
Train no. 09302 Indore – Mangaluru Jn. One Way Special:

Vision Abroad

Train no. 09302 Indore – Mangaluru Jn. One Way Special:
Vision Abroad
Barsu Refinery Protest – समर्थक आणि विरोधक नेत्यांच्या सभा, मोर्चा या मुळे बारसूतील वातावरण पुन्हा तापणार असा अंदाज बांधला जात होता मात्र आज बारसू सड्यावर आंदोलक फारसे फिरकलेले नसल्याने बारसू परिसराचा सडा शांत राहिलेला होता. दरम्यान गेल्या सुमारे १२ते१३ दिवसांपासून सुरु असलेले माती परीक्षणाचे काम आजही सुरु होते. या परिसरात मोठा कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
मात्र दुसरीकडे गोवळच्या निनादेवी मंदिराजवळ आज सोमवारी सकाळी अकरा वाजल्यापासून स्थानिक ग्रामस्थ उपोषणाला बसले आहेत. प्रस्तावित बारसू प्रकल्पाच्या सुरु असलेल्या माती परीक्षणला विरोध करणाऱ्या स्थानिक आंदोलकांचा छळ केल्याचा आरोप स्थानिक आंदोलकांनी केला. त्या विरोधात गोवळ येथील श्री नवलादेवी मंदिराजवळ सोमवारी सकाळी अकरा वाजल्यापासून उपोषणाला सुरुवात केली आहे.त्या विरोधात आता गोवळच्या निनादेवी मंदिराजवळ सोमवारी सकाळी अकरा वाजल्यापासून स्थानिक ग्रामस्थ उपोषणाला बसले आहेत. सुमारे २००-३०० स्थानिक प्रकल्प विरोधक उपोषणस्थळी उपस्थित आहे.
Old Memories MSRTC – सन २००० साली, रत्नागिरी आगारामार्फत सुरू झालेल्या ‘भक्ती दर्शन’ या विशेष बससेवेचे महत्त्व अनन्यसाधारण होते. आगारातीलच एका निम-आराम बसला खास रंगसंगतीत रंगवून तिच्या दोन्ही बाजूला ‘भक्ती दर्शन’ असे ब्रँडिंग करून ही बस पर्यटकांना मार्लेश्वर, कृष्णेश्वर मंदिर, संभाजी स्मारक समाधी, परशुराम मंदिर, चिपळूण, डेरवण येथील प्रति शिवसृष्टी आणि थिबा पॉईंट येथील अरबी समुद्रातील नयनरम्य सुर्यास्ताचे दर्शन घडवत असे.
सकाळी ८ ते संध्याकाळी साडे ६ पर्यंत, एवढी सर्व प्रेक्षणीय स्थळे अगदी माफक दरात दाखवल्यामुळे, वेळ न मिळणाऱ्या मुंबईकरांना आपल्या गावी आल्यावर या बसचा प्रवास म्हणजे फार मोठी पर्वणीच होती. संगीताचा आस्वाद घेत प्रवास घेत करणे, चालक/वाहकांचे सौजन्यपूर्ण वर्तन तसेच प्रवासात मिळणारी वृत्तपत्रे यावर प्रवासी बेहद खुश होता. कालांतराने महाराष्ट्रात अश्या अनेक दर्शन फेऱ्यांचे एसटीने नियोजन केले आणि या फेऱ्यांना प्रवाश्यांनी चांगला प्रतिसाद देखील दिला.
आज पर्यटनाच्या व्याख्या बदलल्या असून, अनेक नवनवीन ठिकाणांची भर यात पडत आहे, तसेच पर्यटकांची संख्या देखील प्रचंड वाढली असून, एसटीने पुन्हा एकदा पर्यटनाची संधी पाहता याकडे विशेष लक्ष द्यायला हवे.
बाहेर फिरायला आलेला व्यक्ती हा प्रवासी भूमिकेत नसून, तो पर्यटक भूमिकेत असल्याने यासाठी नेमकं आपल्याला काय काय करावे लागेल, नियोजन कसे करावे लागेल, यासाठी एसटीने एक स्वतंत्र विभाग तयार केला, तर एसटीच्या आर्थिक स्रोतात अधिकची भर पडून, प्रवाश्यांना देखील किफायतशीर पर्यटनाचा आनंद घेता येईल, यात तिळमात्र शंका वाटत नाही.
लेखक – रोहित धेंडे.
