Category Archives: अपघात

रत्नागिरीत दोन एसटी बस आणि कारचा विचित्र अपघात; २२ प्रवासी जखमी

   Follow us on        

रत्नागिरी

रत्नागिरी शहराजवळील भाट्ये येथील झरी विनायक मंदिरा जवळील चढाावर शनिवारी सकाळी दोन एसटी बस आणि एका कारचा विचित्र अपघात झाला. रत्नागिरीहून पावसकडे जाणारी आणि पावसकडून रत्नागिरीकडे येणाऱ्या दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या. या अपघातानंतर पाठीमागून वेगाने येणारी कार अनियंत्रित होऊन एसटी बसवर आदळली.

​या विचित्र तिहेरी अपघातात बसमधील तसेच कारमधील मिळून २२ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि प्रशासनाने घटनास्थलळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.

​अपघातामुळे रत्नागिरी-पावस मार्गावरील वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली. रस्त्याच्या दोन्ही बाजूूना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दरम्यान, अपघातग्रस्त वाहने रस्त्यावरून बाजूला करण्याचे काम प्रशासनाकडून हाती घेण्यात आले.

Konkan Railway: प्रवाशाचा जीव वाचवणार्‍या कोकण रेल्वेच्या कर्मचाऱ्याचा रोख रक्कम देवून गौरव

   Follow us on        

Konkan Railway: कोंकण रेल्वे मार्गावरील सुरतकळ रेल्वे स्थानकावर एका सतर्क आणि कर्तव्यकठोर कर्मचाऱ्यामुळे एकाचा जीव वाचला आहे. शनिवार, १० ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी बरोबर १२ वाजून १२ मिनिटांच्या सुमारास एक थरारक घटना घडली. माडगाव येथून निघून मंगळुरू सेंट्रलकडे जाणारी मेमू एक्स्प्रेस (गाडी क्रमांक १०१०७) सुरतकळ स्थानकावरून मार्गस्थ होत असताना हा प्रकार समोर आला. चालती झालेली ट्रेन पकडण्याच्या प्रयत्नात एका प्रवाशाचा जीव धोक्यात आला होता, मात्र कर्मचाऱ्याच्या तत्परतेने अनर्थ टळला.

​मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित ट्रेन स्थानकावरून हळूहळू पुढे जात असताना एक प्रवासी धावत फलाटावर आला. त्याने चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न केला, परंतु यादरम्यान अचानक त्याचा तोल गेला. तोल गेल्यामुळे हा प्रवासी थेट धावती ट्रेन आणि रेल्वे फलाट यांच्यातील संकटाच्या फटीमध्ये पडण्याच्या अत्यंत धोकादायक स्थितीत पोहोचला. परिस्थितीचे गांभीर्य समजण्यास सेकंदाचाही अवकाश नव्हता आणि प्रवाशाचा जीव जाऊ शकला असता.

​त्याच वेळी घटनास्थळावर अत्यंत सतर्क असलेले कोंकण रेल्वेचे पॉईंट्समन संदीप नाईक हे कर्तव्यावर हजर होते. प्रवाशाचा अपघाताच्या दिशेने जाणारा तोल आणि निर्माण झालेला जीवघेणा धोका त्यांनी क्षणात हेरला. क्षणाचाही विलंब न करता संदीप नाईक यांनी जीवाची पर्वा न करता त्या दिशेने विजेच्या वेगाने धाव घेतली. आपल्या जीवाची बाजी लावत त्यांनी धावत्या ट्रेनजवळ पोहोचून त्या प्रवाशाला घट्ट धरले आणि फटीत जाण्यापासून ओढून सुरक्षित ठिकाणी आणले.

​संदीप नाईक यांच्या या उत्कृष्ट उपस्थितीमुळे आणि प्रसंगावधानामुळे एका निष्पाप प्रवाशाचा जीव वाचलाच, शिवाय एक मोठी रेल्वे दुर्घटना टळली. त्यांच्या या साहसी आणि धाडसी कृत्याची दखल कोंकण रेल्वे प्रशासनाने तातडीने घेतली. प्रवाशांच्या सुरक्षेबाबत दाखवलेली ही अतूट कर्तव्यनिष्ठा आणि शौर्य पाहून कोंकण रेल्वेच्या सीएमडी यांनी संदीप नाईक यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.

