Konkan Railway News :ठाणे रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म वर होणाऱ्या गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी ठाणे स्थानकावरून पुढे जाणार्या लांब पल्ल्याच्या गाड्यांबाबत काही बदल केले गेले आहेत. दिनांक 01 डिसेंबर 2022 पासून हे बदल अंमलात आणले गेले आहेत अशी माहिती कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघ (रजि.) ठाणे यांच्या मार्फत देण्यात आली आहे.
कोकणात जाणार्या सर्व गाड्यांसाठी खालील बदल करण्यात आलेले आहेत.
कोकणात जाणार्या सर्व गाड्यांचे ठाण्याला उघडणारे जनरल डबे शेवटी म्हणजे (दादर दिशेने) केले आहेत. त्यामुळे ह्या डब्यांसाठी लागणारी रांग आता मागे लागत आहे.
मुंबई वरून कोकणात जाणार्या तुतारी व मांडवी एक्सप्रेस ठाणे स्टेशनला प्लॅटफॉर्म नं. 5 वर तर कोकण कन्या आणि मंगलोर एक़्सप्रेस या गाड्या प्लॅटफॉर्म नं 7 वर येत आहेत.
Follow us on
ठाणे स्थानकावरून कोकणरेल्वेने प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांनी नोंद घ्यावी असे आवाहन कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघ (रजि.) ठाणे मार्फत करण्यात आले आहे.
सिंधुदुर्ग-मालवण: दक्षिण कोकणची काशी अशी ओळख असलेल्या आंगणेवाडीची जत्रा यंदा शनिवारी दिनांक 4 फेब्रुवारी 2023 या दिवशी संपन्न होणार आहे. नुकतीच या यात्रेच्या तारखेची घोषणा करण्यात आली आहे. दरवर्षी कोकणवासियांना या यात्रेच्या तारखेबद्दल उत्सुकता असते. आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या दर्शनाला या वार्षिकोत्समध्ये दर्शनाला भाविक देशा-परदेशातून येतात.
आंगणेवाडीच्या यात्रेसाठी देवीला कौल लावून तारीख निश्चित करण्याची पद्धत आहे. आजही लावलेल्या कौलानुसार 4 फेब्रुवारी हा दिवस यात्रेसाठी ठरवण्यात आला आहे.
दरवर्षी आंगणेवाडीच्या जत्रोत्सवासाठी रेल्वे प्रशासनाकडूनही विशेष रेल्वे फेर्या चालवल्या जातात. एसटी कडूनही भाविकांना खास बससेवा असते. आता सिंधुदुर्गामध्ये चिपी विमानतळ देखील प्रवासी सेवेसाठी खुले करण्यात आले आहे त्यामुळे भाविकांसाठी प्रवास वेगवान आणि सुलभ झाला आहे.
आंगणेवाडीच्या देवीच्या दर्शनाला या जत्रोत्सवामध्ये अनेक सेलिब्रिटी, राजकीय मंडळी आवर्जुन हजेरी लावतात. लाखो भक्त दिवसभरात देवीचं दर्शन घेतात. यासाठी विशेष सोय केली जाते.
रत्नागिरी : कोकणवासियांचा राग दिसून येत नाही, तो कमालीचा सहनशील आहे आणि त्याची सहनशीलता त्यांना घातक ठरत आहे असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज रत्नागिरी येथे पत्रकार परिषदेत म्हणाले. त्यांनी प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पांबाबत रिफायनरी बाबत भूमिका स्पष्ट केली आहे. विनाशकारी प्रकल्प कोकणात नको मात्र राज्यात येणारे प्रकल्प बाहेर जाणे हे देखील योग्य नाही असे त्यांनी प्रकल्पाबत संमिश्र वक्तव्य केले आहे.
राज ठाकरे हे सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. रिफायनरी विरोधक आणि समर्थकांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. आज पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी रत्नागिरी येथे पत्रकार परिषदेला संबोधित केले.
या राज ठाकरे यांनी म्हटले की, कोकणात ज्या अडीअडचणी आहेत त्याबद्दल कोकणवासियांनी राग व्यक्त केला पाहिजे. पण, हा राग दिसून येत नाही. गोवा महामार्ग कितीतरी दिवस रखडला असल्याचे त्यांनी म्हटले. कोकणवासीयांची सहनशक्ती त्यांना घातक ठरत आहे. मतदानातून कोकणी जनतेने राग व्यक्त करायला हवा. मात्र, तो होत नसल्याचे ही राज यांनी म्हटले.
