लहान मुलांसाठी कफ सिरप धोकादायक? केंद्र सरकारने दिला महत्वाचा इशारा

   Follow us on        

नवी दिल्ली: लहान मुलांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी कफ सिरप आणि सर्दीवरील औषधांच्या वापराबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. त्यानुसार बालरोग तज्ज्ञ आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना लहान मुलांना ही औषधे देताना विशेष काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, दोन वर्षांखालील मुलांना कफ आणि सर्दीवरील कोणतीही औषधे देऊ नयेत. तसेच, पाच वर्षांखालील मुलांसाठी ही औषधे सामान्यतः शिफारस केलेली नाहीत. कारण, लहान मुलांमधील तीव्र कफ आणि सर्दीचे बहुतांश आजार स्वतःहून बरे होतात आणि त्यासाठी औषधांची गरज पडत नाही.


सर्व आरोग्य केंद्रे आणि दवाखान्यांनी केवळ उत्तम उत्पादन मानकांनुसार (GMP) तयार केलेली आणि उच्च औषधी दर्जाची कफ सिरप खरेदी करावीत, असे मार्गदर्शक तत्त्वांमध्ये नमूद आहे. या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी सर्व दवाखाने, जिल्हा आरोग्य विभाग, औषध वितरण केंद्रे, प्राथमिक आणि सामुदायिक आरोग्य केंद्रे, जिल्हा रुग्णालये तसेच वैद्यकीय शिक्षण संस्थांमध्ये तातडीने करावी, असे निर्देश सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना देण्यात आले आहेत.

 

Loading

Facebook Comments Box

Konkan Railway: वास्को-द-गामा – मुझफ्फरपूर विशेष गाडी एलएचबी रेकसह धावणार

   Follow us on    

 

 

Konkan Railway: वास्को-द-गामा : प्रवाशांच्या अधिक सुरक्षिततेसाठी आणि सोयीसाठी वास्को-द-गामा – मुझफ्फरपूर – वास्को-द-गामा साप्ताहिक विशेष गाडी (क्र. 07311/07312) आता पारंपरिक आयसीएफ डब्यांऐवजी आधुनिक एलएचबी डब्यांसह धावणार आहे.

ही सुविधा 22 सप्टेंबर 2025 पासून वास्को-द-गामा येथून सुटणाऱ्या गाडी क्रमांक 07311 साठी लागू होणार असून, मुझफ्फरपूर येथून 25 सप्टेंबर 2025 रोजी सुटणाऱ्या गाडी क्रमांक 07312 पासून अमलात येईल.

रेल्वेच्या माहितीनुसार, या गाडीत यापुढे एक फर्स्ट एसी, दोन टू टियर एसी, तीन थ्री टियर एसी, नऊ स्लीपर, तीन जनरल, एक जनरेटर कार आणि एक एसएलआर असा एकूण 20 एलएचबी डब्यांचा समावेश असेल. पूर्वी या गाडीत 21 आयसीएफ डबे जोडले जात होते.

प्रवाशांच्या प्रवासाचा अनुभव अधिक आरामदायी, सुरक्षित आणि वेगवान व्हावा या उद्देशाने हा बदल करण्यात आला आहे. संबंधित गाडीचे तपशीलवार वेळापत्रक आणि थांबे www.enquiry.indianrail.gov.in
या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

या बदलामुळे प्रवाशांनी रेल्वेच्या सेवांचा अधिक सोयीस्कररीत्या लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील बी. नारकर यांनी केले आहे.

Facebook Comments Box

सरकारी नोकरी: धर्मदाय आयुक्त कार्यालयात १७९ पदांसाठी मोठी भरती सुरू; वेतन लाखांच्या घरात

   Follow us on    

 

 

मुंबई: महाराष्ट्र शासनाच्या धर्मादाय आयुक्त कार्यालयाने विविध पदांसाठी मोठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. गट-ब आणि गट-क मधील एकूण १७९ रिक्त जागांसाठी ही भरती होणार असून, या पदांसाठी मिळणारे वेतन आकर्षक आहे. काही पदांसाठी वेतन ₹१,४२,४००/- पर्यंत आहे.

