सावंतवाडी टर्मिनस प्रकरणी कोकण रेल्वे सीएमडींच्या वक्तव्याने नव्याने वाद

   Follow us on        

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकाला ‘टर्मिनस’चा दर्जा देण्याच्या दीर्घकाळ रखडलेल्या प्रकल्पात आता नव्याने वाद निर्माण झाला आहे. कोकण रेल्वे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक (CMD) संतोष कुमार झा यांनी नुकत्याच झालेल्या एका बैठकीत “हे स्थानक टर्मिनस नसून फक्त वे-साईड स्टेशन आहे. ‘टर्मिनस’ हे नाव कसे पडले? याचा पुरावा द्या,” अशी थेट मागणी केल्याची माहिती समोर आली आहे.

सावंतवाडी टर्मिनसच्या कामातील विलंब आणि सुविधांबाबत सतत पाठपुरावा करणारे कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे नेते मिहीर मठकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अलीकडेच संतोष कुमार झा यांची भेट घेतली होती. या चर्चेदरम्यान स्थानकाच्या दर्जा, कामातील उशीर आणि पुढील कार्यवाही यावर बोलताना झा यांनी हा प्रश्न उपस्थित केला. यामुळे स्थानकाच्या नावाचा दर्जा, प्रकल्प रेंगाळण्याची कारणे आणि प्रशासकीय दृष्टिकोनावरून नव्याने वाद पेटण्याची शक्यता आहे.

या घडामोडींवर तीव्र नाराजी व्यक्त करत मिहीर मठकर यांनी म्हटले आहे, “वरिष्ठ अधिकारीच अशा प्रकारचे वक्तव्य करत असतील तर सामान्य नागरिकांनी काय अपेक्षा ठेवाव्या? हा प्रकल्प वर्षानुवर्षे रखडला आहे, आणि आता दर्जाच नाकारला जातोय.” तसेच, पुढील काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

पार्श्वभूमी:

कोकण रेल्वे मार्गावरील सावंतवाडी रोड स्थानकाला टर्मिनस म्हणून विकसित करण्याची योजना २०१५ पासून आहे. तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या उपस्थितीत भूमिपूजनही झाले होते. मात्र, भूसंपादन, निधी आणि इतर कारणांमुळे काम रखडले आहे. स्थानिक नागरिक आणि प्रवाशांसाठी अतिरिक्त थांबे, मेंटेनन्स सुविधा आणि इतर सोयी अपेक्षित आहेत. कोकण रेल्वेच्या काही अधिकृत जुन्या घोषणांमध्ये याला ‘टर्मिनस’ म्हणून उल्लेख आहे, पण सध्याच्या विकासात ते मधले स्थानक (मिड-स्टेशन) म्हणूनच विकसित झाल्याचे सांगितले जाते.

हा वाद आता रेल्वे मंत्रालयापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. स्थानिक खासदार-आमदार आणि संघटनांकडून पाठपुरावा वाढवला जाणार असून, लवकरच आंदोलनाची रूपरेषा आखली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Facebook Comments Box

२०२६ साठी २४ दिवसांच्या सार्वजनिक सुट्ट्या जाहीर; ‘या’ तारखेला असणार एक अतिरिक्त सुट्टी

   Follow us on        

मुंबई, दि. ९: महाराष्ट्र शासनाने २०२६ या वर्षासाठी राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांसाठी २४ सार्वजनिक सुट्ट्या जाहीर केल्या असून, भाऊबीज (११ नोव्हेंबर २०२६, बुधवार) यादिवशी अतिरिक्त सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे, सामान्य प्रशासन विभागाने या संदर्भातील अधिसूचना जारी केली आहे.

जाहीर केलेल्या सुट्ट्यांमध्ये प्रमुख सण आणि राष्ट्रीय दिवसांचा समावेश आहे. या सुट्या महाराष्ट्रातील सर्व शासकीय कार्यालये, राज्य शासनाचे उपक्रम, महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायती यांना लागू राहील.

