Category Archives: देश

तिकीट दलालांवर IRCTC चा सर्जिकल स्ट्राईक; ३ कोटींहून अधिक बोगस खाती बंद, तर ४.८६ कोटी युजर आयडींवर ‘वॉच’!

[BLOCK ID=”GOOGLE-NEWS”]

नवी दिल्ली: भारतीय रेल्वेने तिकीट आरक्षणातील पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि सामान्य प्रवाशांना सहज तिकीट उपलब्ध करून देण्यासाठी आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे. २०२५ सालात रेल्वेने तंत्रज्ञानाचा वापर करून तब्बल ३.०३ कोटी संशयास्पद युजर आयडी (User IDs) निष्क्रिय केले आहेत. दलालांची साखळी मोडून काढण्यासाठी प्रशासनाने आता ‘आधार व्हेरिफिकेशन’ (Aadhaar-linked rules) अनिवार्य करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.

बोगस खात्यांचा सुळसुळाट थांबवला

रेल्वेने केवळ ३.०३ कोटी खाती बंदच केली नाहीत, तर आणखी ४.८६ कोटी युजर आयडी पुन्हा तपासणीसाठी (Re-validation) ठेवले आहेत. सायबर सुरक्षेचा भाग म्हणून १२,८१९ संशयास्पद ईमेल डोमेन ब्लॉक करण्यात आले असून, ३.९९ लाख संशयास्पद PNR नॅशनल सायबर क्राईम पोर्टलवर नोंदवण्यात आले आहेत. यामुळे अनधिकृतपणे तिकीट पळवणाऱ्या टोळ्यांना मोठा दणका बसला आहे.

तांत्रिक बदल आणि ‘अँटी-बॉट’ तंत्रज्ञान

दलाल अनेकदा ऑटोमॅटिक बॉट्सचा वापर करून सेकंदात तिकीट बुक करतात. हे रोखण्यासाठी IRCTC ने ‘अँटी-बॉट’ तंत्रज्ञान आणि ‘कंटेंट डिलिव्हरी नेटवर्क’ (CDN) प्रणाली कार्यान्वित केली आहे. यामुळे तिकीट बुकिंगची गती वाढेल आणि मानवी हस्तक्षेपाशिवाय होणारी बोगस बुकिंग थांबेल.

वेबसाईट आणि ‘रेल कनेक्ट’ अ‍ॅपमध्ये मोठे बदल

प्रवाशांचा अनुभव सुलभ करण्यासाठी रेल्वेने खालील सुधारणा केल्या आहेत:

  • लॉगिन कॅप्चा (Captcha) हटवला: आता प्रवाशांना अधिक वेगाने लॉगिन करता येईल.

  • सुलभ इंटरफेस: मेनू नेव्हिगेशन आणि फॉर्म भरण्याची प्रक्रिया सोपी करण्यात आली आहे.

  • ट्रेन लिस्ट सॉर्टिंग: आता प्रवाशांना गाड्यांची यादी सुटण्याच्या वेळेनुसार (Departure Time) लावता येईल.

  • फास्टर लोडिंग: तांत्रिक सुधारणांमुळे आता वेबसाईट आणि अ‍ॅप कमी वेळात लोड होतील.

आधार व्हेरिफिकेशन आता अनिवार्य

सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे, ज्या दिवशी बुकिंग सुरू होते (ARP) आणि ‘तात्काळ’ बुकिंगच्या वेळेत आता केवळ ‘आधार-व्हेरिफाईड’ युजर्सच तिकीट बुक करू शकतील. या नियमामुळे दलालांकडून होणारी तिकीटांची काळाबाजारी पूर्णपणे थांबण्यास मदत होईल, असा विश्वास रेल्वे प्रशासनाने व्यक्त केला आहे.

संतापजनक! छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी पद्मिनी यांच्या छायाचित्रांचा अपमानजनक वापर

   Follow us on        

हरियाणा: तमाम भारतीयांचे आदर स्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा नको त्या ठिकाणी लावून अपमान झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सिकरी (हरियाणा) येथील मिलन बॅन्केट हॉलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी पद्मिनी यांच्या प्रतिमांचा शौचालयाच्या दरवाज्यांवर लिंग-सूचक चिन्हांसोबत (HE/SHE) वापर केल्याने मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त होत आहे.

या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, लाखो लोकांनी याला ऐतिहासिक व्यक्तींचा आणि हिंदू आस्थेचा अपमान ठरवले आहे.व्हिडीओमध्ये दिसते की, पुरुष शौचालयाच्या दरवाज्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची आणि महिला शौचालयावर महाराणी पद्मिनी यांची छायाचित्रे लावण्यात आली आहेत. शिवाजी महाराज हे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि मुघलांविरुद्ध लढणारे महान योद्धा म्हणून पूजले जातात, तर महाराणी पद्मिनी (पद्मावती) या चित्तोडच्या राजपूत राणी आणि धैर्य व बलिदानाच्या प्रतीक मानल्या जातात.

सोशल मीडियावर अनेकांनी याला “निष्काळजीपणा नव्हे, तर जाणीवपूर्वक अपमान” असे म्हटले आहे. काहींनी बॅन्केट हॉल व्यवस्थापनाकडून तात्काळ प्रतिमा काढून टाकणे, सार्वजनिकरीत्या माफी मागणे आणि जबाबदार व्यक्तींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.”हा केवळ चूक नाही, तर संपूर्ण हिंदू समाजाच्या भावनांवर प्रहार आहे,” असे एका युजर्सने म्हटले आहे.

अद्यापपर्यंत बॅन्केट हॉलच्या व्यवस्थापनाकडून किंवा स्थानिक प्रशासनाकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही.ही घटना फतेहपूर सिकरी किंवा जवळच्या परिसरात असल्याचे काही पोस्टमध्ये नमूद केले जात असले तरी मुख्यतः हरियाणातील सिकरी येथे असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणामुळे ऐतिहासिक व्यक्तींचा सार्वजनिक ठिकाणी योग्य आदराने वापर व्हावा, यावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

 

 

 

 

Railway Updates: ‘बोर्डिंग पॉईंट’ बदलण्याच्या नियमांत बदल होण्याची शक्यता

   Follow us on        

नवी दिल्ली: रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुविधेसाठी रेल्वे बोर्डाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. प्रवासाचे मुख्य स्टेशन म्हणजेच ‘बोर्डिंग पॉईंट’ बदलण्याच्या नियमात मोठी सवलत देण्याचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाने मांडला आहे.