भक्ती दर्शन : एक अनोखी संकल्पना 🌸
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
सन २००० साली, रत्नागिरी आगारामार्फत सुरू झालेल्या 'भक्ती दर्शन' या विशेष बससेवेचे महत्त्व अनन्यसाधारण होते.आगारातीलच एका निम-आराम बसला खास रंगसंगतीत रंगवून तिच्या दोन्ही बाजूला 'भक्ती दर्शन' असे ब्रँडिंग करून
(१/६) pic.twitter.com/B9eTedWb5b— Rohit Dhende (@avaliyapravasi) May 8, 2023
Vision Abroad
Mumbai Goa Highway News : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील चिपळूण येथील परशुराम घाटातील चौपदरीकरणाच्या कामाला गती देण्यासाठी मागील काही दिवसांपासून निर्बंध आणण्यात आले होते. चौपदरीकरणा अंतर्गत घाटात तयार करण्यात आलेल्या मार्गिकेच्या भरावाचे बहुतांश काम पूर्ण झाल्यामुळे हा घाट नियमित वाहतुकीसाठी 11 मे पासून खुला करण्यात येणार आहे.
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे रखडलेले काम पूर्ण करण्याचा युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. परशुराम घाटातील अवघड वळणावरील काम वाहतूक सुरू असताना पूर्ण करणे कठीण जाऊ लागल्यामुळे हा घाट वाहतुकीसाठी 25 एप्रिल ते 10 मे 2023 या कालावधीसाठी अंशतः बंद करण्यात आला होता. या कालावधीत दुपारी बारा ते पाच यावेळी हा घाट वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. वाहतूक बंदी असलेल्या कालावधीत महामार्गावरील वाहतूक खेड तालुक्यामधील चिरणी -लोटे मार्गे वळवण्यात आली होती.
[email-subscribers-form id=”2″]
रत्नागिरी | प्रतिनिधी – राज ठाकरे यांची आज संध्याकाळी रत्नागिरी येथे सभा होती. बारसू रिफायनरी वरून जिल्ह्यातीलच नाही तर पूर्ण राज्यात वातावरण तापले असताना राज ठाकरे या संबधी कोणती भूमिका घेतील याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यांच्या पूर्ण भाषणात त्यांनी या प्रकल्पाला विरोध केल्याचे स्पष्ट झाले.
जमीन म्हणजे अस्तित्व; आपले अस्तित्व सांभाळा
भूमिपुत्राकडून मोठ्या प्रमाणात विकल्या जाणाऱ्या जमिनींबाबत त्यांनी रोष व्यक्त केला. जमीन असेल तर आपले अस्तित्व आहे; एकदा का जमीन गेली कि आपले कोकणातील अस्तिव संपले. पूर्वीपासून हेच सूत्र चालू आहे. भूगोल आणि इतिहास यांचा खूप मोठा संबंध आहे. ज्यांनी जमिनी (राज्य) पादाक्रांत केले त्यांनी इतिहास घडवला. मराठ्यांनी अगदी अटकेपार झेंडा रोवला होता. पण कोकणात खूप वाईट चित्र पाहावयास मिळते.जमिनी कवडीमोलाने विकल्या जातात, या जमिनी परप्रांतीय विकत घेऊन आपले राज्य निर्माण करत आहेत. काही दिवसांनी कोकणची भाषा आणि संस्कृती पण बदललेली असेल. कारण इथल्या स्थानिकांचे येथे अस्तित्वच नसेल. त्यामुळे आपल्या जमिनी विकू नका असे आवाहन राज ठाकरे यांनी या सभेत केले.
कोकणी जनतेला नेहमी गृहीत धरले जाते.
कोकणातील राजकारणात बदल दिसत नाही. नेहमी तेच तेच उमेदवार आणि पक्ष निवडून येताना दिसतात. भले त्यांनी येथील जनतेचे कल्याण करो व ना करो. त्यामुळे येथील राजकारणी येथील प्रश्नाबाबत गंभीर दिसत नाही. समृद्धी महामार्ग ४ वर्षात होतो पण मुंबई गोवा महामार्ग गेली १६ वर्ष रखडला आहे. यावरून येथील राजकारण्यांची उदासीनता दिसून येते. त्यामुळे निवडणुकीच्या वेळी कोकणवासीयांची या गोष्टी लक्षात घेऊनच नवा बदल घडवून आणला पाहिजे असे ते म्हणालेत,
कोकणचे लोक प्रतिभावंत
महाराष्ट्र राज्याला मिळालेल्या एकूण ८ भारतरत्न पुरस्कारापैकी ६ पुरस्कार कोकणातील लोकांना मिळाले आहे. कोकणात प्रतिभावंत लोक आहेत त्यांच्याकडून जमिनी विकून आपलेच नुकसान करून घेण्याची वृत्तीची अपेक्षा नाही असे ते पुढे म्हणाले.
