Category Archives: कोकण

खुशखबर| होळीसाठी कोकण रेल्वेमार्गावर मेमू ट्रेनसह अजून ६ विशेष गाड्या…

संग्रहित फोटो

Holi Special Trains News | 01 Mar 2023 | शिमगोत्सव साजरा करण्यासाठी कोकणात जाणार्‍या भाविकांना एक खुशखबर आहे. प्रवाशांची वाढती प्रतिसाद लक्षात घेऊन कोकण रेल्वे प्रशासनाने मध्यरेल्वे च्या सहाय्याने अजून काही विशेष गाड्या कोकण रेल्वे मार्गावर चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

1) Train No. 01187 / 01188 Lokmanya Tilak (T) – Karmali – Lokmanya Tilak (T) Special (Weekly)

ही गाडी एसी स्पेशल गाडी आहे.

Train No. 01187 Lokmanya Tilak (T) – Karmali – Special (Weekly)

दिनांक  ०२/०३/२०२३  व  ०९/०३/२०२३ (गुरुवार) या दिवशी ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस या स्थानकावरुन रात्री २२:१५ वाजता सुटेल व ती दुसऱ्या दिवशी सकाळी १०:०० वाजता करमाळी या स्थानकावर पोहोचेल.

Train No. 01188 Karmali – Lokmanya Tilak (T) Special (Weekly)

दिनांक  ०३/०३/२०२३ व १०/०३/२०२३ (शुक्रवार) या दिवशी ही गाडी करमाळी टर्मिनस या स्थानकावरुन संध्याकाळी १६:२० वाजता सुटेल व ती दुसऱ्या दिवशी पहाटे ०३:४५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस या स्थानकावर पोहोचेल.

या गाडीचे थांबे

ठाणे, पनवेल, रोहा (RN), माणगाव,वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम

डब्यांची संरचना

पॅंट्री कार – 01 + जेनेरेटर वॅन – 02 + थ्री टायर एसी – 15 + टू टायर एसी – 03  + फर्स्ट एसी – 01 असे मिळून एकूण LHB  22  डबे

2) Train No. 01165 / 01166 Lokmanya Tilak (T) – Mangaluru Jn. – Lokmanya Tilak (T) Special (Weekly)

ही गाडी पण पूर्णपणे एसी सुपरफास्ट स्वरूपाची आहे.

Train No. 01165 Lokmanya Tilak (T) – Mangaluru Jn.

दिनांक  ०७/०३/२०२३ (मंगळवार) या दिवशी ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस या स्थानकावरुन रात्री २२:१५ वाजता सुटेल व ती दुसऱ्या दिवशी संध्याकाळी १७:२० वाजता मंगळूरु या स्थानकावर पोहोचेल.

Train No. 01166 Mangaluru Jn. – Lokmanya Tilak (T)

दिनांक  ०८/०३/२०२३ (बुधवार) या दिवशी ही गाडी मंगळूरु या स्थानकावरुन संध्याकाळी १८:४५ वाजता सुटेल व ती दुसऱ्या दिवशी ११:४५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस या स्थानकावर पोहोचेल..

या गाडीचे थांबे

ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम, करमाळी, मडगांव, कारवार, गोकरण रोड, कुमठा, मुरुडेश्वर, भटकळ, मूकांबिका रोड बैंदूर, कुंदापूर, उडुपी, मुल्की, सुरतकल

डब्यांची संरचना

पॅंट्री कार – 01 + जेनेरेटर वॅन – 02 + थ्री टायर एसी – 15 + टू टायर एसी – 03  + फर्स्ट एसी – 01 असे मिळून एकूण LHB  22  डबे

3) Train No. 01597 / 01598 Roha – Chiplun – Roha MEMU Special

Train No. 01597 Roha – Chiplun MEMU Special

दिनांक  ०४/०३/२०२३ व १२/०३/२०२३ या दिवशी ही गाडी रोहा या स्थानकावरुन सकाळी ११:०५ वाजता सुटेल व ती त्याच दिवशी दुपारी १३:२० वाजता चिपळूण या स्थानकावर पोहोचेल.

Train No. 01598 Chiplun – Roha MEMU Special

दिनांक  ०४/०३/२०२३ व १२/०३/२०२३ या दिवशी ही गाडी चिपळूण या स्थानकावरुन दुपारी १३:४५ वाजता सुटेल व ती त्याच दिवशी संध्याकाळी १६:१० वाजता रोहा या स्थानकावर पोहोचेल.