सध्याच्या नियमानुसार, प्रवाशांना केवळ पहिल्या आरक्षण चार्टची (First Reservation Chart) तयारी होईपर्यंतच आपले बोर्डिंग स्टेशन बदलण्याची सुविधा उपलब्ध आहे. मात्र, आता हा बदल दुसऱ्या आरक्षण चार्टची (Second Reservation Chart) तयारी होईपर्यंत करण्याची परवानगी देण्याबाबत रेल्वे बोर्डाने ‘सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टम’ (CRIS) कडे तांत्रिक व्यवहार्यतेची विचारणा केली आहे.

​रेल्वे बोर्डाचे संचालक संजय मनोचा यांनी १९ फेब्रुवारी २०२६ रोजी जारी केलेल्या पत्रात नमूद केले आहे की, प्रवाशांना अधिक सोयीस्कर व्हावे यासाठी हा प्रस्ताव विचाराधीन आहे. जर या प्रस्तावाची अंमलबजावणी झाली, तर प्रवाशांना ट्रेन सुटण्याच्या साधारण ३० मिनिटे आधीपर्यंत (दुसरा चार्ट तयार होईपर्यंत) आपले बोर्डिंग स्टेशन बदलता येईल. वंदे भारत सारख्या वेगवान गाड्यांच्या बाबतीत ही वेळ मर्यादा १५ मिनिटे असू शकते. सध्या पहिला चार्ट गाडी सुटण्याच्या १० ते २० तास आधी तयार केला जात असल्याने प्रवाशांना ऐनवेळी स्टेशन बदलण्यात अडचणी येतात. नवीन बदल लागू झाल्यास ऐनवेळी प्रवास नियोजन बदलणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

धक्कादायक! NCERT च्या अभ्यासक्रमातून मराठा साम्राज्याचा नकाशाच गायब..

   Follow us on        

नवी दिल्ली: एनसीईआरटीने इयत्ता आठवीच्या इतिहासाच्या पुस्तकात असलेला 1759 सालच्या मराठा साम्राज्याचा विस्तार दाखवणारा नकाशा एकतर्फी हटवला असून राजस्थानमधील राजपूत घराण्यांच्या दबावाखाली एनसीईआरटीने हा खोडसाळपणा केल्याचा आरोप नागपूरकर भोसले राजघराण्याचे वर्तमान वंशज मुधोजीराजे भोसले यांनी केला आहे.

ऐन शिवजयंती दिवशीच मुधोजीराजांनी एनसीईआरटीने केलेला खोडसाळपणा उघडकीस आणल्यामुळे आता नव्या वादळाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. दरम्यान, पुस्तकातून हटवलेला 1759 सालच्या मराठा साम्राज्याचा विस्तार दाखवणारा नकाशा पुस्तकात पुन्हा प्रकाशित करण्याची मागणी मुधोजीराजांनी नागपुरातील शिवजयंतीच्या कार्यक्रमात बोलताना केली आहे.

​NCERT च्या पाठ्यपुस्तकात १७५९ सालातील मराठा साम्राज्याचा नकाशा समाविष्ट होता. या नकाशामध्ये उत्तरेत पेशावर (आजचे पाकिस्तान) पासून ते दक्षिणेत तंजावरपर्यंत मराठ्यांचे वर्चस्व स्पष्टपणे दिसत होते. ‘अटक ते कटक’ असा हा गौरवशाली इतिहास विद्यार्थ्यांच्या मनातून पुसून टाकण्याचा हा राजकीय कट असल्याचा आरोप मराठा इतिहासप्रेमींकडून केला जात आहे.

​RTI मधून झालेला धक्कादायक खुलासा

​या प्रकरणावर माहितीच्या अधिकाराखाली (RTI) प्रश्न विचारण्यात आले होते की, हा नकाशा हटवण्यासाठी कोणते ऐतिहासिक पुरावे वापरले किंवा कोणत्या तज्ज्ञांनी हा सल्ला दिला? यावर उत्तर देताना NCERT ने म्हटले आहे की, “यासंबंधीची कोणतीही माहिती किंवा कागदपत्रे त्यांच्या फाईल्समध्ये उपलब्ध नाहीत.” कोणत्याही पुराव्याशिवाय हा नकाशा का हटवला गेला, असा सवाल आता उपस्थित होत आहे.

​या प्रकरणातील आरोपांचे स्वरूप अत्यंत गंभीर असून प्रामुख्याने दबावाचे राजकारण आणि हेतुपुरस्सर दुर्लक्ष यांवर बोट ठेवण्यात आले आहे. आंदोलकांचा असा दावा आहे की, काही तक्रारदार गट आणि तथाकथित राजघराण्यांच्या राजकीय दबावाला बळी पडून NCERT ने मराठा साम्राज्याचा नकाशा हटवण्याचा हा चुकीचा निर्णय घेतला आहे. त्यातच, ज्येष्ठ इतिहासकार गजानन भास्कर मेहेंदळे यांच्या निधनानंतर NCERT च्या समितीवर एकाही तज्ज्ञ मराठा इतिहासकाराची नियुक्ती करण्यात आली नाही, ज्यामुळे समितीमध्ये इतर प्रादेशिक लॉबींचा प्रभाव वाढला आणि मराठा इतिहासाला दुय्यम स्थान देण्याचे प्रयत्न सुरू झाले, असा आरोप केला जात आहे. हा केवळ तांत्रिक किंवा शैक्षणिक बदल नसून, मराठ्यांनी संपूर्ण भारतावर मिळवलेले प्रभुत्व विद्यार्थ्यांच्या स्मृतीतून पुसून टाकण्याचा आणि पर्यायाने मराठा अस्मितेवर घाला घालण्याचा हा एक मोठा राजकीय कट असल्याचे अभ्यासकांचे आणि इतिहासप्रेमींचे म्हणणे आहे.

