३१ जानेवारी पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-द्वितीया – 14:01:31 पर्यंत
  • नक्षत्र-शतभिष – 28:15:09 पर्यंत
  • करण-कौलव – 14:01:31 पर्यंत, तैतिल – 24:51:48 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-वरियान – 15:32:08 पर्यंत
  • वार- शुक्रवार
  • सूर्योदय- 07:13:13
  • सूर्यास्त- 18:30:50
  • चन्द्र-राशि-कुंभ
  • चंद्रोदय- 08:35:59
  • चंद्रास्त- 20:26:59
  • ऋतु- शिशिर

महत्त्वाच्या घटना:

  • १८९३: आजच्या दिवशी कोका कोला चे ट्रेडमार्क कंपनीने पेटंट स्वतःच्या नावावर केले.
  • १९११: स्वातंत्र्यवीर सावरकर यांना दुसर्‍या जन्मठेपेची शिक्षा झाली. तत्कालीन ब्रिटिश साम्राज्यात दोनदा जन्मठेपेची शिक्षा झालेले ते एकमेव आहेत.
  • १९१५: जर्मनी ने सर्वात आधी रशिया च्या विरुद्ध घातक वायू चा प्रयोग केला होता.
  • १९२०: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ’मूकनायक’ या पाक्षिकावी सुरूवात
  • १९२९: सोविएत रशियाने लिऑन ट्रॉटस्की याला हद्दपार केले.
  • १९४५: युद्धातुन पळ काढल्याबद्दल एडी स्लोव्हिक या सैनिकाला अमेरिकेने मृत्यूदंड दिला. दुसर्‍या महायुद्धाच्या काळात युद्धातुन पळून गेलेल्या एकूण ४९ सैनिकांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती मात्र फक्त स्लोव्हिकच्याच शिक्षेची अंमलबजावणी झाली.
  • १९४९: बडोदा व कोल्हापूर ही संस्थाने (तत्कालीन) मुंबई राज्यात विलीन झाली.
  • १९५०: अमेरिकन राष्ट्राध्यक्ष हॅरी एस. ट्रूमन यांनी हायड्रोजन बॉम्ब बनवण्याच्या योजनेस मान्यता दिली.
  • १९५०: राष्ट्रपती म्हणून डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी संसदेपुढे पहिले भाषण केले. यापूर्वी ते घटना समितीचे अध्यक्ष होते.
  • १९९२: राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना
  • २०००: हवाला केस मधील सर्व आरोपींची सुटका करण्यात आली.
  • २००५: आजच्या दिवशी जोगिंदर जसवंत सिंह यांची सेनाप्रमुख म्हणून निवड झाली.
  • २०१०: ला हॉलीवूड चित्रपट अवतार ने २ बिलियन डॉलर रुपयांची कमाई करून सगळ्यात जास्त कमाई करणारा चित्रपट बनला.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १८९६: दत्तात्रय रामचंद्र बेन्द्रे तथा ’अंबिकातनयदत्त’ – कन्नड कवी, पद्मश्री (१९६८), त्यांच्या ’नाकु तंती’ या काव्यसंग्रहास १९७३ मधे ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. (मृत्यू: २१ आक्टोबर १९८१)
  • १९२३: परमवीर चक्र मिळणारे प्रथम भारतीय सैनिक सोमनाथ शर्मा यांचा जन्म.
  • १९३१: गंगाधर महांबरे – गीतकार कवी व लेखक (मृत्यू: २३ डिसेंबर २००८)
  • १९३२: पंजाब केसरी वृत्तपत्राचे संपादक विजय कुमार चोप्रा यांचा जन्म.
  • १९४९: ला भारतीय चित्रपट अभिनेता राजेश विवेक यांचा जन्म.
  • १९७५: प्रीती झिंटा – चित्रपट अभिनेत्री व उद्योजिका
  • १९७७: मराठी चित्रपट अभिनेता अंकुश चौधरी यांचा जन्म.
  • १९८६: भारतीय अभिनेत्री मनीषा केळकर यांचा जन्म.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