या गाडीचे थांबे

माणगाव, वीर, सापे वामने, कारंजाडी, विन्हेरे, आणि खेड

डब्यांची संरचना

12 मेमू कोच

प्रवाशांनी या अतिरिक्त फेर्‍यांचा लाभ घ्यावा असे आवाहन कोकण रेल्वे तर्फे करण्यात आले आहे.

 

 

Loading

एपीएमसी मार्केटमध्ये हापूस आंब्याची आवक वाढली; डझन चे दरही आवाक्यात…..

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आंब्याची आवक वाढली आहे. सोमवारी कोकणचा हापूस व इतर राज्यातील मिळून ११०४३ पेट्यांची आवक झाली आहे. होलसेल मार्केटमध्ये हापूस ४०० ते १ हजार रुपये डझन दराने आंबा विकला जात आहे.

रत्नागिरी, सिंधुदुर्ग व रायगड जिल्ह्यांमध्ये या वर्षी आंब्याचे पीक मुबलक आले आहे. प्रत्येक वर्षी मार्चपासून नियमित आवक सुरू होत असते. परंतु, या वर्षी फेब्रुवारीमध्येच आवक सुरू झाली आहे. सोमवारी देवगड व इतर ठिकाणांवरून हापूसची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. यामुळे बाजार समितीमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. ४ ते ८ डझन पेटीची २ हजार ते ६ हजार रुपयांना विकली जात आहे. कर्नाटकमधून बदामी व लालबागचीही आवक होत आहे. बाजार समिती संचालक संजय पानसरे यांनी याविषयी माहिती देताना सांगितले की, आंबा हंगाम या वर्षी चांगला होईल अशी चिन्हे आहेत. आवक वाढू लागली आहे. मार्चमध्ये आवक अजून वाढून दरही सामान्य नागरिकांच्या नियंत्रणात येतील. हापूसला ग्राहकांचीही पसंती मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा >आता कोकणातही बॅकवॉटर आणि हाऊसबोट चा अनुभव घेता येईल; कोकणातील तरुणाचे पर्यटन व्यवसायात एक पाऊल पुढे…

Loading

आता कोकणातही बॅकवॉटर आणि हाऊसबोट चा अनुभव घेता येईल; कोकणातील तरुणाचे पर्यटन व्यवसायात एक पाऊल पुढे…

रत्नागिरी : कोकणात येणाऱ्या पर्यटकांसाठी एक खुशखबर आहे. आता तुम्हाला केरळ राज्याप्रमाणे  प्रमाणे कोकणात सुद्धा हाऊसबोट आणि बॅकवॉटर टुरिझम चा अनुभव घेता येणार आहे.
कोकणातील दाभोळ येथील एक तरुण सत्यवान दरदेकर हा तरूण कोकणात खऱ्या अर्थाने बॅकवॉटर टुरिझम ची सुरुवात करत आहे. कोकणातील तरुणांने बनवलेली पहिली हाऊसबोट गुहागर पराचुरी येथील निदानसुंदर बॅकवॉटर मध्ये सुरू होत आहे. दोन खोल्यांची ही अतिशय सुंदर हाऊसबोर्ड सत्यवानने बनवली आहे. थोड्याच दिवसात दाभोळच्या बॅकवॉटर मध्ये परचुरी गावात आपल्याला बॅकवॉटरमध्ये जाऊन प्रत्यक्ष राहता येईल. 
आजोळ हे अतिशय देखणे ग्रामीण व निसर्ग पर्यटनाचा केंद्र सत्यवान चालवतो. तो त्याची पत्नी त्याची आई सर्वजण मिळून कोकणात खऱ्या अर्थाने सांस्कृतिक आणि ग्रामीण पर्यटनाचा समृद्ध अनुभव आणि आनंद देतात.  बॅकवॉटर टुरिझम ची ही त्याची एक नवी सुरवात आहे, नक्कीच हा उपक्रम प्रचंड यशस्वी होईल अशी त्याला आशा आहे.
बुकिंग साठी
>सत्यवान दरदेकर.
9881383228
9209705194

