Category Archives: कोकण रेल्वे

Konkan Railway: होळीसाठी कोकणरेल्वे मार्गावर अजून एका गाडीची घोषणा

   Follow us on        
Konkan  Railway: होळीसाठी कोकणात जाणाऱ्या  प्रवाशांसाठी खुशखबर आहे. होळी सण २०२५ दरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी कोकण रेल्वे प्रशासनाने मध्य रेल्वेच्या समन्वयाने अजून एक विशेष गाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या गाडीचा तपशील खालीलप्रमाणे आहे,
गाडी क्र. ०१०६३/०१०६४ लोकमान्य टिळक (टी) – तिरुवनंतपुरम उत्तर लोकमान्य टिळक (टी) साप्ताहिक विशेष: 
गाडी क्र. ०१०६३ लोकमान्य टिळक (टी) – तिरुअनंतपुरम उत्तर वीकली विशेष ही विशेष गाडी लोकमान्य टिळक (टी) येथून गुरुवार दिनांक  ०६/०३/२०२५ आणि १३/०३/२०२५ रोजी १६;०० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी २२:४५ वाजता तिरुअनंतपुरम उत्तरला पोहोचेल.
गाडी क्र. ०१०६४ तिरुवनंतपुरम उत्तर – लोकमान्य टिळक (टी) साप्ताहिक विशेष ही विशेष गाडी  तिरुअनंतपुरम उत्तर येथून शनिवार, दिनांक ०८/०३/२०२५ आणि १५/०३/२०२५ रोजी १६:२० वाजता सुटेल आणि  लोकमान्य टिळक (टी) येथे तिसऱ्या दिवशी ००:४५  वाजता पोहोचेल.
ही गाडी ठाणे, पनवेल, पेण, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी , थिविम, करमाळी, मडगाव, कारवार, गोकर्ण रोड, कुमठा, मुर्डेश्वर, भटकळ, मुकांबिका, सुरेंद्र रोड, सुरेंद्र रोड, उंबरनाथ रोड मंगळुरू जं, कासरगोड, कन्नूर, कालिकत, तिरूर, शोरानूर जं., त्रिसूर, एर्नाकुलम टाउन, कोट्टायम, तिरुवल्ला, चेंगन्नूर, मावेलीकारा, कायनकुलम आणि कोल्लम जं. या स्थानकावर थांबणार आहे.
डब्यांची रचना: एकूण 22 एलएचबी कोच: टू टायर एसी –  ०१ कोच, थ्री टायर एसी – ०६ कोच, स्लीपर – ०९  कोच, जनरल – ०४ कोच, जनरेटर कार – ०१, एसएलआर – ०१
प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.




Traffic block at CSMT: कोकण रेल्वेमार्गावर धावणार्‍या १० गाड्यांवर परिणाम होणार

   Follow us on        

Megablock on Central Railway: मुंबई सीएसएमटी येथील फलाट क्रमांक १२ आणि १३ च्या कामासाठी मध्यरेल्वे या स्थानकावर या आठवड्यात एक ब्लॉक घेणार आहे. त्यामुळे या स्थानकावरून सुटणार्‍या काही गाड्यांच्या आरंभ आणि अंतिम स्थानकांमध्ये तात्पुरत्या स्वरूपात बदल करण्यात आला आहे. यामध्ये कोकण रेल्वे मार्गावर धावणार्‍या गाड्यांचा समावेश असून याबाबतचा तपशील खालीलप्रमाणे.

आरंभ स्थानकांमध्ये बदल करण्यात आलेल्या गाड्या

दिनांक ०१ मार्च रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक २०१११ सीएसएमटी-मडगाव कोकणकन्या एक्सप्रेस ही गाडी आपला प्रवास पनवेल या स्थानकावरून या स्थानकावरील नियोजित वेळेत सुरु जाणार आहे.