पदांचा आणि वेतनाचा तपशील:

गट-ब (अराजपत्रित):

विधी सहायक: वेतनश्रेणी ₹३८,६०० ते ₹१,२२,८०० (S-13)

लघुलेखक-उच्च श्रेणी: वेतनश्रेणी ₹४४,९०० ते ₹१,४२,४०० (S-16)

लघुलेखक-कनिष्ठ श्रेणी: वेतनश्रेणी ₹४१,८०० ते ₹१,३२,३०० (S-14)

गट-क:

निरीक्षक: वेतनश्रेणी ₹३५,४०० ते ₹१,१२,४०० (S-13)

वरिष्ठ लिपिक: वेतनश्रेणी ₹२५,५०० ते ₹८१,१०० (S-8)

महत्वाच्या तारखा:

अर्ज सुरू होण्याची तारीख: ११ सप्टेंबर २०२५

अर्ज करण्याची अंतिम तारीख: ०३ ऑक्टोबर २०२५ (रात्री ११:५५ वाजेपर्यंत)

परीक्षा: ऑक्टोबर/नोव्हेंबर २०२५ दरम्यान

शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा:

प्रत्येक पदासाठी आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा भिन्न आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

सर्वसाधारण प्रवर्गासाठी वयोमर्यादा १८ ते ३८ वर्षे आहे, तर आरक्षित प्रवर्गासाठी ५ वर्षांची सूट देण्यात आली आहे.

अर्ज प्रक्रिया:

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळाला https://charity.maharashtra.gov.in भेट देऊन ऑनलाइन अर्ज करावा.

ऑनलाइन अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे आणि परीक्षा शुल्क जमा करणे अनिवार्य आहे.

खुला प्रवर्गासाठी परीक्षा शुल्क ₹१०००/- आणि मागासवर्गीय/अनाथ उमेदवारांसाठी ₹९००/- आहे.

या भरतीसाठी अधिक माहिती व सविस्तर जाहिरात धर्मादाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे. उमेदवारांनी अंतिम मुदतीची वाट न पाहता लवकर अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Facebook Comments Box

Konkan Railway Updates: प्रवाशांच्या सोयीसाठी कोकण रेल्वेकडून नवीन मोबाइल अ‍ॅप्लिकेशन सादर

   Follow us on    

 

 

Konkan Railway Updates: कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने (KRCL) आज नव्याने डिझाईन केलेले KR MIRROR मोबाईल अ‍ॅप्लिकेशन  सादर केले. हे अ‍ॅप्लिकेशन प्रवाशांना आधुनिक, सुलभ आणि समावेशक डिजिटल अनुभव देण्यासाठी विकसित करण्यात आले आहे.

हे अ‍ॅप्लिकेशन केवळ माहिती देणारे साधन न राहता आता एक संपूर्ण प्रवास साथीदार ठरत आहे. दृष्टी, हालचाल किंवा संज्ञानात्मक अडचणी असलेल्या प्रवाशांनाही सहज वापरता येईल, याची काळजी घेण्यात आली आहे. बहुभाषिक पर्याय, मोठ्या अक्षरे, तसेच डार्क/लाईट मोडसारख्या सुविधा यात उपलब्ध आहेत.

महत्त्वाच्या सुविधा:

  • गाडीचे प्रत्यक्ष धावते स्थिती व वेळापत्रक

  • स्थानकांवरील व गाड्यांवरील सेवा, केटरिंग माहिती

  • महिला प्रवाशांसाठी स्वतंत्र सुविधा व सुरक्षा हेल्पलाईन्स

  • पर्यटन व चित्रपट स्थळांची माहिती, छायाचित्रे

  • हेल्पडेस्क व तक्रार नोंदविण्याचे पर्याय

  • कोकण रेल्वेचा इतिहास, कामगिरी व घोषणा

  • आपत्कालीन माहिती व सुरक्षा सुविधा

प्रवासी लाभ:
या अ‍ॅप्लिकेशन द्वारे प्रवाशांना जलद माहिती, सुरक्षा जागरूकता, पर्यटन नियोजन, स्थानिक भाषांतील माहिती तसेच थेट KRCL शी संवाद साधण्याची सुविधा मिळणार आहे.