Loading

रत्नागिरी येथे बोलेरो टेम्पो पलटी होऊन अपघात

रत्नागिरी : झरेवाडी नजीक टेम्पो पलटी होऊन अपघात झाला. अज्ञात वाहनाने हुल दिल्याने हा अपघात झाला. या अपघातात कुणीही जखमी झालेले नाही.रत्नागिरी येथून बारामती कडे जाणाऱ्या मच्छी वाहतुकीचा बोलेरो टेम्पो मोठ्या वाहनाने हूल दिल्याने अवघड वळणावर सकाळी साडे सहाच्या सुमारास कठड्यावर आदळला. मात्र यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही. 
पुणे येथून रत्नागिरी येथे मच्छी घेऊन आलेला बोलेरो टेम्पो कंपनीमध्ये मच्छी उतरवून परतीच्या प्रवासात असताना हा अपघात झाला. यावेळी स्थानिकांनी मदत करत बोलेरो गाडीला बाहेर काढण्यात मदत केली.

Loading

उपग्रह टॅगिंग – ऑलिव्ह रिडले कासवांचे गूढ उलगडणार ?

रत्नागिरी: जिल्ह्याच्या गुहागर किनाऱ्यावर बुधवारी दोन ऑलिव्ह रिडले कासवांना  उपग्रह टॅगिंग करण्यात आले. राज्याचा कांदळवन कक्ष आणि डेहरादून येथील भारतीय वन्यजीव संस्थेच्या सहकार्याने हा प्रकल्प राबवण्यात येत आहे. ऑलिव्ह रिडले कासवांना उपग्रह टॅगिंग करून त्या माध्यमातून समुद्रातील त्यांचा भ्रमणमार्ग शोधण्यासाठी प्रकल्प हाती घेतला आहे. 
‘बागेश्री’ आणि ‘गुहा’ नामकरण 
 टॅगिंग केलेल्या कासवांपैकी  एक-मादी बाग या भागात सापडल्याने तिचे नाव ‘बागेश्री’ ठेवण्यात आले, तर गुहागर या नावावरून दुसरीचे नाव ‘गुहा’ असे ठेवण्यात आल्याची माहिती आंजर्ले येथील कासव-मित्र तृशांत भाटकर यांनी  दिली आहे.
टॅगिंग चा इतिहास 
पूर्वी भारताच्या पूर्व किनाऱ्यावर या कासवांचे टॅगिंग झाले होते. पश्चिम किनाऱ्यावर गेल्या वर्षी (२५ जानेवारी २०२२) पहिल्यांदाच उपग्रह टॅगिंग करण्यात आले होते. सुरुवातीला मंडणगड (वेळास), आंजर्ले (दापोली) या किनाऱ्यावरील प्रत्येकी एका कासवाला ट्रान्समीटर लावले होते. त्यानंतर आणखी तीन कासवांना ट्रान्सलेटर बसवून तेही गुहागरमधून सोडले होतो. ते मादी कासव श्वास घेण्यासाठी समुद्राच्या पृष्ठभागावर आल्यानंतर हे ट्रान्सलेटर त्यांच्या ठिकाणाचे संकेत उपग्रहाला पाठवल्यानंतर त्यांच्या अधिवासाची माहिती अभ्यासकांना मिळत होती. सहा-सात महिन्यांनंतर अचानक माहिती येणे बंद झाले होते. यंदाच्या वर्षी कासवांना पुन्हा ट्रान्समीटर बसवण्याचा निर्णय भारतीय वन्यजीव संस्थान (डब्ल्यूआयआय), कांदळवण कक्ष, वन विभागाने घेतला.
टॅगिंग का केली जात आहे?
हा प्रकल्प यशस्वी झाल्यास या कासवांबद्दल काही गूढ गोष्टी समजण्यास मदत होईल. त्यात या कासवांच्या स्थलांतराचा पॅटर्न कोणता? ती कुठून येतात? कोणत्या ठिकाणी जास्त वेळ राहतात? याशिवाय आपणास  माहित नसलेल्या अनेक गोष्टी समजू शकतील.
कशी केली जाते टॅगिंग
टॅगिंग करण्यासाठी किनारपट्ट्यावर आलेले योग्य वजनाचे ऑलिव्ह रिडले जातीचे मादीकासव निवडले जाते. टॅगिंग उपकरणाचे वजन या कासवांच्या प्रवासास त्रासदायक ठरू नये यासाठी एक नियम ठरविण्यात आलेला आहे. उपकरणाचे वजन कासवांच्या वजनाच्या ३% पेक्षा जास्त असू नये. निवडलेल्या मादीचे कवच साफ करून एका विशिष्ट गमाने उपकरण चिटकवले जाते आणि त्यावर निळा रंग देण्यात येतो. सुमारे ७ ते ८ तासांनी  हा गम सुकल्यावर त्या मादीस समुद्रात सोडण्यात येते.
या उपकरणाला एक बटण असते. जेव्हा कासव श्वास घेण्यास समुद्राच्या पृष्ठभागावर येते तेव्हा या बटनावरचा दाब कमी होऊन बॅटरी कार्यन्वित होते आणि हे उपकरण सेटेलाईटला सिग्नल पाठवते. त्यामुळे या कासवाचे स्थान (Live Location)  माहिती होण्यास मदत होते.   