दिनांक ०२ मार्च रोजी सुटणारी गाडी क्रमांक १२०५१ मुंबई मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस, गाडी क्रमांक २२२२९ मुंबई मडगाव वंदे भारत एक्सप्रेस, गाडी क्रमांक २२११९ मुंबई मडगाव तेजस एक्सप्रेस या गाड्या दादरवरून या स्थानकावरील नियोजित वेळेत आपला प्रवास सुरु करणार आहेत. तर गाडी क्रमांक १०१०३ सीएसएमटी-मडगाव मांडवी एक्सप्रेस ही गाडी आपला प्रवास पनवेल स्थानकावरून पनवेल स्थानकावरील नियोजित वेळेत सुरु करणार आहे.

 

अंतिम स्थानकांत बदल करण्यात आलेल्या गाड्या

गाडी क्रमांक २२१२० मडगाव मुंबई तेजस एक्सप्रेस, गाडी क्रमांक १२०५२ मुंबई मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस या गाड्यांचा प्रवास दिनांक २६ फेब्रुवारी ते ०१ मार्च दरम्यान दादरला तर  गाडी क्रमांक १२१३४ मंगलोर मुंबई एक्सप्रेस या गाडीचा प्रवास ठाण्याला संपविण्यात येणार आहे.

दिनांक ०१ मार्च रोजी गाडी क्रमांक २०११२ मडगाव -सीएसएमटी कोकणकन्या एक्सप्रेस, गाडी क्रमांक १०१०४ मडगाव -सीएसएमटी मांडवी एक्सप्रेस-या गाड्यांचा प्रवास पनवेल स्थानकावर संपविण्यात येणार आहे.

Konkan Railway: दिवा स्थानकावरून कोकणरेल्वेच्या गाड्या सोडणे नियमबाह्य़ आणि गैरसोयीचे

   Follow us on        
Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या ५०१०३/५०१०४ रत्नागिरी फास्ट पॅसेंजर आणि १०१०५/१०१०६ दिवा सावंतवाडी दिवा एक्सप्रेस या दोन गाड्या दिवा स्थानकावरून सोडण्यात येतात. मात्र कोकण रेल्वे मार्गावर चालविण्यात येणाऱ्या या दोन गाड्यांसाठी सुरवातीचे स्थानक म्हणुन दिवा स्थानक गैरसोयीचे असून नियमबाह्य़ही आहे. या गाड्या दादर किंवा मुंबई सीएसएमटी या स्थानकांवरून सोडण्यात याव्यात अशी मागणी अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीचे सेक्रेटरी अक्षय महापदी यांनी केली आहे.

रेल्वे बोर्डाच्या मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन

दिवा स्थानकावर सध्या गाड्यांमध्ये पाणी भरण्याची सोय नाही आहे. रेल्वे बोर्डाने दिनांक १६.०४.२०१० रोजी जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार पुढील प्रवासात गैरसोय टाळण्यासाठी गाडयांना सुरवातीच्याच स्थानकावर पाणी भरणे बंधनकारक केले आहे. असे असताना येथून सुटणाऱ्या या दोन गाड्यामध्ये पाणी पुढील स्थानकावर म्हणजे पनवेल स्थानकावर भरण्यात येते. यावरून विभागीय रेल्वे प्रशासन रेल्वे बोर्डाच्या सुचना पाळत नसल्याचे स्पष्ट होत आहे. या गाड्यांना पनवेल स्थानकावर पाणी भरावे लागत असल्याने पनवेल स्थानकावर नियमित थांब्याच्या कालावधीपेक्षा अधिक कालावधीपर्यंत गाडी थांबवून ठेवावी लागत असल्याने प्रवाशांच्या वेळेचा अपव्यव होतो.
फक्त दोन गाड्यांसाठी दिवा स्थानकावर पाणी भरण्याची व्यवस्था करणे अव्यवहार्य आहे. दिवा परिसरात पाण्याची कमतरता पाहता अशी सोय केली तरी गाड्यांसाठी पाण्याची टंचाई भासू शकते. त्यापेक्षा या गाड्या पुढे दादर, सीएसएमटी नेल्यास त्यांच्यासाठी लागणारे पाणी आणि देखभालीचा प्रश्न राहणार नाही.