​या निर्णयाच्या विरोधात समाज माध्यमांवर #SaveMarathaHistory ही मोहीम जोरात सुरू झाली आहे. खासकरून मराठी एकीकरण समितीने यावर मोठा आक्षेप घेतला आहे. मराठा साम्राज्याने देशाला परकीय आक्रमकांपासून वाचवले, तोच इतिहास पाठ्यपुस्तकातून गायब करणे हे ऐतिहासिक सत्याचा अपलाप करणारे आहे, असे मत व्यक्त केले जात आहे.

NCERT ने हा नकाशा पुन्हा समाविष्ट करावा आणि इतिहासाची छेडछाड थांबवावी, अशी मागणी इतिहासप्रेमी आणि विविध संघटनांकडून केली जात आहे.

राज्यसभेच्या ३७ जागांसाठी १६ मार्च रोजी निवडणूक; महाराष्ट्रातील ७ खासदारांचा कार्यकाळ संपणार

   Follow us on        

नवी दिल्ली: भारतीय निवडणूक आयोगाने एप्रिल २०२६ मध्ये निवृत्त होणाऱ्या १० राज्यांमधील राज्यसभेच्या ३७ जागांसाठीनि वडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या प्रक्रियेची अधिसूचना २६ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध केली जाणार असून, १६ मार्च २०२६ रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत मतदान पार पडेल. मतदानानंतर त्याच दिवशी सायंकाळी ५ वाजता मतमोजणी केली जाईल. निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे की, मतपत्रिकेवर पसंतीक्रम नोंदवण्यासाठी केवळ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी पुरवलेल्या जांभळ्या रंगाच्या स्केच पेनचाच वापर करणे अनिवार्य असेल.

​या निवडणुकीत महाराष्ट्र राज्यातील सर्वाधिक ७ जागांचा समावेश आहे. महाराष्ट्रातून डॉ. भगवत किशनराव कराड, डॉ. (श्रीमती) फौजिया तहसीन अहमद खान, प्रियांका विक्रम चतुर्वेदी, शरदचंद्र गोविंदराव पवार, धैर्यशील मोहन पाटील, रजनी अशोकराव पाटील आणि रामदास बंधू आठवले हे सदस्य निवृत्त होत आहेत. याशिवाय, ओडिशा राज्यातून ममता मोहंता, मुजीबुल्ला खान, सुजीत कुमार आणि निरंजन बिशी हे ४ सदस्य, तर तामिळनाडूमधून एन.आर. इलांगो, पी. सेल्वारासू, एम. थंबीदुराई, तिरुची शिवा, डॉ. कनिमोझी एनव्हीएन सोमू आणि जी.के. वासन हे ६ सदस्य निवृत्त होत आहेत.

​पश्चिम बंगालमधील साकेत गोखले, ऋतब्रत बॅनर्जी, विकास रंजन भट्टाचार्य, सुब्रत बक्षी आणि ५ जानेवारी २०२६ पासून रिक्त झालेली मौसम नूर यांची जागा अशा एकूण ५ जागांसाठी निवडणूक होईल. बिहारमधून अमरेंद्र धारी सिंग, प्रेमचंद गुप्ता, रामनाथ ठाकूर, उपेंद्र कुशवाहा आणि हरिवंश नारायण सिंग हे ५ सदस्य निवृत्त होत आहेत. आसाममधील रामेश्वर तेली, भुवनेश्वर कलिता आणि अजित कुमार भुयान यांच्या ३ जागांसाठी मतदान होईल. तसेच छत्तीसगडमधून कवी तेजपाल सिंग तुलसी व फुलोदेवी नेताम, हरियाणातून किरण चौधरी व राम चंदर जांगडा आणि तेलंगणातून डॉ. अभिषेक मनू सिंघवी व के.आर. सुरेश रेड्डी या प्रत्येकी दोन सदस्यांचा कार्यकाळ संपत आहे. हिमाचल प्रदेशमधून इंदू बाला गोस्वामी या एकमेव सदस्या निवृत्त होत आहेत. या सर्व ३७ जागांसाठी २० मार्च २०२६ पर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत.

मुंबई-पुणे अंतर येणार ४० मिनिटांवर! केंदीय अर्थसंकल्पात ७ नवीन बुलेट ट्रेन कॉरिडॉरची घोषणा

   Follow us on        

नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज २०२६ चा अर्थसंकल्प सादर करताना रेल्वे क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत. देशातील रेल्वे पायाभूत सुविधांना आधुनिक रूप देण्यासाठी सरकारने सात नवीन हाय-स्पीड रेल (बुलेट ट्रेन) कॉरिडॉर विकसित करण्याचा प्रस्ताव मांडला आहे.

​या नवीन प्रकल्पांमुळे प्रमुख शहरे आणि आर्थिक केंद्रांमधील प्रवासाचा वेळ कमालीचा कमी होणार असून प्रादेशिक विकासाला गती मिळणार आहे.

​हे आहेत ७ नवीन हाय-स्पीड मार्ग:

​अर्थमंत्र्यांनी जाहीर केल्यानुसार, खालील मार्गांवर हाय-स्पीड ट्रेन धावतील:

१. मुंबई ते पुणे (दैनंदिन प्रवाशांसाठी मोठा दिलासा)

२. पुणे ते हैदराबाद

३. हैदराबाद ते बेंगळुरू

४. हैदराबाद ते चेन्नई

५. चेन्नई ते बेंगळुरू

६. दिल्ली ते वाराणसी

७. वाराणसी ते सिलिगुडी

​मालवाहतुकीसाठी नवीन कॉरिडॉर

​केवळ प्रवासी वाहतूकच नाही, तर मालवाहतुकीला गती देण्यासाठी पश्चिमेकडील सुरत (गुजरात) ते पूर्वेकडील दानकुनी (पश्चिम बंगाल) दरम्यान एक नवीन डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर (DFC) स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे मालाची ने-आण जलद आणि स्वस्त होईल.

मुंबई पुणे अंतर ४० मिनिटांवर

मुंबई आणि पुणे या दोन प्रमुख शहरांदरम्यान प्रस्तावित असलेला हाय-स्पीड रेल (बुलेट ट्रेन) कॉरिडॉर दळणवळणाच्या क्षेत्रात एक मोठी क्रांती घडवून आणणारा ठरेल. सध्या या प्रवासासाठी रस्ते किंवा रेल्वे मार्गाने ३ ते ४ तास लागतात; मात्र बुलेट ट्रेनमुळे हे अंतर अवघ्या ४० ते ६० मिनिटांत पार करणे शक्य होईल. ताशी २५० ते ३०० किमी वेगाने धावणारी ही ट्रेन प्रामुख्याने उड्डाणपूल आणि बोगद्यांमधून जाणार असून, यामुळे प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या वाचणार आहे.