​या धाडसी कामगिरीबद्दल कोंकण रेल्वेच्या वतीने संदीप नाईक यांना १०,००० रुपयांचे रोख बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले. सुरतकळ रेल्वे स्थानकावर घडलेल्या या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरल्यानंतर सर्वत्र संदीप नाईक यांच्या तत्परतेचे आणि धाडसाचे कौतुक होत आहे.

 

View this post on Instagram

 

मालवणच्या तरुणाचा भूतानमध्ये अपघातात दुर्दैवी मृत्यू

   Follow us on        

मालवण तालुक्यातील कुंभारमाठ येथील रहिवासी असलेले शैलेश शिवाजी कांबळे हे सहलीसाठी भूतानला गेले होते. तिथे असताना एका पुलावरून दुचाकीवरून जात असताना त्यांचा दुर्दैवी अपघात झाला आणि ते थेट खालील नदीच्या पात्रात पडले. या घटनेत त्यांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक माहिती समोर आली आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, शैलेश हे व्यवसायाने संगणक अभियंता होते. ते १ जुलै रोजी भूतानला सहलीसाठी रवाना झाले होते. त्यांचा दौरा ६ जुलैपर्यंत निश्चित होता, परंतु त्यांनी तिथे मुक्काम वाढवून ११ जुलैपर्यंत पर्यटन करण्याचा निर्णय घेतला होता. ११ जुलै रोजी सकाळी ते परत येणार होते, मात्र त्याच दिवशी हा काळा दिवस उजाडला.

​अपघाताची बातमी समजताच कांबळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यांच्या मुलाचा तातडीने शोध घेण्यासाठी कुटुंबीयांनी प्रशासनाकडे पाठपुरावा केला आणि भारतीय दूतावासाकडे मदतीची याचना केली. यानंतर शैलेश यांचे वडील आणि काही नातेवाईक तातडीने भूतानला पोहोचले, जिथे स्थानिक पोलीस प्रशासनाने शोधमोहीम राबवली.

​अनेक दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर शैलेश यांचा मृतदेह सापडला. आवश्यक ती कायदेशीर प्रक्रिया आणि ओळख पटवल्यानंतर भूतान प्रशासनाने मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिला. १० ऑगस्ट रोजी शैलेश यांच्यावर भूतानमध्येच शोकसागरात अंत्यसंस्कार करण्यात आले.

​ऐन तारुण्यात शैलेशचा अशा प्रकारे दुर्दैवी अंत झाल्याने कुंभारमाठ परिसर आणि संपूर्ण मालवण शहरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या जाण्याने कुटुंबाची कधीही भरून न येणारी हानी झाली आहे.

आंबोलीत पर्यटनासाठी आलेल्या ५० वर्षीय व्यक्तीचा चिरेखाणीच्या पाण्यात बुडून मृत्यू

   Follow us on        

आंबोली: आंबोलीमध्ये पर्यटनासाठी आलेले ५० वर्षीय संजय लक्ष्मण गांवकर यांचा चिरेखाणीतील साचलेल्या खोल पाण्यात बुडून सोमवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास दुर्दैवी मृत्यू झाला. कालच ईथे सर्पदंशाने एका पर्यटकाचा जीव गेल्याची घटना ताजी असतानाच, आंबोलीत पुन्हा एकदा अशीच दुसरी दुर्देवी घटना घडल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

​मृत संजय गांवकर हे মাজगाव उद्यमनगर येथील ‘हिंदुस्थान पॉलिमर्स’ या कंपनीत नोकरी करत होते. त्यांच्यासह कंपनीतील एकूण ११ कर्मचारी वर्ग मजगाव आणि इन्सुली परिसरातून फिरण्यासाठी आंबोली येथे दाखल झाला होता.

​दुपारी सतिचीवाडी परिसरातील एका चिरेखाणीच्या पाण्यात उतरल्यानंतर अचानक संजय गांवकर यांचा अंदाज चुकला व ते खोल पाण्यात गेले. त्यांना वाचवण्यासाठी त्यांच्यासोबत असलेल्या सहकाऱ्यांनी तातडीने शर्थीचे प्रयत्न केले, परंतु दुर्दैवाने त्यांना यश येऊ शकले नाही.

​या दुर्घटनेची त्वरित माहिती मिळताच माजी सरपंच शशिकांत गावडे यांनी आंबोली पोलीस दूरक्षेत्र आणि रेस्क्यू टीमशी संपर्क साधला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन सह्याद्री एडव्हेंचर आंबोली तसेच सांगेलीच्या रेस्क्यू पथकातील सदस्य तात्काळ घटनास्थळी धडकले.