प्रवाशांसाठी गैरसोयीचे

मांडवी, जनशताब्दी, वंदे भारत, तेजस, नेत्रावती, मत्स्यगंधा, कोकणकन्या, मडगाव वांद्रे, लोकमान्य टिळक टर्मिनस मडगाव या गाड्या कोकणातील बहुतांश स्थानकांवर थांबत नाहीत. त्या स्थानकांवर केवळ सावंतवाडी एक्सप्रेस आणि रत्नागिरी पॅसेंजर या किंवा यांपैकी कोणतीतरी एकच गाडी थांबते. त्यामुळे या ठिकाणी प्रवास करणार्‍या प्रवाशांना इतर पर्यायच नाही. हे प्रवासी ठाणे, भांडुप, घाटकोपर, मुंबई, बोरिवली, मीरा-भायंदर, वसई  विरार येथील आहेत. या गाड्या दिवा स्थानकापर्यंत मर्यादित असल्याने या गाड्यांचा लाभ घेताना त्यांना खासकरून आबालवृद्धांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागतो त्यामुळे या गाड्या दादर किंवा मुंबई सीएसएमटी पर्यत विस्तारित केल्यास त्यांचा त्रास बर्‍यापैकी वाचेल.

फलाटाची कमी लांबी

दिवा स्थानकावरील फलाटांची लांबी पुरेशी नसल्याने या गाडयांना अधिक डबे जोडण्यावर मर्यादा येत आहेत. १०१०५/१०१०६ दिवा सावंतवाडी दिवा ही गाडी एलएचबी स्वरूपात चालविण्यात येत असून सध्या ती १६ डब्यांच्या चालविण्यात येत आहे. कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांची गर्दी पाहता ही गाडी २२ डब्यांची करणे आवश्यक आहे. दिवा स्थानकांवरील कमी लांबीच्या प्लॅटफॉर्ममुळे ते शक्य होणार नाही.

दिवा स्थानकासाठी ५ डबे राखीव असावेत

सध्या या गाड्यादिवा स्थानकावरून सोडण्यात येत असल्याने कल्याण डोंबिवली आणि  दिवा भागातील प्रवाशांना ही गाडी सोयीची आहे. ही गाडी दादर किंवा मुंबई  सीएसएमटी स्थानकापर्यंत विस्तारित झाल्यास येथील प्रवाशांच्या सोयीसाठी किमान ५ जनरल डबे दिवा स्थानकाला राखीव ठेवावे, जेणेकरून या प्रवाशांना प्रवास करणे सोयीचे होईल.
या मुद्द्यांवर श्री.अक्षय महापदी यांनी रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधले असून या गाड्या दादर किंवा मुंबई सीएसएमटी स्थानकापर्यंत विस्तारित कराव्यात अशी इमेलद्वारे मागणी केली आहे.

विशेष गाडीतून महाकुंभमेळ्यासाठी जाणारे गोव्यातील १०० प्रवासी रत्नागिरीहून माघारी फिरले; कारण काय?

   Follow us on        

रत्नागिरी: गोवा सरकारने महाकुंभ मेळ्यासाठी चालविलेल्या विशेष गाडीला तुफान प्रतिसाद मिळाला असून गाडीच्या एकूण क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी झाल्याने या गाडीला मोठी गर्दी झाली होती. या गर्दीमुळे अनेक प्रवाशांना नाईलाजाने आपला प्रवास अर्धवट सोडून परत माघारी फिरावे लागले असल्याची बातमी समोर आली आहे.

गोवा सरकारने गोव्यातील भाविकांनी महाकुंभ मेळ्यासाठी प्रयागराज येथे जाणे सुलभ व्हावे यासाठी विशेष सवलत देवून या मार्गावर गाड्या चालविल्या आहेत. प्रवाशांसाठी प्रवासादरम्यान मोफत जेवण आणि इतर सवलती देण्यात आल्या आहेत. या प्रवासाकरिता सरकारने पास वितरित केले होते. मात्र पासधारकां व्यतिरिक्त किमान ४०० अतिरिक्त प्रवासी या गाडीतून प्रवास करत होते. या अतिरिक्त प्रवाशांमुळे गोवा सरकारने देवू केलेल्या सवलतींवर म्हणजे जेवण आणि इतर गोष्टींवर परिणाम झाला. कारण या गोष्टी फक्त पास धारकांपुरत्या उपलब्ध करण्यात आल्या होत्या. त्यामुळे प्रशासनावर ताण आला.