कोकणातल्या जमिनी विकत घ्यायला भुरटे येतात. त्यावेळी खरबदारी घ्यायला हवी, एक गठ्ठा हजारो एकर जमीन जातेय, बाहेरची मंडळी जमिनी विकत घेतात, तेव्हा संशय येत नाही का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. जेव्हा मोठ्या प्रमाणात अशी बाहेरच्या भुरट्यांकडून खरेदी होते तेव्हा कोकणी माणूस जागृत राहिला पाहिजे असे ते म्हणाले.
सिंधुदुर्ग : मुंबई गोवा महामार्गावरील टोलवसुली बाबत माजी खासदार निलेश राणे यांनी एक विधान केले आहे. मुंबई गोवा महामार्गाच्या चौपरीकरणाचे काम अद्याप अपूर्ण असताना प्रशासन जर जबरदस्तीने टोल सुरू करत असेल तर पुढे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. असा इशारा देतानाच, प्रशासनाने आधी जनतेचे प्रश्न, म्हणणे जाणून घ्यावे, ते सोडवावेत आणि मगच टोल सुरू करण्याचा निर्णय घ्यावा अशी सूचना रत्नागिरी सिंधदुर्ग लोकसभेचे माजी खासदार नीलेश राणे यांनी केली आहे.
ट्विटर च्या माध्यमातून पण त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. मुंबई गोवा महामर्गावरील हातिवले टोल नाका येथे म्हणजेच अगदी टोलच्या आजूबाजूला देखील काम पूर्ण झालेले नाही, रायगड जिल्ह्यात देखील काम अपूर्ण आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील चौपदरीकणाचे काम केवळ 60 टक्केच झाले आहे. त्यामुळे काम अपूर्ण असताना टोल सुरू करणे ही जनतेवर जबरदस्ती आहे. जनतेने एकदा याबाबत निवेदनही दिले आहे. त्यामुळे त्यांच्या मागण्या प्रशासनाने ऐकून घ्यायला हव्यात. टोल ला आमचा विरोध नाही मात्र काम अपूर्ण असताना, जनतेचे प्रश्न नसोडवता, त्यांचे म्हणणे ऐकून न घेता जर जबरदस्तीने अचानक टोल सुरू करू नये. भविष्यात जनता रस्त्यावर उतरली तर याला कोण जबाबदार? असा प्रश्न देखील निलेश राणे यांनी केला आहे. जनतेच्या मागण्या ऐकून घेऊन मग टोल बाबत निर्णय घ्यावा असेही त्यांनी सांगितले आहे.
राजापूर हातिवले टोलच्या आजूबाजूलाच अजून महामार्गाचे काम पूर्ण झालेले नाही, हा त्याचा पुरावा. यामुळे प्रशासनाने जनतेचा रोष स्वतःवर ओढून घेऊ नये, टोलला विरोध नाही पण जोपर्यंत महामार्ग पूर्ण होत नाही तोपर्यंत टोल वसूल करू नये. pic.twitter.com/y3XGaZgeDY
Konkan Railway News :प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन कोकणरेल्वे आणि मध्य रेल्वेने कोंकण रेल्वे मार्गावर चार हिवाळी विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या कोकणात पर्यटनाचा हंगाम चालू आहे, तसेच येत्या ख्रिसमस आणि ३१ डिसेंबर साजरे करण्यासाठी गोवा राज्याला येणाऱ्या प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. ह्या गाड्यांचे आरक्षण उद्या दिनांक ०४.१२.२०२२ रोजी सर्व तिकीट खिडक्यांवर आणि ऑनलाईन पोर्टल वर चालू होणार आहे.
खालील गाड्या अतिरिक्त शुल्कासह चालविण्यात येणार आहेत.
1) Train No 01453/01454 LTT – MANGALURU – LTT Special Weekly
ह्या गाड्या लोकमान्य टिळक टर्मिनस ते मंगळरू जंक्शन ह्या स्थानकांदरम्यान चालविण्यात येणार आहेत.
Train No 01453
S.N.
Station Name
TIME
Day
1
LOKMANYATILAK T
22:15
1
2
THANE
22:38
1
3
PANVEL
23:40
1
4
ROHA
01:10
2
5
KHED
02:30
2
6
CHIPLUN
02:54
2
7
SANGMESHWAR
03:22
2
8
RATNAGIRI
03:55
2
9
KANKAVALI
05:40
2
10
SINDHUDURG
05:54
2
11
KUDAL
06:06
2
12
SAWANTWADI ROAD
06:28
2
13
THIVIM
07:02
2
14
KARMALI
07:24
2
15
MADGAON
08:45
2
16
KARWAR
09:38
2
17
GOKARNA ROAD
10:12
2
18
KUMTA
10:34
2
19
MURDESHWAR
11:12
2
20
BHATKAL
11:28
2
21
MOOKAMBIKA ROAD
11:42
2
22
KUNDAPURA
13:02
2
23
UDUPI
13:40
2
24
MULKI
14:32
2
25
SURATHKAL
15:02
2
26
MANGALURU JN
17:05
2
ही गाडी 09 डिसेंबर 2022 ते 6 जानेवारी 2023 दरम्यान दर शुक्रवारी चालविण्यात येणार आहे.
