरेश जिमन यांच्या प्रचाराने संपूर्ण गणात चांगलीच चर्चा निर्माण केली आहे. तुल्यबळ उमेदवार एकमेकांसमोर उभे ठाकले असताना, काही उमेदवारांना पक्षीय दिग्गजांचा पाठिंबा आहे, तर काही उमेदवार आपल्या सामाजिक कार्याच्या जोरावर राजकीय प्रवास घडवू पाहत आहेत. अशा परिस्थितीत संदेश सुरेश जिमन यांनी अपक्ष म्हणून मैदानात उतरून जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे.

सध्या सुरू असलेल्या प्रचारात संदेश जिमन यांनी आघाडी घेतली असून, त्यांचे नेतृत्व जनतेच्या पसंतीस उतरत असल्याचे चित्र दिसून येत आहे. वाड्या-वस्त्यांवर जाऊन थेट जनतेशी संवाद साधत, त्यांनी आजवर केलेली जनसेवा आणि पुढील काळात समाजकार्य अधिक प्रभावीपणे करण्याची आपली निर्भीड भूमिका स्पष्ट केली आहे. कमी वयात समाजासाठी केलेल्या कामांमुळे त्यांना जनसामान्यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे.

रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी सातत्याने पाठपुरावा करत लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्यांना संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकात थांबा मिळावा यासाठी केलेले प्रयत्न, दुर्गम भागातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप, शिवरायांच्या चरित्र ग्रंथांचे तसेच गोष्टींच्या पुस्तकांच्या संचांचे वितरण, ही त्यांची उल्लेखनीय सामाजिक कामगिरी ठरली आहे. याशिवाय, पाणीटंचाईग्रस्त गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा, तसेच गरीब व गरजू नागरिकांना वैद्यकीय मदत देण्याचे कार्यही त्यांनी केले आहे.

विकास आणि रोजगारनिर्मिती, पाणी प्रश्नावर ठोस उपाययोजना, या गणातील शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह नागरिकांसाठी गरजेनुसार एसटी बससेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न, तसेच कसबा हे ऐतिहासिक क्षेत्र पर्यटनाचे आकर्षक केंद्र बनवण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन संदेश जिमन यांनी दिले आहे.

कसबा पंचायत समिती गणातील या चुरशीच्या लढतीत संदेश सुरेश जिमन यांची सरशी होताना दिसत असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगत आहे. ही वाढती लोकप्रियता इतर उमेदवारांसाठी डोकेदुखी ठरणार की काय, याची उत्सुकता आता निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.

Facebook Comments Box

प्रवाशांना दिलासा! लोकमान्य टिळक टर्मिनसवरील ‘ब्लॉक’ संपला; गाड्यांचे वेळापत्रक पूर्वपदावर

मुंबई: मध्य रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) येथे १ जानेवारी २०२६ पासून घेतलेला पायाभूत सुविधांच्या कामाचा ‘ब्लॉक’ आता नियोजित वेळेनुसार यशस्वीरित्या पूर्ण झाला आहे. ३० जानेवारी २०२६ रोजी हा ब्लॉक संपल्यामुळे, या काळात विस्कळीत झालेली रेल्वे सेवा आता पुन्हा एकदा पूर्वपदावर येत आहे.

या बदलामुळे कोकण रेल्वे आणि दक्षिण भारताकडे जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला असून, खालील गाड्या आता त्यांच्या मूळ वेळापत्रकानुसार आणि मूळ स्थानकापर्यंत धावतील:

१. आजपासून खालील गाड्या पुन्हा त्यांच्या मूळ गंतव्य स्थानकापर्यंत (LTT) धावतील: (३१ जानेवारी २०२६ पासून):

आजपासून खालील गाड्या पुन्हा त्यांच्या मूळ गंतव्य स्थानकापर्यंत (LTT) धावतील

गाडी क्र. १६३४६: तिरुअनंतपुरम सेंट्रल – लोकमान्य टिळक टर्मिनस (नेत्रावती एक्सप्रेस)

गाडी क्र. १२६२०: मंगळुरु सेंट्रल – लोकमान्य टिळक टर्मिनस (मत्स्यगंधा सुपरफास्ट एक्सप्रेस)

२. एल.टी.टी. वरून सुटणाऱ्या गाड्या:

३१ जानेवारी २०२६ पासून: गाडी क्र. १२६१९ (लोकमान्य टिळक टर्मिनस – मंगळुरु सेंट्रल मत्स्यगंधा सुपरफास्ट एक्सप्रेस) आता मूळ वेळापत्रकानुसार एल.टी.टी. वरून सुटेल.