​हा प्रकल्प केवळ वेळेची बचत करणारा नसून, तो दोन्ही शहरांतील दैनंदिन प्रवाशांसाठी आणि अर्थव्यवस्थेसाठी वरदान ठरेल. जलद कनेक्टिव्हिटीमुळे मुंबईत राहून पुण्यात नोकरी करणे किंवा उलट, ही बाब सहज शक्य होईल. यामुळे मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवरील वाहतूक कोंडी कमी होईलच, पण त्यासोबतच या मार्गावरील ग्रामीण आणि उपनगरीय भागांत रिअल इस्टेट व व्यावसायिक संकुलांचा विकास होऊन रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील.

​पर्यावरण आणि तांत्रिकदृष्ट्याही हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा आहे. खाजगी वाहनांचा वापर कमी झाल्यामुळे इंधनाची बचत होऊन कार्बन उत्सर्जन घटण्यास मोठी मदत होईल. ‘महारेल’ आणि केंद्र सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने साकारला जाणारा हा प्रकल्प दोन्ही शहरांमधील व्यापारी संबंध अधिक दृढ करून महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाला एक नवी गती प्रदान करेल.

​अर्थसंकल्पातील इतर महत्त्वाचे मुद्दे:

​जलमार्ग विकास: पुढील पाच वर्षांत २० नवीन राष्ट्रीय जलमार्ग कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट.

​रोजगार निर्मिती: या मोठ्या रेल्वे प्रकल्पांमुळे बांधकाम, मॅन्युफॅक्चरिंग आणि लॉजिस्टिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.

पर्यावरणपूरक प्रवास: कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी सार्वजनिक वाहतूक आणि जलमार्गांवर भर दिला जाणार आहे.

​सध्या मुंबई-अहमदाबाद या पहिल्या बुलेट ट्रेनचे काम वेगाने सुरू असतानाच, या नवीन घोषणांमुळे भारताच्या रेल्वे प्रवासाचा चेहरामोहरा बदलणार असल्याचे चित्र दिसत आहे.

कर्तव्य पथावर महाराष्ट्राचा डंका! गणेशोत्सवाच्या चित्ररथाला देशात प्रथम क्रमांक

   Follow us on        

नवी दिल्ली: यंदाच्या प्रजासत्ताक दिन संचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथाने बाजी मारली असून, राज्याला राज्यांच्या श्रेणीमध्ये प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे. ‘गणेशोत्सव आणि आत्मनिर्भरता’ या विषयावर आधारित महाराष्ट्राच्या चित्ररथाने उपस्थितांची मने जिंकली. या चित्ररथावर पारंपरिक लेझीम नृत्य सादर करणाऱ्या महिला पथकाने महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडवले. राज्यांच्या या स्पर्धेत जम्मू-काश्मीरने दुसरे, तर केरळने तिसरे स्थान पटकावले आहे.

​लष्करी दलांमध्ये भारतीय नौदलाला सर्वोत्तम संचलन तुकडीचा बहुमान मिळाला आहे. तर निमलष्करी दलांमध्ये दिल्ली पोलीस ही सर्वोत्तम तुकडी ठरली आहे. केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांच्या चित्ररथांमध्ये सांस्कृतिक मंत्रालयाच्या ‘वंदे मातरम’ संकल्पनेवरील चित्ररथाला पहिले पारितोषिक देण्यात आले. या चित्ररथातून वंदे मातरम गीताचा १५० वर्षांचा वारसा आणि बंकिमचंद्र चॅटर्जी यांचे योगदान अतिशय देखण्या पद्धतीने मांडण्यात आले होते.

​लोकपसंती (Popular Choice) श्रेणीमध्ये मात्र निकाल काहीसे वेगळे राहिले. यामध्ये नागरिकांनी आसाम रेजिमेंटला सर्वोत्तम लष्करी तुकडी आणि गुजरातच्या चित्ररथाला राज्यांच्या श्रेणीमध्ये पहिले स्थान दिले आहे. गुजरातच्या चित्ररथाची संकल्पना ‘स्वदेशीचा मंत्र’ यावर आधारित होती. लोकपसंती श्रेणीत उत्तर प्रदेश दुसऱ्या आणि राजस्थान तिसऱ्या क्रमांकावर राहिले. या सर्व विजेत्यांना ३० जानेवारी रोजी एका विशेष सोहळ्यात सन्मानित करण्यात येणार आहे.

mAadhaar App: आता घरबसल्या आधार कार्डवरील नाव आणि पत्ता बदलणे शक्य

   Follow us on        

नवी दिल्ली: भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) आधार कार्ड धारकांच्या सोयीसाठी एक नवीन आणि प्रगत मोबाईल अ‍ॅप लाँच केले आहे. या अ‍ॅपमुळे नागरिकांना आता आधारशी संबंधित कामांसाठी आधार सेवा केंद्रांवर जाण्याची गरज उरणार नाही. या नवीन प्लॅटफॉर्मवरून युजर्स आपले नाव, पत्ता आणि मोबाईल नंबर यांसारखी वैयक्तिक माहिती अत्यंत सोप्या पद्धतीने स्वतः अपडेट करू शकतील. याशिवाय, आधारची सुरक्षितता वाढवण्यासाठी यामध्ये ‘ऑफलाईन व्हेरिफिकेशन’ आणि ‘सिलेक्टिव्ह शेअरिंग’ यांसारखी प्रगत फीचर्स देण्यात आली आहेत, ज्याद्वारे युजर्स आपली माहिती सुरक्षितपणे शेअर करू शकतील.