  • १९५४: ई. एच. आर्मस्ट्राँग – एफ. एम. रेडिओचे संशोधक (जन्म: १८ डिसेंबर १८९०)
  • १९६१: बिहार चे माजी मुख्यमंत्री श्री कृष्ण सिन्हा यांचे निधन.
  • १९६९: अवतार मेहेरबाबा – आध्यात्मिक गुरू, मौनव्रती संत, त्यांनी सलग ४४ वर्षे मौनव्रत पाळले होते. (जन्म: २५ फेब्रुवारी १८९४ – पुणे, महाराष्ट्र)
  • १९७२: महेन्द्र – नेपाळचे राजे (जन्म: ? ? ????)
  • १९८६: विश्वनथ मोरे – संगीतकार (जन्म: ? ? ????)
  • १९९४: वसंत जोगळेकर – मराठी व हिन्दी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक (जन्म: ? ? ????)
  • १९९५: सुरेश शंकर नाडकर्णी – बँकिंग तज्ञ, ’रोखे बाजार नियामक मंडळाचे’ (SEBI) चे अध्यक्ष, पद्मभूषण (जन्म: ? ? ????)
  • २०००: कृष्ण नारायण तथा के. एन. सिंग – हिन्दी चित्रपटांतील गाजलेले खलनायक (जन्म: १ सप्टेंबर १९०८ – डेहराडून, उत्तराखंड)
  • २०००: वसंत कानेटकर – नाटककार (जन्म: २० मार्च १९२०)
  • २००४: सुरैय्या जमाल शेख ऊर्फ ’सुरैय्या – गायिका व अभिनेत्री (जन्म: १५ जून १९२९)
  • २००४: व्ही. जी. जोग – व्हायोलिनवादक (जन्म: २२ फेब्रुवारी १९२२)

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.
Facebook Comments Box

MSRTC: एसटीचा “आवडेल तेथे कोठेही प्रवास” महागला; सुधारित दर असे असतील

   Follow us on        
MSRTC: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) नुकतीच एसटी बस दरात १५ टक्क्यांची वाढ केली आहे. सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली असतानाच आता एसटी महामंडळाच्या “आवडेल तेथे कोठेही प्रवास” या सवलत योजनेच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) वतीने आवडेल त्या ठिकाणी कोठेही प्रवास करण्यासाठी “आवडेल तेथे कोठेही प्रवास” ही सवलत योजना प्रवाशांसाठी MSRTC मार्फत राबविली जाते. या योजनेअंतर्गत 7 दिवस व 4 दिवस याप्रमाणे बसेच्या प्रकारानुसार तसेच आंतरराज्यांसह प्रवास सुविधा उपलब्ध करुन दिली जाते. या योजने अंतर्गत येणाऱ्या बससेवांचे प्रतिटप्पा दरात वाढ करण्यात आली आहे. नवीन टप्पा दरपत्रकाप्रमाणे देण्यात येणाऱ्या पासचे सुधारीत दर, अटी व शर्ती लागू करण्यास सक्षम प्राधिकारी यांनी मंजुरी दिली आहे. हे दर १ फेब्रुवारी २०२५ पासून अंमलात येणार आहे.

पासचे सुधारित दर खालीलप्रमाणे

४ दिवसाच्या पासाचे मुल्य

वाहतूक सेवेचा प्रकार प्रौढ  मुले
साधी(साधी,जलद,रात्रसेवा,शहरी,व यशवंती(मिडी) आंतरराज्यसह 1814 910
शिवशाही (आसनी) आंतरराज्यसह 2533 1269
  १२ मीटर ई-बस ( ई-शिवाई ) 2861 1433

७ दिवसाच्या पासाचे मुल्य

वाहतूक सेवेचा प्रकार प्रौढ  मुले
साधी(साधी,जलद,रात्रसेवा,शहरी,व यशवंती(मिडी) आंतरराज्यसह 3171 1588
शिवशाही (आसनी) आंतरराज्यसह 4429 2217
  १२ मीटर ई-बस ( ई-शिवाई ) 5003 2504
Facebook Comments Box

दहावी बारावी परीक्षांना बुरखा घालून येणाऱ्यांवर बंदी आणावी; मंत्री नितेश राणे यांचे शिक्षण मंत्रालयाला पत्र