याशिवाय १ एप्रिल २०२६ (बुधवार) हा दिवस केवळ बँकांसाठी वार्षिक लेखापरीक्षणासाठी सुट्टी म्हणून जाहीर करण्यात आला आहे.

 

 

 

Facebook Comments Box

शालेय सहलींसाठी फक्त एसटी बस हाच पर्याय; विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी सरकारचे कठोर नियम

   Follow us on        

मुंबई : विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला असून, राज्यातील सर्व शालेय सहलींसाठी फक्त एमएसआरटीसीच्या एसटी (लालपरी) बसचांचा वापर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. यामुळे खासगी आणि शाळेच्या मालकीच्या बसद्वारे सहली आयोजित करण्यावर संपूर्ण बंदी घालण्यात आली आहे.

नव्या नियमांनुसार सहलीसाठी शाळांनी प्रशासनाची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक असून, प्रत्येक १० विद्यार्थ्यांमागे १ शिक्षक असा प्रमाण राखणे बंधनकारक करण्यात आले आहे. मुलींच्या गटांसाठी महिला शिक्षकांची नियुक्ती अनिवार्य असेल. तसेच सहलींचे नियोजन ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक स्थळांना प्राधान्य देऊन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

एमएसआरटीसीकडून दररोज ८०० ते १००० बस २५१ डेपोमधून उपलब्ध करून देण्याची तयारी असून, शालेय सहलींसाठी ५० टक्के भाडे सवलत देण्यात येणार आहे. सरकारच्या मते या नियमांमुळे विद्यार्थ्यांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि नियंत्रित होईल अशी अपेक्षा आहे.

Facebook Comments Box

सावंतवाडी टर्मिनससाठीच्या तक्रार मोहिमेला कोकणवासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

   Follow us on        सावंतवाडी टर्मिनस प्रकल्पाला गती देण्यासाठी महाराष्ट्र शासनाचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे ऑनलाईन तक्रार मागणी नोंदवण्याबद्दल आवाहन कोकण रेल्वे प्रवासी संघटनेकडून करण्यात आले आहे.

या मोहिमेला कोकणवासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. कालच्या एका दिवसात टर्मिनस साठीच्या तब्बल 264 तक्रारी दाखल झाल्या असल्याची माहिती संघटनेचे संपर्कप्रमुख तसेच उपाध्यक्ष सागर तळवडेकर यांनी दिली.

सावंतवाडी रेल्वे टर्मिनस व्हावे यासाठी डिजिटल पद्धतीने लढाई करताना सुरवातीला इमेल मोहीम, त्यानंतर तक्रार मोहीम, त्यात महामहीम राष्ट्रपती यांच्याकडे तक्रार, माननीय प्रधानमंत्री यांच्याकडे तक्रार, मुख्यमंत्री श्रीमान देवाभाऊ, रेल्वे मंत्रालय (रेल मदद) आणि कोकण रेल्वे कडे हजारो तक्रारी दाखल केल्या, त्यानंतर असणारे मंत्री महोदयांचे जनता दरबारात देखील तक्रारींचा पाऊस पाडला होता. आणि आज देखील त्याचा प्रत्यय आला.

सोबतच सुरू असलेल्या डिजिटल सह्यांची मोहिमेला कोकणवासीयांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि आता देखील देत आहात याचा अर्थ कोकणवासी आपल्या हक्काच्या लढाईसाठी नक्कीच जागा झालाय. कोकणवासी आपल्या हक्कासाठी डिजिटली साक्षर होतोय यात मी समाधानी आहे. अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