हे अ‍ॅप्लिकेशन आता Google Play Store वर डाउनलोडसाठी उपलब्ध असून, खालील लिंकवर जाऊन ते डाउनलोड करता येईल.

https://play.google.com/store/apps/details?id=com.konkanrailway.krclapp

Facebook Comments Box

लोकमान्य टिळक टर्मिनस – तिरुवनंतपुरम उत्तर विशेष गाडीला खेेड स्थानकावर तात्काळ थांबा द्या

   Follow us on    

 

 

खेेड: लोकमान्य टिळक टर्मिनस – तिरुवनंतपुरम उत्तर (०१४६३/०१४६४) विशेष गाडी पुजा, दिवाळी व छठ २०२५ उत्सव काळात चालविण्याची घोषणा कोकण रेल्वेकडून करण्यात आली आहे. मात्र या गाडीला खेेड स्थानकावर थांबा देण्यात आलेला नाही. या निर्णयाविरोधात प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

जल फाउंडेशन कोकण विभागाचे संस्थापक व अध्यक्ष श्री. नितीन सखाराम जाधव यांनी या संदर्भात निवेदन देऊन संताप व्यक्त केला आहे. उन्हाळी २०२५ विशेष गाड्यांच्या वेळी खेेड येथे थांबा देण्यात आला होता. मात्र आता तो रद्द करण्यात आला असून त्यामागचे कारण जनतेला समजत नाही, असे जाधव यांनी म्हटले आहे.

ते पुढे म्हणाले की, “कोकण रेल्वेकडून महाराष्ट्रातील स्थानकांकडे कायम दुय्यम दृष्टीने पाहिले जाते. केरळ व इतर दक्षिणेकडील प्रवाशांच्या मागण्या मान्य करून त्यांना पुरेसे थांबे दिले जातात. पण कोकणवासीयांच्या सोयीसाठी वारंवार दुर्लक्ष केले जाते. हा अन्याय व पक्षपात आहे.”

खेेड हे तालुक्याचे ठिकाण असून हजारो प्रवाशांसाठी ते महत्त्वाचे स्थानक आहे. ही गाडी पुढे नियमित सेवेतही रूपांतरित होऊ शकते. त्यामुळे प्रवाशांना आंदोलन करावे लागू नये म्हणून तातडीने खेेड येथे थांबा निश्चित करणे आवश्यक असल्याची ठाम मागणी जाधव यांनी केली आहे.

अन्यथा हा मुद्दा मोठ्या प्रमाणावर उचलून धरला जाईल व प्रवाशांना संघर्षाशिवाय पर्याय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

Facebook Comments Box

पीएसआय परिक्षेत अव्वल ठरलेल्या अश्विनी केदारीचा दुर्दैवी मृत्यू; पुण्यात हळहळ

   Follow us on    

 

 

पुणे : पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील पाळू येथील रहिवासी अश्विनी केदारी (वय ३०) हिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेतलेल्या २०२३ च्या पीएसआय परीक्षेत मुलींत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या अश्विनीचा २८ ऑगस्ट रोजी झालेल्या अपघातात गंभीर भाजल्याने मृत्यू झाला.

२८ ऑगस्टच्या सकाळी अभ्यास करताना तिने बाथरूममधील गिझर सुरू करून पाणी गरम केले होते. पाण्याचे तापमान पाहण्यासाठी गेल्यावर तिला विजेचा धक्का बसला आणि अंगावर उकळते पाणी ओतले गेले. यात ती ८० टक्क्यांहून अधिक प्रमाणात भाजली.

तिला तात्काळ पिंपरी-चिंचवड येथील डी. वाय. पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्या उपचारासाठी समाजातील अनेकांनी आर्थिक मदतही केली. मात्र, काही दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

शेतकरी कुटुंबातील अश्विनीने स्वतःच्या कष्टावर यश मिळवले होते. जिल्हाधिकारी होण्याचे तिचे स्वप्न होते. तिच्या निधनाने खेड तालुक्यासह तिचे कुटुंब, नातेवाईक, मित्रपरिवार आणि स्पर्धा परीक्षेतील अभ्यासकांवर दुःखाचे सावट पसरले आहे

Facebook Comments Box

Konkan Railway: दसरा-दिवाळीनिमित्त कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाड्यांची घोषणा

   Follow us on    

 

 

मुंबई : आगामी दसरा व दिवाळी सणानिमित्त प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेतर्फे कोकण रेल्वे मार्गावर अतिरिक्त गाड्या चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रवाशांना या गाड्यांमुळे मोठा दिलासा मिळणार असून, दोन साप्ताहिक विशेष गाड्यांची घोषणा करण्यात आली आहे.