१ फेब्रुवारी २०२६ पासून: गाडी क्र. १६३४५ (लोकमान्य टिळक टर्मिनस – तिरुअनंतपुरम सेंट्रल नेत्रावती एक्सप्रेस) आपल्या नियमित वेळेनुसार एल.टी.टी. वरून मार्गस्थ होईल.

महिनाभर चाललेल्या या ब्लॉकचा फटका केवळ मुंबईकरांनाच नाही, तर कोकण आणि दक्षिण भारतात जाणाऱ्या हजारो प्रवाशांना बसला होता.

Facebook Comments Box

मुंबई-पुणे अंतर येणार ४० मिनिटांवर! केंदीय अर्थसंकल्पात ७ नवीन बुलेट ट्रेन कॉरिडॉरची घोषणा

   Follow us on        

नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज २०२६ चा अर्थसंकल्प सादर करताना रेल्वे क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत. देशातील रेल्वे पायाभूत सुविधांना आधुनिक रूप देण्यासाठी सरकारने सात नवीन हाय-स्पीड रेल (बुलेट ट्रेन) कॉरिडॉर विकसित करण्याचा प्रस्ताव मांडला आहे.

​या नवीन प्रकल्पांमुळे प्रमुख शहरे आणि आर्थिक केंद्रांमधील प्रवासाचा वेळ कमालीचा कमी होणार असून प्रादेशिक विकासाला गती मिळणार आहे.

​हे आहेत ७ नवीन हाय-स्पीड मार्ग:

​अर्थमंत्र्यांनी जाहीर केल्यानुसार, खालील मार्गांवर हाय-स्पीड ट्रेन धावतील:

१. मुंबई ते पुणे (दैनंदिन प्रवाशांसाठी मोठा दिलासा)

२. पुणे ते हैदराबाद

३. हैदराबाद ते बेंगळुरू

४. हैदराबाद ते चेन्नई

५. चेन्नई ते बेंगळुरू

६. दिल्ली ते वाराणसी

७. वाराणसी ते सिलिगुडी

​मालवाहतुकीसाठी नवीन कॉरिडॉर

​केवळ प्रवासी वाहतूकच नाही, तर मालवाहतुकीला गती देण्यासाठी पश्चिमेकडील सुरत (गुजरात) ते पूर्वेकडील दानकुनी (पश्चिम बंगाल) दरम्यान एक नवीन डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर (DFC) स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे मालाची ने-आण जलद आणि स्वस्त होईल.

मुंबई पुणे अंतर ४० मिनिटांवर

मुंबई आणि पुणे या दोन प्रमुख शहरांदरम्यान प्रस्तावित असलेला हाय-स्पीड रेल (बुलेट ट्रेन) कॉरिडॉर दळणवळणाच्या क्षेत्रात एक मोठी क्रांती घडवून आणणारा ठरेल. सध्या या प्रवासासाठी रस्ते किंवा रेल्वे मार्गाने ३ ते ४ तास लागतात; मात्र बुलेट ट्रेनमुळे हे अंतर अवघ्या ४० ते ६० मिनिटांत पार करणे शक्य होईल. ताशी २५० ते ३०० किमी वेगाने धावणारी ही ट्रेन प्रामुख्याने उड्डाणपूल आणि बोगद्यांमधून जाणार असून, यामुळे प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या वाचणार आहे.

​हा प्रकल्प केवळ वेळेची बचत करणारा नसून, तो दोन्ही शहरांतील दैनंदिन प्रवाशांसाठी आणि अर्थव्यवस्थेसाठी वरदान ठरेल. जलद कनेक्टिव्हिटीमुळे मुंबईत राहून पुण्यात नोकरी करणे किंवा उलट, ही बाब सहज शक्य होईल. यामुळे मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवरील वाहतूक कोंडी कमी होईलच, पण त्यासोबतच या मार्गावरील ग्रामीण आणि उपनगरीय भागांत रिअल इस्टेट व व्यावसायिक संकुलांचा विकास होऊन रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील.