   Follow us on        

मुंबई – पुढच्या महिन्यात सुरू होणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक बोर्डाच्या बुरखा बंदीवरून नवा वाद निर्माण झाला आहे. फडणवीस सरकारमधील मंत्री नितेश राणे यांनी परीक्षेला बुरखा घालून येणाऱ्यांवर बंदी आणावी अशी मागणी केली आहे. राणेंनी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांना पत्र लिहून ज्या मुली बुरखा घालून परीक्षेला येतील त्यांना केंद्रावर प्रवेश देऊ नये असं म्हटलं आहे. राज्यात १० वी आणि १२ वीच्या परीक्षा काही दिवसांवर येऊन ठेपल्या असताना नितेश राणेंनी केलेल्या मागणीवर सरकार काय निर्णय घेते हे पाहणे गरजेचे आहे.

दहावीच्या परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू होत आहेत. त्याआधी मंत्री नितेश राणेंनी शिक्षणमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. त्यात म्हटलंय की, १० वी आणि १२ वी परीक्षा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या परीक्षा आहेत. या परीक्षेवर विद्यार्थ्यांचे भवितव्य अवलंबून असते. जर या परीक्षेत बुरखा घालून कुणी परीक्षा देत असेल तर संबंधित युवती इलेक्ट्रॉनिक डिवाईसचा वापर करून परीक्षेत हेराफेरी आणि कॉपीचीही शक्यता नाकारता येत नाही. जर अशा घटना घडल्या तर अनेक समस्या निर्माण होतील म्हणुन परीक्षेला बुरखा घालून येणाऱ्यांवर बंदी आणावी अशी विनंती त्यांनी केली आहे.

Facebook Comments Box

३० जानेवारी पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-प्रथम – 16:13:08 पर्यंत
  • नक्षत्र-श्रवण – 07:16:17 पर्यंत, धनिष्ठा – 29:51:37 पर्यंत
  • करण-भाव – 16:13:08 पर्यंत, बालव – 27:08:56 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-व्यतापता – 18:33:02 पर्यंत
  • वार- गुरूवार
  • सूर्योदय- 07:15
  • सूर्यास्त- 18:29
  • चन्द्र-राशि-मकर – 18:35:53 पर्यंत
  • चंद्रोदय- 07:52:59
  • चंद्रास्त- 19:26:59
  • ऋतु- शिशिर