Train No 01454
S.N.
Station Name
Time
Day
1
MANGALURU JN
18:45
1
2
SURATHKAL
19:40
1
3
MULKI
19:52
1
4
UDUPI
20:14
1
5
KUNDAPURA
21:02
1
6
MOOKAMBIKA ROAD
21:26
1
7
BHATKAL
21:44
1
8
MURDESHWAR
22:00
1
9
KUMTA
22:30
1
10
GOKARNA ROAD
22:52
1
11
KARWAR
23:22
1
12
MADGAON
00:30
2
13
KARMALI
01:02
2
14
THIVIM
01:24
2
15
SAWANTWADI ROAD
01:52
2
16
KUDAL
02:24
2
17
SINDHUDURG
02:36
2
18
KANKAVALI
02:52
2
19
RATNAGIRI
05:55
2
20
SANGMESHWAR
06:52
2
21
CHIPLUN
07:42
2
22
KHED
08:12
2
23
ROHA
12:00
2
24
PANVEL
13:10
2
25
THANE
13:50
2
26
LOKMANYATILAK T
14:25
2
ही गाडी 10 डिसेंबर 2022 ते 7 जानेवारी 2023 दरम्यान दर शनिवारी चालविण्यात येणार आहे.
Grampanchayat Election 2022– येत्या ग्रामपंचायत निवडणुकीत निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांसाठी राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक खर्चमर्यादा निश्चित केली आहे. ग्रामपंचायतीमधील सदस्य संख्येच्या आधारावर प्रचारासाठी खर्चाची मर्यादा २५ हजार ते पावणेदोन लाख रुपयापर्यंत निश्चित करण्यात आली आहे.
सदस्यपदाच्या निवडणुकीतील उमेदवारांसाठी प्रचाराची खर्चमर्यादा २५ हजार ते ५० हजारांच्या मर्यादित आहे. तर सरपंच पदाच्या उमेदवारास ही खर्चमर्यादा ५० हजार ते १.७५ लाख एवढी आहे.
ग्रामपंचायत निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराने निवडणूक खर्चाची नोंद ठेवण्यासाठी स्वतंत्र बॅंकखाते उघडणे अनिवार्य आहे. खर्चाच्या हिशेबात स्पष्टता असणे गरजेचे आहे. निकालानंतर ३० दिवसांच्या आत निवडणूक खर्च उमेदवारांना सादर करावा लागणार आहे.
konkan Railway News :कोंकण रेल्वेमार्गावर धावणारी अजून एक गाडी आता आरामदायक एलएचबी (लिंक हॉफमॅन बुश) सहित धावणार आहे. १९२६०/१९२५९ भावनगर- कोचुवेल्ली- भावनगर हि गाडी २० डिसेंबर पासून नव्या लाल, पांढऱ्या रूपासह रुळावर धावताना दिसणार आहे. सध्या हि गाडी IRS डब्यांसहित चालवली जात आहे.
ह्या गाडीच्या डब्यांच्या संरचनेत पण खालीलप्रमाणे बदल केला आहे.
जनरेटर कार – ०१ + एसलआर – ०१ + सेकंड सीटिंग – ०३ + स्लीपर – ०८ + थ्री टायर एसी – ०६ + टू टायर एसी – २ + पॅन्टरी कार – ०१ असे मिळून एकूण २२ डबे
ह्या गाडीचे मडगाव पर्यंतचे कोकणातील थांबे
वसई रोड, पनवेल, रोहा, चिपळूण, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, थिवीम आणि मडगाव
एलएचबी (लिंक हॉफमॅन बुश) कोच ची वैशिष्ट्ये
LHB Coach
एलएचबी कोच प्रवाशांच्या दृष्टीने सुरक्षित व प्रशस्त असे अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्जित असतात.
मजबूत आणि वजनाने हलके असल्यामुळे गाडीचा वेगही वाढतो.
इतर कोचच्या तुलनेत एलएचबी कोचची लांबी ही १.५ मी. जास्त असल्याने त्यात स्लीपर आणि थ्री टायर एसी डब्यात ८ बर्थ जास्त बसतात तर टू टायर एसी डब्यात ४ बर्थ जास्त बसतात. त्यामुळे अधिक प्रवासी क्षमता.
