Category Archives: सिंधुदुर्ग

”पुढच्या वर्षी लवकर या.. ” बाप्पाला निरोप देण्यासाठी साकारले गेले आकर्षक वाळूशिल्प

वेंगुर्ले: गणेश चतुर्थी म्हणजे कोकणातील सर्वात मोठा सण. दिवाळी पेक्षाही मोठया उत्साहाने हा सण साजरा केला जातो. तसेच हा सण म्हणजे अनेक कलाकारांना आपली कला एक संधीच असते जणू. मूर्ती शिल्पकार, मखर कलाकार आणि भजनी गायक या संधीचा लाभ घेऊन आपल्या कला सादर करताना दिसतात. आरवली सोनसुरे येथील प्रसिद्ध कलाकार रविराज चिपकर यांनी या गणेशोत्सवात आपली कला सादर केली आहे. सागरतीर्थ समुद्र किनारी गणपतीला भावपुर्ण निरोप देताना रविराज चिपकर यांनी प्रती कृतज्ञता व्यक्त करणारे साकारलेले वाळूशिल्प सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

आज संध्याकाळी भाविकांनी अकरा दिवसांच्या गणेश मूर्तींचे जड अंतःकरणाने करत आहेत. याच धर्तीवर प्रसिध्द वाळू शिल्पकार रविराज चिपकर यांनी विसर्जनाला घेऊन जाणाऱ्या गणपतीचे वाळू शिल्प उभारले आहे आणि पुढच्या वर्षी लवकर या अशी आर्त विनवणीही केली आहे. हे शिल्प सर्वच भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे.

Loading

सावंतवाडी-ठाणे-बोरीवली-मुंबई सेंट्रल स्लीपरकोच बस सुरू करण्याची मागणी.

सिंधुदुर्ग : सावंतवाडी-ठाणे-बोरीवली-मुंबई सेंट्रल स्लीपरकोच बस सुरू करण्याबाबत माजी नगरसेवक तानाजी वाडकर यांनी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना निवेदन दिले आहे.
निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, आपल्या माध्यमातून सावंतवाडी डेपोला दोन स्लीपरकोच बस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. राज्यात पहिली सावंतवाडी- मुंबई ही रातराणी बससेवा सुरूं झाली. कालांतराने हा प्रयोग सर्व राज्यात राबविण्यात आला व यशस्वी झाला. सध्या सावंतवाडीहून मुंबईसाठी बस नाही. सावंतवाडी डेपो सिंधुदुर्ग विभागात सर्वाधिक रहदारीचा असून दोन राज्यांच्या सीमेवर असल्याने रहदारी सुरू असते. तेव्हा प्रवांशाची गरज लक्षात घेऊन उपलब्ध स्लीपरकोच बस रात्री ८.३० वा. मुंबईसाठी सोडण्यात यावी. ठाणे- घोडबंदरमार्गे बोरीवली, अंधेरी, बांद्रा, परेल, मुंबई सेंट्रल असा मार्ग असावा व परतीसाठी मुंबई सेंट्रलहून ५ वाजता सोडून बोरीवलीहून ८ वा. सोडावी. म्हणजे त्याचा लाभ ठाणे परिसर, मुंबई उपनगर व मुंबई-परेल या मध्यवर्ती भागातील प्रवाशांना घेता येईल.

Loading

Sindhudurg: महाकालेश्वर,काशीविश्वेश्वर मंदिराच्या धर्तीवर कुणकेश्वर मंदिराचा पर्यटन विकास होणार

सिंधुदुर्ग: जिल्ह्यातील प्रसिद्ध कुणकेश्वर मंदिराच्या विकासासाठी येत्या काही महिन्यांत केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून ७५ कोटीचा निधी प्राप्त करून देण्यात येणार असल्याची माहिती आमदार नितेश राणे यांनी दिली आहे.
महाकालेश्वर मंदिर, काशीविश्वेश्वर मंदिराच्या धर्तीवर कोकणची काशी कुणकेश्वर मंदिराचा पर्यटन विकास होणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. याबाबत दिलेल्या एका पत्रकात म्हटले आहे, की सिंधुदुर्गच्या पर्यटन विकासासाठी धोरणात्मक पावले उचलत आहोत. पहिल्या टप्प्यात कणकवली विधानसभा मतदारसंघात देशातील पहिले कंटेनर थिएटर देवगडमध्ये उभारले आणि ते सुस्थितीत सुरू आहे. पर्यटकांसाठी तळकोकणात पहिले वॅक्स म्युझियम देवगडमध्ये सुरू केले आहे. देशातील दुसरे महाराणा प्रताप कलादालन वैभववाडीत बनवले आहे. पोद्दार स्कूल कणकवली मध्ये सुरू केले आहे. पर्यटनाच्या दुसऱ्या टप्प्यात आणखी मोठे मोठे प्रकल्प पर्यटनच्या माध्यमातून आणणार आहे, असेही आमदार श्री. राणे यांनी पत्रकातून नमुद केले आहे.