जागतिक दिवस:
  • कुष्ठरोग निवारण दिन
  • नशा मुक्ती संकल्प आणि शपथ दिवस.
  • आंतरराष्ट्रीय सर्वोदय दिवस.
  • शहीद दिवस.
महत्त्वाच्या घटना:
  • १६४९: इंग्लंडचा राजा पहिला चार्ल्स याचा शिरच्छेद करण्यात आला.
  • १९३३: अ‍ॅडॉल्फ हिटलरचा जर्मनीचा राष्ट्राध्यक्ष (चॅन्सेलर) म्हणून शपथविधी झाला.
  • १९४८: नथुराम गोडसे याने मोहनदास करमचंद ऊर्फ ’महात्मा’ गांधी यांचा सायंकाळी ५ वाजून १७ मिनिटांनी प्रार्थना करीत असताना गोळ्या घालून खून केला.
  • १९७१: आजच्या दिवशी फोकर फ्रेंडशिप विमान चे अपहरण झाले होते.
  • १९७२: आजच्या दिवशी कॉमनवेल्थ मधून पाकिस्तान बाहेर निघाले.
  • १९९४: पीटर लेंको बुद्धिबळातील सर्वात लहान वयाचा ग्रँडमास्टर झाला.
  • १९९७: महात्मा गांधीच्या अस्थींचे त्यांचे पणतू तुषार अरूण गांधी यांनी अलाहाबाद येथील संगमात विसर्जन केले. ४७ वर्षे या अस्थी कटकमधील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या लॉकरमध्ये होत्या.
  • १९९९: पण्डित रविशंकर यांना ’भारतरत्‍न’
  • २००४: मंगळावर पाठविलेल्या अपॉर्चुनिटी अंतरीक्ष यानाने मंगळावर आयरन ऑक्साइड (गंज) असल्याचे शोधल्या गेले.
  • २००८: चेन्नई च्या विशेष न्यायालयाने स्टॅम्प घोटाळ्यातील मुख्य आरोपी अब्दुल करीम तेलगी ला न्यायालयाने १० वर्षाची शिक्षा सुनावली.
  • २००९: ऑस्ट्रेलिया च्या मिक्स ओपन मध्ये सानिया मिर्झा आणि महेश भूपती यांची जोडी अंतिम फेरीत पोहचले.
  • २००९: कोका कोला क्लासिक चे नाव बदलवून कोका कोला करण्यात आले.
  • २०१६: दक्षिण कोरिया ने त्याचे पहिले रॉकेट रॉकेट नारो-1 चे यशस्वी प्रक्षेपण केले.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १८८२: फ्रँकलिन डी. रुझव्हेल्ट – अमेरिकेचे ३२ वे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: १२ एप्रिल १९४५)
  • १८८९: हिन्दी भाषेतील प्रसिद्ध कवी जयशंकर प्रसाद यांचा जन्म.
  • १९१०: सी. सुब्रम्हण्यम – गांधीवादी नेते, केन्द्रीय मंत्री व महाराष्ट्राचे राज्यपाल (मृत्यू: ७ नोव्हेंबर २०००)
  • १९११: पं. गजाननबुवा जोशी – शास्त्रीय गायक (मृत्यू: २८ जून १९८७)
  • १९१३: प्रसिद्ध चित्रकार अमृता शेरगिल यांचा जन्म.
  • १९१७: वामन दत्तात्रय पटवर्धन – स्फोटके व शस्त्रास्त्र तज्ञ (मृत्यू: २७ जुलै २००७)
  • १९२७: ओलोफ पाल्मे – स्वीडनचे २६ वे पंतप्रधान (मृत्यू: २८ फेब्रुवारी १९८६)
  • १९२९: रमेश देव – हिंदी, मराठी चित्रपटांतील व रंगभूमीवरील अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक
  • १९३७: भारतीय न्यायाधीश के.टे. थॉमस यांचा जन्म.
  • १९४९: डॉ. सतीश आळेकर – नाटककार, दिग्दर्शक आणि निर्माते, ’थिएटर अ‍ॅकॅडमी’चे एक संस् थापक,’ नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’चे संचालक, साहित्य अकादमी पारितोषिक विजेते
  • १९५१: भारताचे केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांचा जन्म.
  • १९७५: भारतीय कलाकार अनुप सोनी यांचा जन्म.
  • १९८०: छोट्या पडद्यांवरील कलाकार गुरदीप कोहली यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १५२८: राजपूत राजवंशाचे राजा राणा संग्राम सिंह यांचा जन्म.
  • १९४८: ऑर्व्हिल राईट – आपला भाऊ विल्बर राईट याच्यासह इंजिनाच्या विमानाचा शोध लावणारे अमेरिकन अभियंते (जन्म: १९ ऑगस्ट १८७१)
  • १९४८: महात्मा गांधी (जन्म: २ आक्टोबर १८६९)
  • १९५१: फर्डिनांड पोर्श – ऑस्ट्रियन वाहन अभियंता (जन्म: ३ सप्टेंबर १८७५)
  • १९६०: प्रसिद्ध लेखक, समाजसेवक, नाथूराम प्रेमी यांचे निधन.
  • १९६०: गांधीवादी व्यक्तिमत्व जे.सी. कुमारप्पा यांचे निधन.
  • १९६८: प्रसिद्ध लेखक, कवी, माखन लाल चतुर्वेदी यांचे निधन.
  • १९९६: गोविंदराव पटवर्धन – हार्मोनियम व ऑर्गन वादक (जन्म: ? ? ????)
  • २०००: आचार्य जनार्दन हरी चिंचाळकर – मानववंशशास्त्रज्ञ व सामाजिक कार्यकर्ते (जन्म: ? ? ????)
  • २००४: रमेश अणावकर – गीतकार (जन्म: ? ? ????)