सावंतवाडी टर्मिनसचे काम त्वरित सुरु करण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे मागणी नोंदवावी यात वेबसाईट www.pratapsamaik.com Grievances ( तक्रार) सेक्शन Public Transport ( सार्वजनिक वाहतूक) निवडा Describe your issue मध्ये पेस्ट करावे असे आवाहन करण्यात आले आहे.गेल्या १० वर्षांपासून रखडलेल्या सावंतवाडी टर्मिनसमुळे कोकणी प्रवाशांचे हाल होत आहेत.निधी परत जाणे आणि प्रशासकीय समन्वयाच्या अभावामुळे हा प्रकल्प ठप्प आहे.हा प्रकल्प गतिमान करण्यासाठी व प्रवाशांना सुविधा देण्यासाठी तो तातडीने राज्य शासनाच्या मित्रा ( MlTRA ) संस्थेकडे वर्ग करावा.मागणी नोंदवल्यानंतर येणाऱ्या पोचपावतीला स्क्रीनशॉट संबधित ग्रुपवर अपलोड करा.या संदेशात सांगितल्याप्रमाणे आपण सावंतवाडी टर्मिनसच्या कामाला गती देण्यासाठी आपली मागणी नोंदवू शकता आणि हा संदेश इतर कोकणवासीयांपर्यत पोहोचवावा असे आवाहन कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने केले आहे.

 

Facebook Comments Box

Mumbai Goa Highway Accident: महामार्गावरील अपघातप्रकरणी अधिकारी व ठेकेदारांना सहआरोपी करा; जनआक्रोश समितीची मागणी

   Follow us on        माणगाव : मुंबई–गोवा महामार्गावरील माणगाव येथे झालेल्या अलीकडील अपघातानंतर अधिकारी व ठेकेदारांना सहआरोपी करण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी जनआक्रोश समितीने माणगाव पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मा. श्री. निवृत्ती बोऱ्हाडे साहेब यांची भेट घेतली.

समितीने यावेळी गेल्या १७ वर्षांतील अपघातांचे आकडे समोर ठेवत सांगितले की, महामार्गावरील रखडलेल्या कामामुळे आजपर्यंत ४५०० पेक्षा जास्त कोकणकरांचा मृत्यू, तर १० हजारांहून अधिक जखमी झाले आहेत. “अनेक दुर्घटनांमध्ये रस्त्यावरील त्रुटी स्पष्ट असतानाही ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कोणतीही कारवाई झाली नाही; प्रत्येकवेळी चालकांवरच गुन्हे दाखल करण्यात आले,” अशी नाराजी समितीने व्यक्त केली.

अपघातात शिवशाही बस चालकाची चूक असल्याचे प्राथमिक मत स्थानिक प्रत्यक्षदर्शी व पोलिसांनी नोंदवले असले, तरी महामार्गाच्या चौपदरीकरणानंतर अचानक दुपदरी रस्ता होणे, इशारा फलकांचा अभाव, धोकादायक ठिकाणांचा सूचना ही प्रशासकीय व ठेकेदारांची गंभीर चूक असल्याचे समितीने स्पष्ट केले. अशा परिस्थितीत अधिकारी व ठेकेदार यांनाही जबाबदार धरणे आवश्यक असल्याची भूमिका समितीने मांडली.

यावर बोऱ्हाडे साहेबांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून कायदेशीर बाजू तपासण्याचे आश्वासन दिले. तसेच माणगाव परिसरातील धोकादायक ठिकाणांची तातडीने पाहणी करण्याचे आदेश त्यांनी तत्काळ दिले. या पाहणी अहवालाच्या आधारे NHAI व PWD यांसारख्या संबंधित यंत्रणांना निर्देशित करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. यापुढे महामार्गावरील त्रुटींमुळे अपघात झाल्यास अधिकारी व ठेकेदारांवर गुन्हे नोंदवले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या बैठकीस स्थानिक माणगावकर, जनआक्रोश समितीचे सदस्य तसेच माणगावमधील सर्व पक्षीय पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व समाजघटक एकत्र आल्यास महामार्गावरील दुर्लक्षाविरुद्धचा आवाज आणखी बुलंद होईल, असा विश्वास जन आक्रोष समितीने व्यक्त केला.