कोकणातील पर्यटन
कोकणात पर्यटनाला भरपूर वाव आहे, केरळ आणि कोकण या दोन्ही भागातील निसर्गात समानता आहे. केरळ राज्याचा विकासाचा कणा पर्यटन होऊ शकते तर कोकणात पर्यटन सोडून अशा प्रकल्पाची काय गरज आहे? कोकणातील पर्यटनाचा विकास केला तर ते पूर्ण महाराष्ट्र पोसू शकते एवढा त्याला वाव आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कातळशिल्प आणि प्रकल्प
बारसू येथे कातळशिल्पे मोठ्या प्रमाणावर आहेत. यातील काही कातळशिल्पाची नोंदणी युनिस्को ने केली आहे . या कातळशिल्पावर पुढे युनिस्को संशोधन पण करणार आहे. युनेस्कोने जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार ज्याठिकाणी कातळशिल्पे आहेत त्या ठिकाणच्या ३ किलोमीटर परिघाच्या भागात कोणतीही विकासकामे किंवा प्रकल्प उभारला जाऊ शकत नाही मग रिफायनरी प्रकल्प कसा काय उभारला जात आहे असा प्रश्न त्यांनी केला.
Mumbai Goa Highway News : मुंबई-गोवा महामार्गाचे काम बारा वर्षे झाले तरीही रखडलेल्या स्थितीत आहे.न्यायालयाने वेळोवेळी दिलेले आदेश तसेच मंत्रीमहोदयांनी दिलेली आश्वासने आणि त्यानुसार प्रशासन व कंत्राटदार यांना दिलेले सूचना इशारे यांना हरताळ फासल्याचे दिसून येते.
म्हणूनच पळस्पे ते झाराप पर्यंतच्या ४५१ किलोमीटरच्या हायवेच्या कामाचा पाठपुरावा करण्यासाठी मुंबई-गोवा हायवे जनआक्रोश समिती गठित झाली आणि प्रशासन, राजकीय नेतृत्व,कंत्राटदार आणि स्थानिक आणि मुंबई-ठाण्यातील जनता यांच्याशी समन्वय साधून व्यापक प्रमाणावर पाठपुराव्याचे काम सुरू केले.
त्याचे फलित म्हणून पळस्पे ते कासू या टप्प्याच्या कामाचे कार्यादेश मिळाल्यानंतर कंत्राटदार जे एम म्हात्रे या कंपनीने कामाला सुरुवात तर केली,परंतु दिवसाला चार किलोमीटरचा टप्प्याचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असताना मागील एका महिन्यात केवळ अडीच किलोमीटरचे काम झाले आहे. कासू ते इंदापूर या दुसऱ्या टप्प्यातील कामाला तर अजून सुरुवातही झालेली नाही. तसेच परशुराम घाट, संगमेश्वर, लांजा या भागात अजूनही मोठया प्रमाणात काम अपूर्ण आहे.
म्हणूनच,आपली नाराजी व्यक्त करण्यासाठी आणि समस्त कोकणकराना या विषयावर पुन्हा एकदा संघटित करून आंदोलन तीव्र करण्याची सुरुवात म्हणून मुंबई-गोवा हायवे जनआंदोलन समितीने त्यांचे पहिलेवहिले त्यावरील आंदोलन म्हणून रविवार दिनांक 7 मे 2023 रोजी दुचाकी रॅली काढण्याचे जाहीर केले आहे.
दुपारी ४ वाजता रॅलीची सुरुवात कामोठे टोल प्लाझा येथून होऊन संध्याकाळी ६.३० च्या सुमारास खारपाडा टोल प्लाझा येथे समारोप होईल . खारपाडा येथे समारोप सभा होऊन पुढची दिशा जाहीर केली जाईल.
समितीच्या या आंदोलनात व उपक्रमात इतर संघटना संस्थांनी देखील सक्रिय सहभागी व्हावे यासाठी आवाहन करण्यात आले.
कोकणातील अनेक संघटनांनी या बाईक रॅलीला पाठिंबा दर्शवला आहे.
त्यामध्ये कोकण कृती समिती, कोकण विकास समिती, कोकण विकास युवा मंच, रायगड मी मराठी प्रतिष्ठान, गवळी समाज सेवा संघ रायगड -रत्नागिरी, रायगड स्वराज्य संघटना, मुंबई, सिंधुदुर्ग जिल्हा संघटना , कोकण प्रतिष्ठान- दिवा कोकण युवा संस्था, पनवेल एम आर असोसिएशन आणि पेण एम आर असोसिएशन यांचा समावेश आहे.
या रॅलीची सर्व माहिती वाचकांपर्यंत पोहोचावी प्रसिद्धी व्हावी या हेतूने महामार्गावर आपले फोटोसह बाईक रॅलीचा फलक प्रिंट करून आपापल्या विभागात तर प्रदर्शित करू शकतात.फलकाचे ग्राफिक डिझाइन समितीतर्फे दिले जाईल. यामध्ये आपण स्वतःचे छायाचित्र व नाव किंवा आपल्या संघटनेचे नाव टाकू शकतात आणि फलक प्रदर्शित करू शकतो असे समितीतर्फे जाहीर करण्यात आले आहे.
Content Protected! Please Share it instead.