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.
Facebook Comments Box

बंद केलेली दादर-रत्नागिरी पॅसेंजर चालू करा अन्यथा ‘त्या’ गाड्या सोडू दिल्या जाणार नाही; रेल कामगार सेनेचा रेल्वेला इशारा

   Follow us on        
मुंबई : जवळपास वीस वर्षे दादर जंक्शनवरून रत्नागिरीसाठी सुटणारी पॅसेंजर बंद करून त्याच प्लॅटफॉर्मवरून त्याच वेळेत गोरखपुर तसेच बलिया मार्गावर गाड्या चालवणाऱ्या मध्य रेल्वे प्रशासनाला माजी खासदार विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज दणका दिला. दि. ९ जानेवारीला दिलेल्या पत्राची आठवण करून देत ही गाडी पूर्वीप्रमाणे दादर येथून सुटली नाही तर येत्या १ मार्चला गोरखपूर आणि बलिया ट्रेन सुटू देणार नाही, असा सज्जड लेखी इशारा कोकणवासीयांच्या वतीने मध्य रेल्वे प्रशासनाला देण्यात आला आहे.
“दादर-रत्नागिरी आणि दादर-सावंतवाडी ह्या पॅसेंजर ट्रेन पूर्वीच्या वेळेनुसार सुरु करण्यासंदर्भात आम्ही यापूर्वी दि.०१.०१.२०२५ रोजी आपणास भेटून विनंती केली होती. आपणही लवकरात लवकर सदर दोन्ही ट्रेन लवकरच सुरु करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु आज सुमारे १९ दिवस होऊनही याबाबत कोणतीही कार्यवाही झाली नसल्याचे दिसून येते. समस्त कोकणवासिय न्याय मागण्यासाठी सातत्याने आपणाकडे विनंतीवजा पाठपुरावा करीत असूनही आपणाकडून जाणूनबुजून दिरंगाई केली जात असल्याची शंका आम्हा सर्वांना येत आहे. यास्तव पुनःश्च आपणास विनंती करण्यात येते की, दादर-रत्नागिरी आणि दादर-सावंतवाडी ह्या पॅसेंजर ट्रेन पूर्वीच्या वेळेनुसार तातडीने सुरु कराव्यात. यासंदर्भात रेल्वे विभागाकडून योग्य ती कार्यवाही न झाल्यास दि. १ मार्च २०२५ रोजी दादर स्टेशनवरून सुटणाऱ्या दादर-गोरखपूर आणि दादर-बरेली ह्या ट्रेनसमोर रेल रोको आंदोलन केले जाईल आणि दादर-गोरखपूर आणि दादर-बरेली ह्या रेल्वे सोडू दिल्या जाणार नाही कृपया याची नोंद घ्यावी.” अशा शब्दात हा इशारा माजी खासदार विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज दिला आहे.
Facebook Comments Box

सिंधदुर्ग जिल्ह्यातील परप्रांतीय फेरीवाल्यांविरोधात पालकमंत्री नितेश राणे यांचे मोठे विधान

   Follow us on        
सिंधुदुर्ग :सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची धुरा हाती घेतल्यानंतर भाजप नेते आणि मत्स्य विकास मंत्री नितेश राणे परप्रांतीय फेरीवाल्यांविरोधात आक्रमक झाले आहेत. बाहेरून आलेल्या परप्रांतीय फेरीवाल्यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातून बाहेर काढणार असे विधान त्यांनी केले आहे.
माझ्या जिल्ह्यामध्ये परप्रांतीयांची मस्ती चालणार नाही. युपी- बिहार आणि बाहेरचे फेरीवाले इथे आले आहेत त्यांना जिल्ह्यातून बाहेर काढणार. जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने आपण जिल्ह्याच्या नागरिकांच्या सुरक्षितेतसाठी कोणतीही तडजोड करणार नसल्याचे ते म्हणाले.
अलीकडच्या काळात सिंधुदुर्ग जिल्ह्यात परप्रांतीय फेरीवाल्यांच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. कोकण रेल्वे मार्गावरून युपी बिहारला थेट जाणाऱ्या रेल्वे गाड्यांमुळे ही संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यांच्या वाढत्या संख्येबरोबर जिल्ह्यातील नागरिकांचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. काही परप्रांतीय बेकायदेशीररित्या अवैध ड्रुग्स आणि दारूच्या तस्करी मध्ये आढळून आले आहेत. या पार्श्ववभूमीवर मंत्री नितेश राणे यांनी हे विधान केले आहे.
Facebook Comments Box