​पर्यावरण आणि तांत्रिकदृष्ट्याही हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा आहे. खाजगी वाहनांचा वापर कमी झाल्यामुळे इंधनाची बचत होऊन कार्बन उत्सर्जन घटण्यास मोठी मदत होईल. ‘महारेल’ आणि केंद्र सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने साकारला जाणारा हा प्रकल्प दोन्ही शहरांमधील व्यापारी संबंध अधिक दृढ करून महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाला एक नवी गती प्रदान करेल.

​अर्थसंकल्पातील इतर महत्त्वाचे मुद्दे:

​जलमार्ग विकास: पुढील पाच वर्षांत २० नवीन राष्ट्रीय जलमार्ग कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट.

​रोजगार निर्मिती: या मोठ्या रेल्वे प्रकल्पांमुळे बांधकाम, मॅन्युफॅक्चरिंग आणि लॉजिस्टिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.

पर्यावरणपूरक प्रवास: कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी सार्वजनिक वाहतूक आणि जलमार्गांवर भर दिला जाणार आहे.

​सध्या मुंबई-अहमदाबाद या पहिल्या बुलेट ट्रेनचे काम वेगाने सुरू असतानाच, या नवीन घोषणांमुळे भारताच्या रेल्वे प्रवासाचा चेहरामोहरा बदलणार असल्याचे चित्र दिसत आहे.

Facebook Comments Box

Badlapur Train Accident: लोकल गाड्यांच्या ‘लेटमार्क’ चा अजून एक बळी

   Follow us on        

बदलापूर: मध्य रेल्वेच्या बदलापूर स्थानकात धावती ट्रेन पकडण्याच्या प्रयत्नात आज एका महिलेला आपला जीव गमवावा लागल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या अपघाताचे अंगावर काटा आणणारे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून, यामध्ये गाडी फलाटावरून सुटत असताना ती पकडताना महिलेचा तोल गेल्याचे स्पष्ट दिसत आहे. मात्र, या अपघातानंतर रेल्वेच्या ढिसाळ नियोजनावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

​नेमकी घटना काय?

​सकाळच्या गर्दीच्या वेळी (Peak Hours) बदलापूर स्थानकावर ही घटना घडली. समोर आलेल्या सीसीटीव्ही व्हिडिओनुसार, लोकल फलाटावरून वेग घेत होती. त्याच वेळी या महिलेने डब्यात चढण्याचा प्रयत्न केला, परंतु तिचा पाय घसरला आणि ती थेट रेल्वे आणि फलाट यांच्यातील फटीत पडली. उपस्थित प्रवाशांनी आरडाओरड करेपर्यंत आणि गाडी थांबेपर्यंत खूप उशीर झाला होता. गंभीर जखमी झालेल्या या महिलेचा जागीच मृत्यू झाला

अपघाताला जबाबदार कोण? 

​बदलापूर रेल्वे स्थानकावरील या दुर्दैवी अपघाताकडे पाहिल्यास, प्रथमदर्शनी धावती गाडी पकडण्याचा प्रयत्न केल्यामुळे ती महिलाच याला जबाबदार असल्याचे भासते. मात्र, या अपघाताला केवळ वैयक्तिक चूक मानणे तांत्रिकदृष्ट्या सोपे असले, तरी त्यामागील ईतर कारणांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. गेल्या काही दिवसांपासून मध्य रेल्वेच्या विस्कळीत नियोजनाचा मोठा फटका सर्वसामान्य प्रवाशांना बसत आहे. बदलापूर ते दादर हा साधारण तासाभराचा प्रवास आता चक्क दीड ते पावणेदोन तास घेत आहे. सकाळी नोकरी-व्यवसायासाठी बाहेर पडणाऱ्या प्रवाशांवर कामाच्या ठिकाणी वेळेत पोहोचण्याचे प्रचंड दडपण असते आणि रेल्वेच्या ‘लेट-लतीफी’मुळे हे दडपण अधिकच वाढते. याच मानसिक तणावातून प्रवासी जीव धोक्यात घालून धावती गाडी पकडण्याचा धोका पत्करतात.