दुसरी गोष्ट म्हणजे पास धारक आणि बिनापासधारक प्रवाशांमध्ये जागेसाठी खटके उडू लागले. रेल्वे खचाखच भरल्याने पाय ठेवण्यासही जागा नव्हती. पास असलेल्यांची चांगली सोय झाली. रात्रीच्या जेवणाची त्यांची सोय झाली. मात्र पास नसलेल्यांना हातपाय पसरू देण्यास इतर प्रवाशांनी नकार देणे सुरू केले. प्रवास हा ६-७ तासांचा नव्हे, तर तब्बल ३६ तासांचा असल्याने प्रत्येकाला व्यवस्थितपणे, सुखकर पद्धतीने प्रवास करायचा होता. त्यांना हे आगंतुक प्रवासी नकोसे झाले होते. त्यामुळे काहींचे खटके उडणे गोवा ते रत्नागिरी प्रवासादरम्यानच सुरू झाले. कंटाळून काही प्रवाशांनी रेल्वे पाण्यासाठी आणि चालक, कर्मचारी बदलासाठी रत्नागिरी येथे थांबवली गेली, तेव्हा तेथे शंभरेक जणांनी उतरून गोव्यात परतीचा मार्ग पत्करणे सोयीस्कर मानले, असे अनेकजण आज सकाळी प्रयागराजऐवजी ते घरी परतले.

 

 

Konkan Railway | होळी विशेष गाड्यांचे चुकीचे नियोजन; प्रवासी संघटनांकडून नाराजीचे सूर

   Follow us on        

Konkan Railway:होळीला होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वे प्रशासनाने मध्य रेल्वेच्या समन्वयाने कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाड्या जाहीर केल्या आहेत. मात्र या गाड्यांच्या चुकीच्या नियोजनामुळे होळीला कोकणात गावाला जाणार्‍या कोकणकरांसाठी या गाड्यांचा खूप कमी फायदा होणार असल्याने प्रवासी संघटनांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

 

या विशेष गाड्या पैकी गाडी क्रमांक ०११५१ मुंबई सीएसएमटी – मडगाव ही गाडी दिनांक ६ आणि १३ (मध्यरात्री) आणि गाडी क्रमांक ०११२९ एलटीटी – मडगाव ही गाडी दिनांक १३ आणि २० या तारखांना रात्री सोडण्यात येणार आहे. १३ मार्च या दिवशी होळी असताना त्याच दिवशी रात्री सोडण्यात येणार्‍या गाड्यांचा उपयोग काय? ६ ते २५ मार्च सर्व गाड्यांचे आरक्षण फुल्ल असताना ह्या आठवडी विशेष गाड्या त्याही रात्रीचा प्रवास असणाऱ्या, गोव्यात जाणाऱ्या गाड्यांचा महाराष्ट्राला काय लाभ असा प्रश्न अखंड कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने विचारला आहे. तसेच होळी दरम्यान मुंबई चिपळूण, मुंबई रत्नागिरी दिवसा आणि मुंबई सावंतवाडी रात्री अशा किमान तीन दैनिक गाड्यांची आवश्यकता असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.

या गाड्यांना सेकंड स्लीपर या श्रेणीच्या डब्यांपेक्षा एसी श्रेणीचे डबे जोडले आहेत. गाडी क्रमांक ०११५१ /०११५२ मुंबई सीएसएमटी – मडगाव या गाडीला तब्बल १० थ्री टायर एसी श्रेणीचे आणि मात्र ४ स्लीपर श्रेणीचे डबे जोडले आहेत. त्यामुळे या गाड्या कोकणातील प्रवाशांसाठी न चालविता गोव्यासाठी चालविण्यात आल्याचा आरोप प्रवासी संघटनांनी केला आहे.