Loading

एसटी बसेसच्या कमी भारमानावर उपाय; रत्नागिरीत आता धावणार मिनी बसेस..

संग्रहित फोटो

रत्नागिरी: ग्रामीण भागातील बस फेऱ्या कमी भारमानामुळे बंद होताना दिसत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातसुद्धा ग्रामीण भागात एसटीला कमी भारमान मिळत असल्याने अनेक फेऱ्या बंद करण्याची वेळ एसटी विभागावर आली आहे त्यातून महामंडळाने पर्याय काढण्याचे ठरवले असून आता ग्रामीण भागात मोठ्या बसेस ऐवजी मिनी बसेस चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्यासाठी रत्नागिरीच्या एसटी विभागाला नवीन पन्नास मिनी बसेस देण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. 

हेही वाचा >एका रात्रीत ३ मंदिरात चोरी; चोरट्यांसाठी कोकणातील मंदिरे बनत आहेत ‘ईझी टार्गेट’

सुरुवातीला या 50 मिनी बसेस कंत्राटी पद्धतीने एसटी विभागाला पुरवण्यात येणार आहेत त्यानंतर प्रवाशांचा मिळणारा प्रतिसाद लक्षात घेऊन या बसेस मध्ये आणखी वाढ करण्याचा विचार महामंडळाकडून करण्यात येणार आहे. 

मिनी बस चा प्रयोग आता शहरात यशस्वी होताना दिसत आहे. मोठ्या बसशी तुलना केल्यास या बसचा प्रवास जलद आणि कमी खर्चिक होतो. या बसेस ताफ्यात आल्यास व्यवस्थापनाच्या दृष्टीने लवचिकता पण येईल. कमी भारमान असलेल्या गावी मिनी बस सोडल्यास एसटीला तोटाही होणार नाही. 

Loading

संगमेश्वर येथे १२ वी इयत्तेत शिकणाऱ्या मुलीची आत्महत्या

संगमेश्वर : तालुक्यातील मुरडव येथे  बारावीची परीक्षा सुरू असतानाच एका मुलीने टोकाचं पाऊल उचलत आपल जीवन संपवलं आहे. रिया रमेश नावले (वय १७, मुरडव-नावलेवाडी) अस या मुलीचं नाव आहे. मुरडव नावलेवाडी येथील रिया रमेश नावले ही बारावीची विद्यार्थिनी आहे. नुकताच तिने इंग्रजीचा पेपर दिलेला होता. तिचे वडील रमेश हे कामानिमित्त मुंबईला आहेत. आई, आजी कामावर गेल्यानंतर घरामध्ये कोणीही नसताना तिने ओढणीने गळफास लावून आत्महत्या केली. रियाने आत्महत्या का केली, या मागील कारण अद्यापही स्पष्ट झाले नसून संगमेश्वर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Loading