Loading

सावंतवाडी: शहरातील धोकादायक झाडे ठरत आहेत जीवघेणी

शहरातील धोकादायक झाडे त्वरित तोडण्यात यावीत अन्यथा…. माजी शिक्षण व आरोग्य सभापती मंगेश तळवणेकर यांचा इशारा 

सावंतवाडी :मंगळवारी रात्री सावंतवाडी शहरात झाड पडून दोन युवकांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. शहरात अशी बरीच धोकादायक झाडे आहेत. अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी स्थानिक प्रशासनाने सावंतवाडी शहरासह परिसरातील रस्त्याच्या लगत जी धोकादायक झाडे आहेत, त्या झाडांच्या मालकांना सांगून ती आठ दिवसांत तोडावीत. अन्यथा शासनासह स्थानिक प्रशासनाला जाब विचारण्यासाठी सावंतवाडी तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा माजी शिक्षण व आरोग्य सभापती मंगेश तळवणेकर यांनी दिला आहे.

सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांना त्यांनी आज एक निवेदन सादर केले. या निवेदनात तळवणेकर यांनी म्हटले आहे की, मंगळवारी जो आठवडा बाजार भरतो त्या ठिकाणी आणि रेस्ट हाऊस जवळ भर रस्त्यावर आलेली अनेक धोकादायक झाडे आहेत मात्र संबंधित प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यामुळेच मंगळवारी रात्री या दोन्ही दुर्दैवी युवकांनी काहीही चूक नसताना त्यांचा बळी गेला शहरातील सर्व धोकादायक झाडे येथे सात दिवसात तोडून घ्यावीत असे तळवणेकर यांनी म्हटले आहे.

मंगळवारी रात्री 11 वाजता सावंतवाडी शहरातील राजवाड्याच्या नजीक एक मोठे झाड पडून दोन तरुणांना आपला जीव गमवावा लागला होता.

Loading

मालवण: माकडामुळे झालेल्या अपघातात रिक्षाचालक ठार

मालवण : चालत्या रिक्षात माकडाने उडी घेतल्याने चालकाचे नियंत्रण सुटून रिक्षा उलटून झालेल्या अपघातात रिक्षाचालक जागीच ठार झाल्याची घटना मालवण येथे घडली आहे. या जयराम ऊर्फ बाबजी दिगंबर मसूरकर (वय ५५, रा. खैदा कोळंब) असे त्या रिक्षाचालकाचे नाव आहे.

ही काल सकाळी साडेअकराच्या सुमारास मसूरकर रिक्षा (एमएच ०७ एएच १८६०) घेऊन मालवणहून आडारी मार्गे खैदाच्या दिशेने जात होते. चढावाच्या रस्त्यावर मसूरकर यांची रिक्षा पोहोचली. यावेळी बाजूच्या झाडीतून आलेल्या माकडांच्या कळपातील एकाने मसूरकर यांच्या रिक्षामध्ये उडी घेतली.यामुळे मसूरकर यांचे नियंत्रण सुटून रिक्षा उलटली. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने मसूरकर जागीच ठार झाले.

पोलिस उपनिरीक्षक शिवराज झांजुर्णे, हवालदार हेमंत पेडणेकर यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. घटना समजताच येथील रिक्षा चालकांनी ग्रामीण रुग्णालयात गर्दी केली. मसूरकर यांच्या मागे पत्नी, मुलगा, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

Loading

सिंधुदुर्ग विमानतळावर नियमित सेवा नाहीच; पालक मंत्र्यांचे घुमजाव

मुबई– दिनांक ०१ सप्टेंबर पासून सिंधुदुर्ग विमानतळावर नियमित सेवा देण्याचे विधान सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविन्द्र चव्हाण यांनी केले होते. मात्र आता त्यांनी घुमजाव केले असल्याचे दिसत आहे. नियमित चिपी विमानसेवा पाहणार्‍या एअरलाईन्सची परिस्थिती नाजुक बनली असल्याने नियमित सेवा देता येत नसल्याने ही सेवा शक्य नाही असे ते आता म्हणाले आहेत.