चौकट

मुंबई – सावंतवाडी,मुंबई -रत्नागिरी,मुंबई -चिपळूण ह्या गाड्या होळी दरम्यान चालवणे सोयीचे आहे.त्यामुळे कोकण रेल्वेला विनंती आहे की कोकणवासियांचा सोयीनुसार गाड्या सोडण्यात याव्यात,किंवा गणेशोत्सवादरम्यान वापरण्यात येणारा फॉर्म्युला होळी दरम्यान चालवावा ही विनंती. – कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडी 

होळी १३ तारखेला…. आणि गाड्या सोडल्या आहेत ६ आणि १३ तारखेला होळीदिवशीच….९,१०,११,१२ तारखेला होळीसाठी गाड्यांना वेटींग आहे तेव्हा एकही स्पेशल गाडी नाही सोडली…रेल्वेचे अजब लाॅजीकश्री गणेश चामणकर

 होळी स्पेशल आणखी काही रेल्वे गाड्यांची प्रवासी संघटनांची मागणी आहे. कोकण रेल्वे मार्गावर मार्च ते जून दरम्यान वाढती प्रवासी संख्या लक्षात घेता ह्या जादा रेल्वेना १० जून पर्यंत मुदतवाढ मिळावी.वसई सावंतवाडी कोकण रेल्वे प्रवासी संघटना 

पश्चिम रेल्वेवरून कोकणात होळीसाठी जाणाऱ्या चाकरमन्यांची संख्या जास्त आहे त्यासाठी ०९०५७/५८ ही उधना मेंगलोर एक्सप्रेस पुन्हा सुरू करावी. – श्री यशवंत जडयार,

 

दादर – रत्नागिरी पॅसेंजर दादर पर्यंत नेण्यासाठी दिवा – दादर मार्गाची पाहणी करणार – मध्य रेल्वेकडून आश्वासन

   Follow us on        

मुंबई : दादर – रत्नागिरी पॅसेंजर पूर्वीप्रमाणे दादर येथूनच सोडावी तसेच दादर – सावंतवाडी पॅसेंजर ट्रेन सुरू करण्याच्या या मागण्यांसाठी शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत (उबाठा) , रत्नागिरी सिंधुदुर्गचे माजी खासदार विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज गुरुवारी पुन्हा एकदा मध्य रेल्वेच्या महाप्रबंधक कार्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांना दादर – रत्नागिरी पॅसेंजर दादर वरून पुन्हा सुरू करण्यासाठी दादर दिवा मार्गाचे तीन दिवसात पाहणी करण्याचे आश्वासन देण्यात आले.

यापूर्वी दिलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने मध्य रेल्वेच्या प्रशासनाने संपूर्ण नकारघंटा वाजवलेली होती. परंतु आजच्या बैठकीमध्ये रेल्वे कामगार सेनेचे श्री. संजय जोशी, श्री बाबी देव यांनी दादर वरून गाडी कशी सोडता येईल आणि या गाडीमुळे इतर गाड्यांवर कोणताही परिणाम होणार नाही, हे अभ्यासाअंती मध्य रेल्वेचे महाप्रबंधक श्री.मीना व उपस्थित सर्व अधिकारी यांच्यासमोर मांडले. शेवटी श्री. मीना यांनी श्री. संजय जोशी आणि श्री. बाबी देव यांनी सुचविलेल्या पर्यायाबाबत त्यांच्याबरोबर दादर ते दिवा पर्यंतच्या मार्गाची पाहणी येत्या तीन दिवसात करावी आणि अहवाल सादर करावा, असे आदेश दिले.