​महत्त्वाची बाब म्हणजे, या अ‍ॅपमध्ये एकाच वेळी अनेक प्रोफाईल्स आणि कॉन्टॅक्ट कार्ड्स व्यवस्थापित करण्याची सुविधा देण्यात आली आहे, ज्यामुळे कुटुंबातील सदस्यांचे आधार सांभाळणे अधिक सोपे होणार आहे. डिजिटल इंडियाच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात असून, यामुळे आधार केंद्रांवरील गर्दी कमी होण्यास मदत होईल. नागरिकांनी हे अधिकृत अ‍ॅप डाउनलोड करून या सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रजासत्ताक दिनी पद्म पुरस्कारांची मोठी घोषणा; १३१ जणांचा गौरव, संपूर्ण यादी ईथे वाचा

   Follow us on        

नवी दिल्ली | २५ जानेवारी २०२६

देशातील सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक असलेल्या पद्म पुरस्कारांची घोषणा केंद्रीय गृह मंत्रालयाकडून प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला करण्यात आली आहे. हे पुरस्कार पद्म विभूषण, पद्म भूषण आणि पद्मश्री अशा तीन श्रेणींमध्ये प्रदान केले जातात.

कला, सामाजिक कार्य, सार्वजनिक जीवन, विज्ञान व अभियांत्रिकी, व्यापार व उद्योग, वैद्यक, साहित्य व शिक्षण, क्रीडा, नागरी सेवा आदी विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय व अतुलनीय योगदानासाठी हे पुरस्कार दिले जातात.

पद्म पुरस्कारांचे महत्त्व

पद्म विभूषण : अपवादात्मक व अतिशय विशिष्ट सेवेसाठी

पद्म भूषण : उच्च दर्जाच्या विशिष्ट सेवेसाठी

पद्मश्री : कोणत्याही क्षेत्रातील उल्लेखनीय सेवेसाठी

दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने या पुरस्कारांची घोषणा केली जाते. पुरस्कारांचे वितरण राष्ट्रपतींच्या हस्ते साधारणतः मार्च-एप्रिल महिन्यात राष्ट्रपती भवनात आयोजित समारंभात केले जाते.

२०२६ साठी १३१ पद्म पुरस्कारांना मंजुरी

२०२६ साठी राष्ट्रपतींनी एकूण १३१ पद्म पुरस्कारांना मंजुरी दिली आहे. यामध्ये २ ‘ड्युओ’ प्रकरणे (ज्यात दोन व्यक्तींना मिळणारा एकच पुरस्कार) समाविष्ट आहेत.

पुरस्कारांचे वर्गीकरण

पद्म विभूषण : ५

पद्म भूषण : १३

पद्मश्री : ११३

या यादीत:

१९ महिला पुरस्कारार्थी

६ परदेशी / NRI / PIO / OCI श्रेणीतील व्यक्ती

१६ मरणोत्तर पुरस्कार यांचा समावेश आहे.

 

सर्व पुरस्कारार्थींची नावे – क्षेत्र (Field) आणि राज्य / देशासह मराठीत, पुरस्कारनिहाय दिली आहेत. (सरकारी प्रेस नोटनुसार)


🏅 पद्म विभूषण (५)

  1. स्व. धर्मेंद्र सिंह देओल – कला – महाराष्ट्र
  2. के. टी. थॉमस – सार्वजनिक जीवन – केरळ
  3. एन. राजम – कला – उत्तर प्रदेश
  4. पी. नारायणन – साहित्य व शिक्षण – केरळ
  5. स्व. व्ही. एस. अच्युतानंदन – सार्वजनिक जीवन – केरळ

🏅 पद्म भूषण (१३)

  1. अल्का याज्ञिक – कला – महाराष्ट्र
  2. भगतसिंग कोश्यारी – सार्वजनिक जीवन – उत्तराखंड
  3. कल्लीपट्टी रामास्वामी पलानीस्वामी – वैद्यक – तामिळनाडू
  4. ममूटी – कला – केरळ
  5. डॉ. नोरी दत्तात्रेयुडू – वैद्यक – अमेरिका
  6. स्व. पियुष पांडे – कला – महाराष्ट्र
  7. एस. के. एम. मैलानंदन – सामाजिक कार्य – तामिळनाडू
  8. शतावधानी आर. गणेश – कला – कर्नाटक
  9. स्व. शिबू सोरेन – सार्वजनिक जीवन – झारखंड
  10. उदय कोटक – व्यापार व उद्योग – महाराष्ट्र
  11. स्व. व्ही. के. मल्होत्रा – सार्वजनिक जीवन – दिल्ली
  12. वेल्लापल्ली नटेसन – सार्वजनिक जीवन – केरळ
  13. विजय अमृतराज – क्रीडा – अमेरिका

🏅 पद्मश्री (११३)

(नाव – क्षेत्र – राज्य / देश)