१) गाडी क्रमांक ०१४६३ / ०१४६४ लोकमान्य टिळक (टी) – तिरुवनंतपुरम उत्तर – लोकमान्य टिळक (टी) विशेष (साप्ताहिक):

गाडी क्रमांक ०१४६३ लोकमान्य टिळक (टी) – तिरुवनंतपुरम उत्तर विशेष साप्ताहिक दर गुरुवार २५/०९/२०२५ ते २७/११/२०२५ रोजी लोकमान्य टिळक (टी) येथून दुपारी ४:०० वाजता सुटेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी रात्री २२:४५ वाजता तिरुवनंतपुरम उत्तर येथे पोहोचेल.

गाडी क्रमांक ०१४६४ तिरुवनंतपुरम उत्तर – लोकमान्य टिळक (टी) विशेष साप्ताहिक दर शनिवारी २७/०९/२०२५ ते २९/११/२०२५ रोजी तिरुवनंतपुरम उत्तर येथून सायंकाळी ४:२० वाजता सुटेल. तिसऱ्या दिवशी दुपारी ०१:०० वाजता गाडी लोकमान्य टिळक (टी) येथे पोहोचेल.

ही गाडी ठाणे, पनवेल, पेण, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम, करमाळी, मडगाव जंक्शन, कारवार, गोकर्ण रोड, कुमठा, मुर्डेश्वर, भटकळ, मुकुंदोब रोड, मुकदुर्ग रोड, कुंडुरा, मुकदुर्ग रोड, सुर्थकल, मंगळुरु जं., कासरगोड, कन्नूर, कोझिकोड, तिरूर, शोरानूर जं., त्रिसूर, अलुवा, एर्नाकुलम जंक्शन, कोट्टायम, चांगनासेरी, त्रिउवल्ला, चेंगन्नूर, मावेलीकारा, कायनकुलम, सस्थानकोट्टा आणि कोल्लम जं. या स्थानकांवर थांबेल.

रचना : एकूण २२ एलएचबी कोच = २ टायर एसी – ०१ कोच, ३ टायर एसी – ०६ कोच, स्लीपर – ०९ कोच, जनरल – ०४, एसएलआर – ०१, जनरेटर कार – ०१.

२) गाडी क्रमांक ०११७९ / ०११८० लोकमान्य टिळक (टी) – सावंतवाडी रोड – लोकमान्य टिळक (टी) विशेष (साप्ताहिक):

गाडी क्रमांक ०११७९ लोकमान्य टिळक (टी) – सावंतवाडी रोड विशेष (साप्ताहिक) दर शुक्रवारी १७/१०/२०२५ ते ०७/११/२०२५ रोजी लोकमान्य टिळक (टी) येथून सकाळी ०८:२० वाजता सुटेल. ही गाडी त्याच दिवशी रात्री २१:०० वाजता सावंतवाडी रोडला पोहोचेल.

गाडी क्रमांक ०११८० सावंतवाडी रोड – लोकमान्य टिळक (टी) विशेष (साप्ताहिक) दर शुक्रवारी १७/१०/२०२५ ते ०७/११/२०२५ रोजी रात्री २२:२० वाजता सावंतवाडी रोड येथून सुटेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी १०:४० वाजता लोकमान्य टिळक (टी) येथे पोहोचेल.

ही गाडी ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, अरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ स्टेशनवर थांबेल.

रचना: एकूण २२ एलएचबी कोच = पहिला एसी – ०१ कोच, २ टियर एसी – ०३ कोच, ३ टियर एसी – ०७ कोच, स्लीपर – ०८ कोच, पॅन्ट्री कार – ०१, जनरेटर कार – ०२.

गाडी क्रमांक ०११८० चे बुकिंग ११/०९/२०२५ रोजी सर्व पॅसेंजर रिझर्व्हेशन सिस्टम (पीआरएस), इंटरनेट आणि आयआरसीटीसी वेबसाइटवर सुरू होईल, अशी माहिती रेल्वे प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.

Facebook Comments Box

Konkan Railway: रेल्वेचा दुजाभाव! उडुपी स्थानकाच्या नामांतराला गती; सावंतवाडी स्थानकाच्या नामांतराची मागणी अद्याप प्रलंबित

   Follow us on    

 

 

सावंतवाडी : कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यातील इंद्राली येथील उडुपी रेल्वे स्थानकाचे नामकरण “उडुपी श्री कृष्णा रेल्वे स्टेशन” करण्यासाठी खासदार श्रीनिवास पूजारी यांनी केलेल्या मागणीवर रेल्वे बोर्डाने सकारात्मक पावले उचलली असून, या संदर्भात कोकण रेल्वेला पत्र पाठवले आहे.