शिष्टमंडळामध्ये खासदार – शिवसेना नेते श्री अरविंद सावंत, शिवसेना नेते माजी खासदार श्री. विनायक राऊत, श्री अरुणभाई दुधवडकर, आमदार श्री महेश सावंत, श्री.संतोष शिंदे, श्री. बाबी देव, श्री.संजय जोशी तसेच कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

कोकण रेल्वे मार्गावर होळीसाठी २ विशेष गाड्यांची घोषणा; आरक्षण या तारखेपासून सुरु

   Follow us on        
Konakn Railway:यंदा होळी सण साजरा करण्यासाठी कोकणात जाणाऱ्या कोकणकरांसाठी  एक खुशखबर आहे. होळी सणा  दरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी कोकण रेल्वेने मध्य रेल्वेच्या समन्वयाने काही विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्यांचा तपशील खालीलप्रमाणे
१) गाडी क्र. ०११५१/०११५२ मुंबई सीएसएमटी- मडगाव जं. – मुंबई सीएसएमटी विशेष:
गाडी क्र. ०११५१ मुंबई सीएसएमटी – मडगाव जं. विशेष ही गाडी  गुरुवार दिनांक ०६/०३/२०२५ आणि १३/०३/२०२५ रोजी मुंबई सीएसएमटी येथून ००:२०  वाजता सुटेल आणि त्याच दिवशी १३:३० वाजता मडगाव जंक्शनला पोहोचेल. .
गाडी क्र. ०११५२ मडगाव जं. – मुंबई सीएसएमटी स्पेशल ही गाडी  गुरुवार दिनांक ०६/०३/२०२५ आणि १३/०३/२०२५ रोजी मडगाव जंक्शन येथून १४:१५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ०३:४५ वाजता मुंबई सीएसएमटीला पोहोचेल.
ही गाडी गाडी दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिविम या स्थानकांवर थांबेल.
डब्यांची संरचना: एकूण २४ कोच : फर्स्ट एसी – ०१  कोच, कंपोझिट (फर्स्ट एसी + टू टायर एसी) – ०१  कोच, टू टायर एसी – ०२  कोच, थ्री टायर एसी – १० कोच, स्लीपर – ०४  कोच, जनरल – ०४  कोच, एसएलआर ०२
२) गाडी क्र. ०११२९ / ०११३० लोकमान्य टिळक (टी)  – मडगाव जं. – लोकमान्य टिळक (टी)  विशेष:
गाडी क्र. ०११२९  लोकमान्य टिळक (टी)- मडगाव जं. ही विशेष गाडी गुरुवार दिनांक १३/०३/२०२५ आणि २०/०३/२०२५ रोजी २२:१५ वाजता लोकमान्य टिळक (टी) येथून विशेष सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 12:45 वाजता मडगाव जंक्शनला पोहोचेल.
गाडी क्र. ०११३० मडगाव जं. – लोकमान्य टिळक (टी) विशेष ही गाडी  शुक्रवार दिनांक १४/०३/२०२५ आणि २१/०३/२०२५ रोजी १३:४० वाजता मडगाव जंक्शन येथून  सुटेल आणि  दुसऱ्या दिवशी लोकमान्य टिळक (टी) येथे ०४:०५ वाजता पोहोचेल.
ही गाडी ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम आणि करमाळी स्थानकावर थांबेल.
डब्यांची रचना : एकूण २० एलएचबी कोच : फर्स्ट एसी – ०१ कोच, टू टायर एसी – ०२ कोच, थ्री टायर एसी – ०६ कोच, स्लीपर – ०८ कोच, पँट्री कार – ०१, जनरेटर कार – ०२ .
गाडी क्रमांक ०११५२ आणि ०११३० या गाड्यांचे आरक्षण दिनांक २४/०२/२०२५  रोजी सर्व प्रवासी आरक्षण प्रणाली (PRS), इंटरनेट आणि IRCTC वेबसाइटवर उपलब्ध होणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनातर्फे देण्यात आली  आहे.

“… तर विशेष गाड्यांतून प्रवास करणे परवडेल.” कोकण विकास समितीने रेल्वेकडे केली ‘ही’ मागणी…