​या बचाव मोहिमेदरम्यान रेस्क्यू टीममधील अजित नार्वेकर यांनी प्रसंगावधान राखत खोल पाण्यात उतरून संजय गांवकर यांचा मृतदेह बाहेर काढला. याकार्यात राजू राऊळ, उत्तम नार्वेकर, नारायण चव्हाण, दीपक मेस्त्री, सुजीत नायर, प्रथमेश गावडे, कमलेश गावडे, गिरीश गावडे आणि विराज गावडे यांनी मोलाची साथ दिली असून, आंबोली पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.

आंबोली घाटात ४०० फूट दरीत पडलेल्या त्या तरुणाचा मृत्यू

   Follow us on        

आंबोली: निसर्गरम्य आंबोली परिसरात फिरण्यासाठी गेलेल्या एका पर्यटकाचा सुमारे ४०० फूट खोल दरीत कोसळून भीषण मृत्यू झाल्याची मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. डॉ. आयुब सय्यद (वय ४५, रा. जत्राट, निपाणी, जि. बेळगाव) असे दरीत कोसळलेल्या दुर्दैवी पर्यटकाचे नाव असून, ते आपल्या नऊ मित्रांसह आंबोलीत पर्यटनासाठी आले होते.

​मंगळवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास हा मित्रपरिवार महादेवगड पॉईंट परिसरात फिरत असताना, डॉ. आयुब हे लघुशंकेसाठी सुरक्षिततेच्या रेलिंगवरून पलीकडे गेले. यादरम्यान अचानक तोल गेल्याने ते थेट सुमारे ४०० फूट खोल दरीत कोसळले. तिथे मका विकणाऱ्या एका स्थानिक विक्रेत्याने त्यांना खाली पडताना पाहताच सहकाऱ्यांना तातडीने याची माहिती दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मकदून आपल्या पथкаसह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आंबोलीच्या ‘सह्याद्री एडव्हेंचर रेस्क्यू टीम’ला पाचारण करून शोधमोहीम सुरू केली. परंतु, परिसरात सुरू असलेला मुसळधार पाऊस, दाट धुके आणि अंधार यामुळे मंगळवारी संध्याकाळी ७ वाजता ही बचाव मोहीम तात्पुरती थांबवावी लागली होती.

​बुधवारी सकाळी पहाटेपासून सावंतवाडी पोलीस, स्थानिक प्रशासन आणि रेस्क्यू टीमने पुन्हा एकदा वेगाने शोधमोहीम हाती घेतली. सकाळी दहाच्या सुमारास खोल दरीत डॉ. आयुब सय्यद यांचा मृतदेह शोधण्यात पथकाला यश आले. सध्या रेस्क्यू टीमच्या साह्याने मृतदेह दरीतून बाहेर काढण्याचे काम सुरू असून, या अचानक घडलेल्या दुर्घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

आंबोली घाटात अपघात! तरुण ४०० फूट दरीत पडला; शोधमोहीम सुरू

   Follow us on        

​आंबोली:

वर्षा पर्यटनाचा मनसोक्त आनंद घेण्यासाठी आलेले बेळगाव जिल्ह्यातील निपाणी येथील डॉ. आयूब सय्यद (वय ४५, रा. जत्राट, निपाणी, जि. बेळगाव) हे मंगळवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास आंबोलीतील महादेवगड पॉईंटवरून सुमारे ४०० फूट खोल दरीत कोसळल्याची दुर्देवी घटना घडली आहे. डॉ. सय्यद हे आपल्या नऊ सहकाऱ्यांसोबत मंगळवारी सकाळी आंबोलीत आले होते. सायंकाळी महादेवगड पॉईंट परिसरात फिरत असताना, लघुशंकेसाठी ते दरीच्या बाजूला असलेल्या सुरक्षेच्या रेलिंगवरून पलीकडे गेले आणि अचानक त्यांचा तोल गेल्याने ते थेट दरीत कोसळले. पॉईंटवर मक्याची कणसे विकणाऱ्या एका स्थानिक विक्रेत्याने हा अपघात पाहताच त्यांच्या सहकाऱ्यांना तात्काळ याची माहिती दिली.