  1. ए. ई. मुत्थुनायगम – विज्ञान व अभियांत्रिकी – केरळ
  2. अनिल कुमार रस्तोगी – कला – उत्तर प्रदेश
  3. अंके गौडा एम. – सामाजिक कार्य – कर्नाटक
  4. आर्मिडा फर्नांडिस – वैद्यक – महाराष्ट्र
  5. अरविंद वैद्य – कला – गुजरात
  6. अशोक खाडे – व्यापार व उद्योग – महाराष्ट्र
  7. अशोक कुमार सिंह – विज्ञान व अभियांत्रिकी – उत्तर प्रदेश
  8. अशोक कुमार हलदार – साहित्य व शिक्षण – पश्चिम बंगाल
  9. बलदेव सिंह – क्रीडा – पंजाब
  10. भगवंदास रायकर – क्रीडा – मध्य प्रदेश
  11. भरत सिंह भारती – कला – बिहार
  12. भिकल्या लडक्या धिंडा – कला – महाराष्ट्र
  13. स्व. विश्व बंधू – कला – बिहार
  14. बृज लाल भट – सामाजिक कार्य – जम्मू-काश्मीर
  15. बुद्ध रश्मी मणी – पुरातत्त्व – उत्तर प्रदेश
  16. डॉ. बुध्री ताती – सामाजिक कार्य – छत्तीसगड
  17. चंद्रमौली गड्डामानुगु – विज्ञान व अभियांत्रिकी – तेलंगणा
  18. चरण हेंब्रम – साहित्य व शिक्षण – ओडिशा
  19. चिरंजी लाल यादव – कला – उत्तर प्रदेश
  20. दीपिका रेड्डी – कला – तेलंगणा
  21. धार्मिकलाल पंड्या – कला – गुजरात
  22. गड्डे बाबू राजेंद्र प्रसाद – कला – आंध्र प्रदेश
  23. गफरुद्दीन मेवाती जोगी – कला – राजस्थान
  24. गंभीर सिंह योंझोन – साहित्य व शिक्षण – पश्चिम बंगाल
  25. स्व. गरिमेल्ला बालकृष्ण प्रसाद – कला – आंध्र प्रदेश
  26. गायत्री व रंजनी बालसुब्रमण्यम (ड्युओ) – कला – तामिळनाडू
  27. गोपालजी त्रिवेदी – विज्ञान व अभियांत्रिकी – बिहार
  28. गुडुरू वेंकट राव – वैद्यक – तेलंगणा
  29. एच. व्ही. हांडे – वैद्यक – तामिळनाडू
  30. हॅली वार – सामाजिक कार्य – मेघालय
  31. स्व. हरी माधव मुखोपाध्याय – कला – पश्चिम बंगाल
  32. हरिचरण सैकिया – कला – आसाम
  33. हरमनप्रीत कौर भुल्लर – क्रीडा – पंजाब
  34. इंदरजीत सिंह सिद्धू – सामाजिक कार्य – चंदीगड
  35. जनार्दन बापुराव बोथे – सामाजिक कार्य – महाराष्ट्र
  36. जोगेश देऊरी – शेती – आसाम
  37. जुझर वासी – विज्ञान व अभियांत्रिकी – महाराष्ट्र
  38. ज्योतिष देबनाथ – कला – पश्चिम बंगाल
  39. के. पाजनिवेल – क्रीडा – पुद्दुचेरी
  40. के. रामास्वामी – विज्ञान व अभियांत्रिकी – तामिळनाडू
  41. के. विजय कुमार – नागरी सेवा – तामिळनाडू
  42. स्व. कबिंद्र पुरकायस्थ – सार्वजनिक जीवन – आसाम
  43. कैलाश चंद्र पंत – साहित्य व शिक्षण – मध्य प्रदेश
  44. कलामंडलम विमला मेनन – कला – केरळ
  45. केवाल कृष्ण ठाक्राल – वैद्यक – उत्तर प्रदेश
  46. खेमराज सुंद्रियाल – कला – हरियाणा
  47. कोल्लकल देवकी अम्मा – सामाजिक कार्य – केरळ
  48. कृष्णमूर्ती बालसुब्रमण्यम – विज्ञान व अभियांत्रिकी – तेलंगणा
  49. कुमार बोस – कला – पश्चिम बंगाल
  50. कुमारस्वामी थंगराज – विज्ञान व अभियांत्रिकी – तेलंगणा
  51. प्रो. लार्स-क्रिश्चन कोच – कला – जर्मनी
  52. लिउडमिला खोखलोव्हा – साहित्य व शिक्षण – रशिया
  53. माधवन रंगनाथन – कला – महाराष्ट्र
  54. मगंती मुरली मोहन – कला – आंध्र प्रदेश
  55. महेंद्र कुमार मिश्रा – साहित्य व शिक्षण – ओडिशा
  56. महेंद्र नाथ रॉय – साहित्य व शिक्षण – पश्चिम बंगाल
  57. मामिडाला जगदीश कुमार – साहित्य व शिक्षण – दिल्ली
  58. मंगला कपूर – साहित्य व शिक्षण – उत्तर प्रदेश
  59. मीर हाजीभाई कसंबाई – कला – गुजरात
  60. मोहन नगर – सामाजिक कार्य – मध्य प्रदेश
  61. नारायण व्यास – पुरातत्त्व – मध्य प्रदेश
  62. नरेश चंद्र देव वर्मा – साहित्य व शिक्षण – त्रिपुरा
  63. निलेश मंडळेवाला – सामाजिक कार्य – गुजरात
  64. नुरुद्दीन अहमद – कला – आसाम
  65. ओथुवार थिरुथनी स्वामिनाथन – कला – तामिळनाडू
  66. डॉ. पद्मा गुरमेट – वैद्यक – लडाख
  67. पालकोंडा विजय आनंद रेड्डी – वैद्यक – तेलंगणा
  68. पोखिला लेखथेपी – कला – आसाम
  69. डॉ. प्रभाकर कोरे – साहित्य व शिक्षण – कर्नाटक
  70. प्रतीक शर्मा – वैद्यक – अमेरिका
  71. प्रवीण कुमार – क्रीडा – उत्तर प्रदेश
  72. प्रेमलाल गौतम – विज्ञान व अभियांत्रिकी – हिमाचल प्रदेश
  73. प्रसेनजित चॅटर्जी – कला – पश्चिम बंगाल
  74. डॉ. पुन्नियामूर्ती नटेसन – वैद्यक – तामिळनाडू
  75. स्व. आर. कृष्णन – कला – तामिळनाडू
  76. आर. व्ही. एस. मणी – नागरी सेवा – दिल्ली
  77. रबीलाल टुडू – साहित्य व शिक्षण – पश्चिम बंगाल
  78. स्व. रघुपत सिंह – शेती – उत्तर प्रदेश
  79. रघुवीर तुकाराम खेडकर – कला – महाराष्ट्र
  80. राजस्थपती कलियप्पा गौंडर – कला – तामिळनाडू
  81. राजेंद्र प्रसाद – वैद्यक – उत्तर प्रदेश
  82. स्व. रामा रेड्डी मामिडी – पशुपालन – तेलंगणा
  83. राममूर्ती श्रीधर – रेडिओ प्रसारण – दिल्ली
  84. रामचंद्र व सुनीता गोडबोले (ड्युओ) – वैद्यक – छत्तीसगड
  85. रतीलाल बोरीसागर – साहित्य व शिक्षण – गुजरात
  86. रोहित शर्मा – क्रीडा – महाराष्ट्र
  87. एस. जी. सुशीलम्मा – सामाजिक कार्य – कर्नाटक
  88. सांग्युसांग एस. पोन्गेनर – कला – नागालँड
  89. संत निरंजन दास – अध्यात्म – पंजाब
  90. शरत कुमार पात्र – कला – ओडिशा
  91. सरोज मंडल – वैद्यक – पश्चिम बंगाल
  92. स्व. सतीश शहा – कला – महाराष्ट्र
  93. सत्यनारायण नुवाल – व्यापार व उद्योग – महाराष्ट्र
  94. सविता पुनिया – क्रीडा – हरियाणा
  95. प्रो. शफी शौक – साहित्य व शिक्षण – जम्मू-काश्मीर
  96. शशी शेखर वेम्पती – साहित्य व शिक्षण – कर्नाटक
  97. श्रीरंग देवबा लाड – शेती – महाराष्ट्र
  98. शुभा वेंकटेश अय्यंगार – विज्ञान व अभियांत्रिकी – कर्नाटक
  99. श्याम सुंदर – वैद्यक – उत्तर प्रदेश
  100. सिमांचल पात्र – कला – ओडिशा
  101. शिवशंकरि – साहित्य व शिक्षण – तामिळनाडू
  102. डॉ. सुरेश हनगावडी – वैद्यक – कर्नाटक
  103. स्वामी ब्रह्मदेवजी महाराज – सामाजिक कार्य – राजस्थान
  104. स्व. टी. टी. जगन्नाथन – व्यापार व उद्योग – कर्नाटक
  105. टागा राम भिल – कला – राजस्थान
  106. तरुण भट्टाचार्य – कला – पश्चिम बंगाल
  107. टेची गुबिन – सामाजिक कार्य – अरुणाचल प्रदेश
  108. थिरुवारूर भक्तवत्सलम – कला – तामिळनाडू
  109. त्रिप्ती मुखर्जी – कला – पश्चिम बंगाल
  110. विझिनाथन कामकोटी – विज्ञान व अभियांत्रिकी – तामिळनाडू
  111. वेंपटी कुटुंब शास्त्री – साहित्य व शिक्षण – आंध्र प्रदेश
  112. स्व. व्ह्लादिमेर मेस्तविरिश्विली – क्रीडा – जॉर्जिया
  113. स्व. युमनाम जात्रा सिंह – कला – मणिपूर