नियमित चिपी विमानसेवा पाहणार्‍या एअरलाईन्सची परिस्थिती नाजुक बनली आहे. सद्यस्थितीत केवळ 7 विमाने सुरू होती. त्यापैकी आता केवळ 4 विमानेच सुरू आहेत. अजुनही त्या एअर लाईन्सची परिस्थिती नाजुक बनत चालली आहे. चिपी विमानतळावरील सेवा सुरू राहण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी केंद्रिय मंत्री नारायण राणे यांच्या प्रमाणे शिवसेना ठाकरे गटाचे खा. विनायक राऊत यांच्यासह आम्ही सर्व मंडळी प्रयत्न करत आहोत असे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी सांगितले.

कुडाळ एमआयडीसी येथे शनिवारी माध्यमांशी बोलताना पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी याबाबत माहिती दिली. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बॅकेंचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर, महिला जिल्हाध्यक्षा सौ. संध्या तेरसे, भाई सावंत, राजु राऊळ, दिपक नारकर, श्रीपाद तवटे, चेतन धुरी आदि उपस्थित होते.

यावेळी बोलताना चव्हाण म्‍हणाले की, दि. 1 सप्टेंबर पासून मुंबई ते चिपी सिंधुदुर्ग विमानसेवा सुरळीत होणे गरजेचे होते. यासाठी चिपी विमानतळा प्रश्नी बर्‍याच बैठका झाल्या. पूर्वी उडाण योजनेअंतर्गत एअरलायन्सची सेवा सुरू झाली होती. ज्या कंपनीला हा ठेका दिला होता. त्या एअरलायन्स कंपनीचा ठेका ऑक्टोबर पर्यंत आहे. मुंबई येथे चिपीसाठी एकच स्लॉट उपलब्ध आहे.

 

Loading

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील केसरी-फणसवडे येथे उभारण्यात आले देशातील पहिले फिश थीम पार्क

सावंतवाडी :भारतातील पहिलंवहिलं फिश थीम पार्क उभारण्याचा मान  सिंधुदुर्ग जिल्ह्याला मिळाला आहे. या फिश थीम पार्कमध्ये नागरिकांना देशाविदेशातील विविध प्रकारचे मासे आणि पक्षी पाहायला मिळणार आहेत. सावंतवाडी तालुक्यातील दाणोली गावाजवळ असणाऱ्या केसरी-फणसवडे येथे हे केएसआर ॲक्वेरिअम उभारण्यात आले असून येत्या सोमवारी म्हणजेच दिनांक ११ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात येत असल्याची माहिती मंत्री रविन्द्र चव्हाण यांनी काल पत्रकार परिषदेत दिली आहे.

या फिश थीम पार्कमध्ये माशांना फीडिंग करण्याची व्यवस्था तसेच छोटेखानी तळेही निर्माण करण्यात आले आहे. या तळ्यामध्ये मत्स्यप्रेमींना फिशिंगचा अनुभव मिळणार आहे. या फिश थीम पार्कमध्ये सुमारे तीन हजार पाचशे विविध जातीचे मासे आपल्याला पाहायला मिळणार आहेत. गोड्या आणि खाऱ्या पाण्यातील मासे तसेच खाडीच्या पाण्यातील मासे पाहायला मिळणार आहेत.

पावसाळी पर्यटनस्थळ आणि थंड हवेचे ठिकाण असलेल्या आंबोलीच्या तळाशी असलेल्या केसरी-फणसवडे येथे हे फिश थीम पार्क उभारले आहे. येथील जंगल भागात असलेले करलाई स्वयंभू मंदिर प्रसिद्ध आहे. हा संपूर्ण परिसर निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. जवळच दाणोली येथे अनेक भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सदगुरु साटम महाराज यांचा मठ आहे. या फिश थीम पार्कमुळे या भागातील पर्यटनाला चांगले दिवस येणार आहेत.