​या परिस्थितीला रेल्वेचे विसंगत प्राधान्यक्रम मोठ्या प्रमाणावर कारणीभूत आहेत. सकाळी जेव्हा नोकरदार वर्गाची सर्वाधिक गर्दी असते (पीक अवर्स), तेव्हा प्रशासनाकडून लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस गाड्यांना प्राधान्य दिले जाते. बदलापूरहून निघालेली लोकल गाडी ठाण्यापर्यंत वेळेत पोहोचते, परंतु त्यानंतर फास्ट ट्रॅकवर एक्सप्रेस गाड्यांची रांग असल्याने लोकलचा वेग बैलगाडीसारखा होतो. जलद मार्ग पूर्णपणे ‘जाम’ झाल्यामुळे लोकल गाड्या रखडतात.

हे रोजचेच झाले असल्याने कामावर वेळेवर पोहोचण्यासाठी आणि लेट मार्क वाचवण्यासाठी बहुतेक जणांना आता आपल्या नेहमीच्या गाडी आधी अर्धा पाउण तासतास पूर्वीची गाडी पकडावी लागत आहे. प्रवाशांची खासकरून महिला वर्गाची जी आपली घरची कामे आटोपून नोकरी करतात त्यांची खूपच मोठी धावपळ होत आहे. अशा धावपळीत गाडी पकडताना असे अपघात होत आहेत.

रेल्वे प्रशासनाने यावर लवकरात लवकर याकडे लक्ष देवून गाड्यांचे लेटमार्क कमी करावेत अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.

 

अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडिओ 👇

Facebook Comments Box

जिल्हापरिषद निवडणूका आणि आंगणेवाडी जत्रेसाठी मुंबई पुण्याहून कोकणात जाण्यासाठी विशेष गाड्यांची मागणी

   Follow us on        

मुंबई | जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका ७ फेब्रुवारी २०२६ रोजी होणार असून, त्यानंतर ९ फेब्रुवारी २०२६ रोजी कोकणातील अतिशय महत्त्वाचा धार्मिक उत्सव आंगणेवाडी जत्रा पार पडणार आहे. यामुळे ६ ते १० फेब्रुवारी २०२६ या कालावधीत मुंबई/पुणे ते कोकण व कोकण ते मुंबई/पुणे मार्गावर प्रवाशांची अभूतपूर्व गर्दी होण्याची दाट शक्यता आहे.

या काळात मतदार, मतदान व शासकीय कर्मचारी, सुरक्षा दल तसेच आंगणेवाडी जत्रेसाठी जाणारे व परतीच्या प्रवासातील लाखो भाविक मोठ्या संख्येने प्रवास करतील. मागील अनुभव लक्षात घेता, कोकण रेल्वे मार्गावरील सध्याच्या नियमित गाड्या ही अतिरिक्त गर्दी हाताळण्यासाठी अपुऱ्या ठरण्याची शक्यता असून, यामुळे प्रचंड गर्दी, प्रतीक्षा यादी (वेटिंग), तसेच प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागू शकतो.

या पार्श्वभूमीवर, ६, ७, ८, ९ आणि १० फेब्रुवारी २०२६ रोजी अतिरिक्त विशेष रेल्वे गाड्या चालवाव्यात, अशी ठाम मागणी कोकण विकास समिती (शहरी व ग्रामीण विभाग) यांच्यावतीने करण्यात आली आहे. या प्रस्तावित विशेष गाड्यांचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे असावे अशी विनंती कोकण विकास समिती तर्फे करण्यात आली आहे.

या विशेष गाड्यांमुळे कोकणकडे जाणाऱ्या व येणाऱ्या विद्यमान सेवांवरील ताण मोठ्या प्रमाणात कमी होईल, निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडण्यास मदत होईल, तसेच आंगणेवाडी जत्रेसाठी येणाऱ्या भाविकांचा प्रवास सुरक्षित व शिस्तबद्ध होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

तातडीने निर्णयाची अपेक्षा

मागणी निश्चित असून नियोजनासाठी वेळ मर्यादित असल्याने, या विशेष गाड्यांना लवकर मंजुरी देऊन तातडीने अधिसूचना जारी करावी, अशी जोरदार विनंती करण्यात आली आहे. वेळेत सकारात्मक निर्णय झाल्यास प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल आणि स्थानिक प्रशासनालाही नियोजनात मदत होईल.

ही मागणी जयवंत शंकर दरेकर व अक्षय मधुकर महापदी (कोकण विकास समिती – शहरी व ग्रामीण विभाग) यांच्या वतीने करण्यात आली आहे.

Facebook Comments Box

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search