 

Republic Day 2026: महाराष्ट्रातील ८९ अधिकारी-कर्मचाऱ्यांना शौर्य आणि सेवा पदके जाहीर; संपूर्ण यादी ईथे वाचा

   Follow us on        

नवी दिल्ली, २५ : भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त देशातील पोलीस, अग्निशमन, होमगार्ड आणि सुधारात्मक सेवेतील एकूण ९८२ अधिकारी व कर्मचाऱ्यांना शौर्य आणि सेवा पदके जाहीर करण्यात आली आहेत. महाराष्ट्रातील एकूण ८९ अधिकारी व कर्मचारी यांना विविध क्षेत्रातील कामगिरीसाठी पुरस्कार जाहीर झाले आहेत. यामध्ये ३१ पोलीस कर्मचाऱ्यांना ‘वीरता पदक’ (GM), उत्कृष्ट आणि विशिष्ट सेवेसाठी दिले जाणारे ‘राष्ट्रपती पदक’ (PSM) पोलीस दलातील ४ अधिकारी आणि सुधारात्मक सेवा विभागातील २ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. उल्लेखनीय सेवेसाठी (MSM) महाराष्ट्रातील पोलीस सेवेतील ४०, अग्निशमन सेवेसाठी ४, नागरी संरक्षण व होमगार्ड सेवेतील ३, सुधारात्मक सेवेतील ५ या अधिकारी-कर्मचाऱ्यांना पुरस्कार जाहीर करण्यात आले.

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय गृहमंत्रालयामार्फत दरवर्षी पोलीस, अग्निशमन, होमगार्ड आणि सुधारात्मक सेवेतील कार्यासाठी शौर्य आणि सेवा पदके दिली जातात.

महाराष्ट्राला मिळालेल्या विविध श्रेणीतील पदक प्राप्त अधिकारी व कर्मचाऱ्यांची यादी

वीरता पदक (GM)-पोलीस सेवा

१. अमोल नानासाहेब फडतरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक,

 

२. वासुदेव राजम मडावी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक,

 

३. मधुकर पोचाय्या नैताम, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकए

 

४. संतोष वसंतराव नैताम, नाईक पोलीस कॉन्स्टेबल ज

 

५. कै.सुधाकर बिताजी वेलादी नाईक पोलीस कॉन्स्टेबल (मरणोपरांत)

 

६. विलास मारोती पोर्तेट नाईक पोलीस कॉन्स्टेबल

 

७. विश्वनाथ सन्यासी सदमेक, नाईक पोलीस कॉन्स्टेबल

 

८. ज्ञानेश्वर सदाशिव फाडणे, नाईक पोलीस कॉन्स्टेबल

 

९. दिलीप वासुदेव सद्मेक, नाईक पोलीस कॉन्स्टेबल

 

१०. रामसू देवू नरोटे, नाईक पोलीस कॉन्स्टेबल

 

११. आनंदराव बाजीराव उसेंडी,नाईक पोलीस कॉन्स्टेबल

 

१२. राजू पंडित चव्हाण, नाईक पोलीस कॉन्स्टेबल

 

१३. अरुण कैलास मेश्राम, पोलीस कॉन्स्टेबल

 

१४. नितेश गंगाराम वेलाडी, पोलीस कॉन्स्टेबल

 

१५. मोहन लच्छू उसेंडी, पोलीस कॉन्स्टेबल

 

१६. संदिप गणपत वसाके, पोलीस कॉन्स्टेबल

 

१७. कैलास देवू कोवासे ,पोलीस कॉन्स्टेबल

 

१८. हरिदास महारू कुलयेती, पोलीस कॉन्स्टेबल

 

१९. किशोर चंती तलांडे, पोलीस कॉन्स्टेबल

 

२०. अनिल रघुपती आलम, पोलीस कॉन्स्टेबल

 

२१. नरेंद्र दशरथ मडावी, पोलीस कॉन्स्टेबल

 

२२. आकाश अशोक उईके, पोलीस कॉन्स्टेबल

 

२३. स्वर्गीय करे इरपा आत्राम, पोलीस कॉन्स्टेबल (मरणोपरांत)

 

२४. राजू मासा पुसाळी, पोलीस कॉन्स्टेबल

 

२५. महेश दत्तूजी जकेवार, पोलीस कॉन्स्टेबल

 

२६. रुपेश रमेश कोडापे, पोलीस कॉन्स्टेबल

 

२७. मुकेश शंकर सडमेक, पोलीस कॉन्स्टेबल

 