   Follow us on        
Konkan Railway: हंगामाच्या आणि सणासुदीच्या काळात प्रवाशांची गर्दी कमी करण्याच्या हेतूने रेल्वे प्रशासन तात्पुरत्या स्वरूपात काही विशेष गाड्या चालवून प्रवाशांना दिलासा देते. कोकण रेल्वे मार्गावर गणेश चतुर्थी, होळी, उन्हाळी सुट्टी तसेच ईतर हंगामाच्या कालावधीत विशेष गाड्या चालविण्यात येतात. या गाड्यांचा तिकीटदर नियमित गाड्यांच्या तिकीट दरापेक्षा जास्त असतो. काही स्थानकांदरम्यान हा दर दुपटी पेक्षा जास्त असतो. कोकण विकास समितीने याकडे रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधले असून कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाड्या चालविताना प्रवाशांना परवडेल अशा प्रकारे त्यांचे नियोजन करावे अशी विनंती केली आहे.
विशेष गाड्यांसाठी  २०१५ साली जाहीर करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार नुसार या गाडय़ांचे तिकीटदर आकारले जातात.या नियमावली नुसार विशेष गाड्यांना तिकीटदरा व्यतिरिक्त  सेकंड क्लास श्रेणी साठी १०% तर ईतर श्रेणी करिता ३०% अतिरिक्त दर आकारले जातात.
अतिरिक्त तिकीट दर आकारणीची किमान आणि कमाल मर्यादा खालील टेबल नुसार आहे.
तसेच या विशेष गाड्यांच्या  तिकीटदरांसाठी किमान प्रवास अंतर ठरविण्यात आले आहे. ते खालीलप्रमाणे
या नियमावलीनुसार मुंबई ते माणगाव किंवा खेड प्रवास करणाऱ्या प्रवाशाला स्लीपर श्रेणी च्या डब्यातून प्रवास करण्यासाठी 500 किलोमीटर प्रवासाचे पैसे द्यावे लागत आहेत. कारण नियमावली नुसार स्लीपर श्रेणीच्या तिकीटदरांसाठी  किमान प्रवास अंतर ५०० किलोमीटर आहे. म्हणजे तुम्ही १०० किलोमीटर प्रवासाचे आरक्षण करायला गेलात तरी तुम्हाला ५०० किलोमीटरप्रमाणे तिकीट दर द्यावाच लागणार आहे. या कारणाने कमी अंतराच्या प्रवासासाठी विशेष गाड्यांचा तिकिटदर दुपटी पेक्षा जास्त वाढतो.
CSMT to KHED Fare for Regular Train Fare for Special Train
Sleeper (SL) ₹ 190 ₹ 385
Three Tier AC (3A)
₹ 505 ₹ 1,050
Two Tier AC (2A) ₹ 710 ₹ 1,440
मात्र सेकंड सीटिंग (2S) आणि एसी चेअर कार (CC) या साठी किमान अंतर अनुक्रमे 100 आणि 250 एवढे आहे. त्यामुळे कमी अंतरासाठी विशेष गाड्यांचा तिकीटदरांत नियमित गाड्यांच्या तिकीट दरांमध्ये मोठा फरक नसतो. त्यामुळे मुंबई ते खेड, चिपळूण, रत्नागिरीसाठी स्लीपर क्लास आणि त्यावरील श्रेणीच्या गाड्या न चालविता सेकंड सीटिंग (2S) आणि एसी चेअर कार (CC) या श्रेणीचे डबे असलेल्या गाड्या चालविण्यात याव्यात अशी विनंती कोकण विकास समितीचे जयवंत शंकर दरेकर यांनी समितीच्या वतीने ईमेल द्वारे रेल्वे प्रशासनला केले आहे.

एलएचबी स्वरुपात धावलेल्या मत्स्यगंधा एक्सप्रेसचे उद्घाटन

   Follow us on        

Konkan Railway : मत्स्यगंधा एक्सप्रेस काल 17 फेब्रुवारी रोजी नव्याने जोडण्यात आलेल्या LHB (लिंक हॉफमन बुश) डब्यांसह पहिल्यांदा चालविण्यात आली. उडुपी-चिक्कमगालुरूचे खासदार कोटा श्रीनिवास पुजारी यांनी LHB डब्यांमध्ये प्रवास करून या नवीन रेकचे उद्घाटन केले.