शिमगोत्सवासाठी मध्यरेल्वेच्या कोंकण रेल्वे मार्गावर ६ विशेष गाड्या

Holi Special Trains | प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने कोंकण रेल्वेमार्गावर ६ विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या आधी कोंकण रेल्वे मार्फत काही अतिरिक्त गाड्या सोडल्या गेल्या आहेत. त्यामुळे कोकणात शिमगोत्सव साजरा करण्यासाठी गावी जाणाऱ्या भाविकांचा प्रवास आरामदायक होईल हे नक्की
1) Train no. 09057 / 09058 Udhana Jn  –  Mangaluru  Jn   – Udhana Jn  Special on  Special Fare
Train no. 09057 Udhana Jn  –  Mangaluru  Jn
ही गाडी दिनांक  ०१/०३/२०२३ (बुधवार), ०५/०३/२०२३ (रविवार) या दिवशी ही गाडी उधाणा या स्थानकावरुन रात्री २०:०० वाजता सुटेल व ती दुसऱ्या दिवशी संध्याकाळी १९:४० वाजता मंगळुरु या स्थानकावर पोहोचेल.
Train no. 09058  –  Mangaluru  Jn  – Udhana Jn
ही गाडी दिनांक  ०२/०३/२०२३ (गुरुवार), ०६/०३/२०२३ (सोमवार) या दिवशी ही गाडी मंगळुरु या स्थानकावरुन रात्री २१:१० वाजता सुटेल व ती दुसऱ्या दिवशी रात्री २१:०५  वाजता उधाणा या स्थानकावर पोहोचेल.
या गाडीचे थांबे
वलसाड, वापी, पालघर, वसई रोड, कामण रोड, पनवेल, रोहा (RN), माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डे, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम, करमाळी, मडगांव, काणकोण, कारवार, अंकोला, गोकरण रोड, कुमठा, मुरुडेश्वर, भटकळ, मूकांबिका रोड बैंदूर, कुंदापूर, उडुपी, मुल्की, सुरतकल, तोकुर
डब्यांची संरचना
दिनांक  ०१/०३/२०२३ (बुधवार) मंगळुरूसाठी प्रस्थान करणारी आणि दिनांक  ०२ /०३/०२२३ (गुरुवार) परत येणाऱ्या गाडीच्या डब्यांची स्थिती
एसएलआर – ०1 + जेनेरेटर वॅन – 01 + सेकंड सीटिंग – 04 + स्लीपर – 10 + थ्री टायर एसी – 04 + टू टायर एसी – 02  असे मिळून एकूण LBH  22  डबे
दिनांक  ०५/०३/२०२३ (बुधवार) मंगळुरूसाठी प्रस्थान करणारी आणि दिनांक  ०६  /०३/२०२३ (गुरुवार) परत येणाऱ्या गाडीच्या डब्यांची स्थिती
एसएलआर – ०2 + सेकंड सीटिंग – 04 + स्लीपर – 12 + थ्री टायर एसी – 03 + टू टायर एसी – 01  असे मिळून एकूण  22  डबे
2) Train no. 09412 / 09411 Ahmedabad  –  Karmali  – Ahmedabad Jn  Special on  Special Fare
Train no. 09412 Ahmedabad – Karmali
ही गाडी दिनांक  ०७/०३/२०२३ (मंगळवार) या दिवशी ही गाडी अहमदाबाद  या स्थानकावरुन सकाळी  ०९:३०  वाजता सुटेल व ती दुसऱ्या दिवशी पहाटे ०४:२५ वाजता करमाळी  या स्थानकावर पोहोचेल.
Train no. 09411 – karmali  – Ahmedabad
ही गाडी दिनांक  ०८/०३/२०२३ (बुधवार) या दिवशी ही गाडी करमाळी  या स्थानकावरुन सकाळी  ०९:२० वाजता सुटेल व ती दुसऱ्या दिवशी सकाळी ०७:०० वाजता अहमदाबाद  या स्थानकावर पोहोचेल.
या गाडीचे थांबे
गेरातपुर, वडोदरा, सुरत, वापी, पालघर, वसई रोड, कामण रोड, पनवेल, रोहा (RN), माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डे, आरवली रोड,  संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड,  कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम
डब्यांची संरचना
एसएलआर – ०2 + सेकंड सीटिंग – 05+ स्लीपर – 12 + थ्री टायर एसी – 04 + टू टायर एसी – 01  असे मिळून एकूण  24  डबे
आरक्षण 
गाडी क्रमांक 09411 या गाडीचे आरक्षण दिनांक २६/०२/२०२३ पासून रेल्वेच्या सर्व तिकीट खिडक्यांवर आणि अधिकृत संकेतस्थळावर सुरु होणार असल्याची माहिती रेल्वे मंत्रालयातर्फे देण्यात आली आहे.

