Mumbai Goa Highway | या गतीने काम चालू राहिल्यास महामार्गाचे काम पूर्ण होण्यास डिसेंबर २०२५ उजाडेल – जनआक्रोश समिती

गणेश नवघरे | मुबंई गोवा महामार्गाची जनआक्रोश समितीच्यावतीने निरीक्षण व सर्व्हे शनिवार दिनांक ३ जुन रोजी करण्यात आले.केद्रींयमंञी नितीन गडकरी यांच्या म्हणन्यानुसार ३१ मे पर्यंत एक मार्गीका तर डिसेंबर २०२३ पर्यंत संपुर्ण महामार्ग पूर्ण केला जाईल असे आश्वासन दिले होते.परंतु महामार्गावर तसे काहीही पहायला मिळले नाही असे जनआक्रोष टीमचे म्हणने आहे. या पहाणी दौऱ्यासाठी NHAI चे अधिकारी तसेच जे. एन. म्हात्रे व कल्यान टोलवेचे ठेकेदार यांना सोबत घेऊन पळस्पे ते ईंदापुर असा पहाणी दौरा जनआक्रोश टीमचे सचिव रुपेश दर्गे व त्यांचे पदाधिकारी ऊपस्थित होते.

या रस्त्याच्याबाबत विचारणा करत असताना अधिकारी माञ ऊत्तर देण्यास टाळाटाळ करताना दिसुन येत आहेत असे माणगाव सचिव रमेशभाई ढेबे म्हणाले.

जनआक्रोश समितीकडून श्री.रुपेश दर्गे, श्री.अजय यादव,श्री.गणेश नवघरे,श्री.संजय जंगम,श्री. अनिल जोशी,श्री.अशोक देवरुखकर काका,श्री. रवींद्र पवार, श्री.संजय सावंत,श्री.अतुल चव्हाण,श्री.राज गुजर,श्री. निलेश घाग(CA),श्री. प्रकाश पालांडे,श्री.सचिन मुनगेकर, श्री.रमेशभाई ढेबे,श्री.सुधीर सापळे,श्री.रवींद्र सांगळे उपस्थित होते.

Facebook Comments Box
   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search