मुंबई गोवा महामार्ग इथेही ‘बदनाम’

   Follow us on        
Mumbai Goa Highway:मुंबई गोवा महामार्गाचे काम काही केल्या पूर्णच होत नाही आहे. कोकणवासीयांना मिळत आहेत त्या पुढे ढकलत जाणाऱ्या फक्त तारखा! गेल्या १७ वर्षांपासून या महामार्गाचे रखडले काम, सुमार दर्जाचे काम या महामार्गावरून नेहमीच टीकेची झोड उठत आहे. हे कमी होते म्हणून की काय या महामार्गाविषयी नकोशी वाटणारी अजून एक बातमी समोर आली आहे.
कोकणातून जाणाऱ्या मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या चार कंपन्यांना शासनाचा साडे नऊ कोटी कर थकविल्याचे उघडकीस आले आहे.  गौण खनिज उत्खननाचा  कर  (रॉयल्टी) न  भरल्याने जिल्हा प्रशासनाकडून या कंपन्यांना  नोटिस बजावण्यात आली आहे. या चार ही  कंपन्यांना जिल्हा प्रशासनाकडून ३१ मार्चपर्यंत कर भरण्याची मुदत देण्यात आली आहे. मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या ईगल इन्फ्रा प्रा. लि., चेकत इंटरप्रायझेस, रवी इन्फ्रा, जे. एस. म्हात्रे या कंपन्यांनी सुमारे साडेनऊ कोटी एवढा कर थकविला आहे.
मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या काम वेगाने सुरु आहे. या कामाचे  सहा टप्पे करून वेगवेगळ्या कंपन्यांना त्याचा ठेका देण्यात आला होता. त्यापैकी काही कंपन्यांनी काम सोडले. मात्र दुसऱ्या कंपन्यांना हे काम देण्यात आले. डिसेंबर २०२५ हा महामार्ग पुर्ण करण्याची डेडलाईन देण्यात आली आहे. अनेक ठिकाणी चौपदरीकरण झाले आहे. काही टप्प्यातच हे काम शिल्लक असताना ठेकेदार कंपन्यांना जिल्हा प्रशासनाने दुसरा दणका दिला आहे. कंपन्यांनी केलेल्या उत्खननापैकी अनेक कंपन्यांनी गौण खनिज उत्खननाचा कर  भरला नसल्याचे पुढे आले आहे. महामार्गाचे काम करताना काळ्या दगडाचे मोठ्या प्रमाणात उत्खनन झाले आहे. त्या तुलनेत कंपन्यांनी रॉयल्टी भरलेली नाही.मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या चार कंपन्यांनी शासनाचा साडे नऊ कोटी रुपये  कर थकविला आहे.  इलोक्टॉनिक टोटल स्टेशन (ईटीएस), ईगल इन्फ्रा प्रा, लि (मकरंद गांधी),चेतक इंटरप्रायझेस, रवी इन्फ्रा अशी त्या चार कर बुडविणाऱ्या कंपनीची नावे आहेत.
Facebook Comments Box

प्रयागराज कुंभमेळ्यात चेंगराचेंगरी; १४ हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती, शाही स्नान रद्द

   Follow us on        

Mahakumbh Stampede Prayagraj : कुंभ मेळ्याच्या दुसऱ्या शाही स्नानापूर्वी म्हणजेच मौनी अमावस्येपूर्वी प्रयागराजच्या त्रिवेणी संगम परिसरात चेंगराचेंगरी झाली. या अपघातात 14 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा केली आहे. विशेष खबरदारी घेत, आखाडा परिषदेने शाही स्नान रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

संगम परिसरातून लोकांना बाहेर काढण्यासाठी बॅरिकेडिंग हटवण्यात आले आहे. पण तरीही नदीच्या काठावर अजूनही लोकांची तुफान गर्दी आहे. चेंगराचेंगरीनंतरही लोक संगमावर पोहोचण्याच्या प्रयत्नात आहे. साधू आणि संत लोकांना संगम परिसरात न जाण्याचं आवाहन करत आहेत.