Facebook Comments Box

हिवाळी विशेष गाड्यांना थांबे द्या – रेल्वे प्रवासी सेवा समितीचे निवेदन

   Follow us on    

 

 

► खेड (ता.) कोंकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या हिवाळी विशेष गाड्यांच्या थांब्यांमध्ये महाराष्ट्रातील महत्त्वाचे तालुके पुन्हा एकदा दुर्लक्षित झाल्याचा आरोप करत अखिल कोंकण रेल्वे प्रवासी सेवा समिती, महाराष्ट्र यांनी मध्य रेल्वेला निवेदन दिले आहे. ०११४१/०११४२ मुंबई-करमळी, ०१४५१/०१४५२ लोकमान्य टिळक टर्मिनस-तिरुअनंतपुरम उत्तर तसेच भविष्यात जाहीर होणाऱ्या सर्व हिवाळी विशेष गाड्यांना माणगाव, महाड, खेड, राजापूर, वैभववाडी व सावंतवाडी या तालुक्यातील स्थानकांवर थांबे देण्यात यावेत, अशी मागणी समितीचे सचिव अक्षय महापदी यांनी केली आहे.

 

अतिरिक्त थांबा न देण्याचा निर्णय अयोग्य…

समितीने नमूद केले आहे की, ख्रिसमस व नवनव्या वर्षाच्या सुट्ट्यांदरम्यान गेल्यावर्षीप्रमाणे महाराष्ट्रातील पर्यटकांनी मोठी वर्दळ असेल. त्याचबरोबर शालेय सुट्ट्यांमुळे स्थानिक नागरिक मोठ्या प्रमाणात आपल्या गावी जातात. नियमित गाड्यांचे आरक्षण पूर्ण भरलेले असल्याने प्रवाशांची अपेक्षा विशेष गाड्यांवर होती; मात्र महाराष्ट्रातील अनेक तालुक्यांना थांबे न दिल्यामुळे प्रवाशांचा हिरमोड झाल्याचे समितीने सांगितले.

रत्नागिरी ते कणकवली या १११ किलोमीटरच्या पट्ट्यात एकाही विशेष गाडीला थांबा नाही. या गाड्या नेमक्या कोणासाठी सोडल्या जातात? असा प्रश्नही समितीने उपस्थित केला आहे. तिरअनंतपुरम विशेष गाडी सावंतवाडीच्या पुढे १५-२० किमी अंतरावर थांबे घेते, परंतु महाराष्ट्र कोकणातील अतिरिक्त थांबा न देण्याचा निर्णय अयोग्य असल्याचे समितीचे मत आहे.

त्वरित सकारात्मक निर्णयाची अपेक्षा व्यक्त

कोकणातील पर्यटक, व्यापारी, शिक्षण आणि रोजगारासाठी हे तालुके महत्त्वाचे असून विशेष गाड्या थांबा नसल्यामुळे स्थानिकांना मोठी गैरसोय होते. अनेकांनी तिकिटे रद्द केली आहेत. समितीने वैयक्तिक राजकारण सोडून, खेडवाडी रोड आणि सावंतवाडी रोड या स्थानकांवर तातडीने थांबे सुरू करण्याची मागणी केली आहे. प्रवासी सेवा समिती रेल्वे प्रशासनाकडून याबाबत त्वरित सकारात्मक निर्णयाची अपेक्षा व्यक्त केली आहे.

Facebook Comments Box

Konkan Railway: डिजिटल तक्रार प्रणालीमुळे हरवलेले ७५ वर्षीय आजोबा कुटुंबीयांकडे सुखरूप परत

   Follow us on    

 

 
५ डिसेंबर, २०२५

दिनांक ४ डिसेंबर रोजी तिरुनेलवेली – जामनगर एक्सप्रेस (गाडी क्रमांक १९५७७) ने प्रवास करणारे ७५ वर्षीय वृद्ध प्रवासी चुकीने चिपळूण येथे उतरल्याने हरवले होते. मात्र त्यांच्या मुलाने ‘रेल मदद’वर तात्काळ तक्रार नोंदवल्यानंतर कोकण रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाने (RPF) जलद आणि समन्वयित शोधमोहीम राबवली.