Loading

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेकडून साहित्य वाटपासाठी २५० भजनी मंडळाची निवड…. यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा

सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील भजनी मंडळांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना साहित्य पुरविणे या जि. प. च्या योजनेची काल दिनांक ७ सप्टेंबर रोजी जि. प. च्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात याची सोडत काढण्यात आली. या सोडतीत तालुक्यातील गावांचे गट पाडून प्रत्येक गटातून चार मंडळाची निवड करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील भजनी मंडळांच्या कलेला प्रोत्साहन मिळावे, यासाठी प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी भजनी मंडळांना साहित्य पुरविणे ही योजना सुरू केली आहे. एक पखवाज, एक चकी आणि पाच टाळ असे साहित्य प्रत्येक निवड झालेल्या भजनी मंडळाला दिले जाणार आहे. यासाठी २५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली दरम्यान, या योजनेचा लाभ जिल्ह्यातील जास्तीत जास्त भजनी मंडळांनी घ्यावा, यासाठी अर्ज करण्याचे आवाहन जि. प. कडून करण्यात आले होते. त्या आवाहनाला अनुसरून आतापर्यंत जि. प. कडे ३२०६ अर्ज प्राप्त झाले होते. एवढ्या मंडळांना साहित्य देणे शक्य नसल्याने विभागवार लकी ड्रॉ पद्धतीने मंडळांची निवड केली गेली.या लकी ड्रॉ पद्धतीत निवडलेल्या २५० मंडळांना याचा लाभ दिला जाणार आहे.

 

 

 

Loading

सावंतवाडी: मुंबई गोवा महामार्गावर गणेशोत्सवासाठी येणार्‍या चाकरमान्यांसाठी मोफत ‘चहापान’

सावंतवाडी :मुंबई गोवा महामार्गावर कुडाळ आणि सावंतवाडी या दरम्यान असलेल्या  झाराप  येथे महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून शहरातून येणार्‍या गणेशभक्त व वाहन चालकांकरता मोफत चहा, पाणी व बिस्कीट स्टॉलची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रविन्द्र चव्हाण यांनी आज दिली. 

गणेशभक्तांसाठी हा स्टॉल गणपतीपर्यंत चालू राहणार आहे. आज या स्टॉलची पाहणी करून, उपस्थितांकडून स्टॉलच्या व्यवस्थेची माहिती घेतली असल्याचे त्यांनी सांगितले.

मंत्री रविन्द्र चव्हाण हे आज मुंबई गोवा पाहणी दौर्‍यावर होते. मुंबई-गोवा महामार्गाची सिंगल लेन गणेशोत्सवापूर्वी पूर्ण करण्यासाठी गेल्या वर्षभरात प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहोत. यामुळेच लवकरच ही सिंगल लेन कोकणवासीयांच्या सेवेत खुली होईल. यामुळेच जो प्रवास करायला पूर्वी १२ तास लागत होते, ते अंतर आता जवळपास ८ तासातच गाठता येईल. असं असलं तरीही कोकणवासीयांनी या रस्त्यावरून प्रवास करताना सुरक्षिततेचे सर्व नियम पाळणे आवश्यक आहे. ओव्हरटेकिंग आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने धोकादायक असलेले इतर प्रकार करू नयेत असे त्यांनी कोकणवासीयांना आवाहन केले आहे. 

 

 

 

Loading

कुडाळ: उद्याच्या दहीहंडी उत्सवास सिनेकलाकारांची हजेरी

कुडाळ :भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांच्या संकल्पनेतून तसेच “मेरी माती मेरा देश” या संकल्पनेअंतर्गत  यंदा कुडाळ येथे भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवात पथकांनी सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
या उत्सवास सिनेअभिनेत्री  प्राजक्ता माळी, मानसी नाईक, अभिनेता भाऊ कदम, देवदत्त नागे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. बॉलीवूड गायक सचिन गुप्ता यांचा लाईव्ह शो या उत्सवाचे आकर्षण ठरणार आहे. आतापर्यंत २६ पथकांनी नोंदणी केली असून त्यात  मुंबई, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी येथील पथकांचा समावेश आहे. या स्पर्धेतील विजेत्या मंडळाला ५,५५,५५५ या रकमेचे पारितोषिक दिले जाणार असल्याचे कुडाळ भाजपचे तालुकाध्यक्ष दादा साईल यांनी सांगितले आहे. 
ज्या मंडळांना या उत्सवात सहभागी व्हायचे आहे त्यांनी नाव नोंदणी साठी रुपेश कानडे यांच्याशी 7020363896 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.   

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search