13 जानेवारीपासून सुरू झालेल्या महाकुंभमेळ्यात आतापर्यंत सुमारे १५ कोटी लोकांनी गंगा नदीत स्नान केलं आहे. आज म्हणजेच बुधवारी मौनी अमावस्येला 10 कोटींहून अधिक भाविक येण्याची शक्यता आहे. मात्र, आता एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेल्या या दुर्घटनेमुळे परिसरातील गर्दी कमी ठेवण्याचं मोठं आवाहन यंत्रणांसमोर असणार आहे.

 

 

Facebook Comments Box

२९ जानेवारी पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-अमावस्या – 18:08:09 पर्यंत
  • नक्षत्र-उत्तराषाढ़ा – 08:21:31 पर्यंत
  • करण-नागा – 18:08:09 पर्यंत, किन्स्तुघ्ना – 29:13:11 पर्यंत
  • पक्ष- कृष्ण
  • योग-सिद्वि – 21:21:19 पर्यंत
  • वार- बुधवार
  • सूर्योदय- 07:16
  • सूर्यास्त- 18:28
  • चन्द्र-राशि-मकर
  • चंद्रोदय- चंद्रोदय नाही
  • चंद्रास्त- 18:25:00
  • ऋतु- शिशिर

महत्त्वाच्या घटना:
  • १७८०: जेम्स ऑगस्टस हिकी यांनी ’कलकत्ता जनरल अ‍ॅडव्हर्टायझर’ या नावाने एक साप्ताहिक सुरू केले. पुढे याचे वर्तमानपत्रात रुपांतर झाले. ’हिकी’ज बेंगॉल गॅझेट’ या नावाने ओळखले जाणारे हे वृत्तपत्र म्हणजे भारतातील पत्रकारितेची सुरुवात मानली जाते.
  • १८६१: कॅन्सास हे अमेरिकेचे ३४ वे राज्य बनले.
  • १८८६: कार्ल बेंझ याला जगातील पहिल्या इंजिनवर चालणार्‍या मोटरगाडीचे पेटंट मिळाले.
  • १९७५: इंडियन नॅशनल थिएटर निर्मित आणि पु. ल. देशपांडे यांनी लिहिलेल्या व दिग्दर्शित केलेल्या ’ती फुलराणी’ या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबईतील रविंद्र नाट्यमंदिर येथे झाला.
  • १९८९: हंगेरीने दक्षिण कोरियाबरोबर राजनैतिक संबंध प्रस्थापित केले.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १२७४: संत निवृत्तीनाथ (मृत्यू: १७ जून १२९७)
  • १७३७: थॉमस पेन – अमेरिकन विचारवंत, राजकारणी आणि क्रांतिकारक (मृत्यू: ८ जून १८०९)
  • १८४३: विल्यम मॅक किनले – अमेरिकेचे २५ वे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: १४ सप्टेंबर १९०१)
  • १८५३: मधुसूदन राव – आधुनिक ओडिया साहित्याच्या तीन प्रवर्तकांतील एक प्रवर्तक. ओरिसावर मराठ्यांचे राज्य असताना महाराष्ट्रातून जी कुटुंबे ओरिसात जाऊन स्थायिक झाली, त्यांपैकी एका कुटुंबात जन्म. (मृत्यू: ? ? १९१२)
  • १८६०: अंतॉन चेकॉव्ह – रशियन कथाकार व नाटककार. याने मॉस्को विद्यापीठातून वैद्यकीय पदवीघेतली होती मात्र वैद्यकीय व्यवसाय कधी केला नाही. (मृत्यू: १५ जुलै १९०४)
  • १८६६: रोमें रोलाँ – साहित्यातील नोबेल पारितोषिक (१९१५) विजेते फ्रेन्च लेखक, नाटककार व संगीत समीक्षक (मृत्यू: ३० डिसेंबर १९४४)
  • १९२२: प्रो. राजेंद्र सिंग ऊर्फ ’रज्जू भैय्या’ – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ४ थे सरसंघचालक (मृत्यू: १४ जुलै २००३)
  • १९२६: डॉ. मोहम्मद अब्दूस सलाम – भौतिकशास्त्रज्ञ, नोबेल पारितोषिक विजेते (१९७९) एकमेव पाकिस्तानी, विज्ञानातील नोबेल पारितोषिक विजेते एकमेव मुस्लिम (मृत्यू: २१ नोव्हेंबर १९९६ – ऑक्सफर्ड, इंग्लंड)
  • १९५१: अँडी रॉबर्टस – वेस्ट इंडिजचा जलदगती गोलंदाज
  • १९७०: राज्यवर्धनसिंग राठोड – ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता भारतीय नेमबाज