अधिक सुरक्षित- अपघात झाल्यास डबे एकमेकांवर चढत नाही त्यामुळे कमी हानी होते.
Grampanchayat Election News : रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणूकीच्या दरम्यान ग्रामपंचायत क्षेत्रातील दारूविक्री दिवसभर बंद राहणार अशी सुचना जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिली आहे. त्यांच्या आदेशानुसार मद्यविक्री दि. १७, १८, २० डिसेंबरला संपूर्ण दिवसभर बंद राहणार आहे.
जिल्हय़ात एकूण 222 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. निवडणुका शांततेत पार पडाव्यात आणि कोणता अनुचित प्रकार घडू नये यासाठी यासाठी हा निर्णय घेतला गेला आहे. मुंबई मद्य निषेध अधिनियमातील तरतुदीनुसार जिल्हाधिकार्यांनी देशी, विदेशी मद्य, माडी विक्री बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. ज्या ग्रामपंचायत क्षेत्रातील निवडणूक बिनविरोध होणार आहेत अशा ग्रामपंचायत क्षेत्रांना मात्र हा आदेश लागु होणार नाही आहे. ह्या आदेशाची अवमानता केल्यास महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ चे कलम ५४, ५६ मधील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येणार आहे याची सर्व संबंधितांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
Konkan Railway News:डिसेंबर महिन्यातील पर्यटन हंगाम, कोकणातील जत्रेला जाणाऱ्या कोकणवासीयांची गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे आणि कोंकण रेल्वेने एक एकेरी मार्गी गाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. गाडी क्रमांक 01427 एकेरी विशेष गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून शनिवार दिनांक ३ डिसेंबर २०२२ रोजी ००.२० वाजता सुटेल आणि मडगाव येथे त्याच दिवशी १२.१५ वाजता पोहोचेल.
Mumbai Goa Highway News : मुंबई-गोवा महामार्ग अपूर्ण असताना तसेच अनेक भागात काम सुमार झाले असताना शासनाने ओसरगाव येथील टोल नाक्यावरून ह्या महामार्गावरील वाहतुकीसाठी टोल वसुली सुरू होणार आहे असे जाहीर केले आहे. आज दिनांक १ डिसेंबर रोजी मध्यरात्री पासून ही टोल वसुली सुरू केली जाणार आहे. यात सिंधुदुर्ग पासिंगच्या नोंदणीकृत व्यावसायिक वाहनांसाठी शुल्कात ५० टक्के सवलत तर अवाणिज्य वाहनांना महिन्यासाठी ३१५ रुपयांचा पास असणार आहे. टोलनाका सुरू होत असल्याची अधिसूचना महामार्ग प्राधिकरणातर्फे आज प्रसिद्ध केली.
असे असणार आहेत टोल वसुलीचे नवे दर
मोटार, जीप, व्हॅन आणि इतर हलकी वाहने : ९० रुपये
मिनी बस आणि हलकी व्यावसायिक वाहने : १४५ रुपये
ट्रक आणि बस (२ ॲक्सल) : ३०५ रुपये
व्यावसायिक वाहने ३ ॲक्सलसाठी : ३३५ रुपये
मल्टी ॲक्सल ४ ते ६ ॲक्सल वाहनांसाठी : ४८० रुपये.
सात किंवा त्याहून जास्त ॲक्सल वाहनांसाठी : ५८५ रुपये
अवाणिज्य प्रकारच्या वाहनांसाठी ३१५ रुपये मासिक पास शुल्क
वसुलीचा ठेका राजस्थान येथील गणेशगढीया कन्स्ट्रक्शन कंपनीला दिला आहे. सिंधुदुर्ग हद्दीवरील खारेपाटण-राजापूर या दरम्यानचा हातीवले टोलनाकाही १ डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून सुरू होणार आहे. येथील वसुलीचा ठेका सिंधुदुर्गातील गणेश मांजरेकर यांना दिला आहे.
ओसरगाव टोल नाक्यावर यापूर्वी १ जूनपासून टोल वसुली होणार होती. त्यासाठी एमडी करिमुन्नीसा या कंपनीला ठेका दिला होता; मात्र प्रखर राजकीय विरोधामुळे ही कंपनी वसुलीची कार्यवाही करू शकली नव्हती. त्यामुळे महामार्ग प्राधिकरणाने तीन महिन्यांसाठी नव्याने वसुलीच्या निविदा मागवल्या. यात टोल वसुली करणाऱ्या कंपन्या निश्चित झाल्यानंतर आता १ डिसेंबरपासून महामार्गावरील वाहनचालकांना टोल द्यावा लागणार आहे.