२८. योगेंद्रराव उपेंद्रराव सदमेक, पोलीस कॉन्स्टेबल

 

२९. घिस्सू वांजा आत्राम, पोलिस कॉन्स्टेबल

 

३०. अतुल भगवान मडावी पोलीस कॉन्स्टेबल

 

३१. विश्वनाथ लक्ष्मण मडावी पोलीस कॉन्स्टेबल

 

विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदक (PSM)

१. श्री महेश उदाजी पाटील, अतिरिक्त आयुक्त, महाराष्ट्र

 

२. श्री बाळकृष्ण मोतीराम यादव, पोलीस उपायुक्त, महाराष्ट्र

 

३. श्री सायरस बोमन इराणी, सहाय्यक पोलीस आयुक्त, महाराष्ट्र

 

४. श्री विठ्ठल खंडुजी कुबडे, सहाय्यक पोलीस आयुक्त, महाराष्ट्र

 

सुधारात्मक सेवा

१. श्री विजय बाबाजी परब, सुभेदार

 

२. श्री राजू विठ्ठलराव हेटे, हवालदार

 

उत्कृष्ट सेवेसाठी पदक (एमएसएम)

१. श्री राजीव वीरेंद्र कुमार जैन, पोलीस महानिरीक्षक

 

२. श्री सुधीर कल्ल्या हिरेमठ, पोलीस महानिरीक्षक

 

३. श्रीमती शीला दिनकर साहिल, पोलीस अधीक्षक

 

४. श्री मोहन मुरलीधर दहीकर, पोलीस अधीक्षक

 

५. श्री पुरुषोतम नारायण कराड, पोलीस अधीक्षक

 

६. श्रीमती. किरण जितेंद्रसिंह पाटील, अतिरिक्त पोलीस अधीक्षक

 

७. श्रीमती. नीलम प्रशांत वाव्हळ, पोलीस उपअधीक्षक

 

८. श्री अविनाश शंकरराव शिळीमकर, निरीक्षक (पीए)

 

९. श्री गजानन रामराव शेळके, पोलीस उपअधीक्षक

 

१०. श्री महेश रमेश तावडे, सहाय्यक पोलीस आयुक्त

 

११. श्री विजय मारोतीराव माहुलकर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक

 

१२. श्री समीर नारायण साळुंके, सहाय्यक पोलीस आयुक्त

 

१३. श्री पराग बापूराव पोटे, पोलीस उपअधीक्षक

 

१४. श्री दयानंद सदाशिव गावडे, पोलीस उपअधीक्षक

 

१५. श्रीमती. पुष्पलता राजाराम दिघे, पोलीस उपअधीक्षक,

 

१६. श्री सुनील शंकर शिंदे, निरीक्षक (PH)

 

१७. श्रीमती. सुवर्णा उमेश शिंदे, निरीक्षक (पीए)

 

१८. श्री अनंत ज्ञानेश्वर माळी, पोलीस उपअधीक्षक

 

१९. श्री महेंद्र दत्तात्रय कोरे, निरीक्षक/आरओ/आरएम

 

२०. श्री कैलाश रामजी बाराभाई, निरीक्षक/आरओ/आरएम

 

२१. श्री विजय गोपाळ मोहिते, उपनिरीक्षक

 

२२. श्री भारत रावसाहेब सावंत, इन्स्पेक्टर/एआरएमआर

 

२३. श्री नरेंद्र सखाराम राऊत, सहाय्यक उपनिरीक्षक

 

२४. श्री सतीश जनार्दन निंबाळकर, उपनिरीक्षक

 

२५. श्री अफजल खान शहेजादे खान पठाण, सहाय्यक उपनिरीक्षक

 

२६.श्री प्रदिप साहेबराव सावंत, सहाय्यक उपनिरीक्षक

 

२७. श्री सुभाष वामन साळवी, उपनिरीक्षक

 

२८. श्री प्रमोद रोहिदास वाघमारे, निरीक्षक (पीए)

 

२९. श्री विजयकुमार शंकर शिंदे, उपनिरीक्षक

 

३०. श्री विक्रम व्यंकटराव नवरखेडे, उपनिरीक्षक

 

३१. श्री विजय प्रभाकर देवरे, उपनिरीक्षक

 

३२. श्री मनोज यशवंत गुजर, उपनिरीक्षक

 

३३. श्री अजय मनोहर सावंत, उपनिरीक्षक

 

३४. श्री गंगाधर रामचंद्र घुमरे, उपनिरीक्षक

 

३५. श्री संजय एकनाथ शेलार, उपनिरीक्षक

 

३६. श्री महादेव मधुकर खंडारे, निरीक्षक/एआरएमआर

 

३७. श्री राजकुमार चनवीरप्पा टोळनुरे, उपनिरीक्षक

 

३८. श्री बाबासाहेब नाथा ढाकणे, उपनिरीक्षक

 

३९. श्री शिवदास दत्तात्रय फुटाणे, उपनिरीक्षक

 

४०. श्री सुरेश साहेबराव सोनवणे, उपनिरीक्षक

 

अग्निशमन सेवा

१. श्री हरिश्चंद्र वसंत गिरकर, उप. मुख्य अग्निशमन अधिकारी,

 

२. श्री दामोदर वनगड, अग्निशमन अधिकारी

 

३. श्री कांचन बंडू पाटील, ड्रायव्हर ऑपरेटर

 

४. श्री काशिनाथ राजनाथ मिश्रा, अग्रगण्य फायरमन

 

नागरी संरक्षण व होमगार्ड

१. श्री गंगाधर वखाजी वुरकुड, प्लाटून कमांडर

 

२. श्री राजेंद्र मधुकरराव बन्सोड, प्लाटून कमांडर

 

३. श्री नागेश्वरराव अल्कोंदिया पोडदाली, प्लाटून कमांडर

 

सुधारात्मक सेवा

१. श्री अशोक शिवराम करकर, अधीक्षक

 

२. श्री गोविंद केशव राठोड, अतिरिक्त अधीक्षक

 

३. श्री राजेंद्र भाऊसाहेब धनगर, हवालदार

 

४. श्री सुनील भाऊसो लांडे, हवालदार

 

५. श्री प्रल्हाद महिपती शिंदे, हवालदार

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search