मात्र दुसरीकडे, कोकण रेल्वेचे शिल्पकार प्रा. मधू दंडवते यांच्या नावाने सावंतवाडी स्थानकाचे नामकरण करण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून पाठपुरावा होत असतानाही याकडे लक्ष दिले जात नसल्याने कोकण रेल्वे प्रवासी संघटना (सावंतवाडी) ने आपली नाराजी व्यक्त केली आहे.

स्थानिक नागरिक व जनमानसांची ठाम मागणी आहे की, सावंतवाडी स्थानकाला परिपूर्ण टर्मिनसचा दर्जा देऊन त्याचे नामकरण “प्रा. मधू दंडवते सावंतवाडी टर्मिनस” असे करण्यात यावे. कोकण रेल्वेच्या स्थापनेत आणि विकासात मोलाची भूमिका बजावणाऱ्या दंडवते यांच्या नावाने स्थानकाला नामांकित करण्याची मागणी आता अधिक तीव्र झाली आहे.

Facebook Comments Box

एमआरएफ टायर कंपनीत बंपर भरती; सिंधुदुर्गात २५० पदांसाठी मुलाखत

   Follow us on    

 

 

कुडाळ : भारतातील नामांकित एमआरएफ टायर कंपनीत प्रशिक्षणार्थी (Trainee) पदांसाठी तब्बल २५० जागांची भरती करण्यात आली असून, या भरतीसाठी मुलाखतीचे आयोजन १२ सप्टेंबर रोजी कुडाळ येथे करण्यात आले आहे.

ही भरती मनसेच्या माध्यमातून होत असून, निवड प्रक्रियेसाठी कंपनीची भरती टीम थेट ठिकाणी उपस्थित राहणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना तात्काळ जॉब लेटर देण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

नोकरीचे ठिकाण फोंडा (गोवा युनिट) असून, उमेदवारांना दरमहा ₹१७,५०० ते ₹१९,००० इतका पगार मिळणार आहे. त्यासोबतच मोफत राहण्याची व कॅन्टीनची सोय, युनिफॉर्म तसेच भविष्यात कायमस्वरूपी नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. दरवर्षी पगारात वाढ होणार असल्याचेही सांगण्यात आले.

शैक्षणिक पात्रता : ८वी ते १२वी उत्तीर्ण, आयटीआय, डिप्लोमा किंवा पदवीधर उमेदवार या भरतीस पात्र आहेत.

मुलाखतीचे तपशील :
🗓️ तारीख : १२ सप्टेंबर २०२५
वेळ : सकाळी १०.३० ते दुपारी २.३०
📍 स्थळ : बै. नाथ पै शिक्षण संस्था, एमआयडीसी, कुडाळ

ही प्रक्रिया पूर्णपणे विनामूल्य असून, सिंधुदुर्गातील तरुणांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी केले आहे.

📞 अधिक माहितीसाठी संपर्क :

  • चौगुले : ९३८४०-०३३०५

  • खांडेकर : ९६९९२-९०२२४

Facebook Comments Box

विजयदुर्ग: रो-रो सेवेची बोट मंगळवारी कोकणात दाखल

चाचणी यशस्वी; सेवा लवकरच सुरू होणार


गेले काही दिवस प्रतीक्षेत असणारी मुंबई टू विजयदुर्ग रो-रो सेवेची बोट मंगळवारी विजयदुर्ग बंदरात सायंकाळी ६ वा. दाखल झाली. या बोटीचे ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. यावेळी विजयदुर्ग ग्रामस्थ व मुंबईकर चाकरमानी यांनी ही बोट पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती.

सिंधुदुर्गातील महत्त्वाचे बंदर असलेल्या विजयदुर्गमध्ये ही बोट दाखल करून पहिली चाचणी यशस्वीपणे पूर्ण करण्यात आली.यामुळे लवकरच ही सेवा आता कायमस्वरूपी सुरू होईल, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला. ही चाचणी यशस्वी झाली असून, हवामान सुरळीत झाले, तर गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्गात दाखल चाकरमान्यांना परतीच्या प्रवासासाठी या रो-रो बोटीने मुंबईकडे जाण्याचा मार्ग मोकळा होईल, अशी आशा आहे. विजयदुर्ग येथे बंदर जेटीचे काम पूर्ण झालेले असून, मंगळवारी दाखल झालेली रो-रो बोट यशस्वीपणे या जेटीवर लावण्यात आली.

Facebook Comments Box

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search