​घटनेची माहिती मिळताच सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम आपल्या पथкаसह आणि आंबोलीतील ‘सह्याद्री एडव्हेंचर रेस्क्यू टीम’ने तातडीने घटनास्थळी धाव घेत शोधमोहीम हाती घेतली. मात्र, परिसरात सुरू असलेला संततधार पाऊस, दाट धुके आणि अंधार यामुळे मंगळवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही शोधमोहीम तात्पुरती थांबवावी लागली.

​रेस्क्यू टीमच्या माहितीनुसार, संबंधित पर्यटक पारपोली येथील सिद्धेश्वर मंदिरापासून सुमारे दोनशे फूट पुढे असलेल्या जंगल भागात कोसळला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अपघाताच्या ठिकाणीच संबंधित व्यक्तीचा मोबाईल राहिल्यामुळे मोबाईल लोकेशनच्या आधारे शोध घेणे अशक्य झाले आहे. या प्रतिकूल हवामानामुळे थांबवण्यात आलेली रेस्क्यू मोहीम बुधवारी सकाळी लवकर पुन्हा सुरू करण्यात येणार असून, त्यानंतरच नेमकी परिस्थिती स्पष्ट होईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

 

कुटगिरी येथे लोखंडी पूल कोसळल्याची दुर्घटना: एका बैलाचा मृत्यू, ६ जनावरे गंभीर जखमी

   Follow us on        

गुहागर शहर : तालुक्यातील कुटगिरी गावठाणवाडी परिसरातील नदीवरील लोखंडी पूल सोमवारी सायंकाळी ७:३० वाजता अचानक कोसळल्याची मोठी दुर्घटना घडली. पूल कोसळत असताना त्यावरून जात असलेली सुमारे १० ते १२ जनावरे पुलाखाली अडकल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. या दुर्घटनेमध्ये दिलीप गुरव यांच्या मालकीच्या एका बैलाचा मृत्यू झाला असून, अन्य ६ जनावरे गंभीर जखमी झाल्याची माहिती गुहागर आपत्ती विभागाकडून प्राप्त झाली आहे.

​घटना घडताच स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र, नदीत मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने तसेच पुलाचे जड लोखंडी साहित्य जनावरांवर कोसळल्यामुळे बचावकार्य करताना मोठ्या अडचणी निर्माण झाल्या होत्या. काही ग्रामस्थ नदीत उतरून जनावरे वाचवण्याचा प्रयत्न करत असले तरी, लोखंडी रचना हटवल्याशिवाय अनेक जनावरांना बाहेर काढणे शक्य होत नव्हते.

​घटनेची माहिती मिळताच मंडळ अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. तसेच, जिल्हा परिषद बांधकाम उपअभियंता व पशुवैद्यकीय अधिकारी यांना घटनास्थळी पोहोचण्याच्या सूचना गुहागर आपत्ती विभागाकडून देण्यात आल्या होत्या. त्यानंतर स्थानिक नागरिक व प्रशासनाच्या मदतीने दुर्घटनेत मृत झालेल्या बैलासह सर्व जखमी ६ जनावरांना अखेर सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.

चिरेकापणीच्या मशिनवर पडून कामगाराचा मृत्यू

   Follow us on        

देवगड:

तालुक्यातील लिंगडाळ येथील एका चिरेखाणीवर काम करणारा सुखदेव बड्डा टेकाम (३६, मूळ रा. कोडल, तेंडूखेडा, जि. दमोह, रा. मध्य प्रदेश) हा कामगार चिरे कापण्याच्या मशिनवर पडून गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. ही दुर्घटना २७ जून, २०२६ रोजी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास घडली. लिंगडाळ येथील चिरेखाणीवर काम करत असताना तो अचानक मशिनवर पडल्याने त्याच्या गळ्याला गंभीर दुखापत होऊन तोंडातून रक्तस्राव झाला.

​ही बाब लक्षात येताच इतर कामगारांनी त्याला तातडीने देवगड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, परंतु उपचार सुरू करण्यापूर्वीच तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. त्यानंतर त्याचा मृतदेह अंत्यविधीसाठी त्याच्या मूळ गावी नेण्यात आला.