25 वर्षांपासून सुरू असलेल्या या ट्रेनला आता जुने डबे बदलून नवीन डबे बसवण्यात आले आहेत. अपग्रेड केलेल्या ट्रेनचे उद्घाटन 17 फेब्रुवारी रोजी झाले. उडुपी-चिक्कमगालुरूचे खासदार कोटा श्रीनिवास पुजारी यांनी ही गाडी LHB स्वरुपात चालविण्यात यावी यासाठी प्रयत्न केले होते.

“मत्स्यगंधा एक्स्प्रेसमधील समस्यांवर प्रकाश टाकणारा धीरजचा व्हिडिओ पाहिल्यानंतर, मी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि राज्यमंत्री सोमन्ना यांच्याशी संपर्क साधला आणि विनंती केली. युनियनच्या मान्यतेने, जर्मन मॉडेलवर आधारित सुधारित मत्स्यगंधा ट्रेन सुरू करण्यात आली. ट्रेनमध्ये आता तात्काळ अपघाताचे संकेत दिले गेले आहेत आणि ते अधिक प्रवासी-अनुकूल आणि कमी गोंगाट करणारे डिझाइन केले आहे. याशिवाय, कोकण रेल्वे स्थानकासाठी 30 ते 40 कोटी रुपयांचा विकास आराखडा प्रस्तावित करण्यात आला असून त्यात सुधारित पार्किंग आणि इतर सुविधांचा समावेश आहे. डिझाईन 1 मार्चपर्यंत पूर्ण होईल आणि त्यानंतर निविदा प्रक्रियेकडे जाईल. कोकण रेल्वेला भारतीय रेल्वे नेटवर्कमध्ये समाविष्ट करणे हे आमचे प्राथमिक ध्येय आहे. मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांनी या उपक्रमाला पाठिंबा दिला आहे.” असे ते यावेळी म्हणाले.

यावेळी आमदार यशपाल सुवर्णा, रेल्वेचे अधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

Konkan Railway: महाकुंभमेळा विशेष गाडीच्या डब्यांत वाढ

   Follow us on        

Konkan Railway: महाकुंभमेळ्यासाठी चालविण्यात येणाऱ्या विशेष गाडीच्या डब्यांत वाढ करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. गाडी क्र. ०११९२ / ०११९१  उडुपी – टुंडला जं. – उडुपी महाकुंभ विशेष या गाडीला स्लीपर श्रेणीचे २ अतिरिक्त डबे जोडण्यात येणार आहेत. त्यामुळे या गाडीच्या डब्यांची संख्या २० वरून २२ होणार आहे. प्रवाशांनी या गाडीला दिलेला प्रतिसाद लक्षात घेऊन या गाडीच्या डब्यांत वाढ करण्यात आली आहे.

गाडी क्र. ०११९२ उडुपी – टुंडला जं. महाकुंभ विशेष ही गाडी सोमवार, १७/०२/२०२५ रोजी दुपारी १२:३० वाजता उडुपी येथून  सुटेल आणि टुंडला जंक्शनला तिसऱ्या दिवशी १३:००  वाजता  (बुधवार)  पोहोचेल.

गाडी क्र. ०११९१  तुंडला जं. – उडुपी महाकुंभ विशेष गाडी तुंडला जंक्शन येथून  गुरुवार, २०/०२/२०२५ रोजी सकाळी ०९:३० रवाना होईल आणि तिसऱ्या दिवशी १८:१० वाजता (शनिवार) उडुपीला पोहोचेल.

ही गाडी बरकुर, कुंदापुरा, मुकांबिका रोड बयंदूर, भटकळ, मुर्डेश्वरा, कुमटा, गोकर्ण रोड, कारवार, मडगाव जंक्शन, रत्नागिरी, चिपळूण, रोहा, पनवेल, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, इटारसी, जंयपुरी, माणिकपूर, मणिकपूर, मणिकपूर प्रयागराज जंक्शन, फतेहपूर, गोविंदपुरी आणि इटावा स्टेशन या स्थानकांवर थांबेल.

या गाडीच्या डब्यांची सुधारित  रचना : एकूण 22 कोच : दोन टियर एसी – 01 कोच, थ्री टायर एसी – 05 कोच, स्लीपर – 12 कोच, जनरल – 02 कोच, SLR – 02.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search