चिपळूण स्थानकात गस्त घालत असताना RPF पथकाच्या लक्षात एक वृद्ध प्रवासी प्लॅटफॉर्मवर भांबावलेल्या अवस्थेत फिरताना दिसले. पथकाने त्यांच्याशी संवाद साधला असता, ते चुकून गाडीतून उतरल्याचे आणि स्वतःचे गंतव्य नीट सांगू न शकण्याच्या अवस्थेत असल्याचे स्पष्ट झाले.

यानंतर ‘रेल मदद’वरील तक्रारीतील तपशीलांची पडताळणी करून RPF पथकाने त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला व त्या वृद्ध प्रवाशाला सन्मानपूर्वक त्यांच्या परिवाराकडे सुरक्षितपणे सोपवले.

कुटुंबीयांनी RPF चे मनःपूर्वक आभार मानले. या घटनेतून कोकण रेल्वेची डिजिटल तक्रार नोंद, वेगवान प्रतिसाद आणि मैदानातील समन्वयित कार्यप्रणाली वृद्ध व असुरक्षित प्रवाशांच्या सुरक्षेसाठी किती प्रभावी ठरते, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले.

Facebook Comments Box

Mumbai Local: ‘एआय’ निर्मित नकली रेल्वे पास आणि तिकिटे – अजून काही प्रवाशांवर कारवाई

   Follow us on    

 

 

Mumbai Local: मध्य रेल्वेने बनावट तिकिटांच्या प्रकरणांवर कारवाईचा धडाका सुरू ठेवत ३ प्रवाशांना बनावट युटीएस (UTS) सिझन तिकिटांसह पकडले. ही घटना २८ नोव्हेंबर रोजी १८.४५ वाजता निघालेल्या परळ–कल्याण एसी लोकलमध्ये घडली. मुंबई विभागातील प्रवासी तिकीट निरीक्षक (TTI) प्रशांत कांबळे यांनी नियमित तपासणीदरम्यान तिकिटांमध्ये संशयास्पद गोष्टी आढळल्याने हे प्रकरण उघड झाले.

मोबाईलमधील ‘My Files’ मध्ये तिकीट पाहून संशय

तपासणीदरम्यान एका तरुणीने आणि दोन तरुणांनी अधिकृत UTS अॅपऐवजी मोबाईलच्या “My Files – Documents” फोल्डरमधून सिझन तिकिटे दाखवली. तिकीट तपासल्यावर तिन्ही तिकिटांवर एकच क्रमांक — XOOJHN4569 — असल्याचे आढळले. प्रत्येक UTS तिकिटाचा क्रमांक वेगळा असणे आवश्यक असल्याने अधिकाऱ्यांना मोठा संशय आला.

तिकिटिंग सिस्टीममध्ये पुष्टी – तिकीटच नाही!

तिकिटिंग प्रणालीतून पडताळणी केली असता प्रवाशांनी दिलेल्या कोणत्याही मोबाइल क्रमांकावर अशी तिकिटे जारीच झालेली नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे तिन्ही तिकिटे बनावट असल्याचे निश्चित झाले.

तीन जण ताब्यात – एआयच्या मदतीने बनावट तिकीट तयार

पकडलेल्या प्रवाशांची नावे अशी आहेत :

  • निरज तलरेजा

  • अथर्व बाग

  • अदिती मंगळूरकर

मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी तिघांना त्वरित कुर्ला येथील रेल्वे पोलीस (GRP) यांच्या ताब्यात दिले. पुढील तपासात समोर आले की बनावट तिकिटे कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) साधनांचा वापर करून तयार केली होती.

मध्य रेल्वेने प्रवाशांना सूचना दिली आहे की अधिकृत UTS अॅपमधूनच तिकिटे बुक व सादर करावीत, अन्यथा कठोर कारवाई केली जाईल.