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १५९७: महाराणा प्रताप – मेवाडचा सम्राट (जन्म: ९ मे १५४०)
  • १८२०: जॉर्ज (तिसरा) – इंग्लंडचा राजा (जन्म: ४ जून १७३८)
  • १९३४: फ्रिटझ हेबर – नायट्रोजनपासून मोठ्या प्रमाणावर अमोनिआ वायू मिळवण्याची पद्धत शोधल्याबद्दल नोबेल पारितोषिक मिळालेले (१९१८) जर्मन रसायनशास्त्रज्ञ. (जन्म: ९ डिसेंबर १८६८ – वॉर्क्लॉ, पोलंड)
  • १९६३: रॉबर्ट फ्रॉस्ट – अमेरिकन कवी (जन्म: २६ मार्च १८७४)
  • १९६३: सदाशिव आत्माराम जोगळेकर – लेखक व संपादक. अहिल्या आणि इतर कथा, घारापुरी (१९४८), संयुक्त महाराष्ट्राचा ज्ञानकोश, सुलभ विश्वकोश ही त्यांची काही पुस्तके आहेत. (जन्म: ? ? ????)
  • १९९३: रँग्लर गोपाळकृष्ण लक्ष्मण चंद्रात्रेय – गणितज्ञ (जन्म: ? ? ????)
  • १९९५: रुपेश कुमार – रुपेरी पडद्यावरील खलनायक, निर्माते व दिग्दर्शक (जन्म: ? ? ????)
  • २०००: पांडुरंग सावळाराम तथा काका वडके – शिवसेना नेते (जन्म: ? ? ????)
  • २०००: देवेन्द्र मुर्डेश्वर – बासरीवादक (जन्म: ? ? ????)
  • २००१: राम मेघे – महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री (जन्म: ? ? ????)

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.
Facebook Comments Box

गोवा सरकार चालविणार ‘महाकुंभमेळा विशेष रेल्वे’ सेवा; भाविकांना मिळणार विशेष सोयी

   Follow us on        
पणजी : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे चालू असलेल्या महाकुंभमेळ्याला जाण्यासाठी गोव्यातून विशेष रेल्वे सेवा सुरु करण्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जाहीर केले आहे. या रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक लवकरच घोषित करण्यात येणार असून गरज भासेल त्याप्रमाणे रेल्वेगाड्यांची संख्या वाढवण्याचा विचार त्यांनी बोलून दाखवला आहे. येत्या ४ दिवसांत या गाड्यांचा मार्ग, वेळापत्रक आणि आरक्षण इत्यादी जाहीर करण्यात येणार आहे.
याशिवाय या प्रवासाला गोवा सरकारतर्फे सवलतीचे तिकीटदर आकारण्यात येणार आहे. तसेच प्रवासात सरकारतर्फे मार्गदर्शक (गाईड्स) नेमण्यात येणार आहेत. तसेच भाविकांचा प्रवास सुखकर आणि आरामदायी होण्यासाठी ईतर सुविधा देण्यात येतील अशी माहिती त्यांनी दिली.
जगातील सर्वात मोठ्या धार्मिक सोहळ्यांपैकी एक असलेल्या महा कुंभमेळ्याला यावर्षी लाखो भक्त आणि पर्यटक भेट देत आहेत. 13 जानेवारी 2025 पासून सुरू होणारा हा भव्य सोहळा 26 फेब्रुवारी 2025 पर्यंत चालणार आहे.
Facebook Comments Box

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search