​या प्रकरणी सुखदेव टेकाम (२६, रा. कोडल) यांनी २९ जून रोजी तेंडूखेडा पोलीस स्थानकात फिर्याद दिली असून, सुरुवातीला तिथे आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. घटना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड पोलीस स्थानकाच्या हद्दीत घडल्याने, तेंडूखेडा पोलिसांनी हे प्रकरण तपासासाठी सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक कार्यालयामार्फत देवगड पोलीस स्थानकाकडे वर्ग केले. त्यानुसार देवगड पोलीस स्थानकात मंगळवारी रात्री उशिरा या घटनेची नोंद करण्यात आली असून, पोलीस निरीक्षक श्याम बुवा यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संतोष उगलमुले पुढील तपास करत आहेत.

सावंतवाडी: ४५ प्रवासी असलेली कदंबा बस कलंडली; मोठी दुर्घटना टळली

   Follow us on        

सावंतवाडी : गोवा राज्याची कदंबा प्रवासी बस आजगावकडून दुचाकी वाहन चालकाला वाचवताना कलंडली, ज्यामध्ये ४५ प्रवासी बालबाल बचावले असून चालकाच्या प्रसंगवधानामुळे मोठी हानी टळली आहे. गोवा येथील पणजी येथून संध्याकाळी साडेचार वाजता सुटणारी पणजी शिरोडा मार्गे वेंगुर्ला ही वस्तीची गाडी शिरोडाच्या दिशेने येत असताना आजगाव वाघबीळाजवळ आली. या वेळी मळेवाडच्या दिशेने चार चाकी गाडी जात असताना त्या घातक वळणावर दुचाकी वाहन चालकाने ओव्हर टेक करण्याचा प्रयत्न केला, आणि त्या दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या नादात ही बस खोलदूरीच्या काही फूट अंतरावर कलंडली.

​या बसमध्ये एकूण ४५ प्रवासी प्रवास करत होते, ज्यांना आपत्कालीन दरवाज्यातून बाहेर काढण्यात आले. या बसचे चालक धनंजय आसोलकर व वाहक सर्वेश नाईक यांनी प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले, तसेच या वेळी परिसरातील ग्रामस्थांनी धाव घेऊन प्रवाशांना वाचवण्यात मदत केली.

या प्रवाशांपैकी कोणालाही दुखापत झालेली नाही, परंतु काही फूट अंतरावर जर ही बस कलंडली असती तर किमान २०० फूट खोल दरीत ही बस कोसळून मोठा अपघात झाला असता. बस चालकाच्या प्रसंगवधानामुळे बस अलिकडेच कलंडली आणि दुचाकीस्वाराच्या चुकीमुळे ४५ प्रवाशांचे जीव धोक्यात जाणार होते, मात्र चालकाच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली.

सावंतवाडी-कुडाळ रस्त्यावर भीषण अपघात: दुचाकीवरील तरुण-तरुणीचा दुर्दैवी मृत्यू

   Follow us on        

सामंतवाडी:

सावंतवाडी-कुडाळ रस्त्यावरील कोलगाव मियासाब दर्ग्या जवळ (समाधीजवळ) दुचाकी आणि स्विफ्ट कार यांच्यात भीषण रस्ता अपघात घडला. या अपघातात दुचाकीवरून जाणाऱ्या तरुण आणि तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आयुषी देसाई असे तरुणीचे नाव असून तिचा जागीच मृत्यू झाला, तर कार्तिक परब या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

​मिळालेल्या माहितीनुसार, कुडाळच्या दिशेने जाणारी दुचाकी (क्रमांक GA 03 AB 7501) आणि सावंतवाडीच्या दिशेने येणारी स्विफ्ट कार (क्रमांक MH 07 AG 7801) यांच्यात जोरदार धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की दुचाकीवरील दोघेही उडून रस्त्यावर फेकल गेले. अपघाताच्या तीव्रतेमुळे स्विफ्ट कार रस्त्याशेजारील गटारात जाऊन कोसळली आणि कारच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले.

​घटनेनंतर स्थानिक नागरिक महेश बांदेकर, कृष्णा धुळपनावर आणि लाडू रायका यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी उपचारास सुरुवात केली, मात्र उपचारादरम्यान कार्तिक परब यांची प्राणज्योत मालवली. माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अपघातानंतर स्विफ्ट कारच्या चालकाचा पोलीस शोध घेत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस फौजदार राऊत, पोलीस हवालदार सुरेश पाटील, पोलीस हवालदार धोत्रे आणि पोलीस कॉन्स्टेबल पवन परब करत आहेत.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search