Loading

एका रात्रीत ३ मंदिरात चोरी; चोरट्यांसाठी कोकणातील मंदिरे बनत आहेत ‘ईझी टार्गेट’

बांदा : काल रात्री सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यातील एक नव्हे तर तीन मंदिरात चोरटयांनी चोरीचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे मंदिरांच्या सुरक्षेविषयी प्रश्न निर्माण झाला आहे.  मडुरा, रोणापाल व इन्सुली येथील ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात काल मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. सर्वप्रथम चोरट्यांनी मडुरा माऊली मंदिराचा मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून फंडपेटी फोडून रोकड लंपास केली. त्यानंतर रोणापाल माऊली मंदिरात चोरीचा अयशस्वी प्रयत्न केला. त्यानंतर पहाटेच्या सुमारास इन्सुली माऊली मंदिर फोडले. त्यात चोरट्यांच्या हाती फारसे काही लागले नाही.
इन्सुली व रोणापाल मंदिरात चोरी करताना दोघे चोरटे सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाले आहेत. सीसीटीव्ही फुटेजमध्ये अंदाजे विशीतील दोघे युवक दिसत आहेत. बांदा पोलीसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरु आहे. बांदा पोलीसांसमोर चोरट्याने पकडण्याचे आव्हान आहे.
कोकणातील मंदिरे बनत आहेत ‘ईझी टार्गेट’
तळकोकणतील मंदिरे काही अपवाद वगळता गाववस्तीपासून दूर असतात. रात्री मंदिरपरिसर निर्मनुष्य असतो. चोरट्यांना ती ईझी टार्गेट वाटायला लागली आहेत त्यामुळे या ठिकाणी  चोरीचे प्रयत्न होताना दिसत आहेत. चोरीचे प्रकार वाढल्याने अनेक मंदिरात सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले आहेत. पण सुरक्षेच्या या उपाययोजना पण कमी पडताना दिसत आहेत.  

Loading

जुगाराच्या पैशाच्या देवाण-घेवाणीतून कणकवलीत रिक्षा जाळण्याचा प्रकार

कणकवली | जुगाराच्या पैशाची आर्थिक देवाण-घेवाणीतुन झालेल्या भांडणातून गुरुवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास घरासमोर लावलेली रिक्षा जाळून टाकल्याची खळबळ जनक घटना कलमठ मठकर कॉम्प्लेक्स या ठिकाणी घडली. या संदर्भात सुरज जाधव (कणकवली – कलमठ मठकर कॉम्प्लेक्स) यांनी कणकवली पोलिसात फिर्याद दिली असून या फिर्यादीनुसार ठाकरे गटाचे कार्यकर्ते रमेश  चव्हाण यांच्यासह आप्पा शिर्के याच्या विरोधात कणकवली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रिक्षा जाळण्याच्या या प्रकाराने मात्र तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. 
याबाबत सुरज जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सुरज जाधव यांचे जुगाराच्या पैशाच्या देवान घेवाणीवरून वरून काल बुधवारी आप्पा शिर्के यांच्यासोबत भांडण झाले होते. त्यावेळी रिमेश चव्हाण, सुनील काणेकर व चेतन पाटील यांनी शिवीगाळ करत धमकी दिली. तसेच रिक्षाच्या मडगळ वर दगड मारून नुकसान केले. याप्रकरणी सुरज जाधव यांनी कणकवली पोलिसात बुधवारी रात्री चौघां विरोधात तक्रार दाखल केली होती. सुरज जाधव हे घरी जात असताना रिमेश चव्हाण यांनी तू रिक्षा घेऊन घरी जा तुझी वाटत लावतो अशी धमकी दिल्याचे या फिर्यादीत म्हटले आहे. त्यानंतर फिर्यादी हे घरी गेले. व रात्री झोपत असताना त्यांना घराच्या खिडकीतून बाहेर ज्वाळा दिसू लागल्या. त्यावेळी त्यांनी घराबाहेर येऊन पाहिले असता रीमेश चव्हाण व आप्पा शिर्के हे पळताना दिसून आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानंतर पाणी मारून रिक्षाला लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत आगीत रिक्षा जळून बेचिराख झाली होती. तर या रिक्षाच्या बाजूला संकेत फोंडेकर यांच्या असलेल्या दोन दुचाकी ना देखील आगीची झळ बसली. या आगीत रीक्षेचे सुमारे 2 लाखाचे नुकसान झाले आहे. या संदर्भात कणकवली पोलिसात संशयित आरोपींच्या विरोधात 435 व 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search