Facebook Comments Box

कोकणाच्या विकासकामांकडे दुर्लक्ष: मतदारांनी सजग राहावे – समाजसेवक आकाश पोकळे

   Follow us on    

 

 

मुंबई : प्रतिनिधी

राज्यात निवडणुकीचे वारे वाहू लागले असताना कोकणातील विकासकामे, रस्त्यांची दुरवस्था आणि स्थानिकांना रोजगाराच्या संधी न मिळणे या प्रश्नांकडे समाजसेवक आकाश पोकळे यांनी लक्ष वेधले आहे. मतदारांनी विकासाच्या निकषावर मतदान करून कोकणाचे हित जपावे, असे आवाहन त्यांनी केले.

पोकळे यांनी सांगितले की, गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई–गोवा महामार्गाचे काम रखडले असून कोकणातील नागरिकांना या समस्येमुळे मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. विविध प्रकल्पांबाबत स्थानिकांमध्ये असंतोष असून आंदोलने करताना नागरिकांना पोलिसांच्या काठ्यांचा सामना करावा लागणे ही खेदजनक बाब असल्याचे त्यांनी मत व्यक्त केले.

रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यातही कोकणातील लोकप्रतिनिधी प्रभावीपणे पुढाकार घेत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. रेल्वे स्थानकांवरील स्टॉल, लहान व्यवसाय आणि सेवा क्षेत्रातील रोजगारात स्थानिक युवकांना प्राधान्य देण्यासाठी ठोस धोरण राबवण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले.

कोकणाचा सर्वांगीण विकास आणि स्थानिकांच्या हिताच्या दृष्टीने सक्षम नेतृत्व आवश्यक असल्याचे सांगत पोकळे यांनी मतदारांना “विचारपूर्वक मतदान करा आणि कोकणाचे संरक्षण करा” असे आवाहन केले.

Facebook Comments Box

कोकण रेल्वे कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे घरातून पळून गेलेल्या १४ वर्षीय मुलाचा शोध लागला

   Follow us on        

रत्नागिरी │ २० नोव्हेंबर २०२५
कोकण रेल्वे महामंडळातील कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या सतर्कता, तात्काळ निर्णयक्षमता आणि समन्वयाच्या मदतीने रेल्वेतून पळून गेलेल्या १४ वर्षीय मुलाचा शोध लावण्यात येऊन त्याला सुरक्षितपणे पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.

मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस – मंगळुरू सेंट्रल मत्स्यगंधा एक्सप्रेस (क्र. १२६१९) मध्ये प्रवास तपासणी करताना मुख्य प्रवासी तिकीट तपासनीस (एचडी टीई) श्री. प्रदीप झेड. शिरके यांनी गुरुवारी (२० नोव्हेंबर) जनरल कोचमध्ये तिकीटाविना प्रवास करणारा विद्यार्थी वेशातील अल्पवयीन मुलगा आढळला. त्याच्याकडे शाळेची पिशवी असल्याने संशय निर्माण झाला. चौकशीदरम्यान मुलगा घरातून पळून आल्याची माहिती मिळताच श्री. शिरके यांनी तातडीने कमर्शियल कंट्रोलला कळवून रत्नागिरी स्थानकात रेल्वे संरक्षण दलाच्या (RPF) सहाय्याची मागणी केली.

काही वेळातच RPF पथकाने रत्नागिरी येथे हजर राहून मुलाला सुरक्षित ताब्यात घेतले. पुढील पडताळणीत संबंधित मुलगा गोवा येथील वास्को-द-गामा येथील शाळेतून बेपत्ता झाल्याचे उघड झाले असून, त्याच्या पालकांनी शोधासाठी माहिती सर्वत्र प्रसारित केली होती.

मुख्य तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांची जागरूकता, कमर्शियल कंट्रोल विभागाचा तातडीचा प्रतिसाद आणि RPF च्या समन्वयातून मुलाचा शोध लागला व त्याचे कुटुंबीयांशी सुरक्षित पुनर्मिलन शक्य झाले, अशी माहिती कोकण रेल्वे महामंडळाने प्रसिद्धीपत्रकात दिली.

Facebook Comments Box

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search